Welcome to misalpav.com

आक्रीत

लेखक: अनन्त्_यात्री | प्रसिद्ध:
सापशिडीच्या डावात माझ्या घडते आक्रीत शिड्या गिळतात साप आणि टाकतात कात बुद्धिबळाच्या डावात माझ्या घडते आक्रीत राजा पांढरा, तयाची काळ्या रंगावर प्रीत घडे आक्रीत तसेच माझ्या जगण्यात रोज वास्तवाच्या कोलाहली कानी अद्भुताची गाज


कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ४

लेखक: टर्मीनेटर | प्रसिद्ध:
आधिचा भाग: कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ३ रात्री लवकर झोपल्याने सकाळी जाग देखील लवकर आली.


अंतरंग - भगवद्गीता - भाग २

लेखक: शीतलउवाच | प्रसिद्ध:
प्रश्न…. समस्या…… अर्जुन ……काल … आजही! अश्मयुगापासून आजपर्यंत आपल्या अचाट बुद्धीमत्तेच्या जोरावर माणसाने खुप प्रगती केली. भौतिक सोयी सुविधांची अनेक साधने निर्माण केली. अनेक अडचणींवर मात केली. पण काही प्रश्न आजही अनुत्तरीतच राहीले. इतक्या सा-या सुविधांमध्ये मानव खरंच समाधानी आहे का? जर असेल तर अजुनही सतत नवनवीन सुखसाधनांचा शोध घेतला जातो, तो कशासाठी? प्रत्येक व्यक्तीचं सुख निराळ्या गोष्टीत आहे, तर मग सुखी असणं म्हणजे नक्की काय आहे? केवळ हवं ते मिळणं म्हणजेही सुख नाही, कारण हवं त्याची यादी कधी संपतच नाही. सतत काही ना काही हवं असतंच.


गुजरात सहल २०२१_भाग ७-अडलज वाव व अहमदाबाद

लेखक: गोरगावलेकर | प्रसिद्ध:
आधीचा भाग येथे वाचा गुजरात सहल २०२१_भाग ६-जुनागड सहलीचा नववा दिवस. अहमदाबादला रात्री उशिरा पोहचून झोपेपर्यंत खूप उशीर झाला होता तरीही नाश्ता आटोपून नऊ वाजता सर्वजण अडालज वावला जाण्यासाठी गाडीत येऊन बसले होते. हॉटेलपासून अंतर अर्ध्या पाऊण तासाचेच (२०किमी) होते . दहाच्या आतच अडालजला पोहचलो. अडालज गावातील ही पायऱ्यांची विहीर अडालज वाव किंवा रुडाबाईनी वाव नावाने ओळखली जाते. राणा वीर सिंग याने या विहिरीचे काम सुरु केले होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी राणी रुडाबाईने ही विहीर सन १४९८-९९ सालात बांधली होती.


शर्यत

लेखक: नीळा | प्रसिद्ध:
शर्यत अजून संपली नाही मी अजून जींकलो नाही घाम गाळत रक्त ओकत धावताना अजुन संपलो नाही हिरव्या दरीच्या धुक्या कडेशी नीळ्या तळ्याच्या काठाशी कधी अजुन दंगलो नाही स्वप्ने तुटताना कचाकड्याची ऊलटताना रात्री बीनस्वप्नांच्या आतुन अजुन भंगलो नाही त्या सुरांच्या स्तब्ध मैफली ईद्रंधनुच्या शब्द चौकटी मी अजुन रंगलोच नाही


फोन

लेखक: पाटिल | प्रसिद्ध:
"आरे पत्त्या कुठाय तुजा‌.! किती फोन केलं मी.! सगळं बंदच असतंय गा कायम?" हॅलोs ? कोण ? "बास का आता? आता आवाज पन इसरला का आमचा?" नाय रे.. आवाज नाय ओळखला मी. "आरे पवन बोलतोय पवन.!" पवन ?.. पवन ताटे का? मला आवाजाची काय ओळख लागली नाय रे आजून. "पवन जाधव बोलतो. पळशीवरनं." आरे हां हां.. हां.. बोल बोल.. कसा काय फोन केला..? "काय नाय.. बगावं म्हणलं काय चाललंय..! तुजा काय फोन नाय काय नाय..कुठं हाईस कुटं तू ? " हाय की.. हितंचाय.. चाललंय निवांत. "आरं पन आसं कुटं आस्तंय गा ? एवडं करूनी लगा.. एवडं कुटं तोडत आस्तेत गा?


अंतरंग - भगवद्गीता - भाग १

लेखक: शीतलउवाच | प्रसिद्ध:
नमस्कार मित्रहो, भगवद्गीता हा नेहेमीच सगळ्यांच्या कुतुहलाचा विषय राहीला आहे. निरनिराळ्या संदर्भात लहानपणापासून या पुस्तकाबद्दल आपण ऐकत असतो. काही जणांना लहानपणी यातील एखादा अध्याय (ब-याचदा जबरदस्तीने!) पाठही करायला लागला असेल. पण ते कुतुहल, कुतुहल याच पातळीवर राहते त्यात फारशी प्रगती होउन आपण स्वतःहून या पुस्तकाच्या वाटेला क्वचितच जातो. पुढे कुठेतरी ट्रेनिंग्ज, सिरियल्स, मॅनेजमेंट प्रेझेंटेशन्स, ऑनलाईन कंटेट वगैरे च्या माध्यमातून गीता आपल्यासमोर येत राहते आणि आपले हे कुतुहल जागवत राहते. माणसाला पडणा-या अनेक सामान्य असामान्य प्रश्नांची उकल करणारे पुस्तक म्हणून गीता आपल्याला माहीत असते.


शोधायला गेले एक, अन......

लेखक: हेमंतकुमार | प्रसिद्ध:
अनेक मानवी आजारांचा मुकाबला आपण औषधांच्या मदतीने करतो. आजच्या घडीला आधुनिक वैद्यकात हजारो औषधे वापरली जातात. एखाद्या आजारावर गुणकारी औषध शोधणे हे खूप कष्टाचे काम असते. त्यासाठी संशोधकांना जिवाचे रान करावे लागते; प्रसंगी तहानभूक विसरून अशा कामात झोकून द्यावे लागते. मात्र काही मोजक्या औषधांचे शोध ह्या अनुभवापासून काहीसे वेगळे पडतात. त्यापैकी काहींच्या बाबतीत त्यांचे शोध ध्यानीमनी नसताना किंवा अगदी योगायोगाने लागून गेलेत.


२ प्रेमी प्रेमाचे..!

लेखक: पाटिल | प्रसिद्ध:
२ प्रेमी प्रेमाचे इसवी सन २०१५ यश = स्वप्नील जोशी प्रिया = गिरीजा ओक यशचा बाप =अरुण बक्षी पहिल्या सीनमध्ये प्रिया तिच्या बॉयफ्रेंडला भेटायला जाते, तेव्हा तो दुसऱ्याच एका मुलीशी प्रेमालाप करत असतो. प्रिया हळवी आहे, मृदू आहे. हे दृश्य पाहून तिचा दिल दुखतो. ती तडकाफडकी बॅग भरून ते शहर सोडते आणि खुशी नावाच्या मैत्रीणीकडे रहायला जाते. कारण शेवटी असं आहे की तुम्ही तुमच्या इंपल्सेसवर जगता ना! तुमच्या मनात आलं की बॅगा भरता आणि शहरं सोडता..! जॉबचा किंवा पोटापाण्याचा वगैरे प्रश्नच कुठे उपस्थित होतो !