कोण जिंकणार दिल्ली?
अवघ्या १४ महिन्यांच्या अवधीत राजधानी दिल्ली पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीला सामोरी जात आहे. डिसेंबर २०१३ पासून ७ फेब्रुवारी २०१५ पर्यंतच्या १४ महिन्यात दिल्लीकर तिसर्यांदा मतदान करणार आहेत. डिसेंबर २०१३ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत विधानसभेच्या ७० जागांपैकी भाजपला ३२, आआपला २८, काँग्रेसला ८, जदयुला १ व अपक्षांना १ अशा जागा मिळाल्या होत्या. कोणालाच स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्तेसाठी आघाडी करावीच लागणार होती. भाजप, आआप व काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकमेकांविरूद्ध लढले होते. सलग १५ वर्षे मुख्यमंत्रीपदावर राहिलेल्या शीला दिक्षितांना पराभूत करून केजरीवालांनी सामनावीराचा किताब पटकाविला होता, परंतु सामना जिंकण्यात त्यांना अपयश आले होते.
प्रचारात काँग्रेसच्या भ्रष्टाचाराविरूद्ध प्रचंड राळ उठविणार्या केजरीवालांनी निकाल लागल्यावर एकदम टोपी फिरविली. काही दिवस चर्चेचे नाटक करून व नंगर नागरिकांकडून एसेमेस मागविण्याची नौटंकी करून शेवटी चक्क काँग्रेसच्याच पाठिंब्यावर सरकार स्थापन केले आणि त्यानंतर लगेचच ४९ दिवसात राजीनामा देऊन मोकळेही झाले. त्या ४९ दिवसात जे झाले त्याचा सभ्य शब्दात "तमाशा" असाच उल्लेख करावा लागेल. आआप सरकारमधील मंत्र्यांने गाडीवर खेळणार्या मुलाचा फुटबॉल आदळल्यावर माझ्यावर दगडफेक झाली हा थेट आरोप करणे, अजून एका दुसर्या मंत्र्याने अधिकार नसताना व कोणतेही वॉरंट नसताना परदेशी नागरिकांच्या घरावर धाड घालणे, दस्तुरखुद्द मुख्यमंत्री केजरीवाल यांनी रात्रभर फुटपाथवर धरणे धरून नागरिकांना वेठीस धरणे, राज्यपालांची परवानगी नसताना जनलोकपाल विधेयक मांडण्याचा हट्ट धरणे व त्या कारणावरून राजीनामा देणे ... हे व असे अनेक वादग्रस्त प्रकार त्या ४९ दिवसात घडले. शेवटी त्यांच्याच अट्टाहासामुळे दिल्लीला पुन्हा एकदा निवडणुक होत आहे.
दरम्यानच्या काळात यमुनेतून बरेच पाणी वाहून गेले आहे. मे २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सर्व ७ मतदारसंघात भाजपचा विजय झाला. दस्तुरखुद्द केजरीवालांनी मोदींविरूद्ध निवडणुक लढण्यासाठी वाराणशीला जाउन उंटाच्या **चा मुका घ्यायचा प्रयत्न केला व त्यात साफ पराभूत झाले. लोकसभा निवडणुकीच्या काळात आआपच्याच कार्यकर्त्यांकडून स्वतःला थोबाडीत मारून घ्यायचे व स्वतःवर शाई उडविण्याचे कार्यक्रम त्यांनी मॅनेज केले व स्वतःला सहानुभूती मिळविण्याचा हास्यास्पद प्रयत्न केला. त्यांच्या दुर्दैवाने हे सर्व प्रयत्न फसले.
परंतु फेब्रुवारी २०१५ मध्ये परिस्थिती बदललेली आहे. आआपचे काही मुख्य नेते आआप सोडून भाजपमध्ये गेले आहेत (शाझिया इल्मी, विनोद बिन्नी इ.). आआपचे एक संस्थापक असलेले शांतीभूषण यांनी केजरीवालांवरच टीका करून किरण बेदींचे कौतुक केले आहे. आआप तर्फे अजूनही केजरीवाल हेच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत. भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जगदीश मुखी असतील हे गृहीत धरून केजरीवालांनी त्यांना लक्ष्य करून प्रचाराला सुरूवात केली होती. नंतर भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार सतीश उपाध्याय आहे अशी समजूत करून घेऊन त्यांनी सतीश उपाध्याय यांच्याविरूद्ध राळ उठवायला सुरूवात केली. नंतर भाजपकडे मुख्यमंत्रीपदाचा उमेदवारच नाही व मोदी स्वतःच दिल्लीचे मुख्यमंत्री होणार अशा तर्हेने भाजप प्रचार करीत आहे असेही आआपने सांगायला सुरूवात केली. परंतु भाजपने अगदी आयत्या वेळी केजरीवालांच्याच सहकारी माजी पोलिस महानिरीक्षक किरण बेदी यांना भाजपत आणून त्यांनाच मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करून ही लढत केजरीवाल विरूद्ध बेदी अशी कलाटणी देऊन टाकली.
बेदींना भाजपत आणून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार करणे हा काही जणांच्या मते भाजपचा मास्टरस्ट्रोक आहे. खरे काय ते दिल्लीकरच ठरवतील. दिल्लीचे मतदार अत्यंत जागृत आहेत. त्यांनी निवडणुकीत भल्याभल्यांना हिसका दाखविलेला आहे. त्यामुळे नक्की काय निकाल लागेल हे सांगता येत नाही.
सध्या तरी आआपचे पारडे काही प्रमाणात जड आहे असे वाटते. भाजप व आआपमध्ये तुल्यबल लढत होऊन भाजपच्या तुलनेत आआपला अगदी थोड्या जागा जास्त मिळतील असा बर्याच मतदार सर्वेक्षणांचा अंदाज आहे. परंतु पुन्हा एकदा कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल असे वाटत नाही. या दोन पक्षांव्यतिरिक्त काँग्रेस व इतर कोणतेही पक्ष मतदारांच्या खिजगणीतही नाहीत. दुर्दैवाने पुन्हा एकदा कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही तर मागील वर्षीच्याच तमाशाची पुनरावृत्ती होईल. जर आआपला स्पष्ट बहुमत मिळाले तरी केजरीवालांसारख्या अत्यंत बेभरवशाच्या व विचित्र स्वभावाच्या व्यक्तीमुळे ते सरकार फार काळ टिकेल असे वाटत नाही.
💬 प्रतिसाद
(452)
श
श्रीगुरुजी
Sat, 02/07/2015 - 08:54
नवीन
>>> Party with difference बद्दल काय मत आहे तुमच ? दुसर्यांच्या पक्षावर लई टीका करून झाली . जरा आता आपल्या पक्षावर बोला की
कोणत्या मुद्द्यावर बोलू ते सांगा.
- Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर
Sat, 02/07/2015 - 09:04
नवीन
हेच भाजप मधले भ्रष्टाचारी नेते , दिल्ली महानगर पालिकेतला भाजप चा भ्रष्टाचार , सीमेवर वर मारले गेलेले अनेक भारतीय जवान , (तरी नवाझ शरीफ यांच्या आईला साडी पाठवणे ), चीन ला अटकाव करण्यात आलेलं अपयश , फ़दवणिस यांचे खेडेकर सोबत स्टेज शेयर करण , विविध पक्षातून आलेले बिभीषण , काळा पैसा बाबत मारलेली थाप , स्वतःच्या राज्यातून तडीपार असणारा गुन्हेगारी प्रवृतीचा राष्ट्रीय अध्यक्ष , ई हूश . अजून लई आहे . तूर्त या मुद्द्यांची उत्तर द्या . मग अजून मुद्दे सांगतो
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sat, 02/07/2015 - 09:09
नवीन
यातल्या बहुतेक गोष्टींचा दिल्ली विधानसभा निवडणुकीशी दुरूनही संबंध नाही.
या सर्व मुद्द्यांवर लोकसभा निवडणुकीच्या काळात व नंतरही महाराष्ट विधानसभा निवडणुकीच्या काळात अनेक धाग्यांवर सविस्तर चर्चा झालेली आहे. पुन्हा पुन्हा तेच टंकायची माझी इच्छा नाही. अर्थात तुम्ही काहीही सोयिस्कर निष्कर्ष काढायला मोकळे आहात.
- Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर
Sat, 02/07/2015 - 09:12
नवीन
http://www.misalpav.com/comment/661850#comment-661850
याचा होता?
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Sat, 02/07/2015 - 09:35
नवीन
सोयीस्कर निष्कर्ष आपण काढता दरवेळेस गुरुजी.
भाजपचे दिल्लीतील महत्वाचे नेते . अपाध्याय साहबे, यांबद्दल केजरीवल यांनी पुरावा दाखवला. २४ तासात राजनिती सोडणार म्हणाले होते ते अजुन सोडलेली नाही.
केजरीवाल यांनी दाखवुन दिले की, मिटर जे वाटप झाले आहेत आणि ज्यात फॉल्टी मिटर जास्त आहेत ते सप्लाय करणारी कंपाणी उपाध्याय यांची होती. आणि उपाध्याय म्हणाले की ती मेडीया कंपणी आहे तर पुर्ण टॅक्स रेकॉर्ड च काढुन दाखवले .. आत हे ही निवडनुकीला लागु नाहीये का ?
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sat, 02/07/2015 - 12:46
नवीन
>>> भाजपचे दिल्लीतील महत्वाचे नेते . अपाध्याय साहबे, यांबद्दल केजरीवल यांनी पुरावा दाखवला. २४ तासात राजनिती सोडणार म्हणाले होते ते अजुन सोडलेली नाही.
केजरीवाल काय गुप्तचर खात्यात आहेत का ते न्यायालयात न्यायाधीश आहेत? ते वाटेल त्या गोष्टी पुरावा म्हणून दाखवतील. त्याला काय महत्त्व? आपल्या पुराव्याबद्दल इतकी खात्री असेल तर ते उपाध्यायविरुद्ध खटला का दाखल करत नाहीत? आआपकडे शांतिभूषण, प्रशांतभूषण इ. नामवंत वकील आहेत. खटला दाखल करायला काय अडचण आहे?
बिनबुडाचे आरोप करणे हे केजरीवालांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. याआधी गडकरी आणि इतर काही नेत्यांविरूद्ध बिनबुडाचे आरोप केल्यामुळे त्यांच्याविरूद्ध न्यायालयात खटले सुरू आहेत. मे महिन्यात केजरीवाल ६-७ दिवस सरकारी पाहुणचारही घेऊन आले होते. तुरूंगात राहीन पण जामिनावर सुटण्यासाठी कोणताही बाँड लिहून देणार नाही, अशी राणा भीमदेवी थाटात गर्जना करणारे केजरीवाल ६ दिवसानंतर निमूटपणे बाँड देऊन जामिनावर बाहेर आले होते. अर्थात वाटेल त्या प्रतिज्ञा करणे आणि नंतर नि:संकोचपणे त्या बिनदिक्कत मोडणे हे सुद्धा केजरीवालांचे अजून एक व्यवच्छेदक लक्षण. काँग्रेसचा पाठिंबा घेणार नाही असे जाहीर सांगून शेवटी त्यांनी काँग्रेसचाच पाठिंबा घेतला होता.
असो.
- Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर
Sat, 02/07/2015 - 12:51
नवीन
काँग्रेसचा पाठिंबा घेणार नाही असे जाहीर सांगून शेवटी त्यांनी काँग्रेसचाच पाठिंबा घेतला होता.
राष्ट्रवादी चा पाठींबा घेणार नाही , नाही , नाही अशी त्रिवार गर्जना करणारे फेकेंद्र लुबाड्वनिस आठवले
*biggrin*
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sat, 02/07/2015 - 13:07
नवीन
घेतलाच नव्हता. याविषयी सविस्तर चर्चा शिवसेना - युद्धात हरले आणि तहातही या धाग्यावर झाली आहे. तिथे वाचा.
बादवे, केजरीवाल हे काही फडणविसांपेक्षा वेगळे दिसत नाहीत. खरं ना?
- Log in or register to post comments
ग
ग्रेटथिंकर
Sat, 02/07/2015 - 13:15
नवीन
म्हणजे फडणवीस हे पण पलटणीस आहेत असेच ना! श्रीगुरुजी?
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sat, 02/07/2015 - 13:37
नवीन
नानासाहेब,
मघापासून बरंच काही खरडलंस. इतकावेळ मी दुर्लक्ष करत होतो. मी वर दिलेला धागा वाच. वस्तुस्थिती समजून घे. त्याच्यात तुझे स्वतःचे प्रतिसादही वाच आणि मग लिहायला लाग.
- Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर
Sat, 02/07/2015 - 15:31
नवीन
गुर्जी केजरीवाल ने कोन्ग्रेस चा पाठींबा मागितला नव्हता . कोन्ग्रेस ने स्वतः दिला . फडवाणीस सरकारला ला राष्ट्रवादी ने असाच दिला . दोन्ही मध्ये गुणात्मक फरक काय ? भाजप ने राष्ट्रवादी चा पाठींबा नाकारला होता का ? त्या धाग्यावर तुमच्या कोलांट्या उड्या लई मजेशीर होत्या . नाशिक मध्ये मनसे ने राष्ट्रवादी ने पाठींबा घेतल्यावर तुम्ही लई बोट मोडली होतीत . काही तरी एक भूमिका
ठेवा ना . बाकी तुम्ही तरी उघड भाजप चे समर्थक आहात . बाकी आम्ही नाही त्या गावचे असे दाखवणार्या छुप्या भक्तांकडून तर उत्तराची पण अपेक्षा नाही
- Log in or register to post comments
ग
ग्रेटथिंकर
Sat, 02/07/2015 - 12:58
नवीन
राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणार नाही असे सांगुण त्यांचाच पाठिंबा बीजेपीने महाराष्ट्रात घेतला हे विसरलात का श्रीगुरुजी?
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sat, 02/07/2015 - 13:41
नवीन
पुरावेच खोटे असतील तर कशी सोडणार राजनीति? आणि खरे असतील तर केजरीवाल त्यांच्यावर खटला का भरत नाहीत? खटल्यात आपण उघडे पडू म्हणूनच कचरत आहेत का?
पुरावे खरे का खोटे ते न्यायालयालाच ठरवू देत ना. केजरीवाल हे ठरविणारे कोण?
- Log in or register to post comments
न
नांदेडीअन
Sat, 02/07/2015 - 09:20
नवीन
असले प्रश्न विचारू नका हो.
मिपा सोडून जातील ते. :P
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sat, 02/07/2015 - 12:48
नवीन
इतक्यात आनंदी होवू नका. केजरीवालांसारखा मी पळपुटा नाही. याउलट तुम्ही आणि अजून एक जण 'आता यापुढे या धाग्यावर लिहिणार नाही' असे लिहूनसुद्धा पुन्हा परत आलेत.
- Log in or register to post comments
न
नांदेडीअन
Sat, 02/07/2015 - 13:16
नवीन
अच्छा, मी परत आलो त्याचा राग आहे का ?
ठीक आहे, इग्नोरास्त्र सोडतो.
बोलू १० तारखेलाच आता. :)
तोपर्यंत जितक्या खोट्या बातम्या शेअर करायच्यात तेव्हढ्या करा.
बेस्ट ऑफ लक. ;)
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sat, 02/07/2015 - 13:33
नवीन
नाही हो. राग कसला. उलट तुमचे सगळे मूद्दे खोडून टाकता आले याचा आनंदच आहे. मला फक्त तुमच्या वागण्यातील विसंगती दाखवून द्यायची होती इतकंच.
>>> तोपर्यंत जितक्या खोट्या बातम्या शेअर करायच्यात तेव्हढ्या करा.
तुमच्याकडच्या खोट्या बातम्या संपल्या की काय?
असो. तुम्हालासुद्धा बेस्ट ऑफ लक.
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Sat, 02/07/2015 - 09:18
नवीन
शेवटचा रिप्लाय म्हंटल होते कारण स्वतातच लिखान चाल उहोते असे वाटले होते.. असो.
त्या मतांचे अनेक वाटेकरी आहेत हे आपल्यालच वाटते.. समस्त दिल्लीकरांना पुर्ण बहुमतातील सरकार हवे आहे आणि ते आप किंवा भाजपच देवु शकणार असल्याने, सामान्य जनता या दोन पक्षापैकीच एकाला वोटींग करेन.. इतर पक्षांना वयक्तीक लेवल वरील रिलेशन्शिप असणारेच वोट येथे मिळतील. म्हणुन इतर अपक्ष दिल्लीत जास्त निवडनु येणार नाहीत.
म्हणुन फतवा फक कॉन्ग्रेस ला वोट करु नका म्हंटले असते तरी ती मते आप लाच पडली असती.
हे म्हणने का सु नये, जर निवडनुकीच्या अगोदर टीव्हीवरील जाहिरातींना बंदि असेन.. प्रचार करण्यास बंदि असेन तर पेपर न्युज पण तश्याच न्युज मध्ये आले पाहिजे असे म्हणने आपणास चुकीचे का वाटते ? की अज्ञात सोर्स कडुन पैसा मिळाला म्हणुन कीती ही खर्चकरायचा का ?
ज्यांना संशयास्पद देणग्या घ्यायच्या असतात ते नेट वर माहीती देणार कशाला या संशयाच्या. आणि तो चेक जर आप कडे आला असेन तर तोच चेक काय बँकेने भाजप ला दिला काय पुन्हा ?
दुसरा मुद्दा ९५२ (७३ %) करोड रुपये भाजप ला अज्ञात सोर्स कडुन मिळाअले आहेत आणि ८२ % कॉन्ग्रेस ला. तर त्यांना पहिली नैतिकताच नाही आप वर आरोप करण्याची ? त्यांनी आपला शहनिशा करायला काय झाले विचारायचे पण स्वता मात्र कॅश घ्यायची असे का ? मोदींच्या एका सभेला येणारा खर्च महाराष्ट्र निवडनुकीवेळेस ही पाहिला आहे आम्ही. त्यामुळॅ पैसे कोणाकडुन आण इकसे येतात भाजप ला हे येथे सांगण्याची गरज नाही.. कदाचीत त्यामुळॅच भांडवलदारांना सवलती चालु आहेत.
किरण बेदी असतील हो लाख यायला तयार पण भाजप ने त्यांना मुख्यमंत्री उमेदवार केले आहे, असे आयात उमेदवार भाजप ला का घ्यावे लागतात.. बिन्नी पण त्यातीलच एक. त्यावरुनच कळते आहे, मागिल वेळेस बिन्नीला खतपाणी कुठुन मिळत होते
आम्ही तेव्हडे स्वच्छ असे आप का माणते कारण ते असे म्हणत नाही प्रत्येक राजकारणी भ्रष्ट आहे, ते म्हणतात भाजप आणि कॉन्ग्रेस अनेक भ्रष्ट नेत्यांना पाठीशी घालते.. नावे सांगायची गरज नसावी असे वाटते. आणि त्यामुळे आप स्वताला स्वच्छ समजते. भगोडा चे जेव्हडे भांदवल केले गेले त्याच अर्थ ते स्वच्छ नव्हते असे लावता येणार नाही.
मी तुमच्या मागच्या धाग्यावर राष्ट्रवादी च्या बाजुने लिहिले होते.
मी एकदा भाजप ला .. एकदा शिवसेनेला ही वोट केले आहे.. कारण ते सदश्य कसे आहेत यावरुन मी वोट करतो.
मागील वेळेस ही मी भाजप लाच वोट करणार होतो . पण आमच्या चिंचवड विधानसभेत भाजप ने आयात उमेदवार राष्ट्रवादीचा घेतला आणि लोकसबेह्ला ज्या विरुद्ध मत दिले त्यांनाच मत कसे द्यायचे म्हणुन आणि ५००० रुपये धुडकावुन मी राष्ट्रवादीला वोट केले हरणार होते ते तरी.
त्यामुळॅ कोणाचे समर्थक असण्यापेक्षा स्वच्छ आणि सरळ राजकारणाला माझा पाठिंबा आहे. म्हणुन दिल्लीमध्ये आप ला माझा पाठिंबा आहे.
फक्त भाजपचीच पाठराखन किंवा फक्त आप विरोध (क्लिंटन सारखा मला जमत नाहि .
---
जाता जाता..
दिल्लीत भाजप किंवा आप कोणी ही जिंकले तरी सक्षम विरोधी पक्ष ही यापैकी एकास होता येइल त्यामुळॅ दिल्लीची कामे होतील असे वाटते.
आता पर्यंत भाजप गेल्या १६ वर्षाचा हिशेब ठेवत आहे.. पण त्याच दिल्ली महानगरपालिकेत भाजप सत्तेवर होता आणि तो हिशेब त्यांचा ही थोड्या फार प्रमाणाअत आहे.. असो तरीही शुभेच्छा .
तसे ही किरण बेदी काय अणि अरविंद केजरीवाल काय दोघे ही स्वच्छ राजकारण करतील आणि दिल्ली पुढे न्हेतील फक्त मोदी प्रतिमा किरण बेदींना आता सारखे झाकोळुन टाकणार नाहीत हे पाहिले पाहिजे.
आप सत्तेत येवो आणि जे लोक रस्त्यावर आंदोलन करणारे होते ते सत्तेत येवुन मुजोर सत्ताशीशांना जागा दाखवावी असे मनोमन वाटते.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sat, 02/07/2015 - 13:01
नवीन
>>> त्या मतांचे अनेक वाटेकरी आहेत हे आपल्यालच वाटते.
मग तुम्हाला काय वाटते? मुस्लिमांची १००% मते फक्त आआपलाच मिळणार अशी समजूत आहे काय तुमची?
>>> समस्त दिल्लीकरांना पुर्ण बहुमतातील सरकार हवे आहे आणि ते आप किंवा भाजपच देवु शकणार असल्याने, सामान्य जनता या दोन पक्षापैकीच एकाला वोटींग करेन.. इतर पक्षांना वयक्तीक लेवल वरील रिलेशन्शिप असणारेच वोट येथे मिळतील. म्हणुन इतर अपक्ष दिल्लीत जास्त निवडनु येणार नाहीत.
परत एकदा चुकीची समजूत. आआप व भाजप व्यतिरिक्त इतर अनेक पक्ष रिंगणात आहेत. बसप व काँग्रेस प्रत्येकी ७० जागा लढवित आहेत. डावे पक्ष १० जागा लढवित आहेत. प्रत्येक पक्षाचे स्वतःचे बेसिक मतदार असतात. ती मते त्या पक्षाला मिळतातच.
>>> म्हणुन फतवा फक कॉन्ग्रेस ला वोट करु नका म्हंटले असते तरी ती मते आप लाच पडली असती.
म्हणून तर आआपने अलका लांबांना बुखारीच्या भेटीला पाठवून फतवा जाहीर करायला लावलेला दिसतोय.
>>> हे म्हणने का सु नये, जर निवडनुकीच्या अगोदर टीव्हीवरील जाहिरातींना बंदि असेन.. प्रचार करण्यास बंदि असेन तर पेपर न्युज पण तश्याच न्युज मध्ये आले पाहिजे असे म्हणने आपणास चुकीचे का वाटते ? की अज्ञात सोर्स कडुन पैसा मिळाला म्हणुन कीती ही खर्चकरायचा का ?
प्रचार संपल्यावर वर्तमानपत्रात जाहिराती देण्यास कायदेशीर परवानगी आहे. जशा भाजपने जाहिराती दिल्या तशाच आआपने दिल्या आहेत. आपण केले ते योग्य आणि भाजप करतो ते चुकीचं हा आआपचा शुद्ध कांगावा आहे.
बादवे, आआपचाही सर्व निधी ज्ञात स्त्रोतांकडून आलेला नाही. २ कोटी रूपयांचा मूळ स्त्रोत अजून अज्ञातच आहे.
>>> दुसरा मुद्दा ९५२ (७३ करोड रुपये भाजप ला अज्ञात सोर्स कडुन मिळाअले आहेत आणि ८२ % कॉन्ग्रेस ला. तर त्यांना पहिली नैतिकताच नाही आप वर आरोप करण्याची ?
आआपची तरी नैतिकता आहे का इतरांवर आरोप करण्याची?
>>> आणि त्यामुळे आप स्वताला स्वच्छ समजते. भगोडा चे जेव्हडे भांदवल केले गेले त्याच अर्थ ते स्वच्छ नव्हते असे लावता येणार नाही.
आआपवाले स्वतःला वाटेल ते समजतील. पण वस्तुस्थिती वेगळीच आहे. ते स्वच्छ आहेत का नाहीत हा वेगळा मुद्दा आहे. अत्यंत चुकीच्या कारणावरून राजीनामा देऊन जबाबदारी झटकून ते पळून गेले ही वस्तुस्थिती आहे.
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Sat, 02/07/2015 - 16:53
नवीन
नाही, परंतु ९९ % मते भाजप ला पडणार नाहीत ही खात्री भाजपला ही होती आणि आप ला ही होती. कॉग्रेस ला यावेळेस जास्त मते पडणार नाहीत या साठी वेगळ्या विश्लेषणाची गरज नसावी.
अहो, ९५२ कोटी जेंव्हा अनक्नोन सोर्स कडुन आणि जास्त करुन कॅश म्हणुन घेतले गेले तेंव्हा कुठला क्रायटेरीआ (फिलटर) लावला गेला होता का भाजप कडुन . निदान आप ने चेक घेतला.. पॅन नं त्याच्याकडे आहेत. त्याही पुढे जाउन चुक होत असतील तर ते आनखिन काय करु शक्तील ते पाहणार आहेत असे ते बोलले.
भाजप वाले आपण कसे ही पैसे घेतो तसेच आप पण घेतोच की कुटेह वेगळे आहेत ते असे का दाखवु इच्छित आहे ? स्वता कसे वेगळे आहेत हे सांगणारेच आज आपण वेगळे नाहे तर कोणीच नाही हा प्रयत्न खरेच भाजप साठी हाश्यास्पद वाट नाही का ? जास्त एक्प्लनेशन देत नाही, वरती एक लिंक दिली आहे त्यात हे आले आहे
ठि काहे त्या साठी त्यांनी माफी मागितली होती. आणि चुक केली होती कुठला गुन्हा तर केला नव्हता असा त्यांचा दावा होता. चुका कोणाअकदुन होत नाहीत ? फक्त काही राजकारणी मान्य करतात काही नाही.
२००२ च्या चुका मोदींल्कडुन मान्य झाल्या नाहीतच ना. म्हणुन ती चुक नव्हती असे आपण कसे म्हणु शकता ?
आणि तरीही त्या ४९ दिवसाचे योग्य भांदवल आप ने निवडनुकित केले. आणि भाजप ला ८ महिन्याचे मुल्यांकन पण देता आले नाही.
असो...
- Log in or register to post comments
व
वेडा बेडूक
Fri, 04/05/2024 - 14:26
नवीन
हाय्ला! ही टेप अजुनही सुरू आहे?
- Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर
Sat, 02/07/2015 - 10:55
नवीन
बाकी मोदी याना आमंत्रण न देऊन ज्या शाही इमाम यांनी त्यांचा अपमान केला होता त्यांनी आयोजित केलेल्या डीनर ला कोण गेल होत ? ओळखा पाहू ?
http://m.bhaskar.com/news/referer/521/UT-DEL-NEW-dinner-party-at-jama-masjid-at-bukhari-presence-4824000-PHO.html?referrer_url=http://lm.facebook.com/lsr.php%3Fu%3Dhttp%253A%252F%252Fwww.bhaskar.com%252Fnews-ht%252FUT-DEL-NEW-dinner-party-at-jama-masjid-at-bukhari-presence-4824000-PHO.html%26ext%3D1423302112%26hash%3DAclvlz_zlt9q8SFnsey5v6F5A6tf_C0-kPnr9QX3ntGrug%26_rdr
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Fri, 02/06/2015 - 14:24
नवीन
मस्त interview आहे केजरीवाल चा.आणि वरती जे जातीय राजकारणाबद्दल बोलले जात आहे ते तरी केजरीवाल खेळत नाही. असो.. या संभाषणात पण त्यावर पण प्रकाश टाकलेला आहे.
http://www.ndtv.com/elections/video/player/the-buck-stops-here/delhi-do-i-look-like-a-naxal-arvind-kejriwal-takes-on-pm/352358?pfrom=home-assembly2015_electionopinionsd
तसे ही माझ्या एका ही रिप्लाय ला एकही उत्तर नाहीच आहे येथे म्हणुन जास्त टंकण्याचे कष्ट घेत नाही.
- Log in or register to post comments
न
नांदेडीअन
Sat, 02/07/2015 - 08:36
नवीन
आज मतदान केल्यानंतर किरण बेदी भाजपाच्या काही समर्थकांना घेऊन कॅमेर्यापुढे आल्या होत्या.
त्यातला एक माणूस म्हणाला, "आम्हाला आपवाल्यांनी प्रत्येकी ३०० रूपये देऊन आपला वोट टाकायला सांगितले आहे, आणि टाकले नाही तर तुमच्या झोपडपट्ट्या बॉम्ब टाकून उडवून देऊ अशी धमकी दिली आहे." *lol*
दुसरा एक माणूस कॅमेर्यापुढे आला, पण तो बिचारा भाजपाची टोपी काढायची विसरून गेला होता.
किरण बेदींनी लगेच त्याची टोपी बाजूला काढून टाकली. *biggrin*
आज तकवर Live सुरू होते हे.
आत्ता दाखवत नसतील तर त्यांच्या YouTube चॅनलवर जाऊन बघा, तिथे अपलोड केले असेल कदाचित.
- Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर
Sat, 02/07/2015 - 08:39
नवीन
दुतोंडी लोक आहेत हो हे . प्रामाणिक वैगेरे म्हणवणारी किरण बेदी कशी या तडीपार भ्रष्ट लोकांच्या हाती लागली देव जाणे .
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sat, 02/07/2015 - 08:40
नवीन
>>> त्यातला एक माणूस म्हणाला, "आम्हाला आपवाल्यांनी प्रत्येकी ३०० रूपये देऊन आपला वोट टाकायला सांगितले आहे, आणि टाकले नाही तर तुमच्या झोपडपट्ट्या बॉम्ब टाकून उडवून देऊ अशी धमकी दिली आहे."
चालायचंच. २ दिवसांपूर्वीचं आशुतोषांचं वक्तव्य विसरलात का? भाजपवाले पैसे, दारू आणि मांसाहारी जेवण मतदारांना वाटत असून झोपडपट्टीवाल्यांची मतदार ओळखपत्रे त्यांनी काढून घेतली आहेत व आआपला मत दिल्यास गंभीर परीणाम होतील अशीही धमकी भाजपवाल्यांनी दिली आहे असे त्यांनी सांगितले होते. जे २ दिवसांपूर्वी आशुतोष म्हणत होते आता तेच भाजप म्हणत आहे. दोघात फरक तो काय?
- Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर
Sat, 02/07/2015 - 08:43
नवीन
दोघात फरक तो काय?
अहो ते live टीवी वर नाही पकडले गेले
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sat, 02/07/2015 - 08:46
नवीन
मग कोण लाईव्ह टीव्हीवर पकडले गेले? दोन्ही बाजू फक्त पोकळ आरोप करतानाच दिसताहेत.
- Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर
Sat, 02/07/2015 - 08:52
नवीन
दुसरा एक माणूस कॅमेर्यापुढे आला, पण तो बिचारा भाजपाची टोपी काढायची विसरून गेला होता.
किरण बेदींनी लगेच त्याची टोपी बाजूला काढून टाकली.
आज तकवर Live सुरू होते हे.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sat, 02/07/2015 - 08:55
नवीन
पैसे देतानाचे लाईव्ह चित्रीकरण होते का?
- Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर
Sat, 02/07/2015 - 12:02
नवीन
बाकी पैसे घेताना कुठल्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष पकडला गेला होता हो गुर्जी ?*lol*
- Log in or register to post comments
प
प्रतापराव
Sat, 02/07/2015 - 08:50
नवीन
भाजपा नि कॉंग्रेस ह्या एकाच नाण्य्याच्या दोन बाजू आहेत. केजरीवाल हे प्रामाणिक व्यक्ती वाटतात. ह्यावेळी दिल्लीत आप्चे बहुमताने सरकार यायला हवे. केजरीवाल ह्यांनी ४९ दिवसात सरकार सोडले हा त्यांचा चुकीचा निर्णय होता परंतु त्यासाठी त्यांनी माफी मागितली आहे किती राजकारणी लोकांकडे एवढा मनाचा मोठेपणा असतो. भाजपा किंवा कॉंग्रेस दिल्लीत आली असती तर पाच वर्षाचे स्थिर सरकार मिळाले असते असे बर्याच जणांना वाटते पण नेमकं काय होतं हो स्थिर सरकार मिळालं तर? स्थिर आहेत पण लोकांच्या हिताविरोधी निर्णय घेत असतील, एकामागून एक घोटाळे करत असतील, स्नूपिंग, भ्रष्टाचार सगळ्यामध्ये हात रंगवून घेत असतील तर त्याचा आपल्याला कसा फायदा होणार हे काही आकलन होत नाही.
(हे सगळं सिद्ध झालेलं नाही हे लक्षात आहे. ते होईल अशी आशा बाळगणंसुद्धा वेडेपणा ठरेल इतके आपले नेते क्लीन-चिट मास्टर्स आहेत!)
- Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर
Sat, 02/07/2015 - 08:58
नवीन
आता तर भाजप वाल्यांचे निवडणूक आश्वासन कोणती आणि 'जुमले ' कुठले असां प्रश्न उपस्थित झाला आहे . ज्याना नाही कळल त्यांनी अमित शाह , जुमला असा गुगल सर्च करावा .
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sat, 02/07/2015 - 09:02
नवीन
निवडणुकीच्या आधीच आआपवाल्यांची निवडणुक आश्वासने म्हणजे 'जुमले' दिसताहेत. निवडून आल्यावर लगेच ५०% वीजबिलात सवलत आणि नंतर वीजकंपन्यांचे लेखापरीक्षण झाल्यावर अजून दर कमी करणार, दिल्लीत सर्व घरांना महिना २०,००० लीटर मोफत पाणी, दिल्लीत १५ लाख सीसीटीव्ही, संपूर्ण दिल्लीत मोफत वायफाय . . . काय बोलायचं आता?
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Sat, 02/07/2015 - 09:30
नवीन
आप ने हे दाखवुन दिले आहे की १००० करोड टॅक्स त्यांच्या काळात जास्त आणला गेला आणि वरील पाणि आणि विज या योजनेस ४०० करोड लागले. दिल्लीचा वार्षिक अर्थ पॅकेज ४००० करोड आहे.
दुसरी गोष्ट
भाजपने वोडाफोनचे कीती तरी कोटी रुपये (३०० + आहेत का ? लक्षात नाही आकडा) टॅक्स माफ केला .. का ?
अनेक शेतकरी पॅकेजेस जाहीत केली .. शेतकर्यांना ते पैसे मिळालेले नाहीत
दिल्लीत भाजप्ने ही ३० % विज कटोती सांगितली आहेच .. विजबिल कंपण्याण्चे ऑडीट भाजप ने थांबवले आहे.
असे सर्व नसावे असे मला वाटते.
सीसीटीव्ही कॅमेरा शहरात का असु नये असे वापणास वाटते ? सेक्युरीटी साठी होणाअरा हा खर्च काय फक्त आप लाच फायद्याचा आहे काय ? संपुर्णा दिल्लीला फायद्याचा आहे. जर ते निट पैश्याअभावी राज्य चालवु शकले नाही तर ते बघतील या घोषणेचे.. पण भाजप प्रमाणे कहावत होती असे ते म्हणणार नाही अशी मनोमन खात्री वाटते
- Log in or register to post comments
ल
लोटीया_पठाण
Sat, 02/07/2015 - 13:20
नवीन
गणेश साहेब, वोडाफोन चे ३०० कोटी वगैरे माफ नाही केलेत. उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकार जाणार नाहीय. युपिए वाल्या सरकार ने पूर्वलक्षी प्रभावाने कर गोळा करण्या विरोधात वोडाफोन ने न्यायालयात धाव घेतलेली अन निर्णय वोडाफोन च्या बाजूने लागलेला ( जो तेव्हा अपेक्षितच होता ). मुळात जी गोष्ट unconstitutional आहे त्यासाठी परत न्यायालयात हेलपाटे घालण्यात काय हाशील ?? असा विचार सध्याच्या सरकारने केलेला दिसतोय.
या सबंध प्रकरणाचा मतितार्थ लक्षात न घेत शेतकर्याच्या आडून फालतू राजकारण करण्याचे उद्योग सध्या काही काँग्रेसी अन सैनिकांनी आरंभले आहेत.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sat, 02/07/2015 - 13:27
नवीन
>>> आप ने हे दाखवुन दिले आहे की १००० करोड टॅक्स त्यांच्या काळात जास्त आणला गेला आणि वरील पाणि आणि विज या योजनेस ४०० करोड लागले. दिल्लीचा वार्षिक अर्थ पॅकेज ४००० करोड आहे.
काय बोलू आता? भारतात केंद्रात आणि राज्यात सर्वाधिक करभरणा हा आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत होतो. आयकर विभागात उपायुक्त असलेल्या केजरीवालांना हे माहित असणारच. परंतु गलिबल आआपभक्तांना फसविण्यासाठी अशा गोष्टी फेकायला लागतात. केजरीवाल त्याच काळात मुख्यमंत्री होते. खरं तर चौथ्या तिमाहीतल्या ९० दिवसांपैकी फक्त ४२ दिवस ते मुख्यमंत्री होते. तरी सगळ्या तिमाहीचे श्रेय तेच घेत आहेत. आणि यात त्यांचा वाटा शून्य असून ही सगळी चौथ्या तिमाहीची करामत आहे.
२०१४ सालातल्या संपूर्ण वर्षात फक्त माझ्याच काळात दिल्लीत थंडी होती, इतर दिवसात दिल्लीकरांना उन्हाळ्याचा त्रास झाला, म्हणून आआपलाच मते द्या असेही ते सांगायला कमी करणार नाहीत आणि गलिबल आआपभक्त त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतील.
>>> भाजपने वोडाफोनचे कीती तरी कोटी रुपये (३०० + आहेत का ? लक्षात नाही आकडा) टॅक्स माफ केला .. का ?
यालाच म्हणतात अपप्रचार. जरा वोडाफोनचे प्रकरण नीट वाचा. हा कर माफ केलेला नाही.
व्होडाफोन या लंडनस्थित मुख्यालय असलेल्या दूरसंचार कंपनीने २००७ साली हाँगकाँग येथील सीजीपी इन्व्हेस्टमेंट्स या कंपनीचे संपूर्ण भागभांडवल खरेदी केले. ही सीजीपी कंपनी जरी हाँगकाँग येथे होती तरी तिची नोंदणी केमन आयलंड या करशून्य स्थानी झाली. जगात अधिकृतपणे अशी अनेक शहरे वा केंद्रे आहेत की जेथे नोंदणी झाल्यास विविध करांत मोठी सवलत मिळते. त्यात काहीही गर नाही. आपापल्या प्रांतात गुंतवणूक आकर्षून घेण्यासाठी अनेक प्रांत विविध मार्गाचा उपयोग करीत असतात. अगदी देशांतर्गत पातळीवरही विचार करावयाचा झाल्यास आपल्याकडे उत्तरांचल या राज्याचे उदाहरण देता येईल. या राज्याने गुंतवणुकीला चालना मिळावी यासाठी मोठय़ा प्रमाणावर करसुटी जाहीर केली होती. त्यामुळे टाटा, बजाजसह अनेक बडय़ा कंपन्यांनी तेथे कार्यालये थाटली. महाराष्ट्रातही वाडा आदी मागास भागांत उद्योगांनी जावे यासाठी दीर्घकाळ करसुटी दिली जाते. हे असे करणे काही गर नाही. तेव्हा याच प्रचलित नियमांनुसार सीजीपीची गुंतवणूक होती. या कंपनीने अशाच वेगवेगळ्या मार्गानी भारतातील हचिसन एस्सार या कंपनीत ६७ टक्के इतके भागभांडवल गुंतवले होते. परंतु व्होडाफोनने सीजीपी विकत घेतल्यावर तिची उपकंपनी असलेल्या हचिसन एस्सार या कंपनीवरही व्होडाफोनची मालकी प्रस्थापित झाली.
एखाद्याने बंगला खरेदी केल्यावर त्यातील कोठीची खोलीही नव्या मालकाच्या ताब्यात जावी, तसेच हे. पण हे इतके साधे ग्यानबाचे अर्थशास्त्र आपल्या आयकर खात्याला समजले नाही. या हचिसनचा व्यवहार भारतात आहे म्हणून व्होडाफोनने सीजीपी खरेदी करण्याच्या व्यवहारावर येथे भांडवल वृद्धी कर भरावा असे त्या खात्याचे म्हणणे. फेब्रुवारी २००७ साली झालेला हा संपूर्ण व्यवहार ५५ हजार कोटींचा होता. याचा अर्थ व्होडाफोनने इतकी किंमत मोजून सीजीपी आणि त्या अनुषंगाने हचिसन एस्सार या कंपनीवर आपली मालकी प्रस्थापित केली. २०१० साली आयकर खात्याला या व्यवहारात देय कर दिला गेला नसल्याचा साक्षात्कार झाला. त्यामुळे व्होडाफोनकडे ११ हजार कोटी रुपयांच्या आयकराची मागणी केली. भारतीय कर खात्याच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे असे की व्होडाफोन या कंपनीने सीजीपी कंपनी विकत घेतली तीच मुळात हचिसन एस्सारवर आपली मालकी प्रस्थापित व्हावी या उद्देशाने. आणि हचिसन एस्सार ही कंपनी भारतात कार्यरत आहे, तेव्हा तिच्या मालकी हस्तांतरणावर व्होडाफोनने आयकर द्यावा. त्यातही पुढे जाऊन आपल्या आयकर खात्याने या कराराचा भरणा पूर्वलक्ष्यी प्रभावाने व्हावा अशीही मागणी केली. तत्कालीन अर्थमंत्री प्रणब मुखर्जी यांनी आपल्या त्या वेळच्या अर्थसंकल्पात या मागास निर्णयाचे समर्थन केले आणि वर अन्य कंपन्यांनाही हा निर्णय लागू होत असल्याचे जाहीर केले. याद्वारे सरकारने वाटेल त्या कंपनीकडे वाटेल तितक्या काळाचा पूर्वलक्ष्यी प्रभावाने कर आकारण्याचा अधिकार स्वत:कडे घेतला. हा निर्णय अत्यंत हास्यास्पद आणि मागास होता. हे असे करणे म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे त्याच्या शाळेने पूर्वलक्ष्यी प्रभावाने बालवाडीपासूनची शुल्कवाढ मागण्यासारखेच. परंतु सरकारला यातील विसंवाद लक्षात आला नाही वा येऊनही त्याकडे सरकारने दुर्लक्ष केले. कारण काहीही असो. इतका वादग्रस्त निर्णय न्यायालयीन लढाईत अडकला नसता तरच नवल. व्होडाफोनने सरकारच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली आणि पुढे सर्वोच्च न्यायालयानेदेखील याप्रकरणी सरकारचे कान उपटले. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताविषयी विश्वास निर्माण व्हावा असे वाटत असेल तर कर प्रणालीत सातत्य हवे असेही सर्वोच्च न्यायालयाने सरकारला सुनावले. परंतु तरीही सरकार बधले नाही. वेगवेगळ्या मार्गानी हा करवसुलीचा मुद्दा उठतच राहिला. अशाच समांतर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने आयकर खात्याचा दावा फेटाळून लावला आणि व्होडाफोन कंपनीच्या बाजूने निर्णय देताना कंपनीवर सरकारने आकारलेला जवळपास तीन हजार कोटी रुपयांचा कर अवैध ठरवला. ही घटना गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यातील. त्या निर्णयासही आव्हान देण्याची भाषा सरकारातील काहींनी सुरुवातीला केली. परंतु अखेर सरकारला शहाणपण सुचले आणि मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय मान्य करण्याचे सरकारने ठरवले.
या विषयावर एक चांगला अग्रलेख लोकसत्ताने लिहून सरकारची भूमिका अत्यंत योग्य ठरविली होती (जुलमाचे शहाणपण).
शरद पवारांनी देखील 'भाजपने वोडाफोनचा कर माफ केला' अशी अत्यंत चुकीची टीका केली होती. आश्चर्य म्हणजे दुसर्याच दिवशी दैनिक सकाळने देखील याच विषयावर अग्रलेख लिहून सरकारची भूमिका योग्य ठरविली होती.
जरा वाचन वाढवा म्हणजे असे गैरसमज होणार नाहीत.
>>> दिल्लीत भाजप्ने ही ३० % विज कटोती सांगितली आहेच .. विजबिल कंपण्याण्चे ऑडीट भाजप ने थांबवले आहे.
पुन्हा एकदा अपप्रचार. ऑडीटच्या निर्णयाविरूद्ध वीज कंपन्याच नायालयात गेल्या होत्या. तेव्हा भाजप सत्तेवर नसून काँग्रेस सत्तेवर होती.
>>> सीसीटीव्ही कॅमेरा शहरात का असु नये असे वापणास वाटते ? सेक्युरीटी साठी होणाअरा हा खर्च काय फक्त आप लाच फायद्याचा आहे काय ? संपुर्णा दिल्लीला फायद्याचा आहे. जर ते निट पैश्याअभावी राज्य चालवु शकले नाही तर ते बघतील या घोषणेचे.. पण भाजप प्रमाणे कहावत होती असे ते म्हणणार नाही अशी मनोमन खात्री वाटते
सीसीटीव्ही असावेत ना. पण अवास्तव आश्वासने कशाला? दिल्लीत १५ लाख सीसीटीव्ही बसविण्याचा खर्च कोण करणार? शेवटी केंद्राचीच मदत लागणार ना? मग आम्ही यँव करू, आम्ही त्यॅव करू ही थापेबाजी कशाला?
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Sat, 02/07/2015 - 18:28
नवीन
हे अवास्तव अश्वासन आपल्याला वाटते आहे, मला किंवा इतर काही लोकांने ते अवास्तव वाटत नाही. आणि तो खर्च कोठुन करणार ते कळेलच. की दिल्लीची अर्थ व्यव्स्थापण फक्त भाजप आणि कॉन्ग्रेस लाच माहिती आहे ?
केंद्राची मदत शेवटी लागणार म्हण्जे फक्त पैश्यासाठी नाही तर काही निर्णय बरोबरीने घ्यावे लागतीलच.. आणि भाजप ने ते केले नाहि तर केंद्रात ही काही वर्षांनी पुन्हा निवडनुक होयील तेंन्व्हा लोक मुल्यांपण करतीलच.
भाजप्णे ३० % विज कटोती चे अश्वासन दिलेले आहे निवडनुकी पुर्वी मान्य नसेल तर शोधुन द्यावे लागेल तुम्हाला नेट वर.
राहता राहिला प्रश्न कंपण्याच ऑडीट करण्या विरोधार कोर्टात गेल्या होत्या .. का ?
ऑडिट केल्याने त्यांचे काय नुकसान होते का ? ऑडीट करु नये का ? ..
व्होडापण बद्दल ची कर माफी बद्दल मला जास्त माहिती नसल्याने आपला रिप्लाय वाचुन द्नान वाढवतो आहे, तो मुद्दा मागे घेतो .परंतु सांगण्याचा मुद्दा हा आहे की अश्वासने .. खैरात भाजप पण करते. त्यामुळॅ दुसर्यांकडे फकत प्रशनार्थक नजरेने बघु नये
- Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर
Sat, 02/07/2015 - 10:28
नवीन
बीजेपी - भारतीय जुमलेबाज पार्टी *lol* *LOL*
- Log in or register to post comments
प
प्रतापराव
Sat, 02/07/2015 - 08:58
नवीन
आप विजेची बिल कमी करेल असे बोलताय ह्यात झाला तर सर्वसामान्य लोकांचा फायदाच आहे.जेची बिलं कमी केली तर तिजोरीवर ताण पडेल असं आपल्याला वाटतं ना. पण आपल्या कल्पनेपेक्षा प्रचंड जास्त पैसा ह्या खादी नेत्यांच्या दिमतीत आणि भ्रष्टाचारात खर्च होतो. तो वाचवला तर सबसिडीज देणं शक्य आहे.
मोदी म्हणतात, "मैं किसी को कुछ भी मुफ्त नहीं दूंगा, बल्कि इतने रोजगार तैय्यर करूंगा की मुफ्त लेने की जरूरत ही ना पडें"
अशी वाक्ये कानाला ऐकायला फार गोडगोड वाटतात. पण खरंच घडतात का?
बातम्या काही वेगळंच सांगतात. Jobless growth in Gujarat असा सर्च टाकला तर ढीगभर आर्टिकल्स मिळतील.
Hemantkumar Shah, an academician considered close to the Sangh ideology, says Gujarat is a classic example of jobless growth. "There has been a decline in growth rates of employment in the decade 2001-2011," he says, arguing that the state government's claim of eight lakh jobless people in Gujarat is not accurate. "There are about 16 lakh unemployed youth, double than what is on record. Data obtained from statistical department suggests that." The annual rate of growth of employment in Gujarat was 2.4% during 1999-00 - 2004-05 (2.89% in India), and it fell to 1.3% during 2004-05 to 2009-10 (1.48% in India).
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sat, 02/07/2015 - 09:05
नवीन
ही 'जॉबलेस ग्रोथ' आहे का 'ग्रोथ विथ लेसर जॉब्ज' आहे? संगणकाचा जितका वापर वाढेल तितकी मॅनपॉवर रिक्वायरमेंट कमी होणारच. भारतात सगळ्या राज्यात हीच परिस्थिती असणार.
- Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर
Sat, 02/07/2015 - 09:10
नवीन
बाकी संगणक आल्याने बेरोजगारी वाढेल तेंवा देशात संगणक येऊ देऊ नका अशी मागणी 'द्रष्टे ' नेते प्रमोद महाजन यांनी तेन्वाच राजीव गांधी कडे केलेली . पण या नतद्रष्ट खान्ग्रेसी लोकांना अक्कल च नाही . आता बर्या बोलाने हि संगणक क्रांती मागे ढकलून पुन्हा सगळी काम हाताने सुरु करू . कस ?*lol* *LOL*
- Log in or register to post comments
प
प्रतापराव
Sat, 02/07/2015 - 09:13
नवीन
इथे बरेच जन असे म्हणत आहेत कि आप हा आंदोलकी पक्ष आहे त्यांच्याकडे काही इकॉनॉमिक/इंडस्ट्रीयल पॉलिसी नाही. ते जर निवडून आले तर पुढे काय होणार ते राज्यकारभार कसा करणार?......
भाजपा किंवा काँग्रेसला समर्थन देणार्या किती जणांना त्या पक्षांची इकॉनॉमिक/इंडस्ट्रीयल पॉलिसी काय आहे ते माहीत आहे? भाजपाने FDI च्या निमिताने इकॉनॉमिक पॉलिसीमध्ये घेतलेला एक मोठ्ठा यु-टर्न मी बघितला. असं असेल तर काय अर्थ आहे पॉलिसी असूना आणि नसून?
FDI चांगलं की वाईट ह्यावर प्रत्येक नागरिकाला सखोल ज्ञान असणं शक्य नाही. पण एक गोष्ट नक्कीच खटकतेय की निवडणूकीपूर्वी ४६% FDI च्या विरूद्ध निदर्शने करणारे लोक सत्तेत आल्यावर १००% FDI आणणार म्हणतात. काय कारण असावं ह्यामागे?
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Sat, 02/07/2015 - 09:40
नवीन
आता पुर्न रिसल इस्टेट मध्ये FDI येणार आहे. त्यामुळे भविष्यात येथील छोट्या बिल्डरांचे पण दिवस येतेहेल छोट्या दुकानदारांसारल्हेच होईल.
FDI ला विरोध हा कॉन्ग्रेस ला विरोध होता. यांनी सत्तेत आल्यावर वेगळॅ काहे केले नाही
- Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर
Sat, 02/07/2015 - 09:15
नवीन
अणु करार , परकीय गुंतवणूक यावर त्यांनी असेच यु टर्न घेतले आहेत
- Log in or register to post comments
न
नांदेडीअन
Sat, 02/07/2015 - 09:28
नवीन
U-Turn बद्दल तर बोलूच नका.
भाजपने पहिल्या १०० दिवसात घेतलेल्या ४१ U-Turns च्या बातम्या एकत्रीत करून एक पोस्ट टाकला होता मी फेसबुकवर.
आणि त्यात गेल्या ४ महिन्यात घेतलेल्या U-Turns चा समावेश नाहीये.
लिस्ट अपडेट करावी लागेल.
- Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर
Sat, 02/07/2015 - 10:19
नवीन
इथे पण टाका ती लिस्ट . कस आहे इथल्या आंधळ्या भक्ताना दुसर्या पक्षाना प्रश्न विचारताना लई मजा येते . जरा उत्तर पण देण्याची कसरत करू द्या . बाकी ज्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष च स्वातःच्या राज्यातून तडीपार आहे त्या पक्षाच्या आंधळ्या समर्थकांना इतराना प्रश्न विचारताना लाज तरी कशी वाटत नाही ?
- Log in or register to post comments
प
प्रतापराव
Sat, 02/07/2015 - 09:38
नवीन
लोकसभेत मी भाजपला मत दिले होते पण परंतु आता माझे असे मत होत चाललेय कि भाजपा नि कॉंग्रेस हे राजकारणाचा वापर हा फक्त सत्तेसाठी करतात त्यांना सत्तेवर राहणे महत्वाचे असते. ते स्थिर सरकार देतात परंतु ह्या स्थिर पणाच्या काळात अनेक प्रकरण घडतात. ह्या सरकारांपेक्षा ४९ दिवसाचे पण लोकांचे काम करणारे सरकार असणे महत्वाचे असे वाटू लागलेय.Political stability is not necessarily an essential pre-requisite item for good economic growth. In actual practice, it is the other way around as it can be argued, that it is good economic growth, that essentially leads to political stability.
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Sat, 02/07/2015 - 09:44
नवीन
बरोबर .
मिटर बनवणारेच आता ठेकेदार असतील तर कसली विज कंपण्यांचे ऑडीट आणि कसले काय ? किरण बेदी किती काअम करु शकतील हे आत्ताच्या प्रचारावरुनच दिसते आहे. प्रचार नक्की मोदिंचा आहे की किरण बेदिंचा हेच जाहिरातीतुन कळत नाही.
४९ दिवसात , १००० करोड टॅक्स आप ने गोळा केला आधी आणि नंतर येव्हडा झाला नाही येव्हड्या कमी पिरिअड मध्ये.
आणि किती दिवस त्यांचेच ऐकायचे.
मला तर वयक्त्रीक रित्या बिल्डर .. ओद्योगीकरण याकडे राझ्यसरकारणे झुकते माप दिलेली बरोबर वाटत नाही. त्यांचय साठी सर्व कर असे करु न तसे.. हे चुकीचे आहे.
कॉन्ग्रेस तशीच आणि भाजप पण तशीच .. फक्त बोलबच्चन गिरी जास्त आहे यांकडे बस्स
- Log in or register to post comments
न
नांदेडीअन
Sat, 02/07/2015 - 09:58
नवीन
४९ दिवसात झालेली कामे.
काम करायला १ दिवससुद्धा पुरेसा आहे हो, इच्छाशक्ती पाहिजे तशी.

- Log in or register to post comments
- «
- ‹
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- ›
- »