Welcome to misalpav.com

काही अठवणी...!

लेखक: अत्रुप्त आत्मा | प्रसिद्ध:
काही अठवणी...उन्हातल्या काही अठवणी...पावसातल्या काही नुसत्या...तालातल्या काही गुलाबी...गालातल्या काही आनंदी...सुखाच्या काही त्रासिक...दु:खाच्या काही केवळ..जनातल्या कित्येकांच्या..मनातल्या! काही..हसर्‍या मुलांच्या काही..गळल्या फुलांच्या देठांनाही सोडून गेल्या.. उमलणार्‍या कळ्यांच्या! काही माझ्या गावाच्या काहि..तर,नुसत्या नावाच्या काही...दूरं देशांच्या तळहातांवरिल..रेशांच्या! काही..मंद वासांच्या काही..धूंद श्वासांच्या तिच्या माझ्या मिठितल्या कूंद मोहक स्पर्शांच्या!!! बेबंदिच्या अठवणी काही.. मुक्त मोकळ्या वाटांच्या फुलांनिही बहरून यावे अश्या गोजिर्‍या क्षणांच्या अठवणींच्या प्रदेशा बा घ्यावा


एक प्रेमपत्र लिहले होते

लेखक: वैभव कुलकर्नि | प्रसिद्ध:
एक प्रेमपत्र लिहले होते,शब्दाऐवजी प्राणच ओतला होता त्यात. संदभ्र होते तिचे नि माझे आणि ईंद्रधनुचे सप्तरंग होते त्यात सात लिहताना काने-मात्रे एकसलग येत नव्हते, हाथ थोडा थरथरत होता नि तुझे नाव कोरले कि डावा डोळा नुसता फरफरत होता..... मध्येच एखादा अश्रू ठीबकात , माझ्या नावाला पुसायचा प्रयत्न करत होता तर कोरलेला तो बाण ह्रधयाभोवती कसला तरी यज्ञ करत होता.


बाकी काही नाही.............. माझी ८वन काढतंय कुणीतरी

लेखक: वैभव कुलकर्नि | प्रसिद्ध:
काहूर का साचंलया आज मनी पाखरासंग फिरतया रानभरी पापनीभी फरफरतीया परापरी १ घास अडकतुया गळ्यापरी कुरणं भी खुलल्याती मळ्यापरी ठसका भी लागतुया कधीतरी बाकी काही नाही.............. माझी ८वन काढतंय कुणीतरी डावी कुशी बदलतुया कधीतरी झोप उसनी द्याहो कुणीतरी जागा राहतुया एका निश्याच्यापरी भास होतुया एका पिश्याच्यापरी सरळ रस्त्यावरून जाता कधीतरी बीना दगडाची ठेच लागतीया मधीतरी बाकी काही नाही..............


रेषा आणि लढाया

लेखक: प्रसाद साळवी | प्रसिद्ध:
त्वेषाने त्या भांडत होत्या रेघोट्यांच्या मधल्या जागा एकसंध धरतीला तोडीत जशा उन्हाळी सलत्या भेगा पुन्हा एक त्यांना होण्याला दोनच रस्ते आता उरती पाऊस पडून चिखल होणे किंवा उन्हाने होणे रेती


रात्रीस उखाणा सुचला

लेखक: प्रसाद साळवी | प्रसिद्ध:
मी शब्द तुला सुचलेला, उधळून लावीतो कविता मी सूर उसवले दोन्ही, तिसर्‍याच्या उदयाकरता बघणार्‍या नजरांमधले वाटेत थांबले अंतर नजरेच्या क्षितिजाआडून सतरंगी जंतरमंतर वाजवता रंग उद्याचे, शत-गंध मोकळे होती ओघळत्या सेकंदांचे अडवून ठेवले मोती देऊळ-खांबा पक्षी क्षत-पंख पुसे इवलासा रदबदली अंधाराशी, हा निव्वळ फोल दिलासा वितळत्या भूतकाळातून निसरडी पाऊले आली घमघमत्या आज-उद्याशी आडवी-तिडवी रमली कधी स्तब्ध उभ्या असलेल्या, डोंगरमाथ्याआडून मुक्त स्वरांनी सरिता नाचते जाणीवा विसरून


तान्हुला

लेखक: Bhagwanta Wayal | प्रसिद्ध:
चिमुकला तान्हा ठेऊन घरी आई त्याची जाते कामावरी असते गरज आणिक मजबुरी करते मग ती लोभाची चाकरी कोणी ठेविती त्याच्यासाठी दाई परी आईची माया कोण देई जीवापाड सांभाळ करू पाही तरी आईची सर येणार नाही पूर्ण वेळ ऑफिसात जातो घरी येण्यास रोज ऊशिर होतो वाट बघून बाळ झोपी जातो झोपेतच तो आई आई म्हणतो बाळ वाढले पाळ्णा घरात आईबाबांच्या आठणी ऊरात आसवांचा पुर लोट्ला जोरात रडे तेंव्हा तो भावनेच्या भरात आई मित्रांना शाळेत घेऊन जाती बघुन त्याच्या डोळ्यांत आश्रु येती आई वडिल आणिक नाती-गोती पैशापुढे सर्वच विसरुन जाती कोणी जाणा हो त्यांच्या भावनेला नका छळू त्या कोवळ्या मनाला भुकेले ते मातेच्या वात्सल्याला द्यावे प