Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ऑपरेशन नोटा-रद्द आणि नोटा-बदल

ड
डॉ सुहास म्हात्रे
Sun, 11/13/2016 - 22:52
🗣 637 प्रतिसाद
नुकत्याच सरकारने अतिरेकी व काळाबाजारी लोकांवर अचानक ५०० व १००० रुपयांच्या नोटा रद्द करून एक प्रकारे "सर्जिकल स्ट्राईक" केला. या प्रकल्पाची मुख्य वैशिष्ठ्ये अशी : १. राष्ट्रीय महत्व : याचा भारताच्या अर्थकारणावर पडणारा प्रभाव सांगायला नकोच. २. प्रचंड आवाका : भारतासारख्या क्षेत्रफळाने आवाढव्य, भौगोलिक परिस्थिती व विकासाच्या अभावामुळे अनेक भाग असलेला व १२५ कोटी लोकसंख्या असलेल्या राष्ट्रातला प्रत्येक नागरीक प्रभावित होईल असा प्रकल्प. रद्द केलेल्या चलनी नोटा या सगळ्यांकडून परत घेऊन त्यांना नवीन नोटा देणे अत्यंत जिकरीचे काम आहे. ३. गुप्तता : सहा महिन्यांच्या तयारीच्या काळात व पंतप्रधान कारवाई जाहीर करेपर्यंत गुप्तता पाळणे हा या प्रकल्पाचा जीव होता. या एका मुद्द्यावर सर्व कारवाईचे मुख्य यशापयश अवलंबून होते. वरच्या दोन क्रमांकांच्या मुद्द्यात आलेल्या विवरणावरून + गेल्या ७० वर्षांत सरकारप्रणाल्यांमध्ये निर्माण झालेल्या हितसंबंधांच्या पार्श्वभूमीवर गुप्तता पाळणे हे काम किती कठीण होते हे सांगायला नकोच. माध्यमांत असलेल्या बातम्यांप्रमाणे या कारवाईच्या प्रकल्पाची काही रुपरेखा आता हळूहळू बाहेर येत आहे. त्याबद्दल मला समजलेले व भावलेले काही, थोडक्यात... काळापैसेवाल्यांना व अतिरेकी जाळ्याला या कारवाईचा वासही येऊ नये यासाठी बँकाच काय या कारवाईचा आराखडा फक्त निवडक मंत्री आणि आरबीआयचे अत्युच्च अधिकारी यांनाच माहीत होता.इतर कॅबिनेट मंत्र्यांनाही ही माहिती ऐन वेळेला दिली गेली, त्या मिटींगमला मोबाईल न आणण्याची सूचना होती. त्यांनतर मोदी राष्ट्रपतींना भेटून नंतर त्यांचे टीव्हीवरचे भाषण संपेपर्यंत सर्व मंत्री मिटिंग रूम मध्ये बसून होते. त्यानंतर वित्त मंत्रालय व आरबीआयची कारवाई सुरू झाली. बँकांना सर्व प्रकल्प समाजावून देण्यासाठी व बँकात नवीन २००० च्या नोटा व साथीला १०० च्या नोटा पोचविण्यासाठी ९ तारखेलाला बँका बंद ठेवणे आवश्यक होते. या नोटा अगोदर पाठविल्याने कारवाईची बातमी फुटली असती. तसेच, बातमी गुप्त ठेवण्यासाठी रु २०००च्या नवीन नोटांसाठी एटीएम मशीन्स ८ नोव्हेंबरच्या आधी कॅलिब्रेट करणे शक्य नव्हते. बातमी थोडीही बाहेर फुटली असती तर कारवाईमधली सगळी नाही तरी बरीचशी हवा निघून गेली असती... मुख्य म्हणजे बदमाषांनी आपला काळा पैसा इतरत्र गुंतवून अथवा अननुभवी सामान्य गरिबांच्या माथी मारून सरकारचे काम फार कठीण केले असते. त्याचसाठी पंतप्रधानांची घोषणा रात्री आठच्या सुमाराला आणि कारवाई सुरु होण्याची वेळ रात्री १२ वाजता ठेवली गेली. या चार तासात बँका बंद असल्याने बातमी कळली तरी काहीच फायदा नव्हता. बँकाचे लॉकर्सही पुढचा एक दिवस तरी उघडता येणे शक्य नव्हते. मला वाटते, या कारवाईतला हा शेवटचा घाव वर्मी बसणारा होता. केवळ आरबीआयच्या परिपत्रकाने अश्या गोष्टी सामान्य लोकांपर्यंत पोचत नाही आणि असे पत्रक सरळपणे न समजेल अश्या शासकीय व कायदेशीर भाषेत असते. वित्तमंत्रालयाच्या, आरबीआयच्या व करविभागाच्या अश्या परिपत्रकांबद्दल सीए सुद्धा संभ्रमात असतात व निर्णय देण्यापूर्वी बाबूलोकांच्या विश्लेषणाची वाट पहातात, हे आपण नेहमी पाहतोच. स्वतः पंतप्रधानांनी आदल्या रात्री टीव्हीवर बातमी सांगून लोकांमध्ये शक्य असलेले अफवांचे पीक टाळले. मला वाटते पूर्वीच्या अश्या प्रकारच्या कारवायांत टाळलेली आणि आता आवर्जून पंतप्रधानांकरवी सर्व जनतेला संबोधून माहिती देणारी ही पायरी "मास कम्युनिकेशन"ची नाडी पक्की माहीत असल्याचे लक्षण आहे. कारवाईचा त्रास होऊनही व काही नेत्यांची उसकवणारी वक्तव्ये येवूनही लोकक्षोभ न होण्याचे हे महत्वाचे कारण आहे, असे मला वाटते. इतर काही असले तरी, इतकी बंधने असलेली, इतक्या थोड्या वेळेत करायची, एवढी मोठी कारवाई भारतासारख्या आवाढव्य देशात करण्यात अपेक्षित होता त्यापेक्षा कमी गोंधळात आणि सामान्य लोकांच्या उत्तम सहकार्याने काम चालू आहे असे माध्यमांतील बातम्यांवरून दिसते आहे. असा प्रकल्प पूर्णपणे आलबेल प्रकारे होईल हे अपेक्षित नव्हतेच. ज्यांना मोठ्या प्रकल्पांची थोडीबहुतही माहिती आहे त्यांना तसा विचार शेखचिल्लीचे स्वप्न वाटेल. यासंदर्भात, सार्वत्रिक निवडणूकीच्या वेळेस किती आठवडे/महिने तयारी केली जाते व त्यानंतरही ती निवडणूक अनेक विभागांत, दीडदोन महिन्यांच्या कालावधीत घेतली जाते, याची आठवण उपयोगी ठरेल. मुख्य म्हणजे विरोधी पक्षांनी या देशाच्या फायद्याच्या कारवाईत मदत तर केली नाहीच. पण, सुरुवातीच्या एकदोन दिवसांत, बसलेल्या धक्क्यात काय करावे हे न कळल्याने, पहिल्यांदा सरकारचे हे पाऊल बरोबर आहे असे म्हणून टाकले आणि नंतर "पण-परंतू" असे बोलत दिशाभूल करणार्‍या गोष्टी सुरू झाल्या आहेत. काहीजण लोकभावना भडकाव्या अशीच वक्तव्ये आणि कारवाया करत आहेत. काही जण तर ही पूर्ण कारवाईच मागे घ्या असे म्हणत आहेत ! हे अपेक्षित आहेच म्हणा. सरकारने यालाही तोंड देण्याची तयारी ठेवायला हवी, ठेवली असेलच. सर्वसामान्य लोक मात्र त्या वक्तव्यांनी फारसे प्रभावित न होण्याइतके प्रगल्भ झालेले पाहून एक भारतिय म्हणून आनंद व अभिमान वाटला. हा तर एका टेकडीचा टप्पा आहे, भारत पुरेसा भ्रष्टाचारमुक्त करायला अख्खा पर्वत चढून जायला लागेल. त्या वाटेत अनेक समस्या येतील, एखादी कारवाई फसेलही. कारण ७० वर्षांत काळ्या पैशाने गडगंज झालेले लोक ना निर्बुद्ध आहेत, ना ते तो पैसा सहजासहजी सोडतील. सरकारच्या कारवाया अयशस्वी व्हाव्या यासाठी ते त्यांची सर्व हुशारी व नवे-जुने हितसंबंध वापरून सर्व भले-बुरे (मुख्यतः बुरेच) मार्ग चोखाळतील, यात शंका नाही. काही सरकारी अधिकारी आणि सत्ताधारी व गटबंधनातल्या पार्टीतल्या लोकांचे अंतर्गत हितसंबंधही गुंतलेले असतील. तो गुंताही सोडवावा लागेल. अनेक अपेक्षित आणि अनपेक्षित घटनांना सामोरे जायची तयारी ठेवावी लागेल. अशी तयारी आहे असेच संकेत सद्या तरी दिसत आहेत. आतापर्यंत या कारवाईतल्या दोन तृटी बाहेर आल्या आहेत. पहिली म्हणजे रु२००० च्या नोटेवर हिंदीत "दोन हजार रुपया" असे छापलेले आहे. दुसरे म्हणजे नोटांचा रंग पाण्यात विरघळतो व फिकट होतो आहे अश्या बातम्या आहेत. मोठ्या प्रमाणात सामग्रीची जुळवाजुळव करत असतानाच गुप्तता आणि घाई पाळायला लागयामुळे याप्रकारे नोटांची प्रत कमी होणे झाले असावे. मात्र जोपर्यंत भारत सरकार त्या नोटांना "लीगल टेंडर" मानते आहे तोपर्यंत ते केवळ "टेक्निकल एरर" असतील व त्यांचा नागरिकांवर त्याचा प्रभाव पडणार नाही. आताचा गडबड गोंधळ ताब्यात आल्यावर मात्र याबाबत पावले उचलणे अत्यावश्यक ठरेल. त्यासंबंधी एखादा प्रकल्प आरबीआय आत्ताच तयार करत नसल्यास आश्चर्य वाटेल. माझ्या अंदाजाप्रमाणे ५०० व १००० च्या पुरेश्या नोटा चलनात आल्यावर या नोटांना बँकिंग व्यवहारातून हळू हळू काढून / बदलून टाकण्याची कारवाई होईल. कारण, पहिल्यापेक्षा जास्त किंमतीच्या (पक्षी : ५०० व १००० ऐवजी २०००च्या) नोटा कारवाई गुप्त ठेवण्यासाठी व तसे करताना कारवाईचा सुरुवातीचा भार (कागद, शाई, छपाई, साठवण, वाहतूक, वितरण, इ) अर्धा करण्यासाठीच वितरीत केल्या जात आहेत. परंतु, या कारवाईसंबंधीच्या जनतेच्या प्रतिसादाने अंतीम यशाच्या आशा उंचावल्या आहेत. कारण, काळ्या पैश्याच्या निर्मुलनातली हीच एक पायरी आहे की जिच्याशी सामान्य जनतेचा तडक संबध येतो व त्याला त्रास होतो. इतर पायर्‍यांत सामान्य जनतेला फारसा त्रास असण्याची शक्यता फार कमी आहे. ही व पुढच्या पायर्‍या यशस्वी होऊन भ्रष्टाचारमुक्त झालेला भारत पहायला मिळण्यासारखा दुसरा आनंद नसेल !
वर्गीकरण
अर्थकारण
राजकारण
देशकारण

प्रतिक्रिया द्या
133576 वाचन

💬 प्रतिसाद (637)
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 11/30/2016 - 11:14 नवीन
म्हणजे कार्ड नसल्याने दुसरीकडे जातो म्हटल्यावर त्यांनी लपवलेले मशीन बाहेर काढले की दुसरीकडे कोठे कार्ड असलेल्या दुकानात खरेदी केलीत ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
च
चौकटराजा Wed, 11/30/2016 - 12:16 नवीन
पहिली शक्यता भन्नाट आहे पण हाय ! दुसरी खरी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 11/30/2016 - 11:19 नवीन
Modi asks BJP MPs, MLAs to submit bank transaction details to Amit Shah हे धाडसी पाऊल उचलणारा दुसरा कोणता नेता भारतीय राजकारणात झालेला नाही. इतर देशांतही असे कधी झाले असे ऐकले-वाचलेले नाही ! पंतप्रधान मोदींनी भाजपच्या सर्व केंद्रस्तरीय व राज्यस्तरीय निर्वाचीत सदस्यांना त्यांच्या ०८ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या कालखंडातले बँक ट्रांझॅक्शन्सचे तपशील पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्याकडे देण्याचे आदेश दिले आहेत. मोदींच्या भ्रष्टाचारविरोधी कारवायांच्या प्रामाणिक हेतूंवर आता तरी विश्वास ठेवायला हरकत नाही. जमल्यास इतर सर्व पक्षांच्या नेत्यांनीही अशीच कारवाई करून "भष्टाचाराला आमचाही विरोधच आहे" या त्यांच्या दाव्याला सक्रिय पुष्टी द्यायला हवी.
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Wed, 11/30/2016 - 19:58 नवीन
हो पण काही पोटदुखे म्हणत आहेत की "भाजपचे खासदार सर्व आर्थिक व्यवहार बँकेमार्फत करायला दुधखुळे थोडीच आहेत?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
स
सुबोध खरे गुरुवार, 12/01/2016 - 16:26 नवीन
खटपट्या शेट मोदी साहेबानी खासदारांना आपले हिशेब सादर करायला कशासाठी सांगीतले आहे याचे मला वाटणारे विश्लेषण असे आहे. जे खासदार स्वच्छ आहेत असे लोक कोण आहेत याची यादी करणे आणि त्यांना पुढच्या अडीच वर्षात विधायक कामाला लावणे आणि जे खासदार संशयास्पद परिस्थितीत आहेत त्यांना सध्या आहेत तसेच बेंच वर ठेवणे आणि २०१९ च्या निवडणुकात तिकीट न देणे यासाठी आहे. त्याचा आयकर आणि इतर भ्रष्टाचार इ शी संबंध नाही. (ही मला आतून वाटणारी भावना (GUT FEELING) आहे. श्री अमित शहा याना कोणतेही मंत्रिपद न देता केवळ पक्षाच्या अंतर्गत कार्यकारिणीवर मजबूत पकड बसवण्यासाठी ठेवले आहे ते उगाच नाही. बाकी लोक त्याच्यावर कितीही कावकाव करू द्या. काही मिपाकर त्याच्या वर एवढी धुळवड खेळत आहेत त्याचे मला हसूच येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
स
संदीप डांगे Wed, 11/30/2016 - 14:22 नवीन
वरील बातमी म्हणजे 8 नोव्हेंबर ते 31 डिसेंम्बर (अजून महिना बाकी आहे) ह्या काळातला सगळ्यात मोठा विनोद असावा.
  • Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद Wed, 11/30/2016 - 19:34 नवीन
आपल्याला जे पटत नाही ते पुराव्यानिशी खोडावे असं साधारण मानल्या जातं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Wed, 11/30/2016 - 20:04 नवीन
बातमी पूर्ण शब्द आणि शब्द वाचा, वेगळ्या पूराव्याची गरज नाही, तसेच असंच काँग्रेस किंवा आप ने केलं असतं तर काय प्रतिक्रिया असत्या त्याचाही अंदाज लावावा, ;) 1. राहुल गांधीने आपल्या पक्ष सदस्यांना आपले बँक अकाउंट व्यवहार सोनिया गांधीना सादर करायला सांगितले, 2. केजरीने आपल्या पक्ष सदस्यांना आपले बँक अकाउंट व्यवहार पक्ष अध्यक्षांकडे सादर करायला सांगितले, जोक कळला नसेल तर इस्कटून सांगावा असे तुम्ही तरी नाही .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
स
सुज्ञ Wed, 11/30/2016 - 20:46 नवीन
काँग्रेस किंवा आप ने केलं असत तर नक्कीच गहजब झ्हाला असता असे आपले म्हणणे दिसते. म्हणजे ममा मॅडम अथवा केजर्याच्या भ्रष्टाचाराची असण्याची आपल्याला इतकी खात्री आहे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे गुरुवार, 12/01/2016 - 03:43 नवीन
आपण खरंच सुज्ञ आहात, दंडवत घ्या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुज्ञ
ह
हतोळकरांचा प्रसाद गुरुवार, 12/01/2016 - 06:10 नवीन
मला खरंच कळलं नाही कि यात आक्षेप घेण्यासारखं काय असू शकतं. एक राजकीय पक्षाने त्यांच्या अंतर्गत विषयावर (अंतर्गत याअर्थाने कि त्यांच्या आमदार/खासदार वगैरे लोकांचे बँक व्यवहार कसे आहेत किंवा असावेत) काही निर्णय घेतला आहे. शिवाय त्यांनी असेही म्हटलेले नाही कि आम्हाला तपशील दिला कि झाले, त्यानंतर आयकर विभाग काही करणार नाही. हि समांतर पायरी नाहीये का? आणि विशेष म्हणजे - मोदींनी हि माहिती कशासाठी गोळा करायची ठरवली आहे याबद्दल "तथाकथित सूत्रांनी" काहीही स्पष्ट केलेले नाही. म्हणजे हि माहिती या काळात कोणीकोणी कसे कसे पैसे पांढरे केले यासाठी आहे कि आमदार/खासदार लोकांच्या संपत्तीचा बेंचमार्क आहे ज्यावर इथून पुढे लक्ष ठेवण्याचे ठरवले आहे? म्हणजे मला असं म्हणायचं आहे कि, समजा हि माहिती जमवून मोदींनी ३१ डिसें. नंतर काहीच केले नाही तर हा मुद्दा नक्कीच त्यांच्या विरोधात वापरता येईल कि, घाई कशाला? असं घाईघाईने डायरेक्ट ह्या निर्णयाला विनोद वगैरे ठरवणे मला तरी पटत नाही, बायस्ड ठरणार नाही का ते? आणि केजरीवाल आणि राहुल गांधींचं म्हणाल तर - त्यांनीहि असे निर्णय घेतले तर आनंदच आहे. केजरीवालांनीही त्यांची फंडींग त्यांच्या संकेतस्थळावर घोषित केली होतीच कि, पण नंतर काही लोकांनी त्यांची माहिती तिथे नसल्याचा दावा केल्यावर संशय निर्माण झाला. म्हणजे काय तर कोणीही करू द्याकी हो, फलनिष्पत्ती नाही झाली तर तो त्यांच्या विरोधातला मुद्दा बनेलच की!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
म
मोदक गुरुवार, 12/01/2016 - 06:30 नवीन
इतके लॉजिकली बोलून चालत नाही प्रसादजी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
स
सुज्ञ Wed, 11/30/2016 - 20:50 नवीन
का विनोद आहे हे स्पष्टपणे सांगता का? का बॅंक स्टेटमेंट मागितल्यावर भाजप चे लोक सगळे पुरावे नष्ट करतील अथवा ८ नोव्हेम्बर पूर्वीच त्यांना हे सर्व माहीत होते असे आपले नाकी म्हणणे आहे काय ? असे छातीठोक पणे सांगता ? खरंच इथले अनेक सदस्य म्हणत आहेत त्याप्रमाणे उगीचच लोकांची दिशाभूल करू नका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे गुरुवार, 12/01/2016 - 03:43 नवीन
कठीण आहे!!!! _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुज्ञ
म
मार्मिक गोडसे Wed, 11/30/2016 - 19:37 नवीन
मोदींच्या भ्रष्टाचारविरोधी कारवायांच्या प्रामाणिक हेतूंवर आता तरी विश्वास ठेवायला हरकत नाही. जमल्यास इतर सर्व पक्षांच्या नेत्यांनीही अशीच कारवाई करून "भष्टाचाराला आमचाही विरोधच आहे" या त्यांच्या दाव्याला सक्रिय पुष्टी द्यायला हवी.
हे व्हायलाच हवे, फक्त जानेवारी २०१६ ते ८ नोव्हेंबर २०१६ पर्यंतच्या बँक ट्रांझॅक्शन्सचा तपशील द्यावा. अर्थात सर्व पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 11/30/2016 - 21:33 नवीन
जानेवारी २०१६ ते ८ नोव्हेंबर २०१६ पर्यंतच्या बँक ट्रांझॅक्शन्सचा तपशील द्यावा. अर्थात सर्व पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी. याला १०० टक्के पाठींबा. किंबहुना मी पुढे जावून असे म्हणेन की... (अ) कोणत्याही स्तरांच्या निवडणूकीचा अर्ज भरताना, अर्जला उमेदवाराच्या गेल्या पाच वर्षांचा आर्थिक लेखाजोखा जोडणे जरूर असावे व ती माहिती निवडणूक आयोगाच्या संस्थळावर प्रसिद्ध व्हावी व आयकर विभागाकडे अधिकृरित्या जावी; आणि (आ) निवडून आल्यावर दर वर्षीचा आर्थिक लेखाजोखाही निवडणूक आयोगाच्या संस्थळावर प्रसिद्ध व्हावा व आयकर विभागाकडे अधिकृरित्या जावा. === मात्र सद्या परिस्थिती अशी आहे की, राजकीय पक्ष त्यांच्या आवक-जावकीचा लेखाजोखा आयकत विभागाला आणि निवडणूक आयोगाला देण्यात टाळाटाळ करतात. मुख्य म्हणजे तसे करता यावे यासाठी सोईचे कायदे त्यांनीच गेले ७० वर्षे बनवलेले आहेत. या पार्श्वभूमीवर स्वत:च्या पाठीराख्यांना, त्यांनी गोलमाल केली असल्यास, ती उघडी पडेल अशी कृती करायचा आदेश देणे, हे धाडसाचेच पाऊल म्हणावे लागेल. हे पहिले पाऊल असावे व त्यानंतर पुढची पाऊलेही उचलली जातील अशी आशा ठेवायला जागा आहे. बघुया, १००० किमीची वाटचाल पहिल्या पावलानेच सुरू होते असे म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
अ
अर्धवटराव गुरुवार, 12/01/2016 - 01:13 नवीन
उमेदवारांचा लेखाजोखा निवडणुक आयोगाकडे वा आयकर विभागाकडे जावा हे उत्तम, पण संस्थाळावर तो प्रदर्शीत होऊ नये. आर.टी.आय. वगैरेच्या मार्फत अशी माहिती ज्याला हवी आहे त्याने ति जरुर मिळवावी, पण आपली सांपत्तीक स्थिती सार्वजनीक करण्यास कोणालाही बाध्य करु नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 12/01/2016 - 09:29 नवीन
सार्वजनिक कामासाठी आयुष्य झोकून देत असल्याचे दावे करणार्‍या आणि जनतेच्या कराचे शेकडो/लक्ष पटींनी जास्त पैसे हाताळायच्या संधीसाठी हिरीरीने झगडणार्‍या लोकांनी आपले वैयक्तीक अर्थिक व्यवहार सार्वजनिक ठेवायला काय हरकत असावी ? आर टी आय ने जेवढी मिळू शकते तेवढी तरी माहिती संस्थळावर ठेवून आपले व्यवहार पारदर्शक आहेत हे सिद्ध करायला त्यांचा विरोध का असावा ? थोडक्यात, कर नाही त्याला डर कशाला ? या एकाच निर्णयाने राजकारणातली बहुतेक घाण साफ होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
अ
अर्धवटराव गुरुवार, 12/01/2016 - 18:58 नवीन
निवडणुकीला उभं राहाताना सगळ्यांना आपापले आर्थीक अ‍ॅसेट्स आयोगापुढे डिल्कीअर करावेच लागतात बहुतेक. बँक खाते व इतर वैध मार्गाने मिळवलेली संपत्ती २४ तास आय.टी. डिपार्टमेण्टच्या समोर हजर असते. त्यामुळे आवष्यक त्या एजन्सीपुढे आवषयक ति माहिती सादर असते. त्या माहितीला पब्लीक प्रॉपर्टी बनवु नये. लोकांनी नेत्यांचं मुल्यमापन त्यांचे निर्णय व काम बघुन करावं, त्यांची संपत्ती बघुन नाहि. सांपत्तीक स्थितीच्या परिक्षणाला काहि लिमीट नाहि. आज बँक खातं उघड करा, उद्या सगळ्या कुटुंबाचा लेखाजोखा द्या, परवा शेअर्सचे परतावे डिक्लीअर करा, त्याउपर हा स्टॉकचा व्यवहार कुठलंही लॉबींग/आतली माहिती मिळवण्याचा प्रयत्न न करता केला आहे हे सिद्ध करा... जनसामान्यांना कुणाच्याच बाबतीत इतकं नाक खुपसायची पर्मीशन देऊ नये. या व्यवहारांचं परिक्षण करायला ज्या अधिकृत संस्था आहेत त्यांनी आपली रेग्युलर प्रोसेस म्हणुन, व ज्यांना त्यातलं काहि कळतं त्या लोकांनी आपले आर.टी.आय वगैरे सेवा वापरुन हि परिक्षणं करावी. अन्यथा कॉमनमॅनला नेत्यांच्या सांपत्तीक स्थितीवरुन जोखायची सवय लाऊ नये असं मला वाटतं.
या एकाच निर्णयाने राजकारणातली बहुतेक घाण साफ होईल.
घाण करण्याएव्हढी ताकत कमावलेले राजकारणी बँक व्यवहारांचे ट्रॅप अगदी सुरुवातीला तोडुनच पुढे येत असावेत. अन्यथा कुणिही सामान्य बँक मॅनेजर या नेत्यांना आपल्या तालावर नाचवेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
स
संदीप डांगे गुरुवार, 12/01/2016 - 05:12 नवीन
दिशाभूल करण्याचा प्रयत्न कोण करतंय? ज्यांचे डोळे उघडे आणि मेंदू विचार करण्यायोग्य आहे त्यांची दिशाभूल शक्य नसते. १. स्वतः आपल्या खासदार आमदारांना बॅन्केच्या व्यवहारांचा तपशील मागणे फक्त 'शोबाजी' आहे. (हे काम आयकर विभाग, ईडी किंवा तत्सम सरकारी विभाग करु शकतो की... आवश्यकता असेल तेव्हा.) २. आपले खासदार आमदार आपला काळापैसा आपल्याच बॅन्क अकाउंटमधे ठेवतात असे समजणे भाबडेपणाची शंभरावी लेवल असावी. ३. ८ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या दरम्यान खासदार-आमदार आपल्याच बॅन्क खात्यातून गडबडीचे व्यवहार करतील असे समजणे भाबडेपणाची हजारावी लेवल असावी. खासदार-आमदार एवढे मूर्ख असतील असे कुणाला वाटत असेल तो मूर्खांच्या नंदनवनात सुखी राहो. ४. आमदार-खासदारांनी आपले बॅन्क व्यवहार तपशील आयकर विभागाकडे नव्हे तर पक्षाध्यक्षाकडे सादर करावे - पक्षाध्यक्ष कोण लागून गेलेत? भारताचे ऑडिटर जनरल का काय? कोण्या पक्षाचा पक्षाध्यक्ष हा सरकारी अधिकारी व सरकारी माणूस नसतोय. आपलाच पक्षाचा माणूस आपल्याच पक्षाच्या माणसाचे डिटेल्स तपासणार आणि त्याला क्लिनचीट देणार? हे तर अक्षरशः 'केजरीवाल छाप' झालं. केजरीविरोधी लोकांनी केजरीच्या असल्या क्लिनचीट प्रकरणांच्या उडवलेल्या रेवड्या आठवत आहेत. सैंया भये कोतवाल तो डर काहे का ही म्हणही आठवत आहे. ५. माध्यमांमधे फक्त हेडलाईन्स वाचल्या जातात, कोण जास्त तपशीलात जात नाही, सामान्य माणूस तर नाहीच. "मोदींनी आपल्या खासदार आमदारांना आपले बॅन्क व्यवहार सादर करायला सांगितले" एवढंच सगळीकडे फिरतंय, त्यावर भक्तभाट व स्वयंघोषित निष्पक्ष लोकांची बुद्धीभ्रम करणारी भाषा असेल तर क्या कहने. भक्तभाट लोकांची दिशाभूल होत नसते हे वरील काही प्रतिसादांवरुन लक्षात आलेच. सारासार विचार करण्याची क्षमता हरवलेल्यांना काय समजवायचे. ज्यांना दुसरीही बाजू बघायची आहे त्यांच्यासाठी हा प्रतिसाद आहे. बाकी ज्याच्यात्याच्या सदसद्विवेकबुद्धीचा वापर करुन निर्णय घ्यावा. माझे मत एवढेच आहे की अशी शोबाजी करण्यापेक्षा सर्व पक्षांच्या सर्व आमदार-खासदार-नेत्यांच्या गेल्या दहा वर्षातल्या व्यवहारांची, संपत्तीची चौकशी करावी. जसा भुजबळ आत टाकला तसे सर्वांना आत टाकावे. तेव्हा प्रामाणिकपणाचे, साफ नियतचे गोडवे गायला भाट लोकांची अजिबात गरज नसेल.
  • Log in or register to post comments
थ
थॉर माणूस गुरुवार, 12/01/2016 - 05:47 नवीन
१००% सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
म
मोदक गुरुवार, 12/01/2016 - 05:47 नवीन
तुम्ही मिपाकरांवर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन (भक्तभाट / भाट) टीका करत आहात. सरकारच्या पुढील सर्व धोरणांचा फक्त तुम्हालाच फर्स्टहॅन्ड अंदाज आहे आणि बाकी सगळे लोक बावळट आहेत या थाटाचे प्रतिसाद लिहून तुम्ही स्वतःचे (आणखी) हसे करून घेत आहात. सरकारच्या प्रत्येक धोरणावर इथे बालिश टीका करण्यापेक्षा सरकारी पोर्टल वापरा आणि सरकारला जी काही सुधारणेची आवश्यकता आहे ती सुचवा. (तुम्हाला फक्त गोंधळ उडवून देण्यात रस असल्याने तुम्ही विधायक मार्ग स्वीकारणार नाही याची खात्री आहे) मोठे व्हा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे गुरुवार, 12/01/2016 - 06:37 नवीन
तुम्ही मिपाकरांवर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन (भक्तभाट / भाट) टीका करत आहात. >> कोणत्याही मिपाकरावर कोणतीही टिका केली नाही, वाट्टेल ते ऐकून घेणार नाही. सरकारच्या पुढील सर्व धोरणांचा फक्त तुम्हालाच फर्स्टहॅन्ड अंदाज आहे आणि बाकी सगळे लोक बावळट आहेत या थाटाचे प्रतिसाद लिहून तुम्ही स्वतःचे (आणखी) हसे करून घेत आहात. >> मला काय म्हणायचे आहे ते मी म्हटले. तुम्हाला हसायचे असेल तर हसा की. सरकारच्या प्रत्येक धोरणावर इथे बालिश टीका करण्यापेक्षा सरकारी पोर्टल वापरा आणि सरकारला जी काही सुधारणेची आवश्यकता आहे ती सुचवा. >> मी काय करावे, नाही करावे ह्याबद्दल तुम्हाला सल्ले द्यायला मी नियुक्त केलं नाही. (तुम्हाला फक्त गोंधळ उडवून देण्यात रस असल्याने तुम्ही विधायक मार्ग स्वीकारणार नाही याची खात्री आहे) >> आपली खात्री आपल्याजवळ ठेवा. गोबेल्स निती वापरुन सूर्य उगवायचा राहत नाही मोदकशेठ! मोठे व्हा. >> तुम्ही झालात तेव्हढं पुरेसं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक गुरुवार, 12/01/2016 - 09:09 नवीन
कोणत्याही मिपाकरावर कोणतीही टिका केली नाही, वाट्टेल ते ऐकून घेणार नाही. भक्तभाट लोकांची दिशाभूल होत नसते हे वरील काही प्रतिसादांवरुन लक्षात आलेच हे कुणाला उद्देशून आहे..? मिपावरच्याच प्रतिसादाबद्दल बोलत आहात ना..? मला काय म्हणायचे आहे ते मी म्हटले. तुम्हाला हसायचे असेल तर हसा की. तेच सांगतोय, तुम्ही जे काही म्हणत आहात त्याला काहीतरी बेस असावा किंवा लॉजीक असावे इतकेच. तुम्हाला वाट्टेल ते बोलायला आणि सरकारवर फक्त टीका करायला काँग्रेसने नियुक्त केले असले तर तसे खुलेपणाने मान्य करा - मग कोणी काही विचारणार नाही किंवा सल्ले देणार नाही. मी काय करावे, नाही करावे ह्याबद्दल तुम्हाला सल्ले द्यायला मी नियुक्त केलं नाही. ब्वॉर, संभाषणामध्ये एखाद्याने एखादी सुचना दिल्यानंतर त्यावर किमान विचार व्हावा हा सर्वमान्य संकेत आहे. तुम्ही सर्वज्ञ आहात आणि तुम्हाला कोणत्याही सुचनेची आवश्यकता नाही हे सांगितल्याबद्दल धन्यवाद. संस्थळासारख्या ठिकाणी व्यक्त व्हायचे असेल तर चार लोकांच्या / पब्लीकच्या सुचना येणारच. त्या नको असतील तर स्वत:चा ब्लॉग काढा आणि आपले एकांगी विचार तेथे लिहा. (बघा - परत एक सल्ला आलाच..!) सामान्य माणसाचा बुरखा पांघरून संस्थळावर व्यक्त होत असाल तर असे सल्ले आणि सूचना स्वीकारण्याची तयारी ठेवा. आपली खात्री आपल्याजवळ ठेवा. ब्वॉर..! गोबेल्स निती वापरुन सूर्य उगवायचा राहत नाही मोदकशेठ! अहो तो गोबेल्स परवडला. तुमच्यासारखे फक्त काळा चष्मा घालून दिसेल त्या मुद्द्यावर टीका करून बुद्धीभेद करणारे लोक जास्ती धोकादायक आहेत. अशी विखारी आणि खोटी टिका करून जर तुमचा काही वैयक्तीक फायदा होत असल्यास तो तुमच्यापर्यंत मर्यादित राहणार मात्र संस्थळाच्या लोकप्रियतेचा फायदा घेवून तुम्ही निर्माण करत असलेले गोंधळाचे वातावरण मोठ्या जनसमुदायाची धोकादायक दिशाभूल करणार नाही का..? (तरी लोकं पुरावे मिळाल्याशिवाय कोणावर विश्वास ठेवत नाहीत ही एक चांगली बाब आहे!) बादरायण संबंध जोडून आणि चुकीचे मुद्दे सतत बोलून खोटी टीका करण्यामागे तुमचा आणखी काय उद्देश असू शकतो..? "हेच मुद्दे सरकारपर्यंत पोहोचवा" असे म्हटले तर ते ही तुम्हाला नीटपणे स्वीकारता येत नाहीये. मग आणखी काही उद्देश असल्यास जरूर सांगा. अशी टीका करून खरोखरी काही विधायक बदल होणार असल्यास पहिला मला कळवा, मी नक्की तुम्हाला मदत करेन. :) ************************************ सरकारच्या धोरणांवर टीका करण्यापूर्वी हा हतोळकरांचा प्रतिसाद पुन्हा वाचा. मला खरंच कळलं नाही कि यात आक्षेप घेण्यासारखं काय असू शकतं. एक राजकीय पक्षाने त्यांच्या अंतर्गत विषयावर (अंतर्गत याअर्थाने कि त्यांच्या आमदार/खासदार वगैरे लोकांचे बँक व्यवहार कसे आहेत किंवा असावेत) काही निर्णय घेतला आहे. शिवाय त्यांनी असेही म्हटलेले नाही कि आम्हाला तपशील दिला कि झाले, त्यानंतर आयकर विभाग काही करणार नाही. हि समांतर पायरी नाहीये का? आणि विशेष म्हणजे - मोदींनी हि माहिती कशासाठी गोळा करायची ठरवली आहे याबद्दल "तथाकथित सूत्रांनी" काहीही स्पष्ट केलेले नाही. म्हणजे हि माहिती या काळात कोणीकोणी कसे कसे पैसे पांढरे केले यासाठी आहे कि आमदार/खासदार लोकांच्या संपत्तीचा बेंचमार्क आहे ज्यावर इथून पुढे लक्ष ठेवण्याचे ठरवले आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे गुरुवार, 12/01/2016 - 10:13 नवीन
अपेक्षित थयथयाट! इतका वैयक्तिक विखाराने भरलेला प्रतिसाद का द्यावा लागतोय तुम्हाला? काय मजबुरी आहे? मुद्देसूद प्रतिसाद करता येत नाहीत तर व्यक्तिगत हल्ले करण्याची नीती...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक गुरुवार, 12/01/2016 - 10:29 नवीन
अपेक्षित थयथयाट! थयथयाट कुठे..? सरळ साधा उपाय सुचवला होता. तुम्हाला तो मान्य नाही म्हणून आणखी एक उपाय सुचवला. काय मजबुरी आहे? मला कसलीही मजबुरी नाही. तुम्हालाच मजबुरी आहे. म्हणून खोट्या लिंका द्याव्या लागतात. सरकारच्या धोरणावर ओढून ताणून टीका करावी लागते आणि अनेकदा मांडलेल्या मुद्द्यांवरून सपशेल घुमजाव करावे लागते. याचे पुरावे हवेत का..? मुद्देसूद प्रतिसाद करता येत नाहीत तर व्यक्तिगत हल्ले करण्याची नीती प्रतिसाद नाही हो, "प्रतिवाद" मुळात प्रतिवाद करायला तुमच्या प्रतिसादामध्ये मुद्दे आहेत का..? आहे तो विखारी द्वेष आणि नेहमीप्रमाणे गंडलेले लॉजीक. हतोळकरांचा प्रतिसाद वाचलात का..? वाचल्यावर नीट समजुन घ्या आणि थोडा विचार करा. ..आणि हल्ल्यांचे म्हणत असाल तर अशी व्हिक्टीम मेंटॅलिटी गळे काढायला सोपी असते. त्याने लोकांची कांहीकाळ दिशाभूल करता येते. नेहमी नक्राश्रू ढाळत बसलात तर उरलीसुरली विश्वासार्हताही धुळीस मिळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
त
तेजस आठवले गुरुवार, 12/01/2016 - 11:11 नवीन
मोदक जी, तुम्ही जर कुबेरांचे अग्रलेख नियमितपणे वाचत असाल तर तुम्हाला हा प्रश्न पडायला नको होता.बुद्धिभेद हे शस्त्र गेले अनेक वर्षे वापरले जाते आहे. ज्यांची सारासार विचार करण्याची क्षमता आहे त्यांना वैचारिक गोंधळात टाकून आपले उद्दिष्ट साध्य करण्याचा हा डाव काही नवीन नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक गुरुवार, 12/01/2016 - 11:17 नवीन
कुबेरांचे अग्रलेख पूर्वी वाचत होतो. ते नोकरदार आहेत त्यांना अग्रलेख लिहिण्याचा पगार मिळतो. इथे संदिप डांगे थेटपणे सांगूदेत की त्यांना असे खोटे लिहायचे आणि ओढून ताणून टीका करायचे पैसे मिळतात म्हणून. मी त्यांच्या प्रतिसादांचा प्रतिवाद करणे बंद करतो. इथे मारे तत्ववेत्त्याच्या थाटात कॉमन मॅनचा बुरखा पांघरून यायचे आणि अजेंडा राबवत लोकांची दिशाभूल करायची याला काय अर्थ आहे..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तेजस आठवले
त
तेजस आठवले गुरुवार, 12/01/2016 - 11:45 नवीन
बरोबर, अगदी मनातले बोललात. मी पण कुबेरांचे अग्रलेख आता रोज वाचणे सोडून दिले आहे. याकूब मेनन चा अग्रलेख तर आहेच. अगदी मागच्या आठवड्यातल्या अग्रलेखात पण काश्मीर समस्येबाबत दोन्ही देशांच्या पंतप्रधानांना काहीतरी करून दाखवणे गरजेचे होते अशा थाटाचे विधान केलेले होते.त्यामुळे भारतीय पंतप्रधानांना पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या पातळीवर आणून ठेवल्यासारखे झाले. त्यामुळे शोबाजी हा शब्द खटकला नाही इथे. बाकी कोणाचा थयथयाट होतो आहे हे आम्हा वाचकांना समजते आहेच. कोणी काही एक गोष्ट करत असेल तर मोडता घालणे ही पहिली पायरी. आणि त्यावर काही बोलले की आरडाओरड करायची ही दुसरी पायरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक गुरुवार, 12/01/2016 - 12:00 नवीन
धन्यवाद. तुम्हीही अशा चर्चेत भाग घ्यायला सुरूवात करावे अशी नम्र विनंती. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तेजस आठवले
स
संदीप डांगे गुरुवार, 12/01/2016 - 12:11 नवीन
इथे संदिप डांगे थेटपणे सांगूदेत की त्यांना असे खोटे लिहायचे आणि ओढून ताणून टीका करायचे पैसे मिळतात म्हणून. मी त्यांच्या प्रतिसादांचा प्रतिवाद करणे बंद करतो.
मोदक, तुम्ही माझी इथे थेट बदनामी करत आहात. माझा तोल जाऊन मी काहीतरी असभ्य वर्तन करावे व बॅन व्हावे किंवा सरळ इथून निघून जावे असे काही तुमच्या अजेंड्यात असेल तर, डोन्ट वरी, असे काहीही होणार नाही. इथे काय खोटे लिहिले आहे ते सिद्ध करा, ओढून ताणुन टिका हा प्रत्येकाच्या पर्सेप्शनचा प्रश्न आहे. पण मी इथे पैसे घेऊन लिहितो हा गंभीर आरोप आहे. तो तुम्ही पुराव्यासकट सिद्ध करा. लै झालं च्यायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक गुरुवार, 12/01/2016 - 12:31 नवीन
शब्द सांभाळा.. च्यायला वगैरे कशाला म्हणताय..? तुम्ही इथून जावे वगैरे काहीही माझ्या अजेंड्यात नाही. मुळात माझा कसलाही अजेंडाच नाही. माझी भूमीका इतकीच आहे की जर कोणी काही लिहीत असेल त्याला योग्य ते पुरावे असावेत नसेल तर स्वत:च्या भूमीकेशी प्रामाणिक असावे. तुम्ही १००% सरकार विरोधी भूमीका मांडत असाल तर तसे मान्य करा आणि विरोध सुरू ठेवा. फक्त वैयक्तीक विरोध करताना लोकांच्या नावाखाली स्वत:चा अजेंडा रेटू नका. ताकाला जाऊन भांडे लपवणे वगैरे भ्याड प्रकार करू नका इतकेच..! तुम्ही दिशाभूल करणारे, ओढून ताणून भाजपा विरोधी विशिष्ट अजेंडा राबवणारे प्रतिसाद देत आहात आणि त्यावर प्रतिवाद न करता पळ काढता हे अनेक ठिकाणी आणि या धाग्यावर सिद्ध झाले आहेच. तुम्ही या धाग्यावर लिहिलेल्या गोष्टींना काहीतरी बेस आहे का..? तसेच मिपावर इतर ठिकाणी तुमच्या प्रतिसादांमध्ये दिसणारा विखार तुमचा अजेंडा दाखवत नाही असे तुमचे म्हणणे आहे का..? तुमच्या पसंतीचे नसले तरी लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या लोकप्रातिनिधींना शिवीगाळ करणे किंवा मिपासदस्यांना भाट* म्हणणे कोणत्या सभ्यतेत बसते ते आधी सांगा मग पुरावे वगैरे मागा. तुमच्यावर आरोप झाले तर इतके चवताळत आहात मग तुम्ही मिपाकरांवर भाट म्हणून केलेल्या आरोपांचे काय..? *भाट शब्दाचा अर्थ सांगा बघू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे गुरुवार, 12/01/2016 - 12:54 नवीन
मी पैसे घेऊन लिहितो हे सिद्ध करा, बाकी नंतर पाहू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक गुरुवार, 12/01/2016 - 12:56 नवीन
पहिला आरोप तुम्ही केलात. तो सिद्ध करा मग तुमच्यावरील आरोपाचे बोलू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे गुरुवार, 12/01/2016 - 14:20 नवीन
तुम्ही इथे 'पैसे खाऊन प्रतिसाद देतो' असा स्पष्ट माझे नाव घेवून आरोप केलाय, तो सिद्ध करा, पहिले दुसरं ची नाटकं नकोत,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक गुरुवार, 12/01/2016 - 14:32 नवीन
Infinite loop माहिती आहे का हो तुम्हाला..? :=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे गुरुवार, 12/01/2016 - 14:38 नवीन
मी काय आरोप केलेत तुमच्यावर???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक गुरुवार, 12/01/2016 - 14:42 नवीन
कठीण आहे!!!! _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
श
श्रीगुरुजी गुरुवार, 12/01/2016 - 15:53 नवीन
इथे काय खोटे लिहिले आहे ते सिद्ध करा, ओढून ताणुन टिका हा प्रत्येकाच्या पर्सेप्शनचा प्रश्न आहे. पण मी इथे पैसे घेऊन लिहितो हा गंभीर आरोप आहे. तो तुम्ही पुराव्यासकट सिद्ध करा. लै झालं च्यायला.
मी भाजपचा दलाल आहे अश्या स्वरूपाचा गंभीर आरोप तुम्ही माझ्यावर एका धाग्यावर केला होता. तो कधी पुराव्यासकट सिद्ध करताय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे गुरुवार, 12/01/2016 - 16:17 नवीन
तुमच्यावर नाव घेऊन????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 12/01/2016 - 16:29 नवीन
http://www.misalpav.com/comment/892439#comment-892439
गुरुजी, फालतू टिवटिव बंद करा. संदीप डांगे - Mon, 24/10/2016 - 22:16 गुरुजी, फालतू टिवटिव बंद करा. घटनात्मक पदावर बसून काय निर्णय घ्यावे ह्याची अक्कल नसेल तर ... असो. डोकं फार तापलं आहे. उगा उणादुणा शब्द निघायचा... श्रीगुरुजी, मिपाची जनभावना तुमच्या विचारांविरुद्ध आहे असेच चर्चेत दिसत आहे, योग्य ती समज आपल्याला येवो, भाजपचे दलाल नकोत इथे मिपावर,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
अ
अभिदेश गुरुवार, 12/01/2016 - 17:40 नवीन
तुम्ही कितीही पुरावे दिले तरी डांगे अण्णा मान्य नाहीच करणार , ती त्यांची जुनी सवय आहे . इतारांना प्राणिवाचक संबोधून नंतर तिकडून पळ काढणे , अत्यंत खालच्या पातळीची भाषा वापरणे आणि नंतर त्याचे समर्थन करणे , असे प्रकार आधीही झाले आहेत. मूकं करोति वाचालं .... असं समजून सोडून द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 12/01/2016 - 10:21 नवीन
१. स्वतः आपल्या खासदार आमदारांना बॅन्केच्या व्यवहारांचा तपशील मागणे फक्त 'शोबाजी' आहे. (हे काम आयकर विभाग, ईडी किंवा तत्सम सरकारी विभाग करु शकतो की... आवश्यकता असेल तेव्हा.)
कशावरून ही फक्त 'शोबाजी' आहे. या मागणीची डेडलाईन ३१ डिसेंबर आहे. त्यानंतर काही काळ वाट पाहून काहीच कृती झाली नाही तरच शोबाजी म्हणता येईल. इथे आधीच 'शोबाजी' म्हणून नाचायला सुरूवात झाली आहे. दुसरं म्हणजे हे काम करायला आयकर विभाग, ईडी किंवा तत्सम सरकारी विभागांना कोणीच बंदी घातलेली नाही. त्यांना वाटलं तर ते काम करतील की. या पक्षाने हा अंतर्गत निर्णय घेतलेला आहे. आयकर विभागाचे किंवा ईडीचे काम आम्ही करत आहोत असा दावा कोणीच केलेला नाही.
२. आपले खासदार आमदार आपला काळापैसा आपल्याच बॅन्क अकाउंटमधे ठेवतात असे समजणे भाबडेपणाची शंभरावी लेवल असावी.
ठेवू पण शकतात किंवा दुसरीकडे पण लपवू शकतात. १९९३ मध्ये झाममुच्या ४ खासदारांना विश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करण्यासाठी नरसिंहरावांनी प्रत्येकी १ कोटी रूपये दिले होते. हा आरोप न्यायालयातही सिद्ध झाला होता. परंतु या व्यवहार संसदेच्या सभागृहाच्या आत झाला व संसदेच्या आत होणार्‍या कोणत्याही गुन्ह्यावर न्यायालय थेट शिक्षा करू शकत नसल्याने नरसिंहराव सहीसलामत सुटले. हे एक कोटी रूपये शिबू सोरेन व अन्य ३ खासदारांनी आपापल्या बँक खात्यात भरले होते.
३. ८ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या दरम्यान खासदार-आमदार आपल्याच बॅन्क खात्यातून गडबडीचे व्यवहार करतील असे समजणे भाबडेपणाची हजारावी लेवल असावी. खासदार-आमदार एवढे मूर्ख असतील असे कुणाला वाटत असेल तो मूर्खांच्या नंदनवनात सुखी राहो.
त्यांच्या पक्षाला काय करायचंय ते करू देत की. तुम्हाला का त्रास होतोय? ते काही बेकायदेशीर कृत्ये करत आहेत का? ते मूर्ख किंवा भाबडे असतील तर असू देत की. तुम्हाला त्यांची का काळजी?
४. आमदार-खासदारांनी आपले बॅन्क व्यवहार तपशील आयकर विभागाकडे नव्हे तर पक्षाध्यक्षाकडे सादर करावे - पक्षाध्यक्ष कोण लागून गेलेत? भारताचे ऑडिटर जनरल का काय? कोण्या पक्षाचा पक्षाध्यक्ष हा सरकारी अधिकारी व सरकारी माणूस नसतोय. आपलाच पक्षाचा माणूस आपल्याच पक्षाच्या माणसाचे डिटेल्स तपासणार आणि त्याला क्लिनचीट देणार? हे तर अक्षरशः 'केजरीवाल छाप' झालं. केजरीविरोधी लोकांनी केजरीच्या असल्या क्लिनचीट प्रकरणांच्या उडवलेल्या रेवड्या आठवत आहेत. सैंया भये कोतवाल तो डर काहे का ही म्हणही आठवत आहे.
कोणत्या आमदार-खासदारांनी असं सांगितलंय की आम्ही आमचे तपशील आयकर विभागाकडे न देता फक्त पक्षाध्यक्षांकडेच देणार म्हणून. त्यांचे तपशील हवे असतील तर ते मिळवायला आयकर खात्याला कोणीही अडवू शकत नाही. पक्षाध्यक्षांनी ते तपशील मागणे गुन्हा असेल किंवा बेकायदेशीर असेल तर आमदार-खासदार तक्रार करू शकतात. तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत मामला आहे. पक्षाध्यक्ष त्यांना क्लीनचिट देऊ देत किंवा गुन्हेगार असे जाहीर करू देत. ते काय करतील त्याला कायदेशीर दृष्ट्या शून्य महत्त्व आहे. तुम्ही का अस्वस्थ झाला आहात?
५. माध्यमांमधे फक्त हेडलाईन्स वाचल्या जातात, कोण जास्त तपशीलात जात नाही, सामान्य माणूस तर नाहीच. "मोदींनी आपल्या खासदार आमदारांना आपले बॅन्क व्यवहार सादर करायला सांगितले" एवढंच सगळीकडे फिरतंय, त्यावर भक्तभाट व स्वयंघोषित निष्पक्ष लोकांची बुद्धीभ्रम करणारी भाषा असेल तर क्या कहने.
मग ही तक्रार माध्यमांकडे करा ना. माध्यमांनी काय शीर्षके द्यावीत हा त्यांचा अधिकार आहे. नगरपालिका निवडणुकीत भाजपची पिछेहाट, भाजपला नोटबंदी भोवली असले मथळे असणार्‍या बातम्यांमध्ये प्रत्यक्षात भाजप इतर पक्षांच्या किती आणि कसा पुढे आहे याचीच माहिती होती. जर कोणी फक्त हेडलाईन्स वाचून जास्त तपशीलात न जाता मते ठरवित असतील तर तो त्यांचा दोष आहे.
भक्तभाट लोकांची दिशाभूल होत नसते हे वरील काही प्रतिसादांवरुन लक्षात आलेच. सारासार विचार करण्याची क्षमता हरवलेल्यांना काय समजवायचे. ज्यांना दुसरीही बाजू बघायची आहे त्यांच्यासाठी हा प्रतिसाद आहे. बाकी ज्याच्यात्याच्या सदसद्विवेकबुद्धीचा वापर करुन निर्णय घ्यावा.
म्हणजे सारासार विचार करण्याची क्षमता फक्त तुमच्याकडेच. इतरांची ती क्षमता हरविली आहे.
माझे मत एवढेच आहे की अशी शोबाजी करण्यापेक्षा सर्व पक्षांच्या सर्व आमदार-खासदार-नेत्यांच्या गेल्या दहा वर्षातल्या व्यवहारांची, संपत्तीची चौकशी करावी. जसा भुजबळ आत टाकला तसे सर्वांना आत टाकावे. तेव्हा प्रामाणिकपणाचे, साफ नियतचे गोडवे गायला भाट लोकांची अजिबात गरज नसेल.
तुम्ही हे मोदी किंवा शहांना कळविल्यास बरे होईल. त्यांना वाटले तर ते करतील चौकशी. तुम्हाला एखाद्या आमदार-खासदाराच्या संपत्तीविषयी संशय असेल तर न्यायालयात जनहित याचिका दाखल करू शकता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
L
lakhu risbud गुरुवार, 12/01/2016 - 07:27 नवीन
ओ! असं कसं बोलता ? आम्हाला पटत नाही हाच एक मोठा पुरावा नाही का ? मग इतर सगळे पुरावे म्हणजे अंधश्रद्धा,आणि ते देणारे किंवा मागणारे तुम्ही म्हणजे भक्त असं आपलं ठरलंय ना आधीच ?
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान गुरुवार, 12/01/2016 - 09:17 नवीन
संदीप डांगे, तुमचा इथला प्रतिसाद वाचला. १.
१. स्वतः आपल्या खासदार आमदारांना बॅन्केच्या व्यवहारांचा तपशील मागणे फक्त 'शोबाजी' आहे. (हे काम आयकर विभाग, ईडी किंवा तत्सम सरकारी विभाग करु शकतो की... आवश्यकता असेल तेव्हा.)
तुमचं ठार बरोबर आहे. यालाच राजकारण म्हणतात. २.
३. ८ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या दरम्यान खासदार-आमदार आपल्याच बॅन्क खात्यातून गडबडीचे व्यवहार करतील असे समजणे भाबडेपणाची हजारावी लेवल असावी.
विधान बरोबर आहे. मात्र उपरोक्त आदेशातनं असा हेतू काही सूचित होत नाही. कशावरनं मोदी खासदारांचा प्रामाणिकपणा तपासून पहात नसतील? आयकर खात्याकडून यथोचित अहवाल मागवले असतीलही. ३.
४. आमदार-खासदारांनी आपले बॅन्क व्यवहार तपशील आयकर विभागाकडे नव्हे तर पक्षाध्यक्षाकडे सादर करावे - पक्षाध्यक्ष कोण लागून गेलेत? भारताचे ऑडिटर जनरल का काय?
आयकर विभागाकडे तपशील सादर करू नयेत असं या बातमीत तरी लिहिलेलं नाही. ४.
आपलाच पक्षाचा माणूस आपल्याच पक्षाच्या माणसाचे डिटेल्स तपासणार आणि त्याला क्लिनचीट देणार? हे तर अक्षरशः 'केजरीवाल छाप' झालं.
कोण म्हणतो सफेद कपटा (=क्लीन चिट) मिळणार आहे? ५.
५. माध्यमांमधे फक्त हेडलाईन्स वाचल्या जातात, कोण जास्त तपशीलात जात नाही, सामान्य माणूस तर नाहीच. "मोदींनी आपल्या खासदार आमदारांना आपले बॅन्क व्यवहार सादर करायला सांगितले" एवढंच सगळीकडे फिरतंय, त्यावर भक्तभाट व स्वयंघोषित निष्पक्ष लोकांची बुद्धीभ्रम करणारी भाषा असेल तर क्या कहने.
तुम्ही जा की तपशीलात. कोणी अडवलंय! मात्र तुम्ही लेख न वाचता मन मानेल तसं खुशाल ठोकून देताहात. ६.
सारासार विचार करण्याची क्षमता हरवलेल्यांना काय समजवायचे. ज्यांना दुसरीही बाजू बघायची आहे त्यांच्यासाठी हा प्रतिसाद आहे. बाकी ज्याच्यात्याच्या सदसद्विवेकबुद्धीचा वापर करुन निर्णय घ्यावा.
ठार बरोबर. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
स
सुज्ञ गुरुवार, 12/01/2016 - 10:24 नवीन
याला "शोबाजी" न म्हणता किमान सुरवात म्हणतात. अर्थात आपल्यासारखे ज्यांना फक्त दिशाभूल करायची आहे किंवा धुरळाच उडवायचा आहे किंवा ज्यांनी आत्तापर्यंत फक्त शोबाजीच बघितली आहे किंवा त्यापुढे जाऊन विचार करण्याची ज्यांची कुवत नाही अशांशी काय बोलावे. उद्या इन्कम टेक्स डिपार्टमेंट कडे जर या आमदारांनी आपापले बैंक स्टेटमेंट पाठवले आणि समजा कोणी दोषी आढळले नाहीत तर परत इथे येऊन कांगावा चालू कराल की इन्कम टेक्स खाते देखिल आता सरकारने आपल्या ताब्यात घेतले वगैरे. कारण एकदा विरोधच करायचा ठरवला कि तो कितीही खालच्या पातळीवर जाऊन करता येतो . बाकी भक्तभाट वगैरे शब्दांबद्दल मी काय बोलावे. जो माणूस मुख्यमंत्र्यांबद्दल 'हरामखोर वगैरे बोलू शकतो , अथवा एका सदस्यांना दलाल वगैरे संबोधू शकतो त्याच्यासाठी हे खूपच कमी समजावे लागेल.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे गुरुवार, 12/01/2016 - 10:32 नवीन
अपेक्षित प्रतिसाद आलेत, धन्यवाद! आवश्यकच होते, आता अजून कोण राहिले असतील तर त्यांचेही येऊ द्या. :)
  • Log in or register to post comments
स
सुज्ञ गुरुवार, 12/01/2016 - 10:39 नवीन
बर मग मोदींनी केली हे फक्त शोबाजी का हे आम्हा भक्तभाट व सारासार विचार न करणाऱ्याना आपल्या महान ज्ञानातून पटवून सांगा . का हा प्रतिसाद ही अपेक्षितच होता ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
श
श्रीगुरुजी गुरुवार, 12/01/2016 - 10:41 नवीन
शहाजोगपणे भाजपच्या निर्णयाला नावे ठेवायला गेलात व त्यातला फोलपणा उघडकीला आणल्यावर त्यावर प्रतिवाद करता येत नाही हे कबूल करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
त
तेजस आठवले गुरुवार, 12/01/2016 - 11:26 नवीन
+1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
  • «
  • ‹
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा