Welcome to misalpav.com

माली पुन्हा अस्थिर

लेखक: पराग१२२६३ | प्रसिद्ध:
रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्षाकडे सध्या जगाचे लक्ष लागले आहे. पण त्याचवेळी तिकडे आफ्रिकेमध्ये मालीमधून फ्रेंच सैन्याला आपली मोहीम अर्ध्यावर सोडून माघार घ्यावी लागली आहे, तीही घटना जगात चर्चेचा विषय ठरली आहे. फ्रांसने आपली मोहीम गुंडाळण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर लगेचच तेथील जिहादी गटांच्या कारवायांनी वेग घेतला आहे. फ्रांसने पुढाकार घेऊन 2013 मध्ये सुरू केलेल्या Operation Serval नंतर मालीमधील जिहादी गटांवर काही प्रमाणात नियंत्रण आले; पण त्याचवेळी या गटांनी आपलं कार्यक्षेत्र मालीच्या आजूबाजूच्या देशांमध्येही विस्तारलं. या मोहिमेतून जिहादींविरुद्ध मोठ्या प्रमाणात आघाडी उघडली गेली.


मी मोठा झालो.

लेखक: Deepak Pawar | प्रसिद्ध:
संध्याकाळी शाळेतून आल्यावर, हात-पाय धूऊन चहा पीत होतो, तेवढ्यात संज्या निरोप घेऊन आला.. "गुरं बाहेर काढताहेत, तुला बोलावलंय! "थांब जरा," मी म्हणालो. आईला संज्यासाठी चहा आणायला सांगून, जावं कि, न जावं, या विचारात बुडून गेलो. शाळेचा गृहपाठ करायचा होता. तिकडं गेलो तर बराच उशीर होणार. माझं दहावीचं वर्ष, शाळेच्या पहिल्याच दिवशी सरांनी भलं मोठं भाषण दिलेलं, "या वर्षी तुम्ही दहावीला आहात, लक्षात ठेवा. खेळ बंद... दांड्या मारायच्या नाही...


सामना (२)

लेखक: नीलकंठ देशमुख | प्रसिद्ध:

सामना (२)
( पूर्वसूत्र: न्यायालयातील ल्यायब्ररीत एका महत्वाचे विषयावर चर्चेसाठी, न्यायाधीशांची बैठक,कुमठेकर साहेबांनी बोलावली आहे.तिथे ते संबोधन करत होते.)



पटवर्धन अण्णा

लेखक: मालविका | प्रसिद्ध:
पटवर्धन सरांकडे आम्ही इंग्लिश विषयासाठी क्लासला जायचो. युनायटेड इंग्लिश स्कूल अर्थात आमच्याच शाळेतून खूप पूर्वी सर रिटायर्ड झालेले होते. शाळेत होते म्हणून सर नाहीतर त्यांना अण्णा म्हटलेलंच आवडायचं. बरीच मुलं त्यांना सर म्हणायच्या ऐवजी अण्णाच म्हणत. सर घरीच इंग्रजीचे क्लास घ्यायचे. फक्त 9 वी आणि 10 वी ची मुलं. सकाळी 7.30 ते 8.30 10 वीची बॅच, 8.30 ते 9.30 9 वीची बॅच आणि शेवटी 9.30 ते 10.30 परत एक दहावीची बॅच. एवढ्या तीनच बॅच दिवसभरात असायच्या. त्यांच्या घरातल्या त्या छोट्याश्या पडवीत हा क्लास चालायचा.एक वेळी जास्तीत जास्त 15 ते 17 मुलं माऊ शकतील एवढीच खोली होती ती.


तुझी वाट पाहत.

लेखक: Deepak Pawar | प्रसिद्ध:
अवखळ वारा रिमझिम धारा हळूहळू सांजावता वाटतं ... तू येशील आता. पावसानं झालंय ओलंचिंब रान मातीलाही सुचलंय दरवळणारं गाणं. मन माझं हेलकावतंय विरहाच्या लाटेवर नजर लावून बसलंय तुझ्या नेहमीच्या वाटेवर. असेच एकदा आठवणींचे मेघ भरून आलेले नकळत डोळ्यातून झरुन गेलेले. तुझी वाट पाहत तिथे भिजलो होतो चिंब म्हणून कुणा दिसले नाहीत आसवांचे थेंब. नाहीतर मित्रांना हे गुपित कळलं असतं खरं सांगतो त्यांनी मला खूप-खूप छळलं असतं. आता हळूहळू होऊ लागलेय रात मंद मंद जळते आहे दिव्यामधील वात. झोपलीत पाखरं गाणं गात गात मन माझं सैरभैर तुझी वाट पाहत.


दिल का रिश्ता

लेखक: पाटिल | प्रसिद्ध:
दिल का रिश्ता. इसवी सन- २००३ जय मेहता- अर्जुन रामपाल टीया- ऐश्वर्या रॉय जयचा बाप- परेश रावळ अनिता- ईशा कोप्पीकर टीयाची आई- राखी सुरूवात. जय आफ्रिकेतून आंघोळ वगैरे करून घाईगडबडीत त्याच्या मुंबईतल्या घरी येण्यासाठी निघतोय. आणि त्याचवेळी रावळपापा लंडनहून घराकडे निघालेत. रावळपापा अत्यानंदाने घरात घुसून मीच आधी पोचलो अशी आरोळी ठोकतात. परंतु जय त्यांच्याआधीच पोचलेला असतो. दर वर्षी एका विशिष्ट दिवशी जयच बापाच्या आधी घरी पोचत असतो, हे आपल्याला त्यांच्या संवादातून कळते. दुर्दैवाने रावळपापांची फ्लाईट लंडनला दोन तास लेट झाल्यामुळे पापांचा चान्स याही वेळी हुकलाय..! पण काय हरकत नाय बरं का पापा..


तू माझा कैवारी.

लेखक: भागो | प्रसिद्ध:
तू माझा कैवारी. सात साडे सात वाजले असावेत. सावंतांची एस टी फलाटाला लागली होती. पण कंडक्टर ड्रायवर चहा प्यायला गेले होते. साधी लाल गाडीच होती. त्यामुळे कुणाला काही घाई नव्हती. प्रवासी तसे थोडकेच होते. खिडकीपाशी बसायला मिळावे म्हणून सगळ्यांची गाडीत घुसण्याची घाई, पण बसचा दरवाजा काही उघडेना. “दरवाजा लॉक झाला जणू”. कोणीतरी रिमार्क टाकला. “अहो उघडेल की. जरा हैय्या म्हणून जोर लावा.” “सगळा अनागोंदी भोंगळ सरकारी कारभार. साधा एस टीचा दरवाजा...... ” “रायटिंग मध्ये तक्रार करायला पाहिजे. साल्यांना ##त लाथा घालायला पाहिजेत.” “काय उपयोग?


एकाकी

लेखक: सागरसाथी | प्रसिद्ध:
एकट्याने एकट्याशी बोलले पाहिजे शब्दांनीही भाव वेडे तोलले पाहिजे. कोण वेडे आहे ऐकण्या पुन्हा पुन्हा आपुलकीचे रोप येथे रोवले पाहिजे. दु:खा मध्ये रमून जाणे रोजचेच आहे आनंदाचे झाड मनात वाढले पाहिजे. स्वत: साठी जग जगते त्यात काय मोठे दुसऱ्यासाठी कधीतरी जगले पाहिजे. आपले आपले करता हात रिक्त होती दुसऱ्याच्या आनंदाने मोहरले पाहिजे. आनंदाने जगताना जपले ही पाहिजे जपण्यासाठी कधी दूर झाले पाहिजे.


राजकारणाचा ढासळला दर्जा

लेखक: बाजीगर | प्रसिद्ध:
कविता म्हणजे आसपास घडणाऱ्या घटनाचेच प्रतिध्वनी असतात ना ... उगाच कुठे चांदतारे पहावे. काळ बदलला, "वोह बुराई करे, हम भलाई करे, नही बदले की हो भावना, ऐ मालिक तेरे ब्लाह ब्लाह हम " हे राहिले नाही म्हणून संयमीत प्रतिउत्तर कविता.. किरीट सोमय्यांवर टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली; म्हणाले...