Welcome to misalpav.com

नवकवी आणि आचार्य अत्रे

लेखक: सागरसाथी | प्रसिद्ध:
१९२९ साली 'पहिले कविसंमेलन' भारत इतिहास संशोधन मंडळाच्या सभागृहात भरले होते. या कविसंमेलनाचे आचार्य अत्रे स्वागताध्यक्ष होते त्यांनी तिथे केलेले भाषण हे भविष्याचा किती वेध घेणारे होते हे त्याचा सारांश वाचल्यावर लक्षात येईलच. त्यांच्या भाषणाचा सारांश त्यांच्या शब्दात....... "तशाच या सणासुदीच्या कविता. चंद्राला गिऱ्हाण लागले म्हणजे दान मागण्यासाठी जशी काही लोकांची धांदल उडते, तसे एखादा सण आला म्हणजे आमचे कवी लोक सैरावैरा धावू लागतात. संक्रांत आली की यांचा शिमगा सुरू झालाच. दसरा आला की हे घोड्यावर बसून शिलंगणाला निघालेच.


तुझ्याचमुळे

लेखक: सागरसाथी | प्रसिद्ध:
सारे तुझेच होते, सारे तुझेच आहे तू आहेस म्हणून स्वप्नांचे येणे-जाणे आहे. शब्द तुझेच होते भाव तुझेच आहेत तुझ्या मुळे इथे कवितेचे व्यक्त होणे आहे. गीत तुझेच होते सूर तुझेच आहेत तुझ्याच मुळे आयुष्यात संगीताचे लेणे आहे. रुप तुझे होते रंग तुझेच आहेत तुझ्याच मुळे सदा रंगपंचमी आहे.


शब्दचित्र

लेखक: कर्नलतपस्वी | प्रसिद्ध:
संपले का रंग सारे का कुंचले मोडले दोन रंगात सारे विश्व का रे रेखले नीळा सावळया निर्झराचा रंग कोठे लपवीला काय ठावे तुझ्या मानसी शुभ्र धवल का रे भावला अंथरुन कालीन धवल लपवले रंग सारे उजळून विश्व सारे दीप तेज मंदावले नील गगन ,धवल तारे वाहती उष्ण वारे शोषून धवल रंग हळूच फुटती धुमारे येता ऋतुराज यौवनाचा उघडेल मूठ त्याची आशा हीच उद्याची उधळून रंग सारे उमटतील चित्रं नव पल्लवांची


रिमझिमत्या धारातून आलीस.

लेखक: Deepak Pawar | प्रसिद्ध:
रिमझिमत्या धारातून आलीस होऊनिया चिंब मला वाटले फुलावरती जणू जलाचे थेंब. मातीस स्पर्शती धारा गंधात नाहते धरा तुझ्या तनुचा तसा दाटला, मनात मृदगंध. पापण्या मिटून दूर लाजून जाहली चूर थरथरत्या ओठावर देशी तू दातांचा दाब. दाटले मनी काहूर डोळ्यात साठला पूर उगा बावरी होऊ नको, का घाबरशी सांग?


परदेशवारी-२

लेखक: कर्नलतपस्वी | प्रसिद्ध:
दुर राहाणाऱ्या लोकांचा "भावनिक भागांक"(Emotional quotient) हा जवळपास राहाणाऱ्या लोकां पेक्षा जास्त आसतो.हा सैन्यातला स्वानुभव, कायमच घरापासून दूर,वर्षातून एकदाच काय ते सुट्टीवर जायचे, त्यामुळेच दूर राहणार्‍या मुलांना काय वाटत असेल याची जाणीव ठेवूनच सामानाचे नियोजन केले होते. शिकागोला पोहोचल्या नंतर सकाळपासून मुलांच्या मीत्र मैत्रिणीचे फोनवर फोन, 'आले का आई बाबा?फ्लाईट वेळेवर आली ना!" वगैरे. बरोबरच आम्ही आल्याशिवाय सुटकेस उघडाल तर बघुन घेऊ आशी प्रेमळ धमकी पण देत होते. करोनामुळे नाईलाजास्तव एक आठवडाभर थांबावेच लागले. घरातच क्वारटाइन होतो.


आशा

लेखक: निनाद | प्रसिद्ध:
नौका ही बांधलेली राहील का बांधलेली उरात भरूनी वारे ही पाहतो निघालेली वादळे येती तरी लाटा फोडून ती गेली थांबलो तेथेच मी ती निघून गेलेली मी असेन येथेच वेळ नाही गेलेली परत कधी येईल ती आशा न विझलेली


कुमुदिनी आणि मी

लेखक: सरिता बांदेकर | प्रसिद्ध:
कुमुदिनी आणि मी कॅालेजचा पहिला दिवस मी कधीच विसरू शकत नाही.त्यादिवशी मला कुमुदिनीचे प्रथम दर्शन झाले. आपलं पण रॅगिंग होईल म्हणून हळूच डोळ्याच्या कोपऱ्यातून इकडे तिकडे बघत पण कुणाला घाबरत नाही असा आव आणत तिने कॅालेजमध्ये प्रवेश केला होता. पण कॅालेजमधील टवाळ कार्टी तिचं ते सौंदर्य बघून घायाळ झाली आणि तिचं रॅगिंग करायचं विसरून गेली. त्यात माझ्या सारख्या भित्र्या भागूबाईचा मात्र फायदा झाला.मग मी ठरवलं काहीही झालं तरी कुमुदिनीशी मैत्री करायची. पण तिचं माझ्याकडे लक्ष जाईल असे कुठचेच गुण माझ्याकडे नव्हते.फक