Welcome to misalpav.com

पायाखाली

लेखक: arunjoshi123 | प्रसिद्ध:
ज्या काळात कोमट्यांच्या घरांत ब्राह्मण भाडेकरूच चालायचे, लिंगायतांच्या घरांत जंगम भाडेकरूच चालायचे, त्या काळात बाबूराव खंदारेंचा वाडा प्रचंड कॉस्मोपॉलिटन म्हणायला हवा. एक बाजूला कौलारू शेडमधे लिंगायत बाबूराव आणि त्यांच्या सप्तकन्या यांचे कुटुंब. दुसर्‍या बाजूला काँक्रीटच्या छताखाली चार वेगवेगळी कुटुंबे. एका छोटेखानी खोलीत आमचे ब्राह्मण कुटुंब, आमच्या मागे थोड्या लांब खोलीत वारकाचे बालाजीमामा, त्यांच्याशेजारी यलमाच्या जिंदगानीचे दोन खोल्यांचे कुटुंब. भाडे वाढले तसे त्यांनी एकच खोली ठेवली आणि त्यांच्यापुढे थोडे भिडस्त मराठे कुटुंब राहायला आले.


दूध

लेखक: कुमारकौस्तुभ | प्रसिद्ध:
आजच सकाळी दैनिक दिव्य मराठी त आलेल्या एका बातमीने लक्ष वेधुन घेतले. ती अशी की महाराष्ट्राचे कामगारमंत्री हसन मुश्रीफ़ यांनी कुठल्याशा कार्यक्रमात (राजकारण्यांच्या टीपीकल तुलादान इ. सारख्या) स्वत:वर दुधाचा अभिषेक करुन घेतला व दुधाची भरपुर नासाडी या कार्यक्रमात त्यांच्या निष्टावंत कार्यकर्त्यांनी केली. या घटनेवर डॉ. राणी बंग यांची प्रतिक्रीया आली आहे ती अशी की, राज्यातील बरीच मुले अन स्त्रिया कुपोषणाच्या जंजाळात अडकल्या असताना स्वत:वर दुधाचा अभिषेक करुन घेण्याचे कामगारमंत्री हसन मुश्रीफ़ यांचे कृत्य लज्जास्पद अन घृणास्पद असुन यामुळे पुरोगामी महाराष्ट्राला एक प्रकारे ठेच पोहोचली आहे.


मिर्झा ग़ालिब...........भाग-२

लेखक: जयंत कुलकर्णी | प्रसिद्ध:
Simple, Free Image and File Hosting at MediaFire मिर्झा ग़ालिब...........भाग-१ जेव्हा ग़ालिब दिल्लीत आला तेव्हा तो तसा तरुणच होता. म्हणजे त्याचे वय त्यावेळेस १९ असले तरीही कवी म्हणून त्याला थोडी फार प्रसिद्धी मिळाली होती. ती प्रसिद्धी पुढे वाढतच जाणार होती. पण त्याच्या लोकप्रियतेचे एकमेव कारण त्याचे काव्य नसून त्याचा स्वभाव हेही एक प्रमुख कारण होते.


बलिदान त्याविना हे ... (गझल)

लेखक: अमेय६३७७ | प्रसिद्ध:
असते मनात काही उमजून येत नाही वाटे किती फुलावे उगवून येत नाही घनघोर मंथनाची आश्वासने फुकाची नुसतेच भोवरे पण घुसळून येत नाही कुंकू पुसून केली तलवार रक्तवर्णी बलिदान त्याविना हे उजळून येत नाही तू बोल ऐकतो मी माझेहि ऐक काही मौनात प्रेमगाणे उमलून येत नाही पेरून चिंतना घे शिंपून लेखणीला शब्दास अर्थ आता लगडून येत नाही -- अमेय


बाप माणुस

लेखक: jaypal | प्रसिद्ध:
बाप माझा बाप बाप मानुस होता. फाटकी चड्डी मळकट बनियान मनाने मात्र तो साफ माणुस होता. बाप माझा बाप बाप मानुस होता. टकलावर तुरा अन डोळ्यावर जाड काचा. आरे मोठठ व्हायच तर भरपुर वाचा. अस नेहमी ओरडणारा तो ताप माणुस होता. बाप माझा बाप बाप मानुस होता. वयात आली जवानी घेऊन नवि उर्मी. स्वभावात रगेल पणा बोलण्यात उद्धट गुर्मी. दोस्तांच्या गप्पात मग एकेरी उल्लेख होता. बाप माझा बाप बाप मानुस होता. आज जेंव्हा मी हळवा बाप होतो. लेकाला माझ्या घट्ट जवळ घेतो. फुटतो सारा बांध कारण समोर चेहरा त्याचा होता. बाप माझा बाप बाप मानुस होता. तक्रार नाही केली की कधी नाही चिडला. आयुष्य भर झिजला संसाराचा गाडा ओढला. माझा बा


सुरतवर अणुबॉम्ब टाकण्याचा प्लान होता ????????

लेखक: मारकुटे | प्रसिद्ध:
यासिन व रियाझमधील फोन संभाषण यासिन: भाईजान... एखाद्या छोट्या अणुबॉम्बची व्यवस्था करता येईल का? रियाझ: नक्कीच करता येईल. पाकिस्तानाच कुठल्याही गोष्टीची व्यवस्था होऊ शकते. यासिन: सुरत शहर उडवता येईल, असा अणुबॉम्ब मला हवा आहे. रियाझ: पण त्यात मुसलमानही मारले जातील. यासिन: हल्ल्याच्या आधी आपण मशिदीत पोस्टर लावू आणि मुसलमान लोकांना गुपचूप शहर सोडण्याच्या सूचना देऊ. अधिक माहिती : http://maharashtratimes.indiatimes.com/nation/Indian-Mujahideen-wanted-to-nuke-Surat-Yasin-Bhatkal-tells-cops/articleshow/28130322.cms हे सर्व भयानक आहे असे वाटत नाही का?


भटकंती २

लेखक: इन्ना | प्रसिद्ध:
भटकंती आणि टूर ह्या दोन शब्दांत एक फरक आहे. कुठे जायचं? कसं जायचं? किती दिवस? काय काय करायचं? खाण्यापिण्याची सोय काय? आधी जाऊन आलेलं आहे का कोणी? थोडक्यात, परीटघडीचा प्रवास म्हणजे टूर. अस्मादिक भटकंतीवर जास्त विश्वास ठेवणारे. एकदा कुठे जायचं आणि किती दिवस ते ठरलं, की बाकीचं जसं समोर येईल तसं.


गुरुजिंचे भावं विश्व! भाग-५

लेखक: अत्रुप्त आत्मा | प्रसिद्ध:
मागिल भागः- http://misalpav.com/node/25626 ...पुढे चालू धार्मिक कार्यक्रमाच्या दिवशी, यांच्या घरी केटरर कडून पायात चपला घालून आणलेलं(पार्सल) जेवण सोवळ्यात देवाला नैवेद्य दाखवून आंम्ही(ही) जेवतो.. हा काळानुसार केलेला बदल, ते कसा विसरले ते काही कळलं नाही.....! ========================================== आपण धार्मिकपणा फारच पाळतो असा दृढं (गैर)समज असणार्‍या अश्या लोकांची काही व्यवच्छेदक लक्षण आहेत. त्यात प्रचंड तात्विक असणं.. हे आद्य लक्षण.. म्हणजे तत्व पाळलं गेलं कि व्यवहार आपोआप पाळला जातोच! असा एक हटकून गैरसमज.