Skip to main content

THRILL…..Once Again

लेखक एक एकटा एकटाच यांनी बुधवार, 20/04/2016 09:54 या दिवशी प्रकाशित केले.
THRILL…..Once Again ****************************************************************************** वाचकांसाठी एक नम्र विनंती. ह्या कथेतील संदर्भ सम्जुन घेण्यासाठी तुम्हाला अगोदर माझी "Thrill" हि कथा वाचावी लागेल. http://www.misalpav.com/node/30565 ****************************************************************************** कधी कधी काही काही गोष्टी प्रारब्धातच लिहिलेल्या असतात. अगदी ठरवुनही टाळता येत नाहीत अश्या काही. अशीच एक गोष्ट माझीही आहे. मला आजही आठवतय त्यादिवशी शुक्रवार होता. संध्याकाळी अंड्याचा फोन आ्लेला.

अॅगाथा क्रिस्ती (जागतिक पुस्तक दिन लेखमाला)

लेखक जुइ यांनी बुधवार, 20/04/2016 07:16 या दिवशी प्रकाशित केले.
Header मर्डर इज अनाउन्सड!! शsssssssss खून झाला आहे! "A Murder is announced" मर्डर मिस्टरीज वाचणार्‍यांसाठी परिचित असे हे वाक्य आणि कादंबरी देखील. या कादंबरीची लेखिका आहे Queen of crime म्हणून नावाजलेली अ‍ॅगाथा क्रिस्ती. १५ सप्टेंबर १८९० साली Agatha Mary Clarissa Miller चा जन्म अमेरिकन वडील आणि ब्रिटिश आईच्या पोटी Torquay इंग्लंड येथे झाला.

पुस्तकांची काळजी कशी घ्यावी? (जागतिक पुस्तक दिन लेखमाला)

लेखक अनाहिता यांनी मंगळवार, 19/04/2016 23:21 या दिवशी प्रकाशित केले.
Header
  • पुस्तकं स्वच्छ हातांनी हाताळावीत.
  • शक्यतो पुस्तक वाचातांना / हाताळतांना खाण्यापिण्याचे पदार्थ दूर ठेवावेत.
  • खुणेसाठी पानं कोपर्‍यात दुमडण्याऐवजी पुस्तकखुणा (बुकमार्क्स) वापरावेत.
  • नविन पुस्तक घेतल्यावर प्लॅस्टीक अथवा कागदी कव्हर घालावं.
  • पुस्तकांचं कपाटं सूर्यप्रकाश थेट पुस्तकांवर पडेल अशा ठिकाणी नसावं.
  • पुस्तकं अधून मधून हाताळत रहावी.

दारावर भाजी महाग का?- स्पष्टीकरण भाजीवाल्याचे

लेखक विवेकपटाईत यांनी मंगळवार, 19/04/2016 21:47 या दिवशी प्रकाशित केले.
हा लेख ठेल्यावर भाजी विकणार्या भाजीवाल्याच्या स्पष्टीकरणावर आधारित आहे. तसे म्हणाल तर आठवड्यातून २-३ दिवस घराच्या १-२ किमी परिसरात कुठला ना कुठला साप्ताहिक बाजार हा लागतोच. पण नेहमीच अश्या बाजारांंत जाणे जमत नाही. आठवड्यातून एक-दोनदा तरी आमची सौ. दारावर भाजी विकत घेते. भाजीवाला जवळपास राहणारा आहे. हा भाजीवाला दररोज ठेल्यावर भाजी सजवून संध्याकाळी ५ ते रात्री ९-१० पर्यंत भाजी विकण्यासाठी उत्तम नगरच्या गल्ली बोळ्यात फिरतो. साधारणत: हा हिवाळ्याच्या दिवसांत २०० किलो आणि उन्हाळ्यात १५० किलो भाजी विकतो. पावसाळ्यात याहून कमी. गेल्या आठवड्यात ४ दिवसांच्या सुट्ट्या होत्या, घरीच होतो. सौ.

पु . ल . तुमच्यासाठी!

लेखक उल्का यांनी मंगळवार, 19/04/2016 20:53 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्राचे लाडके दैवत मनापासुनी हा केला गौरव ‘आपुलकी’ ही साऱ्यांची उदंड केले प्रेम तुम्हावरी ‘पुरचुंडी’ ही तुम्ही बांधली ‘खिल्ली’ कोटयानी उडवली ‘पूर्वरंग’ हा तुम्ही सजवला ‘वंग-चित्रे’ ना साज चढवला ‘जावे त्यांच्या देशा’ जेव्हा ‘गणगोत’ सारे जमते तेव्हा ‘बटाटयाची चाळ’ असो वा ‘वाऱ्यावरची वरात’ असो भेटले ‘व्यक्ती आणि वल्ली’ ‘हसवणूक’ ही झाली न्यारी आम्हास वाटे ‘अपूर्वाई’ फळास आली आमुची पुण्याई शब्दरूपी हा खजिना तुमचा भाग्य आमुचे आम्हा लाभला अनंत या हो उपकारांची होऊ कशी मी उतराई ऋणात राहुनी तुमच्या मी सदैव ‘गुण गाईन आवडी’ – उल्का कडले (ही कविता मी एक-दीड वर्षापूर्वी केली होती. खास पु.

स्फुटः संन्यास...

लेखक राघव यांनी मंगळवार, 19/04/2016 20:40 या दिवशी प्रकाशित केले.
गृहितक: या विषयावर विचार करतांना भगवंत आहे, सर्व चराचरांत व्याप्त आहे, आणि मनापासून ईच्छा असल्यास साधनमार्गावर त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेता येऊ शकतो.. हे मी गृहित धरलेलं आहे. बर्‍याच दिवसांपासून यावर विचार करतोय, संन्यास म्हणजे काय? तो कशाकरिता घेतात? ज्या ध्येयासाठी घेतात ते संन्यास घेतल्याविना साध्य होणार नाही काय? पण उत्तरांनी समाधान काही होत नाही. प्रत्यक्ष तेवढा प्रखर अनुभव घेतल्याशिवाय समजणारही नाही बहुदा. तरीही मला जे वाटतं ते मांडतो. संन्यस्त होणं म्हणजे सरळ अर्थ काढला तर निवृत्त होणं. कशापासून निवृत्त व्हायचं? जगापासून. का निवृत्त व्हायचं?

चिरंतन भेट

लेखक मनमेघ यांनी मंगळवार, 19/04/2016 18:48 या दिवशी प्रकाशित केले.
तिच्या मिठीचा गर्भरेशमी पोत छळे । नकळत कंठी मौनाचा अन् सूर जुळे ।। तिचे मौनही पल्याड देशी दरवळते । अल्याड देशी एकांताचे निळे तळे ।। दिशा भिन्न जरि, उरी असोशी पाझरते । ओझरती दिसतात डोळियांतील जळे ।। कुणा न कळते मौनाचे तारुण्य असे । क्वचित् कधितरी गाण्याचा त्या सूर गळे ।। तिच्या नि माझ्या मौनाला व्यापेल असा । तानपुरा होऊन सारखा चंद्र जळे ।। चिरंजीव ती मिठी, चिरंतन भेट तिची अंशात्मक ती अंशात्मक मज, पूर्ण मिळे ।। -चैतन्य
काव्यरस

मुलांमधे वाचन संस्कृती कशी वाढवावी? (जागतिक पुस्तक दिन लेखमाला)

लेखक किलमाऊस्की यांनी मंगळवार, 19/04/2016 17:41 या दिवशी प्रकाशित केले.
Header लहान मुलं म्हणजे मातीचा गोळा. जसा आकार द्यावा तसा घडत जातो. मुलांच्या वाढत्या वयात पालक तसंच शिक्षक या दोघांचा ही त्यांच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असतो. वाचन, श्रवण, निरिक्षण व लेखन अशा विविध माध्यमातून मुलं सतत शिकत असतात. यापै़की 'वाचन' मुलांच्या जडणघडणीतील महत्त्वाचा टप्पा. विविध विषयातील वाचन फक्त आनंदच देत नाही तर त्यामुळे स्वविकासही साधता येतो.

..आणि 'ती'ला चर्चच्या गाभार्‍यात प्रवेश हवा आहे !

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 19/04/2016 15:33 या दिवशी प्रकाशित केले.
'मिनु इत्त्यीप्पे' नावाच्या स्त्रीचा स्क्रोल.इन नावाच्या संस्थळावर लेख आला आहे. 'मिनु इत्त्यीप्पे' तिच्या लेखाच्या शीर्षकापासूनच "Why only temples? Even some churches don't allow women into the inner sanctum; Religions continue to discriminate against women in the name of tradition." चर्चमधील स्त्रीयांशी केल्या जाणार्‍या भेदभावा बद्दल तक्रार करते. लेखात तीने दिलेल्या माहितीनुसार ती 'मलंकारा मरथोमा सिरीयन' नावाच्या चर्चशी संलग्न आहे.

कोहीनूर हिरा, .. आणि इतिहासाच्या मागील पानावरुन पुढे जाताना .. ..

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 19/04/2016 12:54 या दिवशी प्रकाशित केले.
सोने असो वा जड जवाहीर यांच्यावर निव्वळ अय्याशीखातर आयातीसाठी परकीय चलन वाया घालवावे एवढे नक्कीच महत्वाचे नाहीत. पण काही गोष्टींना सांस्कृतीक वारशाचे महत्व असते, अशा वारशा सोबत अस्मिता जोडल्या गेल्या असतात. एखादी गोष्ट तुम्ही बाजारात सहज विकायला ऑक्शनमध्ये ठेवता आणि कुणि विकत घेऊन जाते तर तुमचा अभिमान आणि तुमचे मन दुखावले जात नाही. पण कुणि तुमच्या पराभवाचा लाभ घेऊन वस्तु आणि तेही अस्मिता जोडलेली सांस्कृतीक वारसा असलेली असेल तर समाजमनाचा हळवा कोपरा दुखावला जातोच. अस्मिता हिरावलं जाण्याचं हे खुपणं वस्तु हिरावून घेऊन जाणार्‍यांना लक्षात येतच असं नाही.