उस्मानाबादेतून कोणी आहे का इकडे? [गायकवाड प्रकरण]
चप्पलमार खा. गायकवाड यांना विमानातून प्रवास करण्यास केलेल्या बंदीविरोधात शिवसेनेने उस्मानाबाद बंदाचा इशारा दिला आहे (http://www.hindustantimes.com/india-news/shiv-sena-calls-for-osmanabad-bandh-may-bring-privilege-motion-over-mp-ravindra-gaikwad-on-no-fly-list/story-5aYaUj9cwxRup9US7FiteL.html)
माफी मागायची ओडून असले बंद करण्या इतपत त्यांची मजल जाते म्हणजे उस्मानाबादेतील लोकांमध्ये काही प्रमाणात तरी खा. गायकवाड यांच्या बद्दल सहानुभूती (!?) आहे असे वाटते.
मिपा वर कोणी तिथून आहे काय? तिथल्या सामान्य लोकांचे म्हणणे काय आहे?
जे वाटते ते टुकार पक्षाच्या टुकार कार्यकर्त्यांना न भीता, लिहिता येते.ह्याला निर्भयपणा म्हणत नसतात हो, ट्रोलिंग म्हणतात. असल्या भाषेत लिहून मोकळे व्हायचीच भावना होत असेल तर मग डायरी ठेवा ना.मला माझा जीव प्यारा आहे आणि माझ्याकडे गुंडांची फौज ही नाही.नोव्हेंबर २०१२ मध्ये बाळासाहेब ठाकरेंचे निधन झाल्यानंतर दुसर्या दिवशी मुंबईत बंद पाळण्यात आला होता. त्यामुळे एका महाविद्यालयीन मुलीने चेपुवरील आपल्या भिंतीवर "बाळासाहेब ठाकरे गेले म्हणून बंद पाळणे योग्य नाही" अशा अर्थाची १-२ वाक्ये लिहिली होती. तिच्या एका मैत्रिणीने तिची पोस्ट लाईक केली होती. शिवसेनेच्या एका स्वाभिमानी, मर्दमावळा, शिवाजी महाराजांचा चेला, वाघ वगैरे असलेल्या कार्यकर्त्याने ही पोस्ट पाहिल्यावर त्याचे डोके फिरले आणि लगेच त्याने पोलिसात तक्रार दाखल करून त्यांना अटक करायला लावली. त्यानंतर लगेच सेनेच्या टोळक्याने तिच्या काकांच्या रुग्णालयात धुडगूस घालून मोडतोड केली. त्या दोन्ही मुली नंतर इतक्या घाबरल्या की त्यांनी पालघर सोडून गुजरातमध्ये शिकायला गेल्या. २००१ मध्ये आनंद दिघेंचे सिंघानिया रूग्णालयात निधन झाल्यानंतर सेनेच्या कार्यकर्त्यांनी तिथे हल्ला करून रूग्णालयाला आग लावली व प्रचंड मोडतोड केली ज्यात कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले. सर्वसामान्य नागरिकांनी असल्या गुंडांच्या टोळीला घाबरूनच राहिले पाहिजे.त्या अधिकार्याने, आपण सेवा क्षेत्रात काम करत आहोत याची जाणीव ठेउन , शांतपणे समजावले असते , चुक मान्य केली असती , त्यांच्या परीने काय मार्ग काढाता येईल ते सांगीतले असते तरी असेच घडले असते का ?चूक मान्य केली असती??????? त्या कर्मचार्याने नक्की कोणती चूक मान्य करायला हवी होती व त्या चुकीतून मार्ग काढायला हवा होता?अधिकाऱ्याने मोदींना कशाला ओढलं मध्ये ?गेल्या २-३ वर्षात अनेकवेळा असे दिसून आले आहे की मोदी, सुषमा स्वराज, सुरेश प्रभू इ. नेत्यांशी ट्विटर किंवा इतर माध्यमातून आपल्या समस्यांबद्दल संपर्क साधला तर ते तातडीने त्यात लक्ष घालतात. एका उदाहरणात रेल्वेचा एक टीसी पैसे मागत असताना त्या प्रवाशाने सुरेश प्रभूंच्या ट्विटर खात्यावर याची माहिती दिल्यावर प्रभूंनी तातडीने पुढील स्थानकातील अधिकार्यांशी संपर्क केला व त्या टीसीला पुढील स्थानकावर उतरवून निलंबित करण्यात आले. दुसर्या एका प्रकरणात एका महिलेला रेल्वेत प्रसूतीवेदना सुरू झाल्यानंतर तिच्या यजमानांनी ट्विटरवरून प्रभूंशी संपर्क केल्यावर प्रभूंनी तातडीने पुढील स्थानकातील अधिकार्यांशी संपर्क साधून अॅम्ब्युलन्सची व्यवस्था केली. परदेशस्थ भारतीयांना परदेशात येणार्या समस्यांबद्दल सुषमा स्वराजांशी संपर्क साधल्यानंतर आपल्या समस्येच्या निराकरणासाठी त्यांनी प्रयत्न केल्याची अनेक उदाहरणे आहेत. शस्त्रक्रिया किंवा इतर काही गोष्टींसाठी मोदींच्या ट्विटर खात्यावर माहिती दिल्यानंतर मोदींनी व्यक्तिशः लक्ष घालून मदतीची व्यवस्था केल्याचेही वाचले आहे. मोदी किंवा इतर काही नेते आपल्या समस्येत व्यक्तिश: लक्ष घालून समस्या सोडविण्याचा प्रयत्न करतात हे आता सर्वश्रुत असल्याने, या खासदार महाशयांनी विमान अडवून ठेवून अरेरावी सुरू केल्यावर त्या कर्मचार्याने मोदींकडे तक्रार करीन असे सांगणे योग्यच आहे कारण त्यामागे मोदींनी कमावलेला विश्वास आहे."आप बुजुर्ग हो, पहले आप बैठो और शांतिसे बात करो, क्यूँ बीपी बढाके के ले राहे हो" यावर "तू पहले निचे उतर, तू एमपी हॊगा घरका, मै भी मोदीको बताउंगा" इथून ते वैयक्तिक भांडण सुरु झाले असावे.ही वाक्ये ज्या चित्रफितीत ऐकू येतात त्या चित्रफितीची लिंक आहे का?