Welcome to misalpav.com

अ‍ॅकलेशिया कार्डिया-३ - सुटका

लेखक: तिमा | प्रसिद्ध:
http://www.misalpav.com/node/27881 http://www.misalpav.com/node/27905 लिक्विड डाएट वर घरी पाठवल्यावर आपण यावर चार आठवडे कसे काढणार असे वाटत होते. कारण खालचा अर्धवट घसरलेला स्टेंट अर्धा अन्ननलिकेत आणि अर्धा जठरात लोंबत होता. त्यामुळे जठरावरचा वॉल्व्ह कायमचा उघडाच राहिला होता. काहीही द्रव पदार्थ प्यायला की थोड्याच वेळांत गॅसेस होऊन ते वर येऊ लागत. अर्ध्या तासात ते कमी होत. त्यानंतरच पलंगावर आडवे होता येत असे. रात्रीच्या वेळी तर, दर दोन तासांनी जाग येऊन उठून बसावे लागे आणि दोन घोट पाणी प्यायल्यावर ढेकरा कमी झाल्यावर परत झोपता येत असे.


ना केले

लेखक: वैभवकुमारन | प्रसिद्ध:
कीती पाप केले, कीती पुण्य केले कोणा हास्य दिले , कुणा शून्य केले जरी जींकता मी हा डाव रडीचा कधी हारण्याचे मी प्रयत्न ना केले असा पोरका मी , जरी पोरका मी मी तेव्हां त्या मातेला धन्य ना केले जेव्हां सोडला तीक्ष्ण शब्दांचा मारा तेव्हां भावनांचे मी काव्य ना केले जरी चुकला कोणी दाही दिशांना तरी वाटाड्याचे मी काम ना केले दिल्या देवाने सुख सुमनांच्या माळा तरी मुखी नाम मी 'राम' ना केले


उत्तर सापडेना आज?

लेखक: विवेकपटाईत | प्रसिद्ध:
(अल्पवयीन मुलींवर बलात्कार आणि त्यांची निर्घुण हत्या होते. अश्या घटना देशात घटत आहेत. मग दिल्ली असो किंवा बदायूँ. प्रश्न अनेक आहेत पण उत्तर सापडत नाही. कुठे चूक झाली आमच्या पिढीच्या हातून कि आजची तरुण पिढी वासनेच्या आहारी जात आहे) कुणी पायदळी तुटवली एक नाजूक कळी आज? मध्यान्हन उन्हाळी पसरली का स्मशान शांतता आज? ममतेचा कोखात निपजली का रक्त पिशाचे आज? माय बहिण भार्या नाती का निरर्थक झाली आज? वासनेच्या डोहात तरंगती का नव तरुणाई आज? काय जाहली चूक आमची उत्तर सापडेना आज?


चांदोबाचा दिवा- (बालकविता)

लेखक: विदेश | प्रसिद्ध:
' आई ग आई , चांदोबाचा दिवा किती चांगला - उंच उंच आकाशात कुणी टांगला .. आई ग आई , चांदण्यांच्या पणत्या किती चांगल्या - उंच उंच आकाशात कुणी लावल्या .. आई ग आई , दे ग शिडी मला उंच उंच चढून - चांदोबा-चांदण्या आणीन मी काढून .. आई ग आई , चांदोबा-चांदण्या ठेऊन अंगणात - रात्री छान खेळेन त्यांच्या प्रकाशात .. .


श्रीरंग जोशी यांच्यासोबत पुणे कट्टा- रविवार दि. २२ जून

लेखक: प्रचेतस | प्रसिद्ध:
मिपाकर श्रीरंग जोशी नुकतेच पुण्यात आले आहेत. त्यांना आपल्या सर्वांना भेटायची इच्छा आहे. आताच त्यांच्याशी झालेल्या बोलण्यानुसार हा जाहीर धागा टाकत आहे. कट्ट्याची ढोबळमानाने रूपरेषा पुढीलप्रमाणे राहील. कट्ट्याची वेळ: रविवार दि. २२ जून २०१४. दुपारी चार वाजता. ठिकाण: शनिवारवाडा ज्यांना शक्य होईल त्यांनी दुपारी ४ वाजता शनिवारवाड्यापाशी जमावे.


तांत्रिक मत"

लेखक: अविनाशकुलकर्णी | प्रसिद्ध:
सुमारे सहा हजार वर्षापुर्वि एक मत भारतात उदयास आले होते..ज्याचे नाव " तांत्रिक मत" ह्या मताचा उदय बंगाल मधे झाला व त्याचा विस्तार बर्मा.तिबेट चिन पर्यंत होत गेला.. पुढे या विचाराचे अनेक ग्रुप्स झाली..व मतमतांतरे वाढत गेली समाज सुधारकानी पण या तान्त्रिंक मतावर तुफान हल्ले चढवले व आज हे मत..


अविस्मरणीय ग्रीस - भाग १ - अथेन्स

लेखक: सानिकास्वप्निल | प्रसिद्ध:
अविस्मरणीय ग्रीस प्रस्तावना सकाळी लवकर उठून , मस्तं नाश्ता करून आम्ही नऊला हॉटेलमधून बाहेर पडलो. थेट टॅक्सी करून आम्ही अ‍ॅक्रोपोलीसला गेलो. तिथे पोहोचताच आम्हाला दुरूनच Parthenonचे दर्शन झाले. भराभर थोडे वर चढून तिकिट काढायला गेलो , तिथे थोडी रांग होतीच शिवाय नऊनंतर अनेक पर्यटक बसमधून Parthenon बघायला मोठ्या प्रमाणात येतात त्यामुळे गर्दी होतेच. पटापटा तिकिटं काढून आम्ही वर चढायला सुरुवात केली, वातावरण मध्येच ऊन मध्येच ढगाळ असे होते त्यामुळे पाऊस येतो की काय असे उगाच वाटून गेले.


'कुणी घर देता का घर' - नटसम्राटाचा टाहो

लेखक: जीएस | प्रसिद्ध:
आपल्या विविधरंगी नाट्यप्रयोगांनी गेली दोन वर्षे जनतेचे अथक मनोरंजन करणार्‍या नटसम्राटाने अखेर 'कुणी घर देता का घर' असा आर्त टाहो फोडला आहे.


जडण-घडण...2

लेखक: माधुरी विनायक | प्रसिद्ध:
शाळेतले दिवस, मित्रमंडळी, अभ्यास, स्पर्धा सगळंच मस्त होतं. प्रत्येक वर्षी वर्गशिक्षक आणि विषयानुरूप शिक्षक बदलत असले तरी सगळेच शिक्षक ओळखीचे होते. त्यामुळे पुढच्या वर्गात मित्रमंडळीही तीच आणि शिक्षकही ओळखीचे. अगदी खरं सांगायचं तर पहिली ते सातवी इयत्तेची सात वर्षं वेगवेगळी आठवतंच नाहीत, मोठ्ठच मोठ्ठं लांबलचक एकच वर्षं असावं ते, असंच वाटतं. तसंच आठवतं... शाळा, परीक्षा आणि परीक्षेनंतरची सुट्टी. मे महिन्याच्या सुट्टीत गावी गेलं की गोंधळात टाकणारा पहिला अनुभव म्हणजे, अरेच्चा, सुट्टी इतक्यात कशी संपली? थांबा, थांबा. थोडं उलगडून सांगते. माझं गाव कोकणात. मुंबईहून गावी पोहोचायला किमान 12 तास लागायचे.