Skip to main content

स्वयंपाकघर

लेखक जागु यांनी बुधवार, 08/03/2017 14:25 या दिवशी प्रकाशित केले.
माणसांच्या आनंदाचा मार्ग पोटातून जातो त्या प्रमाणेच घराच्या आनंदाचा मार्ग स्वयंपाक घरातून जातो असे म्हणायला हरकत नाही. घरातील स्त्रीसाठी तर स्वयंपाक घराला घराच्या ऋदयच स्थान असत. ह्या स्वयंपाक घराच आणि तिच प्रेमळ नात निर्माण झालेलं असत. ती घरात जितका वेळ असते त्यातील तिचा ७०% तरी वेळ स्वयंपाकघरातच जातो. केवळ स्त्रीच नाही तर घरातील प्रत्येक व्यक्ती रोज ह्या स्वयंपाक मंदिरात हजेरी लावतोच. ह्याच स्वयंपाक घरात अग्नीदेवतेचा वास असतो. जीवन म्हणजेच पिण्याचे पाणी असणार्‍या पाण्याचा माठ म्हणा की फिल्टर हा अग्रस्थानी असतो. इथलं बेसिन म्हणजे नळातून येणार्‍या पाण्याचा चैतन्याचा झरा.

आवाज: स्त्रीमुक्तीचा

लेखक सचिन तालकोकुलवार यांनी बुधवार, 08/03/2017 11:37 या दिवशी प्रकाशित केले.
स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतरही महिलांना आपल्या स्वातंत्र्यासाठी, समानतेसाठी झगडावे लागत आहे. हि अत्यंत खेदाची बाब आहे. स्त्रियांच्या या स्तिथीमागे हजारो वर्षांपासूनची गुलामगिरीची परंपरा आहे. खरे तर जेव्हा महिलांना आर्थिक व्यवहारातून वगळण्यात आले व त्यांचे उत्पन्नाचे स्रोत नाकारण्यात आले तेव्हापासून महिला पुरुषांवर अवलंबित ठेवून पुरुषसत्तेचे गुलाम म्हणून ठेवण्यात आले. त्यानंतर स्त्रियांना शिक्षणापासून वंचित करण्यात आले व निर्णय घेण्याचे हक्क पुरुषांना मिळाला.

वर्ल्डकप क्लासिक्स - २०११ - फायनल - भारत विरुद्ध श्रीलंका

लेखक स्पार्टाकस यांनी बुधवार, 08/03/2017 08:07 या दिवशी प्रकाशित केले.
२ एप्रिल २०११ वानखेडे, मुंबई भारतीय क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबईच्या वानखेडे स्टेडीयममध्ये वर्ल्डकपचे संयुक्त यजमान असलेल्या भारत आणि श्रीलंका यांच्यात वर्ल्डकपची फायनल रंगणार होती. वर्ल्डकपच्या फायनलमध्ये दोन आशियाई संघ समोरासमोर येण्याची ही पहिलीच वेळ होती. सेमीफायनलमध्ये श्रीलंकेने कोलंबोला न्यूझीलंडचा पराभव केला होता तर भारताने मोहालीला पारंपारीक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानविरुद्ध वर्ल्डकपमधलं आपलं रेकॉर्ड ५-० असं पुढे नेलं होतं.

मिनार - An Insight

लेखक चित्रा लेले यांनी बुधवार, 08/03/2017 06:09 या दिवशी प्रकाशित केले.
. मिनार! माझी आणि तिची ओळख प्राचार्यांच्या कक्षात झाली. "मिनार आपल्या महाविद्यालयात प्रवेश घेते आहे. तिला राज्यशास्त्र विषय हवा आहे आणि तिला स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत. तिला तुमच्या वर्गात घ्या." प्राचार्यांनी ओळख करून दिली आणि मिनार माझी विद्यार्थिनी झाली. पण खरं तर तिनेच मला कितीतरी गोष्टी शिकवल्या आहेत. चुणचुणीत, वर्गात शंका विचारणारी, "मिस, मला काय वाटतं..." म्हणत आपलं मत मांडणारी मिनार हळूहळू रुळत गेली, आमच्या वर्गाचा भाग बनली. तिचं दिव्यांग असणं कधी जाणवलं नाही.

असं का?

लेखक ज्योति अळवणी यांनी मंगळवार, 07/03/2017 22:17 या दिवशी प्रकाशित केले.
उद्या आठ मार्च.... त्या निमित्ताने परत एकदा स्त्रीच्या अस्तित्वाचं... तिच्या त्यागाचं... तिच्या संसारासाठी झिजण्याचं आणि झटण्याच.... ती करत असलेल्या सर्वांच्या सेवेचं.... खूप कौतुक होईल! आणि अर्थात ते झालच पाहिजे. Because she deserves it! Rather its her right. पण आपण हे अस स्त्रीच्या स्त्रीत्वाच कौतुक करून तिने कायम सगळ्यांच सगळ केलच पाहिजे ही अपेक्षा करायला मोकळे होतो का? आज एक व्हिडीओ whatsapp वर मला आला. किशोरी शहाणे आणि सचिन खेडेकर दोघे आहेत यात. १ मिनित ४० सेकंदाचा व्हिडीओ आहे. पण त्यात खूप सुंदर गोष्ट इतक्या कमी वेळात चित्रित केली आहे.

मी बाई होते म्हणुनी - भाग १४

लेखक ५० फक्त यांनी मंगळवार, 07/03/2017 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या वाड्यापासुन वनविहाराची नवीन जागा बरीच लांब होती, तिथे पोहोचेपर्यंत कुणीच काही बोललं नाही, असे ही त्या रथाच्या खडखडाटामध्ये काही ऐकु येणं शक्य ही नव्हतं. आम्ही वनाजवळ पोहोचलो आणि रथातुन उतरुन विश्रांतीस्थळाकडे चालत निघालो, दहा बारा योजने चाललो तेवढ्यातच राजा दशरथ आणि राजकुमार आल्याची सुचना घेउन एक सैनिक आला, आम्ही त्यांच्या स्वागतासाठी होतो तिथेच थांबलो. राजा दशरथ स्वत्ः सगळ्यांत पुढे होते, त्यांच्या डाव्या बाजुला राम आणि भरत तर उजव्या बाजुला लक्ष्मण आणि शत्रुघ्न होते.

भान सुटलेल्या निवेदीतांच्या निवेदनातील (निसटत्या) बाजू

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 07/03/2017 14:17 या दिवशी प्रकाशित केले.
देश कसा एकत्र राहील त्या एवजी देश इतिहासात एक कसा नव्हता यावर फोकस करणारी जी काही प्राध्यापक मंडळी गेल्या काही दशकात दिल्लीत एकत्रित जमून त्यांचे तत्वज्ञान गल्ली पर्यंत पोहोचावे असा त्यांचा जोरकस प्रयत्न चालू आहे आणि उथळ माध्यमांची साथ पाहता ते होण्यास खूप कालावधी लागेल असे नव्हे. असो अशा देश विभाजनावर फोकस असलेल्या दिल्लीतील प्राध्यापक मंडळीतील एक नाव म्हणजे निवेदीता मेनन या दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील एक प्राध्यापक आहेत.

अंजलीची गोष्ट - रिप्लाय

लेखक aanandinee यांनी मंगळवार, 07/03/2017 13:06 या दिवशी प्रकाशित केले.
"फ्री आहेस का बोलायला?"..... मनस्वीने विचारलं. "हो बोल. सगळं आटपलंय . रात्र झालीये इथे. तू घरी चाललीयेस का?" अंजली "हो" मनस्वी म्हणाली. दोघीनाही घरी जाताना ऑन द वे एकमेकींना फोन करायची सवय होती. "ब्लूटूथ वर बोलतेयस ना, ड्राईव्ह करताना हातात नको घेऊ हं फोन !" अंजली. "हो ग. ब्लूटूथवरच बोलतेय. ऐक ना. स्वप्नीलचा मेसेज आलाय व्हॉट्स अँपवर." मनस्वीला पाल्हाळ लावायची सवयच नव्हती. डायरेक्ट मुद्द्यावर! "स्वप्नील आठवतो ना? माझ्याबरोबर इंजिनीरिंगला होता" तिने थोडं बिचकत विचारलं. "हो आठवतो.... इतक्या वर्षांत कधी बोलणं नाही झालं त्याच्याबद्दल. कुठे असतो तो?आणि मेसेज का केला होता?" अंजलीने विचारलं.

वर्ल्डकप क्लासिक्स - २०११ - सेमीफायनल - भारत विरुद्ध पाकिस्तान

लेखक स्पार्टाकस यांनी मंगळवार, 07/03/2017 09:18 या दिवशी प्रकाशित केले.
३० मार्च २०११ पीसीए, मोहाली चंदीगडमधल्या मोहालीच्या मैदानात 'Mother of all contests' - भारत आणि पाकिस्तान या पारंपारीक कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधली दुसरी सेमीफायनल रंगणार होती. क्वार्टरफायनलला भारताने सलग ३ वेळा वर्ल्डकप जिंकणार्‍या ऑस्ट्रेलियाला बाहेरचा रस्ता दाखवला होता तर पाकिस्तानने वेस्ट इंडीजचा अक्षरशः खिमा केला होता. या सेमीफायनलमधील विजेत्या संघाची फायनलमध्ये मुंबईला वानखेडेवर श्रीलंकेशी गाठ पडणार होती. क्वार्टरफायनलमध्ये दक्षिण आफ्रीकेला धूळ चारणार्‍या न्यूझीलंडचा श्रीलंकेपुढे मात्रं निभाव लागला नव्हता.