Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अंधश्रद्धा निर्मूलन श्री हमीद दाभोलकर ह्यांचे

स
साहना
Sun, 09/18/2016 - 04:28
🗣 456 प्रतिसाद
आमचे एक गुरुजी होते नेहमी सदाचार, शिस्त इत्यादी गोष्टीची शिकवण द्यायचे. गुरुजी म्हणजे साक्षांत गुरु ब्रहस्पती अशी आम्हा मुलांची धारणा होती. एकदा मला तालुक्याच्या ठिकाणी एका स्पर्धेंत ५० रुपयाचे रोख बक्षीस प्राप्त झाले आणि घरी येत असताना गुरुजींनी "बाळ तुझ्या कडून पैसे हरवातील म्हणून मी ठेवतो" असे सांगून लिफाफा आपल्या कडे ठेवला. दुसऱ्या दिवशी शाळेंत "बाळ हे तुझे पैसे" म्हणून सर्वां समक्ष परत सुद्धा दिला. गुरुजींच्या विश्वासामुळे मी पैसे वगैरे मोजायच्या फंदात पडले नाही (त्यांच्या पुढे) मन त्यांच्या मागे मोजून पहिले तर आंत फक्त ५ रुपये होते. घरी सांगितले तर सगळ्यांनी "ग तुझ्याच कडून हरवले असतील, राहू दे" म्हणून विषयावर पांघरून टाकले. खूप वर्षांनी मी कार चा परवाना काढण्यासाठी RTO मध्ये गेले असता गुरुजी सुद्धा टेस्ट द्यायला आले होते आणि फेल सुद्धा झाले. RTO हापिसर मित्र होता. "तिसऱ्यांदा फेल होताहेत" असे त्याने मला मागाहून सांगितले. मी गुरुजींना "काय गुरुजी लायसन भेटले का असे चार चौघां पुढे विचारले" तर गुरुजींनी उत्तर दिले "नाही RTO हापिसर ला आज थोडी घाई होती म्हणून नंतर यायला सांगितले आहे आणि त्यानंतर सरकारी अधिकारी कसे प्रामाणिक पणे काम करत नाहीत ह्यावर भाषण द्यायला सुरु केली. लहानपणांत चारित्र्यवान वाटणारे गुरुजी आज विदूषकाचे पेक्षाही विनोदी वाटत होते. विषयांतर बाजूला ठेवूया. सार्वजनिक जीवनात सुद्धा ह्या गुरुजी सारखे लोक कमी नाहीत. उदाहरण म्हणजे श्री हमीद दाभोलकर. . . . img

प्रतिक्रिया द्या
217829 वाचन

💬 प्रतिसाद (456)
श
श्रीगुरुजी Sun, 09/25/2016 - 11:25 नवीन
अवघड आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
ग
गॅरी ट्रुमन Sat, 09/24/2016 - 07:07 नवीन
बरं मग काय ठरले? १. हमीद दाभोलकरांचे मत समर्थनीय आहे की नाही? २. अनीसचे कार्य चांगले आहे की नाही? हिंदूंमधले उकिरडे साफ करतात तसे तिकडचेही उकिरडे साफ करा हे म्हणणे योग्य आहे की नाही? आणि सर्वात महत्वाचे-- नारळाचा आणि नरबळीचा संबंध आहे की नाही?
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य Sat, 09/24/2016 - 09:18 नवीन
१. हमीद दाभोलकरांचे मत समर्थनीय आहे की नाही? नाही. २. अनीसचे कार्य चांगले आहे की नाही? आहे. हिंदूंमधले उकिरडे साफ करतात तसे तिकडचेही उकिरडे साफ करा हे म्हणणे योग्य आहे की नाही? योग्य नाही. आणि सर्वात महत्वाचे-- नारळाचा आणि नरबळीचा संबंध आहे की नाही? आहे. ऐकिवात आलेल्या माहितीनुसार १८३० मध्ये कोणतातरी इंग्रज सरकारने कायदा केला अन त्याद्वारे नरबळीवर बंदी घातली. तेव्हां नारळ उपयोगात येऊ लागले ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
श
श्रीगुरुजी Sat, 09/24/2016 - 11:32 नवीन
नारळाचा आणि नरबळीचा संबंध आहे की नाही? आहे. ऐकिवात आलेल्या माहितीनुसार १८३० मध्ये कोणतातरी इंग्रज सरकारने कायदा केला अन त्याद्वारे नरबळीवर बंदी घातली. तेव्हां नारळ उपयोगात येऊ लागले ;)
म्हणजे नारळ फोडणे हे बळी देण्याचे प्रतीकात्मक स्वरूप ही ऐकीव माहिती आहे. मी सुरवातीपासूनच हेच म्हणत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य
अ
अनिरुद्ध.वैद्य Sat, 09/24/2016 - 11:39 नवीन
आपल्या ज्या श्रुतीस्मृती म्हणतो त्या ऐकिव माहितीच नाही का? मुळात सगळी कर्मकांडे ऐकीवच ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
सतिश गावडे Sat, 09/24/2016 - 07:35 नवीन
खरा सुधारक कर्मकांडातील फोलपणा लोकांना समजावून सांगेल. एखाद्या कर्मकांडाला पर्यायी आधुनिक कर्मकांड तयार करुन किंवा असलेल्या कर्मकांडाला आधुनिकतेचा गिलावा देऊन स्वतःच्या नावाने "सुधारक" असा डंका पिटणार नाही. :)
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 09/24/2016 - 08:31 नवीन
समाजसुधारकांना सदर गोष्ट अत्यंत चपखलपणे लागू पडते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
प
प्रकाश घाटपांडे Sat, 09/24/2016 - 09:45 नवीन
मला तसे वाटत नाही. अनेक कर्मकांड निरर्थक असतात. काही हानिकारकही असतात. समजातील बहुसंख्यांना कर्मकांड सोडण्यासाठी तुलनेने कमी हानिकारक पर्याय दिला तरच ते तो स्वीकारतात. अस करत करत अनेक कर्मकांडातील हानीकारक भाग काढता येतो. दीपप्रज्वलन, तसबीरीला हार घालणे, दोन मिनिटे स्तब्ध राहून श्रद्धांजली वाहणे,राष्ट्रगीत म्हणणे ही समूह जीवनातील कर्मकांडच आहेत. अनेक प्रथांच कर्मकांडात रुपांतर होते.कर्मकांडच नको ही गोष्ट मानवी स्वास्थ्यासाठी मानवणारी नाही.नारळ हा बळीला कमी हानिकारक पर्यायच आहे ना? श्राद्धाला ब्राह्मण भोजन करण्याऐवजी लोक एखाद्या गरजूचा जेवणाचा खर्च करतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 09/24/2016 - 10:44 नवीन
@

अनेक कर्मकांड निरर्थक असतात. काही हानिकारकही असतात. समजातील बहुसंख्यांना कर्मकांड सोडण्यासाठी तुलनेने कमी हानिकारक पर्याय दिला तरच ते तो स्वीकारतात. अस करत करत अनेक कर्मकांडातील हानीकारक भाग काढता येतो.

››› +++१११ धर्मसुधारणा आणी धर्मनिर्मूलन यातला फरक त्यातल्या उपयोगितेसह जोपर्यंत जांच्या लक्षात येणार नाही. तोपर्यंत वरील मत त्यांच्याकडून स्विकारलच जाणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
श
श्रीगुरुजी Sat, 09/24/2016 - 11:35 नवीन
मला तसे वाटत नाही. अनेक कर्मकांड निरर्थक असतात. काही हानिकारकही असतात. समजातील बहुसंख्यांना कर्मकांड सोडण्यासाठी तुलनेने कमी हानिकारक पर्याय दिला तरच ते तो स्वीकारतात. अस करत करत अनेक कर्मकांडातील हानीकारक भाग काढता येतो.
प्रत्येक वेळी निरर्थक किंवा हानीकारक कर्मकांडांना पर्याय द्यावा लागतोच असे नाही. अशी कर्मकांडे पर्याय न देताही नष्ट होऊ शकतात. उदा. जानवे परीधान करणे, कानावर जानवे अडकविणे इ. निरर्थक कर्मांना कोणताही पर्याय न देता सुद्धा ही कर्मे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. पूजेतील अनावश्यक, निरर्थक भाग अशाच तर्‍हेने कोणताही पर्याय न देतासुद्धा हळूहळू नष्ट होणार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
स
संदीप डांगे Sat, 09/24/2016 - 12:11 नवीन
गुरुजी, पूजेत आवश्यक व अनावश्यक, सार्थक व निरर्थक कसे ठरवावे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sat, 09/24/2016 - 12:23 नवीन
मी तारतम्याने ठरवितो. इतरांचं माहिती नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Sat, 09/24/2016 - 12:35 नवीन
एग्झॅक्टली!! तर, पूजा-पाठ-कर्मकांड ह्याप्रकारात "संपूर्ण फालतूगिरी ते संपूर्ण कर्मठपणे आवश्यकच" ह्या दोन प्रचंड दूर अंतरावर असणार्‍या टोकांच्या मधे बरेच लोक वेगवेगळ्या ठिकाणी असतात. प्रत्येकाला त्याचे वागणे तारतम्याला धरुनच आहे असे वाटते. त्यामुळे आवश्यक-अनावश्यक प्रत्येक व्यक्तिच्या स्वत:च्या तारतम्यानुसार ठरते. अशा परिस्थितीत धर्मसुधारणा म्हणजे नेमकं काय आणि त्या कशा कराव्या ह्याबद्दल दोन व्यक्तिंमधे मतभेद असणे शक्य आहे ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
सतिश गावडे Sat, 09/24/2016 - 12:48 नवीन
तुम्ही दिलेल्या दीपप्रज्वलन, तसबीरीला हार घालणे, दोन मिनिटे स्तब्ध राहून श्रद्धांजली वाहणे,राष्ट्रगीत म्हणणे या गोष्टींना पैसे पडत नाहीत तसेच विशेष वेळ वाया जात नाही. मुळात ज्याच्याकडे वेळ आणि पैसा असेल त्याने इतरांना त्रास होणार नसेल अशा पद्धतीने व्यक्तिगत आणि सामाजिक हितास बाधा न आणणारी कर्मकांडे करण्यास कुणाचाच आक्षेप नसावा. ती त्या व्यक्तीची व्यक्तिगत बाब म्हणता येईल. मात्र काही व्यक्ती जेव्हा जुन्या कर्मकांडांना आधुनिक "सुधारणांचा" गिलावा चढवून व्यवसाय करतात आणि वरुन स्वतःस "धर्मसुधारक" म्हणवून घेतात ते खटकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
प
प्रसाद_१९८२ Sat, 09/24/2016 - 09:52 नवीन
नारळ हा बळीला कमी हानिकारक पर्यायच आहे ना? श्राद्धाला ब्राह्मण भोजन करण्याऐवजी लोक एखाद्या गरजूचा जेवणाचा खर्च करतात खर आहे तुमचे. पण नरबळी द्यायच्या ऐवजी, नारळाचा बळी दिला तर तो त्या 'नारळा'वर अन्याय नाही का होत?
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Sat, 09/24/2016 - 09:57 नवीन
तुलनेने कमी. तसे शेवटी जीवो जीवस्य जीवनम चक्र हे निसर्गचक्रच आहे. सांगायचा मुद्दा असा की लोक एकदम बदल स्वीकारणार नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 09/24/2016 - 13:58 नवीन
@लोक एकदम बदल स्वीकारणार नाहीत. › +१ . रैट्ट. हाच अनुभव आहे.. त्यासाठी धर्मसुधारणावादीच रहावं लागतं. मग ते कुणाला कित्तीही गिलावेकार का वाटे ना? त्यांच्याही आकलनाची मर्यादा लक्षात ठेवायला हवी मला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
स
संदीप डांगे Sat, 09/24/2016 - 11:59 नवीन
ह्यालाही पाचशेपार पोचवायचे का??
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 09/24/2016 - 12:35 नवीन
कोणाशी तरी भांडण उकरून काढ. मग आम्ही पॉपकॉर्न घेऊन बसतोच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Sat, 09/24/2016 - 12:39 नवीन
म्हणजे म्हणायचं काय आहे तुम्हाला?? मी भांडणं उकरुन काढतो मिपावर?? आणि तुम्ही कंपूबाजी करता ते काय असतं मग...?? कोणालाही काही बोलतांना जरा जपून बोलावे माणसाने. लक्षात येईल लवकर ते बरं. (-जमलं काय? ;))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Sat, 09/24/2016 - 12:42 नवीन
जमतंय, जमतंय! आता भांडायला बकरा शोध. आणि ५०० झाल्यावरच थांब. मी चालले वॉशिंग मशिन लावायला. लोकांची धुणी धुण्यापेक्षा आपल्या घरची धुते! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
व
विशुमित Sat, 09/24/2016 - 12:49 नवीन
वंटास...!!!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
व
विशुमित Sat, 09/24/2016 - 12:56 नवीन
सहज बोलले तरी दम दिल्या सारखे वाटतं. (कृपया "हा घ्या" )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
स
संदीप डांगे Sat, 09/24/2016 - 13:05 नवीन
पैसातै, बकरा गावतंय बघ...!!! =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
स
सतिश गावडे Sat, 09/24/2016 - 13:09 नवीन
त्या पाल्याची सोय करायला गेल्या असतील. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
प
पैसा Sat, 09/24/2016 - 14:02 नवीन
हा, आले. बोल, कुठे आणि कोणाला पाला घालायचाय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
न
नाखु Mon, 09/26/2016 - 08:05 नवीन
(नाही तरी कूम्पणाबाहेरून आलेल्या पाल्याचे काय करायचे हा प्र्शन्च होता.) बकरा ज्याचा त्याने आणावा ( पक्षी शोधावा). पाला निवडून मिळणार नाही,आहे तसा आहे त्या स्थीतीत स्वीकारावा,नारळाची चौकशी करू नये,काही भाज्यांची रोपे आहेत त्यांचा पाला/भाजी मागू नये,पिशवी आपली आपण आणावी,प्लास्तीक पिशवी मिळणार नाही बाकी सूचना नंतर. नाखु पाचशेची सुपारीवाला संघाचा सभासद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Mon, 09/26/2016 - 08:38 नवीन
बकरा पळाला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
प
पिशी अबोली Sun, 09/25/2016 - 12:12 नवीन
आता भांडायला बकरा शोध.
खरा बकरा की मातीचा बकरा? आणि मशीन आणल्यावर त्याच्यासमोर नारळ फोडला होता का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
य
यशोधरा Sun, 09/25/2016 - 12:59 नवीन
अभ्यासू आहे मुलगी =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली
प
पैसा Sun, 09/25/2016 - 13:04 नवीन
आता कळलं. मशिनसमोर नारळ फोडला नव्हता. म्हणून मेलं बंद पडतंय सारखं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
म
मारवा Sat, 09/24/2016 - 14:15 नवीन
"पुरुषमेध" प्राचीन भारतात होता. व सरळ नरबळी त्यात होत असे. यात पण इतकं आश्चर्य वाटण्यासारख काय आहे ? प्रत्येक प्राचीन संस्कृतीत नरबळी होताच. रोमनांमध्ये होता ग्रीक मध्ये होता सर्वत्र जगात सर्वत्र होता. आपण वेगळे व श्रेष्ठ आहोत हा गंड असेल तरच अडचण आहे. भारतरत्न पांडुरंग वामन काणें च्या हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्रात सर्व सखोल विश्लेषणासहीत मुळ श्लोकासहीत उपलब्ध आहे. त्या पुरुषमेध चा संबंध नारळ फोडण्याच्या प्रतिकाशी आहे की नाही हे मात्र माहीत नाही.
  • Log in or register to post comments
म
मारवा Sat, 09/24/2016 - 16:46 नवीन
अमुक एक नियम जर काही कारणाने पाळणे वा अमुक एक विधी थांबवायची वा बदलायची असेल तर. (पुर्वीच्या काळी हे अस्तित्वात होते हे मान्य करुन कारण त्याशिवाय पर्याय नव्हता ) तर पुर्वी हा नियम योग्य होता यज्ञ विधी इ. योग्य होते. मात्र सध्या कलियुग आहे व कलियुगात हे वर्ज्य आहे. अशी एक थीम वापरुन कलिवर्ज्याच्या आधारावर पुर्वीच्या कायद्यात "अ‍ॅमेन्डमेंट्स" केल्या जात असत. वरील पुरुषमेध अश्वमेध इ. अडचणीचे यज्ञ आता कलियुगात वर्ज्य आहेत. असे प्रतिपादन नंतरच्या धर्मग्रंथांनी केले. वरील संदर्भ असा आहे. जुने नियम- अतिप्राचीन तैत्तीरीय ब्राह्मण एका विशिष्ट यज्ञात पुरुषाचा बळी कसा द्यावा कोणत्या लक्षणांचा पुरुष निवडावा इ.चे या प्रोसीजरचे विस्ताराने विवरण करते. वाजसनेयी संहीतेत तैत्तिरीय प्रमाणेच याचे उल्लेख येतात. त्यानुसार वैश्याचा बळी मारुत ला, ब्राह्मण पुरुषाचा बळी ब्रह्मा या देवतेला इ. यात अकरा बलीवेंदींवर अकरा प्राणी बळी दिले जात इ. इ.. या यज्ञाच्या समाप्तीनंतर यजमान वनात संन्यासी बनुन निघुन जात असे. हा एक भाग. तसेच दुसरा एक मोठा महत्वपुर्ण यज्ञ होता अश्वमेध, हा एक अनेक गुंतागुंतीच्या विधींचा समावेश असलेला. अतीविचीत्र विधी रीती समाविष्ट असलेला अतीप्राचीन यज्ञ होता .इ.पु. २ ते अगदी १८ व्या शतकातल्या जयसिंग अशा अनेक ऐतिहासीक राजांनीही हा यज्ञ केल्याची नोंद आहे असे काणे म्हणतात. आणि एक असाच राजसुय नावाचा यज्ञ होता हा अतीदीर्घकाळ दोन वर्षांपर्यंतही चालत असे. कलिंग सम्राट खारवेला तसेच नयनिका राणीने हा यज्ञ केल्याची नोंद असलेले ऐतिहासिक शिलालेख आढळतात. कलिवर्ज्य- याने वरील तीनही प्रकारच्या यज्ञांवर बंदी घातली. व पुरुषबळीचा, अश्वमेध आणि राजसुय हे यज्ञ कलियुगात करण्यास मनाई केली. या तिघांचा एकेक कलिवर्ज्य नियम आहे. कलिवर्ज्याचा उल्लेख असलेले सर्व ग्रंथ ऐतिहासिक दृष्ट्या अलीकडच्या काळातीलच आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
प
प्रचेतस Sat, 09/24/2016 - 16:55 नवीन
ही नयनिका म्हणजे नागनिका. ही प्रथम सातकर्णीची राणी. सिमुख सातवाहनाची सून. ह्यांनी केलेल्या अनेक यज्ञांची नोंद नाणेघाटातील प्रतिमालेखात आहेत. हयात एक राजसूय आणि दोन अश्वमेधांची नोंद आहे. खारवेलाचा हाथीगुंफ़ेतील प्रस्तरलेख बराचकाळ पावेतो अज्ञात होता. ह्यानेच दक्षिणपथाधिपतीला (सातवाहन) ह्यांना सीमेवर रोखल्याची नोंद मिळते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
ग
गामा पैलवान Sat, 09/24/2016 - 22:20 नवीन
संदीप डांगे,
>> अशा परिस्थितीत धर्मसुधारणा म्हणजे नेमकं काय आणि त्या कशा कराव्या ह्याबद्दल दोन व्यक्तिंमधे मतभेद >> असणे शक्य आहे ना?
अगदी बरोबर बोललात बघा. म्हणूनंच धर्मशास्त्राप्रमाणे वागायचं असतं. तिथे मनमानी कामाची नाही. कर्मकांड हे श्रद्धा व/वा भक्तिपूर्वक करायचं असतं. अन्यथा नुसती कसरत होते. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sun, 09/25/2016 - 06:46 नवीन
हे धर्मशास्त्र म्हणजे काय? धर्मशास्त्राचा प्रमाण ग्रंथ कुठला मानावा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Sun, 09/25/2016 - 08:43 नवीन
प्रचेतस, वेगवेगळ्या काळांत वेगवेगळ्या उपसानांसाठी वेगवेगळी शास्त्रे लिहिण्यात आली. त्यास ढोबळमानाने स्मृती म्हणता येईल. उपासक जी उपासनापूजाप्रार्थना करता तिला स्मृतीचा आधार असावा अशी कल्पना आहे. ते जमंत नसल्यास सरळ उपासना टाळावी. उगीच मनमानी करू नये अशी कल्पना आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Sun, 09/25/2016 - 08:47 नवीन
स्मृतीही अनेक आहेत मग कोणती स्मृती प्रमाण मानावी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Sun, 09/25/2016 - 08:49 नवीन
प्रचेतस, तुम्हाला पाहिजे ती स्मृती योग्य मानून चालू शकता. जर माहित नसेल तर तत्ज्ञांना विचारावे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Sun, 09/25/2016 - 08:54 नवीन
जे पाहिजे तेच योग्य मानायचे असेल तर मग धर्माशास्त्राला काय अर्थ राहिला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 09/25/2016 - 09:58 नवीन
जबरा प्रश्न!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
म
मारवा Sun, 09/25/2016 - 13:20 नवीन
तुम्ही म्हणताय
जे पाहिजे तेच योग्य मानायचे असेल तर मग धर्माशास्त्राला काय अर्थ राहिला?
पैलवान म्हणताय ते असे. तुम्हाला पाहिजे ती स्मृती योग्य मानून चालू शकता. तुम्ही पाहीजे ती स्मृती म्हणजे एका विषयावर दोन वेगवेगळी असलेल्या दोन स्मृती असतील वा तीन वेगवेगळी मते असलेल्या तीन स्मृती असतील तर तुम्ही त्या दोन वा तीन पैकी कुठलीही एक योग्य मानुन चालु शकता असे ते म्हणत आहेत. पण स्मृतीच मानायची आहे त्या बाहेर त्या चौकटीच्या बाहेर जायला त्यांनी धर्माने परवानगी दिलेली नाही. आता त्या दोन स्मृतीच्याच दोन तरतुदी परस्परविरोधी असतील तर तुम्ही काहीही घ्या निवडा चालेल. ते धर्मसंमतच असेल. आता हेच इंटरेस्टींग आहे. सध्याच्या गायीच्या ज्वलंत प्रश्नासंदर्भात मुळ नियमांना पाळल तरी चालेल गायीचा बळी द्या उत्तरकालीन कलिवर्ज्याचे धर्मग्रंथ आधारभुत मानले तरी चालेल गायीचा बळी देऊ नका. आता एकाने बळी दिला अनुबंध्या चा जुन्या धर्मग्रंथाचा दाखला देऊन तरी ते धर्मसंमत आहे. व सध्याच्या काऊ बॉइजनी एखाद्याला यावरुन बदडुन काढल तरी ते धर्मसंमतच आहे. शिवाय यात बदल झाले म्हणजे हे सनातन सत्य नाही हे ही मान्यच. गंमतच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 09/25/2016 - 17:12 नवीन
@आता एकाने बळी दिला अनुबंध्या चा जुन्या धर्मग्रंथाचा दाखला देऊन तरी ते धर्मसंमत आहे. व सध्याच्या काऊ बॉइजनी एखाद्याला यावरुन बदडुन काढल तरी ते धर्मसंमतच आहे. शिवाय यात बदल झाले म्हणजे हे सनातन सत्य नाही हे ही मान्यच. गंमतच आहे. ››› हिच तर मजा आहे शास्त्रा~धार संमंत धर्मसुधारणेची. उदा~ @चोरी करावी@ यालाही शास्त्रात आधार. @चोरी करू नये. @ यालाही! मग ते शास्त्र न रहाता फक्त परस्पर विरोधी विचारांचा संग्रह होऊन बसतं. सावकर शास्त्राधाराला एरंडाचं गुह्राळ म्हणत असत, ते उगीच नाही! म्हणूनच माझ्यासारखा माणूस धर्मातल्या चूकिच्या गोष्टी काढताना/बदलताना/त्यागताना , त्या गोष्टी चूक, अन्याय्य आहेत, असं म्हणून त्या आंम्ही स्वबुद्धीनी आणी केवळ नितिमत्तेच्या आधारावर बदलतो आहोत. असं म्हणून बदलल्या, काढल्या पाहिजेत. आणी त्यालाच खरीखुरी धर्मसुधारणा म्हटलं पाहिजे असा आग्रह धरतो. आणी म्हणूनच मला, शास्त्राचा आधार देऊन महिलांनाही धर्मातले कोणतेही आधिकार देणारा, किंवा अन्य कोणतिही सुधारणा आणणारा मला दांभिक वाटतो. (संदर्भ-महिलांना अंत्येष्टी क्रियेचा दिला जाणारा कथीत शास्त्राधार! व असे अनेक. ) मग त्या पुरोहिताच्या मनातली तसं करण्याची इच्छा किति का निर्मळ असे ना! या पद्धतिनी केलेल्या सुधारणेला व्यवहारात काहिही अर्थ उरत नाही.. कारण , आज शास्त्राचा आधार देऊन जी सुधारणा घडवली जाते, तीच उद्या गरज पडल्यावर परत विरूद्ध बाजुनी आधार देऊन काढूनंही घेतली जाऊ शकते. आणी पुन्हा २पावलं पुढं आलेला समाज परतीच्या वाटेला मागे जाऊ शकतो. यापेक्षा स्वबुद्धिनी (म्हणजेच धर्माद्न्या न जुमानता) केलेला बदल हा जास्तीत जास्त शाश्वत रहाण्याची शक्यता असते. म्हणून मला तीच वाट वंद्य आणी आचरणीय वाटते. कारण , कथीत धर्मशास्त्र मागे राहिलं तरी हरकत नाही, पण समाज पुढे गेलाच पाहीजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
स
सचु कुळकर्णी Sun, 09/25/2016 - 17:29 नवीन
काऊ बॉइज जबरा शब्द ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
म
मारवा Mon, 09/26/2016 - 08:51 नवीन
आत्मबंधजी मी तुम्हाला समजु शकलेलो नाही. तुम्ही एकीकडे इतके भेदक विश्लेषण एखाद्या कडव्या धर्मसुधारकासारखे करता. दुसरीकडे (माफ करा कृपया व्यक्तिगत घेऊ नये ) तुम्ही स्वतः माझ्या माहीतीप्रमाणे पुरोहीत आहात. तर हा अंतर्विरोध तुम्ही कसा मॅनेज करता. मी खरच तुम्हाला ओऴखु शकलेलो नाही. जर तुम्ही खरेच असे विचार बाळगता तर तुम्ही एकीकडे त्याच शोषण व्यवस्थेचा एक भाग म्हणुन एक सक्रीय घटक म्हणुन काम का करता ? हा मला पडलेला प्रश्न आहे. तुम्ही प्रच्छ्न बौध्द्द सारखे प्रच्छन्न सुधारक वगैरे आहात का ? एक गावठी उदाहरण घेतो समजा एका गावात नविन ऑफसेट मशीन्स आल्यानंतर खिळाप्रेस चे जुने ३ छापखाने राहीलेत. बाकी सर्व ऑफसेट मध्ये कनव्हर्ट झाले. पण गावातील माधवराव हे जुने गृहस्थ ( आठवतय का ग मालती ? आपल्या लग्नाची पत्रिका बाबांनी तो पत्रिकेचा गठ्ठा आणायला मलाच " आर्यभुषण" मध्ये पाठवलेल होत. त्यातली एक ठेऊन घेतली होती व मी तुला पोस्टाने पाठव्लेली) तर असे काही जे माधवराव शिल्लक आहेत शेवटचे थोडेफार त्यांची एक खिळाप्रेस ची गर ज आहे त्यांना खिळाप्रेस शी एक इमोशनल अ‍ॅटेचमेंट आहे. तर तुम्ही ती पुर्तता करणारे खिळाप्रेस चे शेवटचे शिलेदार आहात का ? म्हणजे माझा एक आपला अंदाज तुम्ही का सक्रीय सहभाग देताय मग ? तुमच अस तर लॉजिक नाही ना की मी थांबलो तर काय फरक पडेल लोक दुसरा पुरोहीत बघतील. ते दारुबंदी वेळेस हा युक्तीवाद असतो. तर तुम्ही एक गुढ आणि कॉम्प्लेक्स व्यक्ती आहात माझ्यापुरते तरी. मला तुम्हाला समजुन घेण्यात मदत करावी. अजुन एक स्पेसीफीक प्रश्न एकुण समजा ४० रुढी आहेत तर त्यापैकी जरी ३३ वाइट असल्या तरी उरलेल्या ७ फार चांगल्या आहेत व त्या ७ चे जतन च नव्हे संवर्धनही होणे अगत्याचे आहे असे तर तुमचे मत नाही ? म्हणजे तुम्ही उरलेल्या ७ आवश्यक चांगल्या योग्य न्याय्य रुढींच्या संवर्धनासाठी हे काम करत आहात ? काय आहे तुमची भुमिका नेमकी ? आपला विनम्र मारवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अभ्या.. Mon, 09/26/2016 - 08:58 नवीन
आत्मबंधबुवांविषयी एवढा विचार नका करु मारवाजी, त्यांनी त्यांच्या खिळाप्रेसचे रुपांतर डायकट आणि क्रेझिंग मशीनमध्ये केलेय. चांगला चालुय धंदा त्यांचा. कधी कधी ऑफसेट वाल्यापेक्षा कमी रिस्क आणि भांडवलावर जास्त नफा कमवतात ते. . (गुर्जी, हे अगम्य शब्द वाटले तरी तुमच्या विषयी काही वाईट साईट नाहीये बरका. तुमच्या फ्लेक्सिबिलिटीचे कौतुकच आहे. नायतर येताल दुदुदुदुदुद ल्लुल्लुल्लुलु करत)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
म
मारवा Sun, 09/25/2016 - 08:59 नवीन
उदाहरणार्थ हा स्त्रीच्या पुनर्विवाहा संदर्भातील घोळ बघा. स्त्री ला काही विशीष्ट परीस्थीतीत पुनर्विवाह करण्याची परवानगी काही धर्मग्रंथांनी दिलेली होती.उदा. नारद स्मृती (स्त्रीपुंस प्र. ९७) ने पाच आपत्त्तीत जर पती हरवला असेल, मृत झाला, संन्यासी झाला, नपुंसक असेल, पतित झाला असेल तर दुसरा विवाह करण्याची परवानगी दिली होती. तसेच वसिष्ठ धर्मसुत्र स्त्रीचे दोन प्रकार मानतो एक जिचा विवाह झालेला आहे मात्र ती अक्षतयोनि आहे दुसरी जिचा विवाह झालेला आहे मात्र क्षतयोनि आहे. यात केवळ पहील्या प्रकारात स्त्री ला पुनर्विवाहाची परवानगी होती. इतरही काही ग्रंथ घर सोडुन गेलेल्या पतिची कीती काळ वाट पाहुन मग दुसरा विवाह कधी करावा या संदर्भात नियम देतात उदा. ८ वर्ष ४ इ. वर्णानुसार. कलिवर्ज्य- यानुसार वरील सर्व प्रकारच्या सर्व ग्रंथानी दिलेली सवलत काढुन कुठल्याही परीस्थीतीत पुनर्विवाह हा स्त्री ला या कलियुगात वर्ज्य आहे असे नोंदवतो. स्त्री चा पुनर्विवाहाचा अधिकार पुर्णपणे अमान्य करतो. आता नेमके काय करावे ? मूळात अजुन एक मुद्दा याहुन महत्वाचा आहे तो असा की समजा वरील प्रमाणे विसंगती नाही हे मान्यही केले वा कालानुक्रमे बदल नाहीत हे ही मान्य केले. एक धर्मशास्त्रांतर्गतच एक सुसंगती ही दाखवुन दिली तरीही त्यांचा जर निकाल हा असेल की पुनर्विवाहाचा अधिकार अमान्यच आहे पति कसाही असला तरीही. तर मुळात हा नियम केवळ धर्मग्रंथात आहे व सुसंगत आहे म्हणुन तो योग्य व न्याय्य आहेच असे का मानावे ? म्हणजे असे असेलच असे धरुन कुठल्या नैतिकतेच्या कसोटीवर मान्य करावे. अजुन एक सध्या खाण्यापिण्याचे नियम फारच कडक आहेत या संदर्भात हा एक नियम बघा जुना नियम- गौतम व विष्णुधर्मसुत्र व याज्ञवल्क्य आणि पाराशर स्मृती नुसार ब्राह्मण चार प्रकारच्या शुद्रांच्या घरी अन्न ग्रहण करु शकत असे. ते असे होते एक त्याचा दास, त्याचा गुराखी, त्याचा कुलमित्र ( हेरीडिशीयरी फ़ॅमिली फ़्रेंड हा शब्द काणे वापरतात) आणि ब्राह्मणाचे शेत बटाईने राखणारा सालदार (हिस्सा घेऊन हा मुद्दा महत्वाचा मराठी प्रतिशब्द कोणताही असो) जरी यापैकी हे चारी शुद्रवर्णीय असले तरी यानुसार ब्राह्मणाला यांच्या केवळ यांच्या घरी यांच्या हातचे अन्न खाण्याची परवानगी दिलेली होती. शिवाय यात पाचवा ब्राह्मणाचा न्हावी जो असेल त्यालाही काही धर्मग्रंथ यात घेत. म्हणजे त्याच्या शुद्र न्हाव्याकडेही ब्राह्मण जेऊ शकत असे. कलिवर्ज्य- वरील चारही व पाचव्या प्रकारच्या शुद्रा कडे ब्राह्मणाने भोजन करण्याच्या परवानगीला पुर्णपणे नाकारतो. कुठल्याही परीस्थीतीत शुद्राकडे भोजन करु नये असा प्रतिबंध घालतो. आता केवळ धर्मग्रंथात आहे म्हणुन शुद्राकडे जेवु नये वा ज्याला शुद्र मानतो तो त्या साठी पात्र नाही हे कुठल्या नैतिक निकषावर ठरवावे ? सुसंगती नाही त्यामागील न्यायिक संकल्पना मला अधिक महत्वाची वाटते. सुसंगति तर मिळुनही जाईल. त्यात काही विशेष नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
श
श्रीगुरुजी Sun, 09/25/2016 - 11:32 नवीन
कलिवर्ज्य- यानुसार वरील सर्व प्रकारच्या सर्व ग्रंथानी दिलेली सवलत काढुन कुठल्याही परीस्थीतीत पुनर्विवाह हा स्त्री ला या कलियुगात वर्ज्य आहे असे नोंदवतो. स्त्री चा पुनर्विवाहाचा अधिकार पुर्णपणे अमान्य करतो. आता नेमके काय करावे ?
असल्य स्मृती, ग्रंथात काय लिहिले आहे त्याकडे दुर्लक्ष करून विधवा/घटस्फोटित महिलेने तारतम्य वापरून आपल्याला जे योग्य वाटेल ते करावे. असल्या ग्रंथांवर आधारीत निर्णय घ्यायचा असेल तर कुराणावर आधारीत वर्तणूक ठेवणार्‍या मुस्लिमांमध्ये व आपल्यामध्ये काहीही फरक राहणार नाही.
कलिवर्ज्य- वरील चारही व पाचव्या प्रकारच्या शुद्रा कडे ब्राह्मणाने भोजन करण्याच्या परवानगीला पुर्णपणे नाकारतो. कुठल्याही परीस्थीतीत शुद्राकडे भोजन करु नये असा प्रतिबंध घालतो.
तद्दन मूर्खपणा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
म
मारवा Sun, 09/25/2016 - 11:45 नवीन
मात्र जी व्यक्ती हिंदु आहे धार्मिक आहे. व धर्मग्रंथांवर व त्यांच्या अधिकारावर श्रद्धा ठेवणारी आहे. व आपल्या दैनंदिन कृत्यांचा नैतिक आधार म्हणुन या ग्रंथांवर व त्यातील शिकवणीवर गायडन्स वर अवलंबुन आहे. त्याचे आग्रहाने जमेल तितके आचरण करण्याबाबत आग्रही आहे. जिथे पुर्ण आचरण जमत नाही तिथे गिल्टी फिल करणारी आहे. अशी एक हिन्दु धार्मिक व्यक्ती जर म्हणेल की मी हे असे असे वागतो याचे कारण माझा धर्म व त्याचा ग्रंथ मला असे वागण्याची परवानगी देतो वा त्यात अशी तरतुद आहे. मग हे केवळ तुम्ही म्हणता तद्द्दन मुर्खपणा म्हणून त्याने का मानावे ? तो जर या वागण्याला वरील धर्मग्रंथांचे समर्थन देत असेल तर मग काय करावे ? हे इतर धर्माविषयीही अर्थातच लागु आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sun, 09/25/2016 - 11:57 नवीन
अशी एक हिन्दु धार्मिक व्यक्ती जर म्हणेल की मी हे असे असे वागतो याचे कारण माझा धर्म व त्याचा ग्रंथ मला असे वागण्याची परवानगी देतो वा त्यात अशी तरतुद आहे. मग हे केवळ तुम्ही म्हणता तद्द्दन मुर्खपणा म्हणून त्याने का मानावे ? तो जर या वागण्याला वरील धर्मग्रंथांचे समर्थन देत असेल तर मग काय करावे ?
'तद्दन मूर्खपणा' हे माझे वैयक्तिक मत आहे. परदेशात माझ्या बरोबर अपार्टमेंटमध्ये एक हैद्राबादचा मुस्लिम मुलगा होता. तो फक्त शुक्रवारीच डोक्यावरून स्नान करायचा. इतर दिवशी फक्त खांद्यावरून. ६ दिवस डोक्याला पाणी नसल्याने शेवटचे २-३ दिवस डोक्याला वाईट वास यायचा. त्याला एकदा यासंबंधी कारण विचारले असताना त्याने सांगितले की त्याचा धर्म वाळवंटात जन्माला आला व तिथे पाण्याचे खूप दुर्भिक्ष असल्याने अशी पद्धत पडली. मला ते लॉजिक पटले. परंतु मी त्याला सांगितले की त्या काळात तसे करणे लॉजिकल होते, परंतु २० व्या शतकात या देशात २४ तास स्वच्छ पाणी घरी उपलब्ध असताना ६ व्या शताकासारखेच वागण्याची गरज आहे का? त्याला हा मुद्दा पटला, परंतु त्याने आपल्यात बदल केला नाही. तस्मात ग्रंथात काहीही लिहिले असले किंवा काहीही परंपरा असली तरी त्या काळानुसार बदलायला हव्यात असे माझे मत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
  • «
  • ‹
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा