Skip to main content

कविता

अव्यक्तांच्या समिधा

लेखक सांजसंध्या यांनी रविवार, 10/11/2013 19:30 या दिवशी प्रकाशित केले.
आज ना उद्या वटवृक्षांची जोडी..आपोआप ढासळेल, उन्मळून पडेल.. तग धरून उभारलेली अंग चोरून वाळलेली आज ना उद्या घाव बसतील कु-हाडीचे.. फांदीफांदीवरती काही शिल्लक उरणार नाही, जमिनीवरती पण एकमेकांत गुंतलेल्या पारंब्या तुटता तुटणार नाहीत.. नाग-नागिणीसारख्या मिठ्या सुटता सुटणार नाहीत खोल खोल गेलेल्या..एकमेकांत गुंतलेल्या कितीही खणलं तरी पुरून उरतील.. तुझ्या माझ्या वेदनांसारख्या !! जगाच्या अंतापर्यंत खणत राहीलं तरी अव्यक्ताचा गुंता सुटायचा नाही.. शेजारी उगवूनही जपलेल्या विरहाची माती व्हायची नाही जोडी अचेतन झाल्यावर कुणी पाहीलंच जर..

प्रवास

लेखक भारी समर्थ यांनी रविवार, 10/11/2013 00:28 या दिवशी प्रकाशित केले.
धुक्यात अंधुक दिसते वाट कठिण अशक्य प्रचंड घाट परि न टेकुनी किंचीत पाठ एकच बांध तु निश्चयगाठ चालत रहा रे चालत रहा रविकिरणांची घेऊन साथ अडेल तेथे घालून लाथ फुलात शोधुन न्यारी बात फळे यशाची चाखीत खात चालत रहा रे चालत रहा इथे प्रवासी तु न एकटा नवे सवंगडी, नविन वाटा गाठलेस जरी अपुल्या ध्येया नवशिखरे तु चढुनी जाया चालत रहा रे चालत रहा

"वेडी"

लेखक अमेय६३७७ यांनी शनिवार, 09/11/2013 11:01 या दिवशी प्रकाशित केले.
येताजाता शिव्या सारख्या गाड्यांवरती दगड मारते जरतारीच्या आवेशाने लक्तर दैवी ती सावरते केस पांढरे - जटाच भारी मिचमिच डोळे लुकलुकताना तोंड चालते हातांसोबत तारस्वराने ओरडताना येणारा अन् जाणाराही वाट वाकडी दुरून करतो मधमाश्यांच्या मोहोळाशी कोण कशाला उगाच भिडतो? हसते वेडी सदा मुखाने आनंदी परि कधी न दिसते मूल पाहुनी कुणी गोजिरे तळमळताना अश्रू पुसते स्थळकाळाशी तुटले नाते एकच आठव गतकाळाचे रहदारीने ठोकरलेल्या शिशुदेहाच्या कलेवराचे प्रेत टांगुनी वेशीवरती कुणी चौकशी, कुणी सांत्वना दुःखामागे धिंडवड्यांच्या नको जाहल्या उरी यातना वेड पांघरुन विसरू पाही दैवगतीची बधिर कहाणी जगत

कल्पिते

लेखक अज्ञातकुल यांनी शुक्रवार, 08/11/2013 19:15 या दिवशी प्रकाशित केले.
कोण कल्पिते कथा मनी जळी स्थळी अंग जाळिते व्यथा उजाडते कळी जाणिवा उण्याच का बुडून त्यात पोकळी वंचना किती कशा दिशा न एक मोकळी कोष्टकेच जुंपली व्यापली कुळी झुंझली अनंग रोम रोम पाकळी अंतरी उदंड कंड बंड कोश वादळी थांग छिन्न बंद मुका ओहटी तळी का कुणी कुणास जोजवावे उरी अकारणे कशास आठवावे तरी व्याध वेध घेत धाव धावतो परी मिळेल जे मिळूनही रितीच टोकरी ……………… अज्ञात
काव्यरस

अस्तित्वाच्या पल्याड..

लेखक आनंदमयी यांनी गुरुवार, 07/11/2013 14:49 या दिवशी प्रकाशित केले.
अस्तित्वाच्या पल्याड कोठे संथ नदीच्या पैलतिरावर, जललहरींसह वाहत गेली दूर तिथे स्वप्नांची घागर... त्या तीरावर गोकुळनगरी कान्हाची बेधुंद बासरी पाहुन लोभस रूप तयाचे, मनही झाले निळसर निळसर सर्वार्थाने देह लाजला पाहताच तो रोखुन मजला नाजुक कटिकमलावर बसला रुतुन तयाच्या नजरेचा शर हळूच जवळी आला कान्हा छेडित नाजुक अधरफुलाना भान हरपले जेव्हा मजला स्पर्शुन गेला तो मुरलीधर हलवुन मजला गेला वारा उधळुनी सुंदर स्वप्नफुलोरा विरून गेले रूप सावळे आणिक मागे उरली हुरहुर ©अदिती शरद जोशी
काव्यरस

माणसाचा स्वभावाच आहे तो...

लेखक गजानन५९ यांनी सोमवार, 04/11/2013 14:01 या दिवशी प्रकाशित केले.
माणसाचा स्वभावाच आहे तो... माणसाचा स्वभावच आहे तो कुनि कामाला पुढे ढकलतो, बॉस अप्रेजल पुढे ढकलतो, तर एखादा गरीब मरणाला पुढे ढकलतो मरणाला कवटाळणारा क्वचितच जन्माला येतो, न मागता सगळे देणारा देवत्वाला पोहोचतो. तरीही मरणाच्या बाजारातली तेजी काही सरत न्हाई, काही जन मात्र चंदनाच्या लाकडाशिवाय सरणावर चढत न्हाई असच चालत हल्ली अस म्हणून भागणार न्हाई दुसर्याच पांघरून आपल्याकड वढून चालणार न्हाई न्हायतर एक दिवशी वढलेल्या पांघरुणाखाली गुदमरला जाशील. पन माणसाचा स्वभावच तो आक्षी म्हणूनशान भागणार न्हाई... --------------------------------------------------------------------------- एक विनंती :- हे जे का

तपस्या

लेखक अज्ञात यांनी सोमवार, 04/11/2013 07:02 या दिवशी प्रकाशित केले.
का गं आज अशी शांत का ? कोणी बोललं का तुला ? विशेष काही नाही.

तू उत्तर नाही दिलंस मला

लेखक वडापाव यांनी रविवार, 03/11/2013 00:07 या दिवशी प्रकाशित केले.
तू उत्तर नाही दिलंस मला मी एक प्रश्न विचारला का तुझ्यातल्या नव-याने आज माझ्यावर हात उगारला? तू उत्तर नाही दिलंस मला हवं तर पुन्हा विचारते तुझ्या चुकांचं खापर मी का डोक्यावर माझ्या मारते? तू उत्तर नाही दिलंस मला मी केव्हाची वाट पाहत्येय संसार अधोगतीच्या प्रवाहात जातोय आणि मीही त्यात वाहत्येय तू उत्तर नाही दिलंस मला उलटून बोलतोयस तू फक्त तुझ्यासारखाच मीही जाब विचारला तर का खवळतंय तुझं रक्त? तू उत्तर नाही दिलंस मला आता वाट पाहून मी थकले तुझा विश्वास मिळालाच नाही आज तुझ्या प्रेमालाही मी मुकले

'वाढदिवस'

लेखक अमेय६३७७ यांनी शनिवार, 02/11/2013 00:02 या दिवशी प्रकाशित केले.
रोजच्याच राघववेळी, उठण्याची घटिका झाली  दिवसाचे विझले डोळे, रात्रीस नीज ना आली वडिलांच्या कानी बोले, आवाज आज आईचा, "पुत्राच्या वाढदिनाचा, सोहळा खास घाईचा" "पाहता पाहता सरली, परि कैशी इतकी वर्षे?"  बाळाचे कौतुक दाटे, डोळ्यांतुन श्रावण बरसे औक्षणास उठते माता, वडिलांचा धरुनी बाहू  "उठवाया सोनूल्याला, दोघेजण मिळुनी जाऊ"   थरथरत्या हातांवरती, सावरती हार फुलाचा भिंतीवर सैनिकवेषी, हसतो चेहरा मुलाचा -- अमेय

परिपक्व

लेखक अज्ञातकुल यांनी शुक्रवार, 01/11/2013 17:57 या दिवशी प्रकाशित केले.
जाणीव एक कोण्या बीजापरीस असते संवेदना फळाची शाखेस भार नसते गंधास स्वाद जेंव्हा परिपक्व फूल होते शब्दात भावना अन सारीतेसामान झरते त्या ओढ अर्पणाची समिधा समर्पणाची व्हावा तृषार्थ कोणी आकंठ तृप्त ह्याची ………………… अज्ञात
काव्यरस