Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कोण जिंकणार दिल्ली?

श
श्रीगुरुजी
गुरुवार, 01/29/2015 - 16:13
🗣 452 प्रतिसाद
अवघ्या १४ महिन्यांच्या अवधीत राजधानी दिल्ली पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीला सामोरी जात आहे. डिसेंबर २०१३ पासून ७ फेब्रुवारी २०१५ पर्यंतच्या १४ महिन्यात दिल्लीकर तिसर्‍यांदा मतदान करणार आहेत. डिसेंबर २०१३ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत विधानसभेच्या ७० जागांपैकी भाजपला ३२, आआपला २८, काँग्रेसला ८, जदयुला १ व अपक्षांना १ अशा जागा मिळाल्या होत्या. कोणालाच स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्तेसाठी आघाडी करावीच लागणार होती. भाजप, आआप व काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकमेकांविरूद्ध लढले होते. सलग १५ वर्षे मुख्यमंत्रीपदावर राहिलेल्या शीला दिक्षितांना पराभूत करून केजरीवालांनी सामनावीराचा किताब पटकाविला होता, परंतु सामना जिंकण्यात त्यांना अपयश आले होते. प्रचारात काँग्रेसच्या भ्रष्टाचाराविरूद्ध प्रचंड राळ उठविणार्‍या केजरीवालांनी निकाल लागल्यावर एकदम टोपी फिरविली. काही दिवस चर्चेचे नाटक करून व नंगर नागरिकांकडून एसेमेस मागविण्याची नौटंकी करून शेवटी चक्क काँग्रेसच्याच पाठिंब्यावर सरकार स्थापन केले आणि त्यानंतर लगेचच ४९ दिवसात राजीनामा देऊन मोकळेही झाले. त्या ४९ दिवसात जे झाले त्याचा सभ्य शब्दात "तमाशा" असाच उल्लेख करावा लागेल. आआप सरकारमधील मंत्र्यांने गाडीवर खेळणार्‍या मुलाचा फुटबॉल आदळल्यावर माझ्यावर दगडफेक झाली हा थेट आरोप करणे, अजून एका दुसर्‍या मंत्र्याने अधिकार नसताना व कोणतेही वॉरंट नसताना परदेशी नागरिकांच्या घरावर धाड घालणे, दस्तुरखुद्द मुख्यमंत्री केजरीवाल यांनी रात्रभर फुटपाथवर धरणे धरून नागरिकांना वेठीस धरणे, राज्यपालांची परवानगी नसताना जनलोकपाल विधेयक मांडण्याचा हट्ट धरणे व त्या कारणावरून राजीनामा देणे ... हे व असे अनेक वादग्रस्त प्रकार त्या ४९ दिवसात घडले. शेवटी त्यांच्याच अट्टाहासामुळे दिल्लीला पुन्हा एकदा निवडणुक होत आहे. दरम्यानच्या काळात यमुनेतून बरेच पाणी वाहून गेले आहे. मे २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सर्व ७ मतदारसंघात भाजपचा विजय झाला. दस्तुरखुद्द केजरीवालांनी मोदींविरूद्ध निवडणुक लढण्यासाठी वाराणशीला जाउन उंटाच्या **चा मुका घ्यायचा प्रयत्न केला व त्यात साफ पराभूत झाले. लोकसभा निवडणुकीच्या काळात आआपच्याच कार्यकर्त्यांकडून स्वतःला थोबाडीत मारून घ्यायचे व स्वतःवर शाई उडविण्याचे कार्यक्रम त्यांनी मॅनेज केले व स्वतःला सहानुभूती मिळविण्याचा हास्यास्पद प्रयत्न केला. त्यांच्या दुर्दैवाने हे सर्व प्रयत्न फसले. परंतु फेब्रुवारी २०१५ मध्ये परिस्थिती बदललेली आहे. आआपचे काही मुख्य नेते आआप सोडून भाजपमध्ये गेले आहेत (शाझिया इल्मी, विनोद बिन्नी इ.). आआपचे एक संस्थापक असलेले शांतीभूषण यांनी केजरीवालांवरच टीका करून किरण बेदींचे कौतुक केले आहे. आआप तर्फे अजूनही केजरीवाल हेच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत. भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जगदीश मुखी असतील हे गृहीत धरून केजरीवालांनी त्यांना लक्ष्य करून प्रचाराला सुरूवात केली होती. नंतर भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार सतीश उपाध्याय आहे अशी समजूत करून घेऊन त्यांनी सतीश उपाध्याय यांच्याविरूद्ध राळ उठवायला सुरूवात केली. नंतर भाजपकडे मुख्यमंत्रीपदाचा उमेदवारच नाही व मोदी स्वतःच दिल्लीचे मुख्यमंत्री होणार अशा तर्‍हेने भाजप प्रचार करीत आहे असेही आआपने सांगायला सुरूवात केली. परंतु भाजपने अगदी आयत्या वेळी केजरीवालांच्याच सहकारी माजी पोलिस महानिरीक्षक किरण बेदी यांना भाजपत आणून त्यांनाच मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करून ही लढत केजरीवाल विरूद्ध बेदी अशी कलाटणी देऊन टाकली. बेदींना भाजपत आणून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार करणे हा काही जणांच्या मते भाजपचा मास्टरस्ट्रोक आहे. खरे काय ते दिल्लीकरच ठरवतील. दिल्लीचे मतदार अत्यंत जागृत आहेत. त्यांनी निवडणुकीत भल्याभल्यांना हिसका दाखविलेला आहे. त्यामुळे नक्की काय निकाल लागेल हे सांगता येत नाही. सध्या तरी आआपचे पारडे काही प्रमाणात जड आहे असे वाटते. भाजप व आआपमध्ये तुल्यबल लढत होऊन भाजपच्या तुलनेत आआपला अगदी थोड्या जागा जास्त मिळतील असा बर्‍याच मतदार सर्वेक्षणांचा अंदाज आहे. परंतु पुन्हा एकदा कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल असे वाटत नाही. या दोन पक्षांव्यतिरिक्त काँग्रेस व इतर कोणतेही पक्ष मतदारांच्या खिजगणीतही नाहीत. दुर्दैवाने पुन्हा एकदा कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही तर मागील वर्षीच्याच तमाशाची पुनरावृत्ती होईल. जर आआपला स्पष्ट बहुमत मिळाले तरी केजरीवालांसारख्या अत्यंत बेभरवशाच्या व विचित्र स्वभावाच्या व्यक्तीमुळे ते सरकार फार काळ टिकेल असे वाटत नाही.

प्रतिक्रिया द्या
149616 वाचन

💬 प्रतिसाद (452)
अ
अनुप ढेरे Fri, 01/30/2015 - 10:06 नवीन
गुर्जी फार लाइन मारतात असं म्हणत होत्या माइसाहेब...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
म
मृत्युन्जय Fri, 01/30/2015 - 10:19 नवीन
गुर्जी माईवर लाइन मारतात. एकतर गुर्जी हा आयडी स्त्रीचा आहे असे म्हणायला लागेल मग किंवा....... सांभाळुन गुर्जी मारतील बरे नसत्य जोड्या लावल्यात तर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
च
चिगो Fri, 01/30/2015 - 12:10 नवीन
दणका प्रतिसाद, क्लिंटनराव..
अमुक फुकट देऊ, तमुक अर्ध्या किंमतीत देऊ इत्यादी समाजवादी धोरणे अर्थशास्त्राचा एक विद्यार्थी म्हणून मला अजिबात मान्य नाहीत.
हेच मलापण वाटते.. केजरीवालचे दिल्लीच्या बसस्टॉप्सवरील पोस्टर्स बघून हेच विचारावसं वाटतं कि बाबारे, ह्या सगळ्या चकटफु गोष्टींसाठी पैसे कुठून आणणार? कारण की, एकीकडे फुकट वस्तू वाटतांनाच "वॅट की रेट सबसे कम रखेंगे" हे पण गाजर आहेच.. आणि केंद्र सरकारशी आडमुठेपणाचं धोरण ठेवल्यास ह्यांचे चोचले पुरवायला पण पैसे मिलणार नाहीत.
आम्ही तेवढे प्रामाणिक आणि बाकी अलम दुनिया भ्रष्ट हा होलिअर दॅन दाऊ अ‍ॅटिट्यूड आणखी डोक्यात जातो.म्हणजे ज्या किरण बेदींना तुम्हीच मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार बनविणार होतात त्याच किरण बेदी दुसर्‍या पक्षात गेल्या तर त्या लगेच संधीसाधू बनतात!!
१००% सहमत.. ते "पंतप्रधानांची कार उचलणे" वरुन जो काही फेसबुकी गोंधळ सुरु आहे, तो डोक्यात जातोय. अरे, त्या आय.पी.एस. अधिकारी होत्या. त्या काय कार टो करणार आहेत का स्वतः? पण ज्या कनिष्ठ अधिकार्‍यानी ती कारवाई केली, त्याला पाठींबा तर दिला ना?
त्यांच्यातील सगळेच लोक डोक्यात जातात पण आशिष खैतान आणि आशुतोष हे विशेष. आम्ही म्ह़णजे कोण आणि बाकी सगळी दुनिया भ्रष्ट हा दर्प त्यांच्या बोलण्यातून अगदी शब्दाशब्दाला जाणवतो.
ह्याच्याशीपन पुरेपूर सहमत.. कमालीचा कंट्रोल दाखवून अद्याप टिव्ही फोडण्यापासून स्वतःला रोखले आहे.. ;-) अवांतरः ह्या धाग्यावर आणि ह्या वातावरणात संक्षींची कमतरता प्रचंड जाणवतेय.. त्यांच्यासारखा आपचा बचावकर्ता नव्हता, राजेहो.. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
प
पदम Fri, 01/30/2015 - 12:34 नवीन
_/|_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
य
यश राज Fri, 01/30/2015 - 12:39 नवीन
प्रचंड सहमत...... या महाभागाने दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा काही काळासाठी मी दिल्लीत होतो. त्यावेळेस त्याने आणि मिडीयाने दिल्लीकरांना अगदी वेठीस धरले होते..तेव्हा पासून हा व्यक्ती अगदी डोक्यात गेला.. त्यानंतरचा तर सगळा इतिहासच आहे... बाकी याच्या भक्तांची अक्षरशः कीव येते..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
न
नांदेडीअन Fri, 01/30/2015 - 13:36 नवीन

१) मदनलाल खुराणा, साहब सिंग वर्मा, शिला दिक्षित आणि सुषमा स्वराज यांनीसुद्धा दिल्ली पोलीस राज्य सरकारच्या अखत्यारीत असावे अशी मागणी केली होती. केजरीवालने ही मागणी मान्य करून घेण्यासाठी आंदोलन केले म्हणून तो एकदमच तमाशा होतो का ? २) यासाठीच आपने कॅग ऑडिट करायचे ठरवले होते. तिनही कंपन्या सहकार्य करत नाहीयेत म्हणून कॅगने हाय कोर्टाचे दरवाजे ठोठावले होते. आता तर तिनही कंपन्यांनी १५ ते २० टक्क्यांनी वीज दर वाढवायचे ठरवले आहे म्हणे. ३) सब्सिडीला आपण फ्री कसे म्हणू शकतो ? आपलाच पैसा असतो ना तो, टॅक्स रूपाने गेलेला ? सब्सिडी सगळेच देतात, पण कुठे द्यायची आणि किती द्यायची हे महत्त्वाचे. (सब्सिडी बंद करा म्हणणारे भाजप सरकार आल्यापासून ‘गुलाबी क्रांती’मध्ये १६ टक्क्यांनी वाढ झाली आहे म्हणे.) दिल्लीचे बजेट ४० हजार करोड आहे. त्यापैकी विजेसाठी आपने २५० करोडची सब्सिडी दिली होती. व्हॅट कलेक्शनमधून सरकारला एक्स्ट्रा मिळालेल्या १००० करोडबद्दल कुणी बोलत नाही. ७०० करोडपेक्षा जास्तीचा फायदा झाला होता सरकारला. मोबाईल देणे, लॅपटॉप देणे, साड्या वाटणे (भाजप-कॉंग्रेसची पॉलिसी) याला ‘फ्री’ म्हणतात. ४) कोर्टामध्ये सुरू आहे अजूनही ही केस. कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल न केल्यामुळे १०,००० चा दंड बसलाय गडकरींना. ५) पक्षात लोकशाही आहे म्हणूनच सगळ्यांचे ऎकून घेतल्या जाते. हेच जर एखादा कॉंग्रेसचा नेता कॉंग्रेसच्या किंवा भाजपचा नेता भाजपच्या शीर्ष नेतृत्त्वाबद्दल बोलला असता तर एव्हाना त्यांचा रामलाल राही किंवा अडवाणी, जसवंत सिंग झाला असता. आश्विनी उपाध्याय यांचे नाव घेतल्यामुळे एक सांगतो. यांनी केजरीवालवर आरोप लावला होता की दिल्लीतल्या ऑफिसमध्ये अनेक मोठमोठे आतंकवादी येऊन भेटत असतात. असा आरोप करणार्‍या व्यक्तीबद्दल काय बोलायचे हो ? हे महाशय झोपले होते का तेव्हा ? आता तर ते भाजपमध्ये गेलेत आणि भाजप केंद्र सरकारमध्ये गेलीये. चौकशी करून लटकवा की केजरीवालला फासावर. ६) किरण बेदींना सुरूवातीपासून भाजपबद्दल सॉफ्ट कॉर्नर होता. पण जेव्हा आपने किरण बेदींना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती तेव्हा त्या कॉंग्रेससोबत भाजपलासुद्धा शिव्या घालत होत्या. पण लगेच काही दिवसात त्यांचे भाजप प्रेम ट्विटरवरून परत दिसायला लागले होते. शिला दिक्षित यांच्याविरूद्ध FIR झाली होती. पण सत्तेत आल्या आल्या भाजपने दिल्ली ACB चे सगळेच अधिकार काढून घेतले आणि त्याला दात, नखं नसलेला वाघ करून टाकले. तिकडे राजस्थानमध्ये गेहलोत जेलमध्ये जाणार होते. वर्ष होत आले, काय झाले गेहेलोतांचे ? राष्ट्रीय जावई बापूंवर तर चक्क एक CD रिलिज केली होती भाजपने प्रेस कॉन्फरन्स घेऊन. त्याचे काय झाले तेही नाही माहित आम्हाला. IRS सेवेमध्ये ट्रान्सफरसाठीचे नियम मला माहित नाहीत, त्यामुळे त्याबद्दल मी खात्रीशीररित्या काही सांगू शकत नाही. पण माझ्या माहितीप्रमाणे केजरीवालने फक्त ५ वर्षं तिथे नौकरी केलीये. ७) मेधा पाटकर यांच्याबद्दल बोलत असाल तर त्यांचा विरोध ‘फाशी’ या शिक्षेला होता/आहे, ‘अफजल गुरू’ या व्यक्तीच्या फाशीला नाही. माझे वैयक्तिक मत विचाराल तर माझा स्वतःचा फाशीच्या शिक्षेला मुळीच विरोध नाहीये. बाय द वे, काही दिवसांपूर्वी ही एक बातमी वाचली होती. http://epaper.kashmirmonitor.in/kmepaper/612015/epaper-images/612015-pdkm-1-2.jpg फुटिरवादी सज्जाद लोन आता भाजपचा किती लाडका झालाय हे काही वेगळे सांगायची गरज नाही. अजून एक, नुकत्याच झालेल्या जम्मु-काश्मिरच्या निवडणूकीत भाजपने ४-५ आतंकवाद्यांना तिकिट दिले होते. असो, भाजपमध्ये आले म्हणजे नक्कीच देशभक्त आतंकवादी असतील ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
म
माईसाहेब कुरसूंदीकर Fri, 01/30/2015 - 14:19 नवीन
अतिशय मुद्देसूद रे नांदेडियना. बाकी ते स्वीस बॅन्केतले काळे पैसे कुठवर पोहचले म्हणायचे? भाजपावाले आणणार होते ना ?झुरिक का बर्नवरून विमान निघाले का? आणी ती लिस्ट -७०० लोकांची जो अर्थमंत्री अरूण जाहीर करणार होता? नोव्हेबर २०१३ मध्ये भाजपच्या रमण सिंग ह्यांनी काय काय जाहीर केले होते ते बघा- “Rice at Re1 a kilogram will be provided to 42 lakh poor families in the state if the party remains in power,” chief minister Raman Singh said during the release of the manifesto in the presence of senior leaders on Wednesday. Other promises for the farmers made in the manifesto included interest free agricultural loans, free power supply (for 5 hp pumps), Rs300 per quintal bonus for paddy, insurance facilities and crop insurance guarantee scheme. Besides, the party has also assured to make efforts to provide Rs2,100 per quintal support price to farmers for their paddy. However, it has not clarified a fix support price for paddy procurement to the farmers. http://www.livemint.com/Politics/5BtHob4GH8O6odYIlJ43xL/BJP-showers-sops-on-poor-in-Chhattisgarh-election-manifesto.html सबसिड्यांबद्दल अत्यंत तिटकारा असणारा क्लिंटन आता काय म्हणतो? असा ह्यांचा सवाल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
श
शिद Fri, 01/30/2015 - 15:12 नवीन
असा ह्यांचा सवाल.
ओ माईसाहेब, तुमचे हे नेहमी तुमच्या आडून का प्रतिसाद देत असतात? ;) त्यांनापण मिपावर येण्यास सांगा. जरा त्यांनापण मिपाचा आनंद उपभोगू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
स
सुबोध खरे Fri, 01/30/2015 - 15:36 नवीन
शिद साहेब माईसाहेब फक्त स्टेनोग्राफर आहेत. कर्तेकरविते त्यांचे "हे" च आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिद
V
vikramaditya Sat, 01/31/2015 - 12:03 नवीन
नाना हालेना, नाना चालेना नाना खंत करी, काही केल्या बोलेना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
अ
अनुप ढेरे Sat, 01/31/2015 - 05:49 नवीन
मुद्द्यात दम आहे माई तुमच्या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
क
क्लिंटन Fri, 01/30/2015 - 15:19 नवीन
केजरीवालने ही मागणी मान्य करून घेण्यासाठी आंदोलन केले म्हणून तो एकदमच तमाशा होतो का ?
मागणी करण्याबद्दल आक्षेप नक्कीच नाही.आक्षेप आहे मुख्यमंत्रीपदावर असताना घटनात्मक तरतुदींप्रमाणे एक पाऊलही न उचलता धरणे धरण्याचा तमाशा करायला.
यासाठीच आपने कॅग ऑडिट करायचे ठरवले होते.तिनही कंपन्या सहकार्य करत नाहीयेत म्हणून कॅगने हाय कोर्टाचे दरवाजे ठोठावले होते.आता तर तिनही कंपन्यांनी १५ ते २० टक्क्यांनी वीज दर वाढवायचे ठरवले आहे म्हणे.
बरं मग हायकोर्टाचा निर्णय काय आला?अजून आला नसेल तर तो येईपर्यंत थांबायला हवे.केजरीवालांना लहर आली म्हणून वीजेचे दर अर्धे करा या बोलण्याला काही अर्थ नाही. जर या कंपन्या अकाऊंटिंगमध्ये गडबड करतात असा केजरीवालांचा दावा असेल तर ते ऑडिटमध्ये कुठेतरी पकडले जाईलच.आणि वीजेच्या कंपन्यांच्या ऑडिटमध्ये (जिथे अनेक बॅक टू बॅक ग्राहक असतात-- कोल इंडिया ते एन.टी.पी.सी ते ट्रान्स्मिशन कंपनी ते वितरण कंपनी) असा गफला करायला कॅगपासून सगळे सामील असतील तरच ते शक्य आहे हे वर लिहिले आहेच. जे काही असेल ते-- जर का कुठेही फ्रॉड असेल तर जरूर कारवाई करा.पण जे काही असेल ते प्रस्थापित नियमांनुसारच व्हायला पाहिजे. केजरीवालांना वाटते म्हणून एखादी गोष्ट करा या म्हणण्याला काही आधार नाही. तुम्हाला केजरीवाल भगवान श्रीकृष्णाच्या दरबारातून थेट पृथ्वीवर पडलेले वाटत असतीलही.पण देशाच्या कायद्याच्या दृष्टीने आणि नियमांच्या दृष्टीने या वाटण्याला अगदी शून्य आधार आहे.
कोर्टामध्ये सुरू आहे अजूनही ही केस.कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल न केल्यामुळे १०,००० चा दंड बसलाय गडकरींना.
गडकरींनी प्रतिज्ञापत्रक वेळेत दाखल केले नाही म्हणून दंड झाला आहे.केस अजून संपलेली नाही.मी गडकरींच्या जागी असतो तर केजरीवालांना कोर्टाने शिक्षा करेपर्यंत सोडले नसते.१९९८ मध्ये कोईम्बतूर मधील बॉम्बस्फोटात रा.स्व.संघाचा हात असल्याचा आणि त्याबद्दलचा पुरावाही आपल्याकडे आहे असा आरोप सीताराम केसरींनी केला होता.त्यांना संघाने कोर्टात खेचल्यानंतर माफी मागून सुटका करून घेतली होती.केसरींना म्हातारचळ लागले म्हणून काहीतरी बरळत आहेत असे म्हणत त्यांना संघाने माफीवर सोडून दिले हे ठिक झाले.पण केजरीवालांना मात्र कोर्टाने शिक्षा करेपर्यंत थोडीही ढिलाई गडकरींनी दाखवू नये असे मला नक्कीच वाटते.
पक्षात लोकशाही आहे म्हणूनच सगळ्यांचे ऎकून घेतल्या जाते.
मोठ्ठा जोक. बाहेर पडणारे सगळे मात्र केजरीवाल मनमानी करतात इतर कोणालाच बोलू देत नाहीत म्हणून बाहेर पडतात :)
किरण बेदींना सुरूवातीपासून भाजपबद्दल सॉफ्ट कॉर्नर होता.पण जेव्हा आपने किरण बेदींना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती तेव्हा त्या कॉंग्रेससोबत भाजपलासुद्धा शिव्या घालत होत्या.
असेकाना. पण तरीही तुमच्या पक्षाने त्यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिलीच होती म्हणजे त्यावेळी त्या चांगल्या होत्या ना.
राष्ट्रीय जावई बापूंवर तर चक्क एक CD रिलिज केली होती भाजपने प्रेस कॉन्फरन्स घेऊन. त्याचे काय झाले तेही नाही माहित आम्हाला.
हरियाणात आणि राजस्थानात त्यांच्या शेल कंपन्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या आहेत हे वाचले नाहीत वाटते?
मेधा पाटकर यांच्याबद्दल बोलत असाल तर त्यांचा विरोध ‘फाशी’ या शिक्षेला होता/आहे, ‘अफजल गुरू’ या व्यक्तीच्या फाशीला नाही.
नाही मेधा पाटकरांनी कसाबच्या फाशीला विरोध केला होता . या कारणामुळे मेधा पाटकरांनी इतर काहीही काम केले असले आणि साक्षात भगवान श्रीकृष्णाने त्यांच्यावर अमृताचा अभिषेक जरी केला असेल तरी त्यांच्याविषयी माझे मत तरी चांगले कधीच होणार नाही. असो. माझ्या म्हणण्याचा रोख मेधा पाटकरांवर नव्हता तर कमलमित्र चिनॉय, प्रशांत भूषण या सारख्यांवर होता.
फुटिरवादी सज्जाद लोन आता भाजपचा किती लाडका झालाय हे काही वेगळे सांगायची गरज नाही.अजून एक, नुकत्याच झालेल्या जम्मु-काश्मिरच्या निवडणूकीत भाजपने ४-५ आतंकवाद्यांना तिकिट दिले होते.
फुटिरतावादी चळवळींमध्ये फूट पाडायला असे उद्योग केले जातात हे तुम्हाला माहित दिसत नाही किंवा मुख्य प्रवाहात सामील करायलाही असे केले जाते. मिझोरामचे लालडेंगा, आसामात प्रफुलकुमार महंत यांच्याबरोबर तसेच नागालँडमध्येही हा प्रयोग पूर्वी झालेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
न
नांदेडीअन Sat, 01/31/2015 - 05:39 नवीन
"मागणी करण्याबद्दल आक्षेप नक्कीच नाही.आक्षेप आहे मुख्यमंत्रीपदावर असताना घटनात्मक तरतुदींप्रमाणे एक पाऊलही न उचलता धरणे धरण्याचा तमाशा करायला."
दिल्ली पोलिसांना राज्य सरकारच्या अखत्यारीत फक्त केंद्र सरकार (लोकसभा) आणू शकते. आणि आप केंद्रात नव्हती. मुख्यमंत्री पदावर असतांना धरणे दिलेल्या काही मुख्यमंत्र्यांची नावं सांगतो. जयललिता, शिवराज सिंह चौहान, नरेंद्र मोदी, करूणानिधी, नितिश कुमार, किरण कुमार रेड्डी etc.
"केजरीवालांना लहर आली म्हणून वीजेचे दर अर्धे करा या बोलण्याला काही अर्थ नाही."
केजरीवालांना लहर आली म्हणून नाही तर सहज होऊ शकतात म्हणून अर्धे करायचे आहेत विज दर. या ‘सहज’चा अर्थ पक्षागणिक बदलतो बरं का.
"केजरीवालांना वाटते म्हणून एखादी गोष्ट करा या म्हणण्याला काही आधार नाही."
केजरीवालांना वाटते म्हणून नाही तर खरंच गडबड सुरू आहे म्हणून कॅग ऑडिट करायला लावले. काही घोटाळा करत नसतील तर इतकी का टाळाटाळ करत आहेत या कंपन्या ? बीजेपी सरकार आल्यापासून थंड बासनात का पडली आहे ही ऑडिटची प्रक्रीया ? भाजप आणि या विज कंपन्यांचे नेक्सस आपने अगोदरच दाखवून दिले आहे. पुरावे दिले तर मी राजिनामा देईन म्हणणारे सतिश उपाध्याय पुरावे दिल्यावर गायबच झाले बिचारे. मुख्यमंत्री पदाचे दावेदार बनवायचे तर सोडाच पण साधे तिकिटसुद्धा दिले नाही हो भाजपने त्यांना.
"तुम्हाला केजरीवाल भगवान श्रीकृष्णाच्या दरबारातून थेट पृथ्वीवर पडलेले वाटत असतीलही"
नाही हो, आम्हाला मुळीच नाही वाटत तसे. आमच्या डोळ्यावर कसलिही पट्टी बांधलेली नाहीये. सुदैवाने कुणाचाही ‘भक्त’ होण्याएव्हढी वाईट वेळ आलेली नाहीये आमच्यावर. चूक आहे त्याला चूक आणि बरोबर आहे त्याला बरोबत म्हणण्याची विवेकबुद्धी म्हणा किंवा सुबुद्धी म्हणा, देवाने दिलीये.
"केस अजून संपलेली नाही."
तेच म्हणालो ना मी. केस अजूनही सुरूच आहे कोर्टात. जर केजरीवालने पुरावे दिले नाही तर गडकरी थोडेच सोडतील त्याला. केजरीवालने पाया पडून जरी माफी मागितली तरी माफ करू नये गडकरींनी त्याला.
"मोठ्ठा जोक. बाहेर पडणारे सगळे मात्र केजरीवाल मनमानी करतात इतर कोणालाच बोलू देत नाहीत म्हणून बाहेर पडतात"
गेल्या काही दिवसात जे लोक बाहेर पडलेत, ते नेमके कोणत्या कारणाने बाहेर पडले हे एव्हाना दिसून आलेच आहे की. मोदी म्हणजे भारताच्या लोकशाहीसाठी खूप मोठा धोका आहे म्हणणार्‍या शाझिया काकूंनी हे वाक्य आता बोलून दाखवावे. RTI अंतर्गत न येऊ इच्छिणार्‍या दोन्ही पार्टींना वोट देऊ नका किंवा कॉंग्रेसने वाड्राला अर्बन मिनिस्ट्री आणि भाजपने गडकरींना कॉर्पोरेट अफेअर्स मिनिस्ट्री द्यावी म्हणणार्‍या किरण बेदींनी हीच वाक्यं परत बोलून दाखवावीत.
"तुमच्या पक्षाने त्यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिलीच होती म्हणजे त्यावेळी त्या चांगल्या होत्या ना."
वरच दिले आहे उत्तर. जेव्हा आपने किरण बेदींना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती तेव्हा त्या कॉंग्रेससोबत भाजपलासुद्धा शिव्या घालत होत्या. त्यांच्या ट्विट्स आणि मिडियातील वक्तव्यांमधून त्या निष्पक्ष वाटायला लागल्या होत्या. दोन्ही मोठ्या पार्टीमधल्या भ्रष्टाचार, गुंडगिरी, निनावी देणग्या, अपराधी उमेदवार, जनलोकपाल इत्यादी विषयांवर त्या मत मांडत होत्या. केजरीवाल कधीही २००२ बद्दल बोलला नव्हता, पण स्वतः किरण बेदींनी त्याबद्दल One day NaMo will need to respond with clarity about riots massacre. Despite Courts clearing him so far असे ट्विट केले होते.
"हरियाणात आणि राजस्थानात त्यांच्या शेल कंपन्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या आहेत हे वाचले नाहीत वाटते?"
३६५ दिवस चौकशी करून ३०० एकर जमीन परत घेतली. छान ! असो, त्यांच्या जमिनी परत घेतल्या म्हणजे त्यांनी नक्कीच काहीतरी बेकायदेशीर पद्धतीने केले असेल. मग त्यांच्यावर FIR वगैरे दाखल झाली का हो ? किंवा पुढची कार्रवाई काय होणार आहे याबद्दल काही आयडिया ? हे झाले राजस्थानमधले प्रकरण. हरयाणामधून वाड्राची आलेली शेवटची बातमी ही वाचली होती मी. Vadra-DLF land deal: Haryana govt fails to trace ‘missing’ papers - http://indianexpress.com/article/india/india-others/vadra-dlf-land-deal-haryana-govt-fails-to-recover-missing-papers
"माझ्या म्हणण्याचा रोख मेधा पाटकरांवर नव्हता तर कमलमित्र चिनॉय, प्रशांत भूषण या सारख्यांवर होता."
या दोघांनी AFSPA बद्दल आपले मत मांडले होते. (चिनॉय तर आपमध्ये येण्याच्या ६ महिने अगोदर बोलले होते त्याबद्दल) आता आपण अजून एका व्यक्तीचे AFSPA बद्दलचे मत बघू. Armed Forces Special Powers Act will not be required if we come to power in the state. - BJP state vice-president and Kashmir affairs in-charge Ramesh Arora PDP सोबत एकत्र येऊन भाजप जम्मू-कश्मिरमध्ये सरकार बनवणार हे आता जवळपास निश्चितच झालंय. फक्त दिल्लीच्या निवडणूकीमध्ये त्याची काही झळ बसू नये म्हणून निर्णय जाहीर करायचे लांबणीवर पडले आहे. यावर ओमर अब्दुल्ला यांनी काही प्रश्न विचारले आहेत. Who will compromise over the immediate resumption of dialogue with separatists @jkpdp or @BJP4India? Who will compromise on the issue of dynastic rule raised by @narendramodi during campaigning @jkpdp or @BJP4India? Who will compromise on the issue of West Pakistan refugees @jkpdp or @BJP4India? Who will compromise over the issue of immediate withdrawal of AFSPA @jkpdp or @BJP4India #justasking
"फुटिरतावादी चळवळींमध्ये फूट पाडायला असे उद्योग केले जातात हे तुम्हाला माहित दिसत नाही किंवा मुख्य प्रवाहात सामील करायलाही असे केले जाते."
मग तेच म्हणालो ना मी. भाजपमध्ये जो येतो त्याचे ‘हिर्दयपर्वतन’ होते किंवा तो चटकन टॉपचा देशभक्त होऊन जातो. तीच व्यक्ती जर इतर पक्षात गेली तर ती लगेच देशद्रोही, पाकिस्तानी एजंट, CIA एजंट वगैरे वगैरे होऊन जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन Sat, 01/31/2015 - 06:18 नवीन
दिल्ली पोलिसांना राज्य सरकारच्या अखत्यारीत फक्त केंद्र सरकार (लोकसभा) आणू शकते. आणि आप केंद्रात नव्हती.
आप केंद्रात जर का चुकुनमाकून आली तर तो भारताच्या भवितव्यासाठीचा सर्वात वाईट दिवस असेल हे नक्की. बाय द वे, या इतर मुख्यमंत्र्यांनी घटनात्मक मार्ग न अवलंबता धरणे धरले होते? तसे असेल तर ते चुकीचेच आहे हे पण ऐकून ठेवा.आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या मुख्यमंत्र्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात तमाशा करू अशी धमकी दिली होती का? मागच्या वर्षी जपानचे पंतप्रधान २६ जानेवारीच्या सोहळ्याचे मुख्य अतिथी होते.समजा त्या सोहळ्यात काही गोंधळ झाला असता तर भारताचे नाक परदेशी पाहुण्यासमोर कापले गेले असते.हीच का देशाच्या प्रतिष्ठेची आआपच्या लेखी किंमत?तिसरी गोष्ट म्हणजे यापैकी किती मुख्यमंत्र्यांनी धरणे धरताना रस्त्यावर झोपून केंद्र सरकारच्या महत्वाच्या ऑफिसांचा डि फॅक्टो ब्लॉकेड केला होता? राजकीय पक्ष असले प्रकार करत असतात.पण एकदा सत्तेत गेल्यानंतर जबाबदारी वाढते त्यामुळे असे प्रकार करणे सर्वथैव अयोग्य आहे. (बंगालमध्येही डाव्या सरकारनेच अनेक बंद स्पॉन्सर करून लोकांना वेठीस कित्येक वेळा धरले होतेच.शेवटी काय डावे काय किंवा केजरीवाल काय-- अराजकतावादी ते अराजकतावादीच)
केजरीवालांना वाटते म्हणून नाही तर खरंच गडबड सुरू आहे म्हणून कॅग ऑडिट करायला लावले.काही घोटाळा करत नसतील तर इतकी का टाळाटाळ करत आहेत या कंपन्या ?
खाजगी कंपन्यांची ऑडिटे कॅग सामान्यत: करत नाही.पण समजा जनहितासाठी अशी ऑडिटे कॅगकरून करून घ्यायची असतील ना तर ती करायला लावायची एक प्रोसेस आहे-- कोर्टाकडून आदेश मिळविणे वगैरे. ते झाले होते का?ते झाले असेल आणि तरीही या कंपन्या ऑडीटे करायला नकार देत असतील तर ते नक्कीच चुकीचे आहे.याविषयी तुम्हाला अधिक माहिती आहे.तेव्हा तुम्हीच काय ते सांगा. बाय द वे, ऑगस्ट २०१४ मध्ये निवडणुक आयोगाने आआपलाच निवडणुकीसाठी केलेल्या खर्चाचे हिशेब देण्यास उशीर केला म्हणून तंबी दिली होती हे तुम्हाला माहित आहे का? जर का तुम्ही सगळ्या जगाकडून क्लिन असायची अपेक्षा करत असाल तर सीझरची पत्नी या नात्याने तुम्ही स्वत: पूर्ण क्लिन असावेत ही अपेक्षा जास्त आहे.जर का आआपचे पैसे वैध मार्गाने येत असतील तर हा उशीर का? अजूनही एकाच पावती क्रमांकाच्या अनेक पावत्या आआप देणगीदारांना देत होते याचे अनेक फोटो फेसबुकवर मी स्वत: बघितले आहेत.त्याविषयी नक्की खरेखोटे काय ते माहित नाही पण एकाही आपटर्ड कडून याविषयी 'हे खोटे आहे' असेही कधी वाचल्याचे लक्षात नाही. असो. ३६५ दिवस चौकशी करून ३०० एकर जमीन परत घेतली.
असो, त्यांच्या जमिनी परत घेतल्या म्हणजे त्यांनी नक्कीच काहीतरी बेकायदेशीर पद्धतीने केले असेल.मग त्यांच्यावर FIR वगैरे दाखल झाली का हो ?किंवा पुढची कार्रवाई काय होणार आहे याबद्दल काही आयडिया ?
:) बघू काय होते ते. अशी कारवाई नक्कीच व्हावी ही अपेक्षा.
या दोघांनी AFSPA बद्दल आपले मत मांडले होते. (चिनॉय तर आपमध्ये येण्याच्या ६ महिने अगोदर बोलले होते त्याबद्दल)आता आपण अजून एका व्यक्तीचे AFSPA बद्दलचे मत बघू.
माझा मुद्दा AFSPA विषयी नाहीच. तो कायदा ठेवावा की नाही याविषयी मतेमतांतरे नक्कीच आहेत आणि लोकशाहीत तसे असणे काहीच गैर नाही.पण तरीही 'भारतीय स्टेट' विरूध्दचा लढा वगैरे मुक्ताफळे त्याच चिनॉयने झोडली आहेत.आता तुम्ही म्हणाल की हे चिनॉय आआप जॉइन करायच्या आधी सहा महिने म्हणाला होता. कसे आहे की "आआपमध्ये जो येतो त्याचे ‘हिर्दयपर्वतन’ होते किंवा तो चटकन टॉपचा प्रामाणिक होऊन जातो. तीच व्यक्ती जर इतर पक्षात गेली तर ती लगेच भ्रष्ट, क्रोनी कॅपिटलिस्ट वगैरे वगैरे होऊन जाते." अफझलला फाशी दिली त्यानंतर गरळ ओकली तुमच्याच पक्षातील लोकांनी.तशी गरळ राम जेठमलानीनेही ओकली होतीच.पण भाजप पक्षात जितके नेते आहेत त्यापैकी राम जेठमलानीसारखे मत असलेले लोक किती? ०.१% ही नसतील. पण आआपमध्ये मात्र टिचभर पक्ष असूनही असे मत असलेले दोन-तीन नावे लगेच डोळ्यासमोर येतात त्याचे काय? आणि बाय द वे, मी आफप्सा चे नाव तरी लिहिले होते का? मी काश्मीरातील 'इंडियन स्टेट' विरूध्दचा लढा आणि अफजलची फाशी याविषयी लिहिले होते.तुमची गाडी आफप्सावर कशी काय गेली?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
न
नांदेडीअन Sat, 01/31/2015 - 10:54 नवीन
"आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या मुख्यमंत्र्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात तमाशा करू अशी धमकी दिली होती का? मागच्या वर्षी जपानचे पंतप्रधान २६ जानेवारीच्या सोहळ्याचे मुख्य अतिथी होते.समजा त्या सोहळ्यात काही गोंधळ झाला असता तर भारताचे नाक परदेशी पाहुण्यासमोर कापले गेले असते.हीच का देशाच्या प्रतिष्ठेची आआपच्या लेखी किंमत?"
केजरीवालने अशी धमकी कधी दिली होती ? एखादा व्हिडीओ असेल ना त्या वक्तव्याचा. प्लीज मला तो व्हिडिओ द्या म्हणजे मला केजरीवालला विरोध करण्याचा एक तरी मुद्दा मिळेल.
"यापैकी किती मुख्यमंत्र्यांनी धरणे धरताना रस्त्यावर झोपून केंद्र सरकारच्या महत्वाच्या ऑफिसांचा डि फॅक्टो ब्लॉकेड केला होता?"
नाही हो, कडाक्याच्या थंडीत रात्रभर रस्त्यावर झोपण्याची हिम्मत इतर कुणाची होईल असे वाटत नाही. इतर मुख्यमंत्र्यांनी फक्त तंबू वगैरे उभारून धरणे दिले होते. शिवराज सिंह चौहान यांनी मध्यप्रदेश बंदची घोषणा दिली होती म्हणे. मोदींच्या धरण्याच्या वेळी त्यांचे सगळे मिनिस्टर्स त्यांच्यासोबत होते.
"समजा जनहितासाठी अशी ऑडिटे कॅगकरून करून घ्यायची असतील ना तर ती करायला लावायची एक प्रोसेस आहे-- कोर्टाकडून आदेश मिळविणे वगैरे. ते झाले होते का?"
तसे झाले नसते तर या कंपन्या चूप बसल्या असत्या का ? किंवा कॅग कोर्टाकडे गेले असते का ? किंवा कोर्टाने या कंपन्यांना फटकारले असते का ?
"आआपचे पैसे वैध मार्गाने येत असतील तर हा उशीर का?"
आपचे सगळे पैसे वैध मार्गानेच येतात. उलट दिल्ली हायकोर्टाने भाजप आणि कॉंग्रेसला दोन वेळा शिव्या घातल्या आहेत Illegal Foreign Funding बद्दल. भाजपला ८०% पेक्षा जास्त पैसा हा अननोन सोर्सेसकडून मिळतो. कोण असतील बरं हे अननोन सोर्सेस ? का जाहिर करत नसेल भाजप ? लोकसभेत झालेला खर्च आपने अजून दाखवला नाही हे खरेच आहे. त्याबद्दल उशीर होतोय हेसुद्धा खरे आहे. पण तो आज ना उद्या त्यांना दाखवावाच लागेल, अन्यथा त्यांच्या पार्टीची मान्यता रद्द होऊ शकते. तेव्हा त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. बाय द वे, भाजप आणि कॉंग्रेस दोघांनी आपापला खर्च EC कडे दाखवला आहे हे माहित आहे ना तुम्हाला ? भाजपने ७ अब्ज १४ करोड २८ लाख ५७ हजार ८१३ रूपये खर्च केले होते. कॉंग्रेसने ५ अब्ज १६ करोड २ लाख ३६ हजार ७८५ रूपये खर्च केले होते. कॉंग्रेसकडे इतका पैसा कुठून आला यात आश्चर्य वाटण्‍यासारखे काही नाही. इतकी वर्षं त्यांनी आपल्याला लुटून खाल्लंय, त्यामुळे त्या बिचार्‍यांना एव्हढं क्रेडिट तर देऊ शकतोच आपण. पण सत्तेत नसतांना भाजपकडे इतका पैसा कुठून आला हो ? आणि हो, महत्त्वाचे म्हणजे हा ऑफिशिअल आकडा आहे, जो इलेक्शन कमिशनला देणे बंधनकारक असते. अनऑफिशिअल आकडा किती मोठा असेल याचा अंदाज लावण्यासाठी आपण सुज्ञ आहातच.
"अजूनही एकाच पावती क्रमांकाच्या अनेक पावत्या आआप देणगीदारांना देत होते याचे अनेक फोटो फेसबुकवर मी स्वत: बघितले आहेत"
हा BUG मागच्या वर्षी अगदी थोड्या वेळासाठी आपच्या वेबसाईटवर आला होता. त्याला तेव्हाच दुरूस्त करून टाकले होते आपने. तुमचे महामहिम तेजिंदर बग्गा इलेक्शन कमिशनकडे गेले होते. इलेक्शन कमिशनचे म्हणणे होते की ही एक ‘चूक’ आहे आणि करप्शन किंवा घोटाळा तर मुळीच नाही !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन Sat, 01/31/2015 - 11:17 नवीन
१. http://timesofindia.indiatimes.com/india/Kejriwal-threatens-to-derail-Republic-Day-celebrations/articleshow/29151702.cms २. http://indianexpress.com/photos/picture-gallery-others/arvind-kejriwal-rules-out-talks-will-flood-rajpath-with-aap-men/ ३. http://www.dnaindia.com/india/report-delhi-police-lathicharge-after-violent-protestors-break-barricades-1954715 ४. http://www.hindustantimes.com/india-news/15-injured-as-cops-aap-supporters-clash-kejriwal-stir-threatens-to-mar-r-day-celebrations/article1-1175051.aspx ..... याविषयी बोंबाबोंब झाल्यानंतर आम्ही असे काही करणार नाही वगैरे स्पष्टीकरण आआपकडून आले.पण मुळातच राजपथावर एक लाख कार्यकर्ते आणू आणि २६ जानेवारीच्या कार्यक्रमात विघ्न आणू वगैरे करावेसे वाटणेच (कोणालाही विशेषतः मुख्यमंत्र्याला) अत्यंत चुकीचे आहे. मग कितीही सारवासारव केलीत तरी त्याला काही अर्थ नाही. बाकी निवडणुकांमध्ये पैसे कुठून येतात हे मलाही माहित आहे.हा मुद्दा मी कशाकरता आणला? कारण तुमचाच मुद्दा-- जर कंपन्यांकडे लपविण्यासारखे काही नव्हते तर त्या कॅग ऑडिटला का तयार होत नव्हत्या यावरून. जर आआपचे पैसे सगळे पांढरेच होते तरी हिशेब द्यायला ते इतका वेळ का लावत आहेत? जर आआपकडे लपविण्यासारखे काहीच नसेल तर मग इतका वेळ लावायचे कारण काय? ते जे काही कारण असेल तेच कारण कंपन्या कॅग ऑडिटला तयार होत नव्हत्या त्याचे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
न
नांदेडीअन Sat, 01/31/2015 - 11:43 नवीन
अहो, म्हणून तर मी तुम्हाला मुद्दाम 'व्हिडिओ' मागितला होता. जाऊ द्या, मी विषय थांबवलाय. बोलूयात १० तारखेनंतर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
कपिलमुनी Wed, 02/18/2015 - 13:12 नवीन
05:21 PMकेंद्र ने दिल्ली हाई कोर्ट को बताया- आम आदमी पार्टी की विदेशी फंडिंग में कुछ भी गड़बड़ नहीं। http://timesofindia.indiatimes.com/india/We-probed-AAPs-foreign-funding-nothing-found-in-violation-of-law-Centre-to-Delhi-HC/articleshow/46286694.cms
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
श
श्रीगुरुजी Wed, 02/18/2015 - 18:17 नवीन
याच वृत्तांतातील अजून एक वाक्य - However, appearing for the AAP, advocate Pranav Sachdeva told the court that the issue of AVAM is being investigated by the government and it has cooperated on the issue. २ कोटी रूपयांची देणगी ४ बनावट कंपन्याकडून आआपला मिळालेल्या प्रकरणाची चौकशी अजूनही सुरू आहे. http://timesofindia.indiatimes.com/india/We-probed-AAPs-foreign-funding-nothing-found-in-violation-of-law-Centre-to-Delhi-HC/articleshow/46286694.cms
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
श
शिद Fri, 01/30/2015 - 15:16 नवीन
जबरदस्त सडेतोड प्रतिसाद. तुमची राजकारणावरची मतं नेहमीच वाचनीय असतात. बाकी खुजलीवाल...सॉरी केजरीवाल बद्दल काय बोलणार? *nea*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
अ
अर्धवटराव Fri, 01/30/2015 - 19:24 नवीन
केजरीवाल आणि कंपु इन पर्टीक्युलर समर्थनीय नव्हतेच. त्यांचे एकंदर उद्योग 'माकडचाळे' या एकाच मथळ्याखाली येतात. पण भारतीय राजकारणात माकडचाळ्यांना तोटा नाहि, व दिल्ली भाजपकडे फडणवीस, चौहान वा पर्रीकरसारखा चेहेरा नाहि. शिवाय इन लार्जर पर्स्पेक्टीव्ह, भारतीय राजकारण आपली पारंपारीक कुस बदलत आहे. जातीपाती, धर्म वगैरे बिनकामाचे उद्योग करण्याऐवजी सुशासन आणि विकासाच्या गोष्टी ऐकायला येताहेत. यापुढे एखाद्या खानादानाला वाहिलेल्या पक्षाने पुन्हा उचल खाण्याऐवजी विकासाभिमुख सत्ताधारी आणि भ्रष्टाचारावर चेक ठेवणारे विरोधक असं समिकरण अस्तित्वात यावं असं वाटतं. हि जबाबदारी कम्युनिस्ट आणि समाजवाद्यांनी घ्यायला हवि होती, पण तिथे केवळ आनंदीआनंद आहे. सो अव्हेलेबल इज द बेस्ट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
ह
होबासराव Wed, 02/04/2015 - 12:04 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
म
मृत्युन्जय Fri, 01/30/2015 - 08:02 नवीन
मला तरी असे स्पष्ट वाटते की आपचा काँग्रेस आणि भाजपाने मिळुन बकरा केला आहे. आपने स्वतःची उरली सुरली लाज स्वतःच विदुषकी चाळे करुन काढुन घेतली आहे. त्या लोकांना प्रशासनाचा शष्प अनुभव आहे.. सुशासनाचा तर अजिबात नाही. ज्या राज्यात मुख्यमंत्री स्वतःच उपोषणाला बसतो त्या मुख्यंमंत्र्याला सरकार चालवण्याची किती जाण आहे देव जाणे. मला केजरीवालांच्या प्रामाणिकतेवर शंका घ्यायची नाही. कदाचित ते प्रामाणिक असतीलही. पण मी तरी त्यांना कधीच मत दिले नसते कारण त्यांच्या वृत्ती आंदोलकीच आहे. प्रशासकीय नाही. आंदोलने करायची जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि सत्तेवर आल्यावर ते सोडवण्यासाठी झटायचे. पण आपचा प्रॉब्लेम असा झाला की सत्तेत आल्यावर नक्की काय करायचे हेच त्यांना कळाले नाही. गोंधळून गेले ते. तुम्ही केवळ प्रामाणिक आहात म्हणुन तुम्हाला संधी दिली पण तुम्ही वायाच घालवली. ४९ दिवसात राजीनामा देउन काय साधाले. तरीही माझ्यामते परत एकदा त्रिंशंकु सरकार येइल. भाजपाच्या ४-५ जागा कमी होतील आणी त्या काँग्रेसला जातील. आपच्या खात्यात त्यातली एखादी जागा जाइल. परत एकदा तिच परिस्थिती येइल पण या वेळेस आप लार्जेस्ट सिंगल पार्टी असेल.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 01/30/2015 - 08:07 नवीन
या निवडणुकीत आप जिंकूदे. बीजेपीवाले लैच माजलेत सध्या. तेवढा चेक राहूदे जरा तरी.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स बॉन्ड ००७ Fri, 01/30/2015 - 08:10 नवीन
आपवाले माजावेत अशी ईच्छा आहे का? काही नसतानाही त्यांना भरपूर माज आहे आत्तासुद्धा. बाकी बीजेपी वाले तोंडावर आपटणार हे फिक्स आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
अ
अनुप ढेरे Fri, 01/30/2015 - 08:11 नवीन
हेच बोल्तो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
अ
अनुप ढेरे Fri, 01/30/2015 - 12:37 नवीन
आग केलिए पानी का डर बना रेहेना चाहिये हा मकबूल सिनेमातला डायलॉग आठवला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
आ
आनन्दिता Fri, 01/30/2015 - 22:12 नवीन
या निवडणुकीत आप जिंकूदे. बीजेपीवाले लैच माजलेत सध्या. तेवढा चेक राहूदे जरा तरी.
बिजेपी वाले माजलेत याबाबत सहमत. त्यांना कुठेतरी झटका बसलाच पाहिजे याबाबतीत ही सहमत. पण त्यांना चेक देणारे 'आप' नसावे हे मनोमन वाटते. कारण असं झालं तर त्या अर्धवट आणि अहंमान्य लोकांची अवस्था आधीच मर्कट त्यात ताडी प्याला अशी होणार यात शंका नाही. सुशासना पेक्षा अराजकता माजवण्यात त्यांना जास्त रस आहे. त्यांच्या पेक्षा भाजप आणि किरण बेदी कधीही परवडतील, किमान चांगल्या शासक तरी होतील. केजरीवालांकडुन तर ती ही अपेक्षा नाही. तद्दन फालतु ड्राम्यांशिवाय त्यांचा पक्ष काहीही देईल असं वाटत नाही. असली तमासगिर मंडळी निदान राजधानीत तरी नकोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
क
क्लिंटन Sat, 01/31/2015 - 06:27 नवीन
माजलेत म्हणजे नक्की काय? एकामागोमाग एक निवडणुका जिंकणे म्हणजे माजणे का? माजणे म्हणजे काय याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे १९७० च्या दशकातील इंदिरा गांधींची राजवट.बहुतेक मिपाकरांचा जन्म त्यानंतरच झाला आहे (माझाही).त्यामुळे एक तर त्या गोष्टी माहिती नसतील किंवा मेमरी इज शॉर्ट या न्यायाने त्यांचा विसर पडला असेल हे समजण्यासारखे आहे.१९७० च्या दशकातील इंदिरा गांधींची राजवट आणि गेल्या ८-९ महिन्यातील मोदी सरकार यांच्यात तुलना केल्यास मोदी सरकार त्या माजण्याच्या १% ही नाही हे नक्की.बीजेपीवाले कधीकधी अहंमन्यपणा करतात हे मान्य (म्हणूनच मला मध्याच्या उजवीकडे आणखी एक पक्ष हवा आहे--एक पर्याय म्हणून) तरीही ते माजले आहेत हे मी तरी म्हणू शकत नाहीत विशेषतः १९७० च्या दशकातील इंदिरा गांधींची राजवट लक्षात घेता. तरीही अशा टर्मिनॉलॉजी मनुष्यपरत्वे बदलत असतात.मी ज्याला थोडे अती करणे म्हणतो त्याला कोणी माजणे म्हणू शकतोच. असो.
पण त्यांना चेक देणारे 'आप' नसावे हे मनोमन वाटते.
याला अगदी +१००००. एकवेळ काँग्रेस परवडली पण आआप नको. तसेही शीला दिक्षित यांच्या सरकारने दिल्लीसाठी काही चांगल्या गोष्टी नक्कीच केल्या होत्या. भाजप नको असेल तर (निदान दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये) काँग्रेसला मत दिले तर ते नक्कीच समजू शकतो पण आआप??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता
आ
आनन्दिता Sat, 01/31/2015 - 21:30 नवीन
१९७० च्या दशकातील इंदिरा गांधींची राजवट आणि गेल्या ८-९ महिन्यातील मोदी सरकार यांच्यात तुलना केल्यास मोदी सरकार त्या माजण्याच्या १% ही नाही हे नक्की.
मुळात माज किंवा (अहंमन्यता म्हणु हवंतर) याची तुलनात्मकता हा बचावाचा मुद्दा होऊच शकत नाही. काँग्रेस आमच्यापेक्षा याबाबतीत सुपरलॅटीव्ह आहेत म्हणुन आम्ही चांगले हे स्पष्टिकरण मला तरी पटत नाही. कारण लोकसभा निवडणुकी दरम्यान ज्या पक्षाने मला आम्ही पार्टी विथ डिफरंन्स आहोत यावर विश्वास ठेवायला भाग पाडलं, त्या पक्षाचं हे वर्तन पाहील्यानंतर आय फिल चिटेड. ते जर कमी जास्त प्रमाणात इतरांसारखंच वागणार असतील तर एक मतदार म्हणुन मी त्यांच्यावर ठेवलेल्या विश्वासाचं काय? शेवटी तर असंही म्हणता येऊ शकतं की ८-९ महिन्यांमधे ही अशी अवस्था तर अजुन ५-१० वर्षे यांना सत्ता मिळाली तर काय करतील कोण जाणे??
भाजप नको असेल तर (निदान दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये) काँग्रेसला मत दिले तर ते नक्कीच समजू शकतो पण आआप??
+१ केंद्रात इतकं जास्त संख्याबळ, आणि जास्तीत जास्त राज्यांमध्ये पण सत्ता मिळाली तर त्या सोबत येण्यार्या एकछत्री अंमलाचा आणि काम करण्याच्या स्वातंत्राचा उपयोग भाजप देशाच्या हितासाठीच करेल यावर माझा विश्वास नाही. त्यामुळे सध्यातरी भाजपाला एका ' चेक' ची गरज आहे. पण दुर्दैवाने काँग्रेसवाले दिल्लीत लढाई आधीच शस्त्रे टाकून आप आणि भाजपाचा कलगीतुरा एंजॉय करण्यात धन्यता मानत आहेत असं दिसतंय. त्यामुळे असा खांदे पडलेला चेक काही कामाला येईल असंही वाटेना. त्यामुळे दिल्लीत ही भाजप च यावे. भंपक आप नको असं वाटतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन Sun, 02/01/2015 - 06:06 नवीन
मुळात माज किंवा (अहंमन्यता म्हणु हवंतर) याची तुलनात्मकता हा बचावाचा मुद्दा होऊच शकत नाही. काँग्रेस आमच्यापेक्षा याबाबतीत सुपरलॅटीव्ह आहेत म्हणुन आम्ही चांगले हे स्पष्टिकरण मला तरी पटत नाही.
हो बरोबर.पण त्याचबरोबर एखादे फुलपाखरू ज्याप्रमाणे एका फुलावरून उडून काही सेकंदात दुसर्‍या फुलावर जाऊन बसते त्याप्रमाणे एका पक्षाने १००% अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत ना ५०% च पूर्ण केल्या म्हणून त्याच्या विरूध्द बाजूच्या पक्षाला समर्थन देतात.पण तसे करताना दुसरा पक्ष १०% अपेक्षाही पूर्ण करू शकायच्या परिस्थितीत नाही याचा त्यांना विसर पडतो. याचे एक उदाहरण द्यायचे तर देवेन्द्र फडणवीसांनी राष्ट्रवादीच्या मूक पाठिंब्यावर विश्वासदर्शक ठराव मंजूर केला हे आवडले नाही म्हणून मिपावरच काही जणांनी 'माझे पुढच्या वेळी मत काँग्रेसला' असे म्हटले होते.जर राष्ट्रवादी बरोबर भाजप चार दिवस गेला हे आवडले नसेल तर त्याच राष्ट्रवादीबरोबर जो काँग्रेस पक्ष १५ वर्षे होता त्याला मत द्यायचा विचार करणे हा प्रकार मला तरी समजला नव्हता.लोकशाहीत सत्ताधारी पक्षाला पर्याय नक्कीच बघितला पाहिजे पण तो पर्याय सत्ताधारी पक्षापेक्षा अधिक चांगला हवा. (काय चांगले/वाईट हे व्यक्तीपरत्वे बदलेल. पण राष्ट्रवादीच्या उदाहरणात बघायला मिळते तशी इनकन्सिस्टन्सी नको).अर्थात तुम्ही असा विचार करत आहात असे मला नक्कीच म्हणायचे नाही.तसे म्हणायला लागणारी ओळखही नाही. तेव्हा ही एक जनरल गोष्ट लिहित आहे. मुद्दा एवढाच की कुठलाही पक्ष १००% अपेक्षांना कधीच पूर्ण उतरणार नाही.म्हणून त्याविरूध्दचा राग म्हणून अजून वाईट पक्षांना मत दिले जाऊ नये. माझेच उदाहरण द्यायचे झाले तर मी अगदी शाळेत असल्यापासून भाजपचा समर्थक होतो.२००४ मध्ये पराभव झाल्यानंतर भाजपने विरोधी पक्षात असताना अगदीच सावळागोंधळ घातला होता.अडवाणींचे फिके नेतृत्व पक्षाला दिशा दाखवू शकणार नाही असे मला वाटायला लागले.त्यामुळे हळूहळू भाजपकडून माझा भ्रमनिरास व्हायला लागला.२००८ च्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर मनमोहन सिंग हे अडवाणींपेक्षा अधिक चांगले पंतप्रधान बनतील असा विश्वास त्यांच्याविषयी वाटत होता.तसेच मनमोहन सिंगांची अमेरिकेबरोबरच्या न्युक्लिअर डिलवरील भूमिकाही मला मान्य होती.त्यामुळे मी २००८ पासून काँग्रेसकडे झुकलो. २००९ मध्ये माझे मतही काँग्रेसलाच होते.नंतर युपीए-२ मध्ये प्रचंड अंदाधुंदी वाढली.तरीही 'फुलपाखरू धोरण' मला मान्य नसल्यामुळे मनमोहन यांना आणखी वेळ द्यायला हवा या विचाराने मी अगदी २०१२ पर्यंत मनमोहन सिंग आणि काँग्रेसलाच समर्थन देत होतो.पण नंतर नरेंद्र मोदींचा राष्ट्रीय राजकारणात उदय झाला त्यानंतर एकीकडे हलके होत चाललेले मनमोहन यांचे पारडे आणि दुसरीकडे जड होत चाललेले मोदींचे पारडे यात मोदी मला तरी नक्कीच उजवे वाटले. मान्य आहे की मोदींचे सरकार १००% अपेक्षा पूर्ण करू शकलेले नाही (माझ्याही). मला व्यक्तिशः आर्थिक सुधारणांविषयी अधिक वेगाने प्रगती आवडली असती.तसेच अरविंद पंगारियांना निती आयोगाचे प्रमुख केले त्याऐवजी त्यांना अर्थमंत्रीच करायला हवे होते असेही मला वाटते. (अर्थमंत्री पदावर राजकीय व्यक्ती नको तर त्या क्षेत्रातीलच व्यक्ती हवी असे माझे वैयक्तिक मत आहे). पण शेवटी मुळात चांगले मत नसलेल्या काँग्रेस पक्षाला मी चार वर्षे देऊ शकलो (२००८ ते २०१२) तर मोदींना मी नक्कीच अधिक वेळ देऊ शकतो. आता यावर प्रश्न नक्कीच विचारला जाईल मग केजरीवालांना का वेळ देत नाही? याचे कारण माझ्यासाठी राष्ट्रवाद आणि उजवी आर्थिक धोरणे सर्वात महत्वाची आहेत.या दोन्हींना फाट्यावर मारण्यार्‍या पक्षाला मात्र मी कधीच समर्थन देऊ शकत नाही. त्यातूनही उजव्या बाजूला भाजपबरोबर आणखी एक पक्ष जरूर असावा असेही मला वाटते. अन्यथा माझ्यासारख्या मतदारांना भाजपशिवाय पर्याय राहणार नाही आणि भाजप माझ्यासारख्यांना गृहित धरेल.ते पण मला आवडणार नाही. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता
भ
भुमन्यु Sun, 02/01/2015 - 07:26 नवीन
कारण माझ्यासाठी राष्ट्रवाद आणि उजवी आर्थिक धोरणे सर्वात महत्वाची आहेत.या दोन्हींना फाट्यावर मारण्यार्‍या पक्षाला मात्र मी कधीच समर्थन देऊ शकत नाही. +१००००००...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
आ
आनन्दिता Mon, 02/02/2015 - 05:06 नवीन
माझ्यासाठी राष्ट्रवाद आणि उजवी आर्थिक धोरणे सर्वात महत्वाची आहेत.या दोन्हींना फाट्यावर मारण्यार्‍या पक्षाला मात्र मी कधीच समर्थन देऊ शकत नाही.
या आणि या कारणासाठिच मी पण भाजपालाच मत देत आलेय. दुर्दैवाने आमच्या नशिबी राजे भोसल्यांचा मतदार संघ लिहील्याने त्या मताचा काडीचा ही फरक पडत नाही तरीही. १००% अपेक्षा पुर्ती कुठलाच पक्ष करु शकत नाही हे मान्य आहेच. पण मुळात माझ्या अपेक्षाच खुप रॅशनल आहे. भाजपाने जरी काळ्या पैशाचा मुद्दा निवडणुकीत घेतला असला तरी, ते त्यांना बापजन्मात जमणार नाही हे ढळढळीत सत्य होतं. त्यामुळे त्या 'यु-टर्न' बद्दल मला अपेक्षाभंग वगैरे वाटत नाही. आणि त्यांनी काहीतरी अचाट करुन दाखवाव असंही मला वाटत नाही. भारताच्या आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रात ठोस पॉझिटीव बदल घडावेत इतकंच वाटतं. पाच वर्षात किमान त्या बदलांची नांदी दिसली तरी चालेल. पण तसं काही घडताना दिसत नाहीये. आणि भलतेच मुद्दे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या पुढे रेटले जातायत. त्यामुळे पुढच्यावेळी तरी त्यांना मत देताना माझ्याकडे " नाईलाज" हे एकमेव कारण असु नये असं वाटतंय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन Mon, 02/02/2015 - 06:48 नवीन
भाजपाने जरी काळ्या पैशाचा मुद्दा निवडणुकीत घेतला असला तरी, ते त्यांना बापजन्मात जमणार नाही हे ढळढळीत सत्य होतं.
याला अगदी +१०००. १९८९ च्या निवडणुक प्रचारादरम्यान वि.प्र.सिंगांनी स्वीस बँकेतील दोन अकाऊंट नंबर एका प्रचार सभेत जाहिर केले आणि सगळ्यांना वाटायला लागले की त्याच अकाऊंटमध्ये राजीव गांधींनी पैसे ठेवले आहेत. त्याकाळी मी बराच लहान होतो आणि असे वाटणार्‍यांमध्ये मी पण होतो :) नंतरच्या काळातही काळ्या पैशावरून बरीच बोंबाबोंब झाली पण त्यातील एक छदामही भारतात आलेला नाही आणि यायची शक्यताही नाही. या काळ्या पैशाचे आकडे म्हणावेत तर कशाचाच पायपोस कशात नाही.प्रत्येक भारतीयाला या काळ्या पैशातून १५ लाख रूपये द्यायचे म्हटले आणि भारताची लोकसंख्या १२० कोटी आहे हे लक्षात घेतले तर या काळ्या पैशाची रक्कम १८०० लाख कोटी होईल.२०१४-१५ च्या अर्थसंकल्पात भारत सरकारचे एकूण उत्पन्न सुमारे १८ लाख कोटी रूपये असेल असे म्हटले आहे. म्हणजे भारत सरकारच्या अर्थसंकल्पाच्या शंभर पटीने रक्कम काळ्या पैशाची आहे हे म्हणणेच कैच्याकै झाले. मला वाटते सगळा काळा पैसा स्वीस बँकेत दडविला जातो असे वाटणेच अत्यंत भाबडेपणाचे आहे. असे वाटणार्‍या मंडळींना मुंबईतील रिअल इस्टेटमध्ये कसा काळा पैसा खेळतो आणि मुंबईतील जागांचे भाव इतके का वाढले आहेत हे माहित नसावे. असो. बाकी मोदींनीच प्रचारात आश्वासने देऊन लोकांच्या अपेक्षा भरमसाठ वाढवून ठेवल्या होत्या ते २०१९ मध्ये अंगाशीच यायची शक्यता जास्त. अच्छे दिन आने वाले है हे २०१४ मध्ये ठिक झाले. वास्तविक अच्छे दिन ही मृगजळाप्रमाणे दूरदूर धावणारीच संकल्पना आहे.कितीही प्रगती झाली तरी अच्छे दिन आलेत असे म्हणता येणे अशक्यच आहे. एक उदाहरण द्यायचे झाले तर गिरीश कुबेरांनी लोकसत्तात एका लेखात लिहिले होते की १९९० मध्ये बिहारमध्ये दलितांना ट्रेनमध्ये उच्चवर्णींयांशेजारी बसता येणे ही पण खूप मोठी गोष्ट होती.लालू सत्तेत आल्यानंतर अर्थातच ही परिस्थिती बर्‍यापैकी बदलली.त्यावेळी लालूंना मते देणार्‍यांसाठी ते अच्छे दिन होते कारण त्यापेक्षा बरेच बुरे दिन त्यांनी बघितले होते.पण नंतरच्या काळात असे उच्चवर्णीयांच्या शेजारी बसायला मिळणे ही खूप मोठी गोष्ट समजायची परिस्थिती बदलली.आणि लोकांच्या आकांक्षा वाढल्या आणि अपेक्षाही वाढल्या.जे १९९० मध्ये अच्छे दिन होते तेच २००५ मध्ये "thing to be taken for granted" होती आणि अच्छे दिन म्हणजे त्यापेक्षा बरेच जास्त होते.तेव्हा एकदा एक गोष्ट मिळायला लागली की काही काळानंतर त्याचे काही वाटेनासे होते आणि आणखी जास्त काहीतरी हवे अशी महत्वाकांक्षा जागृत होते.मानवी स्वभाव असाच आहे.अशा वेळी कोणीच कधीच "हो अच्छे दिन आले" असे म्हणू शकणार नाही.तेव्हा २०१९ मध्ये 'कुठे आहेत अच्छे दिन' हा प्रश्न नक्कीच विचारला जाईल हे नक्की. आणि असा प्रश्न विचारला जाईल त्याला मोदी स्वतःच जबाबदार असतील हे पण नक्कीच. माझ्यासारखे मतदार मत देताना सर्व पर्यायांचा विचार करून त्यातल्या त्यात चांगला पर्याय म्हणून जो वाटेल त्याला मत देतात (२००९ मध्ये मनमोहन आणि २०१४ मध्ये मोदी). पण बहुसंख्य मतदार तसा विचार करतीलच असे नाही. अशावेळी मोदींनी अच्छे दिन दिले नाहीत ना म्हणून राग व्यक्त करायला दुसर्‍या पक्षाला मत दिले गेले तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे विशेष काही नाही. सध्या काँग्रेस पक्ष अगदीच ढेपाळला आहे.तो पुढील ३-४ वर्षात सावरला तर मात्र २०१९ ची निवडणुक मोदींना नक्कीच सोपी जाणार नाही. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता
श
श्रीगुरुजी Mon, 02/02/2015 - 09:49 नवीन
एक अवांतर >>> याचे एक उदाहरण द्यायचे तर देवेन्द्र फडणवीसांनी राष्ट्रवादीच्या मूक पाठिंब्यावर विश्वासदर्शक ठराव मंजूर केला हे आवडले नाही म्हणून मिपावरच काही जणांनी 'माझे पुढच्या वेळी मत काँग्रेसला' असे म्हटले होते.जर राष्ट्रवादी बरोबर भाजप चार दिवस गेला हे आवडले नसेल तर त्याच राष्ट्रवादीबरोबर जो काँग्रेस पक्ष १५ वर्षे होता त्याला मत द्यायचा विचार करणे हा प्रकार मला तरी समजला नव्हता. १९ ऑक्टोबरला महाराष्ट्र विधानसभेचे निकाल लागल्यावर भाजप जरी सर्वात मोठा पक्ष बनला तरी पूर्ण बहुमत मिळाले नव्हते. शिवसेना ६३ जागा मिळवून दुसर्‍या क्रमांकावर होती. पूर्ण बहुमत नसल्याने आता शिवसेना जोरदार ब्लॅकमेल करून माज करणार व अवास्तव मागण्या करणार हे भाजपच्या लगेचच लक्षात आले. पवारांनी मतमोजणी पूर्ण होण्याआधीच भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर करून बॉम्बगोळा टाकला. भाजपला राष्ट्रवादीचा पाठिंबा उघडउघड स्वीकारणे अशक्य होते. पण पाठिंबा जाहीररित्या नाकारला असता तर शिवसेनेच्या नाकदुर्‍या काढून शिवसेनेच्या सर्व अटी निमूटपणे मान्य कराव्या लागल्या असत्या. शिवसेनेच्या अटीत उपमुख्यमंत्रीपद (अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद ही पण अट होती म्हणे), गृह,अर्थ,महसूल इ. महत्त्वाची खाती, अनेक महामंडळाचे अध्यक्षपद, केंद्रात जास्तीची मंत्रीपदे अशा अनेक अटी होत्या. राष्ट्रवादीच्या पाठिंब्याचा शिवसेनेला नमविण्यासाठी उपयोग करता येईल हे ओळखून राष्ट्रवादीने दिलेल्या पाठिंब्याबाबत भाजपने नरो वा कुंजरो वा अशी भूमिका घेऊन पाठिंबा स्वीकारला का नाकारला याविषयी मौन पाळले. हे करताना भाजपने प्रचंड टीका सहन केली. परंतु सत्तेसाठी कासावीस झालेली शिवसेना लवकरच शरण येईल हे भाजपला माहित होते. भाजपच्या अपेक्षेप्रमाणेच शेवटी शिवसेना आपल्या सर्व अटी बासनात गुंडाळून, भाजप देईल त्या मंत्रीपदावर समाधान मानून भाजप सरकारला पाठिंबा देती झाली. शिवसेनेला नमविण्यामागची व शिवसेनेला नमवून शिवसेनेला भाजपला पाठिंबा देणे अपरिहार्य करण्याची भाजपची धूर्त खेळी कौतुकास्पद होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
कैलासवासी सोन्याबापु Fri, 01/30/2015 - 08:37 नवीन
सीएसडीएस सर्वे आलाय का? तो बराच authentic असतो!
  • Log in or register to post comments
ग
ग्रेटथिंकर Fri, 01/30/2015 - 15:59 नवीन
आआपचा जन्म भ्रष्टाचारमुक्तीच्या आंदोलनातुन झालेला आहे, केजरीवालांनी घेतलेले प्रशंनीय निर्णय माझ्या उपरोक्त प्रतिसादात दिले आहेत. केजरीवालांनी जनलोकपालसाठी मुख्यमंत्रीपदावर लाथ मारली, इतकी प्रामाणिकपणावर निष्ठा असलेले सध्या ते एकमेव आहेत... या उलट किरण बेदीला आणुन भाजपातल्याच जगदीश मुखी ,उपाध्याय,हर्षवर्धन यांच्यात भावी मुख्यमंत्रीपदावरुन हाणामार्या चालु झाल्या आहेत. कुठे निस्वार्थी केजरीवाल व कुठे हे भाजपातले संधीसाधु. दिल्लीकर हा फरक निश्चितच जाणतात ,जाणत नसतील तर ते त्यांचे दुर्दैव आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 01/30/2015 - 16:15 नवीन
केजरीवालांनी जनलोकपालसाठी मुख्यमंत्रीपदावर लाथ मारली, इतकी प्रामाणिकपणावर निष्ठा असलेले सध्या ते एकमेव आहेत...
कुठे निस्वार्थी केजरीवाल व कुठे हे भाजपातले संधीसाधु
हा तुमचाच पूर्वीचा प्रतिसाद ("टॉफि" अवतारातला) बघता का जरा. http://www.misalpav.com/comment/547008#comment-547008
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ग्रेटथिंकर
श
श्रीगुरुजी Fri, 01/30/2015 - 16:33 नवीन
दिल्लीत कोणी मिपाचे सदस्य आहेत का? विवेक पटाईत दिल्लीत आहेत. अजून कोणी आहेत का? त्यांच्याकडून या निवडणुकीषयी मते ऐकायला आवडतील.
  • Log in or register to post comments
ग
ग्रेटथिंकर Fri, 01/30/2015 - 16:37 नवीन
@श्रीगुरूजी,टॉपगिअर्ड फिलोसॉफर हा माझा आयडी नाही, नाना माई हे आयडीही माझे नाहीत याची कृपया नोंद घ्यावी.धन्यवाद
  • Log in or register to post comments
H
hitesh Sat, 01/31/2015 - 05:13 नवीन
आणि मीदेखील यांचा कुणाचाही आयडी नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ग्रेटथिंकर
क
कपिलमुनी Sat, 01/31/2015 - 06:39 नवीन
तुम्ही संमं कडे अधिकृत तक्रार दाखल करा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh
श
श्रीगुरुजी Sat, 01/31/2015 - 08:18 नवीन
काल एका वाहिनीवर केजरीवालांची मुलाखत बघत होतो. संपूर्ण मुलाखतीत केजरीवालांच्या फुशारक्या, बढाया आणि आत्मप्रौढी या व्यतिरिक्त काहीही नव्हते. मी जे ४९ दिवसात करून दाखविलं ते मोदींना ८ महिन्यात सुद्धा जमलें नाही अशी त्यांची अजून एक बढाई. निव्वळ माझ्या सभेलाच नव्हे तर आआपमधील सर्व नेत्यांच्या (म्हणजे गोपाल राय, योगेंद्र यादव अशी १५-१६ नावे त्यांनी घेतली) सभांना प्रचंड गर्दी होत आहे व भाजप नेत्यांच्या सभा रिकाम्या असतात असाही त्यांचा दावा होता. त्यांचा सर्वात हास्यास्पद दावा म्हणजे दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीवर डोळा ठेवून मोदींनी ओबामा भेट आखली. या दाव्यावर हसावे की त्यांची कीव करावी हेच कळेना. त्यांच्या काही भविष्यकालीन योजना खालीलप्रमाणे - - महिला सुरक्षेसाठी संपूर्ण दिल्लीत १५ लाख सीसीटीव्ही बसविणार. मला सीसीटीव्ही बसविण्याची नक्की किंमत माहीत नाही. मागील वर्षी मी रहात असलेल्या सोसायटीत सीसीटीव्ही बनविण्याचा प्रस्ताव होता. सोसायटीत एकूण ३ वेगवेगळ्या रस्त्यांवरून प्रवेश करता येतो. तिन्ही प्रवेशद्वारांपाशी व आत काही ठिकाणी असे १०-१२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची योजना होती. अंदाजे खर्च दीड लाख रूपये होता. म्हणजे एक सीसीटीव्ही कॅमरा बसविण्याची किंमत अंदाजे दहा हजार रूपये तरी असावी. हा केवळ अंदाज आहे. मला नक्की किंमत माहित नाही. या हिशेबाने दिल्लीत १५ लाख सीसीटीव्ही बसविण्याची किंमत किमान १५०० कोटी रूपये तरी असेल. त्याव्यतिरिक्त त्यासाठी लागणारी वीज, देखभाल खर्च, मॅनपॉवर याचाही खर्च असेल. इतका निधी केजरीवाल कोठून आणणार याचे आश्चर्य वाटले. - महिला सुरक्षेसाठी संपूर्ण दिल्लीत वाय-फाय कार्यान्वित करणार. प्रत्येक बस व ट्रेन मध्ये सुद्धा वायफाय कार्यान्वित करणार. नंतर प्रत्येक महिलेच्या भ्रमणध्वनीवर एक वेगळे बटन ठेवणार जे दाबताक्षणी वाय-फाय च्या माध्यमातून जवळच्या पोलिस ठाण्यात संदेश जाऊन ५ मिनिटात पोलिस तिथे हजर होतील. दिल्ली इतक्या मोठ्या शहरात सर्वत्र वाय-फाय कार्यान्वित करणे फारसे शक्य वाटत नाही. ते करायलाही भरपूर खर्च येणारच. तो निधी कोठून येणार? - वीज व पाण्याचे भाव कमी करणार. कमी झालेल्या बिलांची भरपाई करायला निधी कोठून आणणार? मला आता असं वाटायला लागलंय की यावेळी खरोखरच आआपला पूर्ण बहुमत मिळावे आणि त्यांना ५ वर्षे सत्ता चालवायला मिळावी. तेव्हाच त्यांना कळेल की गप्पा प्रत्यक्षात आणणे किती अवघड आहे ते. दिल्लीच्याही जनतेला यांच्या दाव्यातला फोलपणा समजू दे.
  • Log in or register to post comments
स
सव्यसाची Sat, 01/31/2015 - 08:47 नवीन
आजच आपचा जाहीरनामा जाहीर झाला आहे. दिल्ली साठी पूर्ण राज्याचा दर्जा, १५ दिवसात जनलोकपाल बिल पास करणार अशी आश्वासने आहेत. हे १५ दिवसात कसे पास होणार मला काही कळत नाही. म्हणजे सरकार स्थापन झाल्यानंतर, जे अधिवेशन होते लोकांच्या शपथविधी साठी असते आणि नंतर काही दिवसांनी अधिवेशन घेऊन विधेयक मंजुरी अशी कामे केली जातात ना? कि पहिल्याच अधिवेशनामध्ये असे केले जाते. शिवाय मागच्याच वेळी आलेल्या अडचणी आताही अजून तश्याच आहेत. त्यामुळे गृहमंत्रालयाकडून परवानगी घेऊनच हे बिल सादर करावे लागेल. हे काही कारणामुळे केंद्र सरकारकडे पेंडिंग पडून राहिले तर परत म्हणायला मोकळे कि भाजपा सरकार आम्हाला साथ देत नाही. शिवाय लोकायुक्त कायदा असताना दुसरा तश्याच पद्धतीचा कायदा पास केला तर राष्ट्रपतींकडून त्या राज्यासाठी म्हणून तो कायदा लागू करायचा असेल तर अजून वेळ लागू शकतो. दिल्ली साठी हे कश्या पद्धतीने चालते याची काही कल्पना नाही. त्यामुळे हे १५ दिवसात कसे शक्य होणारे कुणास ठाऊक?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
क
क्लिंटन Sat, 01/31/2015 - 09:20 नवीन
दिल्ली साठी पूर्ण राज्याचा दर्जा
आआपचा जाहिरनामा मी बघितलेला नाही पण तरीही दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देऊ असे त्यांनी म्हटले असेल तर ती बाब दिल्ली सरकारच्या अख्यतारीत येतच नाही. त्यासाठी घटनादुरूस्ती करावी लागेल आणि ती गोष्ट संसदेच्या अख्यतारीत येते.मग तरीही हा मुद्दा विधानसभा निवडणुकांच्या जाहिरनाम्यात का समाविष्ट केला आहे हे समजायला मार्ग नाही. त्यांनी दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा म्हणून पाठपुरावा करू असे म्हटले असेल तर त्यात काही चुकीचे नाही पण दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देऊ असे म्हटले असेल तर ते नक्कीच चुकीचे आहे. आआपवाल्यांचा ट्रॅक रेकॉर्ड लक्षात घेता घटनात्मक तरतुदी, कायदेकानू, नियम इत्यादींना कायमच फाट्यावर मारायची प्रवृत्ती असल्यामुळे असे आश्वासन त्यांनी दिले असले तरी त्यात मला तरी आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही.
हे १५ दिवसात कसे पास होणार मला काही कळत नाही....शिवाय मागच्याच वेळी आलेल्या अडचणी आताही अजून तश्याच आहेत. त्यामुळे गृहमंत्रालयाकडून परवानगी घेऊनच हे बिल सादर करावे लागेल. हे काही कारणामुळे केंद्र सरकारकडे पेंडिंग पडून राहिले तर परत म्हणायला मोकळे कि भाजपा सरकार आम्हाला साथ देत नाही.
मुद्दा पूर्ण योग्य आहे पण असे प्रश्न विचारल्यास तो मनुष्य भ्रष्ट ठरतो ना :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सव्यसाची
श
श्रीगुरुजी Sat, 01/31/2015 - 11:57 नवीन
दिल्ली विधानसभेचे वार्षिक अंदाजपत्रक ३०,००० कोटी रूपयांचे आहे. १५ लाख सीसीटीव्ही बसविण्यासाठी किमान १५०० कोटी रूपये (अंदाजपत्रकाच्या ५ टक्के रक्कम), ते चालविण्यासाठी व देखभालीसाठी अजून रक्कम, संपूर्ण दिल्ली विनामूल्य वाय-फाय करण्यासाठी अजून काही तरतूद, वीजकंपन्यांचे लेखापरीक्षण होईपर्यंत वीजबिलात ५० टक्के सूट व लेखापरीक्षणानंतर अजून बिल कमी करणार, प्रत्येक कुटुंबाला दरमहा २०,००० लिटर पाणी मोफत, दिल्लीत २० नवीन महाविद्यालये उघडणार (त्यासाठी ५०० कोटी रूपये) ... ३०,००० कोटी रूपयांमध्ये काय काय आआप? हे व्यावहारिक दॄष्ट्या शक्य तरी आहे का? नाही करता आलं तर भाजप आणि मोदी आहेच खापर फोडायला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
ग
गणेशा Mon, 02/02/2015 - 15:06 नवीन
दिल्लीला पुर्ण राज्याचा दर्जा देवु हा मुद्दा समाविष्ट यासाठी करण्यात आला आहे की लोकसभेच्या वेळी भाजपने ही आप चा हा मुद्दा आपल्याकडे घेवुन प्रचार केला होता, त्यामुळे हा मुद्दा आप ने आता भाजप चे सरकार देल्ली मध्ये आहे, आणि त्यांनी ही ह्या मुद्द्यावरुन मते मागितलेली आहेतच त्यामुळे आप ने पण हा मुद्दा जाहिर नाम्यात टाकला आहे. जर भाजप्ने मदत केली तर ठिक नाही तर ते लोकसभेच्या वेळेस खोटे बोलले असे होयील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
श
श्रीगुरुजी Sat, 01/31/2015 - 08:41 नवीन
काही नवीन सर्वेक्षणानुसार दिल्लीत खालीलप्रमाणे परिस्थिती असेल. (१) ३१/१/१५ - एबीपी न्यूज-नेल्सन (या सर्वेक्षणात फक्त मतांची टक्केवारी आहे. जागांचा अंदाज दिलेला नाही.) आआप - ५०% मते, भाजप - ४१% मते, काँग्रेस - ९% मते (२) २९/१/१५ द वीक-आयएमआरबी आआप - ३७.४५% मते, भाजप - ३९% मते आआप - २९ जागा, भाजप - ३६ जागा, काँग्रेस - ५ जागा (३) २९/१/१५ हिंदुस्तान टाईम्स-सी फोर आआप - ३१-३६ जागा, भाजप - ३१-३६ जागा, काँग्रेस - २-७ जागा किरण बेदींच्या आगमनापूर्वी खालीलप्रमाणे स्थिती होती. बेदींच्या आगमनामुळे भाजपला थोडासा फायदा झालेला दिसतोय. आआप - ३४-३९ जागा, भाजप - २९-३४ जागा, काँग्रेस - २-७ जागा (४) २८/१/१५ इंडिया टीव्ही-सी व्होटर आआप - ४०% मते, भाजप - ४७% मते, काँग्रेस - १०% मते आआप - २८ जागा, भाजप - ३७ जागा, काँग्रेस - ५ जागा (५) २१/१/१५ - झी न्यूज-तालीम आआप - ४०% मते, भाजप - ४५% मते, काँग्रेस - १०% मते आआप - २९ जागा, भाजप - ३७ जागा, काँग्रेस - ४ जागा एकंदरीत अत्यंत चुरशीची लढत दिसतेय. ३ सर्वेक्षणांनी भाजपला निसटते बहुमत दाखवलंय. एका सर्वेक्षणात दोघेही नेक-टू-नेक आहेत आणि एका सर्वेक्षणात जागांचा अंदाज न देता फक्त मतांचा अंदाज दिलाय. त्या सर्वेक्षणानुसार मते पडणार असतील तर ५० टक्के मते मिळवून आआपला सहज दोन तृतीयांश जागा मिळतील.
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Sat, 01/31/2015 - 09:12 नवीन
निवडणूकपूर्व चाचण्या बहुतांश वेळा % मतांचे किती जागा मिळतील यात रूपांतर करताना चुकतात.या चाचण्यांमध्येही तेच दिसत आहे. १९९३ आणि १९९८ मध्ये दिल्लीत काय झाले हे पुढील तक्त्यात दिले आहे.त्यावरून माझा मुद्दा स्पष्ट करतो. table.tableizer-table { border: 1px solid #CCC; font-family: Arial, Helvetica, sans-serif; font-size: 12px; } .tableizer-table td { padding: 4px; margin: 3px; border: 1px solid #ccc; } .tableizer-table th { background-color: #104E8B; color: #FFF; font-weight: bold; }       १९९३ १९९८   मते %जागामते %जागा भाजप42.80%4934%15 काँग्रेस34.50%1447.80%52 जनता दल12.60%51.80%1 इतर10.10%216.40%2 १९९३ मध्ये जनता दलाने १२% मते घेतली तर १९९८ मध्ये अशी फ्लोटिंग मते अनेक पक्ष/अपक्ष यात विभागली गेली होती. २०१३ मध्ये काँग्रेसने २४.७% मते घेतली असली तरी २०१५ मध्ये काँग्रेस तितकी मते मिळवेल असे कोणीच म्हणत नाही.बहुदा ती मते १०-१२% या रेंजमध्ये असतील.तेव्हा २०१५ मधील निवडणुका या १९९३ प्रमाणे होतील-- दोन मोठे पक्ष आणि १०-१२% मते घेणारा तिसरा पक्ष. १९९३ मध्ये भाजपला काँग्रेसपेक्षा ८.३% मते जास्त होती पण जागा तब्बल ३५ जास्त मिळाल्या. चौथा सर्व्हे भाजपला ७% जास्त मते आणि नऊच जागा जास्त देत आहे तर पाचवा सर्व्हे ५% जास्त मते आणि ८ जागा जास्त देत आहे.मुळात दोन पक्षांच्या मतांमध्ये असा ७-८% चा फरक असेल तर पुढे असलेल्या पक्षाला किमान २० जागा जास्त हव्यात.पण तसे होताना दिसत नाही. पहिल्या सर्व्हेप्रमाणे आआपला ५०% मते मिळाली तर आआपला ५०-५५ जागा नक्कीच मिळायला हव्यात. नक्की काय होते ते बघू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Tue, 02/03/2015 - 08:19 नवीन
कालच एबीपी न्यूज-नेल्सन यांच्या शेवटच्या सर्वेक्षणाचे आकडे प्रसिद्ध झालेत. हे सर्वेक्षण २५ जाने - ३१ जाने या कालावधीत करण्यात आले होते. त्यांच्या अंदाजानुसार खालील परिस्थिती असेल. http://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/delhi-elections-2015-hung-assembly-once-again-aap-35-seats-bjp-29-says-survey/articleshow/46099627.cms - आआप : ३७% मते व ३५ जागा, भाजप : ३३% मते व २९ जागा, काँग्रेस : १८% मते व ६ जागा, इतर : १२ % मते व शून्य जागा यापूर्वीच्या एबीपी न्यूज-नेल्सनच्या २४ जाने - २५ जाने या कालावधीत केलेल्या सर्वेक्षणाचे आकडे असे होते. या सर्वेक्षणात जागांचा अंदाज न देता फक्त संभाव्य मतांची टक्केवारी दिली होती. - आआप : ५०% मते, भाजप : ४१% मते, काँग्रेस : ९% मते, इतर : ०% मते पहिल्या सर्वेक्षणानंतर जेमतेम १-६ दिवसात आआपच्या मतांची टक्केवारी ५०% टक्क्यांवरून ३७% पर्यंत खाली येणे, भाजपच्या मतांची टक्केवारी ४१% टक्क्यांवरून ३३% पर्यंत खाली येणे, काँग्रेसच्या मतांची टक्केवारी ९% टक्क्यांवरून १८% पर्यंत वाढणे व इतरांची मते ०% टक्क्यांवरून १२% पर्यंत वाढणे हे धक्कादायक वाटते. एकंदरीत आआपला भाजपच्या तुलनेत अ‍ॅडव्हांटेज मिळालेले दिसत आहे. माझी अशी इच्छा आहे की डिसेंबर २०१३ च्या निकालाची पुनरावृत्ती होउन अधांतरी विधानसभा होऊ नये. आआप किंवा भाजपला पूर्ण बहुमत मिळावे. डिसेंबर २०१३ ची पुनरावृत्ती झाली तर केजरीवालांच्या आधीच्या ४९ दिवसांची पुनरावृत्ती होउन सावळा गोंधळ माजेल व पुन्हा एकदा निवडणुक घ्यावी लागेल आणि केजरीवालांची झाकली मूठ सव्वा लाखाचीच राहील. जर भाजपला पूर्ण बहुमत मिळाले तर आपल्या उपद्रवमूल्यानुसार आआप भाजप सरकारसाठी अत्यंत उपद्रव निर्माण करेल व सरकार नीट चालून देणार नाही. त्यापेक्षा आआपलाच पूर्ण बहुमत मिळावे असे मला वाटत आहे. जाहीरनाम्यात अत्यंत अव्यावहारिक आश्वासने दिलेल्या आआपला पूर्ण दिवस सरकार चालविता येते का ते समजेल आणि जाहीरनाम्यातील किती आश्वासने किती प्रमाणात पूर्ण करता येतील ते देखील समजेल. समजा आआपने पूर्ण ५ वर्षे स्वच्छ व कार्यक्षम सरकार दिले आणि जाहीरनाम्यातील काही आश्वासने काही प्रमाणात जरी पूर्ण केली तर पुढील निवडणुकीत मी आआपलाच मत देईन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा