अलीकडेच कामरूप देशातील प्राग्ज्योतिषपूर ऊर्फ गुवाहाटी येथे जाणे झाले. नरकासुराच्या राजधानीत चारपाच दिवस होतो पण मोकळा वेळ दीडेक दिवस असेल नसेल. तस्मात बघावयास कमी वेळ मिळाला. तरी तेवढ्यात काही गोष्टी पाहता आल्या. कामाख्या मंदिर अन वसिष्ठ मंदिर पाहता आले नाही :( कारण वेळही मिळाला नै अन शिवाय कामाख्या मंदिरात गर्दी सोडूनही बळी देणे खुंदल खुंदल के चालू असते असे तेव्हाच तिकडे गेलेल्या एका प्राण्याकडून कळाले. मग म्हटले मरो तेच्यायला. एरवी एशी हाटलात बसून समोर मस्त सजवलेले, मसालेदार गिरवीत न्हालेले मांसाचे तुकडे चापावयास काही वाटत नाही पण ते प्राणी मारताना पाहून नै म्ह्टले तरी पोटात अंमळ ढवळतेच.