Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ऑपरेशन नोटा-रद्द आणि नोटा-बदल

ड
डॉ सुहास म्हात्रे
Sun, 11/13/2016 - 22:52
🗣 637 प्रतिसाद
नुकत्याच सरकारने अतिरेकी व काळाबाजारी लोकांवर अचानक ५०० व १००० रुपयांच्या नोटा रद्द करून एक प्रकारे "सर्जिकल स्ट्राईक" केला. या प्रकल्पाची मुख्य वैशिष्ठ्ये अशी : १. राष्ट्रीय महत्व : याचा भारताच्या अर्थकारणावर पडणारा प्रभाव सांगायला नकोच. २. प्रचंड आवाका : भारतासारख्या क्षेत्रफळाने आवाढव्य, भौगोलिक परिस्थिती व विकासाच्या अभावामुळे अनेक भाग असलेला व १२५ कोटी लोकसंख्या असलेल्या राष्ट्रातला प्रत्येक नागरीक प्रभावित होईल असा प्रकल्प. रद्द केलेल्या चलनी नोटा या सगळ्यांकडून परत घेऊन त्यांना नवीन नोटा देणे अत्यंत जिकरीचे काम आहे. ३. गुप्तता : सहा महिन्यांच्या तयारीच्या काळात व पंतप्रधान कारवाई जाहीर करेपर्यंत गुप्तता पाळणे हा या प्रकल्पाचा जीव होता. या एका मुद्द्यावर सर्व कारवाईचे मुख्य यशापयश अवलंबून होते. वरच्या दोन क्रमांकांच्या मुद्द्यात आलेल्या विवरणावरून + गेल्या ७० वर्षांत सरकारप्रणाल्यांमध्ये निर्माण झालेल्या हितसंबंधांच्या पार्श्वभूमीवर गुप्तता पाळणे हे काम किती कठीण होते हे सांगायला नकोच. माध्यमांत असलेल्या बातम्यांप्रमाणे या कारवाईच्या प्रकल्पाची काही रुपरेखा आता हळूहळू बाहेर येत आहे. त्याबद्दल मला समजलेले व भावलेले काही, थोडक्यात... काळापैसेवाल्यांना व अतिरेकी जाळ्याला या कारवाईचा वासही येऊ नये यासाठी बँकाच काय या कारवाईचा आराखडा फक्त निवडक मंत्री आणि आरबीआयचे अत्युच्च अधिकारी यांनाच माहीत होता.इतर कॅबिनेट मंत्र्यांनाही ही माहिती ऐन वेळेला दिली गेली, त्या मिटींगमला मोबाईल न आणण्याची सूचना होती. त्यांनतर मोदी राष्ट्रपतींना भेटून नंतर त्यांचे टीव्हीवरचे भाषण संपेपर्यंत सर्व मंत्री मिटिंग रूम मध्ये बसून होते. त्यानंतर वित्त मंत्रालय व आरबीआयची कारवाई सुरू झाली. बँकांना सर्व प्रकल्प समाजावून देण्यासाठी व बँकात नवीन २००० च्या नोटा व साथीला १०० च्या नोटा पोचविण्यासाठी ९ तारखेलाला बँका बंद ठेवणे आवश्यक होते. या नोटा अगोदर पाठविल्याने कारवाईची बातमी फुटली असती. तसेच, बातमी गुप्त ठेवण्यासाठी रु २०००च्या नवीन नोटांसाठी एटीएम मशीन्स ८ नोव्हेंबरच्या आधी कॅलिब्रेट करणे शक्य नव्हते. बातमी थोडीही बाहेर फुटली असती तर कारवाईमधली सगळी नाही तरी बरीचशी हवा निघून गेली असती... मुख्य म्हणजे बदमाषांनी आपला काळा पैसा इतरत्र गुंतवून अथवा अननुभवी सामान्य गरिबांच्या माथी मारून सरकारचे काम फार कठीण केले असते. त्याचसाठी पंतप्रधानांची घोषणा रात्री आठच्या सुमाराला आणि कारवाई सुरु होण्याची वेळ रात्री १२ वाजता ठेवली गेली. या चार तासात बँका बंद असल्याने बातमी कळली तरी काहीच फायदा नव्हता. बँकाचे लॉकर्सही पुढचा एक दिवस तरी उघडता येणे शक्य नव्हते. मला वाटते, या कारवाईतला हा शेवटचा घाव वर्मी बसणारा होता. केवळ आरबीआयच्या परिपत्रकाने अश्या गोष्टी सामान्य लोकांपर्यंत पोचत नाही आणि असे पत्रक सरळपणे न समजेल अश्या शासकीय व कायदेशीर भाषेत असते. वित्तमंत्रालयाच्या, आरबीआयच्या व करविभागाच्या अश्या परिपत्रकांबद्दल सीए सुद्धा संभ्रमात असतात व निर्णय देण्यापूर्वी बाबूलोकांच्या विश्लेषणाची वाट पहातात, हे आपण नेहमी पाहतोच. स्वतः पंतप्रधानांनी आदल्या रात्री टीव्हीवर बातमी सांगून लोकांमध्ये शक्य असलेले अफवांचे पीक टाळले. मला वाटते पूर्वीच्या अश्या प्रकारच्या कारवायांत टाळलेली आणि आता आवर्जून पंतप्रधानांकरवी सर्व जनतेला संबोधून माहिती देणारी ही पायरी "मास कम्युनिकेशन"ची नाडी पक्की माहीत असल्याचे लक्षण आहे. कारवाईचा त्रास होऊनही व काही नेत्यांची उसकवणारी वक्तव्ये येवूनही लोकक्षोभ न होण्याचे हे महत्वाचे कारण आहे, असे मला वाटते. इतर काही असले तरी, इतकी बंधने असलेली, इतक्या थोड्या वेळेत करायची, एवढी मोठी कारवाई भारतासारख्या आवाढव्य देशात करण्यात अपेक्षित होता त्यापेक्षा कमी गोंधळात आणि सामान्य लोकांच्या उत्तम सहकार्याने काम चालू आहे असे माध्यमांतील बातम्यांवरून दिसते आहे. असा प्रकल्प पूर्णपणे आलबेल प्रकारे होईल हे अपेक्षित नव्हतेच. ज्यांना मोठ्या प्रकल्पांची थोडीबहुतही माहिती आहे त्यांना तसा विचार शेखचिल्लीचे स्वप्न वाटेल. यासंदर्भात, सार्वत्रिक निवडणूकीच्या वेळेस किती आठवडे/महिने तयारी केली जाते व त्यानंतरही ती निवडणूक अनेक विभागांत, दीडदोन महिन्यांच्या कालावधीत घेतली जाते, याची आठवण उपयोगी ठरेल. मुख्य म्हणजे विरोधी पक्षांनी या देशाच्या फायद्याच्या कारवाईत मदत तर केली नाहीच. पण, सुरुवातीच्या एकदोन दिवसांत, बसलेल्या धक्क्यात काय करावे हे न कळल्याने, पहिल्यांदा सरकारचे हे पाऊल बरोबर आहे असे म्हणून टाकले आणि नंतर "पण-परंतू" असे बोलत दिशाभूल करणार्‍या गोष्टी सुरू झाल्या आहेत. काहीजण लोकभावना भडकाव्या अशीच वक्तव्ये आणि कारवाया करत आहेत. काही जण तर ही पूर्ण कारवाईच मागे घ्या असे म्हणत आहेत ! हे अपेक्षित आहेच म्हणा. सरकारने यालाही तोंड देण्याची तयारी ठेवायला हवी, ठेवली असेलच. सर्वसामान्य लोक मात्र त्या वक्तव्यांनी फारसे प्रभावित न होण्याइतके प्रगल्भ झालेले पाहून एक भारतिय म्हणून आनंद व अभिमान वाटला. हा तर एका टेकडीचा टप्पा आहे, भारत पुरेसा भ्रष्टाचारमुक्त करायला अख्खा पर्वत चढून जायला लागेल. त्या वाटेत अनेक समस्या येतील, एखादी कारवाई फसेलही. कारण ७० वर्षांत काळ्या पैशाने गडगंज झालेले लोक ना निर्बुद्ध आहेत, ना ते तो पैसा सहजासहजी सोडतील. सरकारच्या कारवाया अयशस्वी व्हाव्या यासाठी ते त्यांची सर्व हुशारी व नवे-जुने हितसंबंध वापरून सर्व भले-बुरे (मुख्यतः बुरेच) मार्ग चोखाळतील, यात शंका नाही. काही सरकारी अधिकारी आणि सत्ताधारी व गटबंधनातल्या पार्टीतल्या लोकांचे अंतर्गत हितसंबंधही गुंतलेले असतील. तो गुंताही सोडवावा लागेल. अनेक अपेक्षित आणि अनपेक्षित घटनांना सामोरे जायची तयारी ठेवावी लागेल. अशी तयारी आहे असेच संकेत सद्या तरी दिसत आहेत. आतापर्यंत या कारवाईतल्या दोन तृटी बाहेर आल्या आहेत. पहिली म्हणजे रु२००० च्या नोटेवर हिंदीत "दोन हजार रुपया" असे छापलेले आहे. दुसरे म्हणजे नोटांचा रंग पाण्यात विरघळतो व फिकट होतो आहे अश्या बातम्या आहेत. मोठ्या प्रमाणात सामग्रीची जुळवाजुळव करत असतानाच गुप्तता आणि घाई पाळायला लागयामुळे याप्रकारे नोटांची प्रत कमी होणे झाले असावे. मात्र जोपर्यंत भारत सरकार त्या नोटांना "लीगल टेंडर" मानते आहे तोपर्यंत ते केवळ "टेक्निकल एरर" असतील व त्यांचा नागरिकांवर त्याचा प्रभाव पडणार नाही. आताचा गडबड गोंधळ ताब्यात आल्यावर मात्र याबाबत पावले उचलणे अत्यावश्यक ठरेल. त्यासंबंधी एखादा प्रकल्प आरबीआय आत्ताच तयार करत नसल्यास आश्चर्य वाटेल. माझ्या अंदाजाप्रमाणे ५०० व १००० च्या पुरेश्या नोटा चलनात आल्यावर या नोटांना बँकिंग व्यवहारातून हळू हळू काढून / बदलून टाकण्याची कारवाई होईल. कारण, पहिल्यापेक्षा जास्त किंमतीच्या (पक्षी : ५०० व १००० ऐवजी २०००च्या) नोटा कारवाई गुप्त ठेवण्यासाठी व तसे करताना कारवाईचा सुरुवातीचा भार (कागद, शाई, छपाई, साठवण, वाहतूक, वितरण, इ) अर्धा करण्यासाठीच वितरीत केल्या जात आहेत. परंतु, या कारवाईसंबंधीच्या जनतेच्या प्रतिसादाने अंतीम यशाच्या आशा उंचावल्या आहेत. कारण, काळ्या पैश्याच्या निर्मुलनातली हीच एक पायरी आहे की जिच्याशी सामान्य जनतेचा तडक संबध येतो व त्याला त्रास होतो. इतर पायर्‍यांत सामान्य जनतेला फारसा त्रास असण्याची शक्यता फार कमी आहे. ही व पुढच्या पायर्‍या यशस्वी होऊन भ्रष्टाचारमुक्त झालेला भारत पहायला मिळण्यासारखा दुसरा आनंद नसेल !
वर्गीकरण
अर्थकारण
राजकारण
देशकारण

प्रतिक्रिया द्या
133576 वाचन

💬 प्रतिसाद (637)
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 11/14/2016 - 12:30 नवीन
खोडसाळपणा किंवा फालतूपणा करणे माझ्या स्वभावात नाही आणि तो सहन करणेही माझ्या स्वभावात नाही. या प्रतिसादासह वरचे तुमचे प्रतिसाद परत एकदा वाचून पहा ! अनवधानाने काही वाक्यरचना लिहीली गेली असली तरी त्याने वाचकांचा समज-गैरसमज होऊ शकतो. मुक्त संस्थळावरची लिखित वाक्ये तेथे तशीच राहत असल्याने व सगळ्यांना वाचता येत असल्याने, नंतर त्यांचे दडपून समर्थन करणे कठीण जाते. तेव्हा प्रत्येक शब्द नीट विचार करून लिहावा असे माझे मत आहे. तसे तुमचे मत असावे असा माझा आग्रह नाही. बाकी तुमच्या इतर प्रतिसादांना वर उत्तर दिले आहेच. माझीही सूचना :) जर सभ्य भाषेत संवाद चालू ठेवण्याची तयारी असेल तर तो करायला मला नेहमीच आनंद वाटेल. अन्यथा, कर्कश्य व असंवैधानिक भाषेमुळे वितंडवाद होतो, ज्यात मला अजिबात रस नाही. पुढच्या प्रतिसादाला उत्तर आले नाही तर ते का आले नाही (निदान प्रतिवाद सुचत नाही म्हणून तर नाहीच नाही) हे समजावे यासाठी हे शेवटचे विधान आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
म
मराठी कथालेखक Mon, 11/14/2016 - 19:26 नवीन
कर्कश भाषा मी सुरु केली नाही. शिवाय माझा मुद्दाच तुम्हाला कळाला नाही आणि उगाचच मी या 'कारवाई/मोहिमेला विरोध करत आहे' असा तुम्ही समज निर्माण करुन घेतलात. माझा मुद्दा साधा सरळ होता तो म्हणजे उत्साहाच्या भरात या कार्वाईचे नसलेले उद्दिष्ट तुम्ही त्यास चिकटवत आहात. असो. चर्चा मुद्द्यापासून भरकटत असल्याने अधिक चर्चा करण्यात रस नाही. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 11/15/2016 - 07:45 नवीन
हा तर एका टेकडीचा टप्पा आहे, भारत पुरेसा भ्रष्टाचारमुक्त करायला अख्खा पर्वत चढून जायला लागेल. हा आणि... ही व पुढच्या पायर्‍या यशस्वी होऊन भ्रष्टाचारमुक्त झालेला भारत पहायला मिळण्यासारखा दुसरा आनंद नसेल ! हा मजकूर मूळ लेखात आहे. दुसरे विधान तर लेखाच्या शेवटी आणि ठळक अक्षरांत आहे. असे असतानानी या "एकाच" कारवाईने सगळा भ्रष्ताचार कसा संपणार ? असा प्रश्न लेखासंबधी करून कोण बरे... उत्साहाच्या भरात या कार्वाईचे नसलेले उद्दिष्ट तिला किंवा लेखाला चिकटवत आहे ? छान छान ...चला भ्रष्टाचारमुक्त भारताचं 'स्वप्न' रंगवूयात !! असा कर्कशपणा कोणी सुरू केला हे तुमच्या ध्यानात आले नाही तरी वाचकांच्या ते ध्यानात येतेच. इथला सगळा मजकूर सगळ्यांना वाचायला इथेच असणार आहे. इथे काहीही कबूल करायची गरज नाही, कारण तो उद्येश नाहीच. फक्त शांतपणे सर्व विचार केला तर सगळे ध्यानात येईल. लेख नीट न वाचता केल्या जाण्यार्‍या कर्कश्य आणि भरकटवणार्‍या प्रतिक्रिया बंद झाल्या तर त्याचे स्वागतच आहे. धन्यवाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
म
मराठी कथालेखक Tue, 11/15/2016 - 10:11 नवीन
बरं .. तुमचं(च) खरं... तुम्हीच ते मोठे.. आता खुष ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 11/16/2016 - 09:57 नवीन
धन्यवाद, पण नको धन्यवाद ! (पक्षी : थँक्स, बट नो थँक्स !) :) आता तुम्ही, कुत्सितपणे का होईना पण, मोठेपणा दिला आहेच, तर त्याचा फायदा घेऊन काही सर्वमान्य विचार खाली देत आहे. ते नवीन नक्कीच नाहीत, पण महत्वाचे जरूर आहेत... १. सार्वजनिक संस्थळावरचे लेखन (उदा: मिपावरचे लेख व प्रतिसाद) सर्वच वाचकांना दीर्घकाळ वाचायला उपलब्ध राहते, त्यामुळे... २. आपले प्रतिसाद, लेख किंवा त्यावरच्या इतर प्रतिसादांमधील लेखनावर आधारलेले असावेत; किमान त्याच्या केलेल्या विपर्यासावर किंवा स्वतःच्या कल्पनेने बनवलेला व लेखात/प्रतिसादात नसलेला मुद्दा रेटून केलेल नसावे. (माणुस म्हटले की एखादी चूक होणारच, चुकून तसे झाले तर ते स्विकारण्याइतका मनाचा मोठेपणा बाळगावा.) कारण... ३. आंतरजालावरच्या आभासी जगात, प्रत्येकाची ओळख व पत, त्याच्या लिखाणाच्या नीतीवरून व प्रतीवरून ठरते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
ग
गंम्बा Mon, 11/14/2016 - 11:29 नवीन
घरात रोज बाहेरुन धुळ / कचरा येतच असतो. ती धुळ येणे काही बंद करता येणार नाही म्हणुन आत्ता आज घरात साठलेली धुळ्/कचरा आहे तो स्वच्छच करायचा नाही का? नविन होणारा भ्र्ष्टाचार थांबणार नाही, पण आधी जमा झालेला काळा पैसा १० टक्क्यानी जरी कमी झाला तरी मी ही योजना यशस्वी झाली असे म्ह्णीन. नविन होणारा भ्रष्टाचार आणि करचुकवे पणा नक्कीच थोडा कमी होइल कारण त्या लोकांना थोडी धास्ती तर नक्कीच वाटेल. ------- हे ही लक्षात घ्या की, जितका पैसा जमा होणार नाही, तो थेट आरबीया चा नफा असेल. म्हणजे १४ लाख कोटी पैकी १ लाख कोटी बँकेत भरलेच गेले नाहीत तर आरबीआय ला १ लाख कोटीचा फायदा होइल. बजेट डेफीसीट एकदम कमी होइल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
म
मराठी कथालेखक Mon, 11/14/2016 - 11:50 नवीन
नविन होणारा भ्र्ष्टाचार थांबणार नाही, पण आधी जमा झालेला काळा पैसा १० टक्क्यानी जरी कमी झाला तरी मी ही योजना यशस्वी झाली असे म्ह्णीन.
मला हेच म्हणायचे आहे. असलेला काळा पैसा कमी करणे , आणि खोट्या नोटांचा बंदोबस्त करणे हा या पूर्ण मोहीमेचा खरा उद्देश आणि तो काही यशस्वी होईल यात शंका नाही. पण मोहीमेचे स्वागत करताना, उत्साहाच्या भरात नसलेले उद्दिष्ट त्या मोहिमेला चिकटवले जावू नये (भ्रष्टाचारमूक्त भारत) नाहीतर पुढे भ्रष्टाचार होताना पाहिल्यावर ही तुम्हालाच ही मोहीम अयशस्वी वाटण्याची शक्यता निर्माण होते. झालेच तर या मोहीमेमुळे उत्तरप्रदेश वगैरे राज्यांत निवडणूकांत भाजपला काही प्रमाणात फायदा होण्याची शक्यता आहे. कारण काही धनदांडगे काळ्याचे पांढरे करताना आसपासच्या गरीब मंडळींची मदत घेतील आणि त्यावेळी या गरीबांना काही प्रमाणात मोबदला मिळेल. अगदी लाखाला पाच-दहा हजार इतका मिळाला तरी ती मंडळी , भाजपच्या निर्णयामुळे श्रीमंतांचे काही पैसे आपल्याला मिळाले यामुळे खूष होवून भाजपला मत देण्याची शक्यता आहे. टीपः मी इथे केवळ एक शक्यता वर्तवत आहे, यात मी चूक्/बरोबर वगैरे भाष्य करत नाहीये किंवा मोदी/भाजपवर आक्षेप घेत नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंम्बा
म
मृत्युन्जय Mon, 11/14/2016 - 14:05 नवीन
मला हेच म्हणायचे आहे. असलेला काळा पैसा कमी करणे , आणि खोट्या नोटांचा बंदोबस्त करणे हा या पूर्ण मोहीमेचा खरा उद्देश आणि तो काही यशस्वी होईल यात शंका नाही. पण मोहीमेचे स्वागत करताना, उत्साहाच्या भरात नसलेले उद्दिष्ट त्या मोहिमेला चिकटवले जावू नये (भ्रष्टाचारमूक्त भारत) नाहीतर पुढे भ्रष्टाचार होताना पाहिल्यावर ही तुम्हालाच ही मोहीम अयशस्वी वाटण्याची शक्यता निर्माण होते. परफेक्ट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
ट
ट्रेड मार्क Tue, 11/15/2016 - 17:57 नवीन
काळा पैसा बाहेर काढण्यासाठी आणि भ्रष्टाचार थांबवण्यासाठी ही एकुलती एक कृती होती असं तुम्हाला वाटतंय का? या आधी आणि यापुढे पुढे काहीच केलं जाणार नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे का? भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा कायमच चालू राहणार कारण जो पर्यंत लोकांना भ्रष्टाचार म्हणजे नक्की काय आणि तो करणे कसे व का चुकीचे आहे हे कळणार नाही तो पर्यंत सतत भ्रष्टाचार रोखण्यासाठी काही ना काही कृती करायला लागणार. भ्रष्टाचारमुक्त भारताचं 'स्वप्न' रंगवायला काहीच हरकत नाही कारण तेव्हाच स्वप्नपूर्ती कशी करावी याचा विचार होतो. याचा अर्थ लगेच रामराज्य येईल, घरांच्या किंमती कमी होतील व स्वस्ताई येईल असा नाही. पण हे पाऊल उचलणे महत्वाचे होते आणि धाडसाचे पण होते. ते धाडस मोदींनी दाखवले. यामुळे भाजपमधील, विरोधी पक्षातील आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या कितीतरी नेत्यांची आणि काळाबाजारयांची अडचण झाली असणार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
स
संदीप डांगे Mon, 11/14/2016 - 09:18 नवीन
ती राजकीय पक्षांच्या फंडात पैसे भरायची काय भानगड आहे माहित आहे का कुणाला? वीस हजार पर्यंत कॅश भरली तर दात्याचे नाव जाहीर केले जात नाही असे ऐकले आहे, तसेच राजकीय पक्ष आपले अकाऊंट्स, देणग्या जाहीर करत असतात काय?
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Mon, 11/14/2016 - 09:25 नवीन
तसेच राजकीय पक्ष आपले अकाऊंट्स, देणग्या जाहीर करत असतात काय?
एक राजकीय पक्ष होता. त्याने पक्षाला मिळालेल्या सगळ्या देणग्या वेबसाईटवर टाकल्या होत्या. पण ती यादी आता वेबसाईटवरून नाहिशी झाली आहे असे म्हणतात :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
प
प्रसाद_१९८२ Mon, 11/14/2016 - 11:12 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
अ
अनुप ढेरे Mon, 11/14/2016 - 09:25 नवीन
बरोबर आहे माहिती. सर्व पार्ट्या यात आहेत, आप देखील. भरपूर काळा पैसा जमा होतो यातून. इथे स्ट्राईक केला मोदींनी तर आयुष्यभर मत देईन त्यांना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 11/14/2016 - 11:13 नवीन
Under Section 13A of the Income Tax Act, political parties are exempt from paying Income Tax but are required to file their Income Tax returns annually to the Income Tax Department. They enjoy 100% tax exemption from all sources of income.
याबद्दल सुलभ प्रकारे अधिक माहिती इथे मिळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Mon, 11/14/2016 - 14:47 नवीन
या प्रकारे राजकीय पक्षांकडे नक्की किती गंगाजळी आहे व ती कुठून आली याची माहिती जनतेला उपलब्ध होते काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
म
मोदक Mon, 11/14/2016 - 19:47 नवीन
सर्वसामान्य जनतेला नाही, पण या गोष्टींचे (ही) फर्स्ट हॅन्ड रिपोर्ट मिळतात असे ऐकून आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Mon, 11/14/2016 - 21:12 नवीन
मोदक भाऊ, तुम्ही खोचक कमेंट्स करत आहात का? असल्यास का व नसल्यास प्रश्नाचे स्पष्ट उत्तर द्या किंवा इग्नोर मारा, सिम्पले! का भाजपची गंगाजळी किती हा प्रश्न येईन म्हणून दिशाभ्रम करत आहात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
प
पैसा Tue, 11/15/2016 - 05:50 नवीन
२०१३-१४ चे ऑडिटेड बॅलन्स शीट मिळतात ब्वा नेटवर. http://eci.nic.in/eci_main/mis-Political_Parties/AAR2014/AA%202013-14%20BJP.pdf http://eci.nic.in/eci_main/mis-Political_Parties/AAR2014/INC%20Annual%20Audit%20Report.pdf http://eci.nic.in/eci_main/mis-Political_Parties/AAR2015/Nationalist%20Congress%20Party_AAR2014-15.pdf असेच बाकीच्यांचेही मिळतील. बेहिशेबी रोकडा किती मात्र म्हैत नै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Tue, 11/15/2016 - 06:10 नवीन
धन्स अ लॉट! नेमके उत्तर पाहिजे होते. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
अ
अनुप ढेरे Tue, 11/15/2016 - 06:01 नवीन
ती कुठून आली याची माहिती जनतेला उपलब्ध होते काय?
२००००च्या आतली रक्कम कॅशने स्वीकारता येते. ती कशी आली याची काहीही माहिती ठेवावी लागत नाही बहुधा. सर्व राजकीय पक्ष काळा पैसा पक्षात असाच आणतात. इथे सर्जिकल स्ट्राईक करणार का मोदी माहिती नाही. केला तर आदर प्रचंड दुणावेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Tue, 11/15/2016 - 06:09 नवीन
हेच, इकडे सर्जिकल strike होतो का पाहू! सर्वात आधी इथेच व्हायला पाहिजे होतं, आता 19500 च्या नोटांची भरती पक्षांच्या खात्यात होत असेल तर त्याची काही माहिती पब्लिक डोमेन ला येईल काय देव आणि मोदीच जाणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
प
पैसा Tue, 11/15/2016 - 08:29 नवीन
कोणत्याच पक्षाची ही माहिती पब्लिक डोमेनमधे येणार नाही. कारण बँकेत पैसे भरताना ते एकदम सगळी कॅश भरतात. प्रत्येक माणसाची वेगळी रिसिट दाखवणार नाहीत. आणि कोणत्याही बँकेचे एकेक एन्ट्री दाखवणारे स्टेटमेंट थर्ड पार्टीला मिळणे शक्य नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
अ
अन्नू Mon, 11/14/2016 - 09:55 नवीन
आत्ताच मोदींची स्पिच ऐकली त्यातलं एक वाक्य.. "गरीब चैनीत झोपत आहेत आणि श्रीमंत पैसेवाले झोपेच्या गोळ्या घेत आहेत!" त्यावर एक झलक... https://www.facebook.com/freethinker/videos/10154697477823609/ कदाचित हे खरबोपती असावेत!
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 11/14/2016 - 10:48 नवीन
नोटा रद्द करण्याच्या हेतूवर अजिबात शंका नाही. या निर्णयाचे चांगले परीणाम देखील बघायला मिळत आहेत. पुण्यात एकाने १००० च्या ५२ नोटा कचर्‍यात फेकून दिल्या. म्हणजे ५२००० रूपयांचे बेहिशेबी उत्पन्न अर्थव्यवस्थेतून नाहीसे झाले. सोलापूरच्या महापौर बाईंनी अनेक वर्षे मालमत्ता कर भरला नव्हता. नोटा रद्द केल्यावर घरातील ५००-१००० च्या नोटा आणून सव्वा लाख रूपये मालमत्ता करून गेल्या अनेक वर्षांची थकबाकी चुकविली. सर्व महापालिका, नगरपालिकांना थकीत करभरणा मिळत आहे. एकंदरीत असे बरेच चांगले परीणाम दिसत आहेत. परंतु या चांगल्या निर्णयाच्या अंमलबजावणीत काही त्रुटी राहिल्या आहेत असे दिसते. नोटा रद्द करण्याचा निर्णय ठरल्यानंतर ५०० च्या नवीन नोटा व २००० च्या नोटा ८ नोव्हेंबर पूर्वीच मोठ्या संख्येने तयार करून ठेवायला पाहिजे होत्या. म्हणजे त्यांचे लगेच वितरण होऊन नागरिकांना कमी त्रास झाला असता. एटीम यंत्रांचे कॅलिब्रेशनदेखील आधीच करायला हवे होते. त्यामुळे आता जो गोंधळ सुरू आहे तो कमी प्रमाणात झाला असता.
  • Log in or register to post comments
न
नाखु Mon, 11/14/2016 - 11:17 नवीन
आधीच छापुन ठेवल्या नाहीत असेच काल मोदींनी भाषणात सांगीतले आहे.टिप देणारे सरकारी बाबूंनी याचा उपयोग करून घेतला असता आणि जुन्या नोटांची आधीच वासलात लागली असती. नोटा फेकण्यापेक्षा आपत्ग्रस्त शेतकर्यांच्या खात्यात भरा असे मक्याभाऊंनी आवाहन केले आहे. खरेच सरकारी बाबूंनी याचा विचार करावा आणि जमेल तितका दुवा तरी घ्यावा.,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Mon, 11/14/2016 - 16:36 नवीन
आधी छापून ठेवून तयार ठेवता आल्या असत्या व ९ नोव्हेंबर पासून वितरीत करता आल्या असत्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
अ
अनुप ढेरे Mon, 11/14/2016 - 11:18 नवीन
थकित वीज बिलाच्या भरण्यात दसपट वाढ ! http://energy.economictimes.indiatimes.com/news/power/currency-note-ban-sends-electricity-bill-collection-in-up-through-the-roof/55395506
  • Log in or register to post comments
ग
गंम्बा Mon, 11/14/2016 - 11:31 नवीन
हा फायदा ही लक्षात घ्यावा टिका करणार्‍यांनी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
प
पद्माक्षी Mon, 11/14/2016 - 12:00 नवीन
हा पण एक फायदा :), पुण्यात ५ दिवसात एकही घरफोडी नाही. http://timesofindia.indiatimes.com/city/pune/With-cash-in-banks-house-break-ins-peter-out/articleshow/55405400.cms
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंम्बा
स
साधा मुलगा Mon, 11/14/2016 - 12:06 नवीन
कालच श्री.अनिल बोकील म्हणाले होते कि २६ जुलै नन्तर मुंबईत ३ दिवस एकही FIR दाखल झाला नाही, पुण्यात ५ दिवसात एकही घरफोडी नाही.---- हि भारतीय दैवी वृत्ती वर आल्याची पुनरावृत्ती आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्माक्षी
प
पद्माक्षी Mon, 11/14/2016 - 12:26 नवीन
रामराज्य म्हणायचंय का तुम्हाला :-P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साधा मुलगा
स
साधा मुलगा Mon, 11/14/2016 - 12:30 नवीन
तेच हो , काल TV वर झालेल्या श्री. बोकील यांच्या मुलाखतीचा संदर्भ घेऊन बोलत आहे, :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्माक्षी
र
राघवेंद्र Mon, 11/14/2016 - 16:20 नवीन
माझे मित्र भारतात जाताना त्यांच्या काही ५००-१००० च्या नोटा त्यांच्या नातेवाईकांना देण्यासाठी सांगत आहेत. मी सगळ्यांना हो म्हणालो तर एकूण रक्कम ५०,०००-६०,००० होत आहे. माझा प्रश्न असा आहे, विमानतळावर याचा काही प्रॉब्लेम होऊ शकतो का ?
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Mon, 11/14/2016 - 16:31 नवीन
हो...फक्त ७५०० आणायला परवानगी आहे बहुतेक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघवेंद्र
र
राघवेंद्र Mon, 11/14/2016 - 16:50 नवीन
तोच तर प्रॉब्लेम आहे. रु. ७५०० प्रति माणशी. काही वेबसाईट म्हणतात की प्रत्येक मित्राची पॅन कार्ड फोटोकॉपी घेऊन नेली तर चालेल. पण खरे खोटे काही माहित नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 11/14/2016 - 18:07 नवीन
आरबीआयच्या संस्थळावर खालील माहिती आहे... 18. While coming into India how much Indian currency can be brought in? A person coming in to India from abroad can bring in with him Indian currency notes within the limits given below: a. upto Rs. 5,000 from any country other than Nepal or Bhutan, and b. any amount in denomination not exceeding Rs.100 from Nepal or Bhutan. 19. While going abroad how much Indian currency can be taken out? A person going out of India can take out with him Indian currency notes within the limits given below: a. upto Rs.5000 to any country other than Nepal or Bhutan, and b. any amount in denomination not exceeding Rs.100 to Nepal or Bhutan.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघवेंद्र
र
राघवेंद्र Mon, 11/14/2016 - 19:05 नवीन
आता ५००-१००० च्या नोटा बंद झाल्याने त्यात सुद्धा थोडी वाढ करायला पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
श
श्रीरंग_जोशी Tue, 11/15/2016 - 03:57 नवीन
रिझर्व बँकेच्या संस्थळावर उपलब्ध असलेल्या १९ जून २०१४ च्या या पत्रकानुसार भारतातून बाहेर* जाताना व बाहेरुन* परत येताना भारतीय चलन नेण्याची व आणण्याची प्रति व्यक्ती कमाल मर्यादा ₹२५,००० इतकी आहे. (*या बाहेरमध्ये पाकिस्तान, बांग्लादेश, नेपाळ व भूतान यांचा समावेश नाही). रिझर्व बँकेनुसार ₹२५,००० इतकी कमाल मर्यादा असुनही, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कस्टम्स विभागाच्या संस्थळावर ही मर्यादा ₹७,५०० इतकीच आहे. रिझर्व बँकेच्या ससंस्थळावर या विषयाचे अधिक नवे पत्रक शोधण्याचा प्रयत्न केला असता ते मिळाले नाही. बहुतेक तरी रिझर्व बँकेनी तेव्हाची ₹२५,००० ही कमाल मर्यादा कमी केलेली नाही. या ठिकाणी रिझर्व बँक जरी नियमन यंत्रणा असली तरी अंमलबजावणी कस्टम्स विभागालाच करायची आहे. आपल्या देशात दुर्दैवाने विविध सरकारी विभागामंध्ये एकवाक्यता नसते. हे झाले जे लोक ३० डिसेंबर अथवा ३१ मार्चपर्यंत भारतात जाऊ शकणार्‍या मंडळींसाठी. इतरांना स्वतःच्या NRO खात्यात जुन्या नोटा भरायला सांगितले जात आहे परंतु परदेशातून तसे करण्याचा पर्याय सध्या तरी उपलब्ध नाहीये. १० तारखेला वाचलेल्या एका बातमीनुसार युकेतल्या भारतीय डेप्युटी हाय कमिशनर यांनी परदेशस्थ भारतीयांकडल्या जुन्या ₹५०० व ₹१,००० च्या नोटा बदलून देण्याच्या सोयीस्कर पर्यायांसाठी प्रयत्न करू असे सांगितले आहे. आशा आहे की येत्या काही दिवसात सरकारपातळीवरुन याबाबत काही तरी ठोस पाऊल उचलले जाईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघवेंद्र
श
श्रीरंग_जोशी Mon, 11/21/2016 - 14:02 नवीन
वरच्या प्रतिसादात मुंबई विमानतळाच्या कस्टम्सच्या संस्थळावर रिझर्व बँकेपेक्षा कमाल मर्यादा बरीच कमी असल्याने मी ही बाब लक्षात आणून देण्यासाठी mumbaiaircustoms@nic.in या पत्त्यावर १७ तारखेला इमेल पाठवला होता. आज त्याचे उत्तर मिळाले. ते असे... As per the Reserve Bank of India guidelines:- Any passenger resident in India
  • who had gone out of India on a temporary visit, may bring into India at the time of his return from any place outside India (other than from Nepal and Bhutan), currency notes of Government of India and Reserve bank of India notes up to an amount not exceeding Rs. 25,000 (Twenty Five Thousand Only) per person.
  • Any person resident outside India, not being a citizen of Pakistan, Bangladesh, and visiting India, may bring into India currency notes of Government of India and Reserve bank of India notes up to an amount not exceeding Rs. 25,000 (Twenty Five Thousand Only) per person.
For further clarification, you may visit Reserve Bank of India official website https://www.rbi.org.in/Scripts/FAQView.aspx?Id=66 where the issue is clarified under FAQ no 04. SUPERINTENDENT OF CUSTOMS VIGILANCE SECTION, CSI AIRPORT, MUMBAI मी त्यांना धन्यवाद देताना त्यांच्या संस्थळावरील कमाल मर्यादेत दुरुस्ती करण्यास सुचवले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 11/21/2016 - 15:47 नवीन
एकदम ब्येस्ट केलंत ! धन्यवाद ! केवळ त्रासाबद्दल ओरड न करता सुजाण नागरिकांनी केलेल्या दुसर्‍यांना उपयोगी होऊ शकणार्‍या उत्तम सकारात्मक कृतीचे अजून एक उदाहरण !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
ख
खटपट्या Mon, 11/21/2016 - 17:32 नवीन
खूप खूप धन्यवाद श्रीरंग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
इ
इरसाल Wed, 11/23/2016 - 08:26 नवीन
हेच तर चुकतं श्री. श्रीरंग जोशी यांच, असं काही माहित पडल्या पडल्या त्यांनी आधी ट्विटरवर बोंब ठोकायला हवी होती, असतील नसतील तितक्या व्हाट्सप गृप्स वर ठणाणा करायला हवा होता, फेसबुकवर पोस्टी टाकुन शंख करायला हवा होता, मिपावर एक जळजळीत धागा पेटवायला हवा होता गेला बाजार शक्य असल्यास पॉम्प्लेट छापुन विमानतळावरच्या क्स्टमस्च्या ऑफिस समोर ते भिरकावुन रामलीला मैदानीय ठिय्या द्यायला हवा होता. ह्यांनी काय केलं तर म्हणे तिथे मेल टाकुन दुरुस्ती सुचवुन बाकीच्या लोकांची मदत करायचा चंग बांधला. ह्यअ‍ॅ....अस कोणी करतं का ???????????? जर पुन्हा तुम्ही असं करताना सापडलात किंवा दिसलात किंवा कळले तर मग बघाच.........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 11/23/2016 - 10:56 नवीन
नायतर काय ! अश्याने राजकारणात येण्याचे चान्सेस शून्य करून घेत आहेत, ते वेगळेच =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल
स
समर्पक Mon, 11/14/2016 - 22:56 नवीन
उगीच नाही त्या फंदात पडू नका असे मी तरी सांगेन... स्वतःचे पैसे फक्त बरोबर बाळगा, नसती समाजसेवा अंगाशी येऊ शकते. भा.री. बँकेच्या म्हणण्याप्रमाणे अनिवासी भारतीय आपापल्या एन आर ओ खात्यात पैसे भरू शकतात. भा.री. बँक पत्रक : https://rbi.org.in/Scripts/FAQView.aspx?Id=119 बँकांची यादी : https://rbidocs.rbi.org.in/rdocs/Content/pdfs/71206.pdf दुसऱ्या एका धाग्यात म्हंटल्याप्रमाणे कळत-नकळत 'हम सब चोर है' चे अजून एक उदाहरण म्हणजे अनेक अनिवासी भारतीयांकडे (६ महिन्यांहून अधिक वास्तव्य) एन आर ओ/इ खातेच नाहीये, झूम वगैरे सेवा वापरून आपले भारतातील बचत खात्यात असेच पैसे पाठविले जात आहेत... Import and Export of Indian Currency are “Restricted”. However, (i) any person resident in India is allowed to take outside India currency notes of Government of India and Reserve Bank of India notes upto Rs. 7,500/- per person; (ii) any person resident in India who had gone out of India on a temporary visit, is allowed to bring into India at the time of his return from any place outside India, currency notes of Government of India and Reserve Bank of India notes upto Rs. 7,500/- per person; and (iii) a passenger coming from Nepal or Bhutan to India and/or a passenger travelling to Nepal or Bhutan from India, is allowed to carry currency notes of Government of India and Reserve Bank of India notes without any value restriction except notes of denominations of above Rs. 100/- in either case, so long as the same constitutes part of his bonafide baggage.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघवेंद्र
ब
बंड्याभाय Tue, 11/15/2016 - 00:31 नवीन
वरील लींक पाहिल्या पण जर एन आर ई खाते असेल तर नक्की काय करता येईल हे स्पष्ट होत नाहीये. कृपया याबाबतीत अधिक मार्गदर्शन करावे. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समर्पक
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 11/15/2016 - 13:35 नवीन
परदेशातून "भारतीय नोटांच्या स्वरूपात" आणलेले पैसे एनआरआय खात्यात जमा करता येत नाहीत, पण एनआरओ खात्यात जमा करता येतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बंड्याभाय
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 11/14/2016 - 18:28 नवीन
नोटा रद्द केल्यामुळे अतिरेक्यांच्या काळ्या किंवा खोट्या पैशावर टाच आल्याने काश्मीरच्या समस्येत फरक दिसू लागले आहेत. दगडफेक बंद झाली आहे... No stone pelting on forces in Kashmir after demonetisation move, says Manohar Parrikar
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 11/14/2016 - 18:33 नवीन
मराठा मूक मोर्चे देखील थांबलेले दिसतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 11/14/2016 - 18:59 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
अ
अनिरुद्ध.वैद्य Mon, 11/14/2016 - 19:00 नवीन
१४ लाख कोटींपैकी २ लाख कोटी जमा झाले बँकेत असे कळले. २ लाख कोटी जमा झाल्याची प्रेस नोटः http://finmin.nic.in/press_room/2016/PressReleaseR12112016.pdf हजार पाचशेंपैकी एकुण रक्कम इथे सापडेलः http://www.firstpost.com/india/chart-rs-500-rs-1000-notes-form-86-of-total-value-of-currency-in-circulation-3096964.html
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा