Skip to main content

कविता

तोल हा मनाचा तू जरा सावर रे.

लेखक santosh waghmare यांनी शुक्रवार, 30/12/2011 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
दिशाहीन वाहणाऱ्या वाऱ्याला तू जरा आवर रे, तोल हा मनाचा तू जरा सावर रे. झालेल्या व्यथा ते उगाचच आठवत, गतकालातून दुख जणू ते पोखरून काढत, सुखलेल्या जाख्मानाही मग फुटे वेदनेच पाझर रे , तोल हा मनाचा तू जरा सावर रे. बाह्य आकर्षणाला ते सतत भुलत, शोभेच्या फुलालाही नाकाशी धरू लागत, पण मृगजळात तहान नाही भागत रे, तोल हा मनाचा तू जरा सावर रे. प्रेत्येक कर्माच फळ त्याला पटकन हव असत, पिउनी हळद त्याला लगेच गोर व्हायचं असत, पण पिकण्या अगोदर आंबा कसा लागणार गोड रे, तोल हा मनाचा तू जरा सावर रे. समोरच्याकडून ते अधिक अपेक्षा करत, जणू लहानश्या झोळीत ते गावभर बाजार भारत, मग छिद्र पडुनी झोळीस सारा बाजार निघुनी ज

बासूंदी गोड गोड

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 30/12/2011 04:55 या दिवशी प्रकाशित केले.
बासूंदी गोड गोड तो: तू माझी बासूंदी बासूंदी बासूंदी गोड गोड तुला पिवू का पिवू का पिवू का थोडं थोडं ||धृ|| ती: तू माझा गुलाबजाम गुलाबजाम गुलाबजाम गोल गोल तुला खावू का खावू का खावू का पोटभर ||धृ|| तो: दुधासारखे शुभ्र तुझे ग आहे गोरं गोरं अंग बशीमधे घेवू तुला की कपामध्ये तू जरा सांग गरमा गरमी सहवेना ग तू हो आता थंड थोडं तू माझी बासूंदी बासूंदी बासूंदी गोड गोड ||१|| ती: माझ्या दिलाच्या मिठाईचा तू आहे एक हलवाई मीच तूझी कधी बर्फी झाले, कधी झाले रसमलाई बासुंदीची धार चोखण्या तू आता तोंड उघड तू माझा गुलाबजाम गुलाबजाम गुलाबजाम गोल गोल ||२||

उद्याची बात का करु मी

लेखक santosh waghmare यांनी गुरुवार, 29/12/2011 23:35 या दिवशी प्रकाशित केले.
ओन्जळीत पानी असताना, म्रुगजळाला का फसु मी, तहान तर भागत आहे, मग उद्याची बात का करु मी. दिवसा उजेड असताना, अंधारात का चाचपडू मी, रात्र होन्यास उशिर आहे मग उद्याची बात का करु मी. ताटात अन्न असताना, आनंदाने का नाही खाऊ मी, खाल्लेला घास हि न पचन्यास, उद्याची बात का करु मी. परिक्षा तर दिली आहे, परिणामांची भीती का बाळगु मी, परिक्षा ते परिणाम ह्या मधील दिन व्यर्थ जाण्या, मग उद्याची बात का करु मी. म्रुत्युची वेळ माहित नसताना, म्रुत्यु समोर असल्याप्रमाणे का वागू मी, जिवनही जगता न येण्यास, मग उद्याची बात का करु मी. येणार भविष्य हे वर्तमान होत असत, मग प्रत्येक क्षण वर्तमानात का नाही जगू मी, पण आ

ती येते आणिक जाते

लेखक अरुण मनोहर यांनी गुरुवार, 29/12/2011 17:47 या दिवशी प्रकाशित केले.
गालावर येणारी अवखळ लट मानेला हिसका देऊन बाजुला सारण्याची तुझी जीवघेणी लकब... त्याचवेळी तुझ्या डोळ्याचे कोपरे हळूच बघून घेतात समोरचा तडफडणारा जीव अजून जिवंत आहे किंवा कसे? काळ्याभोर लटेचा तो हिसका बसताच खोलवर दडलेले कुठलेसे बीज तरारून थरथरते आणि वरवर यायला बघते ते धुमारे काळ्या डोहात कसलासा आकार घेत आहेत असे वाटू लागते तोच टिक टॉक सॅंडल्स उडवित तू निघून देखील जातेस समोरचा पाचोळा बेफिकीरीने उधळीत उडालेली धूळ काळ्या डोहात धुमार्‍यान्ना गुदमरून टाकीत पाण्यात विलीन होते अस्वस्थ तरंग देखील नि:शब्द होतात शब्दावाचून कुठली कविता? तू येते आणिक जाते......

काय करावे या किड्याला ?

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 28/12/2011 14:41 या दिवशी प्रकाशित केले.
काय करावे या किड्याला साला लिहिता लिहु देत नाही डोक्यात बरेच येत असते पण डोळ्यांना पाहु देत नाही. सुचत असते पान उघडल्यावर 'हे'...'हे'...लिहायचे.. पण बसले एकदा लिहायला की..ते-तेच का रहायचे..?
काव्यरस

मागे वळुन बघायच नाही

लेखक निश यांनी बुधवार, 28/12/2011 10:46 या दिवशी प्रकाशित केले.
समजावल आहे मनाला आता मागे वळुन बघायच नाही. जरी आला विचार अंतरी आठवणीत अडकायच नाही. झाली जखम मनाला तरी जखमी होऊन रडायच नाही. आपल सुख मिळाव आपल्याला तरी हे जरी असल खर तरी जगात कोणी कुणाच नसत हे खोट समजायच नाही. असेल ताकद लढायची तर हरलेला डाव नव्या उमेदीने उभा करुन परत कधी खचायच नाही. मागे वळुन बघायच नाही....

आठवतोस तू .....!!

लेखक फिझा यांनी बुधवार, 28/12/2011 10:38 या दिवशी प्रकाशित केले.
फोन हाती घेतल्यावर बघावा एखादा sms सेंड करावासा वाटावा , मग नकोच जाऊदे असे वाटावे , फक्त कळावे एवढंच कि या क्षणी आठवतोस तू ..... न चुकता करावा तुला फोन मग तू उगीचच काहीतरी बोलवे बोलता बोलता मग असाच वेळ निघून जावा ,फक्त कळावे एवढंच कि या क्षणी आठवतोस तू .... बोलणे व्हावे खूप काही पण जेवढ्यास तेवढे असेच नेहमी, गप्पच असतात मग ते बोलणारे शब्दही ,फक्त कळावे एवढंच कि या क्षणी आठवतोस तू ..... अगदी पहाटे कधी पाऊस पडावा, तुझी आठवण येऊन चहा पिऊन झालेला असावा, आरसाही सकाळीच रुसलेला असावा,फक्त कळावे एवढंच कि या क्षणी आठवतोस तू .....