अंधश्रद्धा निर्मूलन श्री हमीद दाभोलकर ह्यांचे
आमचे एक गुरुजी होते नेहमी सदाचार, शिस्त इत्यादी गोष्टीची शिकवण द्यायचे. गुरुजी म्हणजे साक्षांत गुरु ब्रहस्पती अशी आम्हा मुलांची धारणा होती. एकदा मला तालुक्याच्या ठिकाणी एका स्पर्धेंत ५० रुपयाचे रोख बक्षीस प्राप्त झाले आणि घरी येत असताना गुरुजींनी "बाळ तुझ्या कडून पैसे हरवातील म्हणून मी ठेवतो" असे सांगून लिफाफा आपल्या कडे ठेवला. दुसऱ्या दिवशी शाळेंत "बाळ हे तुझे पैसे" म्हणून सर्वां समक्ष परत सुद्धा दिला. गुरुजींच्या विश्वासामुळे मी पैसे वगैरे मोजायच्या फंदात पडले नाही (त्यांच्या पुढे) मन त्यांच्या मागे मोजून पहिले तर आंत फक्त ५ रुपये होते. घरी सांगितले तर सगळ्यांनी "ग तुझ्याच कडून हरवले असतील, राहू दे" म्हणून विषयावर पांघरून टाकले.
खूप वर्षांनी मी कार चा परवाना काढण्यासाठी RTO मध्ये गेले असता गुरुजी सुद्धा टेस्ट द्यायला आले होते आणि फेल सुद्धा झाले. RTO हापिसर मित्र होता. "तिसऱ्यांदा फेल होताहेत" असे त्याने मला मागाहून सांगितले. मी गुरुजींना "काय गुरुजी लायसन भेटले का असे चार चौघां पुढे विचारले" तर गुरुजींनी उत्तर दिले "नाही RTO हापिसर ला आज थोडी घाई होती म्हणून नंतर यायला सांगितले आहे आणि त्यानंतर सरकारी अधिकारी कसे प्रामाणिक पणे काम करत नाहीत ह्यावर भाषण द्यायला सुरु केली. लहानपणांत चारित्र्यवान वाटणारे गुरुजी आज विदूषकाचे पेक्षाही विनोदी वाटत होते.
विषयांतर बाजूला ठेवूया. सार्वजनिक जीवनात सुद्धा ह्या गुरुजी सारखे लोक कमी नाहीत. उदाहरण म्हणजे श्री हमीद दाभोलकर.
.
.
.


तस्मात ग्रंथात काहीही लिहिले असले किंवा काहीही परंपरा असली तरी त्या काळानुसार बदलायला हव्यात असे माझे मत आहे.या मतात आक्षेप घेण्यासारखे काहीच नाही. फक्त जेव्हा आपण असे करतो तेव्हा आपण पारंपारीक अर्थाने धर्म मानत नाही हे व आपल्या सोयीनुसार वा बुद्धीनुसार वा स्वार्थानुसार धर्माचा अर्थ लावतो याची जाणीव असु दिली म्हणजे झाले. दुसर धर्मात वा धार्मिक ग्रंथात लिहीलेली प्रत्येक बाब ही सनातन सत्य नसुन, ईश्वरी नसुन मानवीच आहे व हितसंबंधाची प्रेरणा त्यामागे अर्थातच आहे. उदाहरणार्थ धर्मग्रंथांचा एक जुना नियम असा होता. गोसव नावाच्या जुन्या यज्ञात "अनुबंध्या" गायीचा बळी ("बॅरन काऊ" असा अर्थ काणे सांगतात) अग्निस्तोमाच्या शेवटी एका विशीष्ट विधीनंतर दिला जात असे. मान्यवर पाहुण्याला देण्यासाठी बनवलेल्या मधुपर्क या विशेष पदार्थातही मुख्य घटक म्हणुन गायीचे मास वापरण्यात येत असे. गोभिल गृह्यसुत्रानुसार अष्टकश्राध्द्दातही गायीचा बळी दिला जात असे.. आपस्तंब धर्मसुत्र सांगतो की गायीचे मांस जर श्राद्धभोजनात पितरांना अर्पण केले तर पितर एक वर्षाच्या कालावधीसाठी तृप्त राहतात. गोमेध या यज्ञातही गायीचीच बळी दिली जात असे हा यज्ञ केवळ वैश्य करु शकत असे. कलिवर्ज्य वरील सर्व जुने नियम रद्द करत कुठल्याही कारणासाठी कुठल्याही यज्ञात गायीच्या बळीचा निषेध करतो. गोवध कलिवर्ज्य ठरवतो. खर म्हणजे माझा मूळ प्रश्न गामा पैलवान यांना होता ते जे म्हणत होते तंतोतंत शास्त्रात जे आहे ते पाळावे नाही तर ती कसरत ठरते त्यावरुन तो विचारलेला होता. तर तुम्हालाही विचारुन घेतो वरील मुळ नियम व बदल आपण पाहीला आता सध्या जी गोहत्या बंदी आहे त्याविषयी आपले काय मत आहे ? यात गोरक्षक मूळ धर्माचे पालन करत आहेत का ? लॉजिकली विचार करत आहेत का ? तुम्ही यावर काय लॉजिकली विचार करता ? काळानुसार ही परंपरा योग्य आहे की अयोग्य आहे ?राद्धभोजनात किंवा नवस म्हणून देवाचा किंवा पितरांच्या नावाखाली जे प्राणी कापले जातात ते देव किंवा पितर यांच्यासाठी आहेत असा फक्त देखावा असतो किंवा या अंधविश्वासाखाली ते कापले जातात. प्रत्यक्षात स्वतःला त्या प्राण्यांचे मांस सेवन करायचे असते. परंतु त्यात देवाला भागीदार करून घेतले जाते.आदी शंकराचार्य यज्ञातील पशु हिंसेचे तुम्ही म्हणता त्या प्रमाणेच उघड दांभिक समर्थन करतात तेव्हा त्याचे आश्चर्य व मौज नेहमीच वाटते.पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे धर्मशास्त्रे लिहिली गेली ती उपासनेसाठी. निदान माझा तरी असा समज आहे. तुमचा प्रश्न उपासनेशी संबंधित दिसंत नाही. तो सोडवण्यासाठी न्यायशास्त्राचा (म्हणजे प्रचलित स्मृतीचा) आधार घ्यावा लागेल.अत्यंत विनम्रतेने आपणांस सुचवु इच्छितो आपणांस असे म्हणावयाचे असेल की धर्मसुत्रे धर्मशास्त्रे एकीकडे व स्मृति दुसरीकडे असे दोन वेगवेगळे आहेत. म्हणजे कायदा नियम या अर्थाने केवळ स्मृतीतच आहे व धर्मशास्त्रे केवळ पुजापाठ उपासने संदर्भातील विवेचन करतात. तर आपले म्हणणे कृपया आपल्या आवडीच्या कुठल्याही अधिकृत म्हणजे धार्मिक अधिकृतच ग्रंथातुन केवळ एकवार तपासुन घेतले तर बरे होइल. कारण धर्मसुत्रे धर्मशास्त्रे व स्मृती तिनही विविध आचरणाचे नियम व कायदे यांनी भरलेले आहेत व या बाबतीत स्मृती वेगळी धर्मसुत्र वेगळे असा भेद नाहीच. सर्वात मुळात श्रुती त्यानंतर स्मृती त्यानंतर पुराणे हा क्रम सर्वमान्य आहे. त्यात भाष्यकार हा वेगळा भाग आहे उदा. याज्ञवल्क्यस्मृतीवरील " मिताक्षरा" ही विज्ञानेश्वराने लिहीलेली टीका/भाष्य आहे. तो उत्तरकालीन इंटरप्रीटर आहे. मनुमृती चे भाष्यकार मेधातिथी आहे कुल्लुक आहे मेधातिथी ११ व्या कुल्लुक तर अगदी अलीकडचा आहे. हा एक भाग. काही स्मृतीतर अगदी अलीकडच्या काळातील आहेत उदा. देवल स्मृती व त्याहुन अनेक धर्मसुत्रे अती प्राचीन आहेत. काही तर इ.स.पुर्व ७ व्या शतकापर्यंत मागे जातात. धर्मसुत्रातला व स्मृतीतला कायदा हा नुसता प्रोव्हीजन्स नाहीतर शिक्षेच्या तरतुदींसहीत दिलेला आहे. त्याचे अॅक्च्युअल इम्प्लीमेंटेशन हा वेगळा विषया आहे. पण ज्या कॅज्युअली तुम्ही स्मृती व धर्मशास्त्र्/सुत्र जो भेद देत आहात तो तसा नाही. वरील सर्व विवेचनही एका बाजुला ठेवा या व्यतिरीक्त दोन स्मृतीच घेतल्या तुमच्याच म्हणण्याप्रमाणे तरी त्यात परस्परविरोधी नियम कायदे मोठ्या प्रमाणावर आहेतच. त्यावर आक्षेप एक भाग. दुसरा परंपरेनेही त्यावर सॉर्ट आउट ची जी सोय केलेली आहे ती आपणास माहीत असेलच. शिवाय हा कलिवर्ज्य चे अॅमेंडमेंट. तर पहीला आक्षेप इनकसिस्टंसीचा आहेच पण तो फारच बेसीक त्यानंतर हितसंबंधाचा त्यानंतर मानवीय असण्याचा व त्याहुन महत्वाचा त्यातील अन्न्याय्य भेदभावयुक्त शोषक विषम तरतुदींचा ज्या कुठल्याच स्वाभाविक न्यायाच्या कसोटीवर कधीही टीकत नाहीत. ते बंधन का मानावे स्वतंत्र चिकीत्सा करुन स्वतंत्र धर्मनिरपेक्षनीतीने का आचरण करु नये या संदर्भातील आक्षेप आहेत. त्यामागील शोषणावर आक्षेप आहे. तर वरील स्मृतींच फक्त साठी खालील एक मुद्दा पहा. यात सध्या कात्यायन या एकाच स्मृतीचा उल्लेख असला तरी त्यातील परस्परविरोध एकदा तपासुन घ्या दुसरी स्मृतीचे उदाहरण शोधुन देतो. अजुन एखादे काँक्रीट दोन स्मृतीभेद असलेले उदाहरणही देतो सध्यापुरते हे बघा. "आततायिन " व्यक्तीने (डेस्परेट/व्हायोलंट) युद्धाच्या पवित्र्यात जर हल्ला केला तर आणि त्याला स्वत:चा बचाव करण्याच्या हेतुने मारले तर त्यात काहीही गैर नाही असे अनेक जुन्या धर्मशास्त्रांचे मत होते. आततायिन च्या व्याख्येत हिंसक पुरुष जो शस्त्रसज्ज आहे/दरोडेखोर आहे/आग लावण्याच्या हेतुने/ एखाद्याची पत्नी पळवण्याच्या हेतुने / जर आक्रमण करत आहे अशांचा समावेश होता. तर अशा "आततायिन" व्यक्तीवर प्रतिहल्ला करुन त्याला ठार मारणे धर्मसंमत होते. मात्र यात असा "आततायिन" ब्राह्मण असेल तर मात्र त्याला मारावे की नाही याविषयी अनेक धर्मसुत्रांत अगोदरपासुनच मतभेद होते. प्रातिनिधीक म्हणुन वसिष्ठ धर्मसुत्र म्हणतो जर ब्राह्मण हा आततायिन म्हणुन हल्ला करण्यास आला व इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर जरी तो वेदाधिकारी असला तरी त्याच्या प्रतिकारात केलेल्या हत्येने ब्रह्महत्येचे पातक लागत नाही. दुसरीकडे कात्यायन स्मृती म्हणते ब्राह्मण हा जरी आततायिन असेल व हल्ला करत असेल तरी त्याला (स्वत:च्या जीवाच्या रक्षणासाठी देखील मारु नये) भृगु म्हणतो आततयिन शुद्र असेल तर मारायला हरकत नाही मात्र ब्राह्मणाला मारु नयेधर्मात बदलाची सोय नसते. न ती कधी कुठल्या धर्माचार्यानी आपणहून दिलेली आहे. हे सर्वांना नीट माहिती आहे.धर्मात बदलाची सोय दिलेली आहे. तीचे स्वरुप थोडे वेगळे आहे इतकेच. कलिवर्ज्य ही बदलाचीच सोय आहे. व धर्माअंतर्गत आहे. पांडुरंग वामन काणे अत्यंत अभिमानाने पाश्चात्यांना संबोधुन म्हणतात की आमच्याकडे ही धार्मिक कायदे स्टॅटीक नव्हते त्यात बदल होत असे व "कलिवर्ज्य" सारक्या व भाष्यकारांची भाष्ये या बदलांना कायद्यातील बदलांना धर्मांतर्गतच बदलाची सुविधा उपलब्ध करुन देत. कलिवर्ज्य ने काही चांगले बदलही केले काही व्यावहारीक उपयोगाचे बदलही केले. तर ती ही सोय होती म्हणुनच केले. उदा. एक बदल पहा जुना मुळ नियम याज्ञवल्क्यस्मृती १-७२ नुसार एखाद्या स्त्रीने व्याभिचार केला असेल तर आणि त्यानंतर तिला मासिक पाळी आली तर अशी स्त्री व्याभिचाराच्या कलंकातुन सहज मुक्त होते. मात्र अशी स्त्री जर या व्याभिचाराच्या योगाने गर्भवती झाली तर मात्र अशा स्त्रीच्या पुत्राने (मातेचा) वा भावाने (बहीणीचा) त्याग केला पाहीजे. त्यांना टाकुन दिले पाहीजे. वसिष्ठ धर्मसुत्रही असाच आदेश तिन वरीष्ठ वर्णीय स्त्रीयांनी शुद्र पुरुषाशी केलेल्या व्याभिचारासंदर्भात देतो. तिथेही नियम गर्भवती होणे न होणेवर अवलंबुन आहे. याज्ञवल्क्यस्मृतीवरील मिताक्षरा या टीकेत याचा अर्थनिर्णय करतांना विज्ञानेश्वर म्हणतो त्यागाचा अर्थ घराबाहेर काढणे असा नसुन अशा स्त्रीला धार्मिक कार्यक्रम व लैगिंक संबंध नाकारणे इतकाच आहे. वसिष्ठ पुन्हा चारच स्त्रीयांचा त्याग करावा असे म्हणतो त्यात पतीच्या गुरु वा शिष्याशी व्याभिचार करणारी, पतीच्या हत्येचा प्रयत्न, वा खालच्या वर्णाच्या पुरुषाशी व्याभिचार करणारी. कलिवर्ज्य- नविन नियम कुठल्याही परीस्थीतीत मातेचा वा भगिनीचा त्यांनी जरी व्याभिचार केला असेल व त्यायोगे त्या गर्भवती झाल्या असल्या तरी त्यांचा त्याग करण्यास प्रतिबंध लावतो. आता धर्मांतर्गतच वरील मुळ नियमात बदल करुन "कलिवर्ज्य" चा वापर करुन पुर्वीपेक्षा उदार भुमिका घेतलेली दिसत आहे. असेच आणखी काही नियम आहे जसे सत्रांवर ज्यात मोठ्या प्रमाणावर पशुबली होत असेल नियोगावर बंदी इत्यादी आहेत. आता यात वेगळी एक बाब अशी आहे की एकुण संख्या कलिवर्ज्याची ६० ते ६५ एक्झॅट नाही सांगता येत ती बघितली तर शोषण अजुन तीव्र करणारे स्वातंत्र्याचा अधिक संकोच करणारे वर्नव्यवस्था अधिक घट्ट करणारे च बदल तुलनेने जास्त आहेत हे कटु वास्तव आहे. आणि पांडुरंग वामन काणे सारखे थोर अभ्यासकही त्यात कधी कधी वाईट बदलांचीही भलामण करतात ते फारच खेदजनक व उद्वेगजनक आहे. एकुण कलिवर्ज्य चा वापर अर्थातच नकारात्मक बदलांसाठीच जास्त झालेला आहे.दिव्याच्या अवसेला बक्र ईद पेक्षा जास्त प्राण्यांची कत्तल होते हे दाखवणारा एक तरी पुरावा आपल्याला देता येईल का?
अल्पसंख्याक म्हणून बोम्ब मारणारे मुसलमान भारतात १५ % आहेत म्हणजेच २० कोटी याना अल्पसंख्याक म्हणणे हा विरोधाभास आता थांबवला पाहिजे.