Skip to main content

कविता

स्वप्न

लेखक पद्मश्री चित्रे यांनी गुरुवार, 29/08/2013 15:14 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्याच आसवांना मी रोखुनी पहावे ह्रुदयात गुंफ़लेले ते गीत मी पुसावे समजाविते मला मी, ते एक स्वप्न होते काट्यात गुन्तलेले ते एक फ़ुल होते माझ्यासमोरुनी तो मार्गस्थ सुर्य झाला माझी दिशा तरिही तम होवुनीच उरली फ़सवेच हे तरन्ग मी मानले जीवाचे नजरेसमोर माझ्या,हे स्वप्न भग्न माझे गुंतेल जीव असला मज वाटले ही नव्हते खोटाच तो जिव्हाळा, ते बेगडीच नाते का व्यर्थ दोष द्यावा, सारी अशीच नाती ह्रुदयी विसावली ती , माझी कट्यार होती उधळुनी स्वत्व आता, झाले रिती मनाने तु वाट वेगळी ती ,बघ चालशी सुखाने

अजाणता

लेखक अज्ञातकुल यांनी गुरुवार, 29/08/2013 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
अजाणता जाणले कसे इप्सित शब्दांनी मनातले भातुकलीने लक्ष्य वेधले गतकाळात विखुरलेले चिमणी पोपट बुलबुल आदी सवंगडी सारे जमले चित्त हरखले हरली चिंता वय उरले शैशवातले बडबडगाणी हिरव्या रानी राज्य परीचे सापडले नितळ मोगरी अवकाशावर बाळ निरागस बागडले …………… अज्ञात
काव्यरस

राधेचा कन्हैया -

लेखक विदेश यांनी बुधवार, 28/08/2013 14:31 या दिवशी प्रकाशित केले.
इकडे तिकडे शोधुन राधा बसली हिरमुसुनी झाडाला टेकताच अवचित सूर आले वरुनी .. फांदीवरती डोलत होता कन्हैया मुरली धरुनी इथेच होता दिसला नव्हता हिरव्या पानामधुनी .. पाहुनिया वर खुषीत आली राधा मनोमनी हरखुन गेली कितीक धडधड वाढे हृदयातुनी .. लटका रुसवाफुगवा वाटे तिला दावुया मनी पट्कन फांदीवरून उतरे कन्हैया ते जाणुनी .. मुरली लावी अधरास तिच्या एक हात धरुनी जवळीकीने गेला रुसवा झणि राधेचा विरुनी .. पुष्प हातचे मुकुटी ठेवुन भाळासी चुंबुनी उभी होतसे अधोवदन ती हात हाति गुंफुनी .. लिपटे जैसी वृक्षास लता, एकरूप होऊनी गाली लाली क्षणात येई कन्हैयास बिलगुनी .. .
काव्यरस

कृष्ण नाही गोकुळी

लेखक जुईचे फूल यांनी बुधवार, 28/08/2013 04:30 या दिवशी प्रकाशित केले.
रंग नाही गंध नाही रास नाही गोकुळी विरह वेड्या गौळणीचा श्वास नाही गोकुळी गोपिकांचे लक्ष भारी दूध लोणी लपविती दूध लोणी चोरण्याची आस नाही गोकुळी सांज वेळी कृष्ण जाई वाजवूनी बासुरी अधर वेड्या बासुरीचा वास नाही गोकुळी मोहनाने मोहलेल्या गौळणीला गाठली कृष्ण प्रेमी गुंगण्याचा भास नाही गोकुळी आठवांचे लोट येती नंदराणी सांगते गोकुळीला जगविणारा त्रास नाही गोकुळी

ज्योती

लेखक kalpana joshi यांनी मंगळवार, 27/08/2013 19:59 या दिवशी प्रकाशित केले.
अंतरीचा दिवा मालवू देऊ नको , प्रज्वलित ठेव ती ज्योत अंतापर्यत I तिच देईल तुला आधार, कार्य करण्या तत्पर होशील तू तयार I अंधारातून मार्ग दाखवते , प्रगतीपथावर ती नेते ,वाट ती किती बिकट , खाच खळगे किती असती त्यावरी I प्रयत्न कष्ट ,आत्माविशासाचा मार्ग दाखवते ती आम्हास, असाध्य ते साध्य कराया सायास , तू जा या वाटेवरुनी उज्वल भविष्याची ती वाट मोकळी I कवी म्हणतो , चालून आली नामी संधी , नाही दवडणार मी कधी , प्रकाश पडला अंतरीच्या मन चक्षुवरी , योग्य दिशा ,मार्ग सापडे त्यास, तेवत राहू दे अंतरीचा दिवा अंतापर्यत I

गुलाब

लेखक kalpana joshi यांनी मंगळवार, 27/08/2013 19:53 या दिवशी प्रकाशित केले.
गुलाब तू राजा असे सर्व फुलांचा, मानही मिळतो तुझ्या गुणांना। सौंदर्याची बरसात करतो आवडतो तू सर्वांना सर्व रूपांत। फूल होता, तू सुकुमार दिसे। साठवता सौंदर्य तुझे, सौंदर्याचा वरदहस्त तुला पहिला मान गुलाबाला, विविध रंग रूप तू घेऊन येतो। आम्हांस तू चकित करतो - प्रसन्न होऊनी आम्ही वाहतो, तुला `श्री' चरणी, दिमाखात, तू कोठेही विराजतो, सौंदर्याने बघणारायाचे मन जिंकतो, किती रंगात रंगून जातो तू, स्वरक्षण करण्या काटे आणतोस तू, जीवनाचे सत्य जाणण्या, काटेरी वाट करतोस तू, तुझ्या सौंदर्याने घायाळ आम्ही, बोचवितो तो काटा तू। आधी काटे मग गुलाब, आधी कष्ट मग सुख हेच शिकवतो आम्हांस तू।।

आई

लेखक kalpana joshi यांनी मंगळवार, 27/08/2013 19:48 या दिवशी प्रकाशित केले.
आई असा एकही दिवस नाही,तुझी आठवण येत नाही, सतत डोळ्यासमोर असते तू ,भू लोकी नसूनही करते पाखरण आमची I मनात हूर हूर दाटून येते ,तू असतीस तर किती बरे वाटले असते, मार्ग दर्शन तुझे लाभले असते ,काही वेळा काही सुचतच नाही I चलबिचल मनाची होई ,तुझ्या फोटो समोर येऊन मी उभा राही, तू गेल्याने झालेले नुकसान कसे बरे भरून येई? मनातील पोकळी कशी बरे भरून येणार ? तुझ्यावर भार टाकून अश्रूंना मोकळी वाट करून कशी देऊ ? प्रत्येकाच्या जिव्हाळ्याची आई तू , दुरून का होईना पाखरण करतेस तू , माया ,ममता प्रेमाचा तुझा स्पर्श , आठवणीत जपून ठेवला तो, सुरक्षित असे आशीर्वाद रुपी कवच ,सौरक्षण करते आमचे , निर्भय पणे वावरतो आम्

बाबा

लेखक kalpana joshi यांनी मंगळवार, 27/08/2013 19:40 या दिवशी प्रकाशित केले.
बाबा चंदना सारखा झिजतो तो, कुटुंबासाठी घाम गाळतो , स्वकष्टाचे चीज करतो. चिमुकल्यांना आसरा मिळावाम्हणून घरटे बांधतो तो । असेल त्या परीस्थितीत स्वत:ला झोकून देतो, उनपावसाचा मारा झेलीत संकटांशी हात मिळवणी करतो तो। माया ,ममतेचे पाश जरा दूर ढकलतो , आद्य कर्तव्याची कास धरतो । घराच्या सुखा साठी स्वत: नव्याने रोज उभा राहतो तो, दिसत नाही त्याचे कष्ट ,संयम ,शांतता, सहन शिलतेचा मंत्र सतत जपत असतो तो। उच्च अधिकारी होतो तो, गर्व नाही ,अभिमान बाळगतो तो I कल्परुक्षाचे झाड लावतो,पुढील पिढीच्या सुखासाठी आज मात्र झोकून देतो। जाणीव असावी मुलांना असा कष्टकरी बाबा आपला असतो।

पुन्हा अनोळखी होऊ .... !!

लेखक psajid यांनी सोमवार, 26/08/2013 14:59 या दिवशी प्रकाशित केले.
संधीकाळी सुखावत होता जो गंध वाऱ्याचा तो विसरू, दिलासा एकमेकां देऊ.... अन पुन्हा अनोळखी होऊ .... !! नको आठवण काढू झंकारणाऱ्या स्वरांची, वादळात विखुरला जो मेणा खांद्यावर घेऊ.... सखे गं.. पुन्हा अनोळखी होऊ .....!! विसरू ती गुंफण कुरवाळणाऱ्या हातांची, नको आवाज झुल्यांचा मन बंदिशीत ठेऊ...... पुन्हा अनोळखी होऊ .....!! एकमेकांच्या पाऊलखुणांवर अंधारून छाया आली, ते व्रण वाळूतले सखे चल, आपणच पुसून पाहू...... सखे पुन्हा अनोळखी होऊ ....!! आहे उमटले प्रतिबिंब एकत्र दोघांचे जळी, छोटासा फेकून खडा विस्कटून त्याला टाकू ..... अन….
काव्यरस

तुही नाही मीही नाही …………. !!!

लेखक फिझा यांनी सोमवार, 26/08/2013 08:41 या दिवशी प्रकाशित केले.
तुही नाही मीही नाही …………. प्रेमाची रुजुवात झाली होती मनात, पण बोललो हिमतीने कधीच ….तुही नाही , मीही नाही ……… पावसाची रिप रिपही चिंब करणारी, पण भिजलो आकंठ कधीच … .तुही नाही , मीही नाही ……… सहजच घडते अशी असते भेट, पण साधला योगायोग कधीच ….