Welcome to misalpav.com

कावळ्यांतला आईनस्टाईन !!!

लेखक: डॉ सुहास म्हात्रे | प्रसिद्ध:
आंतरजालावर असलेली ही व्हिडिओ क्लिप मला एका नातेवाईकाने पाठवली. ती इतकी आश्चर्यकारक आहे की इथे टाकल्याशिवाय राहवले नाही. प्रत्यक्ष पाहूनच ठरवा शिर्षक बरोबर आहे की नाही !


फुटबॉल विश्वचषक :२०१४

लेखक: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे | प्रसिद्ध:
नमस्कार मंडळी. दोनहजार दहामधे मिपावर विश्वचषकाचा थरार आपण सर्वांनी अनुभवला होता. फुटबॉल हाच धर्म देव समजणा-या ब्राझीलमधे फुटबॉलच्या विश्वचषकला सुरुवात होत आहे.


मी रिक्त हस्त आहे -------------- एक गझल

लेखक: डॉ. दत्ता फाटक | प्रसिद्ध:
माझे असून सारे मी रिक्त हस्त आहे माझाचं पोसलेला मी एक मात्र आहे माझे असून सारे मी रिक्त हस्त आहे ------1 ----- आयुष्य मी असे हे उधळून टाकलेले , माझ्या सवेच उरले हे रिक्त दु:ख ओले , माझे असून सारे मी रिक्त हस्त आहे -------2 -------- तोडून टाकलेले हे बंध रेशमांचे माझ्या सवेच उरले हे फास जीवघेणे माझे असून सारे मी रिक्त हस्त आहे -------3 -------- काही करू पहाता विपरीत होत आहे , माझे मला न उमगे


घेई च्छन्द मकरंद -- होमिओपॅथीचा !! [भाग-१]

लेखक: डॉ. दत्ता फाटक | प्रसिद्ध:
आपलं शरीर हे मुख्यतः पाणी, सेंद्रीय पदार्थ तथा बारा निरींद्रीय क्षार युक्त असंख्य पिंडपेशींनी तयार झालेले आहे, निरींद्रीय क्षारांमुळे या पेशी तयार होत असतात, अन रक्ताभिसरणाने पोसल्या जातात, याशिवाय साखर, चरबी, पांडूर- Albumin, हे कर्बयुक्त सेंद्रीय पदार्थ असून चुना-Calcium, लोह-Iron, potashium, Natrum, Scical, हे ख-निज क्षार निरींद्रीय – कार्बन विरहित असतात.निरींद्रीय क्षारांचे प्रमाण अल्प असलं तरी अचेतन सेंद्रीय पदार्थापासून लक्षावधी विशिष्ठ पिंडपेशीसमुह निर्माण करत असतात. याचं कारणामुळे या बारा क्षारांना अनन्य साधारण महत्व आहे, त्याचाच अभ्यास करणें आहे.


मराठी कविता : नया दिन !

लेखक: निमिष सोनार | प्रसिद्ध:
।। नया दिन ।। नवा दिवस उगवलाय! घेवून नवी पहाट! आलाय नवा प्रहर! टाकून जुनी कात! कालचाच मावळलेला तो सूर्य, आला आहे! नव्या आशेचा नवा सोनेरी किरणांचा शर्ट घालून! प्रत्येकाला जगण्याची नवी उमेद द्यायला! प्रत्येकाच्या जीवनात अंधार दूर करुन प्रकाश वाटायला! चला रोज स्वागत करुया त्या सूर्याचे ! जो घेवून येतो आपल्या जीवनात, रोज एक नवी पहाट! नवे चैतन्य! नवा दिवस! नया दिन !! # लेखक - निमिष सोनार


भय, निरुत्साह, साशंकता, ढळलेला आत्मविश्वास....

लेखक: समीरसूर | प्रसिद्ध:
एका मानसिक ताणतणावासंबधित लेखाला मी दिलेला प्रतिसाद (किंचित फेरफार करून) येथे लेख म्हणून टाकत आहे. बर्‍याच लोकांना असे छोटे-छोटे मनःस्वास्थ-विषयक त्रास होत असतात. कदाचित उपयोग होऊ शकेल हा लेख टाकण्याचा हेतू. शिवाय यातून चर्चा होऊन काही उपाय, अनुभव, निरीक्षणे शेअर करता आली तर सगळ्यांनाच त्याचा उपयोग होईल. -------------------------------------------------------------------------------- अनामिक भय हे थोड्या-फार फरकाने सगळ्यांनाच असते. ते एखाद्या झाडाच्या कुजलेल्या अजस्त्र फांदीप्रमाणे कधी कधी खळखळ वाहणार्‍या निरुंद भागात अडकते आणि आपल्या मनाच्या प्रवाहीपणाला अडथळा ठरते.


सेव्हन कप केक

लेखक: लव उ | प्रसिद्ध:
सेव्हन कप केक 7cup_cake मिपावर पाककृती द्यायचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. तस म्हणायला केक पण चविला मात्र बर्फीसारखी अस काहिस आहे. 7cup_cake साहित्य: बेसन १ कप साजुक तूप १ कप दुध १ कप ओल्या नारळाची चोय १ कप साखर ३ कप कृती:
  1. वरील सर्व साहित्य कढईत एकत्र करून घ्यावे.
  2. मंद आचेवर १५ मिनिटे सतत ढवळत रहावे.
  3. कडा सुटायला लागल्यावर गस बंद करवा.


अस्थी कृषीवलांच्या

लेखक: गंगाधर मुटे | प्रसिद्ध:
अस्थी कृषीवलांच्या

पाया रचून गेले कर्तव्य जागणारे
होते तसेच आहे नुसतेच बोलणारे

होऊ नकोस कष्टी चिंतातुराप्रमाणे
जालिम इलाज कर तू विध्वंस रोखणारे

माजून तर्र काही दिसतात कर्मचारी
प्रत्येक कागदाला पैशात घोळणारे

देणार साथ काया नाही मनाप्रमाणे
उडत्या मनास छळते हे शल्य बोचणारे

रस्ता नवीन नवखा दुर्गम-दरी-पहाडी
संगे हवे कशाला वाटेत धापणारे?

धर्मांध शोषकांच्या झुंडी तयार झाल्या
जातीत पांगलेले अन्याय सोसणारे


मेट्रो ट्रेनचा अनुभव

लेखक: साधा मुलगा | प्रसिद्ध:
अनेक दिवस प्रतीक्षेत असलेली मुंबई ची मेट्रो रेल्वे रविवार दिनांक ८ जून २०१४ ला सुरु झाली. त्याचे श्रेय कोणाला याचा वाद सुरु राहील परंतु माझासारख्या असंख्य मुंबईकरांना हि अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक घटना आहे. ज्यांना सेन्ट्रल ते वेस्टर्न प्रवास करायचा आहे, जास्तकरून जे रोज ठाणे, डोंबिवली , कल्याण आणि खाली ते अंधेरी, बोरीवली असा प्रवास करतात त्यांच्यासाठी नक्कीच वेळेची बचत करणारी आहे. मेट्रो रेल्वे चालू झाल्याच्या दोन तीन दिवस मी जो प्रवासाचा अनुभव घेतला आहे तो आपल्यासमोर मांडत आहे. सध्या मला इंटर्नशिप साठी चांदिवलीला जावे लागते.