adv अपर्णा रामतीर्थ आणि स्त्रीमुक्ती
https://www.youtube.com/watch?v=v-itTTYxzGU
हि एक लिंक पाहिली.
ह्या अपर्णा ताई अजूनही काही लिंक्स वर बरेच बोधामृत पाजतांना दिसतात. कायाप्पा वर त्यांच्या भाषणांचे तुकडे फिरताहेत. त्यांचे कहि मुद्दे अस्तिल्हि बरोबर पण विवाह संस्थे विषयी त्यांची मते एकांगी .... एके ठिकाणी तर सुरुवातीलाच त्या बजावतात मी आई म्हणून बोलते त्यामुळे मला प्रश्न विचारायचे नाहीत कारण म्हणे आईच ऐकावच लागत
मुलींना आणि स्त्रियांना पिढ्यान पिढ्या ज्या प्रकारे वंचित ठेवले गेले; त्यामुळे लग्नसंस्थे मध्ये मुलींची एक जोरदार प्रतिक्रिया सध्या उमटतांना दिसते आहे ... काही ठिकाणी त्याचा अतिरेक असेलही पण त्याला नाईलाज आहे कारण ती सामाजिक प्रतिक्रिया आहे
ह्या सोलापूरच्या वकील बाई मूल दत्तक घ्यायला आलेल्या जोडप्यातील मुलीला अक्कल शिकवतात मातृत्व किती महान पवित्र वगैरे पण त्या मुलाला एक शब्द बोलत नाहीत ??
एकुलत्या एक मुलाच्या आईला प्रोब्लेम्स, पण मग एकुलत्या एक मुलीच्या आईवडीलांच काय ? ह्या बाई चक्क नवीन सासवांना सुनेशी खोट बोलायला शिकवतात ??
“मुलाला केलेला फोन सुनेने घेतला तर म्हणाव आग तुझा फोन लागत नव्हता म्हणून मुलाच्या फोन वर केला....पुढे जाऊन म्हणे मुलाला सांगा की ऑफिस मधून मला फोन कर”
अजून एक अशीच पोस्ट वाचलेली, मुलींची लग्न म्हणे १८-२० ह्या वयोगटात करा कारण मुली छान दिसतात त्या वयात. नंतर त्या वयस्कर दिसतात आणि लग्न व्हयला उशीर होतो कारण काय तर म्हणे वधूच्या बापाचा माज (हि त्या पोस्ट ची भाषा, माझी नाही ) की आमची मुलगी शिकल्याशिवाय लग्न करायचं नाही आणि मग म्हणे सगळे प्रोब्लेम्स सुरु होतात.
मुलगी सुंदर हवी पण मुलगा सेटल्ड हवा म्हटले की प्रोब्लेम
मुलगी चांगल्या आर्थिक परिस्थितीत असेल तर हवीये पण मुलाचा flat गाडी वाला हवा म्हटले की “तुझ्या बापाची होती का ह्या वयात गाडी हि भाषा”
मुलगी कमवती हवी पण घरदार खाणपिणं, सासू सासरे वगैरे नित सांभाळावे, हि अपेक्षा तिने सासू सासर्यांना डस्टबिन म्हणणे चुकीचे आहेच पण सुनेच्या आईवडिलांना तशी ट्रीटमेंट दिली जात नाही ? त्यांना मनापासून आपलेसे करणारे किती मुल आणि मुलाकडचे आहेत ?
मुलीच्या आईवडिलांचा वावर हा ढवळाढवळ असेल तर मुलाच्या आईवडिलांचा वावर हा हक्क ?? ( हे पूर्वी सर्व मान्य होत पण आता ह्याला प्रचंड विरोध होत आहे)
तस्मात प्रश्न जटील होत चालला आहे आणि तो आणखीन बिकट होणार आहे ...दोन्ही बाजूंनी भरपूर वाद घालता येतो आणि येईल ... पण आपली मानसिकता कधी आणि कशी बदलणार ? त्यात ती काहे दिया वगैरे सारखी मालिका तर आगीत पेट्रोल ....
समाज म्हणून आपण तसे बरेच अपरीपक्व आहोतच त्यात ह्या अश्या क्लिप्स आणि चेपू पोस्ट्स मुळे भरघोस भर. आनंद आहे ..
बाकी पिढ्यानपिढ्या स्त्रीला वगैरे ठेवले गेले वगैरे सरळसरळ स्त्रीमुक्तीचं थोतांड आहे."वंचित" हा शब्द पण लिहा हो.थोडा जगाचा खरा अभ्यास करा( अनेक गावात, घरात जाऊन,घराबाहेर पडुन, विशेषतः ग्रामीण भागाचा)
=================== इथं लष्कर स्त्रियांना लढाऊ पलटणी, लढाऊ वैमानिक , मेडिकल अश्या सगळ्या क्षेत्रांत एंट्री देतंय अन वरचे तुमचेच रीग्रेसीव विचार पहा. निसर्गानेच पुरुषाला 'घराबाहेरच्या' कामांत कणखर बनवल्याचे वैद्यानिक दृष्ट्या सिद्ध करायचं बघा. स्त्री पुरुषांतील शारीरिक मानसिक रासायनिक (?) फरक तुम्हाला तरी नीट माहिती आहेत का ? कारण ते परत एकदा नीट वाचायची गरज तुम्हालाच आहे असे प्रकर्षाने जाणवले.थोडा जगाचा खरा अभ्यास करा( अनेक गावात, घरात जाऊन,घराबाहेर पडुन, विशेषतः ग्रामीण भागाचा)
================== मुद्दा क्रमांक ३ लक्षात घ्यायच्याही लेवलचा वाटत नाहीये. अन मुद्दा क्रमांक चार अपर्णाताई ह्यांच्या संवैधानिक हक्कांशी संबंधित आहे, जोवर त्यांची भाषा संसदीय आहे तोवर त्यांना वाटेल त्या स्वरात, वाटेल ते (संसदीय कंटेंट) बोलायचं त्यांना स्वातंत्र्य आहे. कोणी कश्याचा कश्याला अभ्यास करावा हे सांगायची तुम्ही गरज नाही अन तुम्हाला तो हक्कही नाही इतकं (तूर्तास) लक्षात घेतलं तरी पुरे.