उस्मानाबादेतून कोणी आहे का इकडे? [गायकवाड प्रकरण]
चप्पलमार खा. गायकवाड यांना विमानातून प्रवास करण्यास केलेल्या बंदीविरोधात शिवसेनेने उस्मानाबाद बंदाचा इशारा दिला आहे (http://www.hindustantimes.com/india-news/shiv-sena-calls-for-osmanabad-bandh-may-bring-privilege-motion-over-mp-ravindra-gaikwad-on-no-fly-list/story-5aYaUj9cwxRup9US7FiteL.html)
माफी मागायची ओडून असले बंद करण्या इतपत त्यांची मजल जाते म्हणजे उस्मानाबादेतील लोकांमध्ये काही प्रमाणात तरी खा. गायकवाड यांच्या बद्दल सहानुभूती (!?) आहे असे वाटते.
मिपा वर कोणी तिथून आहे काय? तिथल्या सामान्य लोकांचे म्हणणे काय आहे?
वैधानिक इशारा- वाचताना मोठ्याने हसू नये. आजूबाजूच्या लोकांचा गैरसमज होईल.)गैरवर्तन करणाऱ्या एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला ‘शिवसेना स्टाइल’ने धडा शिकवणारे शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर विमान कंपन्यांनी घातलेली प्रवासबंदी आज उठवण्यात आली. त्या बंदीच्या विरोधात शिवसेना खासदारांनीं गुरुवारी लोकसभेत रणकंदन केले होते. इतकेच नव्हे तर, गायकवाड यांच्यावरील प्रवासबंदी उठवली नाही तर मुंबईतून एकाही विमानाचे उड्डाण होऊ देणार नाही, असा इशाराही शिवसेनेने दिला होता. त्यानंतर विमान कंपन्यांची चांगलीच टरकली होती आणि केंद्र सरकारही बॅकफूटवर गेले होते.मुंबई विमानतळावरून विमाने उडू न देण्याच्या शिवसेनेच्या पोकळ धमकीला कोणीही घाबरले नव्हते. शिवसेनेच्या धमक्या म्हणजे सादळलेला, भिजलेला, फुसका फटाका ज्याची वात सुद्धा जळत नाही. विमान कंपन्या हवालदिल होण्याचा प्रश्नच नव्हता. १५ दिवस बंदी सुरू होती. शिवसेनेच्या फुसक्या बारांकडे सर्वांनीच दुर्लक्ष केले होते. विमानतळावर पोलिसांबरोबर अर्धसैनिक दल सुद्धा संरक्षणासाठी असते. तिथे कोणी राडा करायला गेले असते तर त्यांच्याकडून योग्य तो प्रसाद मिळाला असता. मातोश्रीत वातानुकुलीत खोलीत बसून वाईन किंवा बीअरचे घुटके घेत यॅव करू, त्यॅव करू अशा धमक्या द्यायला अक्कल लागत नाही, कारण खरोखरच राडा करण्याची वेळ आली तर राडा करायला जाणारे दुसरेच असतात. त्यांच्यावरच लाठ्या खाण्याची, तुरूंगात जायची किंवा खटल्याला सामोरे जायची वेळ येते. मातोश्रीत आरामात राहून स्वतःच स्वतःची मुलाखत घेऊन स्वतःच्यात वृत्तपत्रात स्वतःच छापून स्वतःचेच कौतुक करणारे किंवा भुवया उंचावून गरागरा डोळे फिरवत एअर इंडियाच्या सीएमडीची औकात विचारणारे रॉडी राऊत कधी रस्त्यावर उतरून आंदोलनात किंवा राड्यात सहभागी झाल्याचे अगदी 'सामना'त सुद्धा छापून आलेले नाही. विमाने उडू न देण्याची धमकी प्रत्यक्षात आणण्याचा शिवसेनेच्या पार्श्वभागात खरोखरच दम असता तर त्यांनी १५ दिवस इतकी मानहानी सहन करून बेअब्रू करून घेतली नसती. गायकवाडांचे तिकिट एअर इंडिया व इतर कंपन्यांनी ७-८ वेळा रद्द केले, १५ दिवस त्यांना विमानप्रवास करता आला नाही, शेवटी रेल्वेने जावे लागले, १५ दिवस लपून रहावे लागले. अगदी २ दिवसांपूर्वी संसदेत सुद्धा त्यांना माध्यमांपासून लपूनछपून जावे लागले. शेवटी माफीपत्र लिहून दिल्यावर व परत असे करणार नाही असे लिहून दिल्यानंतरच माफी मिळाली. तोवर त्यांची व पक्षाची देशभर पुरती नाचक्की व बेअब्रू झाली होती. या निमित्ताने शिवसेनेची व त्यांच्या नेत्यांची लायकी पुन्हा एकदा चव्हाट्यावर चघळली गेली आणि त्यांची पुरती शोभा झाली. एकीकडे महाराष्ट्रात भाजपसमोर शिवसेनेची सातत्याने अवहेलना सुरू असताना या प्रकरणामुळे त्यांची पुरती मानहानी झाली. असे असूनसुद्धा 'जितं मया'च्या थाटात आनंदोत्सव साजरा करणे घोट्यात मेंदू असणार्या शिवसेनेलाच शोभून दिसते.खासदारांनी ७ वेळा बुकिंगचा प्रयत्न केला हि धादांत खोटी बातमी संदर्भासाठी आणि निंदेच्या स्वसोयीसाठी वापरताना विश्लेषण होत नाही.धादांत खोटी बातमी?बाकी १५ दिवस फुटकळ बंदी काय लादली तर आनंदोत्सव साजरा करणाऱ्यांचा मेंदू कुठे असेल हे न विचारलेलेच बरे! शिवसेनेची अब्रू चव्हाट्यावर चघळली गेली म्हणे असल्या प्रकरणांनी, हहपुवा! पण काय करणार आता, इतकी डोईफोड करूनही, एवढा चिखल फेकुनही हवा तो रिझल्ट मिळाला नाही ना, मग काय काढा दुसऱ्याच्या मेंदूची लेवल, पकवा खयाली पुलाव!हवा तो रिझल्ट मिळालाच की. १ दिवस बंदी लावली असती तरी त्याचे स्वागतच होते. जितके जास्त दिवस बंदी लावली गेली तो बोनसच होता. मग्रुरीला, मूर्खपणाला आणि फुशारक्यांना योग्य ते उत्तर मिळालेले आहे. १५ दिवस लपून राहून, अनेकवेळा तिकीट रद्द होऊन, सर्वत्र मानहानी होऊन आणि शेवटी माफीपत्र लिहून दिल्यानंतरच माफी मिळाल्यानंतरसुद्धा सुद्धा अब्रूला अजिबात धक्का लागलेला नाही, उलट प्रतिष्ठेत भरघोस वाढ झाली आहे असे वाटत असेल तर धन्य आहे.ओके म्हणजे भाषांतर हवे का हा त्यावरचा प्रश्न सोयीस्कररित्या दुर्लक्ष करण्यात आला. परत विचारतो, तुम्हाला वरील पत्राचे मराठी भाषांतर समजले का? नसेल तर कोणीतरी देईलच करून. त्यात कुठे माफी हा शब्द आहे ते दाखवून देणे. धादांत खोट्या बातम्या स्वसोयीसाठी वापरण्याआधी खात्री करून घ्यावी.टाका भाषांतर म्हणजे तुम्ही स्वतः करीत असलेला शब्दांचा खेळ स्वतःच्याच लक्षात येईल."शिवाय लोकसभेतलं निवेदन बघून घ्या लगेहाथ, अर्थात फरक काही पडणार नाही म्हणा. हे भांडण विमान कंपनी विरुद्ध खासदार वगैरे काही नसून भाजप विरुद्ध शिवसेना आहे हे वर आलेलेच आहे."गायकवाडने लोकसभेतच माफी मागितली आहे. भाषांतर टाकायला एवढी खळखळ का?जर का असले गुंड प्रवृत्तीचे हलकट लोक आणि त्यांचे समर्थक एखाद्यावर टिका करत असतील तर तो माणूस नक्कीच चांगला असणार यात शंका नाही.== सहमत ! अनेक ठिकाणी नाक घासून माफी मागितल्यानंतर ह्या चप्पलमार खासदाराची विमानप्रवास बंदी मागे घेतली एअर इंडीयाने. कॅमेर्या समोर २५ वेळा चप्पलने मारले असे म्हणनारा खासदार, कलम ३०८ चा गुन्हा दाखल झाल्यावर आपण त्या कर्मचार्याला फक्त ढकलले असे घुमजाव करतो आणि ह्या पक्षाचे समर्थक अश्या खासदाराची विमान प्रवास बंदी हटवली म्हणून आनंदोत्सव साजरा करतायत.