आड (बावडी)
...गावात आड होता. आडावर रहाट होता. रहाटाला मोठी साखळी होती. साखळीला बादली अडकवून भल्या पहाटे पाणी ओढणारी माणसं होती. आडाचं पाणी पोटात साठवणारे मातीचे रांजण होते. रहाटाला करकरणारा आवाज होता. बाजूला धुणी धोपटणाऱ्या कासोट्यातल्या बायका होत्या. खाली घरंगळत वाहणाऱ्या पाण्यात खोटी शेती पिकवणारी लहान पोरं होती. "नांदायला नांदायला आडाचं पाणी शेंदायला!" गाणी गाणारे आवाज होते. पण काळाचा पक्षी उंच उडतो. गावासोबत आडही आटून जातो. आड रिता रिता होत जातो...
...आड आजही असतो. वरती मोडलेला रहाटही असतो. गंजलेली साखळीही असते. पण पाण्यात तरंगणारं कासव कधीच मेलेलं असतं.
मिसळपाव
(याच त्या कामिनी बाई, ज्यांना मदत हवी आहे)
डिअर ऑल,
हल्लीची अध्यात्माची चालती बघून आपणही काहीतरी केले पाहिजे, या विचाराने आम्ही "सायुज्यमुक्तीचे सहा सोपान" या नावाने पुस्तक काढणार होतो (त्यात जागोजागी झेन, सुफियाना वगैरे शब्द पेरणार होतो), तेवढ्यात इथे
लहानपणी खरवस एकतर घरच्या म्हणजे आजोळच्या गायींच्या चीकाचा असायचा,नाहीतर गोरेगावहून एक भय्याजी येत असत.ते आमच्याकडे आले की, वाटीभर चीक तसाच देत असत.तो कितव्या दिवसाचा आहे हेही सांगत असे आणि मग आई ठरवायची त्यात कितीपट दूध मिसळायचे ते.त्यात साखर किंवा गूळ,वेलचीपूड घालून एका मोठ्या पातेल्यात पाणी घालून, त्यात हे छोटे पातेले घालून,छोट्या आणिमोठ्या पातेल्यावर झाकण्या घालून स्टोव्हवर चढवले जाई.दहा पंधरा मिनिटातच वेलचीचा स्वाद दरवळू लागे,आई त्यात सुरीचे टोक बुडवून पाही.आईचे समाधान झाले की, भावाची घासाघीस सुरु होई.भय्याज