Skip to main content

कविता

बिंब आणि प्रतिबिंब

लेखक शेखरमोघे यांनी रविवार, 29/12/2013 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
सहज वाटलं जीवनाची वाट चालताना एक प्रसन्न, सुंदर, सुगंधित फूल द्यावं तुला आणि तुझ्याकडे पहातच राहावं, तू ते फूल पहात असताना आणि मनातल्या मनात सांगत रहावं काळ पुरुषाला थांब, जरा थांब, अरे थोडासा तरी थांब का रे सतत घड्याळाचे काटे पुढे ढकलत रहाण्याची घाई तुला? असेच सतत राहू दे ना पहात मला बिंब आणि प्रतिबिंब, बिंब आणि प्रतिबिंब

टिकले तुफान काही

लेखक गंगाधर मुटे यांनी शनिवार, 28/12/2013 00:47 या दिवशी प्रकाशित केले.
टिकले तुफान काही

ललकारण्या दिशांना, उठले तुफान काही
त्यातील फार थोडे, टिकले तुफान काही

निद्रिस्त चेतनेचे सामर्थ्य जागवाया
पोटात सागराच्या घुसले तुफान काही

देण्यास अंधुकांना संधीप्रकाश थोडा
किरणासमान चर्या जगले तुफान काही

संसार ध्वस्त झाला, हटलेच ना तरीही
झुंजून निश्चयाने लढले तुफान काही

उडत्या धुळीकणांना पदरात घेत ज्यांनी
आभाळ झेलले ते उरले तुफान काही

तू रोवलेस येथे बी अर्थकारणाचे

तेंव्हा

लेखक psajid यांनी शुक्रवार, 27/12/2013 14:58 या दिवशी प्रकाशित केले.
तेंव्हा स्वप्नांसाठी , जागणारी ‘तळमळ’ वेगळी होती ऊरी भीती हुरहूर , आवडणारी ‘हळहळ’ वेगळी होती ! जीव गहाण खळीसाठी , पैंजनास कान दिला कुंतलात मुख , मन वेधणारी ‘सळसळ’ वेगळी होती ! वीण जोडून वर्तमानी , दाविले भविष्य त्यांनी घेऊन प्राक्तन हाती, वाहणारी ‘कळकळ’ वेगळी होती ! भोवतीचं भान नाही , क्षण एकेक माजलेला बोचलं सुख ज्यांना , वाटणारी ‘खळखळ’ वेगळी होती ! दोष त्यांचाच होता , ज्यांच्या सदाचारी वल्गना पडदा घेऊन द्वेषाचा , भेदणारी ‘मळमळ’ वेगळी होती ! हिरावला मस्तकमोती , "साजीद" घायाळ अश्वत्थामा चौघांसारखी जखम , सलणारी ‘भळभळ’ वेगळी होती ! - साजीद यासीन पठाण
काव्यरस

अनुप्रीती

लेखक अज्ञातकुल यांनी बुधवार, 25/12/2013 18:19 या दिवशी प्रकाशित केले.
विलयखुणा जन्मावरती; मन उलगडते ती अनुप्रीती चिरंजीव; खडकावरही असते प्रेमाची अनुभूती काळ युगे हतबल शरणागत कली कळा निष्प्रभ भवती हरित वाण अंकूर सदा; ऋतु वयातीत जणु वावरती ओलांडे यातना पर्व वेदना पर्वतांच्या भिंती खळे अवखळे फ़ेसाळे निर्झर निर्मळतम ध्येयगती तमा ना कुणाची वा भीती लाघव सरिता ओघवती काठ किनारे तृप्त; सुप्त समृद्ध क्षणांची ही भरती …………………………. अज्ञात
काव्यरस

का रे बा विठ्ठ्ला का न भेटी मला?

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 25/12/2013 06:57 या दिवशी प्रकाशित केले.
का रे बा विठ्ठ्ला का न भेटी मला? का रे बा विठ्ठ्ला का न भेटी मला? ||धृ|| गेलो तुळशी मंजीरा घ्याया तेथे न तू गावला राया ||१|| गेलो राऊळी शोधाया शोध व्यर्थ गेला वाया ||२|| चंद्रभागेकाठी तू न सापडेना तुझ्याविण मन शांत होईना ||३|| शोध घेतला शोध घेतला अंती नाही तू भेटला ||४|| पाषाण म्हणे का शोधसी इथेतिथे चित्ती तुझ्याच विठ्ठल वसे ||५|| - पाभे
काव्यरस

अशाच एका सांज वेळी

लेखक पंडित मयुरेश नागेश्वरम देशपांडे यांनी मंगळवार, 24/12/2013 20:24 या दिवशी प्रकाशित केले.
अशाच एका सांजवेळी भेट व्हावी आपुली अवेळी एकांत असावा तेव्हा तेथे नसावे कोणी अवतीभवती परतणार्या पक्षांचीही दाटी नसावी अवतीभवती काळोखातही लख्ख दिसावा चेहरा तुझा चन्द्रकोरीसारखा पापण्यांची उघड-झाप असावी जणु चमचमणार्या तारका गार वार्याची झुळुक येईल उब घ्यावीशी तुला वाटेल हातांचा ऊबदार स्पर्श अन् उश्वासांची साथ भेटेल मुकी जरी तु उभी असलीस पैंजण सारे बोलुन जातात चांदण्यात फिरावयास मग पाऊले अलगद चालु लागतात जरी शांतता असली चहुकडे गाणे मनी गुणगुणत असते तालावरती पावलांच्या सतार मनी छेडत असते निरोपाचा क्षण येतो जेव्हा वाट सापडु नये असे वाटते मी हसण्याचा प्रयत्न करतो पाणी तुझ्या डोळ्यात दाटते ---

तू रे पल्याड गोविंदा!

लेखक आतिवास यांनी सोमवार, 23/12/2013 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
चाल चालले मी श्वास राहिला पेटता पाणी उसळले किती गूढ डोहाने जपता. जाणत्याला सारे भय तण माजताना रानी मस्तवाल झाले मी त्याने तुला काय हानी? वाया गेले एक तप पुढे चालू राही धंदा तुला नाही सुख दु:ख तू रे पल्याड गोविंदा! *अन्यत्र पूर्वप्रकाशित

झुळुक वादळी

लेखक अज्ञातकुल यांनी रविवार, 22/12/2013 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
युगे जाहली जळून पण अंगारा अजून दाही कलेवरे उरली स्वप्नांची डोळा भरून कांही काजळ वाटा धूळ फ़ुफ़ाटा दिशा व्यापल्या दाही सुकलेला पाचोळा भिरभिर उडवत वारा वाही अंध मोहरे काळे गहिरे पोत मानवत नाही वठलेल्या रेषांचे व्रण अवशेष वाहती भोई पराधीन मायामय जीवन झुळुक वादळे तीही ओहटीत कवने वचनांची जगणे लाट सदाही उलगडणे वाळूसम काठावर लोटांगण घेई खोल तळातिल दडलेले सागर पृष्ठावर येई फेस दुधी विरघळे उफाळे फुटे अंगभर लाही श्वासांचे दळणे आदळणे चिर अंदोलत राही …………………. अज्ञात
काव्यरस

आयुष्य

लेखक हेमान्गी यांनी शुक्रवार, 20/12/2013 17:42 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्याच्या वाटा थोडे खळगे थोड्या लाटा जपून चालावे तर लाटांबरोबर वाहत जाण्याची भीती धावत जावे तर खळग्यात पडण्याची भीती तरीही मन होते फुलपाखरू स्वप्नगंधी फुलांनी लागते बहरू आसमन्ताच्या जादूने रंगांची उधळण अंगणात जणू प्राजक्ताची पखरण वृक्षवल्लींना चढतो फुलांचा साज कधी गंभीर होते मन ऐकून समुद्राची गाज बहर ओसरू लागताच तुटतात स्वप्न साखळ्या कागदावर उतरू लागतात शब्द चारोळ्या

चिर अनंत

लेखक अज्ञातकुल यांनी शुक्रवार, 20/12/2013 10:10 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा सुखे परतून न येती पानांवर जैसे दंव मोती ओघळल्या स्वप्नांचे अंती व्रण कांचेचे उरती परा शरांचे ढंग निराळे छटा उमलुनिया वावरती विमल कोवळे पराग गंधित माल्य फुलांवर लवलवती परम अलौकिक सण नियतीचे दरवळती वाटेवरती क्षणभंगुर वैभव हे पण अस्वाद कुणी घेती ना घेती पसा असू दे याचकसम आमंत्रक सदा नयन भरती आसपास चिर अनंत कोटी अमृतमय कण भिरभिरती धुंद सरोवर कुंद सभोवर शकुनांचे मेणे अवती माया ईश वराची अवघी चराचरावर ओघवती ……………… अज्ञात
काव्यरस