Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वास्को -दा-गामा चे नामांतर आणि गोवेकरांची मानसिकता

उ
उडन खटोला
Fri, 12/04/2015 - 02:17
🗣 384 प्रतिसाद
http://www.heraldgoa.in/Goa/Has-Vasco-da-Gama-been-renamed-Sambhaji/96346.html मी नुकताच Goa Speaks या फेसबुक समुहावर गेलो असता तेथे "वास्को-दा-गामा" शहराचे नामांतर गोवा भाजप सरकारने "छत्रपती संभाजीनगर " असे केल्याचे समजले. त्यावरून काही पोर्तुगीज ख्रिश्चन (?) मंडळी तावातावाने भांडत होती ... अगदी संभाजी महाराजांच्या सात पिढ्यांचा उद्धार करून Who the F*** is Sambhaji ? What is his contribution to Goa? वगैरे वगैरे चिखलफेक सुरू होती ... मी मराठी संस्थळावरील "आमचे गोय " ही लेखमालिका वाचलेली असल्याने गोव्याच्या इतिहासाची थोडीफार ओळख होती . त्यामुळे यथाशक्ती उत्तरे देण्याचा प्रयत्न करून पोर्तुगीजांनी केलेले अत्याचार वगैरे दाखले दिले ... पण पूर्णपणे आङ्ग्लाळलेल्या चंगळवादी गोवन नवीन पिढीने चिखलफेक सुरूच ठेवली ... आणि पोर्तुगीजांनीच "इंडियन्स"ना civilized बनवले .... अगोदर तुम्ही गावठी बैलगाडीवाले होतात वगैरे नेहमीचे प्रतिवाद सुरू झाले ... गोव्यात पोर्तुगीज पासपोर्ट घेवून परदेशी पलायन करणार्‍यांची संख्या बेसुमार वाढत आहे ... अधिकृतरीत्या सुमारे 15000 तर अंनधिकृतरीत्या सुमारे 3 ते 5 लाख लोकांनी पोर्तुगीज पासपोर्ट घेतलेले असून बर्‍याच जणांकडे तर भारत आणि पोर्तुगीज असे दोन्ही पासपोर्ट आहेत , जो गुन्हा आहे.. भारतात विलीन होवून 55 वर्षे झाली तरी गोवेकरांमध्ये " भारतीयत्व " रुजलेच नाही असे म्हणावे का?

प्रतिक्रिया द्या
66568 वाचन

💬 प्रतिसाद (384)
न
नाव आडनाव Sun, 12/06/2015 - 05:06 नवीन
शिवाजी महाराज जनतेचा राजा होता आणि त्यांची खरी वारसदार सर्वसामान्य भारतीय जनताच आहे. क्या बात! मोगा साहेबांना उत्तर मिळालं असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
ह
होबासराव Fri, 12/04/2015 - 15:13 नवीन
हाssssड
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 12/04/2015 - 16:09 नवीन
अशा वैचारिक जनतेच्या क ल्याणाच्या धाग्याचा रोजचा आढावा ( अधिवेशनातल्या कामकाजाचा करतात तसा ) इथे आणि खरडफळ्यावर प्रकाशित करणयात यावा.
  • Log in or register to post comments
क
कविता१९७८ Fri, 12/04/2015 - 16:51 नवीन
प्रत्येक राज्यात त्या त्या राज्यातील सन्माननीय व्यक्तींच्या नावाचा वापर करणेच योग्य आहे. उद्या कुणी छञपती शिवाजी टर्मिनसचं नाव बदलुन एखाद्या कानडी सन्माननीय व्यक्तीचं नाव ठेवलं तर ते आपल्या महाराष्र्टीयन्सना कीतपत पटेल?? आंदोलनं आणि तोडफोड होण्याची शक्यताच जास्त.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 12/04/2015 - 18:14 नवीन
एकदम बरोबर कविता तै, धागा लेखास आलेल्या बहुतेक प्रतिसादकांना वास्को द गामाच्या नावा बाबत हेच म्हणायच असाव बहुतेक प्रतिसादकांचा संभाजी महाराजांचे नाव असावा असा आग्रह नाही पण 'वास्को द गामा' भारतीय नव्हता भारतासाठी एक आक्रमक होता स्वातंत्र्य मिळाल्या नंतरही एवढ्या वर्षांनी त्याचे नाव गळ्यात बांधून फिरण्याचेही फारसे प्रयोजन दिसत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८
अ
अगम्य Sun, 12/06/2015 - 04:53 नवीन
संभाजी राजांचा गोव्याशी खूप मोठा संबंध आहे. त्यांनी गोव्यावर स्वारी करून जवळ जवळ सर्व गोवा पोर्तुगीझांकडून मुक्त केला होत. पोर्तुगीज केवळ तीस गावांच्या समूहावरच्या जागेवर राहिले होते. त्यानंतर राजांना स्वारी पूर्ण करून पोर्तुगीझांना पूर्णपणे हाकलणे जमले नाही. तरी, गोव्याच्या पोर्तुगीझानविरुद्धच्या संग्रामातील एक महत्त्वपूर्ण सेनानी म्हणून संभाजी राजांचे योगदान acknowledge केले तर ती चांगलीच गोष्ट आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८
उ
उडन खटोला Mon, 12/07/2015 - 14:16 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अगम्य
स
संदीप डांगे Fri, 12/04/2015 - 17:16 नवीन
गोवामुक्तीसंग्राम परत करायला लागेल असे वाटते काही प्रतिसाद वाचून.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Fri, 12/04/2015 - 17:32 नवीन
म्हात्माजी, न्हेरू, इंद्राजी, रजीव... या सर्वांच्या नावानं खूप काही झालंय, त्या बिच्च्चार्‍या राहुलबाळाच्या नावानं मात्र काही नाही. तस्मात वास्को गावाला राहुल नगर हे नाव अगोदरच देऊन टाकायला हवे होते, आता (सध्यातरी) उशीर झालाय म्हणायचा. कदाचित त्याचेही अच्छे दिन येतील, कुणी सांगावे ? असे केले, की गोवेकरांमधे भारतीयत्व रुजलेच समाजा.
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Fri, 12/04/2015 - 18:26 नवीन
अच्छे दिन येतील तेव्हा सोनिया नगर 1. राहुलबाबा पेक्षा शिनेर, वहिवाटे नुसार 2. नवीन नाव ख्रिश्चन असल्याने, धार्मिक रंग देता येणार नाही. (halu ghene)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
प
पैसा Fri, 12/04/2015 - 17:45 नवीन
मी मोबाईल वरून काही लिंक देऊ शकत नाहीये. आमच्या टीम गोवाच्या "आमचे गोंय" मालिकेचे इंक्विझिशन वास्को आणि मराठी साम्राज्याचे भाग वाचा बघू. गोव्याशी शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचा काय संबंध होता याची निदान कल्पना येईल. २ दिवसांनी धागा वर राहिला तर येते परत. बाकी फोरमवर वाकडे तिकडे बोलणारे लोक सगळीकडेच असतात. इथेही सापडतील. त्यावरून बहुसंख्य गोवेकर किंवा एखाद्या particular धर्माचे लोक तसे असतील असे मत बनवू नका. गोव्यात सरकारतर्फे शिवजयंती साजरी होते. त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्रीच हजर असतात. ते उगीच नव्हे. त्या जुन्या राजवटींच्या काळात गोवा हे वेगळे राज्य समजले जात नव्हते. तेव्हा शिवाजी संभाजी राजे फक्त महाराष्ट्राचे हे गृहितक आधी डोक्यातून काढा.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 12/04/2015 - 18:36 नवीन
पै तै आल्या नंतर नेमका दुवा देतील तो पर्यंत जिज्ञासूंसाठी टिम गोवाचे दोन दुवे देतो आमचे गोंय - भाग ५ - शिवकाल आणि मराठेशाही टिम गोवा यांचे सर्व लेखन त्या जुन्या राजवटींच्या काळात गोवा हे वेगळे राज्य समजले जात नव्हते. तेव्हा शिवाजी संभाजी राजे फक्त महाराष्ट्राचे हे गृहितक आधी डोक्यातून काढा. हा मुद्दा आणि शिवाजी महाराज आणि संभाजी राजांचे गोवा परकीय सत्तेपासून स्वतंत्र करण्यासाठीचे योगदान सुस्पष्ट दिसत असताना ते नाकारणे म्हणजे गोव्याच्या प्रथम स्वांतत्र्य सेनानींचा शुद्ध अपमान आहे. इतरांच्या नियमाने शिवाजी महाराज आणि संभाजी राजेंचा प्रभाव मुख्यत्वे पश्चिम महाराष्ट्र कोकण असा असता विदर्भ आणि मराठवाड्याने नाकारावयास हवे पण विदर्भ किंवा मराठवाड्यातील लोकांच्या मनी मानसी ही असे कदापी येत नाही मग गोव्याच्या जनतेने असे मनात का आणावे ? लोकमान्य टिळक म्हणतात तसे खरेतर शिवाजी महाराजांना महाराष्ट्रापुरतेही बंदीस्त करता येत नाही शिवाजी महाराज सर्व अर्थाने आदर्श राष्ट्रपुरुष होते. नेहरुंच्या आणि इंदिरागांधिंच्या नावाच्या गोष्टी राष्ट्रीय नेते म्हणून गोव्यात असू शकतील तसे तत्कालीन स्वांतत्र्यासाठी झगडणारे राष्ट्रीय नेते याच नात्याने शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचे ही गोव्यावर तेवढाच आधीकार बनत असावा असे वाटते. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
न
निनाद मुक्काम … Fri, 12/04/2015 - 22:21 नवीन
+१११११११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
न
निनाद मुक्काम … Fri, 12/04/2015 - 23:00 नवीन
गोव्यात राहणाऱ्या प्रतिसाद वाचला आता त्यामुळे प्रतिवाद घालत नाही. गोवा टीम मुळे मिपाकरांना गोव्याचा इतिहास मराठेशाहीचा संबंध लक्षात आला. अवांतर मद्रास चे चेन्नई नामांतर लोकांच्या जिभेवर रुळले मात्र बॉंबे चे मुंबई का नाही रुळत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
स
सुबोध खरे Sat, 12/05/2015 - 05:23 नवीन
मुंबईतील मराठी आणी गुजराती लोक आधीपासूनच मुंबई म्हणत आले आहेत.कोकणातही लोक मुंबईच म्हणतात. मुंबई बाहेरचे लोकच (यात पुणेकरही आले) आपण "सॉफिस्टीकेटेड" आहोत हे दाखविण्यासाठी "बॉम्बे" म्हणतात. यात मुम्बईतील अर्धआंग्ल आणि RNI( RESIDENT NONINDIANS निवासी अभारतीय) सुद्धा समाविष्ट आहेत. सर्व शासकीय पत्रके आणी अधिकृत भाषा यात उल्लेख मुंबईच आहे. एस ती वर सुद्धा पाट्या मुंबई - रत्नागिरी मुंबई कोल्हापूर अशाच असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
ब
बोका-ए-आझम Sat, 12/05/2015 - 07:23 नवीन
फुटलो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
मृत्युन्जय Sat, 12/05/2015 - 10:26 नवीन
पुण्याचा उल्लेख आला म्हणुन सांगतो, पुणेकर मुंबईला मुंबईच म्हणतो. बॉम्बे म्हणुन मुंबईला अजुन तुच्छ लेखता आले असते तर कदाचित पुणेकरांनी विचार केला असता पण त्यामुळे काही फरक पडणार नसल्याने मूळ नावाने संबोधणे पुणेकरांना योग्य वाटते. माझे ठाण्यात राहणारे काही मित्र मात अजुन बॉम्बे म्हणतात ब्वॉ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
न
निनाद मुक्काम … Sat, 12/05/2015 - 12:22 नवीन
अहो एवन पाकिस्तानी प्रसार माध्यमे भारताच्या विरुद्ध गरळ ओकातांना मुंबई असा उल्लेख करतात. आंतराष्ट्रीय स्तरावर मुंबई असा उल्लेख असतो बर काही अमराठी दीडशहाणे मात्र बॉंबे म्हणतात त्यात तो आयुष्मान खुराणा सारखे अग्रेसर आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सायकलस्वार Sat, 12/05/2015 - 14:03 नवीन
मुंबईला बॉम्बे म्हणणे हे कुठल्या गावाची मक्तेदारी नसून मराठी माणसाच्या कणाहीन पुचाटपणाचे प्रतीक आहे. असे लोक सगळ्याच ठिकाणी आढळतात. दादरमध्ये राहणार्‍या आणि ठाकरे-बिकरेंना देवासमान मानणार्‍या मराठी माणसाला 'बॉम्बे' म्हणताना ऐकले आहे. सहसा या लोकांना 'मुंबई' म्हणणे हे काहीतरी बावळटासारखे वाटते. 'मराठी' हा शब्द तरी किती मराठी लोक वापरतात? त्याऐवजी ते स्वतःला महाराष्ट्रीयन म्हणवून घेतील. कारण महारष्ट्रियन म्हणजे काहीतरी कूल वाटते. मला तर हा शब्द ऐकल्यावर हसू आवरत नाही. अरे गाढवांनो कूल व्हायचंय तर निदान योग्य शब्द तरी वापरा ना!!!... 'महाराष्ट्रिया' नावाचा कुठलाही प्रांत नाही. म्हणायचंच झालं तर 'महाराष्ट्रन्स' म्हणवून घ्या. 'आय ॲम फ्लाईंग टू बॉम्बे ॲंड फ्रॉम देअर टू चेन्नई' असे म्हणणारे मद्रासडे पण ऐकले आहेत. अरे XXXनो चेन्नईच्या आधी मुंबई झाले होते हे तुम्हाला माहीत नाही का? असे म्हणावेसे वाटते पण आपलंच नाणं खोटं तर काय बोलणार. खुन्नस म्हणून मी यापुढे 'मद्रास' आणि प्रत्येक साऊथवाल्याला मद्रासीच म्हणायच ठरवलं आहे. या प्रकाराला कंटाळून अलिकडेच एका अमेरिकन माणसाशी बोलताना I am from Bombay म्हणालो (याने 'मुंबई' नाव कधी ऐकलं नसेल म्हणून) तर 'You mean Mumbai?' असं म्हणून त्यानेच मला सुधारलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ब
बॅटमॅन Mon, 12/07/2015 - 01:37 नवीन
'मराठी' हा शब्द तरी किती मराठी लोक वापरतात? त्याऐवजी ते स्वतःला महाराष्ट्रीयन म्हणवून घेतील. कारण महारष्ट्रियन म्हणजे काहीतरी कूल वाटते. मला तर हा शब्द ऐकल्यावर हसू आवरत नाही. अरे गाढवांनो कूल व्हायचंय तर निदान योग्य शब्द तरी वापरा ना!!!... 'महाराष्ट्रिया' नावाचा कुठलाही प्रांत नाही. म्हणायचंच झालं तर 'महाराष्ट्रन्स' म्हणवून घ्या.
हा शब्द माझ्याही डोक्यात जातो. अनेक नॉर्थ इंड्यन्स ऐतिहासिक पेपर्समध्येही हाच शब्द अट्टाहासाने वापरतात. लै **** आहेत साले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सायकलस्वार
ग
गॅरी ट्रुमन Mon, 12/07/2015 - 07:40 नवीन
पण आपलंच नाणं खोटं तर काय बोलणार.
ही गोष्ट खरी आहे. महाराष्ट्राच्या राजधानीला 'बॉम्बे' आणि तामिळनाडूच्या राजधानीला 'चेन्नई' म्हणणारे मराठी लोकही आहेतच की. तसे असेल तर "आय ॲम फ्लाईंग टू बॉम्बे ॲंड फ्रॉम देअर टू चेन्नई" असे म्हणणार्‍या दाक्षिणात्यांना कोणत्या तोंडाने शिव्या घालायच्या?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सायकलस्वार
म
मालोजीराव Fri, 12/04/2015 - 18:38 नवीन
गोव्यात सरकारतर्फे शिवजयंती साजरी होते. त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्रीच हजर असतात.
वाचून आनंद वाटला, मुख्यमंत्र्यांवरून आठवले गोव्याचे ६ वेळचे मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे हे छत्रपती घराण्याचे जवळचे नातेवाईक आहेत.
तेव्हा शिवाजी संभाजी राजे फक्त महाराष्ट्राचे हे गृहितक आधी डोक्यातून काढा.
गोव्यातील अनेक मोठी मंदिरे छत्रपतींनी बांधून घेतली आहेत उदा. शांतादुर्गा मंदिर - शिवरायांचे नातू आणि संभाजीपुत्र शाहूंनी हे मंदिर उभारले आणि या मंदिराला ५ गावांचा सरंजाम तसेच सोन्याची पालखी दिलेली. बांदोडे येथील नागेशी मंदिराची पुनर्बांधणी हि त्यांनी करून घेतली. इतर अनेक लहानसहान मंदिरांचे जीर्णोद्धार शिवराय,संभाजी,शाहू यांच्या काळात झाल्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
स
सतिश गावडे Fri, 12/04/2015 - 19:09 नवीन
पुण्यात शिवाजीनगरला कुठेतरी न. ता. वाडी आहे. पीएमटीच्या पाटयांवरील ते न. ता. वाडी वाचून बरेच दिवस मला काही उलगडा झाला नव्हता.
  • Log in or register to post comments
ए
एस Fri, 12/04/2015 - 19:56 नवीन
वाकडेवाडीच्या भुयारी मार्गातून कृषी महाविद्यालयाकडे जाणारा रस्ता आहे, त्या भागाला न.ता.वाडी म्हणतात. तिथे पीएमटी (पीएमपीएमएल) चे आगार (डेपो) आहे, म्हणून तिथे जाणार्‍या बशींच्या पाट्यांवर न.ता. वाडी असे लिहिलेले असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
ह
होबासराव Fri, 12/04/2015 - 19:11 नवीन
:)
  • Log in or register to post comments
म
मोगा Sat, 12/05/2015 - 04:48 नवीन
तुमच्या नावाने एक न हो वाडी काढा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव
उ
उडन खटोला Sat, 12/05/2015 - 04:47 नवीन
पैसा ताईनी सविस्तर उत्तर दिल्यास अनेकान्च्या शन्का दूर होतील अशी आशा आहे
  • Log in or register to post comments
उ
उडन खटोला Sat, 12/05/2015 - 04:50 नवीन
गोव्याच्या इतिहासात व हिन्दु संस्क्रुतिरक्षणात छत्रपति सम्भाजीराजान्चे फार मोठे योगदान असून मला वाटते त्याबद्दल गोवा सरकारने व्यापक जनप्रबोधन करणे गरजेचे आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उडन खटोला
उ
उडन खटोला Sat, 12/05/2015 - 13:13 नवीन
https://www.facebook.com/groups/bettergoa/?fref=nf
  • Log in or register to post comments
र
राही Sat, 12/05/2015 - 13:17 नवीन
एक सर्वसाधारण निरीक्षण असे की आजची गोव्यातली तरुण पिढी (महाराष्ट्रातल्या शहरांप्रमाणेच) इंग्लिश माध्यमातून शिकते. मराठी संस्कृतीशी त्यांना फारसे देणेघेणे नाही. गोवामुक्तीनंतर स्वतंत्र राज्य की महाराष्ट्रात विलीनीकरण असा पर्याय होता, आणि स्वतंत्र राहाणे कुणालाही आवडण्याजोगे असल्याने तोच पर्याय मान्य झाला. त्यावेळचे गोमंतकीय हे महाराष्ट्राकडे थोरल्या भावासारखे पाहात. धार्मिक आरत्या, पूजाअर्चा, जुनी आख्याने (आणि गोवामुक्तीसाठी महाराष्ट्राचे भरीव योगदान) वगैरे मराठीतून असल्याने हा भ्रातृभाव काही काळ टिकला. पण हळू हळू महाराष्ट्र हा हात पिरगळणार्‍या मोठ्या भावाच्या दादागिरीने वागत असल्याचा समज वाढू लागला. मराठी सांस्कृतिक विस्तारवाद भयप्रद किंवा नकोसा वाटू लागला आणि एक सूक्ष्म तिरस्कार निर्माण होऊ लागला. त्यात भाषावादाची भर पडली. बा. भ. बोरकरांना मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद ते कोंकणी आहेत यास्तव नाकारले गेले. त्या आधीच शणै गोंयबाब (वामनराव वर्दे वालावलीकर) यांनी 'कोंकणी भाशेचें जैत' या पुस्तकात कोंकणी ही मराठीहून वेगळी कशी याचा आवेशपूर्ण उहापोह केला होता. सांस्कृतिक दृष्ट्या गोव्याचे नाते महाराष्ट्रातल्या फक्त छोटासा सिंधुदुर्ग आणि किंचितसे अतिदक्षिण रत्नागिरी या इवल्याश्या प्रदेशाशी आहे. उर्वरित महाराष्ट्राशी फारसे नाही. त्याउलट कर्नाटकातल्या कारवार- (उत्तर कन्नड आणि थोडे दक्षिण कन्नड)-या भागाशी जवळपास सारख्या भाषेमुळे अधिक जवळिकीचे आहे. कदंबांचे राज्य कारवार आणि गोव्यावर एकत्रितपणे साधारण पावणेदोनशे वर्षे होते. गोव्याची स्वतंत्र अस्मिता वाढती आहे आणि महाराष्ट्रातली प्रतीके, मानचिह्ने यासंबंधी फारसा आपलेपणा राहिलेला नाही. आता सध्या ज्यांना शक्य आहे ते गोव्याचे लोक पुण्यामुंबईत स्थायिक होण्यापेक्षा परदेशी जाणे अधिक पसंत करतील. हेही इतर भारतीय/महाराष्ट्रीयांसारखेच. मला वाटते बांदोडकरांनी (ते कट्टर महाराष्ट्रवादी गोमंतकीय) होते प्रथम panjim (उच्चार पोण्ज्यें) चे स्पेलिंग panaji केले. त्याचा उच्चार बाहेरच्यांकडून काही काळ पण्जी असा न होता पानाजी असा होऊ लागला. त्यानंतर वास्कोच्या एका भागाच्या संभाजी या नामकरणाचा प्रस्ताव ठेवला गेला होता किंवा ते केले होते. पण हे नागरिकांना अजिबात पसंत पडले नव्हते. पानाजी सारखेच संभाजी असे गोव्याचे 'जीजी' होणार काय असा प्रश्न गमतीने तेव्हाच्या छापील माध्यमांतून उपस्थित झाला होता. या बाबतीत अट्टाहास करण्यात अर्थ नाही आणि महाराष्ट्राने त्यात पडू नये असे मला वाटते. शिवाय राजकीय पक्षदेखील कुरघोडीच्या राजकारणात वन अप्मनशिप दाखवताना प्रतिस्पर्ध्याला शह म्हणून असे सवंग निर्णय घेतात. कारण हे त्यांनी नाही केले तर त्यांचा प्रतिस्पर्धी ते अंमलात आणून श्रेय घेणार असतो.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sat, 12/05/2015 - 13:26 नवीन
महाराष्ट्राने त्यात पडू नये
असे परत परत का सांगितले जात आहे. मी वर एका प्रतिसादात स्पष्टीकरण दिले आहेच ते पुन्हा देतो. महाराष्ट्रीय लोक आधी भारतीय आहेत. गोवा भारतातच आहे आणि भारतीयेतरांचे खासकरून जुलमी राजवटीचे प्रतिक असलेले नाव नको म्हणण्याचा इतर भारतीयांनाही पूर्ण नैतीक अधिकार असावा असे वाटते. बदललेले नवे नाव काय असावे हे ठरवण्याचा गोयंकरांचे मत जरुर विचारात घ्यावे. अर्थात त्याच वेळी पै तैंनी दिलेल्या माहितीनुसार परकीय राजवटीपासून गोवा मुक्ततेचा पहिले प्रयत्न शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या नावावर ऐतिहासीक दस्तएवजांनुसार जात असतील तर त्याचे सुयोग्य क्रेडीट गोव्याच्या जनतेने त्यांना स्वतःहून बहाल करावयास हवे असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
व
विकास Sat, 12/05/2015 - 13:43 नवीन
महाराष्ट्राने त्यात पडू नये या संदर्भात अजून एक म्हणावेसे वाटते: व्यक्तीने म्हणणे म्हणजे ती व्यक्ती ज्या राज्यातली आहे त्या राज्याने अधिकृतपणे म्हणणे असे होते का? म्हणजे मी महाराष्ट्रातून आलो. माझे गोव्या बद्दलच कशाला गुजरात बद्दलचे अमुक-तमुक मत मी व्यक्त केले, तर ते काय महाराष्ट्राचे मत होते का? हे म्हणजे, एकाने अतिरेकी हल्ला केला म्हणून त्या अतिरेक्याच्या धर्मालाच अतिरेकी म्हणण्यासारखे झाले, नाही का? ;) मुंबईबद्दल उचलली जीभ करत उठसूठ कोणी काही बोलत असतो. मग हा नियम तेथे पण लागू करायचा का? महाराष्ट्राने म्हणजे महाराष्ट्र सरकारने कधी काय म्हणले आहे? जे बोरकरांबरोबर झाले ते (नुसते चूकच नाही तर) अक्षम्यच होते. पण ते परत त्यावेळच्या बुद्धीवाद्यांमुळे झाले असे म्हणावे लागेल. (अनलेस तो निर्णय सरकारने घेतलेला असला तर. मला त्याची कल्पना नाही). बर गोवामुक्तीनंतर जर गोवा कर्नाटकाच्या जवळ होते तर १९६१ साली, नेहरूंनी गोव्याला कर्नाटकाच्या ऐवजी महाराष्ट्राच्या जवळ प्रशासकीय कारणांवरून का नेले? उदा. गोवा इंजिनिअरींग कॉलेज हे मुंबई विद्यापिठाचा भाग होते, मुंबई हायकोर्टांतर्गत गोवा येत होते (अजून आहे का माहीत नाही). वास्तवीक १९६० च्या राजकीय पराभवानंतर, पक्षी: मुंबई महाराष्ट्राला द्यावी लागल्यानंतर नेहरूंना तसे करणे अधिक आवडू शकले असते असे वाटते... शेवटी हा निर्णय केंद्राचाच होता, यशवंतरावांनी मुख्यमंत्री म्हणून घेतला नव्हता. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
र
राही Sat, 12/05/2015 - 20:08 नवीन
महाराष्ट्र ऐवजी महाराष्ट्रीय लोक असा शब्द हवा होता. महाराष्ट्रीय लोकांनी अन्य राज्यांच्या शहरांच्या नामकरणामध्ये हिरीरीने उतरू नये असे म्हणायचे होते. मते तर असतातच आणि व्यक्तही होतात. पण अन्य राज्याच्या अंतर्गत प्रश्नाविषयी अशा प्रचारमोहीम टाइप माध्यम मोहिमा निघू नयेत असे वाटते. संकटकाळ असेल, पूर वादळ अशी आपत्ती असेल तर ठीक आहे. पण नामांतरासारख्या प्रश्नावर असे होऊ नये. अशाने त्या राज्याविषयी (राज्यातील लोकांविषयी) तिरस्कार वाढीला लागतो आणि दुरावा वाढतो. आधीच बिग ब्रदर वृत्तीचे बीज रोवले गेलेय, आणखी नको असे वाटते. त्यांचे त्यांना ठरवू दे कोणते नाव ठेवायचे ते. हा सल्ला नाही, वैयक्तिक मत आहे. आणि तेसुद्धा दोन राज्यांत सलोखा असावा ह्या हेतूने आहे. महाराष्ट्राविषयी शेजारच्या किमान दोन राज्यांत दबक्या किंवा उघड शत्रूत्वाची भावना दिसते तशी दिसू नये असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
व
विकास Sat, 12/05/2015 - 23:13 नवीन
महाराष्ट्रीय लोकांनी अन्य राज्यांच्या शहरांच्या नामकरणामध्ये हिरीरीने उतरू नये असे म्हणायचे होते. अंशतः सहमत. (तरी देखील "असहमत" अजिबातच नाही). अंशतः अशा साठी करण आदर्श समाजात तसे होईल. पण व्यावहारीक जगात तसे होईलच असे नाही... नाहीतर बाँबेचे मुंबई करण्यावरून किती महाराष्ट्रीय नसलेल्यांनी आवाज केला? आजही करतात? तेच इतर अनेक ठिकाणी म्हणता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
र
राही Mon, 12/07/2015 - 06:27 नवीन
प्रशासकीय मुद्द्यांविषयी अगदी अचूक माहिती सध्या मला सहज उपलब्ध दिसत नाही. पण एक सांगता येईल. महाराष्ट्रातल्या संपूर्ण कोंकण विभागाचे शैक्षणिक आणि न्यायविषयक अ‍ॅफिलिएशन मुंबई विद्यापीठ आणि मुंबई उच्चन्यायालय यांच्याशी होते. (काही काळ पुणे विद्यापीठाशीही संलग्नता होती असे वाटते.) गोव्याला मैसूर, धारवाड आणि बंगळुरु ही ठिकाणे प्रशासकीय दृष्ट्या दूर पडली असती. आजही बीएसएनएल टेलिफोन्सचे गोवा सर्कल हे महाराष्ट्राशी जोडलेले आहे. ह्या काही अ‍ॅड्मिनिस्ट्रेटिव कम्पल्शन्स असू शकतात. माहीतगारांनी याविषयी अचूक माहिती इथे लिहावी अशी आग्रहाची विनंती. आणखी म्हणजे भाषावार राज्यनिर्मिती होण्यापूर्वी सध्याच्या कर्नाटकातले बेळगाव, कारवार (ह्याचे आता विभाजन आणि जोड-मोड झाली आहे.) विजापूर, धारवाड हे जिल्हे जुन्या बाँबे प्रेसिडेन्सीमध्ये होते. त्यामुळे हा सर्व टापू प्रशासकीय दृष्ट्या मुंबईवर अवलंबून होता. अर्थात १९४९ साली धारवाड-कर्नाटक युनिवर्सिटी झाल्यानंतर चारपाच वर्षांत हे जिल्हे शैक्षणिक बाबतीत धारवाडशी जोडले गेले. पण बाकी कारभार मुंबईशी जोडलेला होता. हळूहळू इतर ठिकाणी हायकोर्टे, विद्यापीठे स्थापन झाली आणि मुंबईवरचे अवलंबित्व संपले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
स
सुनील Mon, 12/07/2015 - 06:49 नवीन
खेरीज, गोवा मुक्त झाल्यानंतर तेथिल प्रशासन सांभाळण्यासाठी अधिकार्‍यांची पहिली फळी महाराष्ट्रातूनच डेप्यूट झाली होती (मधु मंगेश कर्णिक हे एक नाव चटकन आठवले). पुढे ८० च्या दशकात गोवा हे राज्य बनल्यानंतरही बरीच वर्षे गोव्यासाठी IAS अधिकार्‍यांचे वेगळे केडर नव्हते. महाराष्ट्र केडरचेच अधिकारी तिथे नेमले जात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
र
राही Mon, 12/07/2015 - 07:43 नवीन
गोवा हा दीव, दमण, दादरा आणि नगरहवेलीसह केंद्रशासित प्रदेश असताना केंद्रातून बरेच महाराष्ट्रीय अधिकारी तिकडे पाठवले गेले. श्री. ज्यूलिओ रिबेरो यांनाही गोव्याचे पोलिसप्रमुख म्हणून नेमणुकीबद्दल विचारणा झाली होती (हे त्यांनी एका मुलाखतीत सांगितलेले ऐकले आहे.) ती त्यांनी नाकारली. १९८७मध्ये स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाल्यानंतर प्रशासकीय बाबीत केंद्राचा हस्तक्षेप कमी झाला. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा प्रभाव उतरणीस लागला. गोव्याची स्वतंत्र अस्मिता फुलू लागली. गोवा कलाअकादमीचीही स्थापना झाली. महाराष्ट्राचा सांस्कृतिक प्रभाव ओसरू लागला. माधव गडकरी यांनीदेखील एके काळी गोव्यातली पत्रकारिता गाजवली होती. धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
प
प्रदीप Sat, 12/05/2015 - 16:48 नवीन
वरील माहिती व उहापोह दोन्ही चांगली आहेत. पण त्यातून ह्या धाग्याच्या संदर्भातील सर्वात महत्वाची बाब सुटली आहे, ती म्हणजे गोवन कॅथॉलिकांचा (विशेष करून, आणि खरे तर, सर्वच भारतीय कॅथॉलिकांचा) स्वतःस, इतर नेटिव्हांपेक्षा आपण काहीतरी खास आहोत, ही सर्व इतर भारतीय जनता uncouth आहे असा स्वतःविषयीचा गैरसमज, व त्यातून येणारे त्यांचे उद्द्दाम वागणे. धागालेखकाने त्याचा उल्लेख केलेला आहे. आणि सदर नामांकरणाला होणारा तीव्र विरोध त्यांच्या ह्याच अ‍ॅटिट्यूडमधून आलेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
न
निनाद मुक्काम … Sat, 12/05/2015 - 23:35 नवीन
हॉटेल व्यवस्थापनाचे धडे मुंबईत गिरवले असल्याने गोवानीज खिस्ती लोकांशी परिचय आला. माझे अनेक चांगले मित्र आहेत मात्र चुकूनही हिंदू देवळात येत नाहीत मात्र अनेक हिंदू मुंबईकर माहिमचा चर्च व वांद्र्याच्या माउंट मेरी च्या जत्रेत भक्तिभावाने सहभागी होतात. आपला असलेला नसलेला पोर्तुगीज वारसा मिरवायचा प्रयत्न करतात,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप
म
मोगा Sun, 12/06/2015 - 05:48 नवीन
तुम्हाला चर्चमध्ये नसेल जायचे तर जाऊ नका. इतरांच्या जाण्यावर तुमचा आक्षेप का ? ( आमची बायकू प्रेग्नंट असताना रोज कृष्णाच्या फोटोपुढ मागत होती ... मुलगा पाहिजे ! मला हवी होती .. मुलगी. मी निराश मनाने सर्व हिंदु देवांकडे बghat होतो. अचानक चमत्कार झाला. एका मित्राने माउंट्मेरी चर्चजवळ सहज भेटायला बोलावलं .... ...... आता मी व माझी पाच वर्षाची मुलगी अधुनमधुन चर्चमध्ये जातो.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
म
मोगा Sun, 12/06/2015 - 05:50 नवीन
गर्व से कहो हम जिहादी है ! गर्व से कहो हमारी बेटी पोर्तुगीज है !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगा
स
संदीप डांगे Sun, 12/06/2015 - 05:58 नवीन
काय पकवता हो! इथे सांगितला ते सांगितलंत, तुमच्या मुलीला सांगू नका!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगा
अ
अर्धवटराव Sun, 12/06/2015 - 06:10 नवीन
=)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
म
मोगा Sun, 12/06/2015 - 06:13 नवीन
तिचा अब्बू मुसलमान होणार आहे. तिला आम्ही गंमतीने ख्रिस्चन म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Sun, 12/06/2015 - 06:20 नवीन
हे आकाशातल्या बापा! ह्यांना माफ कर, हे काय करत आहेत ह्यांना खरंच कळत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगा
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 12/06/2015 - 12:16 नवीन
हे लांडगा आला, लांडगा आला, खूप वेळा झाले. काय ते करून टाका एकदाचं. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगा
स
संदीप डांगे Sun, 12/06/2015 - 12:26 नवीन
अजून होणार आहेत असंच ऐकतोय. बहुतेक घाबरत असतील. न जाणो चुकीचे दिशेने वाकून नमाज पढायला गेलो आणि समजलं अल्लाहच्या अपमानात मान गमावली आहे ते....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
र
राही Sun, 12/06/2015 - 05:55 नवीन
बहुजनसमाजातले हिंदू हे निदान मंबईतल्या जुन्या चर्चेसमध्ये अजूनही जातात हे खरेच आहे. त्याची दोन तीन कारणे आहेत. एक तर हिंदूंना त्यात काही वावगे वाटत नाही आणि आता त्यामुळे त्यांना बाटगेपणा येत नाही. २) चर्च अथॉरिटी अन्य धर्मीयांच्या येण्यास प्रोत्साहन देते आणि चर्च कड्याकुलुपात, सोवळ्या-ओवळ्यात ठेवीत नाही. (हे अन्य धर्मीयांना धर्मबदलासाठी प्रलोभनही होते.) तिसरे म्हणजे ज्या कोळी-आगरी-भंडारी यांच्यातल्या धर्मांतरितांसाठी ही चर्चेस बांधली गेली (हे अर्थात मुंबईच्या संदर्भात,) त्यांच्या धर्म न बदललेल्या जातभाईंसाठी ही नवी सुघटित स्वच्छ देवळेच बनली. त्यांनी मालपादेवी-भाटलादेवी-घोल्पादेवी-जाखाई-मरीआई यासोबतीने मेरी हीसुद्धा आणखी एक देवी मानून या देवळांत जाणे सुरू केले. ही हिंदू बहुजनांची आश्चर्यकारक समावेशकता. यावरून मला अमीबा या एकपेशीयाचे उदाहरण आठवते. हा जीव आपल्या छद्मपादांद्वारे भक्ष्यकणाला विळखा घालतो, आपलेसे करतो आणि आत्मसात करतो. भक्ष्याच्या पोषणावर स्वतः वाढतो. ४) काही केसेसमध्ये या चर्चेसच्या ठिकाणी किंवा परिसरात हिंदू बहुजनांची गावदेवळे होती आणि तिथे पूजा करण्याची प्रथा नव्या पूजापद्ध्तीने चालू राहिली. पण गंमत अशी की या सर्व खटाटोपात चर्चचे देखील मराठीकरण, हिंदवीकरण झाले. या अन्यधर्मीय भक्तगणांच्या सोयीसाठी त्यांच्या सर्विसेस मराठी, कोंकणी, गुजरातीत होऊ लागल्या. मराठीतल्या बायबलची भाषा हिंदवी झाली. हिंदू थव्यामुळे चर्चबाहेरील उत्सवातल्या यात्रांचे स्वरूप बदलले. तिथेही आपल्याकडच्या देवीच्या देवळाबाहेर दिसणारे चणे-फुटाणे, फुले हार अशी दुकाने दिसू लागली. चांगली गोष्ट अशी की आता खूपश्या हिंदूंना स्वतःच्या धर्मबदलाचे भय वाटत नाही. ते मोकळेपणाने कुठेही (पर्मिटेड ठिकाणी) जाऊन तिथे आपल्या संस्कृतीची छाप पाडू शकतात, पाडतात. भारतात क्रिस्टिअन धर्माधिकार्‍यांना त्यांच्या अनुयायांबद्दल असा विश्वास वाटत नाही. ते लोक हिंदू स्थानांवर गेले तर न जाणो पुन्हा हिंदू धर्माच्या प्रभावाखाली येतील अशी असुरक्षितता त्यांना वाटते म्हणून हिंदू मंदिरांत जाण्याविषयीचे त्यांचे नियम काहीसे कडक आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
स
संदीप डांगे Sun, 12/06/2015 - 06:04 नवीन
काहीसे अशीच धारणा राजीव मल्होत्रांनी डायजेशन ऑफ रीलीजन ह्या संकल्पनेत मांडली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
प
प्रदीप Sun, 12/06/2015 - 06:05 नवीन
माझ्या लहानपणी आम्ही सर्व कुटुंबिय तसेच आसपासचे नातेवाईकही, नित्यनेमाने मोतमाऊलीच्या जत्रेस जात असूं. (आणि आम्ही बहुजनसमाजातील नाही आहोत). असेच आम्ही कधीही जवळच्याच डॉनबॉस्कोच्या चर्चमधेही जात असूं. आता मी रहातो तेथेही अशी भव्य चर्चेस आहेत. अशाच एका चर्चमधे आमच्या ओळखीची एक हिंदू स्त्री अधूनमधून नित्यनेमाने जायची. अर्थात काही दिवस असे तिला तेथे पाहिल्यावर धर्मबदलाबदल रीतसर विचारणा तेथे झालीच. गोव्यात मात्र देवळांतून अनेक क्रिस्टियन्सनाही येतांना व देवाला कौल लावतांना मी प्रत्यक्ष पाहिले आहे. तिथे हे सरमिसळ बर्‍यापैकी होत असावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा