वास्को -दा-गामा चे नामांतर आणि गोवेकरांची मानसिकता
http://www.heraldgoa.in/Goa/Has-Vasco-da-Gama-been-renamed-Sambhaji/96346.html
मी नुकताच Goa Speaks या फेसबुक समुहावर गेलो असता तेथे "वास्को-दा-गामा" शहराचे नामांतर गोवा भाजप सरकारने "छत्रपती संभाजीनगर " असे केल्याचे समजले. त्यावरून काही पोर्तुगीज ख्रिश्चन (?) मंडळी तावातावाने भांडत होती ... अगदी संभाजी महाराजांच्या सात पिढ्यांचा उद्धार करून Who the F*** is Sambhaji ? What is his contribution to Goa? वगैरे वगैरे चिखलफेक सुरू होती ...
मी मराठी संस्थळावरील "आमचे गोय " ही लेखमालिका वाचलेली असल्याने गोव्याच्या इतिहासाची थोडीफार ओळख होती . त्यामुळे यथाशक्ती उत्तरे देण्याचा प्रयत्न करून पोर्तुगीजांनी केलेले अत्याचार वगैरे दाखले दिले ... पण पूर्णपणे आङ्ग्लाळलेल्या चंगळवादी गोवन नवीन पिढीने चिखलफेक सुरूच ठेवली ... आणि पोर्तुगीजांनीच "इंडियन्स"ना civilized बनवले .... अगोदर तुम्ही गावठी बैलगाडीवाले होतात वगैरे नेहमीचे प्रतिवाद सुरू झाले ...
गोव्यात पोर्तुगीज पासपोर्ट घेवून परदेशी पलायन करणार्यांची संख्या बेसुमार वाढत आहे ... अधिकृतरीत्या सुमारे 15000 तर अंनधिकृतरीत्या सुमारे 3 ते 5 लाख लोकांनी पोर्तुगीज पासपोर्ट घेतलेले असून बर्याच जणांकडे तर भारत आणि पोर्तुगीज असे दोन्ही पासपोर्ट आहेत , जो गुन्हा आहे..
भारतात विलीन होवून 55 वर्षे झाली तरी गोवेकरांमध्ये " भारतीयत्व " रुजलेच नाही असे म्हणावे का?
💬 प्रतिसाद
(384)
प
प्रचेतस
Mon, 12/07/2015 - 14:10
नवीन
पिवशे, अहमदनगराचं मूळचं नाव भृगुनगर- भिनगर- भिंगार असे होते.
अहमदशाहने जरी हे शहर वसवले(वाढवले) होते तरी हे नगर त्याआधीपासून अस्तित्वात होतेच.
'नगर' हा मूळ संस्कृत शब्द त्याचा अजूनही प्रत्यय देतोच.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Mon, 12/07/2015 - 14:18
नवीन
वल्ली सर,
पण भिंगार नामक शेप्रेट गाव आजही अस्तित्वात आहे की. मग कसं काय नगरचं म्हणताय ते?
- Log in or register to post comments
प
पियुशा
Mon, 12/07/2015 - 14:26
नवीन
वल्ली रोचक माहिती बर झालं तू लिहिलंस हे :) बघ आता मलाच माझ्या गावाचा इतिहास नीट माहीत नाहीं तरी मला हे नाव आवडतच :) नाव that 's the point तेच सांगायचय मला वल्ली तुझ्यामुळे माझा मुद्दा उदाहरण देऊन क्लीअर करता आला मला :) समजलं कां ब्याट्या ;)
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Mon, 12/07/2015 - 14:30
नवीन
हो. पण ते नगरपासून जेमतेम ४/५ किमीवर आहे. मला वाटतं नगरचा मिलिट्री क्याम्प तिथे आहे. अहमदशहाने सीना नदी जवळ वस्ती वाढवली असावी.
खुद्द नगर शहरात इस्लामपूर्व काळातील काही अवशेष आहेत का ते पाहायला पाहिजे.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Mon, 12/07/2015 - 19:42
नवीन
अच्छा एवढं जवळ आहे होय ते? मग असेल तसं. लोकेशन माहिती नव्हते.
- Log in or register to post comments
र
रमेश आठवले
Mon, 12/07/2015 - 21:35
नवीन
प्रचेतस नगरच्या बाबतीत लिहीतात त्याच न्यायाने औरंगाबादचे नाव देवगिरी ठेवायला काय हरकत आहे ? हे लवकर केले पाहिजे. नाहीतर संभाजी नगर चा कॉपी राईट गेल्यामुळे औरंगाबादला आता बाळ ठाकरे नगर असे नाव देण्यासाठी उधोजीराव आणि त्यांचे मावळे चळवळ सुरु करतील .
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Mon, 12/07/2015 - 21:38
नवीन
हायला हे भारी हाय की. उगा धार्मिक वातावरण तापवणार्या सगळ्यांनाच बूच बसेल.
- Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१
Fri, 12/04/2015 - 08:13
नवीन
सगळीकडेच शिवाजी किंवा संभाजी. जरा दुसरी नावे तरी येऊ देत की. महाराष्ट्रात आधीच एक संभाजी नगर आहे.
गोव्याच्या मातीत कोणी नाव देण्यासारखा माणुस जन्माला आलाच नाही का?
- Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस
Fri, 12/04/2015 - 08:27
नवीन
आले की. गोव्याची माती काय वांझ आहे का?
पण ती नांवं देऊन मग वाद कसा निर्माण करता येणार?
मी वर म्हंटल्याप्रमणे ह्या लोकांना हिंदूबहुल उत्तर गोव्यात नामबदल करायचे नाहीत. मुद्दाम ख्रिस्तीबहुल दक्षिण गोव्यात जाउन काड्या करायच्यात!
ज्या प्रांतातली हिन्दू आणि ख्रिस्ती जनता कित्येक वर्षे एकोप्याने रहातेय तिथे हे बाहेरचे जाऊन आगी लावतायत. म्हणून माझा हा सगळा तळतळाट!!
अन्यथा मला ह्यात पडायची गरज नव्हती....
- Log in or register to post comments
प
प्रदीप
Fri, 12/04/2015 - 10:15
नवीन
ज्या प्रांतातली हिन्दू आणि ख्रिस्ती जनता कित्येक वर्षे एकोप्याने रहातेय तिथे हे बाहेरचे जाऊन आगी लावतायत. म्हणून माझा हा सगळा तळतळाट!!
ह्याविषयी वर माझा प्रतिसाद दिलेला आहे. हे नामकरण कुठल्याही भाजपा सरकारने केलेले नाही. सदर नाव मी अनेक वर्षे ऐकत आलोय, त्या नावाच्या पाट्ञा तेथे पहात आलोय. हे नामांतर तेथीलच मगोपाने केले असावे असे मला वाटते.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Fri, 12/04/2015 - 10:25
नवीन
हे रोचक आहे. असे असेल तर फार चूक म्हणवतही नाही.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Fri, 12/04/2015 - 16:10
नवीन
ज्या प्रांतातली हिन्दू आणि ख्रिस्ती जनता कित्येक वर्षे एकोप्याने रहातेय तिथे हे बाहेरचे जाऊन आगी लावतायत. म्हणून माझा हा सगळा तळतळाट!!
पि डां साहेब
याच्याशी मी थोडा असहमत आहे. मी स्वतः साडे चार वर्षे प्रत्यक्ष वास्को मध्ये राहिलो आहे.
आजही दक्षिण गोव्यात हिंदू आणि ख्रिश्चन यांच्यात आपण म्हणता तितके सख्य नाही.
याचे कारण तेथील अर्थ सत्ता ख्रिश्चन लोकांच्या हातात आहे. हि अर्थ सत्ता दोन तर्हेची आहे. हि अर्थ सत्ता टिकवण्यासाठी तेथील ख्रिश्चन नेते आणी त्यांची पिलावळ आपला सवता सुभा सोडायला सहज तयार होणार नाही. यातून स्थानिक लोकांची सुटका नाही. स्थानीक
१) तस्करीतून निर्माण झालेला पैसा -- तस्करी करण्यात बरेच ख्रिस्ती बांधव जे मरीन इंजिनियरिंग किंवा बोटीवर असलेले दर्यावर्दी होते त्यांचा हात होता. सध्या तस्करी तशी थंडावली आहे पण उत्तर गोव्यात येणाऱ्या अमली पदार्थांमध्ये याच लोकांचा मोठ्या प्रमाणावर हात आहे.
उदा. आज ही दक्षिण गोव्यात बाणावली ई परिसरात किंवा क्लब महिंद्र च्या वरका येथे तुम्ही तेथील स्थानिक लोकांकडूनच कार भाड्याने घेणे आवश्यक आहे. एक तर तुमची स्वतःची गाडी असली पाहिजे किंवा त्यांच्या कडूनच त्यांनी सांगितलेल्या दरानेच घेतली पाहिजे. गोव्यातील पणजी किंवा फोंडा येथून गाडी भाड्याने घेऊन येणे शक्य नाही. स्वतंत्र भारतात हा दहशतवाद त्यांनी धर्माच्या नावावर चालू ठेवला आहे. क्लब महिंद्रचा वेबसाईट वरहि पहा.
२) वाहतूकदार-- बस मोटार ई यांची गोव्यातील मक्तेदारी कोकण रेल्वेने बर्यापैकी मोडीत काढली. त्याला त्यांनी जीवापाड विरोध केला.(मुंबई पुणे येथून चालणार्या बससेवा आणी त्यातून बाहेर होणारी दारूची "तस्करी" यातून ते भरपूर मलिदा खात होते.) इतका विरोध केला कि कोकण रेल्वेचा मार्ग मापसा आणी पणजी जवळून जाणार होता तो कोकण रेल्वेच्या "साडे तीन इंजिनांनी" आमच्या पौराणिक चर्चवर परिणाम होईल म्हणून धर्माचा आधार घेऊन आंदोलन केले. त्यावेळचे कोकण रेल्वेचे महा व्यवस्थापक इ श्रीधरन हे खमके होते त्यांनी त्याचा पर्यायी मार्ग शोधून त्याचे सर्वेक्षण एक वर्षात करून कोकण रेल्वे रुळावर आणली . परंतु आजही पणजी किंवा मापसा येथे जाण्यासाठी स्थानिक किंवा प्रवासी माणसाना सुकर अशी बससेवा उपलब्ध होऊ दिली जात नाही.कोकण कन्या महाराष्ट्रात जेथेजेथे थांबते तेथून तिच्या वेळेवर स्थानकातून सुटणाऱ्या एस टी बसेस उपलब्ध आहेत पण अशी सुविधा गोव्यात उपलब्ध करून दिली जात नाही. आजही बाकी गोव्यात बस सेवा यथा तथाच आहे.
तिसरी गोष्ट गोव्यात बरीच सरकारी कंत्राटे श्री मनोहर पर्रीकर येण्याच्या अगोदर या लोकांनी आपल्या हातात ठेवली होती आणी सरकार पाडू या धमकी वर ते वाटेल तेवढा मलिदा खात होते( १९९० ते २००० या दहा वर्षात गोव्यात १२ मुख्यमंत्री (आणी दोन वेळेस राष्ट्रपती राजवट) झाले म्हणजे सरकारे काय स्थितीत होती). इतका कि गोवा राज्य होण्यापेक्षा केंद्रशासीत प्रदेशच बरा होता असे बरेच दिवस तेथील लोक बोलत.
एक उदाहरण. गोव्याला साळावली धरणातून पाणीपुरवठा करण्याची पाईप लाईन दर वर्षी "फुटत"असे आणी दक्षिण गोव्यात आणी पणजीत चार दिवस पाणी नसे. तातडीने" ती दुरुस्त करण्यासाठी सरकार भरपूर पैसे खर्च करत असे. पर्रीकर साहेबांनी आल्यानंतर त्या कंत्राटदाराला सज्जड दम दिल्यानंतर गेल्या कित्येक वर्षात ती पाईप लाईन "फुटलेली" नाही.
अशा धार्मिक गुंडगिरीविरुद्ध लोकांचा आवाज दाबून ठेवलेला होता तो बाहेर पडू लागला आहे. बाकी वास्कोचे नामकरण स्थानिक गोवेकरचे नाव उदा बाकीबाब बोरकर, शणाय गोंयबाब किंवा एखाद्या ख्रिश्चन माणसाचे उदा चार्लस कोरिया https://en.wikipedia.org/wiki/Charles_Correa देऊन केले असते तर हि गुलामगिरीची खुणहि पुसली गेली असती आणी या वादाला धार्मिक वळण देण्याचे गोव्यातील राजकारण्याचे मनसुबे फोल ठरले असते.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Fri, 12/04/2015 - 16:31
नवीन
हा अनुभव मी वारका येथे घेतला आहे. मी आणि हिलरी क्लब महिंद्रच्या शेजारीच असलेल्या वारका पाम बीच रिझॉर्ट मध्ये राहिलो होतो. बाहेर कुठेही जायचे असेल तर या रिझॉर्टवाल्यांकरवीच गाड्या बुक कराव्या लागत होत्या. आणि गाड्यांचे दर प्रचंड महाग होते. आम्हाला काही करून मडगावला जायचे होते.तेव्हा रिझॉर्टबाहेर येऊन अडीच-तीन किलोमीटर चालल्यावर एक रिक्षा मिळाली. परत येताना तो रिक्षावाला रिझॉर्टपर्यंत यायला तयार नव्हता.याचे कारण रिझॉर्टच्या जवळपास तिथले लोक इतर वाहनांना फिरकू देत नाहीत.त्यामुळे परत येतानाही रिझॉर्टपासून एखाद किलोमीटर दूर त्याने आम्हाला सोडले होते.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Fri, 12/04/2015 - 16:34
नवीन
कोकण रेल्वेमुळे गोव्यातील चर्चच्या शांततेचा भंग होतो म्हणून १९९३ मध्ये कोकण रेल्वेचे काम थांबवावे असा प्रचंड दबाव तिथल्या लॉबीने आणला होता. नरसिंह राव सरकारने हे काम काही महिने थांबविलेही होते आणि निवृत्त न्यायमूर्ती ओझा यांच्या अध्यक्षतेखाली याचा अभ्यास करायला समिती नेमली होती. न्या. ओझांनी असे काम थांबवायची मागणी करायला काहीही आधार नाही असा निवाडा दिला आणि त्यानंतर हे काम परत सुरू झाले होते.
- Log in or register to post comments
म
मोगा
Sat, 12/05/2015 - 07:00
नवीन
हिंदु बहुल ( किंवा इतर कोणेही बहुसंख्य असलेल्या ) भागातही अशा स्वार्थी टोळ्या असतात ना ? हे कारण दाखवून तिथल्या भागातही नामांतर करणार का ?
- Log in or register to post comments
प
पक्षी
Mon, 12/07/2015 - 17:00
नवीन
पिवळा ड्यानिएल काकांशी सहमत !!!!
- Log in or register to post comments
प
पक्षी
Mon, 12/07/2015 - 17:02
नवीन
Sorry...गलती से mistake हो गया.. ड्यानिएल एवजी डांबिस असे वाचावे .
- Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस
Fri, 12/11/2015 - 06:45
नवीन
अगर आप ड्यानियल बोलताय तो ड्यानियल!!!
कब्बीसे हमारी मारिया बोल रह्येली हय की ये 'डांबिस, डांबिस, अच्चा नई दिखताय, नाम बदलो!"
अब्बी तुम ड्यानियल सुझाया तो ड्यानियल!!!
हाकानाका!!!
:)
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Fri, 12/04/2015 - 08:31
नवीन
आपल्याला हा नामकरण प्रकारच पटत नाय बॉ. वीटीचे सीएसटी केले, अजून कशाचे काय केले. उगाच? नवीनच स्टेशन बांधले असते इंग्रजांनी बांधलेल्या स्टेशनापेक्षा दहा पट मोठे तर जास्त योग्य वाटले असते. नवीन जागा, इमारती, संस्था, ज्या भारतीयांनी बनवल्या त्यांना द्या भारतीय नावे. जर आधीची विदेशी नावे खटकत असतील तर काही निधर्मी नावे द्या. उगा ज्याला त्याला धार्मिक जातीय तेढीत ओढून नसते वाद निर्माण करायचे.
औरंगाबाद हे शहर औरंगजेबाने वसविले, त्या नावाला विरोध असणार्यांनी नवे शहर वसवावे त्याला संभाजीनगर नाव द्यावे. एवढं करणं कठिण आहे फारच औरंगजेबाच नाव अडकतं तोंडात तर सरळ ओंबाद असं काहीतरी करायचं. उगाच वेळ जात नाही म्हणून रिकामपणाचे उद्योग करत बसतात लोक. शहर राहतंय तसंच बकाल, पाण्याची बोंब दरवर्षी, यांना काळजी नाव बदलायची. काय म्हणून काय लाज नाही लोकांना.
वास्कोचं नाव बदलायच्या वादाबद्दल पिडांकाकांची भूमिका पटते.
- Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस
Fri, 12/04/2015 - 08:44
नवीन
नायतर काय?
जे मुंबई मुळात इंग्रजांनी वसवलं. जिथे मराठ्यांचं राज्य कधीही नव्हतं, तिथल्या इंग्रजांनीच बांधलेल्या व्हीटीला छत्रपती शिवाजी टर्मिनस नामकरण करून काय मोठा पराक्रम केला?
बरं त्याचा उल्लेख करतांना 'छशिट' असा करतात. हा काय शिवाजी महाराजांचा विशेष सन्मान आहे?
त्याहून पुढे म्हणजे विमानतळाला शिवाजीमहारांजं नांव दिलं. काय संबंध?
त्यापेक्षा मुंबई विमानतळाला जेआरडी टाटांचं नांव देणं अधिक समर्पक ठरलं नसतं? भारतीय विमानकलेचा उद्गाता तो!
की जेआरडी भारताचे सुपुत्रच नव्हते?
- Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे
Fri, 12/04/2015 - 10:23
नवीन
हे नामकरण पुण्याचे कलमाडीसाहेब ज्यावेळी केंद्रात रेल्वे राज्यमंत्री होते त्या काळात झाले आहे. वास्तविक बाळासाहेब ठाक-यांचे मत नाना शंकरशेट यांचे नाव द्यावे असे होते.
विमानतळासाठी शिवाजी महाराजांचे नाव देण्यासाठी शिवसेनाच आग्रही होती असे आठवते.
- Log in or register to post comments
प
प्रदीप
Fri, 12/04/2015 - 10:27
नवीन
व्हीटीच्या नामकरणाबाबत मी अगदी १००% सहमत आहे.
पण बाँबेचे मुंबई असे नामकरण झाल्यानंतर आमच्याकडे (म्हणजे मी परदेशातील एका मल्टिनॅशनल कंपनीत तेव्हा काम करत होतो, तेथे) काय झाले ते 'रोचक' आहे. आमच्या कंपनीचे मुंबईत एक कार्यालय होते. हे नामकरण झाल्याझाल्या लगोलग, आमच्याकडील सर्व सहकारी-- त्यात अमेरिकन, ऑस्ट्रेलियन्स, ब्रिटीश व स्थानिक चिनी असे सर्वच-- हे नामकरण अधिकृत रीत्या झाल्यावर त्या शहरास नव्या नावाने संबोधू लागले. पण तेव्हाच एकदा मुंबईमधील एक सहकारी कामानिमीत्त तेथे आला होता. एका ब्रिटीशाने त्याच्याशी बोलतांना, मुंबई असा उल्लेख केल्यावर ह्याचे 'छे! छे! काय ते नवे नाव? आम्ही त्याला अजूनही बाँबे असेच संबोधत रहातो, आणि तसेच करत रहाणार!' असे काहीसे सुरू झाले. अर्थात तिथल्या तिथे त्याचा व माझा ह्यावरून थोडा वाद सुरू झाला. थोडावेळ ही गंमत पाहिल्यावर तो आमचा ब्रिट सहकारी, जो अत्यंत मिश्कील होता, अगदी खास ब्रिट ह्यूमर करता झाला...' पाहिलस प्रदीप, आम्ही तुम्हाला कसं दुभंगून ठेवलंय, ते?'
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Fri, 12/04/2015 - 10:30
नवीन
सहकारी मिश्किल असेल, पण दुर्दैवाने त्याचे हे विधान १००००००००००% खरे आहे.
- Log in or register to post comments
प
प्रदीप
Fri, 12/04/2015 - 10:54
नवीन
आणि ती तर ब्रिट्सांची जुनी खोड आहे, जिथेजिथे ते गेले, तिथेतिथे त्यांनी हेच केले.
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
Fri, 12/04/2015 - 11:26
नवीन
''जिथेजिथे त्यान्नि साम्राज्य स्थापित केले'' असे म्हना...
ते काय तिकीट काढून गेले नव्हते, त्यांनी राज्यकारभार जिंकून घेतलेला, साम्राज्य स्थापित केलेले …
आणि त्या वेळी ऐतदेशीय काय दिवे लावत होते… तर घंटा … बाबाजी का ठुल्लू …
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Fri, 12/04/2015 - 11:30
नवीन
पूर्ण सहमत. त्यामुळे आजदेखील हिटलर-स्टॅलिनवर टीका होते (आणि ती झालीच पा।इजे) पण हे लोक एकदम नामानिराळे राहतात.
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
Fri, 12/04/2015 - 11:41
नवीन
हिटलर स्टालिन ने जर, ब्लिट्झक्रीट सारख्या मानुषसंकारक आक्रमणे न करता, सती प्रथा सारख्या प्रथा बंद केल्या असत्या, रेल्वे तारायंत्रे , शिस्तबद्ध सैन्य (पगारी, जात न पाहता), जातीयवादी राज्यकर्त्यांच्या बंदोबस्त (कोरेगाव भीमा लढाई), पोलिस दल स्थापना (ठग प्रतिबंध , लुटमार /चोरी प्रतिबंध) , सर्वांना (जात न पाहता) शिक्षण, न्यायव्यवस्था, वर्तमान पत्रे अशी कार्ये केली असती, तर त्यांची नावं अत्याचारी म्हणून कोणी घेतली नसती.
शेवटी सत्याग्रहाने लढा देवून मागण्या मान्य करण्याचा विचार हिटलर स्टालिन च्या राजवटीत कोणी केला असता का ?
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Fri, 12/04/2015 - 11:55
नवीन
१. रेल्वे-तारायंत्रे- स्वतःच्या फायद्यासाठी आणलेली यंत्रे आहेत. फुकटचे उपकार नव्हेत ते. अन हे अन्य देशांनीही त्यांच्या कॉलनीजमध्ये केलेले आहे. सो ब्रिटनचा युनिकनेस त्यात नाही. वर्तमानपत्रे हा प्रकारही त्यातलाच.
२. जात न पाहता सैन्य- पानपतात पेशव्यांनी मग गारद्यांची पलटण का घेतली, किंवा पेशव्यांचे काही अंमलदार दलित कसे काय होते हे कळेल का? सैन्यात काय फक्त एकाच जातीचे लोक होते? जरा इतिहास वाचून बघा हो, लै मागणं नाही आपलं.
३. पोलीस दल स्थापना- कोतवाल हा प्रकार ब्रिटिशांनी केलेला नाही. पुणे शहरातील कोतवाली नामक पुस्तक वाचून पहा. अन्य शहरांतही अशी कोतवाली होती.
४. कोरेगाव भीमा- या लढाईचे जे इतके चढवून वाढवून महत्त्व सांगितले जाते ते तितके जास्त आजिबात नव्हते. त्याबद्दल श्रद्धा कुंभोजकर यांचा एक पेपर आहे तो नक्की पहावा. या लढाईचे जनमानसातील स्थान कधीपासून आणि कसे वाढत गेले याचा साद्यंत आणि रोचक इतिहास त्यात आहे. असली सिम्प्लिस्टिक समीकरणे अतिशय हास्यास्पद आहेत. पेशव्यांच्या बाजूलाही जर दलित असतील तर ही लढाई जातीयवादी राज्यकर्त्यांचा बंदोबस्त म्हणून कशी काय सांगता येऊ शकते? उलट ब्रिटिशांनीच मुद्दाम जात पाहून महार बटालियन तयार केली असे का म्हणू नये?
तंत्रज्ञानाचे फार कौतुक तर आजिबातच सांगू नये. १८५३ साली भारतात ब्रिटिशांमुळे रेल्वे आली-मान्य. ते नसते तर आजदेखील आलीच नसती असे म्हणायला नक्की आधार काय आहे? ब्रिटिशपूर्व भारत म्हणजे अनचेंजिंग, त्याच त्या चिखलात रुतून बसलेला हत्ती असं चित्र ब्रिटिशांनी रंगवलं ते अजूनही कितीही रिसर्च झाला तरी जात नाही हेच खरे ब्रिटिशांचे आणि मेकॉलेचे यश आहे.
हिटलर, स्टॅलिन हे जास्तच क्रूर होते, मान्य. पण जगभर केलेल्या गुलामगिरीचा आणि लुटीचा इतिहास तितक्या हिरीरीने का सांगितला जात नाही? ब्रिटिशांनी अमुक एक गोष्ट वाईट केली असे म्हणायचा अवकाश की लगेच लोक अंगावर धावून येतात. सपोर्टिंग अर्ग्युमेंट्स नसली तरीही टकळी चालूच राहते. असे भक्तगण ही ब्रिटिश राजची खरी विरासत आहे हे बाकी मान्य केलेच पाहिजे. अजूनही लोकांना असेच वाटते की ब्रिटिश नसते तर आपण खितपत वगैरे पडलो असतो. मजा आहे, रहा मॅट्रिक्समध्ये. चॉईस अपना अपना.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Fri, 12/04/2015 - 11:58
नवीन
भारतीय शाळातून र्होडेशीयातील वसाहतवादाचा इतिहास शिकवला जायला हवा म्हणजे १८५७ चे महत्व लक्षात येते.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Fri, 12/04/2015 - 12:00
नवीन
हे पाहिले पाहिजे, मला र्होडेशिया ऊर्फ झिम्बाब्वेच्या इतिहासाबद्दल माहिती नाही.
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
Fri, 12/04/2015 - 12:25
नवीन
मी अजुन एक पेर्स्पेक्टिव दिला इतकच....
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Fri, 12/04/2015 - 12:59
नवीन
प्रतिसादात "हे वैयक्तिक घेऊ नये" असे वाक्य घालायचे राहिले.
बाकी लोकांना का वाटतंय त्याची कारणे प्रतिसादात दिलेलीच आहेत.
नामांतरामुळे जर फरक पडणारच नसेल तर त्याला विरोध तरी कशाला करावा इतके सांगा की मग.
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
Fri, 12/04/2015 - 14:01
नवीन
विरोध कशाला तर
पिडाकाका प्रमाणेच माझेही मत खलील्प्रमाणे,
शहराला संभाजी महाराजांचं नांव द्यायचं हयामागे निव्वळ खोडसाळ्पणाखेरीज अन्य काही उद्देश्य असेल असं वाटत नाही.
उगाच आपण आधी कळ काढायची आणी मग विरोध झाला तर फुकटचा कांगावा करायचा याला काय अर्थ आहे?
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Fri, 12/04/2015 - 14:06
नवीन
हे नामांतरण आजकालचं नसून अगोदरही त्यासंदर्भात हालचाली झालेल्या आहेत असे दिसते, तेव्हा खोडसाळपणा असे म्हणवत नाही.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Fri, 12/04/2015 - 22:03
नवीन
मराठवाडा विद्यापीठ, पुणे विद्यापीठ वगैरे नावांनी काय घोडं मारलं होतं मग ;)
- Log in or register to post comments
ह
होबासराव
Fri, 12/04/2015 - 12:27
नवीन
+११११११
संपुर्ण शिक्षण पद्धतीचच ते यश आहे :)
बाकि सत्याग्रह करुन मागण्या मान्य केल्या...हे वाक्य तितकेच खरे आहे जितके ते गाणे...दे दी ह्मे आझादि बिना खड्ग बिना ढाल...
जे असंख्य लोक फासावर चढले...असंख्य अत्याचार सहन केले...कइ लोग तो गुमनामि के अधंरे मे खो गये...त्यांच काय ? खरच वेडे होत ते वेडे.
- Log in or register to post comments
म
मोगा
Sat, 12/05/2015 - 07:31
नवीन
माई मोड ऑन ...
अगदी बरोबर रे ब्याटम्यान्या ! इंग्रजानी फोन , रेलवे त्यांच्या फायद्यासाठी आणली. टिपु सुल्तानने क्षेपणास्त्रे स्वतःच्या फायद्यासाठीच तयार केली. मोघलांचा लाल किल्ला , प्रशासन सगळं त्यांच्याचसाठीच होतं.
हे लॉजिक फक्त मुसुलमान व ख्रिश्चनानाच की हिंदु राजांच्या गड , किल्ले , गनिमी काव्यालाही लावायचं ? असं आमचे हे विचारत होते.
माई मोड ऑफ
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Mon, 12/07/2015 - 01:10
नवीन
सर्वांनाच लाव की मोग्या. सर्वांनाच हे लॉजिक लाव. पण अगदी अत्याचारी वगैरे मुघल म्हटले तरी ते भारतातला पैसा कुठे इराणतुराणात नेत नव्हते. हे ब्रिटिश मात्र बाहेर पैसा न्यायचे म्हणून चार श्या त्यांना जास्त बसतात इतकेच.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Sat, 12/05/2015 - 07:56
नवीन
दुर्दैवाने ब्रिटिश राज्य म्हटले की एकतर ब्रिटिशांनी सगळे काही चांगले केले असे म्हणणारे लोक दिसतात नाहीतर ब्रिटिशांनी सगळे नुकसानच केले असे म्हणणारे लोक दिसतात. मला वाटते की याविषयी थोडा अधिक न्युअन्स्ड विचार व्हायला हवा.
तंत्रज्ञान येते ते आकाशातून पडत नसते. तंत्रज्ञान येते, रूजते आणि प्रगत होते तेव्हा त्यामागे कुठल्या तरी पायरीवर बरीच मोठी गणिताची आणि शास्त्राची बैठक असते. प्रत्येक वेळी अशी बैठक आधी तयार होते आणि मग प्रगती होते असेही नाही. अनेकदा आधी अॅप्लिकेशन येते आणि मग त्यामागचे शास्त्रीय कारण सादर केले जाते (उदाहरणार्थ विमान पहिल्यांदा उडले आणि बाऊंडरी लेअर ही संकल्पना आणि त्यातून एरोडायनॅमिक्स जन्माला आले नंतर). पण त्यानंतरची वाटचाल मात्र दोन्ही गोष्टी हातात हात घालून किंवा थोड्याफारच मागेपुढे असतात (बाऊंडरी लेअर सेपरेशन हा प्रकार आणि सुपरसॉनिक विमाने या गोष्टी थोड्याफार तशाच). सुरवातीला रेल्वे म्हणजे स्टीम इंजिनावर चालणार्या होत्या.स्टीम इंजिन आणणे म्हणजे थर्मोडायनॅमिक्समधली बैठक काही प्रमाणावर तरी तयार झालेली असली पाहिजे. तसेच इतर अनेक तंत्रज्ञानांविषयी लिहिता येईल. ती भारतात होती का किंवा त्या दिशेने पावले तरी पडत होती का हा प्रश्न आहे.
भारतीयांनी शून्याचा शोध लावला वगैरे सर्व ठिक आहे. एकेकाळी पायथागोरसचा सिध्दांतही भारतीयांना माहित होता असे म्हटले जाते. दिल्लीतला स्तंभ म्हणजे भारतीयांनी मेटालर्जीमध्ये प्रचंड प्रगती केली होती त्याचे उदाहरण आहे. असेलही. त्या बर्याच जुन्या गोष्टी झाल्या.पण तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी जे गणित लागते त्या कॅल्क्युलसमध्ये (विशेषतः डिफरन्शिअल इक्वेशन वगैरे) भारतीयांची प्रगती मधल्या काळात नक्की किती होती?
अगदी १८९९ मध्ये (म्हणजे ब्रिटिश राज भारतात आल्यानंतर कित्येक वर्षांनंतर) शाहू महाराजांसाठी वेदातले मंत्र म्हणावेत की पुराणातले या क्षुल्लक गोष्टीवर कित्येक वर्षे खल चालू होता. त्यात अगदी लोकमान्य टिळकांसारख्यांनीही उडी घेतली होती. पु.लंच्या बिगरी ते मॅट्रिकमध्ये प्राथमिक शाळेतील गणितावर गोपाळकृष्ण गोखल्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा उल्लेख आहे. म्हणजे १९ व्या शतकाच्या शेवटी/२० व्या शतकाच्या सुरवातीला भारतातील एक आघाडीच्या व्यक्ती प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पुस्तक लिहित होती. त्या उलट Philosophical Transactions of Royal Society of London सारखे जर्नल अगदी १६६५ पासून प्रसिध्द केले जात आहे. फोरिअरने त्याच्या फोरिअर सिरीजचा पेपर पहिल्यांदा सबमिट केला होता (१८०७ साली) तेव्हा "Lack of rigor" या कारणाने तो पेपर पहिल्यांदा रिजेक्ट केला होता असेही वाचले आहे. तेव्हा आपण किती शतके मागे होतो हे समजून यायला हरकत नसावी.
तंत्रज्ञान ब्रिटिशांनी त्यांच्या फायद्यासाठी आणले हे नक्कीच.आणि ब्रिटिश नसते तर आजही आपण बैलगाडीने प्रवास केला असता हे म्हणणेही अतिशयोक्तीपूर्ण आहे हे पण नक्कीच.पण ब्रिटिश येण्यापूर्वी अशी तंत्रज्ञानाची प्रगती व्हायला लागणारी बैठक आपल्याकडे होती असे म्हणता येईल असे वाटत नाही. आणि ब्रिटिश आल्यामुळे ती प्रक्रीया बरीच expedite झाली हे पण नाकारण्यात काही अर्थ नाही.
राजकीय आघाडीवर ब्रिटिश येण्यापूर्वी भारत म्हणजे हे एक ओपन ग्राऊंड होते. कोणीही यावे आणि हात धुऊन न्यावेत अशीच भारतीयांची परिस्थिती होती. आणि ब्रिटिश म्हणजे कोणीतरी परके असे म्हणण्यापेक्षा तत्कालीन विविध राजेरजवाड्यांच्या रस्सीखेचीच्या राजकारणातील इतर खेळाडूंप्रमाणे एक खेळाडू असेच त्यांच्याकडेही बघितले जात होते असे म्हटले तरी चुकीचे ठरू नये. अगदी नानासाहेब पेशव्यांनीही अंग्र्यांचे आरमार बुडवायला ब्रिटिशांचीच मदत घेतली होती.मागे एकदा याविषयी लिहिलेही होते. आपले भारतीय लोकच आपापसात इतके भांडत असतील तर ती परिस्थिती कोणीतरी परका येऊन आपल्यावर राज्य करायला अत्यंत अनुकूल होती.अशा परिस्थितीत पोर्तुगीज किंवा स्पॅनिश लोकांचे भारतावर राज्य न येता ब्रिटिशांचे राज्य आले ही गोष्ट त्यामानाने चांगलीच झाली.
आपल्याकडे एक गोष्ट फार वाईट असते. हे असे काही लिहिले की काळा इंग्रज, मेकॉलेचे गुलाम इत्यादी इत्यादी विशेषणांची सरबत्ती ते लिहिणार्यावर सुरू होऊन जाते. असला प्रकार वस्तुनिष्ठ अभ्यासाच्या दृष्टीने नक्कीच चांगला नाही.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Sat, 12/05/2015 - 08:24
नवीन
तुमच्याशी बहुतांशी सहमत आहे.
थोडासा ह्यासाठी असहमत की इंग्रजांनी भारतीय इतिहासासोबत नक्की काय घोळ घालून ठेवलेत आपल्याला माहित नाहीत. ही पण एक बिग बँगसारखी थेरी म्हणा हवं तर, की १३ अब्ज वर्षांआधी काय होते नक्की सांगता येत नाही. इंग्रज १८१८ पासून १८४७ च्या मध्यरात्रीपर्यंत देशाचे निरंकुश सत्ताधारी होते. त्यांनी उपलब्ध इतिहासाची प्रचंड मोडतोड केल्याचे पुरावे आहेत. पण कोणत्या इतिहासाची काय मोडतोड केली ह्याचे नाहीत. उदा. (गंमत म्हणून असे समजूया की) 'आज आम्ही औषधशास्त्रावरचे सगळे ग्रंथ जाळून नष्ट केले व ते सगळे ज्ञान चोरून अमेरिकेत आणले' असे लिहिलेला एखादा दस्तावेज कोणी बनवून ठेवणार नाही. महाराष्ट्रातला एकही किल्ला सुस्थितीत नाही, सोने-मौल्यवान वस्तू तर जहाजांचे तांडे भरून नेल्यात त्याची गणतीच नाही. इंग्रज नुसतेच सत्तापिपासू नव्हते तर धूर्त व दूरदर्शीसुद्धा होते. जेव्हा आपण आज मागच्या साडेतीनशे वर्षांच्या इतिहासाकडे बघतो तेव्हा हे आले, ते गेले, मग ते आले हे गेले वैगेरे दिसते पण इंग्रज जेव्हा इथे पाय रोवून उभे राहिले तेव्हा आपण फक्त दिडशे वर्ष सत्ता करू असे ठरवून आले नव्हते. आपण कायम सत्ता करू असेच ठरवून आले होते. तेव्हा सगळ्या हालचालींना ह्याच उद्देशाने बघणे क्रमप्राप्त ठरते. त्यासाठी इंग्रजांनी भारताच्या इतिहासाची भयानक पद्धतीने मोडतोड केली की जी कुठे रेकॉर्ड होऊ शकली नाही. त्याकाळानुसार ते शक्य नव्हते. कुणी चारशे वर्षे जगलेला अन सर्वकाही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेला महात्मा पुढे आला तरच तो सत्य सांगू शकेल. बाकी उपलब्ध पुरावे हे मोजकेच असावे, ज्यायोगे मोजकेच निष्कर्ष काढता यावे अशी व्यवस्था त्यांनी करून ठेवली असे तर नसेल? हा प्रश्न मला इतिहासासंदर्भात पडत आला आहे. म्हणजे आपण तटस्थ भूमिकेतून पाहिले तरी इंग्रजांच्या आधी भारत खरोखर कसा होता ह्याचे सुतराम चित्र उभे राहत नाही.
इथल्या दिग्गज इतिहासतज्ञांच्या तुलनेने माझे ज्ञान तोकडे आहे. परंतु हा प्रश्न मला नेहमीच पडत आलाय की जे सत्य म्हणून आपल्या समोर नेहमी मांडले गेले आहे ते सत्यच आहे ह्याचा पुरावा काय? कारण खरे इतिहासकार हे पुराव्यांचे गुलाम असतात. त्यांना दंतकथा, आख्यायिका वैगेरेशी घेणेदेणे नसते. ह्या तटस्थपणाच्या वैशिष्ट्यामुळेही काही नुकसान झाले आहे काय? यादृष्टीकोनातूनही कोणी संशोधन केले असेलच. मार्गदर्शन करावे.
(चित्रांवरून आठवले, ह्या युरोपिअन समुद्रीचाच्यांसोबत बरेच चित्रकार वैगेरे यायचे, त्यांनी काढलेल्या भारताच्या चित्रांबद्दल कुठे माहिती मिळेल काय?)
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Sat, 12/05/2015 - 09:55
नवीन
बरोबर आहे. भारतीयांनी पूर्वी प्रगती बरीच केली होती पण ती व्यवस्थित डोक्युमेन्ट केली नाही असा एक मतप्रवाह आहे आणि दुसरा मतप्रवाह असा की मुसलमानी आक्रमणात सगळ्या ग्रंथांची जाळपो़ळ झाली आणि त्यामुळे जे काही डोक्युमेन्टेशन झाले होते ते गेले. खरेखोटे माहित नाही. पण काहीही असले, कोणत्याही कारणाने असले तरी अशी शास्त्रीय प्रगती करायला लागणारी बैठक १८०० सालच्या ३००-४०० वर्षे होती का हा प्रश्न आहे. तशी बैठक फार पूर्वी असेलही पण प्रश्न ब्रिटिश राज्यकर्ते व्हायच्या पूर्वीचा म्हणजे १७५०-१८०० च्या काळातला आहे. त्या काळात नक्की काय झाले हे सांगता येत नसले तरी नंतरच्या काळात काय झाले त्यावरून काहीतरी आडाखे बांधता येतीलच ना? त्यातून तरी फारसे उत्साहवर्धक चित्र उभे राहत नाही. केंब्रिज वगैरे १३ व्या शतकापासून असले तरी सुरवातीला ते विज्ञानाच्या अभ्यासापेक्षा तत्वज्ञान-धर्म यांच्या अभ्यासासाठीचे केंद्र होते. तरीही १७ व्या शतकापर्यंत न्यूटनसारखे विद्यार्थी तिथून घडले होते. अशा प्रकारचे नक्की कुठले अभ्यासाचे केंद्र भारतात त्याकाळी होते? नक्की कुठली जर्नल भारतातून निघत होती? बर्नुली, बेसेल, फोरिअर सारखे किती गणिती भारतातून त्या काळात झाले? अशा घडामोडी व्हायला लागणारी स्थिरता आपल्याकडे नव्हती हे एक मोठे कारण आहेच.तरीही पुढे तंत्रज्ञान निर्माण व्हायला लागणारा पाया भारतात (कुठल्याही कारणाने का होईना) बनू शकला नाही हे पण तितकेच खरे.
अवांतरः हा प्रतिसाद लिहायला संदर्भ म्हणून थोडी खोदाखोद केली तेव्हा समजले की रॉयल सोसायटी ऑफ लंडनची स्थापना १६६० मधली. या संस्थेने शास्त्रातील विविध क्षेत्रांमधील शोधांबद्दल कोपली मेडल म्हणून मेडल द्यायला सुरवात केली १७३१ पासून. बेंजामिन फ्रॅन्कलीन हा अमेरिकेच्या सुरवातीच्या संस्थापकांपैकी (फाऊंडिंग फादर्स) एक होता तसाच तो एक शास्त्रज्ञही होता.त्याचे इलेक्ट्रिसिटीच्या क्षेत्रात सुरवातीचे काम केले होते. त्याला १७५३ चे कोपली मेडल दिले गेले होते. म्हणजे अशा प्रकारच्या कामाचे महत्व जाणून, त्याला मान्यता आणि पुरस्कार देऊन उत्तेजन देणे हे प्रकार ब्रिटिशांनी इतक्या पूर्वीपासून केले होते. तंत्रज्ञानाची प्रगती तिकडे झाली ती याच बेसवर झाली होती. तो बेस आपल्याकडे नसताना अचानक हवेतून कशीकाय प्रगती आपल्याकडे होणार होती हे त्या भगवंतालाच माहित. पण होते असे की असे काही प्रश्न विचारले की "हा बघा काळा इंग्रज आला" अशा प्रकारचेच रिमार्क अनेकदा केले जातात. यातून शॉव्हिनिझम सुखावण्यापलीकडे फार काही निष्पन्न होत नाही.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Sat, 12/05/2015 - 12:31
नवीन
ढोबळमानाने भारतीय मानसिकतेचे सरळ दोन भाग पडतात. एक अस्मितेचे झेंडे मिरवणारे, दुसरे नेटीवांना शिव्या घालून साहेबांचे गुणगान करणारे. थोडे वंशश्रेष्ठतेच्या अंगाने जाणारे वाटते. तटस्थ भुमिकेतून एखादा काही मत मांडत असेल तरी ते-विरूद्ध-आम्ही असाच सामना असल्याने कुणाच्या तटस्थपणाला काय रंग लागेल सांगता यायचे नाही.
समाजाला प्रगती करायची तर शांतता वा तसे वातावरण लागते असे आपले मत. पण त्याकाळात युरोपखंडातही भारतापेक्षा वेगळी स्थिती होती असे वाटत नाही. म्हटलं तर तेराव्या शतकापासून अठराव्या पर्यंत सगळ्या जगातच अनागोंदी सुरू होती. तरी नेमके युरोपियन्स-इन्ग्लिश माणसे वैज्ञानिक क्रांती कशी करू शकली हे (माझ्या मते) एक गूढ आहे.
बाकी गुप्तकाळातल्या भारतीय प्रगतीबद्दल आपले काय मत आहे?
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Sat, 12/05/2015 - 12:56
नवीन
बरोबर. युरोपातही युध्दे चालत होती, अनागोंदी होती, गॅलिलिओ-कोपर्निकस सारख्या शास्त्रज्ञांना चर्चने भरपूर त्रास दिला होता तरीही शास्त्रीय प्रगती कशी झाली हे गूढ आहेच.
माझे मत वेगळे कसे काय असणार? गुप्तकाळ म्हणजे भारताचे सुवर्णयुगच होते की. ते कसे काय आणि कशाबद्दल नाकारायचे? माझा मुद्दा ब्रिटिश येण्यापूर्वीच्या ३००-४०० वर्षांबद्दल आहे. ज्या काळात युरोपात शास्त्रीय प्रगतीचा पाया रचला जात होता आणि नंतर त्यांना या पायाचा प्रचंड फायदा झाला त्या काळात मात्र भारतात तसे काही होत होते असे वाटत नाही.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Sat, 12/05/2015 - 13:41
नवीन
गुप्तकाळाबद्दल मत विचारण्याचे कारण की मी तरी इतिहासाकडे आवर्तनांच्या प्रतिमांनुसार पाहतो. इंग्रजपूर्व काळाबद्दलचा तुमचा दृष्टिकोन तसाच आहे हे ध्यानात आलं.
संस्कृती निर्माण होतात, बुडतात. त्यात काय होतं, काय नव्हतं ह्या चिकित्सेला तसा मोठ्या कालखंडाकडे बघितलं तर अर्थ राहत नाही. कारण आज जे वर आहे ते उद्या खाली जाणारच. पण जे आज खाली गेलंय ते कधी काळी उंचावर होतं हे मानायला तयार नसलेले काही लोक (तुम्ही नाही) इंग्रज व इंग्रजपूर्व काळाचा दाखला देऊन भारतीयांना अपमानित करण्याचा प्रयत्न करतात.
३००-४०० वर्षांच्या ह्या काळात नेमके काय झाले असावे ह्यावर अभ्यासपूर्ण चर्चेसाठी दुसरा धागा काढायला लागेल.
धन्यवाद!
- Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य
Mon, 12/07/2015 - 10:15
नवीन
गूढ बिढ नाही हो तंत्र वैज्ञानिक प्रगती एक्स्प्लोरेशन, अधिक आधुनिक व विध्वंसक शस्त्रे आणि अधिक पैसा कसा मिळवावा ह्या हेतूने झाली असावी. एज ऑफ एक्स्प्लोरेशन, ज्ञानाचा स्फोट अथवा रेनेसां आणि युरोपिअन साम्राज्यवाद अगदी हातात हात घालून आले.
ब्रिटीश येण्याआधी; भारतात, त्याकाळी हाणून मारा करणारे सुलतान आणि समिन्द्रावर गेलास म्हणून बहिष्कृत करणारे धर्ममार्तंड होते. कोणासही 'साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं माहाराज्यमाधिपत्यमयं' करावे असे काही वाटतच नव्हते. मग काय जे जे होईल ते पाहावे राहावे चित्ती असु द्यावे समाधान!
- Log in or register to post comments
र
राही
Sat, 12/05/2015 - 10:25
नवीन
ब्रिटिशांनी त्यांचा साम्राज्यविस्तार केला हे खरेच पण भारतात अर्वाचीन इतिहासशास्त्र, उत्खननशास्त्र, पुरातत्त्व, नाणेशास्त्र यातल्या अभ्यासाची मुहूर्तमेढही त्यांनीच रोवली. ब्राह्मी लिपी वाचनामुळे अशोकाच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब झाले. महावंशातील देवानाम् पिय पियदस्सी चा उलगडा झाल्याने एक मोठे दालन इतिहासाच्या अभ्यासकांसाठी खुले झाले. अंबरनाथ येथील शिवालयाचे अगदी तपशीलवार सर्वेक्षण कित्येक आराखड्यांसह, मोजमापांसह एकोणिसाव्या शतकात ब्रिटिशांनी करून ठेवले आहे. तेथे भव्य पुष्करिणी होती हे या आराखड्यांवरून स्पष्ट झाले. जेम्स प्रिन्सेस, कनिंगहॅम, कर्झन इत्यादि अनेक ब्रिटिशांनी या शास्त्रांमध्ये पायाभूत आणि अमूल्य काम करून ठेवले आहे. सांचीच्या स्तुपाचे अवशेष ब्रिटिशांनी पुरातत्त्व म्हणून ओळखले आणि जतन केले. (या स्तुपाच्या विटा आणि चिरे बनारसच्या राजाचे दिवाण जगजितसिंह यांनी आपल्या वाड्यासाठी वापरल्या होत्या.) या विषयी थोडीफार माहिती येथे मिळेल.
ब्रिटिशांनी सामरिक महत्त्वाच्या स्थळांची (किल्ले, तटबंद्या आदि) तोडफोड केली हे खरेच पण प्राच्यविद्येला उजाळाही त्यांनीच दिला. म्हणजे वसाहतींच्या स्थिरीकरणाच्या विरोधातली संभाव्य धोकास्थाने त्यांनी उद्ध्वस्त केली पण इतर नागरी आणि सांस्कृतिक बाबीत उदारमतवाद जोपासला असे म्हणता येईल.
- Log in or register to post comments
र
राही
Sat, 12/05/2015 - 10:58
नवीन
प्रतिसादातल्या महावंश या शब्दाऐवजी दीपवंस हा शब्द वाचावा.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Sat, 12/05/2015 - 12:33
नवीन
माहितीपूर्ण प्रतिसादासाठी धन्यवाद!
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sat, 12/05/2015 - 12:51
नवीन
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Sat, 12/05/2015 - 14:38
नवीन
अवांतर :
संदीप डांगे,
इंग्रज भारताचे निरंकुश सत्ताधारी कधीच नव्हते. कारणे येणेप्रमाणे.
१.
भारतात अनेक संस्थाने होती. त्या सर्वांच्यात भारतातली सुमारे ३/४ जनता आणि २/३ प्रदेश होता. यांवर इंग्रज सरकारची हुकुमत चालत नसे. १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धानंतर इंग्रजांनी संस्थानिकांच्या सत्तेत हस्तक्षेप करायचं टाळलं.
२.
वंगभंगाची चळवळ एव्हढी पेटली की बंगालात इंग्रज शासन उरलंच नव्हतं. १९०४ ते १९११ हिंदूंनी असं काही आंदोलन चालवलं की १९११ साली बंगालची फाळणी तर रद्द झालीच शिवाय १९१२ साली इंग्रजांना भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीस हलवावी लागली. कारण तेच. बंगालात कोणत्या क्षणी कसला घातपात होईल याची कुणालाच कल्पना नव्हती.
३.
पुढे १९२१ सालापासून असहकार आंदोलनास सुरुवात झाली. ते तर वंगभंगापेक्षाही भयंकर रीत्या पेटलं. चौरीचोरा येथे २२ पोलिसांना जमावाने जाळून मारलं. पण नेमक्या याच कारणाने मोहनदास गांधीने ऐन वेळेस आंदोलन मागे घेऊन बट्ट्याबोळ केला. अहिसा परमो धर्म:. इंग्रजी इतिहासकार गांधींचा उदोउदो उगीच नाही करंत.
असो.
सांगायचा मुद्दा काय की इंग्रज भारताचे निरंकुश शासक कधीच नव्हते.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- ›
- »