अंधश्रद्धा निर्मूलन श्री हमीद दाभोलकर ह्यांचे
आमचे एक गुरुजी होते नेहमी सदाचार, शिस्त इत्यादी गोष्टीची शिकवण द्यायचे. गुरुजी म्हणजे साक्षांत गुरु ब्रहस्पती अशी आम्हा मुलांची धारणा होती. एकदा मला तालुक्याच्या ठिकाणी एका स्पर्धेंत ५० रुपयाचे रोख बक्षीस प्राप्त झाले आणि घरी येत असताना गुरुजींनी "बाळ तुझ्या कडून पैसे हरवातील म्हणून मी ठेवतो" असे सांगून लिफाफा आपल्या कडे ठेवला. दुसऱ्या दिवशी शाळेंत "बाळ हे तुझे पैसे" म्हणून सर्वां समक्ष परत सुद्धा दिला. गुरुजींच्या विश्वासामुळे मी पैसे वगैरे मोजायच्या फंदात पडले नाही (त्यांच्या पुढे) मन त्यांच्या मागे मोजून पहिले तर आंत फक्त ५ रुपये होते. घरी सांगितले तर सगळ्यांनी "ग तुझ्याच कडून हरवले असतील, राहू दे" म्हणून विषयावर पांघरून टाकले.
खूप वर्षांनी मी कार चा परवाना काढण्यासाठी RTO मध्ये गेले असता गुरुजी सुद्धा टेस्ट द्यायला आले होते आणि फेल सुद्धा झाले. RTO हापिसर मित्र होता. "तिसऱ्यांदा फेल होताहेत" असे त्याने मला मागाहून सांगितले. मी गुरुजींना "काय गुरुजी लायसन भेटले का असे चार चौघां पुढे विचारले" तर गुरुजींनी उत्तर दिले "नाही RTO हापिसर ला आज थोडी घाई होती म्हणून नंतर यायला सांगितले आहे आणि त्यानंतर सरकारी अधिकारी कसे प्रामाणिक पणे काम करत नाहीत ह्यावर भाषण द्यायला सुरु केली. लहानपणांत चारित्र्यवान वाटणारे गुरुजी आज विदूषकाचे पेक्षाही विनोदी वाटत होते.
विषयांतर बाजूला ठेवूया. सार्वजनिक जीवनात सुद्धा ह्या गुरुजी सारखे लोक कमी नाहीत. उदाहरण म्हणजे श्री हमीद दाभोलकर.
.
.
.


अनेक कर्मकांड निरर्थक असतात. काही हानिकारकही असतात. समजातील बहुसंख्यांना कर्मकांड सोडण्यासाठी तुलनेने कमी हानिकारक पर्याय दिला तरच ते तो स्वीकारतात. अस करत करत अनेक कर्मकांडातील हानीकारक भाग काढता येतो.
››› +++१११ धर्मसुधारणा आणी धर्मनिर्मूलन यातला फरक त्यातल्या उपयोगितेसह जोपर्यंत जांच्या लक्षात येणार नाही. तोपर्यंत वरील मत त्यांच्याकडून स्विकारलच जाणार नाही.नारळ हा बळीला कमी हानिकारक पर्यायच आहे ना? श्राद्धाला ब्राह्मण भोजन करण्याऐवजी लोक एखाद्या गरजूचा जेवणाचा खर्च करतातखर आहे तुमचे. पण नरबळी द्यायच्या ऐवजी, नारळाचा बळी दिला तर तो त्या 'नारळा'वर अन्याय नाही का होत?तुम्हाला पाहिजे ती स्मृती योग्य मानून चालू शकता.तुम्ही पाहीजे ती स्मृती म्हणजे एका विषयावर दोन वेगवेगळी असलेल्या दोन स्मृती असतील वा तीन वेगवेगळी मते असलेल्या तीन स्मृती असतील तर तुम्ही त्या दोन वा तीन पैकी कुठलीही एक योग्य मानुन चालु शकता असे ते म्हणत आहेत. पण स्मृतीच मानायची आहे त्या बाहेर त्या चौकटीच्या बाहेर जायला त्यांनी धर्माने परवानगी दिलेली नाही. आता त्या दोन स्मृतीच्याच दोन तरतुदी परस्परविरोधी असतील तर तुम्ही काहीही घ्या निवडा चालेल. ते धर्मसंमतच असेल. आता हेच इंटरेस्टींग आहे. सध्याच्या गायीच्या ज्वलंत प्रश्नासंदर्भात मुळ नियमांना पाळल तरी चालेल गायीचा बळी द्या उत्तरकालीन कलिवर्ज्याचे धर्मग्रंथ आधारभुत मानले तरी चालेल गायीचा बळी देऊ नका. आता एकाने बळी दिला अनुबंध्या चा जुन्या धर्मग्रंथाचा दाखला देऊन तरी ते धर्मसंमत आहे. व सध्याच्या काऊ बॉइजनी एखाद्याला यावरुन बदडुन काढल तरी ते धर्मसंमतच आहे. शिवाय यात बदल झाले म्हणजे हे सनातन सत्य नाही हे ही मान्यच. गंमतच आहे.