एक वर्षानंतर . . .
१६ मे २०१४ या दिवशी भारतात इतिहासाचे एक नवे पान लिहिले गेले. स्वतंत्र भारताच्या ६७ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एका तथाकथित उजव्या विचारांच्या, प्रतिगामी व जातीयवादी पक्षाने लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळविले. त्यापूर्वीच्या ६७ वर्षांपैकी जवळपास ५४-५५ वर्षे काँग्रेसकडे सत्ता होती. उर्वरीत १२-१३ वर्षांपैकी सुमारे ६ वर्षे भाजप आघाडीचे सरकार होते व ५-६ वर्षे जनता पक्ष, जनता दल इ. वेगवेगळ्या तथाकथित मध्यममार्गी, डाव्या, निधर्मी आघाड्यांचे सरकार होते.
परंतु १६ मे २०१४ रोजी प्रथमच भारतीय जनता पक्ष या उजव्या, राष्ट्रवादी, जातीयवादी इ. तथाकथित विशेषणांनी नटलेल्या पक्षाने संपूर्ण बहुमत मिळवून इतिहास घडविला. भाजपला बहुमत मिळण्यास मुख्य २ गोष्टी कारणीभूत होत्या. त्या म्हणजे, (१) २००४-२०१४ या कालखंडातील भ्रष्टाचारात नखशिखान्त बुडलेले व अत्यंत निष्क्रीय असलेले व सर्व आघाड्यांवर पूर्ण अपयशी ठरलेले काँग्रेसचे सरकार आणि (२) भाजपकडे असलेले नरेंद्र मोदींचे अत्यंत प्रभावी व आक्रमक नेतृत्व. अत्यंत झंझावाती प्रचार करून मोदींनी काँग्रेसवर घणाघाती टीका करून जनमत आपल्या बाजूला वळवून भाजपला इतिहासात प्रथमच स्पष्ट बहुमत मिळवून दिले व जेमतेम ४४ जागा मिळून काँग्रेसचा अक्षरशः पालापाचोळा झाला.
मोदींनी २६ मे २०१४ या दिवशी पंतप्रधानपदाची शपथ घेताना सार्क समूहातील सर्व राष्ट्रप्रमुखांना सोहळ्यासाठी निमंत्रित करून एक अत्यंत वेगळा पायंडा पाडून आपले पररष्ट्र धोरण कसे वेगळे असणार आहे याची चुणू़क दाखविली.
एक वर्षानंतर परिस्थितीत कोणते चांगलेवाईट बदल झाले, भारताला किती फायदातोटा झाला, देशाच्या आर्थिक/राजकीय/सामाजिक्/संरक्षण/परराष्ट्र धोरण इ. क्षेत्रात कोणते बरेवाईट बदल झाले याचा संक्षिप्त स्वरूपात आढावा या लेखाद्वारे घेत आहे.
मोदी सरकारच्या सुदैवाने आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे भाव कमी झाल्यामुळे भारतातही भाव कमी झाले. त्यामुळे महागाईचा दर कमी झाला आहे. त्यामुळे आयातीवरील खर्च देखील कमी झाला आहे.
जीडीपी वाढ २०१३-१४ या वर्षात ६.९ % टक्के होती. २०१४-१५ मध्ये हाच आकडा ७.४% आहे.
महागाई निर्देशांक २०१३-१४ या वर्षात ८ % हून अधिक होता. २०१४-१५ मध्ये हाच आकडा ५ % च्या खाली आला आहे.
आर्थिक विषयात मोदी सरकारला १० पैकी ६ गुण.
आर्थिक
विमा क्षेत्रातील परकीय गुंतवणूक-मर्यादेत वाढ, संरक्षण क्षेत्रात परकीय कंपन्यांना गुंतवणुकीची संधी, खाण उत्खनन कायद्यात आमूलाग्र बदल, रेल्वेसारख्या महाप्रचंड खात्यात खाजगी गुंतवणुकीला मुभा, राज्य सरकारांना अधिक निधी, अमेरिकेबरोबर अणुऊर्जा करार, कोळसा खाण उत्खननाचे आणि दूरसंचार तरंगलहरींचे लिलाव, चलनवाढीला अटकाव आणि मुख्य म्हणजे भ्रष्टाचारावर नियंत्रण ही या सरकारची प्रमुख वैशिष्ट्ये सांगता येतील. २०१३-१४ हे आर्थिक वर्ष संपताना भारताकडे ३०४ अब्ज डॉलर्सचा परकीय चलनाचा साठा होता. २०१४-१५ हे आर्थिक वर्ष संपताना भारताकडे ३४१ डॉलर्सचा परकीय चलनाचा साठा होता. एका वर्षात परकीय चलनाची गंगाजळी १२% टक्क्यांनी वाढली. औद्योगिक उत्पादनात २०१३-१४ मध्ये ४.२% ची वाढ झाली होती. हीच वाढ २०१४-१५ या वर्षात ५% टक्के इतकी आहे. आयातीत २०१४-१५ मध्ये २०१३-१४ च्या तुलनेत ०.५ % टक्क्यांची घट झाली आहे, तर निर्यातीत २०१४-१५ मध्ये २०१३-१४ च्या तुलनेत २.० % टक्क्यांची घट झाली आहे भारताची अणु उर्जा क्षमता २०१३-१४ मध्ये ४,७८० मेगॅवॅट्स इतकी होती. २०१४-१५ मध्ये हीच क्षमता ५,७८० मेगॅवॅट्स इतकी झाली आहे. यात एकूण २१ % वाढ झालेली आहे. २०१४-१५ या वर्षात जीडीपी वाढीचा दर ७.४ % होता, शेती उत्पन्न वाढीचा दर १.१ % होता, कोळसा उत्पादन ८.२ % इतके वाढले. वीज उत्पादन - २०१३-१४ च्या तुलनेत २०१४-१५ मध्ये वीज उत्पादनात १०% वाढ झाली. थकीत कर्जे - सार्वजनिक बँकांच्या थकीत कर्जात २०१३-१४ च्या तुलनेत २०१४-१५ मध्ये वीज उत्पादनात १७% वाढ झाली. ब्रिक्स राष्ट्रप्रमुखांच्या भेटीत मोदींनी ब्रिक्स बँकेची अभिनव कल्पना मांडली. ब्रिक्स बॅंक सुरू होऊन बॅकेचे सुरवातीचे अध्यक्षपद भारताकडे आले आहे. मनमोहन सरकारने २-जी तरंगलहरी आणि कोळसा खाणी वाटप करताना देशाचे तब्बल ३ लाख कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान केले होते. या दोन्ही प्रकरणात प्रचंड भ्रष्टाचार झाला होता. न्यायालयाने २०४ कोळसा खाणींचे व २-जी तरंगलहरींचे वाटप रद्द करून लिलाव पद्धतीने त्यांचे वाटप करण्याचा आदेश दिला होता. गेल्या वर्षभरात ४० कोळसा खाणी व २-जी तरंगलहरी वाटपासाठी लिलाव केल्यामुळे देशाच्या तिजोरीत तब्बल २ लाख कोटींहून अधिक रक्कम जमा होणार आहे. उर्वरीत १६०+ खाणींच्या लिलावानंतर हीच रक्कम १५ लाख कोटींहून अधिक होण्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे या लिलावात सुरवातीपासूनच संपूर्ण पारदर्शकता आणलेली आहे. थेट परकीय गुंतवणूक २०१३-१४ या वर्षात २०.८ अब्ज डॉलर्स होती. २०१४-१५ या वर्षाच्या पहिल्या ११ महिन्यात हीच गुंतवणूक २८.८ अब्ज डॉलर्स आहे. जनधन या नवीन योजनेंतर्गत नवीन १५ कोटी बँक खाती उघडण्यात आली आहेत. अनेक नागरिकांनी आयुष्यात पहिल्यांदाच स्वतःच्या नावाचे बँक खाते उघडले आहे. प्रतिवर्ष फक्त १२ रूपये भरून २ लाखांचा अपघात विमा देण्याची केंद्र सरकारची नवीन योजना प्रचंड यशस्वी ठरली आहे. योजना सुरू केल्यापासून पहिल्या ९ दिवसातच ५.५७ कोटी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. नागरिकांना मोफत गोष्टी देण्याचे पूर्वीच्या सरकारचे धोरण बदलून अल्प खर्चात नागरिकांच्या सहभागाने योजना सुरु करण्याची ही कल्पना अभिनव आहे. ५० वर्षाखालील नागरिकांना प्रतिवर्ष ३३० रूपये भरून जीवनविमा देण्याची अभिनव योजना देखील यशस्वी ठरली आहे. ही योजना सुरू झाल्यापासून पहिल्या १८ दिवसांतच १.७४ कोटी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे दिल्या जाणार्या शेतकर्यांच्या नुकसानभरपाईच्या अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. ५०% किंवा अधिक नुकसान असल्यासच भरपाई देण्याची पूर्वीची अट बदलून आता ३३% नुकसान असले तरी भरपाई देण्यात येईल. तसेच भरपाईची रक्कम दीडपट करण्यात आली आहे.
मोदी सरकारच्या सुदैवाने आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे भाव कमी झाल्यामुळे भारतातही भाव कमी झाले. त्यामुळे महागाईचा दर कमी झाला आहे. त्यामुळे आयातीवरील खर्च देखील कमी झाला आहे.
जीडीपी वाढ २०१३-१४ या वर्षात ६.९ % टक्के होती. २०१४-१५ मध्ये हाच आकडा ७.४% आहे.
महागाई निर्देशांक २०१३-१४ या वर्षात ८ % हून अधिक होता. २०१४-१५ मध्ये हाच आकडा ५ % च्या खाली आला आहे.
आर्थिक विषयात मोदी सरकारला १० पैकी ६ गुण.
संरक्षण व परराष्ट्र धोरण
आपल्या शपथविधीला मोदींनी सार्क समूहातील सर्व राष्ट्रप्रमुखांना बोलावून एक नवीन पायंडा पाडला. सार्क समूहातील भारत हा सर्वात मोठा देश. सार्क हे एक कुटुंब मानले तर भारताचे स्थान सर्वात मोठ्या भावाचे. एखाद्या देशमुखाच्या घरातील लग्नाला पंचक्रोशीतील सर्व गावाच्या पाटलांनी उपस्थित रहावे व देशमुखांचे स्थान मान्य करावे अशा स्वरूपाचा हा पायंडा होता. त्यानंतर लगेचच मोदींनी भूतानला व श्रीलंकेला भेट देऊन शेजारी राष्ट्रांशी संबंध वाढविण्यावर भर दिला. मोदींच्या प्रयत्नामुळे श्रीलंकेत फाशीची शिक्षा झालेल्या तामिळनाडूतील ५ कोळ्यांना श्रीलंकेने मुक्त करून भारतात परत पाठवून दिले. काही वर्षांपूर्वी मोदींनी चीनला भेट देऊन तस्करीच्या आरोपावरून तेथील तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या २१ पैकी ११ गुजराती व्यापार्यांना सोडवून आणण्याची यशस्वी शिष्टाई केली होती. मागील महिन्यात नेपाळमध्ये जबरदस्त भूकंप झाला. भारत सरकारने अत्यंत तातडीने नेपाळला मदत पाठवून दिलासा दिला. काही महिन्यांपूर्वी मालदीवमध्ये अचानक पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असताना भारत सरकारने तातडीने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला. येमेन व इराकमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे अनेक भारतीय अडकून पडले होते. भारताने ही परिस्थिती युद्धजन्य पातळीवर हाताळून बहुसंख्य भारतीयांना सुखरूप परत आणले. एवढेच नव्हे तर येमेन मध्ये अडकलेल्या ४१ देशांच्या ९०० हून अधिक नागरिकांना भारताने सुखरूप बाहेर काढले. अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या फादर प्रेम यांना सरकारने सुखरूप भारतात परत येण्यास मदत केली. गतवर्षी सप्टेंबरमध्ये काश्मिरमध्ये भयानक पूर आलेला असताना केंद्र सरकारने तातडीने लष्कराच्या मदतीने नागरिकांना मदत केली होती. मोदी सरकारचे वैशिष्ट्य हे आहे की हे सरकार सर्वत्र व्हिजिबल आहे. पूर्वीच्या मनमोहन सिंग सरकारचे कोठेही अस्तित्व जाणवत नव्हते. मात्र या सरकारचे सर्व क्षेत्रात ठळक व सकारात्मक अस्तित्व दिसत आहे. गेल्या वर्षात अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगला इ. देशातील ४ हजारहून अधिक हिंदू नागरिकांना भारताचे नागरिकत्व देण्यात आले आहे. यापूर्वीच्या वर्षात हाच आकडा १ हजारहून कमी होता. या देशात हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अन्याय होत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. भारत हा त्यांचा एकमेव आधार आहे. पूर्वीच्या सरकारने त्यांच्या बाबतीत आस्ते कदम धोरण ठेवले होते. या सरकारने मात्र त्यांना दिलासा दिला आहे. मोदी फ्रान्स दौर्यावर गेले असताना त्यांनी फ्रान्सबरोबर राफेल या आधुनिक लढाऊ विमानांच्या खरेदीचा करार केला. गेली अनेक वर्षे हा करार प्रलंबित होता. जुलै-ऑगस्ट २०१४ मध्ये सीमेवरील पाकिस्तानी सैन्याने नेहमीप्रमाणे अचानक गोळीबार सुरू केला. त्यात सीमाभागातील काही नागरिक मृत्युमुखी पडले. पाकिस्तान काही महिन्यांच्या अंतराने नियमितपणे असा गोळीबार करून नागरिकांचे प्राण घेत असते. या गोळीबाराविरूद्ध भारताची प्रतिक्रिया म्हणजे निषेधाचा खलिता पाठविणे. यावेळी प्रथमच भारतीय लष्कराला प्रतिगोळीबार करण्याची मुभा मिळाली. पाकिस्तानने गोळीबार सुरू केल्यावर प्रथमच भारतीय सैन्याने उलट गोळीबार करून जोरदार प्रत्त्युत्तर दिले ज्यात काही पाकिस्तानी सैनिक व नागरिक मरण पावले. भारताच्या जोरदार प्रतिकारामुळे आश्चर्यचकीत झालेल्या पाकिस्तानी लष्कराने गोळीबार थांबविला. त्यानंतर आजतगायत पाकिस्तानकडून विनाकारण गोळीबार होण्याचे प्रकार घडलेले नाहीत. ऑगस्टमध्ये भारत-पाकिस्तानची सचिव पातळीवर चर्चा होणार होती. परंतु चर्चेच्या काही दिवस आधी पाकिस्तानी राजदूताने हुरियतच्या फुटिरतावादी नेत्यांची भेट घेतल्याने भारताने तातडीने चर्चा रद्द करून एकाच वेळी भारताशी व फुटीरतावाद्यांशी चर्चा होऊ शकत नाही असा पाकिस्तानला जोरदार इशारा दिला. मोदींनी नुकतीच चीनला भेट दिली. ही भेट चीनच्या भूमीवरून चीनला स्पष्ट शब्दात इशारा दिल्यामुळे गाजली. इंडिया-टुडे या साप्ताहिकाने या इशार्याबद्दल असे म्हटले आहे. "In Modi, India has a PM who can look China in the eye". याच लेखात पुढील वाक्ये आहेत. Prime Minister Narendra Modi's recent visit to China will be remembered for will be his plain-speaking. And it is by no means a small achievement. For years, Indian political leaders have gone to China and said what the Chinese wanted to hear. Modi changed all that when he openly "stressed the need for China to reconsider its approach on some of the issues that hold us back from realising full potential of our partnership" and suggested that "China should take a strategic and long-term view of our relations". In his speech at the Tsinghua University too, Modi went beyond the rhetorical flourishes of Sino-Indian cooperation and pointed out the need to resolve the border dispute and in the interim, clarify the Line of Actual Control to "ensure that our relationships with other countries do not become a source of concern for each other". This is a significant shift in India's traditional defensiveness vis-a-vis China and should put the relationship on a firmer footing. चिनार यांचा ह्या सविस्तर प्रतिसादात भारताच्या परराष्ट्र धोरणांचे ठळक मुद्दे आलेले आहेत. २ वर्षांपूर्वी केदारनाथ येथील प्रलयात शेकडो भाविक मृत्युमुखी पडले होते. तत्कालीन राज्य सरकार ती परिस्थिती नीट हाताळू शकले नव्हते. त्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षात भारताने भारतात व विदेशात अशी परिस्थिती अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळली आहे. २००८ मध्ये अमेरिकेबरोबर अणुकरार झाल्यानंतर पुढे फारसे काही झाले नव्हते. मोदींनी आपल्या पहिल्या वर्षात ऑस्ट्रेलिया व कॅनडाला भेट देऊन युरेनियम पुरवठ्याबद्दल यशस्वी बोलणी केली. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेवर अजित डोवाल या अत्यंत कार्यक्षम अधिकार्याला आणण्यात आले आहे. "संरक्षण व परराष्ट्र धोरण" या विषयात मोदी सरकारला १० पैकी ८ गुण.भ्रष्टाचार निर्मूलन
गेल्या १ वर्षात एकही मोठा घोटाळा झालेला नाही हे या सरकारचे मोठे यश आहे. युपीएची १० वर्षांची कारकीर्द म्हणजे उच्चपदस्थांचा प्रचंड भ्रष्टाचार होता. युपीएतील अनेक मंत्री भ्रष्टाचारात गुंतलेले होते व त्यातून देशाचे प्रचंड नुकसान झाले. मनमोहन सिंग मूक राहून अप्रत्यक्षरित्या भ्रष्टाचाराला प्रोत्साहनच देत होते. मोदींच्या कारकीर्दीत याला लगाम बसलेला दिसत आहे. 'मी भ्रष्टाचार करणार नाही व कोणाला करून देणार नाही' हे त्यांचे वचन पहिल्या वर्षात तरी सत्य झालेले दिसत आहे. मात्र भ्रष्टाचार्यांवरील कायदेशीर कारवाई मात्र पुरेशा वेगाने सुरू नाही. वड्राला खिरापतीसारख्या वाटलेल्या हरयाना व राजस्थानमधील जमिनी काढून घेण्यात आल्या. हरयानाने नुकतीच या जमीन व्यवहारांची चौकशी सुरू केली आहे. परंतु हे आधीच व्हायला हवे होते. महाराष्ट्रात छगन व समीर भुजबळांची चौकशी सुरू झाली आहे. आता तटकरे व अजित पवारांना समन्स गेले आहे. परंतु ही कारवाई अधिक वेगाने होणे अपेक्षित आहे. कोळसा घोटाळ्यातील जिंदाल व इतर काही नेत्यांवर व अधिकार्यांवर खटला दाखल झालेला आहे. मनमोहन सिंगांना देखील समन्स पाठविण्यात आले. "आपण न्यायालयात जाऊन आपले निर्दोषत्व सिद्ध करू" असे माध्यमांसमोर सांगणार्या सिंगांनी प्रत्यक्षात सर्वोच्च न्यायालयात जाऊन समन्सला स्थगिती मिळवून चौकशी दूर पळण्याचाच प्रयत्न केला आहे. देशाबाहेरील काळा पैसा भारतात आणण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. काळ्या पैशाला प्रतिबंध करण्यासाठी एक नवीन कायदा करण्यात आला आहे. "भ्रष्टाचार निर्मूलन" या विषयात मोदी सरकारला १० पैकी ७ गुण.राजकीय
लोकसभा निवडणुकीनंतर भाजपची घोडदौड सुरूच राहिली. हरयाना व झारखंडमध्ये स्पष्ट बहुमत मिळवून भाजपने सत्ता स्थापन केली. महाराष्ट्रात शिवसेनेचे ओढणे उतरवून स्वबळावर बहुमताच्या जवळ पक्ष पोहोचला. जम्मू-काश्मिरमध्ये प्रथमच भाजपने तब्बल २५ जागा मिळवून दुसरा क्रमांक मिळविला. दिल्लीत मात्र पक्षाचा दारूण पराभव झाला. आता लवकरच बिहार विधानसभेची निवडणुक आहे. त्यापाठोपाठ मे २०१६ मध्ये तामिळनाडू, केरळ, पाँडीचेरी, प. बंगाल व आसामची निवडणुक आहे. या राज्यात भाजपची परिस्थिती पूर्वीच्या तुलनेत नक्कीच सुधारली असेल. महाराष्ट्रात भाजपने अत्यंत चातुर्याने शिवसेनेला आपली जागा दाखवून देऊन युतीतला मोठा भाऊ कोण हे दाखवून दिले. महाराष्ट्रात ब्राह्मण, हरयानात जाट नसलेला व झारखंड मध्ये आदिवासी नसलेला मुख्यमंत्री देऊन जातीवर राजकारण होणार्या या राज्यात एक वेगळा पायंडा पाडला. जम्मू-काश्मिरमध्ये पीडीपी या पूर्ण वेगळी विचारसरणी असलेल्या पक्षाबरोबर सरकार स्थापन करून भाजपने एक वेगळाच प्रयोग केलेला आहे. यात भाजपकडे उपमुख्यमंत्रीपद, काही मंत्रीपदे व सभापतीपद आले आहे. पूर्वीच्या नॅकॉ-काँग्रेस सरकारने फुटिरतवादी मसर्रत आलमची स्थानबद्धता न वाढवता त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा केला होता. त्यामुळे तो सुटला. सुटल्यावर लगेचच त्याने भारतविरोधी कारवाया सुरू केल्यावर त्याच्यावर लगेचच कारवाई करण्यास पीडीपीची तयारी नव्हती. परंतु केंद्राच्या दबावानंतर त्याला पुन्हा स्थानबद्द करण्यात आले. हा एक नवीन प्रयोग आहे. हा प्रयोग कितपत यशस्वी/अयशस्वी होईल ते काही काळानंतर कळेलच. परंतु पीडीपी सारख्या फुटिरतावादी पक्षावर केंद्राच्या व राज्यातील भाजप सरकारच्या माध्यमातून दबाव ठेवण्यास या प्रयोगाचा उपयोग होऊ शकेल असं आतातरी वाटतंय. दिल्लीत मात्र भाजपचा सुपडा साफ झाला. अत्यंत अवास्तव व अव्यावहारीक आश्वासने देऊन 'आआप'ने सत्ता मिळविली. प्रचंड बहुमत पाठीशी असूनसुद्धा केजरीवालांचा नाटकीपणा, पोरकटपणा, हेकेखोरपणा, हुकूमशाही वृत्ती अजिबात कमी झालेला नाही. त्यांचे विदूषकी चाळे अजूनही सुरुच आहेत. त्यांच्या नाटकापायी एका शेतकर्याचा फास लागून जीव गेला. केंद्राबरोबर ते कायम संघर्षाच्या पवित्र्यात आहेत. एकंदरीत त्यांच्या मर्कटलीलांमुळे दिल्लीची जनता भरडली जाईल हे निश्चित. सप्टेंबर-ऑक्टोबर २०१५ मध्ये बिहार विधानसभेची निवडणुक होणार आहे. सध्या जनता दलाच्या अनेक तुकड्यांच्या विलिनीकरणाची चर्चा आहे. मागील वर्षी बिहारमध्ये झालेल्या १० विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकीसाठी राजद, संजद व काँग्रेस ने युती करून १० पैकी ६ जागा जिंकल्या होत्या. परंतु प्रत्यक्ष विधानसभा निवडणुकीसाठी अशी युती प्रत्यक्षात येणे अवघड आहे. राजद व संजद या दोन्ही पक्षांना मुख्यमंत्रीपद हवे असल्याने दोन्ही पक्ष २४३ पैकी जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घ्यायचा प्रयत्न करेल व त्या भांडणातून अशी युती प्रत्यक्षात येणार नाही. राजद व संजद वेगवेगळेच स्वतंत्र लढतील. या दोघांपै़की कोणाबरोबर शय्यासोबत करायची हा काँग्रेसपुढे यक्षप्रश्न असेल. लालू हा सोनिया गांधींचा नीलाक्षतनय असल्याने शेवटी काँग्रेस राजदचाच मळ्वट भांगात भरेल असा अंदाज आहे. भाजप चातुर्याने जीतनराम मांझीला आपल्या आघाडीत सामील करून घेईल. शेवटी राजद्+काँग्रेस, संजद, भाजप+लोकजनशक्ती+मांझी+उपेंद्र कुशवाह असे तीन गट वेगवेगळे लढतील. डावे पक्ष बहुतेक राजदबरोबर जातील. अशा स्वतंत्र लढतील भाजप आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल. नुकत्याच झालेल्या एबीपी-नेल्सन च्या सर्वेक्षणानुसार राजद्+काँग्रेस्+संजद युती झाल्यास या युतीला १२६ व भाजप आघाडीला ११२ जागा मिळतील. परंतु राजद, काँग्रेस, संजद व भाजप आघाडी स्वतंत्रपणे लढल्यास भाजप आघाडीला १२६, संजद ६४, राजद ४२ व काँग्रेस २ अशी स्थिती असेल. दिल्ली असो, उ.प्र. असो वा बिहार, काँग्रेसचे अस्तित्व संपलेले आहे. दिल्लीत भाजपला पराभूत करण्यासाठी गुपचुप आआपला मदत करणे, बिहार मध्ये राजद किंवा संजदची सेज सजविणे, उ.प्र. मध्ये मुलायम किंवा मायावतीच्या पदराखाली लपणे एवढेच काँग्रेस करू शकते. नुकत्याच झालेल्या एबीपी-नेल्सन सर्वेक्षणानुसार एक वर्षानंतर मोदींची जादू बरीचशी कायम आहे. आता निवडणुक झाल्यास एनडीए ३१७ (पूर्वी ३३६), युपीए ७३ (पूर्वी ६०) अशी परिस्थिती आहे. इतर काही वाहिन्यांनी (आयबीएन, आजतक इ.) देखील सर्वेक्षण केले. त्यांनी जागांचा अंदाज दिलेला नाही. परंतु मोदींच्या कामावर व सरकारवर बहुसंख्य जनता समाधानी असल्याचे दिसते. मे २०१६ मध्ये प.बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम व पाँडिचेरीच्या विधानसभा निवडणुका आहेत. बंगालमध्ये पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने ममता बॅनर्जी निवडून येण्याची शक्यता आहे. शारदा चिट फंड घोटाळ्याचा बंगाली जनतेवर काहीही परीणाम झालेला दिसत नाही. दुसर्या क्रमांकावर काँग्रेस असेल. तामिळनाडूत आता द्रमुकची पाळी आहे. केरळमध्ये डावे पक्ष निवडून येतील. आसाममध्ये अधांतरी विधानसभा असण्याची शक्यता आहे. या सर्व राज्यात पूर्वीच्या तुलनेत भाजपची कामगिरी सुधारलेली असेल. परंतु बहुमत मिळविण्यासाठी किंवा प्रमुख विरोधी पक्ष होण्यासाठी भाजपला अजून बराच काळ लागेल. एकंदरीत गेल्या वर्षभरात भाजपने राजकीय क्षेत्रात खूपच प्रगती केली आहे. राजकीय आघाडीवर भाजप सरकारला १० पैकी ८ गुण.सामाजिक
गेल्या वर्षभरात एकही मोठी जातीय दंगल झाली नाही. यापूर्वी २०१३ मध्ये मुजफ्फरनगरमध्ये झालेल्या जातीय दंगलीत ६० हून अधिक नागरिक मरण पावले होते. काही ठिकाणी चर्चवर ह्ल्ले झाले. काही हल्ल्यांमागे जातीय नसून पूर्ण वेगळी कारणे होती. मोदी मंत्रीमंडळातील गिरीराज सिंह, साक्षी महाराज इ. गणंगांनी काही वादग्रस्त वक्तव्ये केली. वाहिन्यांनी टीआरपी वाढविण्यासाठी त्या वक्तव्यांना प्रचंड प्रसिद्धी देऊन आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न केला. परंतु नुकत्याच झालेल्या वेगवेगळ्या वाहिन्यांच्या सर्वेक्षणानुसार अशा वक्तव्यांकडे बहुसंख्य नागरिकांनी दुर्लक्ष केलेले आहे. मोदींनी मात्र या वाचाळ मंत्र्यांच्या वक्तव्यावर सार्वजनिकरित्या मौन पाळले आहे. त्यांनी तातडीने पावले उचलून अशा मंत्र्यांना घरी बसविले पाहिजे. एकंदरीत सामाजिक जीवनात शांतता आहे. "सामाजिक" क्षेत्रासाठी या सरकारला १० पैकी ६ गुण.विरोधी पक्षांची कामगिरी
संपूर्ण वर्षात विरोधी पक्षांची कामगिरी निराशाजनक राहिली. वर्षाच्या शेवटी भूमी अधिग्रहण कायद्याच्या निमित्ताने काही विरोधी पक्ष एकत्र येताना दिसले. परंतु काही विरोधी पक्ष अजूनही काँग्रेसपासून अंतर ठेवून आहेत. काँग्रेस अजूनही गांधी घराण्याच्या पदराखालून बाहेर येण्यास तयार नाही. राहुल गांधी अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या काळात तब्बल २ महिने परदेशात वास्तव्य करून आले. आपल्या परदेश दौर्यासाठी जाब विचारला जाईल हे ओळखून परदेशातील सूटबूट सोडून झब्बापायजमा परीधान करून आल्याआल्या दुसर्या दिवसापासून घसा ताणून मोदींवर टीका करणे सुरू केले आहे. त्याच्याबरोबरीने शेतकर्यांच्या घरी जाऊन भेटण्याचे पूर्वीचे नाटकही सुरू केले आहे. ते परदेशात विपश्यना करत होते म्हणे. परदेशात जाऊन २ महिन्यात ते ३ नवीन शब्द शिकले - किसान, मजदूर, गरीब. आता त्यांच्या प्रत्येक दुसर्या वाक्यात हे ३ शब्द असतात. पूर्वी कोणत्याही प्रश्नाच्या उत्तरात ते महिला सबलीकरण, नरेगा असे शब्द उच्चारायचे. आता विषय कोणताही असला तरी किसान, मजदूर आणि गरीब हे ३ शब्द असल्याशिवाय त्यांचे वाक्य पूर्ण होत नाही. लोकसभेत संपूर्ण निष्प्रभ ठरल्यावर राज्यसभेतल्या बहुमताच्या जोरावर काँग्रेसने महत्त्वाची विधेयके अडवून धरली आहेत. परंतु काही महिन्यातच भाजप काँग्रेसला मॅनेज करून ही विधेयके पास करून घेईल हे निश्चित. महाराष्ट्रात विरोधी पक्षाची भूमिका शिवसेना पार पाडत आहे. मनसेचा अवतार समाप्त झाला आहे. काही वर्षांतच राष्ट्रवादी आणि शिवसेनाही संपुष्टात येण्याची शक्यता आहे. डाव्या पक्षांची सद्दी जवळपास संपुष्टात आली आहे. प्रकाश करातांच्या जागी येचुरी येऊनसुद्धा काहीही फरक पडणार नाही. जनता दलाचे छोटे छोटे तुकडे अस्तित्वहीन होण्याच्या मार्गावर असल्याने विलिनीकरण करून धुगधुगी टिकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. आआपची नाटके व तमाशे सुरूच आहेत. एकंदरीत विरोधी पक्षांची अवस्था दयनीय आहे. विरोधी पक्षांच्या कामगिरीला १० पैकी २ गुण. _________________________________________________________________________________ मोदी सरकारची पावलें योग्य दिशेने पडतांना दिसत आहेत. पुरेसा वेग आलेला नाही कारण लोकांना शिस्तबद्ध रीत्या कामे भराभर उरकीत जाणे हेच ठाऊक नाही. तें अंगवळणी पडण्यास बराच वेळ लागेल. कृतीपेक्षा बडबड अधिक हे ही काही मंत्र्यांच्या/ खासदारांच्या बाबतीत आढळत आहे.त्याला वेसण घालणे आवश्यक आहे. मोदी सरकारची कामगिरी समाधानकारक, विकासाभिमुख आणि प्रामाणिक अशा शब्दात वर्णन करता येईल. गत सरकारच्या नाठाळ कामगिरीच्या पार्श्वभूमीवर या सरकारची कार्यक्षमता अधिकच खुलून दिसते. _________________________________________________________________________________ एक वर्षाच्या कामगिरीसाठी मोदी सरकारला ७/१० गुण. _________________________________________________________________________________अच्छे दिन
माझी "अच्छे दिन" ची व्याख्या अशी आहे. भ्रष्टाचारमुक्त सरकार, कणखर सरकार, नवीन कल्पना घेऊन आलेले सरकार, इतरधर्मियांचे मतांसाठी लांगूलचालन न करणारे सरकार, पाकिस्तान व चीनसमोर नांगी न टाकता ताठ मानेने उभे राहिलेले सरकार, देशाला आर्थिक उन्नतीच्या मार्गावर न्यायला सुरूवात करणारे सरकार, नागरिकांच्या हिताची काळजी घेणारे सरकार ... असे सरकार सत्तेवर असेल तर अच्छे दिन येण्याची सुरूवात आहे असे मानता येईल. यापूर्वीचे सरकार हे कणाहीन व अकार्यक्षम सरकार होते. ते भ्रष्टाचारात नखशिखान्त बुडलेले होते. माझ्या मते मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून अच्छे दिन येण्याची सुरूवात झाली आहे हे नक्की! _________________________________________________________________________________तळटीप
विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर जवळपास ८ आठवडे मी मिपापासून दूर होतो (राहुल गांधीही एवढाच काळ भारतापासून दूर होते!!!). परत आल्यानंतर हा लेख लिहिला आहे. अजून बरेच मुद्दे आहेत, परंतु विस्तारभयास्तव लेख आटोपता घेतो. वाचकांनी प्रतिसाद दिले तर त्यातील योग्य त्या मुद्द्यांवर प्रतिसाद देईन. जर प्रतिसाद विषयाला धरून असेल, जर प्रतिसाद सभ्य असेल, जर प्रतिसाद योग्य त्या आकडेवारी व वस्तुस्थितीवर आधारीत असेल, तरच उत्तर देईन. जर प्रतिसाद व्यक्तिगत स्वरूपाचा असेल, जर प्रतिसाद उपहासात्मक व कुत्सित टोमणे अशा प्रकारचा असेल, जर प्रतिसाद द्वेषमूलक व पक्षपाती स्वरूपाचा असेल अशा प्रतिसादांकडे दुर्लक्ष केले जाईल. Now shoot _________________________________________________________________________________
💬 प्रतिसाद
(1265)
क
कपिलमुनी
Tue, 10/27/2015 - 12:50
नवीन
उत्तराच्या प्रतीक्षेत !
श
श्रीगुरुजी
Tue, 10/27/2015 - 18:38
नवीन
अनुदान दिल्या जाणार्या पेट्रोलियम पदार्थांमध्ये रॉकेल व स्वयंपाकाच्या गॅसचा सुद्धा समावेश होतो. अनुदानाबद्दल खालील लेख वाचा.
http://www.livemint.com/Politics/OQaYOOKMJcCNNliEV6SWTJ/India-to-spend-37-billion-on-major-subsidies-in-201516.html
खालील लेखात २०११-१२ पर्यंत दिलेल्या अनुदानाच्या रकमेचे आकडे आहेत. डाटा काहीसा जुना असला तरी त्यातून दरवर्षी किती अनुदान दिले जाते याचा अंदाज येतो.
https://data.gov.in/catalog/subsidy-provided-government-and-oil-companies-pds-sko-and-domestic-lpg
भारतातील पेट्रोलियम पदार्थ क्षेत्रे संशोधन व उत्खनन यातील अंडररिकव्हरी चा डाटा
https://data.gov.in/catalog/likely-under-recoveries-petroleum-products
पेट्रोलियम पदार्थावरील अनुदान या विषयावर बिझनेस टुडे मधील एक लेख
http://www.businesstoday.in/magazine/focus/why-oil-subsidy-bill-still-remains-massive/story/203173.html
खालील लेखात तुमच्या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे मिळतील.
https://www.iea.org/publications/freepublications/publication/petroleum_pricing.pdf
याच लेखातील काही परिच्छेद -
The Cost of ‘Effective’ Subsidies: Under-recoveries to Oil Marketing Companies
The effect of significantly lower product prices than input prices – a large „effective subsidy‟ – has been the increasing accumulation of "under-recoveries‟ by OMCs. Under-recoveries
are a notional measure representing the difference between the trade-parity cost of refined
product paid by OMCs and their realised sale price.
The key fact is that Indian domestic product prices have not risen in line with the sharp increase
in international crude prices that has occurred until recently since 2004-2005, and, as such, have placed a significant subsidy burden on OMCs.
under-recoveries have escalated alarmingly in recent years, from approximately
US$10 billion in 2006-2007 to an expected total of over US$40 billion in 2008-2009. International crude prices of over US$100/barrel between April-September 2008 were particularly damaging, leaving, according to OMCs, a significant under-recovery overhang into 2009, despite steeply falling international prices since mid-2008. The mounting burden of under-recoveries has seriously affected the operational functioning and financial health of OMCs. Between April and December 2008, India‟s three key OMCs lost between 43 per cent and 25 per cent of their total net worth – a period in which they also collectively lost over US$2.7billion.
म
मार्मिक गोडसे
Wed, 10/28/2015 - 07:41
नवीन
रॉकेल व स्वयंपाकाच्या गॅसवर सरकार कुठलेच कर लावत नाहीत का ?
.माझ्याच एका लेखावरील माझाच हा प्रतिसाद वाचला असता तर तुम्ही ह्या लेखाची लिंक दिली नसती.
गुरुजी प्रथम तुम्ही खालील गोष्टिंचा अभ्यास करा.
१) कच्च्या तेलाच्या आयातीपासून रिटेल विक्री पर्यंत इंधनावर कोणकोणते व किती प्रमाणात कर लावले जातात आणि सरकार इंधनावर अनुदान किती देते. (महसूल व अनुदानाचे प्रमाण)
२) इंपोर्ट पॅरीटी.
३) रिफायनरी मार्जीन
४) नोशनल लॉस.
५) ऑइल बाँड व राज्य सरकारांचे इंधनावरील कर.
६) तेल उत्पादक कंपन्या व OMC तोट्यात असतील तर लाभांश का देतात व केंद्र सरकार तो का घेतो? जर ह्या कंपन्या नफ्यात असतील तर हा नफा कोठून येतो?
तुम्ही जर ह्या इंधन दरवाढीचे समर्थन करत असाल तर मागील सरकारचे इंधन दरवाढीबाबतचे धोरण योग्य होते असे समजायचे का?
ह्याबाबत तुमचे काय मत आहे?
श
श्रीगुरुजी
Wed, 10/28/2015 - 08:56
नवीन
रा़ज्याने valorem कर लावायचा का नाही हा निर्णय राज्याचा असतो. केंद्र फक्त आवाहन करू शकते, बळजबरी करू शकत नाही. valorem कर राज्यांनी लावल्याने फार फरक पडणार नाही. त्यामुळे जी तूट येईल ती तूट केंद्र किंवा राज्य इतर करांचे प्रमाण वाढवून भरून काढू शकेल.
या सरकारने केलेली (किंवा झालेली) इंधन दरवाढ आणि मागील सरकारने केलेली दरवाढ यात खूप फरक आहे. मागील सरकार निवडणुक जवळ आली की तोटा होत असताना सुद्धा किंमत दरवाढ अनेक महिने रोखून धरायचे. त्यामुळे संचित तोटा वाढत जायचा. तो तोटा भरून काढण्यासाठी नंतर ते दरवाढ करायचे. या सरकारच्या काळात तसे झालेले नाही. तस्मात मागील सरकारचे इंधन दरवाढीचे धोरण फारसे योग्य नव्हते.
म
मार्मिक गोडसे
Wed, 10/28/2015 - 11:13
नवीन
बरोबर आहे,परंतू आपल्याच पक्षाचे राज्य असलेल्या राज्यांना सध्या केन्द्रात असलेल्या सरकारने तसे आवाहन केले आहे का? गोव्याचे उदाहरण देऊ नका, विषयाला फाटे फुटतील.
राज्यांच्या ad valorem करांमुळे आलेली तूट केन्द्र सरकार कोणते कर वाढवून भरून काढू शकते. अशी तूट केन्द्र सरकारने कधी भरून काढल्याची माहीती तुमच्याकडे आहे का? तुम्हाला ऑईल बाँड म्हणायचे आहे का?
तोटा? कोणता आणि कधी झाला तोटा? मग लाभांश का वाटतात ह्या कंपन्या? तोट्यातील कंपन्यांकडून केन्द्र सरकार हा लाभांश का स्विकारते ? ह्याचे उत्तर तुम्ही सोयिस्करपणे टाळले आहे.
ह्याविषयी आपले मत जाणून घ्यायला आवडेल.
त
तर्राट जोकर
Wed, 10/28/2015 - 18:10
नवीन
मार्मिकभाऊ,
अगदी अचूक पकडलात मुद्दा.... मी एवढं लिहूच शकलो नसतो. तुम्ही व्यवस्थित मांडत आहात.
गुरुजींच्या मुद्द्यांमधे दम नाही हे सरळ दिसत आहे. पण हार मानतील ते गुरुजी कसले...
श
श्रीगुरुजी
Wed, 10/28/2015 - 18:57
नवीन
मी दिलेल्या ४-५ लिंक्स नीट वाचा. सर्व माहिती मिळेल. आधीच अनेक करांच्या बोजा असलेल्या पेट्रोलियम उत्पादनांवर valorem हा अजून एक कर लावणे अयोग्य आहे. हा कर व्हॅटसारखा थेट उत्पादन विक्री किंमतीशी निगडीत असल्याने जेव्हा भाव वाढतील तेव्हा करही त्या प्रमाणात वाढेल. थोडक्यात म्हणजे आधी लावलेला एखादा कर काढायचा आणि त्याजागी नवीन कर लावायचा. यातून काहीही साध्य होणार नाही. पेट्रोलियम पदार्थ हे 'कॅश काऊ' या प्रकारातले असल्याने कोणतेही सरकार त्याचा फायदा घेणारच. परंतु त्यात स्वयंपाकाचा गॅस व रॉकेल हे थेट स्वयंपाकघराशी निगडीत असल्याने या दोन उत्पादनांच्या किंमती वाढविण्यावर प्रचंड मर्यादा आहेत. म्हणून त्याची भरपाई पेट्रोल व डिझेलमधून केली जाते.
भारतातील ३ प्रमुख तेल उत्पादक कंपन्या — Indian Oil Corporation, Bharat Petroleum Corporation and Hindustan Petroleum Corporation — लाभांश वाटल्यामुळे फायद्यात वाटतात. परंतु ते खरे नाही. कारण त्यांना अंडर रिकव्हरी व तोट्यामुळे जे नुकसान होते त्याची भरपाई (१) केंद्र सरकारकडून मिळालेले काम्पेन्सेशन (याचा भरपाईत सर्वाधिक वाटा असतो), व (२) अपस्ट्रीम कंपन्यांकडून (ओएनजीसी, गेल इंडिया, ऑईल इंडिया) तेल उत्पादन विकत घेताना मिळालेला डिस्काऊंट, यातून केली जाते. थोडक्यात सांगायचे तर तेल उत्पादक कंपन्यांचे नुकसान केंद्र सरकार व अपस्ट्रीम कंपन्या भरून काढतात. केंद्र सरकारकडून दिली जाणारी भरपाई ही करदात्यांच्या करातूनच जात असते. म्हणजे जनतेला तेल उत्पादनांवर जे अनुदान मिळते ते करदात्यांच्या (म्हणजेच तुलनेने समृद्ध जनतेच्या) करांच्या पैशातूनच मिळत असते. श्रीमंतांचा पैसा अशा रितीने अप्रत्यक्ष रित्या गरीबांकरीता वापरला जातो.
त
तर्राट जोकर
Wed, 10/28/2015 - 19:26
नवीन
तुमच्या विधानाचा सरळ अर्थ असा आहे की करदाते आधी कर भरतात, मग त्यातून इंधनावर सबसिडी देतात. म्हणजे १०० रुपयाची वस्तू असेल तर ती ७५ ला विकत घ्यायची मग ते २५ चं नुकसान भरून काढायला ते २५ रुपये दुसर्या हाताने दुकानदाराला द्यायचे. एकूण वस्तू १००लाच पडते ना?
श्रीमंतांचा पैसा गरिबांकरिता वापरणे ही लोकशाही अर्थव्यवस्थेची प्रचंड मोठी धूळफेक आहे. इथे जी जनता कर भरते तीच उपभोक्ता आहे. तिला सवलत मिळावी म्हणून तीच परत कर भरते हा उफराटा प्रकार आहे. यात रॉबीनहूडी वैगेरे काही प्रकार नाहीये.
याबद्दल सविस्तर नंतर टंकतो....
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 10/29/2015 - 06:01
नवीन
पेट्रोलियम उत्पादने सरसकट सर्वांना अनुदानित दराने दिली जातात. त्यामुळे अर्थातच तेल उत्पादक कंपन्यांना तोटा होतो. तो तोटा सरकारच भरून काढते. करदात्यांनी दिलेल्या कराच्या पैशातून तो तोटा भरून काढला जातो. जे तुलनेने श्रीमंत आहेत ते करही भरतात आणि त्यांना अनुदानही मिळते. जे तितकेसे श्रीमंत नाहीत ते कर भरत नाहीत पण त्यांना अनुदान मिळते. याचा सरळ अर्थ असा आहे जे तुलनेने श्रीमंत आहेत त्यांच्या उत्पन्नातून गरीबांना फायदे दिले जातात.
क
कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 10/29/2015 - 06:06
नवीन
अहो गुरूजी गोडसे बहुतेक तेच म्हणाले आहेत की वंचित गरीब लोक प्रत्यक्ष कर भरत नाही अप्रत्यक्ष भरतात असे काहीसे
त
तर्राट जोकर
गुरुवार, 10/29/2015 - 06:29
नवीन
माझं काय म्हणणं आहे आधी तुम्ही पेट्रोलियम उत्पादन ते वितरण याबद्दल सविस्तर माहीती मिळवून प्रतिसाद द्या ना..!
क
कैलासवासी सोन्याबापु
Wed, 10/28/2015 - 15:06
नवीन
हे तेल वालं एक्सप्लेनेशन तर तुरडाळी पेक्षा वरिष्ठ आहे राव ! पर गुरूजी नहीं मानेंगे :D :D
त
तर्राट जोकर
Wed, 10/28/2015 - 18:08
नवीन
हा हा हा! धमाल चाललीये गुरुजींची...!
"पर गुरुजी नहीं मानेंगे" वरून बाहुबलीतलं, 'ना, शिव नही मानेंगे' आठवले!
ब
बॅटमॅन
गुरुवार, 10/29/2015 - 13:11
नवीन
=)) =)) =))
म
मार्मिक गोडसे
Wed, 10/28/2015 - 19:54
नवीन
मी वाचल्या मी विचारलेल्या एकाही प्रश्नाचे त्यात उत्तर नाही.तुम्हीच नीट वाचा त्या लिंक्स. हे अनेक कर valorem प्रकारातच मोडतात. हे अयोग्य आहे असे वाटल्याने मागच्या सरकारने ते specific करावे असे सर्व राज्यांना आवाहन केले होते. तुमचेही म्हणने हेच आहे ना?
कसं बोललात.
सांगा ना हे सरकारला. खुशाल लाभांश घेतात त्यांच्याकडून.
प्रत्यक्ष करातून ही भरपाई होत असेल तर प्रत्यक्ष कराचा इतका महसूल मिळतो का सरकारला? अप्रत्य़क्ष करातून होत असेल तर गरीब हा कर भरत नाही असे म्हणायचे आहे का तुम्हाला?
माझ्या मागील एकाही प्रश्नाचे उत्तर तुम्ही दिलेले नाही.
म
मोगा
गुरुवार, 10/29/2015 - 01:19
नवीन
पेट्रोलियम पदार्थ हे 'कॅश काऊ' या प्रकारातले असल्याने कोणतेही सरकार त्याचा फायदा घेणारच
तूरडाळ हे 'कॅश काऊ' या प्रकारातले असल्याने कोणताही चतुर व्यापारी त्याचा फायदा घेणारच.
...
राजकारण हे 'कॅश काऊ' या प्रकारातले असल्याने कोणताही पक्ष त्याचा फायदा घेणारच
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 10/29/2015 - 06:06
नवीन
तेल कंपन्यांकडून सरकारने लाभांश घेणे म्हणजे वाटीतले ताटात ओतणे किंवा एका खिशातले पैसे दुसर्या खिशात टाकण्यासारखे आहे. अर्थात या लाभांशाचे लाभार्थी फक्त सरकार नसून शेअर होल्डर्स सुद्धा असतात. गरीब वा श्रीमंत यांच्यासाठी बरेचसे कर समान असतात. काही करांचा अपवाद आहे. उदा. आयकर. भारतात आयकर भरणार्यांची संख्या एकूण लोकसंख्येच्या १० टक्क्यांहून कमी आहे. मोठ्या उपाहारगृहात जेवणारे, महागड्या हॉटेलात वास्तव्य करणारे, मोठी घरे घेणारे इ. ना जास्त कर द्यावा लागतो. त्यामुळे तुलनेने समृद्ध जनतेचा करभरणा हा समृद्ध नसलेल्या जनतेच्या तुलनेत जास्तच असतो. याचाच काही वाटा पेट्रोलियम उत्पादने व इतर काही गोष्टींवर दिल्या जाणार्या अनुदानासाठी वापरला जातो.
म
मार्मिक गोडसे
गुरुवार, 10/29/2015 - 08:08
नवीन
मोघम बोलू नका.
माझ्या मागील एकाही प्रश्नाचे उत्तर तुम्ही दिलेले नाही हेही लक्षात ठेवा.
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 10/29/2015 - 16:12
नवीन
कुठे काय मोघम बोललोय? व्यवस्थित उदाहरणे आणि संदर्भ दिलेले आहेत.
तुम्ही बरेच प्रतिसाद लिहिले आहेत. मी त्यांना माझ्या अनेक प्रतिसादात व्यवस्थित उत्तर दिले आहे. माझ्या उत्तरांत तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील अशी अपेक्षा आहे. अजूनही काही प्रश्न अनुत्तरीत आहेत असे वाटत असेल तर ते प्रश्न सांगा, म्हणजे त्या प्रश्नांनाही उत्तर देईन.
म
मार्मिक गोडसे
गुरुवार, 10/29/2015 - 17:40
नवीन
१) हे तुम्हीच म्हणताय ना ? मग हे अनुदान कसं ठरतं?
.
२) खरोखरंच असं करण्याचा सरकारचा मानस आहे की तुमचा अंदाज आहे. नवीन तेलविहिरींच्या शोधासाठी खाजगी कंपन्यांनापण हा महसूल मिळणार आहे की फक्त सरकारी कंपन्यांना? नफ्यात असणार्या ह्या कंपन्यांनी सरकारकडे अशी मागणी केली आहे का?
३) वर्तमान सरकारने एका वर्षात इंधनावरील exciseचे दर ४ वेळा वाढविले, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे हे दर स्थिर नव्हते व एक वर्षात ह्या वाढीव दरामुळे केंद्र सरकारला ३०००० कोटीचा महसूल मिळाला. हा अप्रत्यक्षरीत्या वर्तमान सरकारचा इंधनाच्या दरांवर नियंत्रन ठेवण्याचाच प्रकार आहे. ह्यावर तुमचे मत काय आहे?
४) हे अनेक कर valorem प्रकारातच मोडतात. हे अयोग्य आहे असे वाटल्याने मागच्या सरकारने ते specific करावे असे सर्व राज्यांना आवाहन केले होते. परंतू आपल्याच पक्षाचे राज्य असलेल्या राज्यांना सध्या केन्द्रात असलेल्या सरकारने अशा प्रकारचे आवाहन केले आहे का?
५) प्रत्यक्ष करातून ही भरपाई होत असेल तर प्रत्यक्ष कराचा इतका महसूल मिळतो का सरकारला? अप्रत्य़क्ष करातून होत असेल तर गरीब हा कर भरत नाही असे म्हणायचे आहे का तुम्हाला?
श
श्रीगुरुजी
Fri, 10/30/2015 - 08:37
नवीन
Immediately after independence the cost realization to the oil companies in the country was linked to the ‘import parity’ type of pricing, known as the ‘Value Stock Pricing’ (VSA). This mechanism was basically a cost-plus formula to the import price, which included added elements of all the costs such as shipping charges upto the Indian ports, insurance, transit losses, import duties and other levies and charges.
The VSA was followed by the Administered Price Mechanism (APM) which actually involved artificial price fixing by the government from time to time and hike or reduction in the prices become a political decision, rather than being a rational economic decision. The decision to dismantle the APM was aimed at gradually shifting from artificial pricing of petroleum products towards a situation where the price is determined by the market forces of demand and supply.
The new mechanism was designed to partially insulate the prices of petroleum products in the country from volatile international crude oil prices. At the same time it was to ensure that the prices of certain products like kerosene and LPG remained subsidised as per the government policy.
Following is an example of diesel price build up in Delhi.
Import Crude basket price : Rs 42.67/Lit
Refinery Gate Price : Rs 43.73/Lit
OMC’s DESIRED selling price : Rs 46.07/Lit
UNDER- RECOVERIES : Rs 6.31/Lit (हेच सरकारने दिलेले अनुदान)
Price charged to dealers by OMC : Rs 46.07 -6.31 = Rs 39.76/Lit
Dealer commision : Rs 1.09
Add TAXES : Rs 9.40/Lit
FINAL Price WE pay : Rs 50.25/Lit
Govt. tells OMC's, let's say IOCL, that the Price of Rs 46.07 is too high for the people. You give it for a discount of Rs 6.31/liter, and sell it at Rs 39.76/liter.
Which means a loss of Rs 6.31/Lit for the OMC. But Govt. assures don't worry, We will reimburse the loses at the end of the year!
सरकार हे करत असतेच. हा महसूल कोणाला द्यायचा हा निर्णय सरकारचा असतो. जर खाजगी कंपन्यांना सुद्धा अनुदान द्यावे लागत असेल तर त्याची भरपाई सरकारला करावी लागणारच. मुळात अशा किती खाजगी कंपन्या आहेत? काही वर्षांपूर्वी रिलायन्सने सुरू केलेल्या पेट्रोल पंपांपैकी बहुसंख्य पंप बंद झाले आहेत. रिलायन्सचा सुरू असलेला पंप आता क्वचितच दिसतो. या क्षेत्रात बहुतांशी सरकारी कंपन्याच आहेत.
जागतिक तेल व्यापारातील भाव काही वेळा खूप दोलायमान असतात. भाव अचानक मोठ्या प्रमाणात वाढले तर ग्राहकांना तितक्या प्रमाणात फटका बसू नये म्हणून भावासाठी काहीसे कुशन ठेवलेले असते. त्यामुळे ज्या प्रमाणात जागतिक बाजारपेठेत भाव वाढतात त्या प्रमाणात भारतात भाव वाढत नाहीत. त्याचप्रमाणे ज्या प्रमाणात जागतिक बाजारपेठेत भाव घसरतात त्या प्रमाणात भारतात भाव घसरत नाहीत. पेट्रोलियम उत्पादनांचे भाव २००२ पूर्वी पर्यंत फक्त सरकार नियंत्रित करत होते. त्यामुळे वर्षातून एकदा किंवा दोनदा भाव बदलायचे (म्हणजे वाढायचे. कमी कधीच झाले नव्हते.) नंतर भाव ठरविण्याचे स्वातंत्र्य तेल वितरण कंपन्यांना देण्यात आले. त्यामुळे हे भाव दर १५ दिवसांनी जागतिक भावातील बदलानुसार कमी किंवा जास्त होऊ लागले. २००४ नंतर पुन्हा एकदा हे धोरण रद्द करण्यात येऊन सरकारने पुन्हा एकदा स्वत:च्या हातात भाव नियंत्रणाचे अधिकार घेतले. परंतु युपीए-२ च्या उत्तरार्धात पुन्हा एकदा भाव ठरविण्याचे स्वातंत्र्य तेल वितरण कंपन्यांना देण्यात आले. परंतु त्या कंपन्यांना एका ठराविक कक्षेत भाव ठरविण्याचे स्वातंत्र्य आहे. कंपन्या भाव अचानक मोठ्या प्रमाणात वाढवू शकत नाही. तसे करायचा प्रयत्न केल्यास सरकार लगेच हस्तक्षेप करते व अमर्यादीत भाव वाढीपासून ग्राहकांचे संरक्षण करते.
भारताच्या वार्षिक अंदाजपत्रकात दरवर्षी अंदाजे ४% तूट असते. ही तूट भरून काढण्यासाठी सरकार विविध मार्गांचा उपयोग करते. सेवा कराच्या क्षेत्रात अजून क्षेत्रे आणणे, आयकरावर अधिभार, सेवा कराचे दर वाढविणे, नवीन कर लावणे (पूर्वी पी चिदंबरम यांनी फ्रींज बेनिफिट कर व १०००० रु. अधिक रोख रक्कम बँकेतून काढणे यावर कर लागू केला होता तो याच कारणासाठी), अबकारी कर वाढविणे, आयात कर वाढविणे इ. उपाय सरकार योजते. पेट्रोलियम पदार्थांवर अबकारी कराचे प्रमाण वाढविणे हा महसूल वाढीसाठी केलेला उपाय आहे. पेट्रोलियम पदार्थांच्या भावावर नियंत्रण ठेवण्याचा हा प्रकार नाही.
प्रत्येक राज्याला व्हॅट ठरविण्याचे स्वातंत्र्य आहे. जर सरकारने राज्यांवर जबरदस्ती केली तर त्यातून केंद्र-राज्य संबंध असा नवा वाद निर्माण होईल. सरकार फक्त सूचना करू शकते, सूचना लादू शकत नाही. जर केंद्र सरकारने सर्व राज्यांना असे आवाहन केले असेल तर त्यात भाजपशासित राज्येही मोडतात.
गरीब व श्रीमंत विविध प्रकारचे कर भरतात. परंतु काही कर फक्त ठराविक उत्पन्न असलेले नागरिकच भरतात. उदा. आयकर. त्याव्यतिरिक्त पंचतारांकीत हॉटेलमधील वास्तव्य, तिथले उपाहारगृह अशांसारखे कर फक्त जास्त उत्पन्न असलेलेच नागरिक भरतात कारण तेच त्या सुविधा वापरतात.
म
मार्मिक गोडसे
गुरुवार, 10/29/2015 - 04:57
नवीन
त्या एका वाक्याने त्यांची अवस्था अशी झाली.....
य
याॅर्कर
गुरुवार, 10/29/2015 - 07:23
नवीन
सगळ्यांनी मस्त anylysis केलं सरकारचं.
एखादं न्यूजचॅनल सुद्धा फिके पडेल या धाग्यासमोर.
.
.
.
.
.एकापेक्षा एक प्रकांडपंडित आहेत मिपावर,अगदी भारावून गेलो.(उपरोध नव्हे सिरीयस बोलतोय)
य
याॅर्कर
गुरुवार, 10/29/2015 - 07:27
नवीन
नाहीतर शुद्धलेखनावरून अब्रूचं खोबरं करणारे ही आहेतच.
म
मोगा
गुरुवार, 10/29/2015 - 12:58
नवीन
http://m.navbharattimes.indiatimes.com/world/asian-countries/china-refuels-nepal-as-india-fails-to-deliver/articleshow/49571321.cms
नेपाल: ईंधन मामले में भारत का एकाधिकार खत्म.
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 10/29/2015 - 16:10
नवीन
विश्वबँकेने नुकत्याच जाहीर केलेल्या क्रमवारीनुसार 'नवीन व्यवसाय सुरू करण्याची सुलभता' या मुद्द्यावर भारताचा मागील वर्षी १४२ वा क्रमांक होता. तोच क्रमांक यावर्षी सुधारून १३० इतका झाला आहे.
http://www.firstpost.com/business/heres-how-nda-pushed-india-up-to-130-in-ease-of-doing-business-ranking-2485796.html
म
मार्मिक गोडसे
Fri, 10/30/2015 - 10:14
नवीन
१)
व्वा क्या बात है, असे म्हणायला सिंहाची छाती असावी लागते. आता एकदा मोठ्याने सिंहगर्जना करून सांगा हे अनुदान पॉझिटीव्ह आहे की निगेटीव्ह ? कळत नसेल तर अनुदानाचे तुनतुने वाजवत रहा.
२)
मग खाजगी कंपन्यांना सरकार अनुदान का देत नाही?
३)
छान समजावून दिले गुरुजी तुम्ही.
जेव्हा जागतीक बाजारात तेलाच्या भावात अचानक वाढ झाली तेव्हा मागील सरकारने भारतातील तेलाचे भाव वाढवले नाहीत व महसूलावर पाणी सोडले. वर्तमान सरकारने जागतीक बाजारात तेलाचे भाव कमी झाल्यावर, तेलावरील exciseचे दर ४ वेळा वाढवून महसूलही वाढवण्याचा व भारतातील तेलाचे भाव 'स्थिर' ठेवण्याचा दुहेरी पराक्रम केला
४)
मुळात असे आवाहन वर्तमान सरकारने राज्यांना केले आहे का?
५)
मग गरिबांच्या योगदानाचे महत्व कमी का लेखता?
थांबा, आता मी पंतप्रधानांना तुमचे नावच सांगतो, की गुरुजी वर्गात गाईडमध्ये बघून उत्तरे देतात म्हणून.
अहो, गुरुजी जर स्वतः नीट अभ्यास करा व आमच्या 'डाळ' भातावर घरगुती ज्ञानाचे 'नवनीत' टाका.
श
शलभ
Fri, 10/30/2015 - 10:40
नवीन
मला असं वाचलेले आठवतेय की, बीजेपी सरकार ऑईल रिजर्व करण्यासाठी प्रयत्न करतेय. त्यासाठी काही लाख कोटी रूपये लागणार आहेत. त्याच्यासाठी पण हे excise चे दर वाढवलेत. विदा पाहीजे असेल तर सर्च करून मिळेल. शोधा. :)
ऑईल रिजर्व: जी कल्पना वाजपेयी सरकार नी मांडलेली, युपीए नी बासनात गुंडाळली, आणि आता मोदी सरकार त्यावर काम करतेय.
बाकी मुद्द्यावर नो कमेंट्स. ;)
क
कैलासवासी सोन्याबापु
Fri, 10/30/2015 - 11:13
नवीन
एरवी यूपीए म्हणले की आठ्या पडतात कपाळावर पण ह्याबाबतीत जे आहे ते आहेच कारण यूपीए ने मंगलोर ला ओएनजीसी च्या अंतर्गत रिज़र्वच काम सुरु केले होते जे बहुतेक मागच्या (२०१४) ऑक्टोबर का डिसेम्बर मधे पुर्ण झाले होते, आता बहुतेक रिज़र्व भरणे सुरु असावे पण त्याचा रिटेल तेल कीमतीवर काय फरक पडतो/पडला आहे हे मला माहिती नाही तस्मात् ओवर टु एक्सपर्ट्स ऑफ़ द सब्जेक्ट एंड गुरूजी
श
श्रीगुरुजी
Fri, 10/30/2015 - 16:01
नवीन
अनुदान पॉझिटिव्ह असतं का निगेटिव्ह?
ते सरकारलाच विचारा ना.
मागील सरकारने केलेल्या 'पराक्रमाची' भरपाई नवीन सरकारला करावीच लागते. महाराष्ट्रात सुद्धा आघाडी सरकारने सरकारी कर्जाचा बोजा ३ लाख कोटी रू. वर नेऊन ठेवला आणि पूर्ण कर्जबाजारी राज्य भाजपच्या पदरात पडलं. त्यामुळे नवीन सरकारला हात राखूनच खर्च करावा लागणार.
'आवाहन' 'आवाहन' हे कसलं तुणतुणं लावलंय सुरवातीपासून! कसलं आवाहन आणि कसलं काय! हा 'आवाहन' शब्द सारखा सारखा वाचून आता बोअर व्हायला लागलंय. निदान शब्द तरी दुसरा वापरा.
समजा असे आवाहन केले असले तर काय फरक पडतो? किंवा केले नसले तर काय फरक पडतो?
तस्मात हे निरर्थक 'आवाहन' पुराण बंद करा असे मी 'आवाहन' करतो.
परत तेच. पूर्वीच लिहिलं आहे की गरीब-श्रीमंतांसाठी काही कर समान असतात. परंतु जे तुलनेने श्रीमंत असतात त्यांना इतर वेगळे कर भरावे लागतात. अभ्यासाचं म्हणाल तर कदाचित तुमच्याएवढा परीपूर्ण नसेल माझा अभ्यास, परंतु माझा अभ्यास सतत सुरू असतो. नवीन माहिती सतत येत असते आणि मी त्यानुसार स्वतःला अपडेट ठेवण्याचा प्रयत्न करीत असतो.
क
कैलासवासी सोन्याबापु
Fri, 10/30/2015 - 10:39
नवीन
जौद्या गोडसे साहेब!
एक बार जो गुरूजी ने बोल दिया फिर वो अपने आप की भी नहीं सुनते!!
म
मार्मिक गोडसे
Fri, 10/30/2015 - 11:26
नवीन
ओके बापुसाहेब, आपने बोला इस्ल्लिये जौदिया.
अ
असंका
Fri, 10/30/2015 - 14:07
नवीन
चांगलाच अभ्यास आहे आपला!
_/\_
या सगळ्या माहितीबद्दल धन्यवाद.
(रच्याकने, तुम्ही जौ दिलंत तरी गुरुजी जौ देतील असं काही वाटत नाही.)
ध
धर्मराजमुटके
Mon, 11/02/2015 - 16:01
नवीन
कल्याण डोंबिवली आणि कोल्हापूर येथील महापालिकांच्या निकालावरील जाणकारांच्या भाष्याच्या प्रतिक्षेत !
श
श्रीगुरुजी
Mon, 11/02/2015 - 16:42
नवीन
http://online5.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5462305830705376609&SectionId=28&SectionName=%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE&NewsDate=20151102&Provider=%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B6%20%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%87%20yogesh.kute@esakal.com&NewsTitle=%CE%B2%20%E0%A4%AB%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80%20%E0%A4%AA%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A5%87%20%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%20%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87..!
क
कपिलमुनी
Tue, 11/03/2015 - 17:42
नवीन
फारच विनोदी !
आता मात्र ह्या प्रकारातला गंभीरपणा संपून विनोदीपणा सुरू झालाय
श
श्रीगुरुजी
Wed, 11/04/2015 - 07:34
नवीन
हा प्रकार कधीच गंभीर नव्हता. प्रचारात आपापसांचा एकेरी उल्लेख करून पगार, लायकी वगैरे काढली गेली तेव्हाच विनोदीपणा सुरू झाला होता.
क
कैलासवासी सोन्याबापु
Mon, 11/02/2015 - 16:51
नवीन
काय मग शिजले का वरण तुरीचे सब्सिडी च्या रॉकेल वर :P
श
श्रीगुरुजी
Tue, 11/03/2015 - 15:46
नवीन
IOC reports Q2 loss of Rs. 329 crore
म
मार्मिक गोडसे
Fri, 11/06/2015 - 05:43
नवीन
ह्या माहितीचा धाग्याशी काय संबंध?
श
श्रीगुरुजी
Fri, 11/06/2015 - 09:41
नवीन
वरील अनेक प्रतिसादांशी या माहितीचा संबंध आहे.
स
सुबोध खरे
Wed, 11/04/2015 - 05:34
नवीन
किती चूक किती बरोबर ते मला माहित नाही. परंतु एक वर्ष झाल्यावर मोदी सरकारचा लेखाजोखा सर्वांसमोर मांडण्याचा प्रामाणिकपणा गुरुजी करीत आहेत हि एक नक्कीच प्रशंसनीय बाब आहे. मिपावर अशा तर्हेचा प्रयत्न दुसर्या कोणत्या सरकारच्या समर्थकांनी केल्याचे मला तरी आठवत नाही.
श
श्रीगुरुजी
Wed, 11/04/2015 - 07:35
नवीन
धन्यवाद डॉक्टरसाहेब!
न
नितीनचंद्र
Wed, 11/04/2015 - 11:56
नवीन
२०१४ मध्ये काँग्रेसने फारसे काही केले नाही म्हणुन लोकांनी त्यांना नाकारले. आता अपेक्षा इतक्या वाढल्या आहेत की त्याचे परिणाम लगेचच्या काही निवडणुकात अँटी इस्टाब्लीशमेंट म्हणुन दिसतील. असे झाले तर २०१७ चे मुल्यमापन लोक फारच क्रिटीकल करतील असे दिसते.
माझ्या मते लोकांनी अजुन ३.५ वर्षे थांबावे. इतक्या घाईने मुल्यमापनात तांत्रीक चुका मोठ्या दिसतील.
म
मोगा
Wed, 11/04/2015 - 13:35
नवीन
लोकांच्या अपेक्षा मोदी , भाजपा , संघ आणि मित्रपक्षानी वाढवल्या.
म
मार्मिक गोडसे
Sat, 11/07/2015 - 13:41
नवीन
No hike in petrol, diesel prices despite higher excise duty
म
मोगा
Sat, 11/07/2015 - 15:45
नवीन
काश्मीरमधून आलेल्या सुफी परंपरेनं माणसांना जोडणं शिकवले .. ... मोदीजी बोलले !!
..... ख्वाजा मोगुद्दीन
म
मोगा
Tue, 11/10/2015 - 01:51
नवीन
British Indians projected the words "Modi not welcome" onto the Houses of Parliament building on Sunday evening (8 November) in a bold show of protest against the Indian Prime Minister's visit to the UK next week.

म
मोगा
Wed, 11/11/2015 - 14:00
नवीन
पाटीदार पटेलांच्या आंदोलनाचा परिणाम गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर झाला असून भाजपचे कार्यकर्ते आणि नेत्यांनीच याचा मोठा धसका घेतला आहे. गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या मेहसाणा जिल्ह्यातच भाजपचा पळपुटेपणा दिसून आला आहे.
उंझा येथील नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या एकाही सदस्याने अर्ज भरला नाही. कारण या भागात पाटीदार पटेल समाजाची संख्या मोठी आहे. पाटीदारांचा भाजपवर रोष आहे. हे पाहता आपला पराभव आधीच निश्चित मानून भाजपच्या सदस्यांनी उमेदवारीसाठी अर्जच भरला नाही. तर काही ठिकाणी भाजप सदस्यांनी आपले अर्ज मागे घेतले आहे
श
श्रीगुरुजी
Wed, 11/11/2015 - 16:39
नवीन
आर्थिक आघाडीवर अजून एक आश्वासक पाऊल
http://indianexpress.com/article/india/india-news-india/govt-eases-fdi-norms-fipb-limit-raised-from-rs-3000-crore-to-rs-5000-crore/
Close on the heels of the BJP’s defeat in Bihar, the government Tuesday further opened up several key sectors including defence, construction, civil aviation and media to foreign investment, eased norms for businesses such as single-brand retail and private banking and allowed the Foreign Investment Promotion Board (FIPB) to clear proposals up to Rs 5,000 crore from Rs 3,000 crore earlier.
- «
- ‹
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- ›
- »