चालू घडामोडी - फेब्रुवारी २०१९
.
२०१९चा लेखानुदान (अंतरिम अर्थसंकल्प) काल अर्थमंत्री श्री पियुष गोयल यांनी संसदेत सादर केला. अपेक्षेप्रमाणे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन यात लोकप्रिय योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.
अर्थमंत्र्यांच्या भाषणाचा संपूर्ण गोषवारा इथे इंग्लिशमध्ये वाचता येईल.
अर्थसंकल्पातील काही ठळक योजना:
महामार्ग बांधणीसाठी अतिरिक्त तरतूद
क्रीडाक्षेत्रासाठी वाढीव तरतूद
असंघटित क्षेत्रातील कामगार व शेतकरी यांच्यासाठी निवृत्तीवेतन
उपभोक्त्याकडे अधिक पैसे राहणार
या सुखांनो या!
.
एक प्रकट स्वगत:
मोदी सरकारने आपल्या पहिल्या कार्यकाळात केलेल्या उल्लेखनीय बाबींपैकी एक म्हणजे सामाजिक-राजकीय चर्चेचा रोख केवळ दलित-अल्पसंख्यांक-शेतकरी-ग्रामीण जनता (पहिला गट) यांवरून मध्यमवर्गीय-छोटे व्यापारी-शहरी जनता (दुसरा गट) यांच्यावर आणला.
म्हणजे, सर्वसाधारणपणे, कोणत्याही लाभप्रद योजना यापूर्वी मुख्यतः पहिल्या गटापैकी काही समाजघटकांसाठी असायच्या. दुसऱ्या गटाला शासनाकडून कुठल्या विशेष लाभाची गरजच नाही असा राजकीय विचारप्रवाह होता. खरंतर, दुसऱ्या गटातील समाजघटक हे अर्थव्यवस्थेचे key driving forces (मराठी?) असतात पण त्यांच्या लाभाची भाषा बोलण्यास आणि त्यांबध्दल काही करण्यास जणू काही अघोषित मज्जाव होता. अर्थव्यवस्थेतील एक प्रमुख घटक या न्यूनगंडानं पछाडलेला होता. त्यांच्यासाठी, आरक्षण, अतिरिक्त करमाफी, मुद्रा कर्ज, इ. योजना लागू करून, हे चित्र काही प्रमाणात बदलण्याचं श्रेय मोदींच्या आधुनिक राजकीय मांडणीला द्यायला हवं. तथापि, पहिल्या गटाकडे मोदी सरकारने दुर्लक्ष केलंय असं अजिबात नव्हे.
(संपादित)कोणताही "ठोस" पुरावा नसताना"या वेळेस"
असे विधान केल्याबद्दल आपला त्रिवार निषेध द्वेषामुळे आपली "वैचारिक पातळी" किती खाली घसरली आहे ते समजून येते आहे.विकास केल्याचाही कोणताही ठोस पुरावा नसताना शांघाय व कोलंबियाचे फोटो गुजरातचे म्हणून व्हॉट्सॅपवर पसरवून सत्ता मिळवली ना?हे म्हणताय त्याचा काही पुरावा? तुम्ही स्वतः गुजराथला गेलात का? शांघाय आणि कोलंबियाचे फोटो कोणी व्हाट्सअप वर पसरवले? जर मोदींनी चांगले काम केले नव्हते तर गुजराथच्या लोकांनी त्यांना सलग ३ वेळा मुख्यमंत्री म्हणून कसं काय निवडून दिलं?२६/११ चा हल्ला सुरु असताना मुंबईत येऊन गोंधळ घातलाच ना?कोणी कसला गोंधळ घातला? जरा संदर्भ पुरावे आणि उदाहरणे देऊन आपले मत मांडावे.पण सगळे भाजपातले महत्त्वाचे नेते सोडून अगदी गडकरी व यशवंत सिन्हांसारखे विद्वान व कार्यक्षम लोक सोडून लोक मोदी मोदी का करायला लागण्यामागे काय भावना आहे सगळ्यांना कळते आणि अशा गोष्टी कागदोपत्री कधी सिद्ध होत नसतात.कोणाला किती महत्व द्यायचे हा भाजपचा अंतर्गत मामला आहे ना? २०१४ च्या निवडणूक सुद्धा मोदीना पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करूनच लढल्या गेल्या. असे असूनही लोकांनी बहुमताने निवडून दिले. आता तुम्ही निवडणुकीवर आणि पर्यायाने लोकांच्या मतदानावरच प्रश्न उभा करताय. तरी बरं काँग्रेसमध्ये जसे गांधी आडनावामुळे पप्पुलाही पंप्र म्हणून प्रोजेक्ट केले जाते तसे भाजपात होत नाहीये. उद्या मोदी नाही चालले तर दुसऱ्या कोणाला उमेदवारी देतील. पण काँग्रेसमध्ये मात्र पप्पू नंतर आता प्रियांका आली. काय तर म्हणे तिचं नाक आजीसारखं आहे. बाकी द्वेष वगैरे म्हणताय तर मोदींचे मुसलमानांप्रती द्वेष जाहीर करणारे भाषण दाखवा बघू. ओवैसी जसे १५ मिनिटांसाठी पोलीस काढा आणि आम्ही सगळे हिंदू कापून काढू म्हणाला तसे किंवा काँग्रेसी जसे हिंदू दहशतवाद म्हणतात किंवा भारताच्या संपत्तीवर मुसलमानांचा पहिला हक्क आहे असे डिस्क्रिमिनेशन करणारे वक्तव्य करतात तसे मोदींनी काय काय म्हणले आहे याची यादी इथेच या धाग्यावर पुराव्यांसहित द्या. स्वीकारताय हे आव्हान?