उस्मानाबादेतून कोणी आहे का इकडे? [गायकवाड प्रकरण]
चप्पलमार खा. गायकवाड यांना विमानातून प्रवास करण्यास केलेल्या बंदीविरोधात शिवसेनेने उस्मानाबाद बंदाचा इशारा दिला आहे (http://www.hindustantimes.com/india-news/shiv-sena-calls-for-osmanabad-bandh-may-bring-privilege-motion-over-mp-ravindra-gaikwad-on-no-fly-list/story-5aYaUj9cwxRup9US7FiteL.html)
माफी मागायची ओडून असले बंद करण्या इतपत त्यांची मजल जाते म्हणजे उस्मानाबादेतील लोकांमध्ये काही प्रमाणात तरी खा. गायकवाड यांच्या बद्दल सहानुभूती (!?) आहे असे वाटते.
मिपा वर कोणी तिथून आहे काय? तिथल्या सामान्य लोकांचे म्हणणे काय आहे?
मला वैयक्तिकरित्या भक्त मंडळींपेक्षा अंध विरोधकांची जास्त कीव येते. दिसले मोदी, करा विरोध, दिसली शिवसेना, करा विरोध, दिसली काँग्रेस करा विरोध! मग सत्यता काय याच्याशी काहीही देणेघेणे नाही.मलाही पूर्वी कीव येत होती पण दुर्लक्ष केले की "उत्तरे नाहीत म्हणजे आंम्हीच बरोबर" आणि उत्तरे दिली की "बघा बघा हल्ले करत आहेत" अशी सोयीस्कर कोल्हेकुई ऐकून कंटाळा आला मग त्यांच्याच प्रतिसादपद्धतीनुसार प्रतिसाद द्यायला सुरूवात केली. आता अंधविरोधकांचे "सोयीस्कर निवृत्ती पर्व" सुरू आहे. :)एका धाग्यावर भाजपा समर्थक फडणवीसांना नावं ठेवत आहेत चुकीचा निर्णय घेतल्याबद्दल आणि दुसरीकडे शिवसेना समर्थक एका खासदाराने सरकारी कर्मचार्याला झोडपण्याचं समर्थन करत आहेत. भक्त कोणाला म्हणावं हे विचार करण्यासारखं आहे.:)