Skip to main content

कविता

वसा संस्कृतीचा

लेखक BONGALE SANTOSH SHAHU यांनी शनिवार, 30/11/2013 20:02 या दिवशी प्रकाशित केले.
वसा संस्कृतीचा ऋण सावकारीच फेडण्या कुणब्याला दुष्काळाचा शाप रात्रंदिन कष्ट करायचा नाही थांबला कधी बाप उठून पहाटे रोज माय सारवते दुःखाच्या भिंती सोसत चटके दारिद्र्याचे दिस रोज मावळती राणी डुलणाऱ्या पिकामंधी दिसू लागे साखर गोड जल्म गेला मातीत अवघा तळहाताला आले किती फोड गाई गुरांच्या हंबरात वाढे संसार शेणामातीचा सुख नांदावे घरीदारी वसा जपतो संस्कृतीचा थकलेला चार घास खाऊन जाई तृप्त होऊन वाटसरू जिच्यावर जगतो आम्ही त्या काळ्या आईला कसं विसरू संतोष बोंगाळे

मैत्री......एक आगळंवेगळ नातं

लेखक अनिल तापकीर यांनी गुरुवार, 28/11/2013 23:50 या दिवशी प्रकाशित केले.
(सदरचा लेख याला कविता म्हणावी की निबंध काही समजत नव्हते माझी मुलगी आरती दहावित शिकते तिने स्वता तयार करुन वाचयला दिला नि थक्क झालो. तिचे हे पहिलेच लेखन वाचुन खुप आनंद झाला. पहा आपल्याला कशी वाटते.) कु. आरती आनिल तापकीर , भारती विध्यापीठ कन्या प्रशाला , कोथरूड ,पुणे गाव- मुलखेड . तु मैत्रीण नाहीस , मैत्रीतला पहिला शब्दच तु आहेस . तु एक दिवस जरी शाळेला आली नाहीस कि असं की काही तरी घरीच विसरले . तुझ्यासारखी मैत्रीण मिळण्यासाठी नशीबच लागते . मैत्री करण्यासाठी प्रेम लागतं . तू माझं जीवनच बदलून टाकलं आहेस . मनातलं स्वप्न साकार करण्याची जिद्द दिली आहेस.

ऐक सखे

लेखक अमेय६३७७ यांनी गुरुवार, 28/11/2013 22:21 या दिवशी प्रकाशित केले.
कशाला उसासे हवे आर्जवांचे   नवी वागण्याची तर्‍हा ही कशी उगा श्वास श्वासांस जाळीत येतो  फिरे जो तुझा हात देहानिशी  तिथे चंद्र माथी चढूनी नभाच्या  मनासारखे चांदणे शिंपुदे  रतीला म्हणावे तुझ्या साजणाचे  जरासे निखारे विखारास दे   प्रिये खेळ आहे खरा संयमाचा  कसे आवरावे कळेना तुला  अगे मंद चालीतली रागदारी  असे ही नव्हे हा स्वरांचा झुला  जसे मोगर्‍याने फुलावे सुखाने  तसे वाढवूया निशेला सखी   हळू माधुरीचे भरू देत प्याले  उधाणास येऊ नको सारखी    -- अमेय

बेधुंद मनीचे बोल...

लेखक आनंदमयी यांनी गुरुवार, 28/11/2013 14:51 या दिवशी प्रकाशित केले.
बेधुंद मनीचे बोल निसटून चालले होते चंचलशा त्या लहरींना मी हळूच टिपले होते ते बोल खुळेसे काही अविचल त्या अस्फुट तारा वळणाशी भिरभिरणारा तो सोसाट्याचा वारा बांधून कधीचे ज्यांना मी उरात जपले होते मी बोल बोलता सारे अस्तित्वच बहिरे झाले अविभाव आर्त स्वत्वाचे ते अजून गहिरे झाले जिद्दीच्या तेज कणांनी आयुष्य रापले होते त्या उधाणलेल्या लहरी संकोच गोठवुन गेल्या, विझलेल्या सामर्थ्याला अवचीत पेटवुन गेल्या...! मी ध्येय गाठले तेव्हा हे भान हरपले होते... © अदिती शरद जोशी

मडकी

लेखक सोनल कर्णिक वायकुळ यांनी बुधवार, 27/11/2013 17:57 या दिवशी प्रकाशित केले.
आभाळाच्या सावलीत जमिनीच्या पोटातून झरणारी माया पित शांत पहुडली होती सगळी कुणा दोन अनोळखी हातांनी ओंजळीत मावतील तेव्हढी उचलून नेली कच्ची बच्ची एकमेकांची ओळख घट्ट धरून मुठीत एका अनोळखी वर्तुळावर जावून पडली सारी सुरु झाला खेळ तशी, कधी भिजत, कधी थिजत शोधत राहिली हरवलेली जमिन फिरत राहिली काळचक्रावर भोवळ येईस्तोवर काही घडली,काही मोडली दोन हात तिम्बत राहिले त्यांना मनाजोगता आकार येईपर्यंत भाजून काढताना, हात कुणालातरी सांगत होते 'तावून सुलाखून निघाल्यावरच पक्की होतात मनं… वाजवून बघावीत एकदा , आणि नेभळट वाटली तर मांडूच नयेत बाजारात.' ऐकता ऐकता शोधत राहिली आपल आभाळ आपल्याच आतल्या अंध-या पोकळीत पुन्ह

खळबळ

लेखक अज्ञातकुल यांनी मंगळवार, 26/11/2013 09:34 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या तीर्थरूप वडिलांचे अकस्मात निधन झाले. वयाच्या नव्वदीतही शेवटच्या क्षणापर्यंत ते कार्यरत आणि आत्मनिर्भर होते. त्यांच्या जाण्याने हरवल्यागत झालेली ही विकल मनोवस्था...................... ते समाधानाने भाग्यवंतासारखे अनंतात विलीन झाले. त्यांना सद्गती मिळेलच. त्यांची तत्परता, प्रमाणिकपणा, स्वावलंबन या आदर्श संस्कारांद्वारे ते आम्हा सर्व भावंडांत वास्तव्य करून असले तरी त्यांच्या सहवासाची पोकळी आता आमच्या अखेरपर्यंत रितीच राहील.........
काव्यरस

गूज

लेखक अमेय६३७७ यांनी सोमवार, 25/11/2013 07:47 या दिवशी प्रकाशित केले.
शिशिराची ती असो पानगळ गदमद किंवा दाहवणारी तुझ्या संगती कळे न काही निशा नवी की ... मालवणारी दूर राहता उमजत जाते नात्याच्या विरहाची खोली मनांसारखी उधाणलेली देहांचीही असते बोली सभोवताली निसर्गलीला चराचराचे खेळ वेगळे आज पाहता नसे स्वस्थता कर्पूरासम चित्त पेटले गंध स्मृतींचा होय अनावर हसू सांडते दारी जाई भूल घालतो तशात चाफा हिवाळ्यातही चटका देई शब्दासोबत अर्थ स्मरावा सहवासाचे आठव तैसे अंगोपांगी मोहरतो मी गूज कुणा सांगावे कैसे ! -- अमेय

विचार

लेखक अमोल मेंढे यांनी शनिवार, 23/11/2013 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
तुला प्रेमपत्र लिहतांना साक्षी ठेवलेल्या, प्रेमदेवतेला विचार... तु येण्याची वाट पाहत जिच्यावर तासन् तास बसलो, त्या वाटेला विचार... दिवसरात्र तुझीच स्वप्ने बघणार्‍या, माझ्या डोळ्यांना विचार... चंद्राची व तुझी तुलना करतांना, तयार झालेल्या कवितांना विचार... तुझ्या आठवणीत रात्री जागतांना, ज्यांना मला पाहिलं, त्या चांदण्यांना विचार... माझं तुझ्यावर किती प्रेम आहे, हे तेव्हा तुला कळेल... माझ्या राखेतील अस्थींतुन सुद्धा, तुला तुझेच नाव ऐकायला मिळेल...

अरूप

लेखक सागरलहरी यांनी शनिवार, 23/11/2013 09:40 या दिवशी प्रकाशित केले.
अरूप उमजोनी जाय, दाविते पंथ गुरुमाय, अज्ञान विलया जाय, तत्काले... जन्मोजन्मीच्या ग्रंथी, पाडिती जीवा गुंथी, गुरुस्पर्शे निघे पंथी, मुक्तीचिया... सर्व स्थळी सर्व देही, एकतत्व निश्चये पाही, नित्यानुसंधानी राही, आत्ममग्न... फिटता भ्रमजाल, जेथे तेथे पाहाल, एकत्व अनुभवाल, चित्शक्तीचे... - सागरलहरी - २३.११.२०१३

हझल

लेखक विदेश यांनी गुरुवार, 21/11/2013 06:20 या दिवशी प्रकाशित केले.
ते वार लाटण्याचे चुकवू कितीक आता हा पोळपाट हाती तोही फुटेल आता पाठीस ढाल केले त्या लाटण्यासमोरी डोक्यावरी निशाणा धरणार हाय आता तो संपला 'पुरुषदिन' कळता तिला अखेरी लोटांगणाविना ना पर्याय काय आता प्राविण्य नेमबाजी कौतूक फार झाले का भोगणे तडाखे मज ह्या वयात आता ती सात जन्म नशिबी हिटलर म्हणून आली आज्ञा किती झुगारू उरले न त्राण आता . . .
काव्यरस