Skip to main content

कविता

अपेक्षा

लेखक मि मिपाचा मित्रच यांनी शुक्रवार, 10/01/2014 13:08 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार माझा मिपा वर हा प्रथमच लिहिण्याचा प्रयत्न .. काय लिहावे असा विचार करत असताना वृद्धाश्रम वरील शतशब्द कथा वाचली आणि खालील कविता - संग्रही असलेली - आठवली ,कविता खूप जुनी आहे, मी लिहिलेली नाहीय - पण भावना पोहचवण्या साठी अश्या गोष्टींची गरज नसते.. स्वतःचे लिखाण नसेल तर ते मीपा वर टंकता येते कि नाही हे माहित नाही, हि कविता या आधी मिपा वर पूर्व-प्रकाशित झाली आहे कि नाही ते पण माहित नाही. जर अशी परवानगी नसेल किंवा पूर्व प्रकाशित असेल तर आधीच क्षमस्व. !! अपेक्षा !!

गुगल आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार

लेखक आयुर्हित यांनी शुक्रवार, 10/01/2014 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या महिन्यात एक छान जाहिरात बघण्यात आली.बघताच त्याच क्षणी आपल्या सन्माननीय तात्यारावांची (स्वातंत्र्यवीर सावरकरांची) प्रकर्षाने आठवण झाली. जाहिरात परत परत बघाविसी वाटली. व्वा! काय उत्तम संदर्भ, हृदयस्पर्शी कथा, संगीत, संकलन व सादरीकरण!!! "एक दौर था ,मन मन मोर था" वरून ही मराठीमाणसाने(संदर्भ: बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला) बनवलेली आहे ह्या विचारावर ठाम झालो. आता लवकरच "अटकेपार" च्या ऐवजी "गुगलवर" हा शब्द प्रयोग येईल असे वाटते.

काळजातली धग विझु देउ नकोस.......

लेखक पंडित मयुरेश नागेश्वरम देशपांडे यांनी गुरुवार, 09/01/2014 19:02 या दिवशी प्रकाशित केले.
एक प्रश्न विचारावासा वाटतो देवा तुला असा कसा संसाराचा गाडा तु उभा केला कुणी न जिंकती कुणी न हारती कुणी न हसती कुणी न रडती सारेच अभिमन्यु इथे नशिबाच्या चक्रव्युहात अडकती पैजांचा असतो डाव तीन पत्त्यांत रंगतो खेळ इथे कुणाचे कुणीच नसती फक्त असतो हाता-तोंडाचा मेळ क्षितीजाच्या वाटेवरती डोळे सारेच लावुन बसतात तोच सूर्योदय पुन्हा सूर्यास्त मनातल्या मनात हसत राहतात ठिणग्यांची कमतरता इथे अगदीच आहे असे नाही पण सारे रानच पेटुन उठावे असे काही घडतच नाही अद्याप घंटानाद होतोय गाभारी देवा तुझ्या अद्याप आस लावुन बसलोय पायरीशी देवा तुझ्या तुच आता ओढुन आण लाट वादळांची एखादी मुठी वळु दे नसा तापु दे होउन जाउ

नविनच

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी मंगळवार, 07/01/2014 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
पावसात भिजूनही मी कोरडाच राहणे हे जरा नविनच होते चिंब होऊनही मी धुंद न होणे हे जरा नविनच होते . हा कुठला नवा खेळ? . दाटून येता 'तो' जीव असा हुरहुरतो 'तो' येताच दारचा निशिगंध बहरतो ढग फुटून 'तो' असा काही बरसतो त्या गंधाने मी आकंठ मोहरतो . नेहमी हा पाऊस येतो आणि मी शुद्ध हरवतो सचैल भिजून भान हरपतो कोसळणाऱ्या मेघधारांनी माझे सूर भिजतात हृदयात मेघमल्हाराची गाज उमटू लागते मनात वसंत रुंजी घालाया लागतो मग आजच असे का व्हावे? . हा वर्षाव कोरडा का वाटावा कां आज मी ओथंबत नाही नेहमीसारखा . . हम्म... आज ह्या पावसाची दिशाच चुकली होती तो तुझ्या घराला टाळून आला होता हे जरा नविनच होते....
काव्यरस

क्षण

लेखक चाणक्य यांनी रविवार, 05/01/2014 20:43 या दिवशी प्रकाशित केले.
सोनेरी किरणं अंगावर पडली तशी त्याची चुळबुळ सुरु झाली किणकिण्या डोळ्याने पाहिले त्याने आजूबाजूला आज नेहेमीपेक्षा जरा जास्त लख्ख वाटत होतं काय की... थोडं जास्त दिसतही होतं पण तरी अजून काही पहावं असंही वाटत होतं त्याला धडपडत ऊठलं ते आपल्या चिमुकल्या पायांवर तोल सांभाळत आजूबाजूच्या अनुभवी जीवांना कळलं आता काय होणार आहे ते त्यांना एकीकडे आनंदही होत होता आणि थोडं दु:खही कारण आज 'तो' दिवस होता... कुठुनशी एक आदिम ऊर्जा अंगात भरून झोकून दिलं त्याने स्वतःला आसमंतात त्याने....त्या पक्ष्याच्या ईवल्याश्या पिल्लाने आणि ऐकू आली ईतर अनुभवी पक्ष्यांना ती चितपरीचित फडफड पंखांची 'मी उडालो आई' 'हो रे पिला, तू उडा

माझी मिठि अद्याप खुली आहे..........

लेखक पंडित मयुरेश नागेश्वरम देशपांडे यांनी रविवार, 05/01/2014 14:27 या दिवशी प्रकाशित केले.
कानी पडला आवाज पैंजणांचा झपकन नजर मागे गेली मनास झाला भास पावलांचा मला तर वाटले तुच आली असे कित्येकदा होत असते तुच सगळीकडे दिसत असते वार्याची एखादी झुळुकही तुझ्या येण्याची चाहुल भासते तु दूर जातेस जेव्हा परतीची मी वाट बघतो ज्या वाटेने गेलीस तु त्याच वाटेवर उभा राहतो तुझे निघुन जाणे नेहमीचेच माझेही वाट पाहणे नेहमीचेच जरी प्रेम आपल्यात टिकुन आहे आपले भांडण होणे नेहमीचेच तु परत येण्याची खात्री आहे तरी अजुन रात्र भित्री आहे लवकर परत येशील का तु? माझी मिठि अद्याप खुली आहे.......... - कवि म.ना.दे.

भरारी

लेखक अज्ञातकुल यांनी शुक्रवार, 03/01/2014 11:13 या दिवशी प्रकाशित केले.
घेत भरारी गगन विहारी विहंग मन प्रतिमा कोरी वेध दिशांचे युगे युगे जन्मो जन्मी विस्मयकारी अशक्य कोटी असंख्य नाती गुंता अनुनय गाभारी अन्वय शोध बिचारे अगणित चुकार भाषा व्यभिचारी गाळिवशा रिपुकांच्या भिंती रोप पेरती अविचारी किती करावे थोडे ते तृप्ती न कधीच महाद्वारी द्यावे घ्यावे विसरावे परतून न यावे माघारी निववेल कुणी इच्छा वांच्छा थांबेल कधी का ही वारी ?? ………………………. अज्ञात
काव्यरस

मटका भरके सूरज उल्टा

लेखक चाणक्य यांनी बुधवार, 01/01/2014 07:00 या दिवशी प्रकाशित केले.
नानबाच्या स्वाक्षरीत गुलजार च्या ओळी वाचलेल्या-
तुम बोल रही थीं होंठ तुम्हारे चाँद की काशें काट रहे थे ! मैं हैरां... हैरां हैरां ...
वाचल्या क्षणापासून मनात रुंजी घालत होत्या. जरा गुगलून पाहिलं तर समजलं की गुलजारच्या 'पंधरह पाँच पचहत्तर' या पुस्तकात एक नज्म आहे- 'मटका भरके सूरज उल्टा' , त्यातल्या या ओळी आहेत. अहाहा....कय सुंदर नज्म - मटका भरके सूरज उल्टा शाम ने दूर समंदर की दहलीज पे जाकर रातका पश्मीना पह्नकर तुम आईं थी !

अंथर

लेखक अज्ञातकुल यांनी रविवार, 29/12/2013 11:49 या दिवशी प्रकाशित केले.
धुके सभोवर चराचरावर दोघे कातर एकांतावर गूढ वेदना हृदयी अनवट खोल कुठे निश्वास अनावर काळ दाटला पडद्यापाठी स्मरण अडखळे प्रतिमा धूसर शब्द स्तब्ध प्रतिबिंब आभासे; संरचना कांचेचे झुंबर लोलक फिरवी तरंग गहिरे द्वैत विचारांचे मन संगर ताल आडाणे अवघडलेले रान दुंदुभी वणवा मंथर आहे नाही संभ्रम अवघे सहवासाचे दुर्लभ अंथर उलाल रेषा अगतिक निष्फळ जुळवू पाहे समान अंतर …………………………. अज्ञात
काव्यरस