Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ऑपरेशन नोटा-रद्द आणि नोटा-बदल

ड
डॉ सुहास म्हात्रे
Sun, 11/13/2016 - 22:52
🗣 637 प्रतिसाद
नुकत्याच सरकारने अतिरेकी व काळाबाजारी लोकांवर अचानक ५०० व १००० रुपयांच्या नोटा रद्द करून एक प्रकारे "सर्जिकल स्ट्राईक" केला. या प्रकल्पाची मुख्य वैशिष्ठ्ये अशी : १. राष्ट्रीय महत्व : याचा भारताच्या अर्थकारणावर पडणारा प्रभाव सांगायला नकोच. २. प्रचंड आवाका : भारतासारख्या क्षेत्रफळाने आवाढव्य, भौगोलिक परिस्थिती व विकासाच्या अभावामुळे अनेक भाग असलेला व १२५ कोटी लोकसंख्या असलेल्या राष्ट्रातला प्रत्येक नागरीक प्रभावित होईल असा प्रकल्प. रद्द केलेल्या चलनी नोटा या सगळ्यांकडून परत घेऊन त्यांना नवीन नोटा देणे अत्यंत जिकरीचे काम आहे. ३. गुप्तता : सहा महिन्यांच्या तयारीच्या काळात व पंतप्रधान कारवाई जाहीर करेपर्यंत गुप्तता पाळणे हा या प्रकल्पाचा जीव होता. या एका मुद्द्यावर सर्व कारवाईचे मुख्य यशापयश अवलंबून होते. वरच्या दोन क्रमांकांच्या मुद्द्यात आलेल्या विवरणावरून + गेल्या ७० वर्षांत सरकारप्रणाल्यांमध्ये निर्माण झालेल्या हितसंबंधांच्या पार्श्वभूमीवर गुप्तता पाळणे हे काम किती कठीण होते हे सांगायला नकोच. माध्यमांत असलेल्या बातम्यांप्रमाणे या कारवाईच्या प्रकल्पाची काही रुपरेखा आता हळूहळू बाहेर येत आहे. त्याबद्दल मला समजलेले व भावलेले काही, थोडक्यात... काळापैसेवाल्यांना व अतिरेकी जाळ्याला या कारवाईचा वासही येऊ नये यासाठी बँकाच काय या कारवाईचा आराखडा फक्त निवडक मंत्री आणि आरबीआयचे अत्युच्च अधिकारी यांनाच माहीत होता.इतर कॅबिनेट मंत्र्यांनाही ही माहिती ऐन वेळेला दिली गेली, त्या मिटींगमला मोबाईल न आणण्याची सूचना होती. त्यांनतर मोदी राष्ट्रपतींना भेटून नंतर त्यांचे टीव्हीवरचे भाषण संपेपर्यंत सर्व मंत्री मिटिंग रूम मध्ये बसून होते. त्यानंतर वित्त मंत्रालय व आरबीआयची कारवाई सुरू झाली. बँकांना सर्व प्रकल्प समाजावून देण्यासाठी व बँकात नवीन २००० च्या नोटा व साथीला १०० च्या नोटा पोचविण्यासाठी ९ तारखेलाला बँका बंद ठेवणे आवश्यक होते. या नोटा अगोदर पाठविल्याने कारवाईची बातमी फुटली असती. तसेच, बातमी गुप्त ठेवण्यासाठी रु २०००च्या नवीन नोटांसाठी एटीएम मशीन्स ८ नोव्हेंबरच्या आधी कॅलिब्रेट करणे शक्य नव्हते. बातमी थोडीही बाहेर फुटली असती तर कारवाईमधली सगळी नाही तरी बरीचशी हवा निघून गेली असती... मुख्य म्हणजे बदमाषांनी आपला काळा पैसा इतरत्र गुंतवून अथवा अननुभवी सामान्य गरिबांच्या माथी मारून सरकारचे काम फार कठीण केले असते. त्याचसाठी पंतप्रधानांची घोषणा रात्री आठच्या सुमाराला आणि कारवाई सुरु होण्याची वेळ रात्री १२ वाजता ठेवली गेली. या चार तासात बँका बंद असल्याने बातमी कळली तरी काहीच फायदा नव्हता. बँकाचे लॉकर्सही पुढचा एक दिवस तरी उघडता येणे शक्य नव्हते. मला वाटते, या कारवाईतला हा शेवटचा घाव वर्मी बसणारा होता. केवळ आरबीआयच्या परिपत्रकाने अश्या गोष्टी सामान्य लोकांपर्यंत पोचत नाही आणि असे पत्रक सरळपणे न समजेल अश्या शासकीय व कायदेशीर भाषेत असते. वित्तमंत्रालयाच्या, आरबीआयच्या व करविभागाच्या अश्या परिपत्रकांबद्दल सीए सुद्धा संभ्रमात असतात व निर्णय देण्यापूर्वी बाबूलोकांच्या विश्लेषणाची वाट पहातात, हे आपण नेहमी पाहतोच. स्वतः पंतप्रधानांनी आदल्या रात्री टीव्हीवर बातमी सांगून लोकांमध्ये शक्य असलेले अफवांचे पीक टाळले. मला वाटते पूर्वीच्या अश्या प्रकारच्या कारवायांत टाळलेली आणि आता आवर्जून पंतप्रधानांकरवी सर्व जनतेला संबोधून माहिती देणारी ही पायरी "मास कम्युनिकेशन"ची नाडी पक्की माहीत असल्याचे लक्षण आहे. कारवाईचा त्रास होऊनही व काही नेत्यांची उसकवणारी वक्तव्ये येवूनही लोकक्षोभ न होण्याचे हे महत्वाचे कारण आहे, असे मला वाटते. इतर काही असले तरी, इतकी बंधने असलेली, इतक्या थोड्या वेळेत करायची, एवढी मोठी कारवाई भारतासारख्या आवाढव्य देशात करण्यात अपेक्षित होता त्यापेक्षा कमी गोंधळात आणि सामान्य लोकांच्या उत्तम सहकार्याने काम चालू आहे असे माध्यमांतील बातम्यांवरून दिसते आहे. असा प्रकल्प पूर्णपणे आलबेल प्रकारे होईल हे अपेक्षित नव्हतेच. ज्यांना मोठ्या प्रकल्पांची थोडीबहुतही माहिती आहे त्यांना तसा विचार शेखचिल्लीचे स्वप्न वाटेल. यासंदर्भात, सार्वत्रिक निवडणूकीच्या वेळेस किती आठवडे/महिने तयारी केली जाते व त्यानंतरही ती निवडणूक अनेक विभागांत, दीडदोन महिन्यांच्या कालावधीत घेतली जाते, याची आठवण उपयोगी ठरेल. मुख्य म्हणजे विरोधी पक्षांनी या देशाच्या फायद्याच्या कारवाईत मदत तर केली नाहीच. पण, सुरुवातीच्या एकदोन दिवसांत, बसलेल्या धक्क्यात काय करावे हे न कळल्याने, पहिल्यांदा सरकारचे हे पाऊल बरोबर आहे असे म्हणून टाकले आणि नंतर "पण-परंतू" असे बोलत दिशाभूल करणार्‍या गोष्टी सुरू झाल्या आहेत. काहीजण लोकभावना भडकाव्या अशीच वक्तव्ये आणि कारवाया करत आहेत. काही जण तर ही पूर्ण कारवाईच मागे घ्या असे म्हणत आहेत ! हे अपेक्षित आहेच म्हणा. सरकारने यालाही तोंड देण्याची तयारी ठेवायला हवी, ठेवली असेलच. सर्वसामान्य लोक मात्र त्या वक्तव्यांनी फारसे प्रभावित न होण्याइतके प्रगल्भ झालेले पाहून एक भारतिय म्हणून आनंद व अभिमान वाटला. हा तर एका टेकडीचा टप्पा आहे, भारत पुरेसा भ्रष्टाचारमुक्त करायला अख्खा पर्वत चढून जायला लागेल. त्या वाटेत अनेक समस्या येतील, एखादी कारवाई फसेलही. कारण ७० वर्षांत काळ्या पैशाने गडगंज झालेले लोक ना निर्बुद्ध आहेत, ना ते तो पैसा सहजासहजी सोडतील. सरकारच्या कारवाया अयशस्वी व्हाव्या यासाठी ते त्यांची सर्व हुशारी व नवे-जुने हितसंबंध वापरून सर्व भले-बुरे (मुख्यतः बुरेच) मार्ग चोखाळतील, यात शंका नाही. काही सरकारी अधिकारी आणि सत्ताधारी व गटबंधनातल्या पार्टीतल्या लोकांचे अंतर्गत हितसंबंधही गुंतलेले असतील. तो गुंताही सोडवावा लागेल. अनेक अपेक्षित आणि अनपेक्षित घटनांना सामोरे जायची तयारी ठेवावी लागेल. अशी तयारी आहे असेच संकेत सद्या तरी दिसत आहेत. आतापर्यंत या कारवाईतल्या दोन तृटी बाहेर आल्या आहेत. पहिली म्हणजे रु२००० च्या नोटेवर हिंदीत "दोन हजार रुपया" असे छापलेले आहे. दुसरे म्हणजे नोटांचा रंग पाण्यात विरघळतो व फिकट होतो आहे अश्या बातम्या आहेत. मोठ्या प्रमाणात सामग्रीची जुळवाजुळव करत असतानाच गुप्तता आणि घाई पाळायला लागयामुळे याप्रकारे नोटांची प्रत कमी होणे झाले असावे. मात्र जोपर्यंत भारत सरकार त्या नोटांना "लीगल टेंडर" मानते आहे तोपर्यंत ते केवळ "टेक्निकल एरर" असतील व त्यांचा नागरिकांवर त्याचा प्रभाव पडणार नाही. आताचा गडबड गोंधळ ताब्यात आल्यावर मात्र याबाबत पावले उचलणे अत्यावश्यक ठरेल. त्यासंबंधी एखादा प्रकल्प आरबीआय आत्ताच तयार करत नसल्यास आश्चर्य वाटेल. माझ्या अंदाजाप्रमाणे ५०० व १००० च्या पुरेश्या नोटा चलनात आल्यावर या नोटांना बँकिंग व्यवहारातून हळू हळू काढून / बदलून टाकण्याची कारवाई होईल. कारण, पहिल्यापेक्षा जास्त किंमतीच्या (पक्षी : ५०० व १००० ऐवजी २०००च्या) नोटा कारवाई गुप्त ठेवण्यासाठी व तसे करताना कारवाईचा सुरुवातीचा भार (कागद, शाई, छपाई, साठवण, वाहतूक, वितरण, इ) अर्धा करण्यासाठीच वितरीत केल्या जात आहेत. परंतु, या कारवाईसंबंधीच्या जनतेच्या प्रतिसादाने अंतीम यशाच्या आशा उंचावल्या आहेत. कारण, काळ्या पैश्याच्या निर्मुलनातली हीच एक पायरी आहे की जिच्याशी सामान्य जनतेचा तडक संबध येतो व त्याला त्रास होतो. इतर पायर्‍यांत सामान्य जनतेला फारसा त्रास असण्याची शक्यता फार कमी आहे. ही व पुढच्या पायर्‍या यशस्वी होऊन भ्रष्टाचारमुक्त झालेला भारत पहायला मिळण्यासारखा दुसरा आनंद नसेल !
वर्गीकरण
अर्थकारण
राजकारण
देशकारण

प्रतिक्रिया द्या
133576 वाचन

💬 प्रतिसाद (637)
म
मराठी कथालेखक Mon, 11/14/2016 - 12:31 नवीन
मला नाही तसे वाटत , माझा दुसरा प्रतिसाद बघा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्माक्षी
स
सुबोध खरे Tue, 11/15/2016 - 15:19 नवीन
माणूस हा स्वार्थी आहे त्यामुळे भ्रष्ठाचार जगातून "कधीच" संपणार नाही हि वस्तुस्थिती आहे. अत्यंत कडक आणि अमानवी कायदे असणाऱ्या देशातही गुन्हे थांबलेले नाहीत हि वस्तुस्थिती आहे कारण ती स्वार्थ हि मानवी प्रवृत्ती आहे. आज भ्रष्टाचार हा शिष्टाचार झालेला आहे किंवा सामान्य माणसाला भ्रष्टाचार यात काही वावगे वाटत नाही हि खरी शोकांतिका आहे. गोठा फारच घाण असेल तर त्यात राहणाऱ्या माणसांना त्याची सवय होते असे आहे. मग त्याने आरोग्याला अपाय होत असेल तरीही. पण कुणी येऊन तो साफ केला आणि त्या माणसांना स्वच्छतेचि सवय लावली तर काही काळाने आपो आप त्यांना त्या स्वच्छ तेचि सवय लागते आणि मग त्यांना हि घाणीची शिसारी येऊ लागते. समांतर अर्थव्यवस्था सुधारून( ती कायमची नष्ट होईल हा स्वप्नवाद आहे) जितकी कमी करता येईल आणि सर्व सामान्य माणसाने आज भ्रष्टाचार हा अगतिकपणे स्वीकार केला आहे त्यात बदल होईस्तोवर करणे आवश्यक आहे. आज माणसे मी अमुक इतका कर चुकवला याची शेखी मिरवताना दिसतात या ऐवजी त्यांना त्याची लाज वाटायला लागेल हि स्थिती येणे आवश्यक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
प
पक्षी Tue, 11/15/2016 - 09:00 नवीन
भ्रष्टचार संपणार नाही, पण संपण्यास मदत होईल. किंवा भ्रष्टचार संपण्याच्या दृष्टीने हे एक पाऊल आहे. काहीही नसण्या पेक्षा काहीतरी असणे कधीही चांगले. हे सरकार प्रयत्न तरी करत आहे, ह्याच्या अगोदर किती प्रामाणिक प्रयत्न झाले भ्रष्टचारा विरुद्ध??? कुठल्या हि गोष्टीचा परिणाम व्हायला थोडा वेळ द्यावा लागतो, एक रात्रीत ७० वर्षांची घाण साफ करणं केवळ अश्यक्य आहे. चांगल्या प्रयत्नांना शंका काढण्या पेक्षा आपण ह्या उपक्रमात काय हातभार लावू शकतो किंवा अनुकूल वातावरण कसं निर्माण करू शकतो हे महत्वाचं आहे. मुळात, आपल्या सवयी जर चांगल्या असतील तर, ह्या निर्णयाचा त्रास खूप कमी होईल. जसे कि, मी शक्य तितके व्यवहार ऑनलाईन(मराठी प्रतिशब्द?) किंवा डेबिट कार्ड वापरून करतो. उदाहरणार्थ: वीज बिल, रेल्वे आरक्षण, घर भाडे हे ऑनलाईन भरतो. खरेदीसाठी डेबिट कार्ड वापरतो, अगदीच इ-देवाणघेवाण शक्य नसेल तरच चलन वापरतो. हा निर्णय जेव्हा घोषित झाला तेव्हा माझ्या कडे फक्त २०० रुपये होते, पण त्याची क्वचितच गरज पडली. आपण सर्वानी जर इ-देवाणघेवाणची सवय लावली तर काळा पैसा आपोआप कमी होईल, कुठल्या हि व्यहारात आपली फसवणूक होण्याची शक्यता सुद्धा कमी होईल, कारण आपल्या कडे त्याचा पुरावा असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
म
मार्मिक गोडसे Tue, 11/15/2016 - 09:10 नवीन
ह्याच्या अगोदर किती प्रामाणिक प्रयत्न झाले भ्रष्टचारा विरुद्ध???
निवडणूक ओळखपत्र, पॅन कार्ड, आधारकार्ड सरकारने कशासाठी काढली असं तुम्हाला वाटतं? तुम्ही नक्की भारतीयच आहात ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्षी
प
प्रसाद_१९८२ Tue, 11/15/2016 - 09:46 नवीन
आणि भ्रष्टाचाराचा काय संबध आहे ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे Tue, 11/15/2016 - 10:50 नवीन
निवडणूक ओळखपत्रामूळे निवडणुक मतदानात होणार्‍या गैरप्रकारांना आळा बसला. पैसे घेवून दुसर्‍याच्या नावावर मतदान करणे कठीण झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२
श
श्रीगुरुजी Tue, 11/15/2016 - 10:55 नवीन
पूर्णपणे नाही. बुरखा घातलेल्या मुस्लिम बायका बुरखा न काढता, ओळख पटवून न देता मतदान करू शकतात. तिथे बोगस मतदानाची शक्यता आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे Tue, 11/15/2016 - 11:08 नवीन
कहीतरीच. बुरखा न उघडता ह्यांचे फोटो कसे काढतात निवडणूक ओळखपत्र देताना? पासपोर्ट काढताना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Tue, 11/15/2016 - 18:24 नवीन
फोटो फक्त महिलांच्या उपस्थितीत बुरख्याशिवाय काढतात. परंतु मतदान केंद्रात सर्व महिला ठेवणे अशक्य आहे. तिथे बुरखा न काढता बरोबरील पुरुषाने हीच ती बाई अशी खात्री देणे पुरेसे आहे. बुरख्याच्या आत बाप्या असला तरी अधिकाऱ्याला ते कळू शकणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
व
विशुमित Wed, 12/07/2016 - 09:55 नवीन
हा जावई शोध मी पहिल्यांदाच ऐकतोय... ग्रेट माहिती...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
प
पैसा Tue, 11/15/2016 - 13:01 नवीन
कालच एका एटीएमबाहेर बोर्ड पाहिला की हेल्मेट, स्कार्फ किंवा बुरखा घातल्यास एटीएम मधे प्रवेश मिळणार नाही. बुरखा घालणार्‍या महिलांना चेकबुक देऊ नये तसेच बुरखा घालून बँक काउंटरवर आल्यास विथ्ड्रॉवल स्लिप देऊ नये असे निर्देश आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
म
मराठी कथालेखक Tue, 11/15/2016 - 10:09 नवीन
पॅनकार्ड ही अत्यंत महत्वाची पायरी होती. यामुळे एकाच व्यक्तीचे सगळी बॅक खाती आयकर विभागाशी जोडली गेलीत. पॅनकार्ड कधी अंमलात आले याबद्दल खात्री नाही. पण कोणत्याही पक्षाने आणले असले तरी त्या सरकारास त्याचे श्रेय द्यायला हवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे Tue, 11/15/2016 - 10:54 नवीन
पॅनकार्ड कधी अंमलात आले याबद्दल खात्री नाही.
नरसिंह राव सरकारच्या काळात पॅन कार्ड अ‍ॅक्ट मध्ये दुरुस्ती करण्यात आली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
म
मराठी कथालेखक Tue, 11/15/2016 - 11:13 नवीन
धन्यवाद एकूणातच नरसिह राव हे एक फार चांगले पंतप्रधान देशाला मिळाले होते असं माझं मत आहे. दुर्देवाने काँग्रेसलादेखील त्यांचा विसर पडलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे Tue, 11/15/2016 - 11:18 नवीन
दुर्देवाने काँग्रेसलादेखील त्यांचा विसर पडलाय.
खरंय. नरसिंह रावांनी धोरणांना प्राधान्य दिले तर काँग्रेसवाल्यांनी व्यक्तीपुजेला. आताही तेच चालू आहे फक्त पक्ष बदलला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
अ
अनुप ढेरे Tue, 11/15/2016 - 13:20 नवीन
नरसिंहराव गेल्यावर त्यांचं पार्थिव कॉंग्रेस मुख्यालयात देखील आणलं गेलं नव्हतं. जनरली मोठा नेता (इथे तर माजी पंतप्रधान) गेल्यावर कार्यकर्त्यांसाठी आणतात पार्थिव. रावांच पार्थिव मुख्यालयाबाहेरपर्यंत आणलं होतं. सोनिया गांधींनी गेट उघडायची परवानगी दिली नाही. तसच परत नेलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे Tue, 11/15/2016 - 14:26 नवीन
रावांच पार्थिव मुख्यालयाबाहेरपर्यंत आणलं होतं. सोनिया गांधींनी गेट उघडायची परवानगी दिली नाही. तसच परत नेलं.
हे माहीत नव्हतं. इतक्या पररकोटीच्या द्वेषाची फळं भोगतोय त्यांचा पक्ष.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
क
कैलासवासी सोन्याबापु Tue, 11/15/2016 - 14:31 नवीन
खरंय, पीव्ही नरसिंह राव म्हणजे अक्षरशः आज जो भारत दिसतो त्याचे डेंग झिओ पिंग म्हणवले जावेत असले व्यक्तिमत्व, मराठवाडा मुक्ती आंदोलनाच्या वेळी माझ्या आजोबांनी त्यांच्या सोबत काम केले होते अन कारावास सुद्धा भोगला होता सोबत, रावांना खूपशा भाषा अस्खलित बोलता येत असत असे मी कैकवेळा आजोबांना सांगताना ऐकले आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे Tue, 11/15/2016 - 14:43 नवीन
जसे माजी. पंतप्रधान वाजपेयींविषयी विरोधी पक्षातले लोकही आदराने बोलतात तसे नरसिंह रावांविषयी त्यांच्या पक्षाचा प्रमुख विरोधी पक्षवाले कधी आदराने बोललेले आढळले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
स
सुबोध खरे Tue, 11/15/2016 - 15:34 नवीन
काळा चष्मा घातला तर जगही काळेच दिसते. श्री नरसिम्ह राव हे अत्यंत सुसंस्कृत आणि समंजस पंतप्रधान भारताला लाभले होते असे मी सर्व पक्षांच्या नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून वेगवेगळ्या वेळेस ऐकले आणि वाचलेले आहे. श्री मनमोहन सिंहांना वित्त मंत्री करणे आणि उदार आर्थिक धोरण हे मूळ श्री नरसिम्हरावांचे धोरण होते पण त्यांना त्याचे श्रेय दिले गेले नाही याबद्दल त्यांना विचारले असताना त्यानं हसून तो विषय टाळला असेही वाचले आहे. त्यांना शुद्ध मराठीत बोलताना मी टीव्ही वर पाहिले आहे. माझ्या पाहण्यातील नरसिम्ह राव हा सर्वात जास्त सुसंस्कृत आणि शालीन असा काँग्रेस चा नेता होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
क
कैलासवासी सोन्याबापु Tue, 11/15/2016 - 17:05 नवीन

काळा चष्मा घातला तर जगही काळेच दिसते.

ह्या वाक्याची सलामीला गरज होतीच का डॉक्टर साहेब ? एड होमिनेम न करता मुद्दे मांडले जाऊ शकत नाहीत का ? तुमचे मुद्दे संयुक्तिक होते/आहेत/असतील ही खात्री सुद्धा आहे. तरीही जर अशी शेरेबाजी टाळता आली तर पहा ही विनंती करतो. बाकी तुमचे जर गोडसे साहेबांसोबत काही वैयक्तिक विषय असले तर खरडवही/ व्यनी आहेतच. राग मानू नये जाणवले म्हणून स्पष्ट बोलतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
मार्मिक गोडसे Tue, 11/15/2016 - 17:19 नवीन
खरे सरांची मते मला खरोखरंच पटली माझे वाचन, अनुभव व अभ्यास त्यांच्यापेक्षा नक्कीच कमी आहे. मी काळा चष्मा घातला असता तर, वरील एका प्रतिसादात ,हे माहीत नव्हतं. इतक्या पररकोटीच्या द्वेषाची फळं भोगतोय त्यांचा पक्ष. असे मी म्हटले नसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 11/15/2016 - 16:34 नवीन
दुसर्‍या पक्षातले नरसिंह रावांबद्दल आदराने बोलतात पण त्यांच्या पक्षातले तसे बोलायला घाबरतात... कारण त्यांनी घराणेशाहीला मुजरा करायला नकार दिला होता व तो आचरणात आणला होता. १९९०-९१ ला भारताची वित्तव्यवस्था खोल गर्तेत असताना नरसिंह राव व मनमोहन ही जोडगोळी भारतात पंतप्रधान व वित्तमंत्री या पदांवर नसते तर भारत आज आहे त्या अर्थिक सुव्यवस्थेत नसता, किंबहुना दुर्बळ व दरिद्री राष्ट्रांच्या रांगेत कोठेतरी मागच्या जागेवर उभा असता. त्या दोघांनी भारताची फिरवलेली (टर्न अराऊंड या अर्थाने) अर्थव्यवस्था हा देशांच्या इतिहासात क्वचित घडणारा सुवर्णक्षण आहे. भारताची आताची स्थिती हा त्या दोघांच्या कृतीने त्यावेळी बनवलेल्या पायावर उभी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
अ
अभिजीत अवलिया Tue, 11/15/2016 - 18:06 नवीन
वरील प्रतिसादासाठी +१. जिथे काम करतो त्या कंपनीतल्या सहकारी पण 'अंध भक्तांना (सर्व पक्षीय) ' हे सांगितले की काहीही विचार न करता अंगावर येतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
प
पुष्कर जोशी Sun, 12/04/2016 - 20:31 नवीन
नरसिंहराव हे गुप्त संघस्वयंसेवक होते .. व त्यांना संघाने काॅग्रेस मधे घुसवले होते असे वाटते ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
स
संदीप डांगे Sun, 12/04/2016 - 20:47 नवीन
कोण्या जेम्स लेनच्या पुस्तकात तुम्ही हि कुजबुज वाचली... ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्कर जोशी
अ
अनुप ढेरे Mon, 12/05/2016 - 07:46 नवीन
शब्दशः नाही पण राव हे संघाचे पहिले पंतप्रधान असं गंमतीनी म्हणतात. ते लुंगीच्या आत खाकी चड्डी घालतात अशी थट्टा होत असे म्ह्णे. काँग्रेस आणि गांधी घराणं त्यांचा द्वेष करण्यामागे हे एक कारण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
सौन्दर्य Tue, 11/15/2016 - 15:06 नवीन
काळा पैसा संपविण्यासाठी सरकारने उचलेले हे पाउल अगदी स्तुत्य आहे. पण असेच पाउल १९७८ साली १००० च्या नोटा चलनातून बाद करून उचलले होते मग तरी देखील आजपर्यंत भ्रष्टाचार कसा टिकून राहिला ? माझ्या मते जोपर्यंत १०० रुपयांवरील सर्व व्यवहार चेकने किंवा क्रेडीट/डेबिट कार्डने करणे बंधनकारक होत नाही तोपर्यंत भ्रष्टाचार चालूच राहील, जरी कमी झाला तरी. पण पूर्ण भारत म्हणजे फक्त मोठी मोठी शहरे नव्हेत, आजही वीज, पाणी, रस्ते, इंटरनेट, दळणवळणाची साधने नसलेली अनेक गावे भारतात आहेत. जेथे ह्या मुलभूत सुविधा नसतील तेथे डेबिट/क्रेडीट कार्ड कसे वापरणार ? जेथे अजूनही निरीक्षरता आहे तेथे चेकचे व्यवहार कसे होणार ? समजा एखाद्या गावातल्या माणसाला त्याच्या बैलगाडीचे चाक दुरुस्त करायचे असेल तर तो गावातल्याच किंवा तालुक्यातील लोहाराकडे जातो, तेथे रोखीने पैसे देऊन(किंवा उधार ठेऊन) तो आपले काम करून घेतो. जर काहीही कारणाने त्या माणसाकडे भ्रष्टाचाराने गोळा केलेला पैसा असेल तर असा माणूस ते पैसे निर्धोकपणे वापरू शकतो. त्यामुळे भ्रष्टाचार कमी झाला तरी तो चालूच राहणार ह्यात शंका नाही. थोडक्यात, रोखीने पैशाचे व्यवहार चालूच राहिले तर आवाक्यात आलेला भ्रष्टाचार थांबणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्षी
स
संजय पाटिल Tue, 11/15/2016 - 13:13 नवीन
भ्रष्टाचार करण्यासाठी दोन बाजू आवश्यक असतात. देणारा व घेणारा. तुम्ही तुमच्या बाजूने बंद करा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
स
संदीप डांगे Tue, 11/15/2016 - 13:19 नवीन
'तुमच्या'??? ओ मकले, कोणत्या बाजूला असता बावा तुमी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय पाटिल
म
मराठी कथालेखक Tue, 11/15/2016 - 13:28 नवीन
मी का ? अं ....जिकडून पैसे मिळतील तिकडे जायला तयार आहोत आपण :) विनोद बाजूला ठेवून.. हो काही वेळा भ्र्ष्टाचारात माझाही सहभाग असतो. जसे हॉटेलवर रहाताना जर टॅक्स मुळे ३००-४०० रुपये (प्रतिदिन भाड्यात) जास्त जाणार असतील तर रोखीने पैसे देवून मी ही पैसे वाचवलेले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Tue, 11/15/2016 - 13:32 नवीन
श्या, तिकडे सैनिक सीमेवर उभे असताना तुम्ही हाटेलात का राहता, रस्त्यावर उभं राहायचं, सगळेच पैसे वाचतील, आणि ब्रष्टाचार न केल्याने देशभक्तीही होईल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
म
मराठी कथालेखक Tue, 11/15/2016 - 15:00 नवीन
असं नसतं हो... सर्व काही करायचं आणि नंतर फेसबूकवर/व्हाटस अप्वर सैनिकांबद्दल कळवळा असणारे संदेश प्रसारित करायचे म्हणजे झाली देशभक्ती !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
सुबोध खरे Tue, 11/15/2016 - 16:00 नवीन
मकले आणि डांगे अण्णा प्रत्येक वेळेस सैनिकाला/ लष्कराला या वादात ओढायचे कारण काय? कोणताही प्रामाणिकपणे काम करणारा भारतीय हा काय कमी देशभक्त आहे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
स
संदीप डांगे Tue, 11/15/2016 - 17:39 नवीन
हा हा, हे तुम्ही मला म्हणताय? अगदी हेच जिथे तिथे सैनिकांचे दाखले देणाऱ्यांना बोला डॉक्टर साहेब! माझा प्रतिसाद उपरोधिक आहे अशाच लोकांसाठी, लोकांनी जरा म्हटले त्रास होतो की हे भक्त लोक लगेच सैनिकवाला मुद्दा काढत आहेत, हवे असेल तर जरा चेपुवर चक्कर मारून या,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
मराठी कथालेखक Wed, 11/16/2016 - 08:39 नवीन
मी पण उपरोधानेच बोललो. खूप लोकांचे असे पोस्ट्स वाचलेत 'सीमेवर सैनिक लढत आहेत, तुम्हाला काही वेळ रांगेत उभे रहायला काय त्रास' वगैरे.. उबग आला असल्या पोस्ट्सचा. फेसबूकवर मी एक वयस्कर गृहस्थ माझ्या फ्रेंडलिस्ट मध्ये होते. [हे माझ्या एका सरांचे मित्र. माझे सर आणि हे गृहस्थ दोघेही अनेकविध विषयांवर आपली मते फेसबूकवर टाकत असत/असतात. दोघांचीही फ्रेंड/फॉलोअर लिस्ट प्रचंड मोठी. माझे सर काही काळापुर्वि निर्वतलेत.] तर या गृहस्थांनी अशीच काहीतरी पोस्ट टाकली. त्यावर कुणा एकाने 'सैनिकांना त्यांच्या कामाचा मोठा पगार मिळतो' अशा अर्थाची काहीशी प्रतिक्रिया दिली. मी त्या प्रतिक्रियेला 'लाईक' दिले , तसेच 'अशी तुलना गरजेची नव्हती' अशी प्रतिक्रिया मूळ पोस्टवर दिली. या गृहस्थांनी पाच मिनटातच त्या दुसर्‍या व्यक्तिला आणि मला 'अनफ्रेंड' केले !! डॉक्टरसाहेब तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आपले काम प्रामाणिकपणे , चोखपणे करणारा कुणीही व्यक्ती सैनिकच आहे. मग तो शाळेत मन लावून शिकवणारा शिक्षक असेल, गटारात उतरणारा सफाई कामगार असो की कोणतीही किळस न बाळगता रुग्णसेवा, त्यांची स्वच्छता करणारे नर्स/मामा/मावशी असतील..अशा अनेकांना ना जास्त पगार मिळतो ना समाजात चांगला मान...गटारात विषारी वायूमुळे गुदमरुन मेलेल्या कामगारास कुणी हुतात्माही म्हणत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
म
मृत्युन्जय Mon, 11/14/2016 - 10:06 नवीन
भ्रष्टाचार नाहिच थांबायचा हो. पुर्वी लोक १००० च्या नोटेत साचवायचे आता २००० च्या नोटेत साचवतील इतकेच. लाच पुर्वीही खात होते. आताही खातील (आता नव्या नोटा मागतील इतकेच). पण २ गोष्ती नक्की साध्य होतीलः १. सध्याचा बराच काळा पैसा सर्क्युलेशन मधुन बाहेर जाइल (अथवा येइल) २. खोट्ञा नोटा सर्क्युलेशन बाहेर जातील (यामुळे दहशतवादी कारवायांना आणि देशविघातक वृत्तींना (काही काळ) चाप बसेल. भ्रष्टाचारमुक्त भारतासाठी अजुन बराच वेळ जाइल. मोदींच्या पिढीच्या हयातीत शक्य होइल असे वाटत नाही (माझ्या पिढीच्या हयातीत तरी होइल की नाही कुणास ठाउक). तुम्हाला खरेच असे वाटते का की या सगळ्या खटाटोपाचा उद्देश भ्रष्टाचारावर मात करणे हा आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
म
मराठी कथालेखक Mon, 11/14/2016 - 11:01 नवीन
तुमचे दोन्ही मुद्दे मान्य. खोट्या नोटांचा प्रश्न बराच काळासाठी निकालात निघेल हे तर आहेच. शिवाय काही काळ बाजारातला काळा पैसा कमी झाल्याने महागाई कमी होईल. खास करुन स्थावर मालमत्तांचे भाव कमी होवू शकतील असे वाटते. पण यापुढे भ्रष्टाचार होणार नाही किंवा त्याचे प्रमाण खूप कमी होईल असे मानणे भाबडेपणाचे वाटते. समजा एक भ्रष्ट अधिकारी आहे. त्याचे 'वरचे' मासिक उत्पन्न सुमारे दोन लाख रुपये महिना आहे. त्याने घरात सुमारे सात-आठ लाख साठवले होते. नोटा रद्द झाल्याने त्याला समजा त्याने काही मार्गाने काही नोटा बदलून घेतल्या आणि पैसा वाचवला असे मानू. पण तरी त्याचे तीन-चार लाखांचे नुकसान झाले तर पुढच्या महिन्यात तो काय विचार करेल ? "नको मला तो काळा पैसा, नको ती लाच वगैरे" की "xxx बरंच नुकसान झालं की ..हे नुकसान भरुन काढायला आता 'रेट' वाढवायला हवा ..."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
मृत्युन्जय Mon, 11/14/2016 - 14:03 नवीन
भ्रष्टाचार नाहिच हो कमी होणार भ्रष्ट अधिकारी आता १०० आणि २००० च्या नोटांमध्ये पैसे खातील. आजच कुणलातरी २००० च्या नोटांंअध्ये लाच घेताना पकडले. हे चक्र चालुच राहणार. एकदा हा स्ट्राइक करुन मग दर काही काळाने नविन उपाययोजना आणुन या सर्व प्रकाराला आळा घालणे एवढेच काम सरकार करु शकते. तुर्तास जे उद्देश साध्य झाले आहेत ते महत्वाचे आहेत. या आणी अश्या उपायांनीच भ्रष्टाचार हळु हळु कमी होइल. उद्या सकाळी भार भ्रष्टाचारमुक्त झाला असेल असे मानणे भाबडेपणाचे ठरेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
म
मराठी कथालेखक Mon, 11/14/2016 - 14:34 नवीन
बरोबर आहे. मुळात 'सामान्य' माणसाला भ्रष्टाचार नको आहे हे गृहितक तरी खरं आहे का ? किंबहूना भ्रष्टाचारी आणि सामान्य माणूस असं वर्गीकरण तरी कितपत योग्य आहे ? मला वाटतं आपल्या सोयीचा असलेला भ्रष्टाचार अनेकांना हवा आहे. तुम्ही रस्त्यानं आपल्या वाहनानं चालला आहात आणि एखादा नियम मोडलात आणि पकडले गेलात तर समोरच्या पोलिसाने नियमाप्रमाणे दंड न घेता कमी पैशात तडजोड करावी हीच तुमची (म्हणजे अनेकांची ) अपेक्षा असते ना ? मी पुर्वि जिथे रहात होतो तिथून जवळच एक कमी उत्पन्न गटासाठीची जूनी वसाहत होती. या लोकांना सरकारी योजनेतून स्वस्तात घरे मिळाली. पूढे अनेकांनी समोरच्या रस्त्यावरील जागेत अतिक्रमण केलेत. आता एखादा प्रामाणिक , कर्तव्यदक्ष महापालिका आयुक्त येवून त्याने ही सगळी अतिक्रमणं पाडलीत तर या 'सामान्य' लोकांना आवडणार/चालणार आहे का ? मीटर न टाकणारा रिक्षावालाही सामान्यच असतो ना ? त्याला कर्तव्यदक्ष अंमलबजावणी अधिकारी आलेला आवडेल का ? छोटे मोठे दुकानदार उत्पन्नाचे कर प्रामाणिकपणे भरतात का ? शहराच्या थोडं बाहेर गेलं की अनेक 'सामान्य' दुकानदार शीतपेय छापील किमतीपेक्षा दोन-तीन रुपये जास्त घेवून विकताना दिसतील. हा देखील भ्रष्टाचारच ना ? आतादेखील अनेक 'सरळमार्गी सामान्य' लोक (म्हणजे पर्याय नसल्याने मारुन मुटकून टॅक्स भरणारे-खरं तर तो आधीच कापला जातो म्हणा) आपल्या 'काळे पैसे' बाळगणार्‍या नातेवाईक वा मित्रांना 'दोन लाख आपल्या खात्यात' भरुन देत आहेत वा त्या विचारात आहेत. अनेक उदाहरणं सापडतील. भारत भ्रष्टाचार मुक्त तेव्हाच होईल जेव्हा 'मी भ्रष्टाचार करणार नाही वा भ्रष्टाचारास कोणत्याही प्रकारे पाठीशी घालणार नाही' अशी मनोवृत्ति असणारे लोक भ्रष्टाचार करु पहाणार्‍यांपेक्षा संख्येने खूप जास्त आणि सर्व वर्गात असतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
न
नितिन थत्ते Mon, 11/14/2016 - 17:05 नवीन
>>मुळात 'सामान्य' माणसाला भ्रष्टाचार नको आहे हे गृहितक तरी खरं आहे का ? >>किंबहूना भ्रष्टाचारी आणि सामान्य माणूस असं वर्गीकरण तरी कितपत योग्य आहे ? >>मला वाटतं आपल्या सोयीचा असलेला भ्रष्टाचार अनेकांना हवा आहे. सहमत आहे. >>छोटे मोठे दुकानदार उत्पन्नाचे कर प्रामाणिकपणे भरतात का ? सामान्य माणसं अजाणतेपणे(?) त्यांना हे करायला उद्युक्त करतात किंवा त्यात साथ देतात. समजा एकाद्या दुकानातून पाचशे रुपयांची खरेदी केली. त्यावर बिल द्या असे म्हटल्यावर तो व्यापारी म्हणतो,"बिल हवे असेल तर १३ टक्के टॅक्स पडेल. ५६५ रुपये लागतील". त्यावर हा सामान्य माणूस क्षणाचाही विलंब न लावता बिल नसले तरी चालेल असे सांगेल. (म्हणाजे ज्या वस्तूत वॉरंटी वगैरे भानगड नसेल अशा वस्तूच्या बाबतीत).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
प
पक्षी Tue, 11/15/2016 - 09:04 नवीन
We can say that we have won the BATTLE, but not the WAR War is still going on or may be will continue forever.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
व
वगिश Tue, 11/15/2016 - 04:01 नवीन
आपण ईतर प्रगत राष्ट्रांप्रमाने रोखी मुक्त व्यवहार करण्याकडे वाटचाल करीत आहोत. अतिशय नगण्य भ्रष्टाचार हा त्याचा एक फायदा ( अनेक पैकी) फायदा आहे. 2000 ची नोट तात्पुरती व्यवस्था आहे. http://blogs.timesofindia.indiatimes.com/voices/demonetisation-issue-an-open-letter-to-delhi-cm-arvind-kejriwal/?utm_source=facebook.com&utm_medium=referral&utm_campaign=TOI
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 11/14/2016 - 11:04 नवीन
ही व पुढच्या पायर्‍या यशस्वी होऊन भ्रष्टाचारमुक्त झालेला भारत पहायला मिळण्यासारखा दुसरा आनंद नसेल ! या तुम्ही उधृत केलेल्या वाक्यातील ही व पुढच्या पायर्‍या हे शब्द तुमच्या नजरेतून अनवधानाने निसटले, की अवधानाने दुर्लक्षित केले गेले, हे ठरवण्याची जबाबदारी तुमच्यावर टाकत आहे :) ;) "काळे धन, भ्रष्टाचारी लोक व अतिरेक्यांनी बनवलेलया खोट्या पैश्याविरुद्ध काहीही न करता हातावर हात ठेऊन बसले आहे आणि जनतेला त्या दलदलीला सतत सहन करणे भाग पाडले आहे", अश्या सरकारचे तुम्ही अभिनंदन कराल असे तुमच्या लेखनातून व्यक्त होत आहे ! तेव्हा शुभेच्छा !! छान छान ...चला भ्रष्टाचारमुक्त भारताचं 'स्वप्न' रंगवूयात !! आता थोडी सर्वमान्य व्यावहारीक माहिती... १. व्यवस्थापनाचा महत्वाचा नियम... "जगावेगळे उत्तम यश मिळविण्यासाठी प्रथम जगावेगळी उत्तम स्वप्ने पाहणे जरूर असते... आणि ध्येय माहीत असेल तरच ते सत्यात आणण्यासाठी रननीति बनवणे शक्य होते. खुजे ध्येय केवळ सामान्यत्वाकडेच नेऊ शकते आणि कोठे जायचे हेच माहीत नसले की दिशाविहीन भरकटणे नशिबी येते." २. Henry David Thoreau : If you have built castles in the air, your work need not be lost; that is where they should be. Now put the foundations under them. ३. विकसित देशांतील विकास व सुस्थिती आकाशातून पडलेली नाही, किंवा कोणत्या हरीने खाटल्यावर बसलेल्या जनतेला दिलेली भेटही नाही. तो, तेथिल सरकारचे काही वर्षांचे प्रयत्न आणि जनतेचे सहकार्य, यांच्या एकत्रित परिणाम आहे. ================ महत्वाची सूचना : भारताला विकसित देश करण्यासाठी तुमच्याकडे काही विशेष कार्यक्रम असल्यास तो सांगण्यासाठी पंतप्रधानांनी संस्थळाची खास व्यवस्था निर्माण केलेली आहे. त्यावर केलेली सुचना पसंत पडली तर त्याबद्दल स्वतः माहिती घेण्यासाठी पंतप्रधान वेळ देतात असा इतिहास आहे. या संधीचा जरूर फायदा घ्या व आपल्या देशाची प्रगती करण्यासाठी हातभार लावा. त्याचा सर्व भारतियांना फायदाच होईल... त्यात तुम्ही-आम्ही आणि आपल्या पुढच्या पिढ्यांनाही फायदा होईल. बघा पटते का.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
म
मराठी कथालेखक Mon, 11/14/2016 - 11:28 नवीन
त्या पुढच्या पायर्‍या काय आहेत ते ही तुम्ही सांगा, माझ्यामते पुढच्या पायर्‍या म्हणजे जमा झालेल्या धनावर टॅक्स, पेनल्टी वसूल करणे. यामुळे बाजारातला काळा पैसा कमी होईल हे निश्चित (दुसर्‍या एका प्रतिक्रियेत मी ते मान्य केले आहेच). पण यापुढे भ्रष्टाचार होणार नाही ते कसे ? बाकी इकडचे तिकडचे quotes टाकण्यापेक्षा तुम्ही जे म्हणताय ते म्हणजे 'भ्रष्टाचारमुक्त भारत' हे 'नेमके कसे साध्य होणार' ते सांगितलेत तर बरे होईल.
भारताला विकसित देश करण्यासाठी तुमच्याकडे काही विशेष कार्यक्रम असल्यास तो सांगण्यासाठी पंतप्रधानांनी संस्थळाची खास व्यवस्था निर्माण केलेली आहे
माझ्याकडे असा काही कार्यक्रम नाहीये हो. मी एक सामान्य बुद्धीचा नोकरदार माणूस आहे आहे. महत्वाची सूचना : बाकी मी नेमके प्रश्न विचारले होते , नेमकी उत्तर देता येत आलीत तरे बरे होईल. अन्यथा चालू देत तुमचं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ग
गंम्बा Mon, 11/14/2016 - 11:33 नवीन
'भ्रष्टाचारमुक्त भारत' हे 'नेमके कसे साध्य होणार' ते सांगितलेत तर बरे होईल.
आधी जमा झालेला काळा पैसा चलनातुन फेकुन देणे आणि ह्यापुढे काळा पैसा निर्माण होणार नाही हे बघणे ह्या दोन पूर्णपणे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्या म्युचुअली एस्च्क्लुझीव्ह सुद्धा आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
म
मराठी कथालेखक Mon, 11/14/2016 - 11:53 नवीन
मी ही तेच म्हणतोय. पण मूळ लेखात 'भ्रष्टाचारमूक्त भारत' चा उल्लेख असल्याने माझी ही प्रतिक्रिया होती. आपण दोघे एकच मुद्दा मांडत आहोत :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंम्बा
ब
बोका-ए-आझम Mon, 11/14/2016 - 15:38 नवीन
हे समजलं नाही. म्हणजे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंम्बा
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 11/14/2016 - 12:12 नवीन
तुमच्या महत्वाच्या सूचनेप्रमाणे तुमच्या प्रतिसादाची नेमकी उत्तरे खालीलप्रमाणे आहेत... १. माझा वरचा प्रतिसाद, तुमच्या... छान छान ...चला भ्रष्टाचारमुक्त भारताचं 'स्वप्न' रंगवूयात !! या नेमक्या वाक्याने संपलेल्या प्रतिप्रतिसादाचे, तुम्हाला सोईचे वाटले नसले तरीही, अगदी नेमकेच उत्तर होते. :) २. भ्रष्टाचारमुक्त भारत' हे 'नेमके कसे साध्य होणार' ते सांगितलेत तर बरे होईल. ७० वर्षांचा भ्रष्टाचार एका कारवाईत आणि एका रात्रीत संपवता येणार नाही हे सर्वसामान्य जनतेला माहीत आहे व पटले आहे असे माध्यमांतल्या त्यांच्या प्रतिक्रियांवरून दिसत आहे. हे मलाही पटले आहे. तुम्हालाही पटायला हरकत नसावी, असे वाटते. "आजच पुढच्या सगळ्या पायर्‍या सांगून सावध करून, (अ) त्यांच्याबद्दल काही प्रतिबंधक कारवाई करण्याची भ्रष्टाचार्‍यांना आणि अतिरेक्यांना संधी देण्याइतके हे सरकार बुळे नाही किंवा (आ) भ्रष्टाचार्‍यांची पाठराखण करणार्‍या वृत्तीचे नाही", असे त्याच्या आतापर्यतच्या कारवायांवरून दिसत आहे... हे देशासाठी चांगलेच आहे. याबाबतीत गेल्या दोन वर्षांत अनेक छोट्यमोठ्या पायाभूत कारवाया झाल्या आहेत व त्या माध्यमांत प्रसिद्ध झाल्या आहेत. अजून काही महत्वाच्या कारवाया भविष्यात चालू राहणार आहेत असे पंतप्रधानांनी स्वतः सार्वजनिक सभेत सांगीतले आहे. तेव्हा "भ्रष्टाचार्‍यांच्या आणि अतिरेक्यांच्या विरुद्धच्या सरकारच्या कारवायांना उघड करा (पक्षी : भ्रष्टाचार्‍यांना आगावू माहिती देवून मदत करा)" असा दुराग्रह न करता, त्या कारवाया जश्या उलगडत जातील तश्या, एक सजग नागरीक म्हणून सहकार्य करणे हेच आपल्या सर्वांच्या फायद्याचे आहे. ३. माझ्याकडे असा काही कार्यक्रम नाहीये हो. मी एक सामान्य बुद्धीचा नोकरदार माणूस आहे आहे. असे तुम्हीच म्हणत आहात. अशा अवस्थेत निदान कधी नाही ते एखादे सरकार भ्रष्टाचाराविरुद्ध काही कारवाई करत आहे त्याबद्दल समाधान ठेवून त्याच्या प्रत्येक पायरीवर सरकारला सहकार्य करावे हे उत्तम असे मला वाटते. गेली ७० वर्षे भ्रष्टाचाराची सतत वाढ होत असताना त्याविरुद्ध काही दीर्घकालीन ठोस उपाय झाले नाही, त्यापेक्षा हे बरे नाही का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
म
मराठी कथालेखक Mon, 11/14/2016 - 11:38 नवीन
"काळे धन, भ्रष्टाचारी लोक व अतिरेक्यांनी बनवलेलया खोट्या पैश्याविरुद्ध काहीही न करता हातावर हात ठेऊन बसले आहे आणि जनतेला त्या दलदलीला सतत सहन करणे भाग पाडले आहे", अश्या सरकारचे तुम्ही अभिनंदन कराल असे तुमच्या लेखनातून व्यक्त होत आहे ! तेव्हा शुभेच्छा !!
मी नं व्यक्त केलेलं काहीही तुम्ही माझ्या नावावर खपवू पहात आहात. हा शुद्ध फालतूपणा झाला. मुळात मी माझ्या प्रतिक्रियेत १) नोटा रद्द करण्याच्या निर्णायास विरोध केलेला नाही २) नोटा रद्द करण्याने बनावट नोटांचा बंदोबस्त झाल्याचे अमान्य केलेले नाही ३) तसेच बाजारातील काळा पैसा कमी होईल हे देखील मी अमान्य केले नव्ह्ते. (आणि दुसर्‍या एका प्रतिक्रियेत तर अगदी स्पष्टपणे मान्य केले होते). पण तरीही तुम्ही नको तो अर्थ काढत असाल तर याला 'खोडसाळपणा' हाच एक शब्द आहे. माझा मुद्दा एकच आहे. नोटा रद्द करण्याने वरील दोन फायदे मान्य असले तरी 'यापुढे भ्रष्टाचार होणार नाही किंवा झाल तरी फार कमी असेल' असे मला वाटत नाही. यावर मुद्देसूद प्रतिवाद केल्यास बरे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा