Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ऑपरेशन नोटा-रद्द आणि नोटा-बदल

ड
डॉ सुहास म्हात्रे
Sun, 11/13/2016 - 22:52
🗣 637 प्रतिसाद
नुकत्याच सरकारने अतिरेकी व काळाबाजारी लोकांवर अचानक ५०० व १००० रुपयांच्या नोटा रद्द करून एक प्रकारे "सर्जिकल स्ट्राईक" केला. या प्रकल्पाची मुख्य वैशिष्ठ्ये अशी : १. राष्ट्रीय महत्व : याचा भारताच्या अर्थकारणावर पडणारा प्रभाव सांगायला नकोच. २. प्रचंड आवाका : भारतासारख्या क्षेत्रफळाने आवाढव्य, भौगोलिक परिस्थिती व विकासाच्या अभावामुळे अनेक भाग असलेला व १२५ कोटी लोकसंख्या असलेल्या राष्ट्रातला प्रत्येक नागरीक प्रभावित होईल असा प्रकल्प. रद्द केलेल्या चलनी नोटा या सगळ्यांकडून परत घेऊन त्यांना नवीन नोटा देणे अत्यंत जिकरीचे काम आहे. ३. गुप्तता : सहा महिन्यांच्या तयारीच्या काळात व पंतप्रधान कारवाई जाहीर करेपर्यंत गुप्तता पाळणे हा या प्रकल्पाचा जीव होता. या एका मुद्द्यावर सर्व कारवाईचे मुख्य यशापयश अवलंबून होते. वरच्या दोन क्रमांकांच्या मुद्द्यात आलेल्या विवरणावरून + गेल्या ७० वर्षांत सरकारप्रणाल्यांमध्ये निर्माण झालेल्या हितसंबंधांच्या पार्श्वभूमीवर गुप्तता पाळणे हे काम किती कठीण होते हे सांगायला नकोच. माध्यमांत असलेल्या बातम्यांप्रमाणे या कारवाईच्या प्रकल्पाची काही रुपरेखा आता हळूहळू बाहेर येत आहे. त्याबद्दल मला समजलेले व भावलेले काही, थोडक्यात... काळापैसेवाल्यांना व अतिरेकी जाळ्याला या कारवाईचा वासही येऊ नये यासाठी बँकाच काय या कारवाईचा आराखडा फक्त निवडक मंत्री आणि आरबीआयचे अत्युच्च अधिकारी यांनाच माहीत होता.इतर कॅबिनेट मंत्र्यांनाही ही माहिती ऐन वेळेला दिली गेली, त्या मिटींगमला मोबाईल न आणण्याची सूचना होती. त्यांनतर मोदी राष्ट्रपतींना भेटून नंतर त्यांचे टीव्हीवरचे भाषण संपेपर्यंत सर्व मंत्री मिटिंग रूम मध्ये बसून होते. त्यानंतर वित्त मंत्रालय व आरबीआयची कारवाई सुरू झाली. बँकांना सर्व प्रकल्प समाजावून देण्यासाठी व बँकात नवीन २००० च्या नोटा व साथीला १०० च्या नोटा पोचविण्यासाठी ९ तारखेलाला बँका बंद ठेवणे आवश्यक होते. या नोटा अगोदर पाठविल्याने कारवाईची बातमी फुटली असती. तसेच, बातमी गुप्त ठेवण्यासाठी रु २०००च्या नवीन नोटांसाठी एटीएम मशीन्स ८ नोव्हेंबरच्या आधी कॅलिब्रेट करणे शक्य नव्हते. बातमी थोडीही बाहेर फुटली असती तर कारवाईमधली सगळी नाही तरी बरीचशी हवा निघून गेली असती... मुख्य म्हणजे बदमाषांनी आपला काळा पैसा इतरत्र गुंतवून अथवा अननुभवी सामान्य गरिबांच्या माथी मारून सरकारचे काम फार कठीण केले असते. त्याचसाठी पंतप्रधानांची घोषणा रात्री आठच्या सुमाराला आणि कारवाई सुरु होण्याची वेळ रात्री १२ वाजता ठेवली गेली. या चार तासात बँका बंद असल्याने बातमी कळली तरी काहीच फायदा नव्हता. बँकाचे लॉकर्सही पुढचा एक दिवस तरी उघडता येणे शक्य नव्हते. मला वाटते, या कारवाईतला हा शेवटचा घाव वर्मी बसणारा होता. केवळ आरबीआयच्या परिपत्रकाने अश्या गोष्टी सामान्य लोकांपर्यंत पोचत नाही आणि असे पत्रक सरळपणे न समजेल अश्या शासकीय व कायदेशीर भाषेत असते. वित्तमंत्रालयाच्या, आरबीआयच्या व करविभागाच्या अश्या परिपत्रकांबद्दल सीए सुद्धा संभ्रमात असतात व निर्णय देण्यापूर्वी बाबूलोकांच्या विश्लेषणाची वाट पहातात, हे आपण नेहमी पाहतोच. स्वतः पंतप्रधानांनी आदल्या रात्री टीव्हीवर बातमी सांगून लोकांमध्ये शक्य असलेले अफवांचे पीक टाळले. मला वाटते पूर्वीच्या अश्या प्रकारच्या कारवायांत टाळलेली आणि आता आवर्जून पंतप्रधानांकरवी सर्व जनतेला संबोधून माहिती देणारी ही पायरी "मास कम्युनिकेशन"ची नाडी पक्की माहीत असल्याचे लक्षण आहे. कारवाईचा त्रास होऊनही व काही नेत्यांची उसकवणारी वक्तव्ये येवूनही लोकक्षोभ न होण्याचे हे महत्वाचे कारण आहे, असे मला वाटते. इतर काही असले तरी, इतकी बंधने असलेली, इतक्या थोड्या वेळेत करायची, एवढी मोठी कारवाई भारतासारख्या आवाढव्य देशात करण्यात अपेक्षित होता त्यापेक्षा कमी गोंधळात आणि सामान्य लोकांच्या उत्तम सहकार्याने काम चालू आहे असे माध्यमांतील बातम्यांवरून दिसते आहे. असा प्रकल्प पूर्णपणे आलबेल प्रकारे होईल हे अपेक्षित नव्हतेच. ज्यांना मोठ्या प्रकल्पांची थोडीबहुतही माहिती आहे त्यांना तसा विचार शेखचिल्लीचे स्वप्न वाटेल. यासंदर्भात, सार्वत्रिक निवडणूकीच्या वेळेस किती आठवडे/महिने तयारी केली जाते व त्यानंतरही ती निवडणूक अनेक विभागांत, दीडदोन महिन्यांच्या कालावधीत घेतली जाते, याची आठवण उपयोगी ठरेल. मुख्य म्हणजे विरोधी पक्षांनी या देशाच्या फायद्याच्या कारवाईत मदत तर केली नाहीच. पण, सुरुवातीच्या एकदोन दिवसांत, बसलेल्या धक्क्यात काय करावे हे न कळल्याने, पहिल्यांदा सरकारचे हे पाऊल बरोबर आहे असे म्हणून टाकले आणि नंतर "पण-परंतू" असे बोलत दिशाभूल करणार्‍या गोष्टी सुरू झाल्या आहेत. काहीजण लोकभावना भडकाव्या अशीच वक्तव्ये आणि कारवाया करत आहेत. काही जण तर ही पूर्ण कारवाईच मागे घ्या असे म्हणत आहेत ! हे अपेक्षित आहेच म्हणा. सरकारने यालाही तोंड देण्याची तयारी ठेवायला हवी, ठेवली असेलच. सर्वसामान्य लोक मात्र त्या वक्तव्यांनी फारसे प्रभावित न होण्याइतके प्रगल्भ झालेले पाहून एक भारतिय म्हणून आनंद व अभिमान वाटला. हा तर एका टेकडीचा टप्पा आहे, भारत पुरेसा भ्रष्टाचारमुक्त करायला अख्खा पर्वत चढून जायला लागेल. त्या वाटेत अनेक समस्या येतील, एखादी कारवाई फसेलही. कारण ७० वर्षांत काळ्या पैशाने गडगंज झालेले लोक ना निर्बुद्ध आहेत, ना ते तो पैसा सहजासहजी सोडतील. सरकारच्या कारवाया अयशस्वी व्हाव्या यासाठी ते त्यांची सर्व हुशारी व नवे-जुने हितसंबंध वापरून सर्व भले-बुरे (मुख्यतः बुरेच) मार्ग चोखाळतील, यात शंका नाही. काही सरकारी अधिकारी आणि सत्ताधारी व गटबंधनातल्या पार्टीतल्या लोकांचे अंतर्गत हितसंबंधही गुंतलेले असतील. तो गुंताही सोडवावा लागेल. अनेक अपेक्षित आणि अनपेक्षित घटनांना सामोरे जायची तयारी ठेवावी लागेल. अशी तयारी आहे असेच संकेत सद्या तरी दिसत आहेत. आतापर्यंत या कारवाईतल्या दोन तृटी बाहेर आल्या आहेत. पहिली म्हणजे रु२००० च्या नोटेवर हिंदीत "दोन हजार रुपया" असे छापलेले आहे. दुसरे म्हणजे नोटांचा रंग पाण्यात विरघळतो व फिकट होतो आहे अश्या बातम्या आहेत. मोठ्या प्रमाणात सामग्रीची जुळवाजुळव करत असतानाच गुप्तता आणि घाई पाळायला लागयामुळे याप्रकारे नोटांची प्रत कमी होणे झाले असावे. मात्र जोपर्यंत भारत सरकार त्या नोटांना "लीगल टेंडर" मानते आहे तोपर्यंत ते केवळ "टेक्निकल एरर" असतील व त्यांचा नागरिकांवर त्याचा प्रभाव पडणार नाही. आताचा गडबड गोंधळ ताब्यात आल्यावर मात्र याबाबत पावले उचलणे अत्यावश्यक ठरेल. त्यासंबंधी एखादा प्रकल्प आरबीआय आत्ताच तयार करत नसल्यास आश्चर्य वाटेल. माझ्या अंदाजाप्रमाणे ५०० व १००० च्या पुरेश्या नोटा चलनात आल्यावर या नोटांना बँकिंग व्यवहारातून हळू हळू काढून / बदलून टाकण्याची कारवाई होईल. कारण, पहिल्यापेक्षा जास्त किंमतीच्या (पक्षी : ५०० व १००० ऐवजी २०००च्या) नोटा कारवाई गुप्त ठेवण्यासाठी व तसे करताना कारवाईचा सुरुवातीचा भार (कागद, शाई, छपाई, साठवण, वाहतूक, वितरण, इ) अर्धा करण्यासाठीच वितरीत केल्या जात आहेत. परंतु, या कारवाईसंबंधीच्या जनतेच्या प्रतिसादाने अंतीम यशाच्या आशा उंचावल्या आहेत. कारण, काळ्या पैश्याच्या निर्मुलनातली हीच एक पायरी आहे की जिच्याशी सामान्य जनतेचा तडक संबध येतो व त्याला त्रास होतो. इतर पायर्‍यांत सामान्य जनतेला फारसा त्रास असण्याची शक्यता फार कमी आहे. ही व पुढच्या पायर्‍या यशस्वी होऊन भ्रष्टाचारमुक्त झालेला भारत पहायला मिळण्यासारखा दुसरा आनंद नसेल !
वर्गीकरण
अर्थकारण
राजकारण
देशकारण

प्रतिक्रिया द्या
133576 वाचन

💬 प्रतिसाद (637)
ह
हतोळकरांचा प्रसाद गुरुवार, 12/29/2016 - 13:14 नवीन
हो नक्की वाढवतो! काय करणार माझा परीघ जरा वेगळा आहे ना! बाकी, तोपर्यन्त तुम्ही (किंवा मोठा परीघ असणारे कोणी ) आपापला परीघ वापरून जनता मोदींच्या पाठीशी कशी नाहीये हे दाखवून दिले तर उत्तमच आहे कि, कसे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
अ
अनुप ढेरे गुरुवार, 12/29/2016 - 12:40 नवीन
अन जर त्यांना पैसे मिळण्यासाठी समस्या आली तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.
हे प्रेडिक्षन आहे का धमकी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित गुरुवार, 12/29/2016 - 12:45 नवीन
गावच्या कट्ट्यावरील गप्पा तुन साभार..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
स
संदीप डांगे गुरुवार, 12/29/2016 - 12:54 नवीन
ओ साहेब, इथे फक्त घरच्या मोलकरणीचे, जेटलीचे (असलेच तर) आणी मोदीसाहेबांचेच मत सत्य म्हणून ग्राह्य धरले जाते. तस्मात् तुमच्या गावच्या कट्टेकर्‍यांना शष्प समजत नाही असे आमचे एकमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
ह
हतोळकरांचा प्रसाद गुरुवार, 12/29/2016 - 13:15 नवीन
व्हिक्टीम कार्ड कि काय ते यालाच म्हणत असतील का बरे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
म
मार्मिक गोडसे गुरुवार, 12/29/2016 - 11:08 नवीन
कधी करविभागातील पूर्व वरिष्ठ अधिकारी तर कधी भूतपूर्व चीफ इकॉनॉमिस्ट ऑफ आरबीआय च्या अधिकार्‍यांचे स्वतःला रोचक वाटणारे विडिओ टाकायचे, त्यात काय रोचक वाटलं ते सांगण्याचेही कष्ट घ्यायचे नाही व समोरच्यानं त्यातला फोलपणा दाखवीला तर तोही मुद्देसुदपणे खोडून काढायचा नाही, टोमणे तर पाचवीलाच पूजलेले. आता पुढे कायम अशा प्रकारचे विनोदी विडिओ बघायची तयारी ठेवावी लागेल. ह्यावेळचा ३१ डिसेंबर अशाच एखाद्या बंपर विनोदी विडिओने साजरा करावा लागेल असं वाटतंय.
  • Log in or register to post comments
L
lakhu risbud गुरुवार, 12/29/2016 - 11:16 नवीन
दुखने काय आहे नक्की ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
स
संदीप डांगे गुरुवार, 12/29/2016 - 11:20 नवीन
=)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
L
lakhu risbud गुरुवार, 12/29/2016 - 11:33 नवीन
विरोधकांचा विरोध ज्या पध्दतीने आणि मुद्द्यांवर चालू आहे त्यावरुन त्यांनाच खात्री नाहीये कि मोदींचा हा निर्णय आत्मघातकी आहे का नाही ते आणि म्हणूनच मग त्यांना घाई झालेली आहे ....हे दाखवण्याची की हा निर्णय कसा चुकलाय ते ते सुद्धा निवडणूकांशिवाय ! पण त्यामुळे ते स्वतःचीच केविलवाणी अवस्था करुन घेत आहेत.स्वतःसाठी योग्य काय आणि अयोग्य काय हे जनतेला ठरवूद्या की. हा निर्णय पटला नाही तर येत्या उत्तर प्रदेश २०१७ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत जनता भाजप आणि मोदीना धडा शिकवेलच ! काही कट्टर समर्थकांना विरोध आहे म्हणून नोटाबंदीच्या बाजूने बोलणार्या प्रत्येकाला त्या गटात बसवायचे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 12/29/2016 - 16:40 नवीन
जाऊंद्या साहेब. झोपी गेलेल्याला उठवता येते, झोपेचे सोंग सोडून देणे गैरसोईचे असलेल्याला उठवणे अशक्य असते. ज्यांना नुकत्याच नोटबंदीनंतर झालेल्या नगरपालिका निवडणूकांचे निकालही लोकांचे मत नसल्याने दुर्लक्ष करण्याजोगे वाटतात त्यांना अधिक काय समजावणार ? "वस्तूस्थिती जाणून घ्यायला इतर जे कोणी तयार आहेत त्यांच्या करिता माहिती इथे टाकावी आणि आंधळा विरोध करणार्‍यांवर इग्नोरास्त्राचा उपयोग करावा" या विचारापर्यंत मी पोचलो आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: lakhu risbud
ख
खटपट्या गुरुवार, 12/29/2016 - 17:55 नवीन
नशीब भाजपाला यश मिळाले. नाहीतर अपयशाचे खापर नोटबंदीवर फोडले असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
व
विशुमित Fri, 12/30/2016 - 05:50 नवीन
<<<<ज्यांना नुकत्याच नोटबंदीनंतर झालेल्या नगरपालिका निवडणूकांचे निकालही लोकांचे मत नसल्याने दुर्लक्ष करण्याजोगे वाटतात त्यांना अधिक काय समजावणार ?>>>> -- नगरपालिका आणि स्थानिक स्वराज संस्थांचे निकाल बहुतांशी पक्षीय धोरणातून होत नाहीत. त्याला अनेक कांगोरे असतात. विजयी उमेदवारात १००% भाजपीय उमेदवार किती होते, हा पण कळीचा मुद्दा आहे. त्यामुळे नोटबंदीचे यश अपयश या निवडणुकींवरून ठरवू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ह
हतोळकरांचा प्रसाद Fri, 12/30/2016 - 07:51 नवीन
एक्झॅक्टली! खरतर भाजप परभूत झाला असता तर हेच समीकरण सरसकट लावलं असतं का हा कळीचा मुद्दा आहे! मुळात यश अपयश ठरवण्याची घाईच का? फक्त हे सरकार कसं निरुपयोगी आहे हे दाखवण्यासाठी? ह्या निर्णयाचे शॉर्टटर्म लॉँगटर्म कसलेच फायदे नाही झाले तर २०१९ आहेच कि त्यांना तोंडावर पाडायला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Fri, 12/30/2016 - 08:12 नवीन
<<<खरतर भाजप परभूत झाला असता तर हेच समीकरण सरसकट लावलं असतं का हा कळीचा मुद्दा आहे!>>> -- हो त्याला वाव होता कारण immediate इफेक्ट मानला गेला असता. पण स्थानिक निवडणुकीत सहसा स्थानिक प्रश्न, हेवे दवे, गट तट, जिरवा जिरवी, जातीवाद आणि नेतृत्व या गोष्टी प्रामुख्याने असतात. (उदा. देतो बारामती नगर परिषदेमध्ये भले राष्ट्रवादीची सत्ता आली पण राष्ट्रवादीच्या २ माजी नगर अध्यक्षांना स्वपक्षानेच धूळ चाखायला लावली, ती पण सांगून. सासवड मध्ये काँग्रेस (जगताप फेम ) यांच्या विरोधात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे आणि अजून सटरफटर लढले पण सासवड मधील जगतापांनी अस्मितेचा प्रश्न उपस्थित करून निवडणूक एकहाती जिंकली. कृपया उदाहरणे प्रातिनिधिक समजा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 12/30/2016 - 08:26 नवीन
खरतर भाजप परभूत झाला असता तर हेच समीकरण सरसकट लावलं असतं का हा कळीचा मुद्दा आहे! -- हो त्याला वाव होता कारण immediate इफेक्ट मानला गेला असता. आपण विश्लेषण चष्मा लावून करत असल्याचे खुल्या संस्थळावर स्पष्टपणे कबूल केल्याबद्दल अनेकानेक आभार ! (हल्ली असा प्रामाणिक स्पष्टवक्तेपणा विरळ झाला आहे) :) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Fri, 12/30/2016 - 09:22 नवीन
माझ्या डोळ्या चा नंबर अजून ही ६ / ६ च आहे त्यामुळे चष्माची गरज नाही भासली अजून. असो एवढेच नमूद करू इच्छितो स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या निकालावर नोटबंदीचा immediate इम्पॅक्ट नव्हता. त्याला स्थानिक कारणे आणि गटातटाचे राजकारण हेच जवाबदार होते. (मतदारांचे नगरपालिकांचे थकीत कर उमेदवारांनी भरले याचा खूप बोलबाला आहे म्हणतात, लोकशाहीचा पूर्ण आदर राखून)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
प
पुंबा गुरुवार, 12/29/2016 - 14:22 नवीन
प्रतीसादांचे अर्धसहस्त्रक झाले. अद्याप दोन्हीही बाजूचे खंदे वीर आपापल्या जागी भक्कम उभे आहेत. त्यांच्या भुमिकांमध्ये कसलाच फरक पडला नाही. चर्चेचे फलीत म्हणजे कुणीतरी आपापल्या विचारांत बदल झाला, बदलत्या काळ-परीस्थितीमुळे कसले तरी स्थित्यंतर झाले हे मान्य करण्यात असते हे गॄहीतक चुकीचे आहे का?
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे गुरुवार, 12/29/2016 - 14:27 नवीन
राजकिय चर्चांचे कधी फलित निघत नसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
अ
अप्पा जोगळेकर Fri, 12/30/2016 - 10:49 नवीन
करेक्ट. कारण एखादी बाजू पडायला लागली की अहंकार आडवा येतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 12/29/2016 - 17:11 नवीन
नोटाबंदीनंतर आता ५० दिवसांची मुदत संपत येऊ लागल्यावर, बँकेत जमा केलेल्यापैकी काळा-गोरा पैसा कसा वेगळा काढणार त्याचे संकेत सरकार व आरबीआयने देणे सुरु केले आहे... Large deposits by 60 lakh individuals and companies under scrutiny, no mercy for evaders, says government * नोटाबंदीनंतर आतापर्यंत ६० लाख लोकांनी एकूण ७ लाख कोटी (एकूण जमेपैकी जवळ जवळ निम्मे) बँकांत जमा केलेले आहेत. ---> बँकेत पैसे जमा केले म्हणजे ते पांढरे झाले असे नव्हे, हे विरोधकांना न समजलेले (किंबहुना त्यांनी न समजावून न घेण्याचे ठरवलेले) सत्य सरकारने परत एकदा सांगितले आहे. या सात कोटींत अनेक काळे मासे गळाला लागतील. ---> यातले काही पैसे वैध मार्गांनी मिळवलेले असले तरी, आता त्यावरचा कर चुकवणे शक्य नसल्याने, कर तर मिळेलच पण कर चुकविल्यामुळे त्यांचे नवीन काळ्या नकदेत रुपांतर होणार नाही. * एकाच माणसाची अनेक बॅंक खाती व त्यातले एकूण जमा पैसे ओळखणारी संगणक प्रणाली करविभागाकडे आहे. आता तिचा उपयोग करायची वेळ आली आहे. त्यामुळे, वरचे ७ लाख कोटी सोडून उरलेल्या इतर पैशांचीही छाननी करणे शक्य होईल. * अनेक जणांच्या बँकेत आपले पैसे जमा करण्यार्‍यांना पकडण्यासाठीच्या क्लृप्त्याही आता कपाटातून बाहेर काढल्या जातील. * आतापर्यंतच्या कारवायांत पकडलेले बँक मॅनेजर्स, आरबीआय अधिकारी, वकील, सीए, इडी व करविभागाच्या छाप्यांत सापडलेले लोक, नकदीसह सापडलेले लोक, इत्यादीच्या तपासणींतही अनेक धागेदोरे अनेक काळाबाजार्‍यांपर्यंत घेऊन जातीलच. अवांतर : सद्या इतकेच पुरे. डेटा ओव्हरलोड झाल्याने विरोधकांना नवीन तथ्यांतही खोट काढणे कठीण पडू नये यासाठी सगळी माहिती एकदम न देता हळूहळू देणे योग्य होईल, नाही का ?! :)
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 12/29/2016 - 17:21 नवीन
नोटाबंदीचा मूळ उद्येश नसलेल्या पण तरीही खूप उपयोगी असलेले अनेक अतिरिक्त परिणाम (बाय-प्रोडक्ट्स) आकड्यांसह बाहेर येत आहेत. करसंकलनाच्या वाढीचे १९ डिसेंबरपर्यंतचे काही आकडे... १. डायरेक्ट टॅक्सेस : १४.४% २. इनडायरेक्ट टॅक्सेस : २६.२% ३. सेंट्रल एक्साईज : ४३.३% याशिवाय, महानगरपालिका, नगरपालिका, इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या करसंकलनात आणि वीजकंपन्यांच्या बीलभरण्यात लक्षणिय भर पडली आहे. त्यांची सद्य वर्षांचीच घेणी नव्हे तर अनेक वर्षांची थकबाकीही जमा झाली आहे ! काही महानगरपालिकांच्या करांची वसूली दशकोटी रुपयांत झाली आहे.
  • Log in or register to post comments
व
विशुमित Fri, 12/30/2016 - 09:32 नवीन
डायरेक्ट टॅक्सेस, इनडायरेक्ट टॅक्सेस आणि सेंट्रल एक्साईज वाढीचा आणि नोटबंदीचा कसा संबंध जोडला ते कळालं नाही. कृपया फोडून सांगता का ? <<<<याशिवाय, महानगरपालिका, नगरपालिका, इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या करसंकलनात आणि वीजकंपन्यांच्या बीलभरण्यात लक्षणिय भर पडली आहे. त्यांची सद्य वर्षांचीच घेणी नव्हे तर अनेक वर्षांची थकबाकीही जमा झाली आहे ! काही महानगरपालिकांच्या करांची वसूली दशकोटी रुपयांत झाली आहे.>>> -- ही जमेची बाजू आहे पण याला गुड गव्हर्नन्स म्हणता येणार नाही कारण थकीत ठेवणारे दुसरी नोटबंदी होई पर्यंत असेच कर बुडवत राहातील. त्यात नक्की किती थकीत कर संकलन झाले ही आकडेवारी हातात येई पर्यंत वाट पाहावी लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 12/30/2016 - 10:25 नवीन
बघुया ! आता किती समजावले तरी ते समजायला कठीण पडणार आहे. शिवाय हे मी वर "अतिरिक्त परिणाम (बाय-प्रोडक्ट्स)" असे लिहिले आहे हे घ्यानात घ्या. हे नोटाबंदीमुळे कसे झाले हे माध्यमात चावून चावून चोथा झालेले आहे. नोटाबंदीच्या मुख्य परिणामांचा निर्देश त्यावरच्या प्रतिसादात आहे. फायदा-श्रम यांचे गुणोत्तर व्यस्त झालेले असल्याने, यापुढे काही समजावत बसण्याऐवजी (काही सन्माननिय अपवाद वगळता) या लेखाच्या प्रतिसादात फक्त तथ्ये मांडण्याचे ठरवले आहे. आतापर्यंत उघड झालेल्या आणि दिवसेदिवस अजून उघड होत जाणार्‍या तथ्यांकडे "डोळसपणे" बघितले तर काही बरेच उघड होत राहील व समजायला सोपे होत राहील ! ============= नोटाबंदीच्या संदर्भात सर्व मिपाकरांना सावधगिरीचा मैत्रीपूर्ण इशारा सद्या बाहेर येत राहिलेल्या तथ्यांवर घाई करून आताच ओढूनताणून मारलेले शेरे, मिपा मुक्त संस्थळ असल्याने, भविष्यात ते तसेच सर्व वाचकांना वाचण्यास आणि उद्धृत करण्यास खुले असतील. त्यामुळे, ते शेरे पुढे करून भविष्यात जाब विचारला गेल्यास, तोंडघशी पडून कसनुसे होण्याची पाळी येऊ शकते, तेव्हा सर्वांनी आपापल्या जबाबदारीवर सांभाळून असावे ! =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 12/30/2016 - 10:27 नवीन
Rs 4 lakh crore of cash deposits so far may be suspect, estimates I-T * १.१४ लाख बँक खात्यांत जमा झालेल्या ४ लाख कोटी रुपयांवर आयकर विभाग आता (संगणकिय प्रणाली वापरून डेटाचे विश्लेषण करून) लक्ष केंद्रित करत आहे. * आतापर्यंत ५००० वर आयकर नोटीसेस पाठवल्या गेल्या आहेत. वैध पैसे असलेल्यांना त्यांचे योग्य विवरण देण्यास कठीण पडणार नाही व त्यांना काही त्रास होणार नाही, कारण असे विवरण येत्या ITR-V साठी त्यांच्याकडे असेलच. काळाबाजार्‍यांची मात्र तारांबळ होईल... आणि मग काळाबाजारी मजेत आहेत असे म्हणणार्‍या विरोधकांची मजा पहायला मिळेल ! * दिल्ली, पश्चिम बंगाल आणि कर्नाटक ही राज्ये जनधन खात्यांत पैसे जमा करण्यात अग्रगण्य आहेत... यामागे काय काळेबेरे आहे का हे पण लवकरच स्पष्ट होईल असे दिसते. * केवायसी नसलेल्या बँक खात्यांत १ कोटीपेक्षा जास्त रकमा टाकलेल्या आढळल्या आहेत ! आता, कळले का की केवायसी च्या बाबतीत अनेक वर्षे चालढकल करणार्‍या अनेक सहकारी बॅकांना नोटाबंदीमध्ये जुन्या नोटा घ्यायला बंदी का केले ते ?! (इथे या बाबतील श्री मनमोहन सिंग यांची री ओढणार्‍या कोणीतरी हे सिंगसाहेबांना समजावून द्यावे. राजकारणी होण्याच्या नादात त्यांना ते एकेकाळी आरबीआयचे गव्हर्नरही होते हे कोणीतरी विसरायला लावलेले आहे.) ============================= Frequent rule changes done to corner the corrupt: PM Modi घ्या, हे आम्ही सांगत होतो तेव्हा पटले नाही. आता खुद्द पंतप्रधानांकडून ऐका... थांबा, थांबा, त्यांनाही खोटे ठरविण्याआधी काही जमिनीवरची तथ्ये विचारात घ्या (जमल्यास !)... १. काळाबाजार्‍यांविरुद्धची (किंवा कोणत्याही अवैध व्यवसायाविरुद्धाची) कारवाई काही नियमांनी बांधलेला असा खेळ नसतो की जेथे आपल्या विरुद्ध पार्टीलाही नियम पाळावेच लागतात. ते बदमाषांच्या विरुद्ध् केलेले युद्ध असते. २. अर्थातच, कोणत्याही युद्धात प्रतिस्पर्धी बदमाषांसमोर आपल्या सर्व खेळी उघड करायच्या नसतात. अश्या खेळी प्रामाणिकपणे करताना, स्वत;चे आणि आपल्या पक्षचे हितसंबंध बाजूला ठेवून, केवळ देशाचे हितसंबंध समोर ठेवून कारवाई करावी लागते. अश्या प्रकारच्या कारवाया करण्याची हिम्मत जगभरांच्या राजकारण्यांनी नगण्य क्वचित वेळेसच दाखविली आहे. नाहीतर, विरोधक मागणी करत असल्याप्रमाणे, सर्व खेळी अगोदरपासून उघड्या करून काळाबाजार्‍यांना आपले पैसे निर्धोकपणे पांढरे करून घ्यायची संधी देण्याचे प्रकार याआधी झाले आहेतच ! ३. अर्थातच, समोरचे बदमाष सरकारला अयशस्वी करण्यासाठी अनेक भले आणि बुरेही मार्ग चोखाळणारच यात काही शंका नाही. तेव्हा सरकारला त्यांना शह देण्यासाठी आपल्या कारवाईत बदल करणे भाग असते. एखाद्या प्रकल्पात, बदलत्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी काहीच फरक करू नये हे म्हणणे केवळ, निर्बुद्धपणाचे किंवा कांगावाखोरपणाचे, यातील केवळ एक किंवा दोन्ही प्रकारचे असते. आणि हे सर्वच प्रकल्पात (युद्ध, मोठे खाजगी/सरकारी प्रकल्प, इ) खरे असते. हे छोटाशाही प्रकल्पात (अगदी ३०० किमी दूर जाण्याच्या कार्यक्रमात गाडीचे चाक पंक्चर होणे, अनपेक्षितरित्या खराब रस्ता लागणे, एखाद्या मोर्चा वाट अडवणे, इ) झाले तरी ते करावे लागतेच. हे जनतेला कळले, पण विरोधकांना नाही... यामागची मेख जनतेला माहीत झाली आहे, इतके विरोधकांना कळले तरी खूप झाले ! ४. गंमत म्हणजे, सर्वसामान्य जनता हे सर्व समजून आहे आणि त्यामुळेच त्रास सहन करायला लागूनही जनतेत कोणताही मोठा क्षोभ दिसला नाही... किंबहुना, विरोधकांचे मोर्चा, आक्रोश दिवस, बंद अश्या अनेक धडपडींना जनतेचा प्रतिसाद दिसला नाही. तरीही विरोधक जनतेचा त्रास, केऑस, इ बाबत गळा काढत आहेत. यावरून, विरोधी नेत्यांपेक्षा जास्त भारतातील जनता प्रगल्भ झाल्याचे दिसत आहे आणि विरोधी नेते काय करावे हे न कळल्याने गांगरून जाऊन, विचित्ररित्या जनतेसमोर स्वतःला अधिकाधिक हास्यास्पद बनवत आहेत. या सगळ्याचा येत्या निवडणूकांत भाजपला फायदा झाला तर, विरोधकांनी इतर कोणाला नाही तर स्वतःलाच दोष देणे योग्य होईल. बाकी काही असो, पण, स्वतःचा व पक्षाचा स्वार्थ बाजूला सारून देशाला पुढे नेणारा खंबीर नेता दिसला तर, जनता आपला तातकालीक स्वार्थ बाजूला सारून, त्याच्या पाठीशी उभी रहायला तयार आहे, हे उघड झालेले सत्य एक भारतिय म्हणून नक्की अभिमानास्पद आहे.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sat, 12/31/2016 - 06:50 नवीन
डॉक्टर सुहास म्हात्रे,
तरीही विरोधक जनतेचा त्रास, केऑस, इ बाबत गळा काढत आहेत.
अगदी अगदी. एव्हढा असंतोष लोकांत खदखदत असेल तर आत्तापावेतो एकही मोर्चा निघालेला का दिसंत नाही? विरोधकांनी पीडितांना जमवून काढावाच मोर्चा. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 03/02/2017 - 11:21 नवीन
Central Statistics Office (CSO) ने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालाप्रमाणे... १. भारताचे गेल्या तिमाहीचे (ऑक्टो-नोव्हे-डिसे २०१६) जीडीपी ७.१% आहे. २. हा दर चीनपेक्षा (६.९%) जास्त आहे. India's GDP to grow 7.1% in FY'17, retain fastest growing tag नोटाबंदीचा अत्यंत मोठा ताण असतानाचा वाढीचा दर इतका चांगला आहे तर, यानंतर अपेक्षित असलेल्या... (अ) ताणविरहित अर्थव्यवस्थेमध्ये, (आ) जीएसटीने सुधारलेल्या अर्थव्यवस्थेत आणि (इ) सुधारलेल्या करसंकलनामुळे ...वाढीचा दर अजून वर जाणे अपेक्षित आहे. "लिगॅलाईज्ड प्लंडर, ऑर्गॅनाईज्ड लूट, नेपोलियन मोमेंट, इत्यादी शेलक्या विशेषणांनी नोटाबंदीचे वर्णन करून भारतामध्ये कसे अराजक माजले आहे आणि अर्थव्यवस्था कशी सुधारणेपलिकडे गाळात गेली आहे" हे ओरडून ओरडून सांगणार्‍या (तथाकथित राजकारण प्रेरीत) अर्थतज्ज्ञांचे आवाज ही बातमी पाहून मात्र बसले आहेत असे दिसते ! :) ;) आपल्याशी मतभेद असणार्‍यांबद्दल नेहमी फटकळ बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या अमर्त्य सेन यांनीही मनमोहनसिंग अवतार घेतला आहे ! नोटाबंदीमुळे त्रास झालेला असताना आणि त्याबद्दल आकाशपाताळ एक करूनही लोकांना रस्त्यावर आणण्यात अपयश आल्याचा विरोधकांनी खूपच धसका घेतलेला दिसत आहे. कारण आता त्या "सर्वनाशी" कारवाईबद्दल विरोधक काही बोलणे टाळतानाच दिसताहेत... अगदी सद्या चाललेल्या राज्यनिवडणूकांतही कोणी विरोधी पक्ष हा मुद्दा त्याच जुन्या हिरीरीने मांडताना दिसत नाही. जीडीपीच्या नव्या आकड्यांवर भाष्य करणे गैरसोईचे असल्याने, विद्यार्थी राजकारणाच्या जुन्या कढीला उत आणून जीडीपीच्या मुद्द्यापासून जनतेचे लक्ष विचलित करणे आणि त्यामुळे उत्तरप्रदेशात चाललेल्या निवडणूकीत किती मते गोळा करता येतील तिकडे लक्ष देणे, हा सोईचा विचार भारतिय राजकारण्यांनी चालवला आहे असेच दिसते. त्यासाठी, विभजनवादी, अतिरेकी आणि पाकिस्तानधार्जिण्या शक्तींना पाठींबा द्यायला लागले तरी त्याचे काँग्रेस आणि डाव्यांना सोयर सुतक नाही, हे नेहमीप्रमाणेच अधोरेखीत झाले आहे. अन्यथा, "जागतिक स्तराच्या अर्थतज्ज्ञांचा हवाला देत २% जीडीपी घट होईल असे घसा सुकेस्तोवर ओरडत असलेल्या राजकारण्यांना या आताच्या आकड्यांवर टीप्पणी करायला, तीन दिवस होऊन गेले असतानाही, जरासा वेळ मिळू नये, यावरून बरेच काही स्पष्ट होत आहे ! कदाचित, "नेहमीच्याच यशस्वी जागतिक अर्थतज्ज्ञांच्या" भाषणांच्या "राजकिय लेखकांना" या आकड्यांतील "(नेहमीप्रमाणेच नसलेली) खोट शोधून काढायला (पक्षी : मॅन्युफॅक्चर करायला )" अजून तरी जमलेले दिसत नाही :)
  • Log in or register to post comments
व
विशुमित गुरुवार, 03/02/2017 - 11:44 नवीन
<<<"नेहमीच्याच यशस्वी जागतिक अर्थतज्ज्ञांच्या" भाषणांच्या "राजकिय लेखकांना" या आकड्यांतील "(नेहमीप्रमाणेच नसलेली) खोट शोधून काढायला (पक्षी : मॅन्युफॅक्चर करायला )" अजून तरी जमलेले दिसत नाही :)>>> -- हे Q-३ चे रिझल्ट्स आहेत आणि त्यात शेती {३.८ -> ६ }आणि मायनिंग {(-१.३) ->७.५ } उत्पनाचा जास्त हातभार आहे. शेतीची वाढीचे चांगल्या पाऊसामुळे हे चित्र दिसत आहे. औदयोगिक उत्पन्नात इन्व्हेंटरी होल्डिंग मुळे वाढ दिसत आहे. न आवडणाऱ्या तज्ञांनुसार Q-४ मध्ये आकडेवारी सुस्पष्ट होईल. लेट्स सी.. भारताचे कल्याण झाले पाहिजे कोणी करेल त्याला माझ्या लेखी महत्व आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 03/02/2017 - 12:18 नवीन
भारताचे कल्याण झाले पाहिजे कोणी करेल त्याला माझ्या लेखी महत्व आहे. याला +१००,००० ही विचारसरणी बहुसंख्य (बहुसंख्य, कारण सगळे तसे करणे शक्य नाही ही वस्तूस्थिती आहे, दुर्दैवाने) लोकांनी प्रामाणिकपणे कृतीत आणली तर भारताला खरेच उत्तम भवितव्य आहे, यात वाद नाही. (या वाक्यातला ठळक भाग कळीचा मुद्दा आहे.) "नेहमीच्याच यशस्वी जागतिक अर्थतज्ज्ञांच्या" भाषणांच्या "राजकिय लेखकांना" या आकड्यांतील "(नेहमीप्रमाणेच नसलेली) खोट शोधून काढायला (पक्षी : मॅन्युफॅक्चर करायला )" अजून तरी जमलेले दिसत नाही :) पर्वताएवढी नकारात्मक टीका करायला आपल्या राजकारण्यांना राई हाती येण्याची वाट पहायची गरज नसते. सत्याचा विपर्यास करून किंवा अगदी कल्पनेतूनही राई तयार करून तिचा पर्वत बनवण्याच्या कलेत ते तरबेज आहेत हे वारंवार दिसते. त्याचबरोबर, गैरसोईच्या मुद्द्यांचा डोळ्यासमोर असलेला पर्वत आस्तित्वातच नाही असे ठामपणे सांगून त्याच्याकडे दुर्लक्ष करणे ही कला तर त्यांच्याकडे जन्मजात आहे असेच दिसते ! या पार्श्वभूमीचा विचार करून ते वाक्य लिहिलेले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित गुरुवार, 03/02/2017 - 12:29 नवीन
प्रामाणिकपणे कृतीत आणली तर भारताला खरेच उत्तम भवितव्य आहे, यात वाद नाही. (या वाक्यातला ठळक भाग कळीचा मुद्दा आहे.) -- शेवटी प्रामाणिकपणावर शंका घेतलीच. असोकाही हरकत नाही.. बाकी राजकारणी काय विचार करतात, काय बोलतात त्यापेक्षा मी फक्त JDP चे आकडे धुंडाळले आणि जे दिसले ते इथे चिटकवले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
न
नितिन थत्ते गुरुवार, 03/02/2017 - 12:39 नवीन
टीका करणारे सगळेच राजकारणी नव्हते/नाहीत. http://economictimes.indiatimes.com/news/economy/policy/is-indian-gdp-data-turning-a-little-too-chinese/articleshow/57422398.cms येथून India's Aspirations That’s right: The best stimulus, according to India’s GDP data, is taking away people’s money. I’m not sure why the government isn’t planning to do it every quarter. After all, the new GDP release also predicts that giving cash back to people will reduce private consumption expenditure growth. From over 10 percent between October and December, when the government took the currency away, growth in private spending is supposed to fall to 6.4 .. Other data is equally puzzling. Bank credit growth fell to a decades-long low in December. Yet somehow investment -- which in India is dependent on bank finance -- reversed direction sharply. After three-quarters of accelerating decline -- down 1.9 percent, 3.1 percent and then 5.6 percent -- it grew at 3.5 percent precisely when every bank employee was stocking ATMs instead of handing out loans. The data says manufacturing grew at 8.3 percent in the quarter, even though an index of manufacturing production produced by the same government statisticians said it shrank 2 percent in December. सरकारचा दुसरा वचाब टॅक्स कलेक्शनच्या वाढीवर आधारित आहे. त्या वाढीचे विश्लेषण खालील लिंक वर आहे. https://ajayshahblog.blogspot.in/2017/01/what-does-tax-data-tell-us-about-state.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
प
पुंबा गुरुवार, 03/02/2017 - 13:21 नवीन
परत तीच टेप लावतो. जीडीपीत जेवढी टिकाकार म्हणत होते, तेवढी घट झाली नाही. मान्य. त्याबद्दल अभिनंदन. आता, जी उद्दिष्ट्ये मनात धरून निश्चलनीकरण अंमलात आणले गेले ती पूर्ण झाली का? जीडीपीत घट न होऊ देणे हे याचे उद्दिष्ट्य नव्हते. तर काळा पैसा बँकांत न आल्याने अर्थव्यवस्थेमधून बाहेर जाणे, कर्जपुरवठा वाढणे, बँकात पैसा जमा केलेल्या लोकांच्या डेटाचा वापर करून आयकराच्या व्याप्तीत जास्तीत जास्त लोकांना आणणे, भ्रष्टाचार थांबवणे आदी होती. तर आता या पैकी किती उद्दिष्ट्ये पूर्ण झाली याची आकडेवारी कधी व कुठे मिळेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
म
मार्मिक गोडसे गुरुवार, 03/02/2017 - 17:35 नवीन
जी उद्दिष्ट्ये मनात धरून निश्चलनीकरण अंमलात आणले गेले ती पूर्ण झाली का? झाली नाही म्हणून तर नोटाबंदीसमर्थक Q3 GDP ग्रोथचे झेंडे नाचवत आले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 03/02/2017 - 17:38 नवीन
खुद्द लोकसभेत २% जीडीपी कमी होणाच्यानाचवलेल्या झेंड्यांबद्दल सद्या चर्चा चालू आहे... नेहमीप्रमाणे गोलपोस्ट बदलू नका ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे गुरुवार, 03/02/2017 - 17:43 नवीन
घाई करताय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 03/03/2017 - 09:33 नवीन
डीमॉनेटायझनचे ५० दिवस संपण्याच्या खूप खूप आधिपासून ती कारवाई ठार अयशस्वी झाली अशी ओरड चालू झाली होती. त्या पार्श्वभूमीवर आकडे बाहेर येऊन चार दिवस झाले तरी जानेमाने जगप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ (आणि पर्यायाने त्यांचे भाषणलेखक) गटाकडून भयाण शांतता आहे ! हे पाहता "घाई करताय" हे विनोदी वाक्य आहे असे समजून घेतोय ! :) ;) अजून किती महिने लागणार आहेत खुसपटे काढायला सुचायला ?! =)) =)) =)) ते विनोद वाचायची नक्कीच घाई झाली आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
व
विशुमित Fri, 03/03/2017 - 09:46 नवीन
खरंच घाई करताय म्हात्रे सर तुम्ही. सगळे आकडे अजून फ्रीझ झाले नाहीत, असे देशाचे मुख्य सांख्यिकीतज्ज्ञ टी. सी. ए. अनंत यांनी म्हटले आहे. http://www.loksatta.com/desh-videsh-news/chief-statistician-tca-anant-gdp-growth-rate-demonetization-reserve-bank-of-india-1423210/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 03/03/2017 - 10:40 नवीन
साहेब, मूळ मुद्दाच तुमच्या नजरेतून निसटलाय ! अधिक इस्काटून सांगायचे तर... सरकारवर नकारात्मक टीका करण्यासाठी विरोधक "खर्‍या व खात्रीलायक" आकड्यांसाठी थांबले आहेत असा इतिहास आहे काय ? :) नोटाबंदी कारवाईच्या एकाच उदाहरणात केलेल्या दाव्यांमध्ये अशी घिसाड्घाईने केलेली अतिशयोक्त उदाहरणे भरपूर सापडतील. तेव्हा चार दिवस उशीर ही त्यांच्या पूर्वकिर्तीला काळीमा लावणारी दिरंगाई झाली नाही काय ? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Fri, 03/03/2017 - 10:58 नवीन
तुम्ही प्रतिसाद गोलगोल फिरवताय. घिसाडघाईने कोणी अतिशयोक्त उदाहरणे आहेत, हे कळू शकेल का? इथे विरोधक काय म्हणतात याच्याशी मला देणे घेणेच नाही. सांख्यकीतज्ज्ञांनी JDP च्या आकड्याबाबत खुलासा केला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 03/03/2017 - 12:46 नवीन
मुख्य मुद्दे... १) २% जीडीपी घटीचा "आकडेबद्ध" दावा करताना मनमोहनसिंग यांच्याकडे कोणते खात्रीलायक आकडे होते ? २) "भारताची अर्थव्यवस्था उध्वस्त झाली", "निपोलियन मोमेंट", इ "भयानक आपात्ती दर्शविणारे" दावे करण्याच्या वेळी अमर्त्य सेन यांच्याकडे कोणते खात्रीलायक आकडे होते ? हे झाले फक्त "दोन जागतिक किर्तीच्या अर्थतज्ज्ञांनी" केलेले दावे, जे अनेक लहानमोठ्या विरोधकांनी "अटळ सत्य" असल्यासारखे वापरले. इतर छोटेमोठे लोक अनेक छोटेमोठे दावे करून गेले आहेत. फार दूर जायला नको. नोटबंदी विषयावरचे मिपावरचे घागे व प्रतिसाद त्यांच्या तारखांसह (तारखा पाहिल्या म्हणजे ते दावे घिसाडघाईने, घाईने कि योग्य वेळी केले गेले ते कळेल) चाळलेत तरी नको नको म्हणण्याइतपत मुद्दे मिळतील. ते आज परत वाचले तर त्यांची किंमत जाणायला अर्थतज्ज्ञ असायची गरज नाही ! मी ते शोधून देण्याची गरज नाही. ते तुम्हालाही मुक्तपणे उपलब्ध आहेत... ही तर जालावरच्या मुक्त संस्थळांची खासियत आहे, नाही का ?!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Fri, 03/03/2017 - 13:07 नवीन
मनमोहन सिंगांनी केलेला दावा हा अंदाज होता, हे मान्यच आहे. पण सरकारने अर्ध्या माहितीची खातरजमा न करताच जाहीर केलेला JDP चा आकडा ही घिसाडघाई ठरत नाही का ? (मी फक्त "घाई" हा शब्द वापरला असताना " 'घिसाड'घाई " हा शब्द एवढे उतेजीत होऊन वापरण्याचे प्रयोजन नाही समजले. सिनियर लोकांना प्रश्न विचारलेले आणि एक ठराविक पक्षाप्रतीच्या प्रामाणिकपणा बद्दल शंका उपस्थित केल्याचे आवडत नसावे, बहुदा..!!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
अ
अनुप ढेरे Fri, 03/03/2017 - 13:22 नवीन
हीच स्टँडर्ड पद्धत आहे. दरवेळेला आकडा करेक्ट होतो नवा नवा डेटा आला की. हे वाचा http://indianexpress.com/article/opinion/columns/india-gdp-fastest-growing-indian-economy2841900/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 03/03/2017 - 13:52 नवीन
(मी फक्त "घाई" हा शब्द वापरला असताना " 'घिसाड'घाई " हा शब्द एवढे उतेजीत होऊन वापरण्याचे प्रयोजन नाही समजले. सिनियर लोकांना प्रश्न विचारलेले आणि एक ठराविक पक्षाप्रतीच्या प्रामाणिकपणा बद्दल शंका उपस्थित केल्याचे आवडत नसावे, बहुदा..!!) http://www.misalpav.com/comment/923175#comment-923175 इथे विशुमत या आयडीने घिसाडघाईने कोणी अतिशयोक्त उदाहरणे आहेत, हे कळू शकेल का? हा मजकूर कोणी लिहिला ???!!! तो तुम्ही लिहिला नसल्यास समस्या आहे व आयडी हॅक झाल्याचे प्रशासनाला कळवावे. ;) (हघ्या) असो. मुळात घिसाडघाईने तुम्ही दावे केले असे मी कोठेच म्हटलेले नाही. तशी घिसाडघाई करणार्‍या तज्ज्ञ व तथाकथित तज्ञांना उद्येशून तो शब्द होता आणि त्याच्या पुराव्याखातर मी तुमच्या मागणीवरूनच दोन जागतिक किर्तीच्या अर्थज्ज्ञांनी ५० दिवसाची मुदत संपण्याच्या बर्‍याच आधी केलेले व केवळ कल्पनेवर आधारीत असलेले दावे दिले आहेत. ते घिसाडघाईने केलेले दावे अर्थकारणाने नव्हे तर राजकारणाने प्रेरीत होते हे मी आधिही म्हटले आहे आणि आजही माझे तेच मत आहे. हे पाहता, तुम्ही तो शब्द स्वतःच्या अंगावर ओढून घेण्याचे कारण समजले नाही ! मुख्य म्हणजे माझ्या कोणत्याच प्रतिसादातले कोणतेच वाक्य कोणत्याच एका मिपाकराला उद्येशून नाही... तो शब्द सर्वच भारतिय (व सद्या नोटबंदीचा विषय असल्याने विरोधी पक्षातील) राजकारण्यांसाठी सामायीकपणे लागू होतो आणि हे काही मीच पहिल्यांदा सांगत आहे असेही नाही. सर्वसामान्य नागरीकासाठीही ते गुपित नाही, याबद्दल तुम्ही सहमत असाल असा माझा अंदाज आहे. खाली एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे, माझे मत असे आहे... वेळ घेऊन, तथ्ये तपासून, विचारपूर्वक मत देण्याची पद्धतिची तुम्ही पाठराखण करता आहात हे स्वागतार्ह आहे. धन्यवाद ! माझेही तेच मत आहे. माझ्या मूळ प्रतिसादातला एक महत्वाचा मुद्दा, "विरोधकांकडून तसे पूर्वी झाले नव्हते व बर्‍याचदा होत नाही", असाच आहे :) फक्त आपल्याला सोईचे असेल तेव्हाच ते तत्व वापरावे, गैरसोईचे असले तर विसरावे, हे चुकीचे होईल, नाही का ? बाजू अंगावर आली की मुद्दा टाळणे हे भारतिय राजकारणात आश्चर्याचे नाही. तरीही, जर "पूर्ण माहिती घेऊन मगच विचारपूर्वक टीका करू" या विचाराने विरोधी पक्ष आता गप्प असले तर, जरी ते वागणे त्यांच्या भूतकाळाशी विसंगत असले तरीही, स्वागतार्हच आहे. त्या निमित्ताने भारतिय लोकशाही एक पाऊल पुढे गेली असे म्हणता येईल. आणि त्यामुळे मला आनंद व अभिमानच वाटेल. असो. गैरसमज सोडून इथेच थांबूया. यासंबंधी अजून काही नवीन आकडे-तथ्ये बाहेर आली तर परत चर्चा करूच. कसे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
फ
फेदरवेट साहेब Fri, 03/03/2017 - 13:09 नवीन
ते थांबले नाही तर मी ही थांबणार नाही असं एका वाक्यात म्हणले असते तरी भागले असते की म्हात्रे साहेब :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
न
नितिन थत्ते Fri, 03/03/2017 - 12:09 नवीन
रिज़र्व बॆंकेच्या नोटा मोजून झाल्या की नाही अजून?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 03/03/2017 - 12:57 नवीन
=)) =)) =)) छे, छे, ते काम "नोटा मोजण्यात तरबेज" असलेल्या लोकांइतके लवकर इतर कोणाला जमेल तरी का ? पण त्या लोकांनी तर सहकार्य करण्याऐवजी फक्त बॅकेबाहेर उभे राहून आपले चार हजार रुपये बदलून घेतले आणि मग फाटक्या खिशातून हात काढून दाखवला ! एक मात्र खरे हा चाचा, तेवढ्या चार हजार रुपयांत (आणि ते पैसे फाटक्या खिशातून खाली पडून गेले असले तर मग शून्य रुपयांत) इंग्लंडची वारंवार वारी कशी करता येते हे जाणून घ्यायची खूssssssप इच्छा आहे =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
म
मार्मिक गोडसे Fri, 03/03/2017 - 17:18 नवीन
अजून किती महिने लागणार आहेत खुसपटे काढायला सुचायला ?! =)) =)) =)) ते विनोद वाचायची नक्कीच घाई झाली आहे :) संशयकल्लोळ दूर व्हावा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 03/03/2017 - 18:08 नवीन
साहेब, खळबळजनक मथळा पाहून तुमचा धागा मी मोठ्या आशेने उघडला होता. परंतु, त्या छोटाश्या धाग्यात मुख्यतः नोटबंदीच्या काळात केलेले मोघम आरोप आणि मोघम वाक्यरचनाच आहेत. काही महत्वाचे आरोप असलेले त्या दुव्यातले दोन भाग असे आहेत... ...अर्थव्यवस्थेतील घसरणीची ही सुरवात असून एका वर्षात असंघटित क्षेत्रासह संघटित क्षेत्राचीही संपूर्ण माहिती, आकडेवारीतून जीडीपी दीड ते दोन टक्क्यांनीच खाली जाण्याचा अंदाज आहे. आणि आता मात्र त्यांच्यातही केंद्र सरकार हस्तक्षेप करून आपल्या सोयीनुसार आकड्यांचा खेळ करीत असल्याचे दिसते. त्यामुळेच सरकारी आकडेवारीत नकारात्मक बाबींकडे दुर्लक्ष करणे, तुलना करताना मागील विकासदर मुद्दाम कमी दाखविणे, असंघटित क्षेत्राची आकडेवारी लपविणे असे आरोप राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय बॅंकिंक क्षेत्रातून केले जात आहेत, याचीही गांभीर्याने नोंद केंद्र सरकारने घ्यायला हवी. शेवटी हा सरकार आणि देशाच्याही विश्वासार्हततेचा प्रश्न आहे. १. असे मोघम आरोप करताना संबंधात काही सबळ पुरावे दिले असते तर त्या छोट्याशा लेखाला जरा तरी विश्वासार्हता आली असती. आता तरी तसे म्हणता येत नाही. २. "...केंद्र सरकार हस्तक्षेप करून आपल्या सोयीनुसार आकड्यांचा खेळ करीत असल्याचे दिसते." अशी सुरुवात करून त्यानंतरच्या वाक्यात "याचीही गांभीर्याने नोंद केंद्र सरकारने घ्यायला हवी." असे म्हटले आहे. "सरकार घोळ करत आहे याची सरकारनेच नोंद घ्यावी" म्हणजे नक्की काय म्हणायचेय ?! :) त्याऐवजी, गैरप्रकार झाल्याचे पुरावे सादर करून ते थांबविण्याचा सरकारवर दबाव आणणे अपेक्षित होते. ३. वर उद्धृत केलेल्या आरोपांपैकी दुसर्‍या वचनामधिल "तुलना करताना मागील विकासदर मुद्दाम कमी दाखविणे" हा पुराव्याविना केलेला दावा/आरोप तर मी मूळ प्रतिसादात दिलेल्या राष्ट्रीय स्तरावरच्या वृत्तपत्राच्या संदर्भदुव्यातील मजकूरावरून धडधडीत असत्य दिसत आहे. त्या दुव्यात, "The Central Statistics Office (CSO) ने जीडीपी मोजताना... The growth rate was on a higher base after the CSO revised 2015-16 GDP growth rate to 7.9 per cent from the earlier provisional estimate of 7.6 per cent" असे स्पष्ट लिहिले आहे. म्हणजेच, जीडीपीचा वाढदर मोजताना सन २०१५-१६ चा अंदाजे (प्रोव्हिजनल) ७.६% हा दर न वापरता त्याऐवजी नवीन आकडे हाती आल्यानंतर वाढलेला ७.९% हा दर वापरलेला आहे. हे पाहिल्यावर तर मग बाकीच्या मोघम आरोपांचीही विश्वसनियता अजूनच कमी झाली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे Fri, 03/03/2017 - 19:02 नवीन
अर्थव्यवस्थेतील घसरणीची ही सुरवात असून एका वर्षात असंघटित क्षेत्रासह संघटित क्षेत्राचीही संपूर्ण माहिती, आकडेवारीतून जीडीपी दीड ते दोन टक्क्यांनीच खाली जाण्याचा अंदाज आहे. मी माझ्या अल्पमतीप्रमाणे त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करू शकतो. पण, सद्याच्या गरमागरमीच्या वातावरणात ते मी माझ्याजवळच ठेवून "वेट अँड वॉच" पॉलिसी स्वीकारली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 03/04/2017 - 09:46 नवीन
मी माझ्या अल्पमतीप्रमाणे त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करू शकतो. पण, सद्याच्या गरमागरमीच्या वातावरणात ते मी माझ्याजवळच ठेवून "वेट अँड वॉच" पॉलिसी स्वीकारली आहे. सहमत. ही उत्तम पॉलिसी आहे. डिमॉनेटायनचे सर्व परिणाम प्रत्यक्षात दिसायला आणि त्यामुळे अर्थकारणावर झालेले तातपुरते नकारात्मक आणि दीर्घकालिन सकारात्मक बदल आकड्यांत दिसायला २ ते ४ तिमाह्या जातील असे तर अनेक समतोल विश्लेषक पहिल्यापासून बोलत आहेत. माध्यमे टीआरपी खेचण्यासाठी "भडक-आकर्षक" गोष्टी चढाओढीने प्रसिद्ध करत असतात. त्यामुळे, समतोल विश्लेषकांच्या शांत शैलीपेक्षा राजकिय गदारोळ नेहमीच नको तेवढा भाव खाऊन जातो. :) मात्र, आकड्यांनी सिद्ध केलेल्या जीडीपीसारख्या पुराव्यांचे महत्व त्यामुळे कमी होत नाही. यावेळेस जीडीपीत फार मोठी घट आली असती किंवा त्याच्या मोजणीत काही गडबड असल्याचा संशय घेण्याजोगी जागा असती तर विरोधी पक्ष तिकडे दुर्लक्ष न करता सरकारवर हिरीरीने तुटून पडले असते, हे सांगायला फार मोठा अर्थतज्ज्ञ किंवा राजकारणी विश्लेषक असण्याची गरज नाही, नाही का ? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
न
नितिन थत्ते Sat, 03/04/2017 - 15:43 नवीन
>>अर्थकारणावर झालेले तातपुरते नकारात्मक आणि दीर्घकालिन सकारात्मक बदल आकड्यांत दिसायला २ ते ४ तिमाह्या जातील असे तर अनेक समतोल विश्लेषक पहिल्यापासून बोलत आहेत. पण कैच परिणाम झाला नै असं २-४ तिमाह्या न थांबताच सरकारने जाहीर करून (करवून?) टाकलं की !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
  • «
  • ‹
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • 13
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा