Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वास्को -दा-गामा चे नामांतर आणि गोवेकरांची मानसिकता

उ
उडन खटोला
Fri, 12/04/2015 - 02:17
🗣 384 प्रतिसाद
http://www.heraldgoa.in/Goa/Has-Vasco-da-Gama-been-renamed-Sambhaji/96346.html मी नुकताच Goa Speaks या फेसबुक समुहावर गेलो असता तेथे "वास्को-दा-गामा" शहराचे नामांतर गोवा भाजप सरकारने "छत्रपती संभाजीनगर " असे केल्याचे समजले. त्यावरून काही पोर्तुगीज ख्रिश्चन (?) मंडळी तावातावाने भांडत होती ... अगदी संभाजी महाराजांच्या सात पिढ्यांचा उद्धार करून Who the F*** is Sambhaji ? What is his contribution to Goa? वगैरे वगैरे चिखलफेक सुरू होती ... मी मराठी संस्थळावरील "आमचे गोय " ही लेखमालिका वाचलेली असल्याने गोव्याच्या इतिहासाची थोडीफार ओळख होती . त्यामुळे यथाशक्ती उत्तरे देण्याचा प्रयत्न करून पोर्तुगीजांनी केलेले अत्याचार वगैरे दाखले दिले ... पण पूर्णपणे आङ्ग्लाळलेल्या चंगळवादी गोवन नवीन पिढीने चिखलफेक सुरूच ठेवली ... आणि पोर्तुगीजांनीच "इंडियन्स"ना civilized बनवले .... अगोदर तुम्ही गावठी बैलगाडीवाले होतात वगैरे नेहमीचे प्रतिवाद सुरू झाले ... गोव्यात पोर्तुगीज पासपोर्ट घेवून परदेशी पलायन करणार्‍यांची संख्या बेसुमार वाढत आहे ... अधिकृतरीत्या सुमारे 15000 तर अंनधिकृतरीत्या सुमारे 3 ते 5 लाख लोकांनी पोर्तुगीज पासपोर्ट घेतलेले असून बर्‍याच जणांकडे तर भारत आणि पोर्तुगीज असे दोन्ही पासपोर्ट आहेत , जो गुन्हा आहे.. भारतात विलीन होवून 55 वर्षे झाली तरी गोवेकरांमध्ये " भारतीयत्व " रुजलेच नाही असे म्हणावे का?

प्रतिक्रिया द्या
66568 वाचन

💬 प्रतिसाद (384)
च
चिंतामणी Fri, 12/04/2015 - 04:02 नवीन
गोव्यात पोर्तुगीज पासपोर्ट घेवून परदेशी पलायन करणार्‍यांची संख्या बेसुमार वाढत आहे ज्यांचे या देशवर प्रेम नाही त्यांचा विचार कशाला करता. जाउ द्या त्यांना.
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Mon, 12/07/2015 - 04:43 नवीन
वर्तमान पत्रात खालिल लेख वाचण्यात आला, वाचा व विचार करा...... जिथं गर्वाला घर नाही... इतिहासात दालनं नसतात. आपण उट्टं काढण्यासाठी इतिहासातल्या कोणत्या वर्षावर रेघ मारायची व त्या वर्षाआधी झाला तो अन्याय असं समजायचं? आणि किती रेघा मारायच्या? प्रत्येक दोन रेघांमध्ये एक इतिहासाचं दालन मनातच बांधलं, तर ते काही खरं नसतं. आपण रेघा मारतो व आपणच दालन ठरवतो. सोईप्रमाणे रेघा बदलतो. नवीन दालनं मनात तयार करतो. जिथं गर्वाचं वास्तव्य नसतं, तिथं निर्मिती मुक्काम करते. जिथं गर्व नाही, तिथं द्वेष व तिरस्कार यालाही थारा नाही. आपण स्वतःला कुणी महान लोक समजून पूर्वी झालेल्या अन्यायाचा वचपा काढायचं ठरवलं, तर हे दुष्टचक्र कधीच संपणार नाही. गेल्या पाच हजार वर्षांचा जगाचा इतिहास पाहिला, तर एक सत्य दृष्टीस पडतं. जेव्हा जेव्हा एखाद्या समाजातले लोक धर्म, राज्य, राष्ट्र याविषयीचा अहंकार सोडून गुण्यागोविंदानं राहतात, तिथं लक्ष्मी व सरस्वती एकत्र नांदतात. जिथं गर्व, दंभ व अहंकार आणि पर्यायाने द्वेष व तिरस्कार खासगी आयुष्यापलीकडं जाऊन सामाजिक रूप धारण करतो, तिथं कलह माजतो. धर्माधर्मांतला संघर्ष, दहशतवाद, शेजारी राष्ट्रांबरोबर युद्ध अशा ठिकाणी होणं साहजिक असतं. गेल्या एक हजार वर्षांत हे युरोपमध्ये झालं. सध्या ते पश्‍चिम आशियात आणि आफ्रिकेत पाहायला मिळतं. उद्या हे विष कुठं पसरेल, याचं भाकीत कोण करू शकेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी
स
सुबोध खरे Mon, 12/07/2015 - 05:13 नवीन
हे आदर्शवादी तत्वज्ञान आहे. प्रुथ्वीराज चौहानने १६ वेळा आक्रमण करणाऱ्या अल्लाउद्दिन खिलजीला सोडून दिले आणि सतराव्यांदा काय झालं हा इतिहास आपण विसरलात काय? चहुबाजुना शांतता नांदत असेल तर आपले उच्च आदर्शवादी तत्वज्ञान डोक्यावर घेऊन नाचू. देश स्वतंत्र झाल्यापासून आपला शेजारी आपली कुरापत काढतो आहे. त्यांच्याशी प्रेमाने वागायचे प्रयत्न आपण काय कमी केले आहेत हो ? एक देश मुसलमानांसाठी देऊनही आपण आज निधर्मीच आहोत हिंदुराष्ट्र म्हणून घोषित करून सर्व मुसलमानांना हाकलून दिलेले नाही ना? हे आदर्शवादी तत्वज्ञान पुस्तकात लिहायला आणि बुद्धिवादी लोकांच्यात उभे राहून भाषण करून टाळ्या मिळवायला ठीक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Mon, 12/07/2015 - 10:16 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 12/07/2015 - 15:59 नवीन
हे तेव्हाच शक्य होते जेव्हा दोन्ही बाजू "समंजस" असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पिवळा डांबिस Fri, 12/04/2015 - 06:29 नवीन
सुलभीकरण करणे फार सोपे आहे. वस्तुस्थीती जाणून ती पचवणे अवघड आहे. गोव्यात आज (आणि गेली अनेक दशके) दोन प्रकारच्या संस्कृती नांदत आहेत. जे पोर्तुगीजांद्वारे बळजबरीने किंवा स्वेच्छेने (सवर्ण हिंदूंच्या छळाला कंटाळून!) ख्रिस्ती झाले ते आणि उरलेले हिंन्दू. त्यापैकी ख्रिस्ती हे दक्षिण गोव्यात जास्त आहेत जिथे वास्को हे शहर आहे. हिंदू हे उत्तर गोव्यात जास्त आहेत. संभाजी महाराजांनी जरी गोव्यावर स्वार्‍या केल्या असल्या तरी त्यांनी वास्को शहर जिंकल्याचं मी तरी कुठेही वाचलेलं नाही. तेंव्हा त्या शहराला संभाजी महाराजांचं नांव द्यायचं हयामागे निव्वळ खोडसाळ्पणाखेरीज अन्य काही उद्देश्य असेल असं वाटत नाही. जर संभाजी महाराजांचं नांवच द्यायचं असेल तर उत्तर गोव्यात बांदा, म्हापसा, फोंडा अशी अनेक शहरं आहेत त्यांना द्यावं की! उगाच आपण आधी कळ काढायची आणी मग विरोध झाला तर फुकटचा कांगावा करायचा याला काय अर्थ आहे?
  • Log in or register to post comments
उ
उडन खटोला Fri, 12/04/2015 - 06:57 नवीन
पोर्तुगीजांनीच "इंडियन्स"ना civilized बनवले .... अगोदर तुम्ही गावठी बैलगाडीवाले होतात वगैरे नेहमीचे प्रतिवाद सुरू झाले ...
याबद्दल आपले काय म्हणने आहे डाम्बिस म्हाराज ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
उ
उडन खटोला Fri, 12/04/2015 - 06:59 नवीन
का? ख्रिश्चन बहुल शहराना हिन्दु राजान्ची नावे दिली म्हनूण काय झाले? एवढ्या मिर्च्या का झोम्बतात नाकास?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उडन खटोला
प
पिवळा डांबिस Fri, 12/04/2015 - 07:36 नवीन
ख्रिश्चन बहुल शहराना हिन्दु राजान्ची नावे दिली म्हनूण काय झाले?
हा खोडसाळपणा आहे इतकंच माझं मत. आधी आपण खोडी काढायची आणि मग विरोध झाला तर साळसूदपणाचा आव आणून बोंबा मारायच्या हे कशाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उडन खटोला
प
प्रदीप Fri, 12/04/2015 - 10:07 नवीन
आचार्य अत्र्यंच्या शब्दात सांगायचं झालं तर, 'हजारो वर्षांपूर्वी' देण्यात आलेले आहे. व ते मगोपने दिले असावे (बांदोडकरांच्या काळात). आणि हे कुणीहे केले असले तरी त्यात नक्की खोडी काय आहे आणि ती कुणाची आहे, हे समजले नाही. जागांची प्रचलीत नावे बदलू नयेत, इतपत मान्य आहे. पण एका पोर्तुगीजाचे नाव काढून त्याच्याऐवजी एका हिंदू राजाचे ठेवले, तर नक्की कुणाची खोडी काढली गेली इथे? जाता जाता, वास्को, गोव्याच्या दक्षिणेस नसून, ते पश्चिमेस आहे, पणजीच्या थोडे दक्षिणेस. जुलुमी पोर्तुगीजांचे जबरदस्तीने धर्मांतराचे तडाखे ह्याच भागातून सुरू झाले. त्यामुळे त्या भागात असलेली मुळची हिंदू देवळे तेथून हलवून पोंडा महालात, सुरक्षित ठिकाणी न्यावी लागली. तेव्हा एकार्थी वास्को परिसराचा, व पोर्तुगीजांच्या जुलूमी राजवटीचा निकटचा संबंध आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
पिवळा डांबिस Sat, 12/05/2015 - 06:14 नवीन
आचार्य अत्र्यंच्या शब्दात सांगायचं झालं तर, 'हजारो वर्षांपूर्वी' देण्यात आलेले आहे. व ते मगोपने दिले असावे (बांदोडकरांच्या काळात).
ह्याला काय प्रतिसाद द्यावा हेच कळलेले नाही. अवांतर म्हणुन सोडून देण्यात आले आहे...
आणि हे कुणीहे केले असले तरी त्यात नक्की खोडी काय आहे आणि ती कुणाची आहे, हे समजले नाही. जागांची प्रचलीत नावे बदलू नयेत, इतपत मान्य आहे. पण एका पोर्तुगीजाचे नाव काढून त्याच्याऐवजी एका हिंदू राजाचे ठेवले, तर नक्की कुणाची खोडी काढली गेली इथे?
अभ्यास वाढवावा हीच विनंती. नांव बदलायचेच असेल तर गोव्याबाहेरच्या हिदू माणसाचे नांव उत्तर गोव्याऐवजी दक्षिण गोव्यामधे ठेवण्यामधेच खोडसाळपणा आहे हे कळत नसल्यास बुद्धिमत्तेची कीव करण्याखेरीज आमच्या हाती काही नाही. ज्यांचा गोव्याच्या संस्कृतीचा काही अभ्यास नाही त्यांना उत्तर द्यायला आम्ही बांधलेले नाही!!
वास्को, गोव्याच्या दक्षिणेस नसून, ते पश्चिमेस आहे, पणजीच्या थोडे दक्षिणेस.
वा रे गोवा माहितगार! वास्को हे बंदर आहे. ते पश्चिमेसच असणार ना! गोव्याचे महाल कोणते, त्यातले उत्तर गोव्यातले कोणते आणि दक्षिण गोव्यातले कोणते, त्यांच्या संस्कृतीत काय फरक आहे, याची काहीही माहिती नसतां उगाच काहीतरी लिहिण्यात आपण आपले अज्ञानच जाहीर करतोय हे लोकांना कधी कळणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप
ग
गॅरी ट्रुमन Sat, 12/05/2015 - 06:29 नवीन
गोव्याबाहेरच्या हिदू माणसाचे नांव उत्तर गोव्याऐवजी दक्षिण गोव्यामधे ठेवण्यामधेच खोडसाळपणा आहे हे कळत नसल्यास बुद्धिमत्तेची कीव करण्याखेरीज आमच्या हाती काही नाही.
पिडांकाकाही इतरांच्या बुध्दीमत्तेची कीव करण्याच्या ब्रिगेडमध्ये सामील होतील असे वाटले नव्हते. एकूणच हा प्रतिवाद अत्यंत डिसअपॉईंटिंग वाटला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
पिवळा डांबिस Sat, 12/05/2015 - 06:42 नवीन
पिडांकाकाही इतरांच्या बुध्दीमत्तेची कीव करण्याच्या ब्रिगेडमध्ये सामील होतील असे वाटले नव्हते.
ब्रिगेड की सेना की संघी हा तुमचा दृष्टीकोन! गोव्याबाहेरच्या लोकांनी गोव्यातल्या नामांतराचा सव्यापसयी उद्योग करावा हे तुम्हाला योग्य वाटतं याचंच आश्चर्य वाटतं.
एकूणच हा प्रतिवाद अत्यंत डिसअपॉईंटिंग वाटला
समज आपली आपली!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
म
माहितगार Sat, 12/05/2015 - 12:35 नवीन
गोव्याबाहेरच्या लोकांनी गोव्यातल्या नामांतराचा सव्यापसयी उद्योग करावा
गोवा भारतातच आहे आणि भारतीयेतरांचे खासकरून जुलमी राजवटीचे प्रतिक असलेले नाव नको म्हणण्याचा इतर भारतीयांनाही पूर्ण नैतीक अधिकार असावा असे वाटते. बदललेले नवे नाव काय असावे हे ठरवण्याचा गोयंकरांचे मत जरुर विचारात घ्यावे. अर्थात त्याच वेळी पै तैंनी दिलेल्या माहितीनुसार परकीय राजवटीपासून गोवा मुक्ततेचा पहिले प्रयत्न शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या नावावर ऐतिहासीक दस्तएवजांनुसार जात असतील तर त्याचे सुयोग्य क्रेडीट गोव्याच्या जनतेने त्यांना स्वतःहून बहाल करावयास हवे असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
प्रदीप Sat, 12/05/2015 - 08:49 नवीन
अवांतर म्हणुन सोडून देण्यात आले आहे... असे म्हणून पुन्हा पुढील प्रतिसादात गोव्याबाहेरच्या लोकांनी गोव्यातल्या नामांतराचा सव्यापसयी उद्योग करावा हे तुम्हाला योग्य वाटतं याचंच आश्चर्य वाटतं. हे तुम्हीच लिहीता आहात. माझा प्रतिसाद नीट वाचलेला दिसत नाही. मगोपाचा मी त्यात उल्लेख केला होता. खाली पिशी अबोली ह्यांनी १९९८ च्या रीडिफच्या एका वृत्ताचा दुवा दिलेला आहे, जो माझे म्हणणे, की (१) हे नामकरण आता कुणी घडवून आणत नाही, तर ते अगोदरच, म्हणजे १९९८ साली इनिशेअ‍ॅट केले गेलेले आहे आणि (२) ते मगोप (महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष ह्यांनी केले होते, ह्या विधानांना दुजोरा देतो. आता ह्यापुढे तुमचे समज गैरसमज दूर करण्याच्या फंदात मी पडणार नाही. गोव्याचे महाल वगैरे सर्वकाही ठीकठाक मला माहिती आहे, असा मी दावा केलेला नाही. मात्र आपण स्वतःच गुगल मॅप उघडून वास्को गोव्याच्या पश्चिमेस आहे, की दक्षिणेस ह्याचा एकदा शोध घ्यावा. (बहुतेक तुमच्याप्रमाणेच) मीही मुळचा गोंयकार आहे, तेथे वर्षां- दोन वर्षांकाठी देवाला म्हणून जाणे होतेच. असो. ह्यापुढील प्रतिसाद द्यायचा झालाच तर रॅटल न होता द्यावा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
पिवळा डांबिस Fri, 12/11/2015 - 06:36 नवीन
अँ! अशें कितें उलैतारे? सामको मारे तू? :) गोव्याविषयी काही लिहितांना भावनाशून्य होणे (तुमच्या भाषेत रॅटल न होणे!) मला तरी शक्य नाही. आतड्यात गुंतलेला विषय आहे तो माझ्यासाठी. मगोपा जरी मराठी लोकांना जिव्हाळ्याची असली तरी ती सर्व गोवेकरांचं प्रतिनिधित्व करत नाही. म्हणून तर ती गोवा महाराष्ट्रात विलीन करण्याचं मतदान हरली.... त्यामुळे लेट्स अ‍ॅग्री टू डिसअ‍ॅग्री!!! :) --------------------------- अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे, हरीभजनावीण काळ घालवू नको रे || -सोयरोबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप
प
पिवळा डांबिस Fri, 12/04/2015 - 07:32 नवीन
तुम्हाला प्रतिवाद करणं जमलं नाही इतकाच त्याचा अर्थ. मी असतो तर सांगितलं असतं की, "बाबांनो, पोर्तुगीजांनी गोव्यावर म्हणजे भारतातल्या चिमूटभर भागावर सत्ता गाजवली. असं असतांना त्यांनी बाकी खंडप्राय भारतातल्या सगळ्या इंडियन्सना/भारतीयांना सिव्हिलाईझ्ड बनवले हे म्हणणं मूर्खपणाचं आहे!!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उडन खटोला
म
मृत्युन्जय Fri, 12/04/2015 - 07:01 नवीन
मान्य. पण मग वास्को डि गामा चे गोव्याच्या प्रगतीतील योगदान काय? केवळ तो ख्रिस्ती होता म्हणुन गोव्यातील ख्रिस्ती बांधवांनी त्याची कड घ्यावी काय? दुसरी गोष्ट म्हणके गोव्यातील पोर्तुगीज राजवट आणि ख्रिस्ती धर्माचा प्रसार हा मुख्यत्वेकरुन बळजबरीनेच झाला आहे हे अमान्य करता येइल काय? गोव्याकडे पोर्तुगीज ख्रिस्ती धर्माचा प्रसार करण्याची एक जागा म्हणुन पाहत होते हे देखील करेच नाही काय? गोव्याचा विकास आणि एकुणच एतद्देशीय जनतेची भलाई या उद्देशाने काही पोर्तुगीज गोव्यात आले नव्हते. असे असताना एका पोर्तुगीजाच्या नावाच्या जागी एखाद्या एतद्देशीय राजाचे नाव दिल्यास त्यात नक्की काय चुकीचे आहे. कातडीबचावु धोरण अंगिकारुन भाजपाने हे नामांतरण टाळलेच असते तर ते त्यांच्यासाठी बरेच झाले असते. असेही इतक्या वर्षांनंतर आता त्याचे नाव संभाजीनगर केले जरी तरी आपल्या हयातीत त्याला कोणी संभाजीनगर म्हणेल असे वाटत नाही. पण पारतंत्र्याच्या खुणा आपण अंगावर शोभेने मिरवल्याच पाहिजेत का हे ही आपल्याला एकदाच ठरवलेच पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
पिवळा डांबिस Fri, 12/04/2015 - 07:50 नवीन
ख्रिश्चन बहुल शहराना हिन्दु राजान्ची नावे दिली म्हनूण काय झाले?
तुम्हीही महाराष्ट्रीय चश्म्यातून गोव्याकडे पहाताय. ज्या शहराशी संभाजीमहाराजांचा काहीही संबंध आला नव्हता (नसावा) त्या शहराला त्यांचं नांव देणं (संभाजीमहाराज आपल्याला कितीही वंदनीय असले तरीही) आणि ते ही स्थानिक लोकांच्या इच्छेला न जुमानता, ह्यात तुम्हाला काही खोडसाळपणा दिसत नाही? आणि ह्यांना एखाद्या हिन्दू राजाचं नांव सुचवायचंच होतं तर मग गोव्याचं स्थानिक कदंब राजघराणं काय ओस पडलं होतं? पण नाही, ते हे लोक सुचवणार नाहीत कारण गोव्याची मूळ संस्कृती काय, कदंब राजे कोण याची ह्यांना काहीही माहिती नाही. माहीती करून घ्यायची इच्छा नाही. ह्यांना फक्त वाद निर्माण करून जिथे भांडण नाही तिथे भांडण निर्माण करायचंय!!! म्हणून माझा विरोध!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
स
संदीप डांगे Fri, 12/04/2015 - 07:53 नवीन
'कदंबनगर' छान वाटते की नाव..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
पिवळा डांबिस Fri, 12/04/2015 - 08:07 नवीन
जर स्थानिकांना पसंत पडलं तर आपणहुन बदलतीलच की ते! मार्मागोवाचं मुरगांव नाही केलं? हे बाहेरचे लोकं कोण जबरदस्ती करणार? आज वास्कोचं संभाजीनगर कराल, उद्या दोना पावलाचं चिमाजीआप्पानगर कराल! सांगितला कुणी ह्यांना हा उद्योग? आणि मग स्थानिकांनी विरोध केला की हे देशभक्तीच्या दांभिक आरोळ्या मारायला तयार!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
अ
अर्धवटराव Fri, 12/04/2015 - 21:49 नवीन
सोचनेवाली बात है.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
ब
बॅटमॅन Fri, 12/04/2015 - 07:58 नवीन
बाकी कै असलं तरी हा मुद्दा महत्त्वाचा आहे. बससेवेला कदंबा नाव आहेच, त्याप्रमाणे कदंबपूर वगैरे नाव ठेवता आले असते. पण हे लोकही येडेच आहेत. जरा थोडेसे होमवर्क करावे ते नाही. अशाने काही साधत नाही. बायदवे संभाजीराजे गोव्यात नक्की कुठपर्यंत आले होते हे पाहणे रोचक ठरेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
ब
बॅटमॅन Fri, 12/04/2015 - 07:59 नवीन
आणि वास्कोचेही गोव्यात योगदान काय आहे हे पहावयास आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ह
होबासराव Fri, 12/04/2015 - 08:04 नवीन
+१११११११११११११११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
प
पिवळा डांबिस Fri, 12/04/2015 - 08:16 नवीन
बायदवे संभाजीराजे गोव्यात नक्की कुठपर्यंत आले होते हे पाहणे रोचक ठरेल.
इतिहासकार तुम्ही आहांत. तुम्ही शोधा, आम्हालाही शिकवा. आम्ही नाय कुठं म्हणतोय. आम्ही तर म्हणतो की सुरतेला शिवाजीनगर असे नांव का देऊ नये? महाराजांनी एकदा नाही दोनदा लुटली तिला!! पुराव्याने शाबीत गोष्ट आहे!!! जा, आधी ते नामकरण करा आणि मग या गोव्यात नवी नांवं सुचवायला!!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Fri, 12/04/2015 - 08:47 नवीन
खी खी खी, पिडां जस्ट चिल! बाकी महाराष्ट्रातच औरंगाबादेचे संभाजीनगर करणे ज्यांना जमले नाही, इस्लामपूर बसस्ट्यांडनजीकच्या रिक्षास्ट्यांडावर फक्त "शाखा ईश्वरपूर" असे लिहून जे मोठा तीर मारलाय अशा आविर्भावात असतात ते घंटा काय करणारेत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
क
कैलासवासी सोन्याबापु Sun, 12/06/2015 - 11:43 नवीन
बॅटमॅन भाऊ, हे इस्लामपुर वालं दर वेळी पाहून हसतो मी! बरी आठवण करून दिलीत :D :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
र
राजाभाऊ Fri, 12/04/2015 - 16:34 नवीन
सुरत शहराच्या नावाचा उगम परकियांशी संबंधित आहे, या मला माहित नसलेल्या माहितीबद्दल धन्यवाद...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
म
मालोजीराव Fri, 12/04/2015 - 11:30 नवीन
बायदवे संभाजीराजे गोव्यात नक्की कुठपर्यंत आले होते हे पाहणे रोचक ठरेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Fri, 12/04/2015 - 11:43 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव
म
मृत्युन्जय Fri, 12/04/2015 - 08:01 नवीन
ख्रिश्चन बहुल शहराना हिन्दु राजान्ची नावे दिली म्हनूण काय झाले? काय पिडांकाका तुम्ही पण दुसर्‍या कोणाची तरी विधाने माझ्या नावावर चिकटवुन मला दूषणे देत आहात होय? मी कुठे ख्रिश्चन बहुल शहरांना हिंदु राजांची नावे देण्याबद्दल बोललो? मी पोर्तुगीज लोकांऐवजी एतद्देशीय व्यक्तींची नावे देण्याबद्दल प्रतिवाद केला होता. वास्को डि गामा पोर्तुगीज नसून स्थानिक राजा असला असता तर कदाचित मी हा प्रतिवाद लिहिला देखील नसता? माझ्या एतद्देशीय भूमिकेमध्ये कदंब राजे देखील येतात. त्यांचे नाव जरी दिले वास्को ला तरी काहिच हरकत नाही. किंबहुना या भूमीत राहुन, धर्मांचा किंतु मनात न ठेवता, या भूमीतील जनतेच्या कल्याणासाठी झटलेला एखादा पोर्तुगीज राजा अथवा गव्हर्नर असेल तर त्याचेही नाव वास्कोला देण्यात काहिच हरकत नाही. वास्को डि गामाचे नाव देण्यामागची भूमिका कदाचित मला नीट कळालेली नाही. ती नीट कळाली आणि पटली तर वास्को हे नाव असण्यालादेखील माझा विरोध नाही. असो. माझ्या मनात ख्रिश्चनाचे नाव काढुन हिंदुचे नाव द्यावे असा काहिही विचार नाही. हे नामांतर करताना त्या माणसाचा धर्म बघु नये असे माझे मत आहे. गोव्यातील एतद्देशीय जनतेच्या आर्थिक आणि / अथवा शारिरीक आणि / अथवा सांस्कृतिक आणि / अथवा बौद्धिक विकासात त्यांचा धर्म न बघता हातभार लावणार्‍या कुठल्याही माणसाचे नाव त्या शहराला दिले तर काहिच हरकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
पिवळा डांबिस Fri, 12/04/2015 - 08:11 नवीन
एका पोर्तुगीजाच्या नावाच्या जागी एखाद्या एतद्देशीय राजाचे नाव दिल्यास त्यात नक्की काय चुकीचे आहे.
मला तुमच्या प्रतिसादातलं हे वाक्य कॉपी/पेस्ट करायचं होतं पण चुकून आधीच्या प्रतिक्रियेतलंच वाक्य पुन्हा पेस्ट झालं.... आय बेग फॉर युवर फरगिव्हनेस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
प
पगला गजोधर Fri, 12/04/2015 - 12:49 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
स
सुनील Mon, 12/07/2015 - 10:06 नवीन
वास्को डि गामा चे गोव्याच्या प्रगतीतील योगदान काय?
प्रगतीचे काय ठाउक नाही पण गोवाच कशाला पण संपूर्ण भारताने 'वदनी कवळ घेता' त्याचे नाव नक्कीच घ्यावे; विशेषतः उपासाच्या दिवशी!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
स
संदीप डांगे Mon, 12/07/2015 - 10:20 नवीन
यु मीन बटाटा..? तुम्ही बटाटा आणी उपास यांचा उल्लेख केला. चला यानिमित्ताने "हिंदू उपासाच्या दिवशी पोर्तुगीज बटाटा कसा काय चालतो" याचे विश्लेषणही देऊन टाकावे, बरेच लोक हिणवतांना बघितलेत. बटाटा हे जमिनीखाली येणारे कंदमूळ वर्गीय वनस्पती आहे. तसेच बीट, रताळे आणि टॅपियोकाही. साबुदाणा आणि बटाटा ह्या दोन्ही उपासाच्या सामग्री हिंदूंच्या शास्त्रात (कुठल्या?) सांगितलेल्या उपवासाच्या पदार्थांमधे कंदमूळ ह्या वर्गात समाविष्ट होतात. कंदमूळ व फळे खाऊन उपवास करणे हे हिंदू संस्कृतीत शेकडो वर्षांपासून चालू आहे. त्यात पोर्तुगीजांनी बटाटा आणला म्हणून शास्त्रबाह्य होत नाही. बाकी, 'उपवासाला चालतं' ह्या नावाखाली काहीच्या काही खातांना लोकांना बघितलंय हे वेगळे, अजून कोणाला काही माहिती असेल तर जरूर देणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
स
सुनील Mon, 12/07/2015 - 10:30 नवीन
यु मीन बटाटा..?
फक्त बटाटाच नव्हे तर कोलंबियन एक्स्चेंज अंतर्गत येणारे बहुतेक सर्व काही!
चला यानिमित्ताने "हिंदू उपासाच्या दिवशी पोर्तुगीज बटाटा कसा काय चालतो" याचे विश्लेषणही देऊन टाकावे, बरेच लोक हिणवतांना बघितलेत.
आँ? मी कुठे हिणवलय? माझ्या प्रतिसादात तसे काही दिसतय तरी का? मला म्हणायचे ते एवढेच की, आमच्या आजच्या खाद्यजीवनातील बरेच महत्त्वाचे पदार्थ पोर्तुगिजांमार्फत आपल्यापर्यंत पोचले!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Mon, 12/07/2015 - 10:34 नवीन
अहो, ते तुम्हाला नाही. बरेच लोक हिणवतात ते यानिमित्ताने आठवले असे म्हणायचे आहे. गैरसमज नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
स
सुनील Mon, 12/07/2015 - 10:45 नवीन
ओक्के!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
न
नगरीनिरंजन Mon, 12/07/2015 - 13:44 नवीन
मिरचीसुद्धा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
व
विकास Fri, 12/04/2015 - 23:41 नवीन
(प्रतिसाद खाली मुद्दामून घुसून वर दिसण्यासाठी म्हणून येथे देत आहे. केवळ पिडांसाठीच नाही आहे!) खाली जो मुद्दा लिहीत आहे तो आधी आला आहे का हे पाहील आणि दिसला नसल्याने इथे लिहीत आहे. पण तरी देखील चुकून माझ्याकडून नजरचूक झाली असेल तर क्षमस्व. ही चर्चा वाचून मला, "अरे देवा तुझी मुले अशी (न शोधता/वाचता) का रे भांडतात असे म्हणावेसे वाटले... अर्थात तो चर्चेकर्‍यांचा पूर्ण दोष देखील नाही. हं तर मुद्दा आहे: "तेथे "वास्को-दा-गामा" शहराचे नामांतर गोवा भाजप सरकारने "छत्रपती संभाजीनगर " असे केल्याचे समजले." हे वाक्य. मला खात्री आहे की हे असले काही घडले असते आणि विशेष करून या सरकारने चुपचुपके केले असते तर मोदी सरकारचे "माध्यम मित्र" गप्प बसले नसते. दुसरा लॉजिकल मुद्दा: भाजपाचे सरकार गोव्यात मोदी सरकार येण्याआधीपासूनच होते. जर नाव बदलायचेच असते तर त्यावेळेस बदलून राजकीय हवा तापवता आली असती... पण तसे तर झालेले नाही... म्हणून या संदर्भात जरा शोधायचा प्रयत्न केला. तर चर्चा प्रस्तावाच्या सुरवातीसच असलेया या बातमी नुसार, "छत्रपती संभाजीनगर " असे काही नाव झालेले नसावे हे लक्षात आले. आता ती बातमी काही भाजपा सरकारच्या बाजूची नाही. तरी देखील त्यात असे म्हणलेले आहे की वास्को मधील काही भागातील रेशनकार्डावर भागाचे नाव संभाजी असे लिहीलेले असून कंसात वॉस्को-द-गामा असे म्हणलेले आहे. त्याचे कारण, “per government records which show that certain pockets in Vasco were named as Sambhaji in 1971”. म्हणजे वॉस्को मधील एका भागाचे (jurisdiction) नाव "संभाजी" आहे. पण ते आधी कधी वापरलेले नव्हते. मग त्या बातमीत म्हणले गेले आहे की ते जर खरे असेल तर ते कसे कुणाला माहीत नाही? आता जर सरकारी अधिकार्‍यांनीच ते वापरले नसेल तर ते इतरांना कशाला माहीत असणार? आणि माहीत नाही म्हणून कायदेशीर नाव न वापरणारे मधल्या काळातले सरकारी अधिकारी बरोबर का आत्ता ज्याने (कदाचीत खोडसाळपणाने पण असेल, हू नोज!) दुरूस्ती करून नाव वापरले ते बरोबर? आता तुम्ही म्हणालं की हे कशावरून बरोबर म्हणून... परत मला त्या साठी कॅलीफोर्नियातील उपक्रमाने मदत केली. ;) आय मिन गुगलने मदत केली... goaprintingpress.gov.in (सरकारी छापखान्याच्या) संस्थळावर मला गोवा, दमण, दिव लँड रेवेन्यू कोडचा हा खजीना मिळाला. (पिडीएफ फाईल असल्याने ती डाऊन्लोड होईल). तर या माहीतीपत्रकाच्या पृष्ठक्रमांक २६९ वर २४ वी ओळ जी आहे त्यात लिहील्या प्रमाणे मोर्मुगाव (मार्मागोवा) मधील एका भागाचे नाव "संभाजी" आहे. त्याला जो संदर्भ दिला आहे तो Jurisdiction in the circle as constituted under Order No. RDB/REV/3/1970 dated 30-7-71 असा आहे. आता वॉस्को-द-गामा गाव हे मार्मागोवा तालुक्याच्या अंतर्गत म्हणजे ज्या मधे संभाजी नामक सरकारी "सर्कल" आहे, त्याच भागात येते. आता सर्कल, गाव, तालुका वगैरे मधील मला फरक समजत नाही... पण हे सगळे वेगळे सरकारी परीपत्रकात किमान १९७१ पासून आहे. कदाचीत आता पद्धत अजून डिटेल केली असेल अथवा वर म्हणल्याप्रमाणे खोडसाळपण असेल... मात्र आपण येथे आणि पब्लीक इतरत्र वाद घालत बसलो आहोत...असो. चालायचचं! :) ___________________ अजून एक भरः http://inngoa.com/category/cities/ या संस्थळावर म्हणल्याप्रमाणे: " As the name suggests, Vasco-da-Gama city inherited its name from the Portuguese explorer and the former viceroy, Vasco-da-Gama and is locally known as Vasco. Located at close proximity to Mormugao harbor and Zuari River, the city was originally called Sambhaji. This coastal town came under Portuguese rule in 1543 A.D. and evolved as a leading export-import trade center for India on a global platform. The city was founded in 1543 and remained in Portuguese hands until 1961, when Goa was annexed by India. " म्हणजे, असे दिसतयं की पोर्तुगिजांनी संभाजी हे नाव बदलून १५४३ साली वास्को-द-गामा हे नाव केले. (वरील संस्थळ हे देखील भाजपा अथवा संघपरीवाराचे नाही! ;) त्यांनी ही बातमी वास्को बद्दल लिहीत असताना इतिहास म्हणून लिहीली आहे. आता इथले जाणकार गोवेकर उरलेले संशोधन करतील अशी आशा करून, मी माझे दोन शब्द संपवतो! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
व
विकास Sat, 12/05/2015 - 02:00 नवीन
आत्ताच टाईम्स मधे आलेली बातमी... Carlos faults previous govt for ‘renaming error’ चर्चेच्या संदर्भात खालील काही भाग... In an attempt to turn the tables in the alleged renaming of Vasco issue, Vasco MLA Carlos Almeida (BJP), alleged that it was the earlier government's failure to make the corrections that resulted in the new food security card error which displays the name 'Sambhaji nagar' in the address on several ration cards. Almeida said, "In 2011, a notification in the government of Goa's official gazette displays Sambhaji (Vasco-da-Gama). This was recorded then and the MLA of the day and former revenue minister Jose Philip D'Souza overlooked this mistake. Tension prevails in Vasco as he failed to notice the error or purposely overlooked it." The notification dated March 17, 2011, under serial Number 8, refers to 'Sambhaji' (Vasco-da-Gama). (माझा मुद्दा: तरीपण १९७१ पासून होते ते काय होते?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
प
पिवळा डांबिस Sat, 12/05/2015 - 06:27 नवीन
अरे देवा! कुणाला कशाचं आणि विकासला फक्त भाजपाचं!!!! :) मी इथे भाजपाचं नांव तरी घेतलंय का? धार्मिक कळा काढायला माणसं काय फक्त भाजपाची कार्ड कॅरियरिंग मेंबरं असायला लागतात का? :) माझा मुद्दा इतकाच की हे गोव्याबाहेरचे लोक हिंदूबहुल उत्तर गोव्यात नामांतर न करता (अनेक उमेदवार आहेत नांवं बदलण्यासारखे, बांदा, म्हापसा, फोंडा वगैरे!!) मुद्दाम ख्रिस्तीबहुल दक्षिण गोव्यातल्या गावांची नांवे बदल करून ती ही गोव्याबाहेरच्या राज्यकर्त्यांची ठेवायला बघताहेत. त्यांना विरोध केला तर काय चुकलं? इतकी हौसच असेल तर डोंबिवलीचं नांव बदला आणि ठेवा छत्रपती संभाजीनगर! त्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
व
विकास Sat, 12/05/2015 - 13:17 नवीन
मी इथे भाजपाचं नांव तरी घेतलंय का? अहो, माझे वरच्या पहील्या प्रतिसादातले, पहीले वाक्य वाचलेत का? प्रतिसाद खाली मुद्दामून घुसून वर दिसण्यासाठी म्हणून येथे देत आहे. केवळ पिडांसाठीच नाही आहे! संपूर्ण चर्चेत भाजपा हे काही मी नाही आणले. तसे कोणी मुद्दामून आणले असे देखील म्हणलेले नाही. पण पब्लीकने या चर्चेत दोन गोष्टी गॄहीत धरल्या होत्या असे वाटले: (१) वास्को द गामा हे नाव बदलले आणि (२) ते जर आत्ता बदलले तर असले तर ते भाजपानेच बदलले असणार. आता यातील #२ गृहीतक हे #१ वर अवलंबून आहे. त्या संदर्भात मी जी मुद्याची गोष्ट सांगितली, त्या बद्दल आपले काय मत आहे? संभाजी हे नामकरण वास्को चे नसून त्यातील एका भागाचे १९७१ पासून आहे. दुसर्‍या प्रतिसादात मी टाईम्स मधली बातमी देखील दिली आहे ज्यानुसार हे परत सिस्टीम मधे २०११ सालीच आले आहे. आता माझे किंचीत तांत्रिक लॉजिक असे सांगते आहे की जेंव्हा सिस्टीम्स अधुनिक केल्या जात असतात आणि त्यात जर जी आय एस वापरले जात असेल तर प्रत्येक पॉइंट हा वेगवेगळ्या संदर्भाने डिफाईन केलेला असू शकतो. त्यामुळे देखील तसे २०११ साली केले असेल. कारण काहीही असेल पण आता कोणीतरी राजकीय फायदा उठवायला ही बातमी तयार केली आणि आपण तुरी बाजारात पण नसताना वाद घालत बसलो आहोत. म्हणून म्हणतो, माध्यमातील बातम्यांवर ज्वलंत विश्वास ठेवण्याआधी त्याची खात्री करून घेणे महत्वाचे असते. आणि माध्यमातील कोणत्याही (आपल्याला आवडू अथवा नावडू शकतील अशा काहीही) बातम्यांवरून कुठलेही मत तयार करण्याच्या आधी अधिक माहिती काढणे इष्ट!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
प्रदीप Sat, 12/05/2015 - 16:29 नवीन
मूळ धाग्याच्या प्रस्तावातच आहे: मी नुकताच Goa Speaks या फेसबुक समुहावर गेलो असता तेथे "वास्को-दा-गामा" शहराचे नामांतर गोवा भाजप सरकारने "छत्रपती संभाजीनगर " असे केल्याचे समजले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
D
DEADPOOL Sun, 12/06/2015 - 04:31 नवीन
च्यायला दाव्याची हवाच गेली!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
प
पियुशा Mon, 12/07/2015 - 13:46 नवीन
सिम्पल गोष्ट आहे ज्या गावात शहरात तुम्ही राहता त्या शहराच्या नावाशी तुमची एक आत्मीयता असते ओळख असते ती आपली कानावर तेच पडलेलं असत भले हि ते कुणाचंही असो ! कुठल हि असो आता आमचं अहमदनगर बघा मुस्लिम राजाने वसवलेल शहर ,पण अहमदनगर म्हटल कि कस आपलं आपलं वाटत भले हि मी मुस्लिम नाही पण त्याच नाव बदलायचं ठरलं तर मला वाईट वाटणारच कारण माझ्या जन्मापासूनची सोबत आहे या गावाशी उद्या त्याच नाव कुंणी बदलावे अस म्हटलं तरी मला वाईट वाटण साहजिकच तसच काहीस झालं असणारे वास्को च्या बाबतीत वास्को आला गेला, काय केलं? काय नाय केलं हे सगल्याच आताच्या पिढीला काय घेणं असेल ? किंवा नसेल पण जर त्यांच्या गावाच नाव त्यांची ओळख त्यांना आवडत असेल तर का बदलाव? ज्याचं त्याच गावाच नाव लाडक असत त्याची नाळ जोडलेली असते इतिहास काय सांगतो न का सांगतो ते सगळं राहू द्या पुस्तकात ! नाव बदलून वास्कोच वाशिंगटन नाही होणार ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
ब
बॅटमॅन Mon, 12/07/2015 - 13:48 नवीन
हो, पण पिवशे तुमचे लोक्सच कधी अहमदनगर म्हणताना दिसत नैत बा फारसे. नगरच म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा
प
पियुशा Mon, 12/07/2015 - 13:52 नवीन
आलास का ये ये ....नाव मोठं आहे म्हणून शॉर्ट फॉर्म " नगर" पुरेस आहे समजायला" ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
न
नाखु Tue, 12/08/2015 - 05:15 नवीन
तेही खरयं म्हणा... म्हणून तर आम्हाला नगरीच म्हणतात... नगरी खेडेवाला पारनेरी नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा