उस्मानाबादेतून कोणी आहे का इकडे? [गायकवाड प्रकरण]
चप्पलमार खा. गायकवाड यांना विमानातून प्रवास करण्यास केलेल्या बंदीविरोधात शिवसेनेने उस्मानाबाद बंदाचा इशारा दिला आहे (http://www.hindustantimes.com/india-news/shiv-sena-calls-for-osmanabad-bandh-may-bring-privilege-motion-over-mp-ravindra-gaikwad-on-no-fly-list/story-5aYaUj9cwxRup9US7FiteL.html)
माफी मागायची ओडून असले बंद करण्या इतपत त्यांची मजल जाते म्हणजे उस्मानाबादेतील लोकांमध्ये काही प्रमाणात तरी खा. गायकवाड यांच्या बद्दल सहानुभूती (!?) आहे असे वाटते.
मिपा वर कोणी तिथून आहे काय? तिथल्या सामान्य लोकांचे म्हणणे काय आहे?
जसे महात्मा गांधींचे सामान रेल्वेतून ब्रिटिशांनी फेकून दिले होतेआणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (अमेरिकेने) व्हिसाबंदी घातली होती तशी दडपशाही चालू आहे..’’ << या चप्पलमार खासदारांने स्वत:ची तुलना चक्क महात्मा गांधींबरोबर केलेय. इतिहासाच्या आजवर वाचलेल्या कोणत्याही पुस्तकात 'दक्षिण अफ्रिकेत, महात्मा गांधी यांना ट्रेनमधून खाली उतरवल्यानंतर, महात्मा गांधी यांनी, त्यांना ट्रेन मधून खाली उतरवणार्या ब्रिटीश अधिकार्याचे थोबाड २५ वेळा पायातील सँडल/चप्पल यांनी फोडलेले अजिबात वाचले नाही.