Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अंधश्रद्धा निर्मूलन श्री हमीद दाभोलकर ह्यांचे

स
साहना
Sun, 09/18/2016 - 04:28
🗣 456 प्रतिसाद
आमचे एक गुरुजी होते नेहमी सदाचार, शिस्त इत्यादी गोष्टीची शिकवण द्यायचे. गुरुजी म्हणजे साक्षांत गुरु ब्रहस्पती अशी आम्हा मुलांची धारणा होती. एकदा मला तालुक्याच्या ठिकाणी एका स्पर्धेंत ५० रुपयाचे रोख बक्षीस प्राप्त झाले आणि घरी येत असताना गुरुजींनी "बाळ तुझ्या कडून पैसे हरवातील म्हणून मी ठेवतो" असे सांगून लिफाफा आपल्या कडे ठेवला. दुसऱ्या दिवशी शाळेंत "बाळ हे तुझे पैसे" म्हणून सर्वां समक्ष परत सुद्धा दिला. गुरुजींच्या विश्वासामुळे मी पैसे वगैरे मोजायच्या फंदात पडले नाही (त्यांच्या पुढे) मन त्यांच्या मागे मोजून पहिले तर आंत फक्त ५ रुपये होते. घरी सांगितले तर सगळ्यांनी "ग तुझ्याच कडून हरवले असतील, राहू दे" म्हणून विषयावर पांघरून टाकले. खूप वर्षांनी मी कार चा परवाना काढण्यासाठी RTO मध्ये गेले असता गुरुजी सुद्धा टेस्ट द्यायला आले होते आणि फेल सुद्धा झाले. RTO हापिसर मित्र होता. "तिसऱ्यांदा फेल होताहेत" असे त्याने मला मागाहून सांगितले. मी गुरुजींना "काय गुरुजी लायसन भेटले का असे चार चौघां पुढे विचारले" तर गुरुजींनी उत्तर दिले "नाही RTO हापिसर ला आज थोडी घाई होती म्हणून नंतर यायला सांगितले आहे आणि त्यानंतर सरकारी अधिकारी कसे प्रामाणिक पणे काम करत नाहीत ह्यावर भाषण द्यायला सुरु केली. लहानपणांत चारित्र्यवान वाटणारे गुरुजी आज विदूषकाचे पेक्षाही विनोदी वाटत होते. विषयांतर बाजूला ठेवूया. सार्वजनिक जीवनात सुद्धा ह्या गुरुजी सारखे लोक कमी नाहीत. उदाहरण म्हणजे श्री हमीद दाभोलकर. . . . img

प्रतिक्रिया द्या
217829 वाचन

💬 प्रतिसाद (456)
म
मारवा Sun, 09/25/2016 - 12:54 नवीन
तस्मात ग्रंथात काहीही लिहिले असले किंवा काहीही परंपरा असली तरी त्या काळानुसार बदलायला हव्यात असे माझे मत आहे. या मतात आक्षेप घेण्यासारखे काहीच नाही. फक्त जेव्हा आपण असे करतो तेव्हा आपण पारंपारीक अर्थाने धर्म मानत नाही हे व आपल्या सोयीनुसार वा बुद्धीनुसार वा स्वार्थानुसार धर्माचा अर्थ लावतो याची जाणीव असु दिली म्हणजे झाले. दुसर धर्मात वा धार्मिक ग्रंथात लिहीलेली प्रत्येक बाब ही सनातन सत्य नसुन, ईश्वरी नसुन मानवीच आहे व हितसंबंधाची प्रेरणा त्यामागे अर्थातच आहे. उदाहरणार्थ धर्मग्रंथांचा एक जुना नियम असा होता. गोसव नावाच्या जुन्या यज्ञात "अनुबंध्या" गायीचा बळी ("बॅरन काऊ" असा अर्थ काणे सांगतात) अग्निस्तोमाच्या शेवटी एका विशीष्ट विधीनंतर दिला जात असे. मान्यवर पाहुण्याला देण्यासाठी बनवलेल्या मधुपर्क या विशेष पदार्थातही मुख्य घटक म्हणुन गायीचे मास वापरण्यात येत असे. गोभिल गृह्यसुत्रानुसार अष्टकश्राध्द्दातही गायीचा बळी दिला जात असे.. आपस्तंब धर्मसुत्र सांगतो की गायीचे मांस जर श्राद्धभोजनात पितरांना अर्पण केले तर पितर एक वर्षाच्या कालावधीसाठी तृप्त राहतात. गोमेध या यज्ञातही गायीचीच बळी दिली जात असे हा यज्ञ केवळ वैश्य करु शकत असे. कलिवर्ज्य वरील सर्व जुने नियम रद्द करत कुठल्याही कारणासाठी कुठल्याही यज्ञात गायीच्या बळीचा निषेध करतो. गोवध कलिवर्ज्य ठरवतो. खर म्हणजे माझा मूळ प्रश्न गामा पैलवान यांना होता ते जे म्हणत होते तंतोतंत शास्त्रात जे आहे ते पाळावे नाही तर ती कसरत ठरते त्यावरुन तो विचारलेला होता. तर तुम्हालाही विचारुन घेतो वरील मुळ नियम व बदल आपण पाहीला आता सध्या जी गोहत्या बंदी आहे त्याविषयी आपले काय मत आहे ? यात गोरक्षक मूळ धर्माचे पालन करत आहेत का ? लॉजिकली विचार करत आहेत का ? तुम्ही यावर काय लॉजिकली विचार करता ? काळानुसार ही परंपरा योग्य आहे की अयोग्य आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sun, 09/25/2016 - 17:10 नवीन
आपस्तंब धर्मसुत्र सांगतो की गायीचे मांस जर श्राद्धभोजनात पितरांना अर्पण केले तर पितर एक वर्षाच्या कालावधीसाठी तृप्त राहतात. गोमेध या यज्ञातही गायीचीच बळी दिली जात असे हा यज्ञ केवळ वैश्य करु शकत असे.
श्राद्धभोजनात किंवा नवस म्हणून देवाचा किंवा पितरांच्या नावाखाली जे प्राणी कापले जातात ते देव किंवा पितर यांच्यासाठी आहेत असा फक्त देखावा असतो किंवा या अंधविश्वासाखाली ते कापले जातात. प्रत्यक्षात स्वतःला त्या प्राण्यांचे मांस सेवन करायचे असते. परंतु त्यात देवाला भागीदार करून घेतले जाते. कदाचित प्राणीहत्या करताना मनात अपराधी भावना असावी व त्या हत्येचे संपूर्ण पातक आपल्यावर न येता त्यातला काही भाग देवाकडे/पितरांकडे जावा अशी मनात इच्छा असावी. जर हे प्राणी सेवनासाठी न मारता फक्त नवस/श्राद्ध इ. साठीच मारले गेले असते तर मारल्यानंतर त्या प्राण्यांची प्रेते सेवन न करता जाळून किंवा पुरून टाकली असती. मुस्लिमसुद्धा कोंबड्या/बकर्‍या सेवनासाठी कापतात. परंतु त्यांना मारताना अल्लाला भागीदार करून घेतात. त्यामागे हीच भावना असावी. मुळात पितरांचे अस्तित्व हे अमूर्त/अदृश्य अस्तित्व आहे. असे अस्तित्व मूर्त्/दृश्य वस्तूंनी कसे काय तृप्त राहू शकेल? अवांतर - आमच्या घराण्याच्या ज्ञात पूर्वजांपैकी सर्वजण शाकाहारी होते. त्यांच्या श्राद्धाला गायीचे मांस भोजनात ठेवले तर ते तृप्त राहण्याऐवजी शाप देतील.
तर तुम्हालाही विचारुन घेतो वरील मुळ नियम व बदल आपण पाहीला आता सध्या जी गोहत्या बंदी आहे त्याविषयी आपले काय मत आहे ? यात गोरक्षक मूळ धर्माचे पालन करत आहेत का ? लॉजिकली विचार करत आहेत का ? तुम्ही यावर काय लॉजिकली विचार करता ? काळानुसार ही परंपरा योग्य आहे की अयोग्य आहे ?
मी शाकाहारी आहे. मला जे पटत नाही ते बंद करताना किंवा जे पटते ते स्वीकारताना मी धर्माची याला मान्यता आहे का, याविषयी धर्मग्रंथात काय लिहिले आहे, आपण हे करताना धर्मपालन करीत आहोत का, ही परंपरा योग्य की अयोग्य इ. गोष्टींचा विचार करीत नाही. मी फक्त माझ्या मनाचा कौल स्वीकारतो. निव्वळ गोहत्याच नव्हे तर इतर सर्व प्राण्यांच्या हत्या बंद व्हाव्यात असे माझे मत आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
म
मारवा Mon, 09/26/2016 - 09:43 नवीन
तुमची मते छान स्पष्टपणे मांडलीत ती आवडली. विशेषतः हे श्राद्धभोजनात किंवा नवस म्हणून देवाचा किंवा पितरांच्या नावाखाली जे प्राणी कापले जातात ते देव किंवा पितर यांच्यासाठी आहेत असा फक्त देखावा असतो किंवा या अंधविश्वासाखाली ते कापले जातात. प्रत्यक्षात स्वतःला त्या प्राण्यांचे मांस सेवन करायचे असते. परंतु त्यात देवाला भागीदार करून घेतले जाते. आदी शंकराचार्य यज्ञातील पशु हिंसेचे तुम्ही म्हणता त्या प्रमाणेच उघड दांभिक समर्थन करतात तेव्हा त्याचे आश्चर्य व मौज नेहमीच वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
संदीप डांगे Sun, 09/25/2016 - 05:29 नवीन
म्हणूनंच धर्मशास्त्राप्रमाणे वागायचं असतं. तिथे मनमानी कामाची नाही. ^^^^ अगदी इस्लामी धर्मगुरुसारखं आहे हे विधान..
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sun, 09/25/2016 - 08:47 नवीन
.... पण मला बाई किनई, ऐच्छिक आणि अनिवार्य यांतला फरक छानपैकी कळतो हो. -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Sun, 09/25/2016 - 17:15 नवीन
पण मला बाई किनई, ऐच्छिक आणि अनिवार्य यांतला फरक छानपैकी कळतो हो. >> अय्या हो!? मग ही मनमानी आहे की नाही????? =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Sun, 09/25/2016 - 22:42 नवीन
मारवा, परस्परविरोधी धर्मशास्त्रे असतील तर काय करावे असा तुमचा प्रश्न आहे. पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे धर्मशास्त्रे लिहिली गेली ती उपासनेसाठी. निदान माझा तरी असा समज आहे. तुमचा प्रश्न उपासनेशी संबंधित दिसंत नाही. तो सोडवण्यासाठी न्यायशास्त्राचा (म्हणजे प्रचलित स्मृतीचा) आधार घ्यावा लागेल. आता स्मृतीविपरीत धर्मशास्त्राधार मिळाला तरी त्यानुसार आचरण करू नये या मताचा मी आहे. उदाहरणार्थ द्विभार्या प्रतिबंधक कायदा ही प्रचलित स्मृती आहे. त्यामुळे शक्य असलं तरी दोन बायका करू नयेत (मात्र हा कायदा धाब्यावर बसवून अनेक लोकं अतिरिक्त विवाह करतात ते वेगळं). अर्थात, हिंदुंचं कुठलंही धर्मशास्त्र आवाहन, सूचना वा सल्ला देतं. आदेश देत नाही. आदेश देण्याचं काम स्मृतीचं आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
म
मारवा Mon, 09/26/2016 - 08:38 नवीन
पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे धर्मशास्त्रे लिहिली गेली ती उपासनेसाठी. निदान माझा तरी असा समज आहे. तुमचा प्रश्न उपासनेशी संबंधित दिसंत नाही. तो सोडवण्यासाठी न्यायशास्त्राचा (म्हणजे प्रचलित स्मृतीचा) आधार घ्यावा लागेल. अत्यंत विनम्रतेने आपणांस सुचवु इच्छितो आपणांस असे म्हणावयाचे असेल की धर्मसुत्रे धर्मशास्त्रे एकीकडे व स्मृति दुसरीकडे असे दोन वेगवेगळे आहेत. म्हणजे कायदा नियम या अर्थाने केवळ स्मृतीतच आहे व धर्मशास्त्रे केवळ पुजापाठ उपासने संदर्भातील विवेचन करतात. तर आपले म्हणणे कृपया आपल्या आवडीच्या कुठल्याही अधिकृत म्हणजे धार्मिक अधिकृतच ग्रंथातुन केवळ एकवार तपासुन घेतले तर बरे होइल. कारण धर्मसुत्रे धर्मशास्त्रे व स्मृती तिनही विविध आचरणाचे नियम व कायदे यांनी भरलेले आहेत व या बाबतीत स्मृती वेगळी धर्मसुत्र वेगळे असा भेद नाहीच. सर्वात मुळात श्रुती त्यानंतर स्मृती त्यानंतर पुराणे हा क्रम सर्वमान्य आहे. त्यात भाष्यकार हा वेगळा भाग आहे उदा. याज्ञवल्क्यस्मृतीवरील " मिताक्षरा" ही विज्ञानेश्वराने लिहीलेली टीका/भाष्य आहे. तो उत्तरकालीन इंटरप्रीटर आहे. मनुमृती चे भाष्यकार मेधातिथी आहे कुल्लुक आहे मेधातिथी ११ व्या कुल्लुक तर अगदी अलीकडचा आहे. हा एक भाग. काही स्मृतीतर अगदी अलीकडच्या काळातील आहेत उदा. देवल स्मृती व त्याहुन अनेक धर्मसुत्रे अती प्राचीन आहेत. काही तर इ.स.पुर्व ७ व्या शतकापर्यंत मागे जातात. धर्मसुत्रातला व स्मृतीतला कायदा हा नुसता प्रोव्हीजन्स नाहीतर शिक्षेच्या तरतुदींसहीत दिलेला आहे. त्याचे अ‍ॅक्च्युअल इम्प्लीमेंटेशन हा वेगळा विषया आहे. पण ज्या कॅज्युअली तुम्ही स्मृती व धर्मशास्त्र्/सुत्र जो भेद देत आहात तो तसा नाही. वरील सर्व विवेचनही एका बाजुला ठेवा या व्यतिरीक्त दोन स्मृतीच घेतल्या तुमच्याच म्हणण्याप्रमाणे तरी त्यात परस्परविरोधी नियम कायदे मोठ्या प्रमाणावर आहेतच. त्यावर आक्षेप एक भाग. दुसरा परंपरेनेही त्यावर सॉर्ट आउट ची जी सोय केलेली आहे ती आपणास माहीत असेलच. शिवाय हा कलिवर्ज्य चे अ‍ॅमेंडमेंट. तर पहीला आक्षेप इनकसिस्टंसीचा आहेच पण तो फारच बेसीक त्यानंतर हितसंबंधाचा त्यानंतर मानवीय असण्याचा व त्याहुन महत्वाचा त्यातील अन्न्याय्य भेदभावयुक्त शोषक विषम तरतुदींचा ज्या कुठल्याच स्वाभाविक न्यायाच्या कसोटीवर कधीही टीकत नाहीत. ते बंधन का मानावे स्वतंत्र चिकीत्सा करुन स्वतंत्र धर्मनिरपेक्षनीतीने का आचरण करु नये या संदर्भातील आक्षेप आहेत. त्यामागील शोषणावर आक्षेप आहे. तर वरील स्मृतींच फक्त साठी खालील एक मुद्दा पहा. यात सध्या कात्यायन या एकाच स्मृतीचा उल्लेख असला तरी त्यातील परस्परविरोध एकदा तपासुन घ्या दुसरी स्मृतीचे उदाहरण शोधुन देतो. अजुन एखादे काँक्रीट दोन स्मृतीभेद असलेले उदाहरणही देतो सध्यापुरते हे बघा. "आततायिन " व्यक्तीने (डेस्परेट/व्हायोलंट) युद्धाच्या पवित्र्यात जर हल्ला केला तर आणि त्याला स्वत:चा बचाव करण्याच्या हेतुने मारले तर त्यात काहीही गैर नाही असे अनेक जुन्या धर्मशास्त्रांचे मत होते. आततायिन च्या व्याख्येत हिंसक पुरुष जो शस्त्रसज्ज आहे/दरोडेखोर आहे/आग लावण्याच्या हेतुने/ एखाद्याची पत्नी पळवण्याच्या हेतुने / जर आक्रमण करत आहे अशांचा समावेश होता. तर अशा "आततायिन" व्यक्तीवर प्रतिहल्ला करुन त्याला ठार मारणे धर्मसंमत होते. मात्र यात असा "आततायिन" ब्राह्मण असेल तर मात्र त्याला मारावे की नाही याविषयी अनेक धर्मसुत्रांत अगोदरपासुनच मतभेद होते. प्रातिनिधीक म्हणुन वसिष्ठ धर्मसुत्र म्हणतो जर ब्राह्मण हा आततायिन म्हणुन हल्ला करण्यास आला व इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर जरी तो वेदाधिकारी असला तरी त्याच्या प्रतिकारात केलेल्या हत्येने ब्रह्महत्येचे पातक लागत नाही. दुसरीकडे कात्यायन स्मृती म्हणते ब्राह्मण हा जरी आततायिन असेल व हल्ला करत असेल तरी त्याला (स्वत:च्या जीवाच्या रक्षणासाठी देखील मारु नये) भृगु म्हणतो आततयिन शुद्र असेल तर मारायला हरकत नाही मात्र ब्राह्मणाला मारु नये
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Sun, 09/25/2016 - 22:51 नवीन
आत्मबंध गुरुजींना बालके गामा पैलवानाचा साष्टांग नमस्कार! तुम्ही म्हणालात की :
आंम्ही स्वबुद्धीनी आणी केवळ नितिमत्तेच्या आधारावर बदलतो आहोत. असं म्हणून बदलल्या, काढल्या पाहिजेत.
ठीक आहे. वादापुरती ही भूमिका मान्य करूया. पुढे तुम्ही म्हणालात की :
आज शास्त्राचा आधार देऊन जी सुधारणा घडवली जाते, तीच उद्या गरज पडल्यावर परत विरूद्ध बाजुनी आधार देऊन काढूनंही घेतली जाऊ शकते.
आता गम्मत बघा की, नेमका हाच युक्तिवाद तुमच्या बुद्धीलाही लागू पडतो. आज तुम्ही तुमच्या बुद्धी आणि नीतीचा हवाला देताहात. उद्या कशावरून ती बदलणार नाही? समजा जरी बदलली नाही तरी, भावी पिढ्यांचा काय भरोसा? तुमच्यासारखे सद्बुद्धी आणि दृढनीतीने वागणारे पुढे निपजलेच नाही तर? अशा वेळेस तुमचा शब्दंच प्रमाण मानावा लागेल ना? तोच शास्त्रासम ठरेल ना? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 09/26/2016 - 01:46 नवीन
@तुमच्यासारखे सद्बुद्धी आणि दृढनीतीने वागणारे पुढे निपजलेच नाही तर? अशा वेळेस तुमचा शब्दंच प्रमाण मानावा लागेल ना? तोच शास्त्रासम ठरेल ना? ››› नाही . अजून तरी कुणी आजपर्यंत घडलेल्या सुधारणा बुद्धीच्या आधारे फिरवून उलट मागे नेलेल्या दिसत नाहित. जेव्हढे बदल झालेत ते भरपूर टिकलेत. उलट धार्मिक संघटनाच धर्माद्न्या काढून ते पुसायचा प्रयत्न करतायत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Mon, 09/26/2016 - 09:13 नवीन
आत्मबंध गुरुजींना बालके गामा पैलवानाचा साष्टांग नमस्कार! स्त्रियांचे सबलीकरण ही एक सुधारणा आहे. मात्र त्याकरिता ४९८ अ सारखा अन्यायी कायदा बनवणे ही कुधारणा आहे. ही कुधारणा बुद्धीच्या सहाय्याने केलेली आहे. तुमच्या वैयक्तिक बुद्धी व नीतीच्या आधारे केलेल्या धर्मसुधारणा देखील शास्त्रबद्ध केल्या नाहीत तर पुढे त्यांची गती ४९८ अ सारखी होणार नाही हे कशावरून? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 09/26/2016 - 09:53 नवीन
चुकिचे कायदे किंवा कायद्यातील चुका सामाजिक चळवळी करून बदलल्या जाऊ शकतात. पण चिपाड बंद हजारो वर्ष झाली तरी बदलले गेलेले नाहित.. पोथ्यांमधेही आणी बरेचसे व्यवहारातही! धर्मात बदलाची सोय नसते. न ती कधी कुठल्या धर्माचार्यानी आपणहून दिलेली आहे. हे सर्वांना नीट माहिती आहे. तेंव्हा यापुढिल तुमच्या निरर्थक युक्तिवादांना उत्तर देण्याचिही गरज नाही. मी थांबतो. तुमचं .. ... ... चालू द्या... निरर्थक... आत्मकुंथन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 09/26/2016 - 09:54 नवीन
चुकिचे कायदे किंवा कायद्यातील चुका सामाजिक चळवळी करून बदलल्या जाऊ शकतात. पण चिपाड बंद धर्म हजारो वर्ष झाली तरी बदलले गेलेले नाहित.. पोथ्यांमधेही आणी बरेचसे व्यवहारातही! धर्मात बदलाची सोय नसते. न ती कधी कुठल्या धर्माचार्यानी आपणहून दिलेली आहे. हे सर्वांना नीट माहिती आहे. तेंव्हा यापुढिल तुमच्या निरर्थक युक्तिवादांना उत्तर देण्याचिही गरज नाही. मी थांबतो. तुमचं .. ... ... चालू द्या... निरर्थक... आत्मकुंथन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
म
मारवा Mon, 09/26/2016 - 10:22 नवीन
धर्मात बदलाची सोय नसते. न ती कधी कुठल्या धर्माचार्यानी आपणहून दिलेली आहे. हे सर्वांना नीट माहिती आहे. धर्मात बदलाची सोय दिलेली आहे. तीचे स्वरुप थोडे वेगळे आहे इतकेच. कलिवर्ज्य ही बदलाचीच सोय आहे. व धर्माअंतर्गत आहे. पांडुरंग वामन काणे अत्यंत अभिमानाने पाश्चात्यांना संबोधुन म्हणतात की आमच्याकडे ही धार्मिक कायदे स्टॅटीक नव्हते त्यात बदल होत असे व "कलिवर्ज्य" सारक्या व भाष्यकारांची भाष्ये या बदलांना कायद्यातील बदलांना धर्मांतर्गतच बदलाची सुविधा उपलब्ध करुन देत. कलिवर्ज्य ने काही चांगले बदलही केले काही व्यावहारीक उपयोगाचे बदलही केले. तर ती ही सोय होती म्हणुनच केले. उदा. एक बदल पहा जुना मुळ नियम याज्ञवल्क्यस्मृती १-७२ नुसार एखाद्या स्त्रीने व्याभिचार केला असेल तर आणि त्यानंतर तिला मासिक पाळी आली तर अशी स्त्री व्याभिचाराच्या कलंकातुन सहज मुक्त होते. मात्र अशी स्त्री जर या व्याभिचाराच्या योगाने गर्भवती झाली तर मात्र अशा स्त्रीच्या पुत्राने (मातेचा) वा भावाने (बहीणीचा) त्याग केला पाहीजे. त्यांना टाकुन दिले पाहीजे. वसिष्ठ धर्मसुत्रही असाच आदेश तिन वरीष्ठ वर्णीय स्त्रीयांनी शुद्र पुरुषाशी केलेल्या व्याभिचारासंदर्भात देतो. तिथेही नियम गर्भवती होणे न होणेवर अवलंबुन आहे. याज्ञवल्क्यस्मृतीवरील मिताक्षरा या टीकेत याचा अर्थनिर्णय करतांना विज्ञानेश्वर म्हणतो त्यागाचा अर्थ घराबाहेर काढणे असा नसुन अशा स्त्रीला धार्मिक कार्यक्रम व लैगिंक संबंध नाकारणे इतकाच आहे. वसिष्ठ पुन्हा चारच स्त्रीयांचा त्याग करावा असे म्हणतो त्यात पतीच्या गुरु वा शिष्याशी व्याभिचार करणारी, पतीच्या हत्येचा प्रयत्न, वा खालच्या वर्णाच्या पुरुषाशी व्याभिचार करणारी. कलिवर्ज्य- नविन नियम कुठल्याही परीस्थीतीत मातेचा वा भगिनीचा त्यांनी जरी व्याभिचार केला असेल व त्यायोगे त्या गर्भवती झाल्या असल्या तरी त्यांचा त्याग करण्यास प्रतिबंध लावतो. आता धर्मांतर्गतच वरील मुळ नियमात बदल करुन "कलिवर्ज्य" चा वापर करुन पुर्वीपेक्षा उदार भुमिका घेतलेली दिसत आहे. असेच आणखी काही नियम आहे जसे सत्रांवर ज्यात मोठ्या प्रमाणावर पशुबली होत असेल नियोगावर बंदी इत्यादी आहेत. आता यात वेगळी एक बाब अशी आहे की एकुण संख्या कलिवर्ज्याची ६० ते ६५ एक्झॅट नाही सांगता येत ती बघितली तर शोषण अजुन तीव्र करणारे स्वातंत्र्याचा अधिक संकोच करणारे वर्नव्यवस्था अधिक घट्ट करणारे च बदल तुलनेने जास्त आहेत हे कटु वास्तव आहे. आणि पांडुरंग वामन काणे सारखे थोर अभ्यासकही त्यात कधी कधी वाईट बदलांचीही भलामण करतात ते फारच खेदजनक व उद्वेगजनक आहे. एकुण कलिवर्ज्य चा वापर अर्थातच नकारात्मक बदलांसाठीच जास्त झालेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
प
प्रचेतस Mon, 09/26/2016 - 10:44 नवीन
काणे ह्यांचे हे पुस्तक सध्या उपलब्ध आहे का? असल्यास कुठे मिळेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 09/26/2016 - 11:33 नवीन
@एकुण कलिवर्ज्य चा वापर अर्थातच नकारात्मक बदलांसाठीच जास्त झालेला आहे. ››› यातच सर्व आलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
ग
गामा पैलवान Mon, 09/26/2016 - 20:57 नवीन
आत्मबंध गुरुजींना बालके गामा पैलवानाचा साष्टांग नमस्कार! सार्वजनिक गणेशोत्सव देखील नकारात्मक रीत्या बदलला आहे. काय करावं मग? तुम्ही तुमच्या बुद्धी आणि नीतीच्या सहाय्याने सुचवलेल्या सुधारणाही नकारात्मक मार्गाने जाणार नाहीत याची शाश्वती काय? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
ग
गामा पैलवान Mon, 09/26/2016 - 09:22 नवीन
मारवा, १.
पण ज्या कॅज्युअली तुम्ही स्मृती व धर्मशास्त्र्/सुत्र जो भेद देत आहात तो तसा नाही.
माझं भेदवर्णन ढोबळ (कॅज्युअल) आहे हे मान्य. मात्र हेच अचूक व्हावं असा माझा आग्रह आहे. स्मृती म्हणजे राजाज्ञा मानली जावी. तिची व्याप्ती सार्वजनिक म्हणूनंच अतिशय मर्यादित असावी. आजच्या भाषेत किमान पण प्रभावी कायदे आणि बळकट अंमलबजावणी असावी. यासोबत खाजगीतले नियम पाळणे हे स्वयंप्रेरित असावे. या स्वयंप्रेरणेस दिग्दर्शन धर्मशास्त्राद्वारे व्हावं अशी अपेक्षा आहे. आता आततायी ब्राह्मणाकडे वळूया. जर कोणी ब्राह्मण आततायीपणे वागंत असेल तर तो ब्राह्मणंच नव्हे. म्हणजे जर कोणी आततायीपणा केला तर धर्मशास्त्रे वाचत न बसता सरळ त्याचा कोथळा बाहेर काढावा. हा मथितार्थ आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Mon, 09/26/2016 - 09:27 नवीन
जर कोणी आततायीपणा केला तर धर्मशास्त्रे वाचत न बसता सरळ त्याचा कोथळा बाहेर काढावा.
कोथळा काढायचा अधिकार धर्मशास्त्राने कुणाला दिलाय? इतकी अराजकता असेल असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
प
प्रचेतस Mon, 09/26/2016 - 09:32 नवीन
गापै हे सनातनप्रभातछाप सनातनी आहेत त्यामुळे त्यांना हा अधिकार असू शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. Mon, 09/26/2016 - 09:44 नवीन
असेल असेल. नम्रपणे कसा कोथळा काढतात तेच बघायचेय मला. ;) . आपला अतिविनम्र अर्थातच अभ्या.. (दुसरा कोण?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
ग
गामा पैलवान Mon, 09/26/2016 - 13:58 नवीन
प्रचेतस, तुमचा नेम पार चुकलाय. सनातन संस्था अधिकारांपेक्षा कर्तव्यावर अधिक भर देते. त्यामुळे आक्रमण करणाऱ्याचा कोथळा काढणे हे अधिकार नसून कर्तव्य आहे. ते बजावायचं नसेल तर आपली मर्जी. शिवाजीमहाराज आणि अफझलखान यांच्या उदाहरणावरून हेच दिसंत नाही काय? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
स
संदीप डांगे Mon, 09/26/2016 - 19:39 नवीन
तर अशा रितीने गापैमहाराजांनी इतिहासाचा कोथळा काढून आपले कर्तव्य बजावले आहे. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
म
मारवा Mon, 09/26/2016 - 10:02 नवीन
आता स्मृतीविपरीत धर्मशास्त्राधार मिळाला तरी त्यानुसार आचरण करू नये या मताचा मी आहे
आदेश देण्याचं काम स्मृतीचं आहे.
वरील प्रतिसादात आपणच स्मृतीवर भर देत विपरीत धर्मशास्त्राधार मिळाला तरी त्या नुसार आचरण करु नये. शिवाय त्या आदेश देतात हेही तुम्हास मान्य आहे. तर इतकी स्पष्ट भुमिका तुमची स्मृतीचा आदेश पाळण्या संदर्भात आहे. आता वरील उदाहरणात धर्मसुत्रेही सोडुन देऊ " कात्यायनस्मृती"चेच उदाहरण घेउ ही स्मृतीच आहे व हीचा स्पष्ट आदेशच आहे की "आततायिन" व्यक्ती ब्राह्मण असेल तर आणि त्याने हल्ला केला तर स्वतःचा जीव वाचवण्यासाठीदेखील बचावासाठीदेखील त्याच्यावर प्रतिहल्ला करणे योग्य नाही चुक आहे. मात्र शुद्र असेल याच्या जागी तर त्याला अशा शुद्र आततायिन च्या व्याख्येत बसणारा शुद्र असेल तर स्व-बचावासाठी त्याला मारण्यात सर्वच झाडुन सर्वच धर्मसुत्राचे एकमत आहे. तुम्ही म्हणता
जर कोणी ब्राह्मण आततायीपणे वागंत असेल तर तो ब्राह्मणंच नव्हे.
पण असा ब्राह्मण असु शकतो व त्याने असे केले तर त्यावर प्रतिहल्ला करु नये असा नियम जेव्हा कात्यायनस्मृती देते तेव्हा ती अशा ब्राह्मणाचे १- अस्तित्व पुर्णपणे मान्य करते असे समाजात असु शकतात आहेत होते हे ती मान्य करते २- त्यानंतर त्यांचे रक्षण व्हावे या दिशेने क्लीअर प्रोव्हीजनही करते. व त्यांना ब्राह्मणच मानते. मग तुम्ही कात्यायन स्मृती च्या पुर्णपने विरोधी भुमिका घेत आहात असे आपणास वाटत नाही का आपण आदेश भंग करत आहात आपण धर्मादेश झुगारत आहात स्वतःच आग्रहाने प्रतिपादलेला. शिवाय जेव्हा आपण जेव्हा असा आततायिन ब्राह्मण असुच शकत नाही अशी स्वतःची गामा पैलवान यांची व्यक्तीगत मत असलेली व्याख्या आग्रहाने मांडता तेव्हा. आपल्याच वरील एका प्रतिसादातील की शास्त्रात जे आहे तेच पाळावे तंतोतंत पाळावे अन्यथा ती एक कसरत निरर्थक कसरत ठरते असे म्हणता. यात उघड विसंगती आहे असे मी नम्रपणे आपल्या निदर्शनास आणुन देऊ इच्छितो. शेवटी असा इतका टोकाचा कोथळा काढणे अशी भुमिका "अतिरेकी " आहे असे आपणास वाटत नाही का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ध
धर्मराजमुटके Mon, 09/26/2016 - 11:19 नवीन
एवढी चर्चा झाली पण श्री हमीद दाभोलकर ह्यांचे अंधश्रद्धा निर्मुलन झाले की नाही अखेरीस ?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 09/26/2016 - 11:40 नवीन
छे छे! ते तर अजिबात झालेले दिसत नाही. ते आहे तसेच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
अ
अनंत छंदी Mon, 09/26/2016 - 11:53 नवीन
जनाब हमीद यांचे वडील पशुहत्या थांबावी म्हणून त्यांच्या अं.नि.स. या संघटनेमार्फत अनेक देवस्थानांजवळ आंदोलने करीत होते. नेमका याचाच विसर हमीद याना पडलेला दिसतो. की हिंदूंच्या देवळाबाहेरील पशुहत्या नापाक आणि ईदीची पशुहत्या पाक असे त्यांना वाटते.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Mon, 09/26/2016 - 13:45 नवीन
मारवा,
आपल्याच वरील एका प्रतिसादातील की शास्त्रात जे आहे तेच पाळावे तंतोतंत पाळावे अन्यथा ती एक कसरत निरर्थक कसरत ठरते असे म्हणता.
शास्त्राज्ञा तंतोतंत पाळण्याचा आग्रह वैयक्तिक उपासनेसाठी आहे. याव्यतिरिक्त सार्वजनिक प्रसंगी राजाज्ञा पाळणे इष्ट. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Sun, 09/03/2017 - 06:12 नवीन
इथे राजाज्ञा म्हणजे राज्यघटना पाळावी असे म्हणायचे आहे ना? बादवे कालच बकर ईद होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Sun, 09/03/2017 - 08:43 नवीन
प्रकाश घाटपांडे, होय तर! राजाज्ञा = राज्यघटना! आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
प
प्रकाश घाटपांडे Mon, 08/12/2019 - 05:51 नवीन
अनेक मुस्लिम बांधवांनी ईद ही अगदी ’शास्त्रा’ पुरती साजरी करुन गोळा झालेला चंदा हा पूरग्रस्तांसाठी देण्याचे ठरवले आहे. हे सकारात्मक पाउल आहे. मातीची बकरी हा सिंबॉलिक या अर्थाने वापरलेला शब्द आता हळू ह्ळू त्याकडे वाटचाल करीत आहे..रुढींचा मागसलेपणा हा हळू हळूच कमी होत असतो.
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Mon, 08/12/2019 - 08:43 नवीन
हमीद दाभोळकर आणि इतर फुरोगामी आणि फेक्युलर जमात इस्लाम म्हणाले कि निष्पक्षपणे काम करते ते माहिती पाहिलेय त्यामुळे त्यांच्याबद्दल no कॉमेंट... पण मित्रहो हार्दिक समाज देखील हळू हळू बदलत आहे. बरेच मुस्लिम लोक यंदा ईद साजरी न करता सर्व रक्कम पूरग्रस्तांसाठी देत आहेत. तसेच कालच पेपर मध्ये वाचले कि श्रावण सोमवार आणि ईद दोन्ही एकच दिवशी आल्यामुळे काही मुस्लिम लोकांनी ईदची कुर्बानी सोमवारी न देता दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी देण्याचे ठरवले आहे. आता ह्या बदलाला नेमक्या कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत ते माहिती नाही पण मुस्लिम समाज कट्टरते कडून सामाजिक सौदार्ह्याकडे पावले टाकत आहे त्यामुळे एरवी विरोधात बोलत असलो तरी त्यांच्या या अटीट्युड ची प्रशंसा करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
ग
गामा पैलवान Mon, 08/12/2019 - 19:06 नवीन
बाप्पू, तुमच्याशी शंभर टक्के सहमत. हिंदू व मुस्लिम समाजांना एकमेकांच्या सदिच्छा प्राप्त होत असतील तर त्यांचं भरभरून स्वागतंच आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाप्पू
ड
डॉ.नितीन अण्णा Wed, 08/14/2019 - 17:47 नवीन
देव तेथेचि जाणावा... हमीद दाभोलकर महाराष्ट्र टाइम्स | Updated: 14 Aug 2019, 09:57 AM महापुराने तडाखा दिलेल्या भागातील मुस्लिम बांधवांनी कुर्बानीचा अर्थ विस्तारून पूरग्रस्तांना मदत हीच कुर्बानी, असे धार्मिकतेला व्यापक रूप दिले... महापुराने तडाखा दिलेल्या भागातील मुस्लिम बांधवांनी कुर्बानीचा अर्थ विस्तारून पूरग्रस्तांना मदत हीच कुर्बानी, असे धार्मिकतेला व्यापक रूप दिले. याचे स्वागत करायला हवे... कोल्हापूर आणि सांगलीला महापुराचा तडाखा बसला. एका बाजूला ह्या आपत्तीच्या मानवनिर्मित अनेक बाजू समोर येत असतानाच स्वत:च्या पलीकडे जावून मदत करण्याची असंख्य उदाहरणे ह्या दोन आठवड्यात दिसली. त्या मधील कोल्हापूरच्या मुसलमान बांधवानी ईदला बकऱ्याची कुर्बानी देण्याऐवजी आर्थिक कुर्बानी देण्याचा निर्णय घेतला आणि सांगली, सातारा भागातील मुसलमान समाजातील लोकांनी त्याला पाठिंबा दिला, ही मोलाची घटना आहे. देव आणि धर्माशी संबंधित कुठल्याही गोष्टीची चिकित्सा करणे त्याला विधायक पर्याय सुचवणे हे केवळ अवघडच नाही तर अनेक प्रसंगी जीवघेणे ठरते आहे. अशा कालखंडात धर्माचे मानवतावादी रूप समोर आणणारी ही घटना आहे. म्हणूनच तिचे विवेचन आवश्यक आहे. जगभर ईदला मोठ्या प्रमाणात बोकडाची कुर्बानी दिली जाते. महाराष्ट्रातील मुसलमानही ही प्रथा पाळतात. कुर्बानीच्या एका बोकडाची किंमत जवळ जवळ वीस हजार असते. ज्यांना ती परवडत नाही, ते यात पाच हजार रुपयाचा वाटा कुर्बानी म्हणून देतात. इस्लामच्या मूळ रुपात बोकडाची कुर्बानी देण्याची प्रथा आहे का नाही, याविषयी तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. इस्लामच्या एका कालखंडात नरबळीला पर्याय म्हणून कुर्बानी देणे चालू झाले असे दाखले दिले जातात. कुर्बानीचा अधिक व्यापक अर्थ सांगणारे काही इस्लामचे तज्ज्ञ आहेत. ह्या प्रवाहाच्या मते, कुर्बानी ह्या गोष्टीचा अर्थ हा आपल्यामधील चांगले काही तरी दुसऱ्याला देणे. मानवी समूहांच्या विकसित होत जाणाऱ्या टप्प्यांच्या मध्ये कोणत्याही धर्मातील त्या काळाला सुसंगत नसलेल्या प्रथा परंपरा बदलून त्या अधिक कालसुसंगत प्रकारे आचरणात आणणे हे मानवी मन विकसित होण्याचे एक लक्षण असते. मानवी सुधारणेचा इतिहास हा प्रामुख्याने धर्म सुधारणेचा इतिहास आहे असे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे एक वाक्य आहे. हिंदू धर्माच्या मध्ये विधायक धर्मचिकित्सा करणाऱ्या संत आणि समाज सुधारकांची पाच हजार वर्षांची परंपरा आहे. पण इस्लाममध्ये मात्र त्या तुलनेत हा प्रवाह खूपच क्षीण राहिलेला आहे. त्यामुळे हिंदू समाजात सती प्रथा निर्मूलनापासून ते अस्पृश्यता निवारण, स्त्री शिक्षण अशा अनेक सुधारणा धर्माच्या आतून झालेल्या दिसतात. त्या तुलनेत इस्लाममध्ये मात्र हे काम अतिशय संथ गतीने होत आलेले आहे. या पार्श्वभूमीवर ईदची कुर्बानी ही आर्थिक स्वरुपात पूरग्रस्तांना देण्याचा निर्णय आपण समजून घेतला पाहिजे. हमीद दलवाई यांनी सुरू केलेले मुस्लिम सत्यशोधक मंडळ आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेली सहा वर्षे महाराष्ट्रात रक्तदान करून ईद साजरी करते. यामागे आपले रक्त हे गरजू व्यक्तीला कुर्बानी म्हणून देणे, हा उन्नत भाव आहे. त्याला गेल्या सहा वर्षांत वाढता प्रतिसाद असला तरी तीन जिल्ह्यातील बहुतांश समाजाने मोठ्या प्रमाणात कुर्बानीचा अर्थ हा अधिक उन्नत भावनेने घेणे हे महत्त्वाचे ठरते. नोंद करण्यासारखा भाग म्हणजे ज्या कोल्हापूर जिल्ह्यातून डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विसर्जित गणपतीदान ही पर्यवरण पूरक गणेश उत्सवाची मोहीम सुरू केली त्याच कोल्हापूरमधून आर्थिक कुर्बानी देण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. शाहू महाराजांच्या विचाराने झालेली कोल्हापूर जिल्ह्याची मशागतदेखील ह्याच्या पार्श्वभूमीला आहे. वीस वर्षांपूर्वी जेव्हा के. डी. खुर्द ह्यांच्या पुढाकाराने विसर्जित गणपती दान मोहीम कोल्हापुरात राबवली गेली, तेव्हा त्याला खूप विरोध झाला होता. पण आज मात्र पर्यावरण पूरक गणपतीला समाजमान्यते बरोबर शासन मान्यताही मिळालेली आहे. एका धर्मातील धर्मांधता दुसऱ्या धर्मातील धर्मांधतेला बळ देते, असा आपल्याकडे सार्वत्रिक अनुभव आहे. हिंदुत्वाचे राजकारण करणारे पक्ष आणि मुस्लिम धर्माचे राजकारण करणारे पक्ष हे बाहेरून एकमेकांचे कट्टर विरोधक दिसत असले तरी प्रत्यक्षात हे पक्ष हे दोन्ही धर्मातील विचार करू इच्छिणाऱ्या लोकांच्या विरोधात असतात, ही आता लपून राहिलेली बाब नाही. पण संविधानाच्या चौकटीत राहून रूढी व परंपरांची कालसुसंगत चिकित्सा करणाऱ्या लोकांमध्ये मात्र अनेकदा अशी परस्परपूरकता दिसत नाही. पर्यावरण पूरक गणपती, फटाकेमुक्त दिवाळी तसेच अनेक ठिकाणी यात्रेतील पशुहत्यादेखील थांबविण्याचे जे यशस्वी प्रयत्न सध्याच्या कालखंडात आपल्या समाजात झाले आहेत, त्यापासून एक मोठा दिलासा आर्थिक कुर्बानीसाठी प्रयत्नशील राहणाऱ्या मोहिमेला मिळू शकतो. अशाच पद्धतीने आर्थिक पातळीवर कुर्बानी देण्याचा कोल्हापूरमधून चालू झालेला हा उपक्रम केवळ आपत्कालीन प्रतिसाद न राहता त्याचे एका विधायक जनचळवळीत रूपांतर होऊ शकते. भारतातच नाही तर जगभरात धार्मिक कट्टरपंथी विचार वाढीला लागलेला असताना धर्माला अधिक मानवी रूप देण्याचे वरील प्रयत्न हे निश्चितच उठून दिसतात. कोल्हापूरच्या घटना ही एक छोटी सुरूवात असली तरी अशी एक छोटी सुरूवात समाजाच्या विचार करण्याच्या प्रक्रियेत किती बदल करू शकते, हे समजून घेण्यासाठी पुण्यातील मानाच्या पाच गणपतींनी यंदा पुणे महापालिकेला केलेले आवाहन समजून घेतले पाहिजे. ज्या पद्धतीने पुराच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या मुस्लिम बांधवांनी कुर्बानी आर्थिक स्वरुपात देण्याचा निर्णय घेतला, त्याचप्रकारे चार वर्षांपूर्वी पुण्यातील मानाच्या पाच गणपतींनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पर्यवरणपूरक विसर्जन करण्याचा निर्णय घेतला होता. ह्या वर्षी ह्याच गणेश उत्सव मंडळानी पुणे महापालिकेला आम्ही पर्यवरण पूरक गणेश उत्सव करून पर्यावरणाची काळजी घेतली, आता तुम्ही पुढाकार घेवून पुण्यातील नदीपात्र स्वच्छ आणि सुशोभित करा, असे आवाहन केले आहे. माणसाचे मन एकदा विधायक कृतिशील चिकित्सा करू लागले की ते केवळ रूढी आणि परंपरांच्या चिकित्सेपाशी थांबत नाही तर ते नागरी प्रश्नांच्या बाजूने आपल्या चिकित्सेचा परीघ वाढवते असा आशावाद यामधून मिळतो. "माझी लढाई हि काही दशकांची नाही तर काही शतकांची आहे, ह्याची नम्र जाणीव मला आहे," असे डॉ. नरेंद्र दाभोलकर म्हणत. २० ऑगस्टला त्यांच्या खुनाला सहा वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांचे मारेकरी पकडले असले तरी अजून त्यामागचे सूत्रधार पकडले गेलेले नाहीत. असे असले तरी जो विचार समाजमनात रुजावा, यासाठी डॉ. दाभोलकरांचे बलिदान झाले तो ह्या देशातील संत आणि सुधारकांनी सांगितलेला 'विधायक कृतिशील धर्मचिकित्सेचा विचार' हा अतिशय प्रतिकूल सामाजिक परिस्थितीमध्येही एका पातळीवर समाजमन स्वीकारते आहे, हे वास्तव आश्वासक आहे. (लेखक अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आहेत.)
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान गुरुवार, 08/15/2019 - 20:03 नवीन
डॉक्टर नितीन अण्णा,
या पार्श्वभूमीवर ईदची कुर्बानी ही आर्थिक स्वरुपात पूरग्रस्तांना देण्याचा निर्णय आपण समजून घेतला पाहिजे.
प्रागतिक विचार अंमलात आणल्याबद्दल मराठी मुस्लिम समाजाचं अभिनंदन. इस्लाम म्हणजे अरबांच्या चालरीती कॉपीपेस्ट करणे नव्हे. इतका जरी बोध घेतला तरी तूर्तास पुरे. पुढे इस्लाम म्हणजे काय आहे व काय नाही याच्या चिंतनाची जोड देता येईल. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
र
राघव Fri, 08/16/2019 - 07:11 नवीन
त्यांना कुणीतरी नीट आठवण करून द्यायला हवी की, "बाब्बौ, तुमचे नाव 'केत'कर आहे, 'कट'कर नाही म्हणून.." अर्थात् त्यांच्या नावातच "मार" आहे आता तर ते तरी काय करणार [मार] खाण्याशिवाय म्हणा... बाकी तुमचा लेख वाचून एक प्रश्न पडलाय.. ते ***ची कातडी सोलणे म्हणजे यालाच म्हणतात काय हो? _/\_
  • Log in or register to post comments
र
राघव Fri, 08/16/2019 - 07:14 नवीन
@संपादक, चुकून या धाग्यावर प्रसिद्ध झालेली ही प्रतिक्रीया काढून ताकावी अशी विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव
प
प्रकाश घाटपांडे Fri, 08/23/2019 - 07:34 नवीन
गामापै यांचा अन्यत्र असलेला हा विषयावरचा धागा अप्रकाशित झालेला दिसतोय. त्यात या धाग्याचा संदर्भ मी दिला होता.
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Fri, 08/23/2019 - 09:27 नवीन
मलाही हेच म्हणायचं आहे, गामा पैलवानांचा लेख कशामुळे अप्रकाशित झाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
च
चौकस२१२ Wed, 08/28/2019 - 15:32 नवीन
अंधश्रद्धा विनाशाय अनिस च्या कार्याची माझी पहिली ओळख झाली जेव्हा माझे वडील त्यांच्या कार्याला हात भार म्हणून सोबतच्या इंजिनीरिंग प्राध्यापकांबरोबर काही शिबीर आयोजित कार्याचे त्यात विविध शास्त्रीय प्रयोगातून बुवाबाजी कशी असते ते दाखवून द्यायचे... पुढे "अंधश्रद्धा विनाशाय" हे पुस्तक वाचले आणि भारतीय समाजात अंधश्रद्धा किती आहे ते वाचून थकक झालो... परंतु पुढे पुढे जसा काळ गेला आणि अनिस आणि समविचारी लोकांच्या विविध विधाने ऐकून अनिस बद्दल चा आदर कमीच होत गेला खास करून आता तर मत पक्के बनले आहे कि जरी हे अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य महत्वाचे असले तरी या लोकांना एकाच धर्मात ते का दिसते? त्यांना इतर धर्मातील अंधश्रद्धा दिसत नाही का? ती उघडकीला का आणीत नाही किंवा पुरेश्या जोमाने त्याबद्दल काही पाठपुरावा का करीत नाहीत? आपलं चार्ली हबदू होईल अशी भीती वाटते कि काय अनिस ला? अधिक भर म्हणजे अति डावे आणि ज्यांना अर्बन नक्षल म्हणले जाते यांच्या बरोबर यांनी हात मिळवणी केली आहे का असे वाटते. जीवनात थोडी पापभिरू श्रद्धा असली तर फार काही बिघडत नाही पण अंधश्रद्धा नक्कीच नसावी दुसरे असे कि काही प्रथा ( धार्मिक आणि सामाजिक) या कालबाह्य होऊ शकतात हे जसे श्रधुळु लोकांनी विचारात घेतले पाहिजे तसेच अनिस वाल्यांनी उगाच लोकांना त्रास दिल्यासारखे पण वागू नये अनिस ने हे हि विचारता घयावे कि काळाप्रमाणे बदलण्याची जरुरी काही फक्त एका धर्माची नाहीये ... इत्यादी
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Wed, 08/28/2019 - 16:54 नवीन
अनिस ने हे हि विचारता घयावे कि काळाप्रमाणे बदलण्याची जरुरी काही फक्त एका धर्माची नाहीये >>>>>> हे सर्वामान्यच आहे. अधिक भर म्हणजे अति डावे आणि ज्यांना अर्बन नक्षल म्हणले जाते यांच्या बरोबर यांनी हात मिळवणी केली आहे का असे वाटते.>>>>>> असे वाटणे याचे कारण अनिस त विद्रोही चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात येत आहेत हे असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२
स
सर टोबी Wed, 08/28/2019 - 19:13 नवीन
अंनिसच्या कामाच्या उपयुक्ततेबद्दल फारसा कुणाला आक्षेप सहसा दिसत नाही. थोडीशी श्रद्धा असू द्यावी, तिचा फार बाऊ करू नये असे बऱ्याच वेळेला वाचायला मिळते. माझ्या आकलनानुसार अंनिस पण हे जाणून आहे. त्यांचा भर आहे तो फसवणूक टाळणे आणि पर्यावरणपूरक उत्सव असावे यावर. फसवणुकीच्या नावाखाली सहसा अशिक्षित आणि गरीब लोकांची होणारी फसवणूक जसे भानामती, आजार आणि प्राणीदंश यावर होणारे उतारा, मंत्रोपचार, बळी देणे यासारखे उपचार, आणि आपले दणदणाटी उत्सव हे त्यांचे प्रमुख आक्षेप असावेत. याखेरीज, वास्तुशास्त्र, ज्योतिष, आणि सत्यनारायण यावरही त्यांची टिप्पणी असायची पण ती जाहीर व्याख्यानांमधून विचार व्यक्त करणे या पुरतीच मर्यादित होती असे वाटते. आता वळूया आपल्या ठसठसणाऱ्या वेदनेकडे. फक्त प्रबोधन 'आमचेच' का म्हणून? यावर माझी मते खालील प्रमाणे: सर्वप्रथम सुरुवात होते ती बकरीदच्या प्रथेपासून. 'त्यांची' हि प्रथा कशी चालते, त्यावर बरे कोणी बोलत नाही. तर वाचकांनो, या वर्षी, आषाढीच्या दुसऱ्याच दिवशी सकाळचा अंक वाचायला घेतला तर तर जवळपास एक सबंध पानभरून आखाडाचा बेत असणाऱ्या हॉटेलांच्या जाहिराती! भागवत संप्रदाय, वैष्णवांचा मेळावा, सावळा विठ्ठलु वगैरे सर्व आपण एका रात्रीत गुंडाळून ठेवले! वर तर वर, हि सर्व छपाई तर आषाढी एकादशीच्याच दिवशी होत होती! आणि कडी म्हणजे दीपअमावसेला जेवढे बोकड, कोंबड्या आणि समुद्र जीव प्राण सोडतात त्या पुढे बकरीदच्या दिवशी होणाऱ्या कुर्बानी तर काहीच नाही. लक्षात घ्या, इथे आक्षेप प्राणिहत्येला नाहीये. एवढा मोठा विरोधाभास बाळगून वर दुसर्यांकडे बोट दाखवायचे म्हणजे एक तर हिमतीचे काम असावे नाही तर अट्टल निर्लज्जपणा असावा. अजुनहि काही मुद्दे आहेत पण त्यांचा परामर्श नंतर कधी तरी.
  • Log in or register to post comments
म
मारवा गुरुवार, 08/29/2019 - 03:42 नवीन
हे आत्मपरीक्षण करणारे करुन घेतील पण हमीद दाभोळकर आणि अनिस कधी आत्मपरीक्षण करणार ? म्हणजे समजा जैन समाजातील कुठल्याही एका सर्वसाधारण जैन माणसाने हा प्रश्न हमीद यांना विचारला ( जैन समाज सर्वसाधारणतः जनरली स्ट्रीक्टली शाकाहारीच असतो ) आता हा प्रश्न समजा डॉ. कल्याण गंगवाल यांनी ( हे जैन आहेत बहुधा व शाकाहार प्रचारक आहेत ) हमीद दाभोळकर यांना जैन समाजातर्फे विचारला तर तुम्हाला वरीलप्रमाणे " तुम पहले अपने गिरेबान मे झाक के देखो " हा लोकप्रिय संवाद इथे वापरता येणार नाही कारण सर्वसाधारण जैन माणसाचं गिरेबान यात वरील प्रमाणे अडकत नाही इतके ते शाकाहारी जनरली असतात तर हमीद दाभोळकर किंवा तुम्ही अस समजा की हा प्रश्न हिंदु कडुन नाही जैनांकडुन आलेला आहे तर त्याचे उत्तर तुम्ही किंवा दाभोळकर काय देणार ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 08/29/2019 - 05:47 नवीन
खर तर तुम्हाला नेमक काय म्हणायच आहे हे समजल नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
स
सर टोबी गुरुवार, 08/29/2019 - 06:31 नवीन
अशा व्यवस्थित उंची दिलेल्या आणि मंदगती चेंडूवर एक सिक्स तो बनती है. माझे विवेचन थोडे तुकड्या तुकड्यांमध्ये आहे. पहिला मुद्दा हा आहे कि आपण सर्व जण एकमेकांशी संबंधित असतोच. अगदी तिरीमिरीत देखील 'तुझा आणि माझा काय संबंध?' असे विचारले तरी आपण संबंधित असतोच. आता हे बघाना. पुणेकर मनमुराद कचरा करतात आणि तिकडे फुरसुंगीच्या मुलांची लग्न होत नाहीत. आहे कि नाही संबंध? हा संबंध अनेक पातळ्यांवर असतो. काश्मिरात बर्फ पडले कि उर्वरित भारतात थंडीची लाट येते. उजव्यांनी 'सर्व कायदे फक्त हिंदूंनीच पाळायचे का' असे म्हटले कि शहरं गुदमरवून टाकणारे उत्सव सुरु होतात. म्हणजे भौतिक आणि आत्मिक पातळीवर देखील आपण एकमेकांचे संबंधित असतो. आता वळूया नाकाने कांदे सोलणाऱ्या जैनांकडे. यातील काही जैन आपल्या मराठी बांधवांना हिणवतात. साले तुमचे लग्न समारंभ म्हणजे काय असतात रे. एक जिलेबी एवढाच गोडाचा पदार्थ. आमच्याकडे बघा. चार चार मिठाया. तो शुध्ध तुपाने थबथबणारा मूग हलवा, ते शुध्ध तुपात तळलेले गुलाबजाम आणि वरती घट्ट रबडी. आता कल्पना करा कि अशा प्रकारच्या दुधाच्या वापरासाठी कोणीतरी कपिला गायीची व्यापारी पैदास करतो. आणि तितक्याच मोठ्या प्रमाणावर भाकड जनावरांची पण बेगमी करतो. काही ठिकाणी भाजी बाजारात होणारा कचरा भाकड जनावरांकडून जिरवला जातो. पण भाकड जनावरांची निर्मिती आपल्या क्षमतेहूनही जास्त वेगाने होत असते. दोन तीन वर्षांपूर्वी जवाहरलाल दर्डा यांनी संपूर्ण ग्रँड ट्रंक रोडवरून प्रवास केला असता त्यांना शेतकऱ्यांनी सोडून दिलेली भाकड जनावरं संपूर्ण प्रवासभर दिसली. मुद्दा निव्वळ वाहतूक मंदावण्याचा नाहीए. जनावरांना मरणाहूनही अमानुष अशा परिस्थितीत ढकलण्याचा आहे. तेंव्हा शाकाहारी भलेही मांस भक्षण करीत नाही या आनंदात असतील लेकिन गिरबान तो उनकाभी सांफ नाही है मेरे दोस्त!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
म
मारवा Fri, 08/30/2019 - 05:09 नवीन
सरजी तुम्ही मुळ प्रश्नाला न भिडता प्रश्नकर्त्याला भिडु शकता पण त्यातुन मुळ प्रश्न अनुत्तरीतच राहतो. इथे अजुन स्पष्ट करतो हमीद यांना दुर्गापुजेतील पशु बळी ही जर अंधश्रद्धा वाटत असेल आणि बकरी इद मधील पशु बळी ही अंधश्रद्धा वाटत नसेल तर प्रश्नच मिटला विषयच संपला. पण आता मी जे गृहीत धरतो आहे की हमीद यांच्या व अनिस यांच्या मते दोन्ही अंधश्रद्धाच आहेत मी चुकत असेल माझ्या गृहीतकात तर कृपया दुरुस्त करा जर दोन्ही मध्ये अंधश्रद्धा आहेत व दोन्ही ना विधायक पर्याय म्हणुन माती ची बनवुन बळी द्या असा पर्याय अंनिस वा अजुन कोणी सुचवत असेल तर त्यात ही गैर काय ? आता हा विधायक पर्याय जर गणेशमुर्ती मातीच्या वगैरे विसर्जन ( गणेशमुर्ती विसर्जन हा सर्वस्वी वेगळा पर्यावरण वगैरे च्या रीलेटेड मुद्दा आहे पशु बळी चा नाही हे जाणुन आहे ) इथे फक्त पर्यायाची तुलना म्हणून म्हणतोय कोणी हा विधायक पर्याय मुस्लिम समाजाला द्या त्यांच्यात प्रबोधन करायला काय हरकत आहे ? हा प्रश्न हमीद व अनिस ला विचारला तर त्याचे उत्तर जे त्यांनी दिलेले इथे वाचले आहे ते पटले नाही. म्हणजे हमीद म्हणतात खोडसाळपणा व विरोधासाठी विरोध या प्रश्नात आहे हे दोन्ही मुद्दे एकवेळ मान्य करु की हमीद बरोबर आहेत तरी सर्वात मोठा आक्षेप हा त्यांच्य भावार्थ समजुन घ्या या अत्यंत दांभिक टिप्पणी मध्ये आहे उद्या सतीचा ही भावार्थ समजुन घ्या दुर्गापुजेतील बळीचा ही भावार्थ समजुन ग्या अश्वमेघ चा भावार्थ समजुन घ्या आणि गप्प बसा असे चालेल का ? मी जैन उदाहरण तुमचा Ad hominem बंद व्हावा यासाठी दिले पण तुम्ही त्यातच रस घेतलेला दिसतोय. एकदम गावठी उदाहरण गावच्या चावडीवर चोर पकडुन आणला तर रमेश नावाचा चोर म्हणतो अगोदर याला बघा आता पहीला झाला दुसरा झाला तिसरा झाला सर्वांची चौकशी झाली चोर ही झाले सिद्ध ही झाल शिक्षा सुद्धा झाली त्याने ज्या ज्या कडे बोट दाखवलं ते सर्व झाले आता रमेश ची पाळी आहे आता रमेश चा खिसा तपासायचा आहे आता रमेश ला जबाब द्यावा लागेल आता रमेश ला बोट दाखव्ण्यास कोणी उरल नाही हमीद आता कोणाकडे बोट दाखवतील ( हमीद चोर आहे असे म्हणणे नाही हे उदाहरण आहे मला अनिस च्या कार्याविषयी आदर आहे पण वरील हमीद च्या विधानातील दांभिकता बघुन मला धक्का बसलेला आहे म्हणुन हे सर्व म्हणतोय ) याउलट पेटा संघटना मला तुलनेने प्रामाणिक वाटते बकरीद च्या अगोदर च त्यांनी हे प्रयत्न केलेले आहेत त्यांच्यासाठी प्राणी हिंसा च चुकीची आहे धर्म कुठलाही असो तात्विक दृष्य्ट्या पेटा मला भडक जाहीराती करत असली तरी किमान भुमिकेत प्रामाणिक वाटते. https://www.petaindia.com/blog/bakrid-peta-india-asks-prohibiting-animal-sacrifices/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी
स
सुबोध खरे गुरुवार, 08/29/2019 - 06:44 नवीन
टोबी महाराज लोकांचा आक्षेप प्राण्यांच्या कत्तलीला नसून सार्वजनिक ठिकाणी घाण करण्याला आहे. उगाच सेक्युलर पणाचा आव आणू नका. दिव्याच्या अवसेला कोणीही प्राणी घरात/ घराबाहेर मारून घाण करत नाही. पण अशी स्थिती बक्र ईद ची नाही यामुळेच मुंबई उच्च न्यायालयाला Because home isn't a slaughter house: Bombay HC prohibits slaying of animals in houses for Bakrid असा सज्जड दम द्यावा लागला https://www.dailyo.in/lifestyle/bakri-eid-goat-slaughter-on-bakri-eid-bombay-hc-muslim-rituals/story/1/31823.html हीच स्थिती बहुसंख्य हिंदूंची( यात मी पण आलो) अंनिस बद्दल आहे. उगाच सेक्युलर पणाचा आव आणायचा आणि इतर धर्मातील अंधश्रद्धा बद्दल तोंड बंद ठेवायचे या दुटप्पीपणाबद्दल लोकांना राग आहे. गणपती उत्सवातील ढोल ताशे आवाज प्रदूषण करतात पण मशिदीवरील भोंग्याबद्दल/ मोहर्रमच्या ताजिया बद्दल तोंड बंद ठेवायचे असला दुटप्पीपणा आम्हाला भावत नाही. कोणत्याही धर्माच्या माणसाला सार्वजनिक शांतता भंग करण्यास सक्त मनाई केली पाहिजे यात गणेशोत्सवातील डीजे ढोल ताशे पण आलेच.

दिव्याच्या अवसेला बक्र ईद पेक्षा जास्त प्राण्यांची कत्तल होते हे दाखवणारा एक तरी पुरावा आपल्याला देता येईल का?

अल्पसंख्याक म्हणून बोम्ब मारणारे मुसलमान भारतात १५ % आहेत म्हणजेच २० कोटी याना अल्पसंख्याक म्हणणे हा विरोधाभास आता थांबवला पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 08/29/2019 - 07:18 नवीन
कोणत्याही धर्माच्या माणसाला सार्वजनिक शांतता भंग करण्यास सक्त मनाई केली पाहिजे यात गणेशोत्सवातील डीजे ढोल ताशे पण आलेच.
अगदी सहमत आहे. 'आमच' बंद करा काही हरकत नाहि पण 'त्यांचही' बंद करा अस म्हणणारे दिसतात. फक्त अस आहे कि हिंदू धर्मात उदंड सण उत्सव आहेत. आन त्याच स्वरुप उन्मादी होत चाललय. इतर धर्मांचही उन्मादी होतच आहे.झुंड आली कि उन्माद आलाच.
उगाच सेक्युलर पणाचा आव आणायचा आणि इतर धर्मातील अंधश्रद्धा बद्दल तोंड बंद ठेवायचे या दुटप्पीपणाबद्दल लोकांना राग आहे.
नक्कीच हो पण अस का आहे यावर वरती एके ठिकाणी थोडस भाष्य केले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 08/29/2019 - 07:20 नवीन
http://www.misalpav.com/comment/883190#comment-883190
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 08/29/2019 - 07:25 नवीन
http://www.misalpav.com/comment/881303#comment-881303 बर्‍याच दिवसांनी पुन्हा धागा व प्रतिक्रिया वाचल्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
  • «
  • ‹
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा