Skip to main content

कविता

टंकेल वीडंबक जैं न काहीं

लेखक धनंजय यांनी शुक्रवार, 09/07/2010 22:02 या दिवशी प्रकाशित केले.
टंकेल वीडंबक जैं न काहीं . टंकेल वीडंबक जैं न काहीं, तैं हासयाला मिळणार नाहीं. कोठून पद्यें मिळतील ठोक? सवंगतेला मुकतील लोक. ॥१॥ . कवित्व लोकांत जरी विकें ना, विडंबनीं खूप रुची जनांना. झाकावया लाज कवी न पाहो, विडंबनांचा सुकाळ राहो! ॥२॥ . तीं-तींच चोथा यमकें फिरून, कथानकें तीच फिकी विरून, स्वस्तात आस्वाद तैं नष्ट सारा, रुसेल वीडंबक जैं बिचारा!
काव्यरस

मीरा म्हणे ...........

लेखक झुम्बर यांनी शुक्रवार, 09/07/2010 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
मीरा हसुनी सांगे राधेला रोजच भेटे श्रीहरी मजला हेवा मी करू तरी कसला तो माझ्यातच भरुनी उरला सकाळी माझ्या शेजेवरी सूर्यकिरण बनुनी येतो अल्लड उधळीत उषा लाडिक चाळा तो करितो स्नानासाठी मी जाता माझ्यास्तव तो जल होतो मी माळंता फुले सुगंधी तोच तयातुनी परीमळतो गंध उगळता त्याच्यासाठी चंदन बनुनी तो झिजतो माला गुंफता जाईची तो सूत्र म्हणुनी वावरतो मी नेसता वस्त्र रेशमी तो तयातील मार्दव बनतो मी करिता शृंगार दर्पणी तो सौंदर्य माझे होतो मी छेडीता वीणा विरागी तो तारांचे अंतर बनतो पायी बांधता मी घुंगरू नादमधुर तो झंकारून उठतो रात्री माझ्या गवाक्षातुनी चंद्र बनुनी पाझरतो नक्षत्रांचे
काव्यरस

महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरील गीत : उठ रे मराठी गड्या तू चल सीमेवर

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 08/07/2010 19:06 या दिवशी प्रकाशित केले.
उठ रे मराठी गड्या तू चल सीमेवर
उठ रे मराठी गड्या तू चल सीमेवर उचल मराठी झेंडा जावूदे वर वर ||धृ|| उचल तुझे हात नको भिऊ आता आपूलाच जय होईल सीमेत शिरता झेंडा मराठीचा फडके बेळगाव मनपावर उठ रे मराठी गड्या तू चल सीमेवर ||१|| राज्य आपले एक व्हावे मराठी भाषकांचे वेगळे न राहू आता एक घर करू बांधवांचे सुपीक प्रदेश ताब्यात आणू निप्पाणी कारवार उठ रे मराठी गड्या तू चल सीमेवर ||२|| पुर्वज आपले खपले तेथे विसरतो कशाला महाराष्ट्र एकीकरण समिती आहे तुझ्या पाठीला सामिल करू हलियाल,भा
काव्यरस

शिशिर ऋतू का आला हेमंत सरून

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 08/07/2010 07:27 या दिवशी प्रकाशित केले.
प्रितीचा वृक्ष जेव्हा बहरला
प्रितीचा वृक्ष जेव्हा बहरला किती वेचली फुले ओंजळ भरून आताच का लागली पानगळ शिशिर ऋतू का आला हेमंत सरून हरदिनी तुझी वाट बघणे वेळ लागतो म्हणूनी रूसणे येतील का आठवणी कधी परतून शिशिर ऋतू का आला हेमंत सरून मज आठवे ओंजळ फुलांची घट्ट केलेल्या दोन करांची तीच निष्प्राण फुले बघते आता वहीतून शिशिर ऋतू का आला हेमंत सरून धुक्यात एकदा गेलो पहाटे फिरावयास दोघे शालीत एकटे हाती हात धरता उब मिळाली स्पर्शातून शिशिर ऋतू का आल

हाच आपला ढंगु आहे...

लेखक घाटावरचे भट यांनी गुरुवार, 08/07/2010 03:19 या दिवशी प्रकाशित केले.
टायम मोठा झकास आला आवळा नाड्या सावरा चड्डी दारू कोंबडी हिरवा गांधी सुरू नव्याने रोज कबड्डी धोंडे फेकू गोळ्या झाडू स्वत: स्वत:चे कपडे फाडू 'कैसी जनता भूखी नंगी' म्हणत आपणच गळेही काढू लाठ्या काठ्या अश्रूधूर अन् कधि एखादी गोळी आहे थांबायाला वेळ कुणा पण भाजायाची पोळी आहे पिचले रडले कुणी भरडले कैवाराला आपण आहे फोटो बाईटा काळे झेंडे चुलीत अपुल्या सरपण आहे शरम बेशरम नीती अनीती जुन्या बुकातील फंदा आहे राजकीय रंडीबाजीचा खुल्लमखुल्ला धंदा आहे कुबड्यांचेही शॉर्टेज झाले जो तो साला पंगु आहे 'अपनेकू क्या करना यारों?' हाच आपुला ढंगु आहे...

जीवन-मृत्यू!

लेखक राघव यांनी गुरुवार, 08/07/2010 02:50 या दिवशी प्रकाशित केले.
ही कल्पना बरीच आधी सुचली होती.. पण शब्द सापडत नव्हतेत.. यशोधरातैंचा ये परतीचा वारा... हा लेख वाचून शब्द आपोआप स्फुरायला लागलेत.. म्हणून ही कविता त्यांचीच!

अंतरंग

लेखक jaypal यांनी बुधवार, 07/07/2010 20:40 या दिवशी प्रकाशित केले.
अंतरंग पावसाच गाणं मातीच न्हाणं माझ समुद्र होण अंतरंगी ओला पक्षी हिरवी नक्षी मी एक साक्षी अंतरंगी चींब सर ओली थरथर अधिर हे अधर अंतरंगी उठे उधाण नुरे देहभान मन हे तुफान अंतरंगी झाकल्या खुणा उघड्या पुन्हा घडे काय गुन्हा? अंतरंगी जयपाल ७/७/२०१०
काव्यरस

काय बोलणे

लेखक सागरलहरी यांनी बुधवार, 07/07/2010 09:49 या दिवशी प्रकाशित केले.
काय बोलणे, उगा रहाणे, गोंधळ चाले, शांत पहाणे ... उगा कसे मी अवचित काढू , बोलायाचे नवे बहाणे ? ओळख माझी मला पटेना, मी पणाचा अंत मिळेना .. तुजसाठी मी कुठून आणू , नवे सूर अन नवे तराणे ? वर वर सारे हसरे दिसती , काटे झेलून फुले दाविती, कोणा ठाउक कुठे ठेविती, कोम्ब व्यथांचे जुने पुराणे ? - सागर लहरी ०९-०६-२०१०