Skip to main content

अनस्टॉपेबल - नक्की बघा!

लेखक समीरसूर यांनी रविवार, 28/11/2010 01:31 या दिवशी प्रकाशित केले.
'ब्रेक के बाद' ची ब्याद संपल्यावर आम्ही तडक अलकाला साडेनऊचा 'अनस्टॉपेबल'चा शो बघायला गेलो. साडेसहाचा 'ब्रेक के बाद' साधारण सव्वानऊपर्यंत संपून पंधरा मिनिटात अलकाला पोहोचून 'अनस्टॉपेबल' कसा गाठणार या विवंचनेत आम्ही 'ब्रेक के बाद' बघण्याआधी होतो; पण 'ब्रेक के बाद' चा जीव फारच छोटा निघाला. आठ वाजून वीस मिनिटांनी 'ब्रेक के बाद' सुदैवाने गतप्राण झाला आणि आम्ही सुटकेचा निश्वास टाकला. जेमतेम शंभर मिनिटांच्या 'ब्रेक के बाद'ने आमचा अक्षरशः अंत पाहिला होता. एका छोट्या डासाने मलेरिया गिफ्ट करावा तसा 'ब्रेक के बाद' आम्हाला कंटाळेरिया देऊन गेला होता. बराच वेळ हातात होता.

आरसा :- मिपाच्या प्रगतीचा

लेखक रन्गराव यांनी शनिवार, 27/11/2010 22:34 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.alexa.com हे web-stats संपादित करणारे एक अग्रणी संकेतस्थळं आहे. मिपा बद्दल ह्या संकेतस्थळाचं म्हणनं पुढील प्रमाणे आहे. "There are 178,791 sites with a better three-month global Alexa traffic rank than Misalpav.com. Its visitors view an average of 5.2 unique pages per day. The site's content places it in the “समाज” category. This site has a relatively good traffic rank in the cities of Pune (#1,613) and Toronto (#7,189). Visitors to Misalpav.com spend roughly eight minutes per visit to the site and 60 seconds per pageview.

ब्रेक के बाद - एक डोके उठवणारी ब्याद

लेखक समीरसूर यांनी शनिवार, 27/11/2010 20:32 या दिवशी प्रकाशित केले.
काल मोठ्या उत्साहाने 'ब्रेक के बाद' हा अत्युच्च दर्जाचा सिनेमा बघण्याचा योग जुळून आला. संध्याकाळी साडेसहाचा 'लक्ष्मीनारायण'चा खेळ होता. दिवसभर थकवा आल्याने थोडा हलका-फुलका चित्रपट बघावा म्हणून आम्ही (म्हणजे मी आणि माझ्या बायकोने) 'ब्रेक के बाद' या सिनेमाची निवड केली. चित्रपटाविषयी काहीच माहिती नसल्याने मल्टीप्लेक्सनामक नोटा खाणार्‍या राक्षसाकडे न जाता आम्ही लक्ष्मीनारायणच्या मॅजेस्टी वर्गाचे तिकीट काढून सिनेमा सुरु होण्याची वाट बघत बसलो. कमी गर्दी, पार्किंगचे पाच रुपये, आणि मॅजेस्टीचे ऐंशी रुपयांचे तिकीट असे खर्चाचे योग्य माप निवडल्यामुळे मी खुशीत होतो.

संगीत नाटक - ०१ - कट्यार का़ळजांत घुसली

लेखक ५० फक्त यांनी शनिवार, 27/11/2010 16:23 या दिवशी प्रकाशित केले.
किंचित मंद उजेड, दोन बॆठका, एक तसबिर,मागच्या कोनाड्यात मुरलीधराची मुर्ती आणि कुणाची तरी कुठेतरी जायची तयारी चालु आहे. अरे हि तर उमा, घर सोडायची तयारी करते आहे. हो पण तिच्यावर हे घर सोडायची वेळ का यावी? जाउन विचारावं का? नको ही मोठ्या घरची माणसं आपण आपलं थोडं हातभर अंतर राखुनच रहावं. हे काय दिवाणजी पण आले, म्हणजे नक्की काहीतरी झालंय त्याशिवाय अशा मोठया हुद्द्यावरची माणसं सहजासहजी दिसत नाहीत होत हो. थांबा थोडं इथंच आणि पाहु काय आहे प्रकार तो. काय ! छे छे हे कसं होईल, अशक्य असं कसं झालं.

मन पखरु

लेखक अनिल आपटे यांनी शनिवार, 27/11/2010 16:19 या दिवशी प्रकाशित केले.
मी तिला पाहिलं तिने मला पाहिलं दोघांनी एकमेकांना स्मितहास्य दिलं कळलं नाही केव्हा एकमेकात गुंतत गेलो जणू फुलावर फुलपाखरू बसलं आणि पाकळी होऊन गेलं
काव्यरस

किनारा

लेखक शैलेन्द्र यांनी शनिवार, 27/11/2010 15:35 या दिवशी प्रकाशित केले.
रात्रीत चांदण्यांचा विरघळता पिसारा, तृप्तल्या गात्रांत गेला तृप्तसा इषारा मन भोगते पुन्हा तो आवेग मंथनाचा. अन सांडतो भरुनी शृंगार अंतरीचा. वनवास या सुखाचा मी विरहात साहीला, स्वप्नात शोधीला पण शारीर राहीला, माझ्या प्रियेस ठावा आक्रोश या मनीचा, दवबिंदुनी विझावा वणवा कसा तनीचा. होता आवेश वेडा, अन वेडीच रात्र होती, लवलवती पेटुन काया, गंधीत मात्र होती, नग्न वासनेचा तो, शुद्ध मंत्रखेळ होता, ह्रदयातल्या प्रीतीचा त्या अजोड मेळ होता. होतीस तुच साक्षी रक्तातल्या खुणेची, गेली जिरुन जेंव्हा तगमग या मनीची, आली प्रचंड भरती मग उधान सागराला, गेला भिजुन अवघा तृषार्त तो किनारा.
काव्यरस

जाम्भूलाख्यान ची द्रौपदी हरपली....

लेखक स्पा यांनी शनिवार, 27/11/2010 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
'माझी मैना गावाकडं राहिली'पासून तर "मी बाबूराव बोलतोय'पर्यंत लोकप्रिय लोकगीतांची रचना करीत आपल्या खड्या आवाजाने अवघ्या महाराष्ट्राच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी आज दीक्षाभूमीवर शेकडो लोकांच्या साक्षीने "जय भीम' आणि "जय बुद्धा' अशी गगनभेदी गर्जना करीत अखेरचा श्‍वास घेतला. पोवाडे, भारुडं, लोकगीते, भीमगीते तसेच 500 हून अधिक नाटकांच्या जोरावर लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी मराठमोळ्या रसिकांवर मोहिनी घातली होती. "चला हो नमू गौतमा' हे त्यांचे भीमगीत बौद्धबांधवांच्या सदैव ओठावर असते.

एक विचार

लेखक अवलिया यांनी शनिवार, 27/11/2010 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी कधी कधी एखादा लेख, कथा वाचतांना आपल्याला एखादे वाक्य खुप आवडते किंवा त्यावर आपण अनेकदा विचार करत बसतो. वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळ्या परिस्थितीत जेव्हा तेच वाक्य समोर येते तेव्हा आधी न केलेला विचार मनात येतो. त्या वाक्याचे वेगळे पैलु नजरेस पडतात. मागे कधी तरी वेगळ्या संकेतस्थळावर मी एक लेखमाला लिहिली होती. तिच्यात मीच एक वाक्य सहज लिहिले होते. आज परत काही कारणाने तो लेख परत वाचला, अन माझेच वाक्य मला परत परत नजरेसमोर तरळु लागले. अनेक विचार मनात आले. तुमच्या मनात असे काही विचार येतात का हे पहावे यासाठी हा प्रपंच.

गोष्ट-२ लिंगबदल

लेखक शरद यांनी शनिवार, 27/11/2010 08:17 या दिवशी प्रकाशित केले.
लिंगबदल भीष्मांनी आपला सावत्रभाऊ विचित्रवीर्य याचा विवाह करण्याचे ठरवले. त्याचवेळी काशीराजाने आपल्या तीन मुली अंबा,अंबिका व अंबालिका यांचे स्वयंवर योजिले होते. भीष्म त्या ठिकाणी गेले व त्या तीन मुलींना उचलून आपल्या रथात ठेवले व जमलेल्या सर्व राजांना युद्धाचे आव्हान दिले. सर्वांचा पराभव करून त्यांनी त्या मुलींना घरी आणून आपल्या आईच्या ताब्यात दिले व सांगितले की विचित्रवीर्याच्या लग्नाकरिता यांना आणले आहे. त्या वेळी अंबा त्यांना म्हणाली की " माझे शाल्व राजावर प्रेम आहे व आम्ही लग्न करावयाचे ठरविले होते". भीष्मांनी तिला शाल्वाकडे पाठविले पण शाल्वाने तिचा स्विकार करावयाचे नाकारले.