Skip to main content

कविता

आई.. मिटलेला श्वास - ७

लेखक गणेशा यांनी मंगळवार, 16/11/2010 13:36 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ६ :- http://www.misalpav.com/node/15395 पार्श्वभुमी : शेतवस्ती वरती राहणारा कवितेचा नायक. शेतातील फ़ुले , बांधावरील माळवादाचे घर, वाहणारा पाट , चंद्र यांची अवस्था ही आता त्यास त्याच्या मोडलेल्या मना प्रमाणे वाटते.. सुर हरवलेले जग त्याच्या मनाच्या बांधावरुन.. बांधावर पडलेल घर रानफ़ुलांचा एकेरी सूर भळभळणारा आठवांचा पाट डोळ्यामध्ये भयसंध्या दाट चंद्राची ढगात हूल सुनसान विचारांची भूल निशब्द एक काहूर मन व्याकुळ सैरभैर श्वास हवेत निस्तब्ध कळेना माझे प्रारब्ध स्मरणात तुझीया सुकलेले दोन नेत्र ------- शब्दमेघ
काव्यरस

नाग !!

लेखक प्रकाश१११ यांनी मंगळवार, 16/11/2010 09:21 या दिवशी प्रकाशित केले.
नाग जेव्हा सरपटत जातो तेव्हा खरेच नाही कळत मला की तो नाग आहे की साप आहे ? तुम्हाला कळतो का तो काय आहे ते ? साप की नाग ? कधी बघितलाय का त्याला सरपटताना ..? नि अचानक फणा काढताना ? ***** सळसळ सळकताना विजेच्या वेगाने नि फणा काढून जाभाड पसरताना ? अगदी वीतभर फणा नि पसरलेला आक्राळविक्राळ जबडा एखादे पाखरू ,उंदीर कसा भयभीत नि मत्रमुग्ध होऊन जातो त्याच्या नजरेच्या टप्प्यात नि जागच्या जागी कसे खिळून जातो त्याच्या जबड्यात कसा शिरतो अलगद आपले प्राण त्याच्या हवाली करत ? ****** मी पाहिलेय भर दुपारी बारा वाजता एका सरड्याला हताशपणे ...!! आपले प्राण त्याच्या हवाली करताना ….!!! *

मठ्ठपणाचा भाव असणारी दुपार !!

लेखक प्रकाश१११ यांनी मंगळवार, 16/11/2010 08:04 या दिवशी प्रकाशित केले.
सुस्त अशी दुपार उगवली आहे सगळे शरीर सुस्तीने भेंडाळुन यावे अशी दुपार ...! सर्वत्र सुन्न असे वातावरण माणसाच्या जमावाला पण ओहोटी लागलीय सगळीच पेंगत डुलकीच्या नशेत ... कान नि मन सुन्न व्हावे असे वातावरण वटवाघळ!

शब्द्-छल

लेखक अरुण मनोहर यांनी रविवार, 14/11/2010 08:58 या दिवशी प्रकाशित केले.
असं म्हणतात, शब्दांना असतो गंध शब्द करतात धुंद शब्दांचा हा विलास शब्दगंध देई खास पण..... असंही म्हणता येईल........ शब्दांना असतो आकृतीबंध जो करतो गंध कुपीत बंद कोषात अर्थ साचेबंद पचनाला जड ताळेबंद शब्द कंजुषीने वापरा, अर्थाचा झालाच कचरा शब्द भरभरून उधळा, अनर्थाला येई उमाळा शब्द सोलले जातात शब्द तोलले जातात किस काढता अजाणता मने तोडली जातात

(भांडणं..तिचं)

लेखक बेसनलाडू यांनी शनिवार, 13/11/2010 13:13 या दिवशी प्रकाशित केले.
जयश्रीताईंची सांज ही अशी थांबली आणि आम्हाला आमची लांबलेली (गुलाबी) सांज ही अशी आठवली - लांबलेली सांज, कातरवेळ... मनात तीच.. तशीच नेहमीसारखी ! तेच जीवघेणं मौन , तीच नजर करारी. त्या नजरेची दहशत, ते गर्भगळीत होणं...नकळत !! ते बहाणे, ती धडपड, ती धडधड... लवकर कल्टी मारण्यासाठी. मग कबुली, ते न पटणं, समजून न घेणं मी फिक्सर, ती हिटलर .... सार्‍या संध्येचा विसर ! बागेतलं भटकणं, पावसातलं भिजणं, बारमधलं रमणं, शर्टावरल्या गुलाबी खुणा.... ... .. अन् अचानक... अचानक तिचं प्रकटणं .. मग तिचं अस्तित्व, खरं, वास्तवातलं कानफटातलं, बुक्क्यांतलं ! त
काव्यरस

..मी गरुडभरारी घेता...

लेखक कानडाऊ योगेशु यांनी शनिवार, 13/11/2010 00:02 या दिवशी प्रकाशित केले.
..मी गरुडभरारी घेता... मी गरूडभरारी घेता.. तु हो आकाश निळे.. मी सुर्य कदाचित होता.. तु हो किरण कोवळे.. मी खट्याळा वारा होता.. तु हो सुगंध धुंद करणारा.. मी भरलेले नभ मग होता.. तु हो पाऊस कोसळणारा.. मी मिटली पापणी होता.. तु हो सुंदर स्वप्ने सारी.. मी प्रवास सुंदर मोठा तु हो वाट गुणगुणणारी.. मी कधी कंटाळवाणा होता.. तु हो आठवण हुरहुरणारी.. मी कोरा कागद उलगडलेला.. तु होऊनि ये कविता स्फुरणारी.. मी राकट मनगट होता.. तु हो मूठ ताकदवानी.. मी उचकी शेवटची होता.. तु हो पवित्र गंगेचे पाणी.. -------योगेश.
काव्यरस

निशाण

लेखक नगरीनिरंजन यांनी शुक्रवार, 12/11/2010 14:49 या दिवशी प्रकाशित केले.
जय नावाचा इतिहास जो सारे जेत्यांचेच लिखाण आहे पराजितांना अधर्मी ठरवून उंच विजेत्यांचे निशाण आहे राजपुत्रच श्रेष्ठ धनुर्धारी वचन गुरुंचे महान आहे एका अंगठ्याच्या कर्जापायी गुरुधर्म तो गहाण आहे सूताघरी सूर्यपुत्र दानी वंचनाच नियतीचे दान आहे धर्माची चौकशी करतो ईश्वर उरी भावाचाच बाण आहे जरी सुयोधन अंधपुत्र तू राजपदीही अपमान आहे सत्तालोभ धर्माधर्म कधी कमरेखालीच प्रहार आहे कर्मयोगाची करुनि भलामण हरला गुरुचाच प्राण आहे सूडाग्नीत जीवन गुरुपुत्राचे चिरंजीव विराण आहे पराजितांना अधर्मी ठरवून उंच विजेत्यांचे निशाण आहे.....
काव्यरस

रानमेवा’ पुस्तक प्रकाशन

लेखक गंगाधर मुटे यांनी शुक्रवार, 12/11/2010 11:58 या दिवशी प्रकाशित केले.
‘रानमेवा’ पुस्तक प्रकाशन श्री संत गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यनगरीत,शेगांव येथे बुधवार दिनांक १० नोव्हेंबर २०१० रोजी ‘रानमेवा’ या माझ्या पहिल्यावहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मा. शरद जोशी यांच्या हस्ते संपन्न झाले. मा. शरद जोशी यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजीत शेतकरी महामेळाव्यात शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा. रविभाऊ देवांग, कवी इंद्रजित भालेराव, माजी आमदार मा. वामनराव चटप, माजी आमदार मा. सरोजताई काशीकर आणि शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

आई.. मिटलेला श्वास - ६

लेखक गणेशा यांनी गुरुवार, 11/11/2010 19:05 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ५: http://www.misalpav.com/node/15255 पार्श्वभुमी : गावाकडे शांत तळ्यावर बसल्यावर, त्याची सुक्ष्म लाट ही मनावर आघात करते आणि विचारधारेच्या प्रवाहात मन हळुच वाहु लागते तळ्याकाठी निशब्द निरव सांजवेळ नक्षत्रांच्या फेर्‍यामध्ये आठवांचा खेळ सोनेरी क्षणांचा हा क्षणिक कवडसा अभिषेक सूर्यास्तास ओघळणार्‍या आसवांचा तरंगीत सुक्ष्म लाट मनपटलावर विरता तिमिरात सामावते अखंड विचारधारा ---------- शब्दमेघ
काव्यरस

(पडुन आहे गात्र कुजुनि)

लेखक मेघवेडा यांनी गुरुवार, 11/11/2010 04:57 या दिवशी प्रकाशित केले.
प्रियालीतैंच्या "भयंकर, भेसूर आणि अमानवी काव्य" या धाग्यावर केलेलं विडंबन आहे. तेव्हा दोनच कडवी लिहिली होती. आता पूर्ण काव्याचं विडंबन देतो आहे. सुरेश भट साहेबांच्या या अजरामर कलाकृतीचं हे बीभत्स विडंबन केल्याबद्दल त्यांची माफी मागतो. सिच्युएशन अशी आहे : प्रेयसीला सोडून प्रियकर एकटाच जळाला आहे.