चालू घडामोडी - फेब्रुवारी २०१९
.
२०१९चा लेखानुदान (अंतरिम अर्थसंकल्प) काल अर्थमंत्री श्री पियुष गोयल यांनी संसदेत सादर केला. अपेक्षेप्रमाणे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन यात लोकप्रिय योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.
अर्थमंत्र्यांच्या भाषणाचा संपूर्ण गोषवारा इथे इंग्लिशमध्ये वाचता येईल.
अर्थसंकल्पातील काही ठळक योजना:
महामार्ग बांधणीसाठी अतिरिक्त तरतूद
क्रीडाक्षेत्रासाठी वाढीव तरतूद
असंघटित क्षेत्रातील कामगार व शेतकरी यांच्यासाठी निवृत्तीवेतन
उपभोक्त्याकडे अधिक पैसे राहणार
या सुखांनो या!
.
एक प्रकट स्वगत:
मोदी सरकारने आपल्या पहिल्या कार्यकाळात केलेल्या उल्लेखनीय बाबींपैकी एक म्हणजे सामाजिक-राजकीय चर्चेचा रोख केवळ दलित-अल्पसंख्यांक-शेतकरी-ग्रामीण जनता (पहिला गट) यांवरून मध्यमवर्गीय-छोटे व्यापारी-शहरी जनता (दुसरा गट) यांच्यावर आणला.
म्हणजे, सर्वसाधारणपणे, कोणत्याही लाभप्रद योजना यापूर्वी मुख्यतः पहिल्या गटापैकी काही समाजघटकांसाठी असायच्या. दुसऱ्या गटाला शासनाकडून कुठल्या विशेष लाभाची गरजच नाही असा राजकीय विचारप्रवाह होता. खरंतर, दुसऱ्या गटातील समाजघटक हे अर्थव्यवस्थेचे key driving forces (मराठी?) असतात पण त्यांच्या लाभाची भाषा बोलण्यास आणि त्यांबध्दल काही करण्यास जणू काही अघोषित मज्जाव होता. अर्थव्यवस्थेतील एक प्रमुख घटक या न्यूनगंडानं पछाडलेला होता. त्यांच्यासाठी, आरक्षण, अतिरिक्त करमाफी, मुद्रा कर्ज, इ. योजना लागू करून, हे चित्र काही प्रमाणात बदलण्याचं श्रेय मोदींच्या आधुनिक राजकीय मांडणीला द्यायला हवं. तथापि, पहिल्या गटाकडे मोदी सरकारने दुर्लक्ष केलंय असं अजिबात नव्हे.
हे जे झुकतं माप दिलंय ते किती दिलंय आणि त्यामुळं मुसलमानांचा किती फायदा झाला याची माहिती तुम्हाला असेलच, ती देखील सांगा. की मनमोहन सिंग यांचा हा 15 लाख रूपये सारखाच चुनावी जुमला होता?" तुम्ही तर या प्रतिसादात फक्त सच्चर समितीचा उल्लेख केला आहे. मी निदान एक वाक्य तरी दिलं. एवढी तुम्हाला सच्चर समितीच्या रिपोर्ट समग्र माहित आहे तर एक लेख लिहा ना काय रिपोर्ट काय सांगतो आणि आत्ताच्या सरकारांनी काय काय केले आणि काय नाही केले.शिवाय सेल्फ गोल म्हणजे काय याचे उदाहरण तुमच्या प्रतिसादात दिसेल.हाहा, एकही प्रतिसाद धड देता येत नाही पण तुमचा कॉन्फिडन्स मात्र वाखाणण्यासारखा आहे. थोडी प्रयत्नांची दिशा बदललीत आणि झापडं काढलीत तर हळू हळू जमू शकेल.मी कुठेही मोदी शब्द वापरला नाही तरी तुम्हाला जुमला म्हटल्यावर मोदी आठवले.नाही हो, जुमला म्हणलं म्हणून नाही तर १५ लाख म्हणलं म्हणून आठवले. सगळे विरोधक वाडगा घेऊन कधीच आस लावून बसलेत.एखाद्या गोष्टीवर आक्षेप घेताना किमान सुसंगत दिसेल असा प्रयत्न करा.कोण कोणास म्हणाले! स्वतःचे प्रतिसाद लिहिताना थोडा विचार करत जा, आधीच्या प्रतिसादाचा रेफरन्स घ्या, संशोधन करत जा आणि नंतर १० वेळा वाचत जा. नाहीच जमलं तर बुद्धिवर्धक औषधे घेऊन बघा. एक गोष्ट मात्र नमूद करण्यासारखी आहे की माझ्या प्रतिसादांवर आक्षेप तुम्ही घेताय, त्यातही एक पण गोष्ट सुसंगत सोडा पण धडपणे मांडताही आली नाहीये. बाकी तुम्ही स्वतःला एवढे शहाणे समजत असाल तर मी काही प्रश्न विचारले आहेत त्याची उत्तरे द्या - १. मुसलमानांनी प्रगती करू नये म्हणून कोणी हिंदू विशेष प्रयत्न करताय का? २. देशाच्या पंतप्रधानांनी एखाद्या धार्मिक गटाला झुकते माप का द्यायचे? याचे स्पष्टीकरण ३. १५ लाखांचा प्रत्येकाला देऊ असा चुनावी जुमला कोणी कधी केला त्याचा अधिकृत पुरावा द्या. ४. मुस्लिम लोकांच्या प्रगती साठी मुस्लिम धार्जिण्या काँग्रेसने आत्तापर्यन्त काय काय प्रयत्न केले? ५. सचर समितीच्या रिपोर्टबद्दल तुमचे आकलन काय आहे? ६. सरकारने मुस्लिम लोकांच्या प्रगतीसाठी काय पावले उचलायला पाहिजेत? तुमच्या सोयीसाठी सगळे प्रश्न एकत्र विचारलेत. आता दाखवा तुम्ही किती सुसंगत आणि मुद्देसूद उत्तरे देताय.