Skip to main content

कविता

रानातल्या फुलांचा

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शुक्रवार, 16/12/2011 15:26 या दिवशी प्रकाशित केले.
जागु ताईंनी कलादालनात आजवर प्रस्तुत केलेल्या सर्व रानफुलांच्या दर्शनातुन ही कविता जन्माला आली आहे.मला या कवितेतनं ही कविता ''माझी आहे'' असं श्रेय नको आहे,तेंव्हा ही कविता कशी कडु/गोड जमली असेल तशी त्या रान फुलांनाच अर्पण करतो. रानात जाउनी मी होइन या फुलांचा सहवास देवतांच्या बागेतल्या मुलांचा... किती रंगरुप त्यांचे व्हावे मनात गोळा भरगच्च रानराइ वाटे ही सांब भोळा मी एकटाच त्यांची बांधेन देवळेही परि मुळ तत्व त्यांचे आहेच देवळे-ही राना मधेच देव मानायचाच झाला रानामधुन फुलता तो रान रान झाला त्याचीच रूपकेही त्याने प्रतीत केली आंम्ही खुळ्या जनांनी भक्तीत सोय केली सारे अखेर त्याचे त्याचेच फक्त
काव्यरस

पुन्हा एकदा

लेखक अज्ञातकुल यांनी शुक्रवार, 16/12/2011 10:46 या दिवशी प्रकाशित केले.
दुलई धुक्याची अंगावर दंव निळी ओढणी गूढ नभावर कौलांवरती वलये धुराची ऊब पांघरुन जो तो भूवर झिरमिळ पालव रेशिम इरकल चित्र नव्हाळे लज्जित कणभर गोत जिव्हाळा हा सृजनाचा मकर क्रांतिचा वारू मनभर चाहुल वा ही हूल म्हाणावी येते जाते तुडवित अंतर पाचोळा उधळित स्वप्नांचा पुन्हा एकदा झुलते अंबर ....................अज्ञात
काव्यरस

चित्र

लेखक मकरन्दबेहेरे यांनी शुक्रवार, 16/12/2011 09:26 या दिवशी प्रकाशित केले.
त्या दीवशी मी तीचे चित्र काढले रक्ताच्या लाल रंगाने समोरच्या कॅनव्हॉस वर, ज्यावर बर्‍याच अकृत्यांची गर्दी होती, त्यातील एका अबलक वारुला ती आवडली आणि तो तीला घेउन गेला कुठल्यातरी रम्य अरण्यात दूर दूर काही सुप्रसिद्ध तारे तारकांच्या साक्षीने जे जन्मत:च स्वयम्भू होते मी इतका शोकाकुल झालो की माझे अश्रु त्या कॅनव्हॉस वर पडले म्हणून मी घेतले तारेवर वाळत असलेले कापड ज्याने मी कॅनव्हॉसवरचे पाघळलेले रक्त पुसून काढले.... बेहेरे मकरंद ११०२२१६१

वसा..

लेखक प्राजु यांनी शुक्रवार, 16/12/2011 00:49 या दिवशी प्रकाशित केले.
बांधण्या कवितेत सारे मी असा घ्यावा वसा सहज यावे शब्द आणि भाव उमजावा जसा! आज कविते ये फ़िरूनी सांध शब्दांनी दुवा टाक उघड्यावर मनाला, अन जराशी दे हवा लख्ख झाल्या कल्पनेला दाव आता आरसा बांधण्या कवितेत सारे मी असा घ्यावा वसा पावसाच्या हालचाली, गर्द हिरवी वाटही प्रेम शृंगारात भिजली, तारकांची रातही अन पहाटेच्या मनावर, गोड उमटावा ठसा बांधण्या कवितेत सारे मी असा घ्यावा वसा घाल कविते दान थोडे फ़ाटक्या झोळीत या अर्थ ओथंबून जावा मांडल्या ओळीत या वाहुदे जन्मांतरी मजला तुझा हा वारसा बांधण्या कवितेत सारे मी असा घ्यावा वसा -प्राजु
काव्यरस

सायंकालीन छटा....

लेखक मकरन्दबेहेरे यांनी शुक्रवार, 16/12/2011 00:07 या दिवशी प्रकाशित केले.
सायंकालीन छटा आजकाल तीच्या चेहर्‍यावर प्रतिबिंबित होत असतात आणि त्या छटा पाहुन मला अग्निज्वालांनी होरपळत असलेल निर्वात अंतरिक्ष स्वप्नात दिसते आणि मी जागा होतो आणि कुणा मदमत्त जोडप्याला हवी हवीशी रात्र मला भयाण वाटु लागते आणि मी ती स्मशान शांतता भंग पावु नये म्हणुन तोंडावर हात ठेवुन मी आक्रोश करु लागतो आणि शेवटाच्या विश्वापर्यंत जाउन येतो आणि त्याच वेळेला देवळाच्या गाभार्‍यात माझ नाव घुमत असत आणि विश्वेश मात्र शांतपणे बसलेला असतो बेहेरे मकरंद ११०२२०८०

(ऐल-पैल)

लेखक चतुरंग यांनी गुरुवार, 15/12/2011 21:12 या दिवशी प्रकाशित केले.
प्रतिथयश कवयित्री क्रांतीतैंचं अप्रतिम काव्य 'ऐल-पैल' वाचलं आणि मी सैरभैर झालो! मग काय आपोआप दाद निघालीच मनातून! ईर्शाद!! ऐल मळे पैल खळे भेटू मी कुठे, ना कळे टाकता पाऊल वळे बापूस माघारी! ऐल दिवा पैल वात भेट नाही पंध्रवड्यात आहे काळोख घरात खवीस दारी! ऐल साद पैल जाई चिंच फोक चोप देई ओरडा घुमत जाई भर बाजारी! ऐल 'चंद्रा' पैल 'निशा' अभिलाषा दशदिशा धुमसतात वेड्यापिशा पेटल्या सिगारी! ऐल जान पैल सखी बाप 'गाजरपारखी' दमदाटी हो सारखी 'वळ' 'माघारी'! ऐलपैलाच्याही पार तुझ्या परसाचे दार त्याच्या पायरीशी प्यार दे गं दुपारी! -चतुरंग
काव्यरस

ऐल-पैल

लेखक क्रान्ति यांनी गुरुवार, 15/12/2011 19:45 या दिवशी प्रकाशित केले.
ऐल मळा पैल तळे जायचे कुठे ना कळे टाकता पाऊल वळे पुन्हा माघारी ऐल दिवा पैल वात भेट नाही आयुष्यात मिट्ट काळोख घरात अवस दारी ऐल गंध पैल जाई मधे गूढ खोल खाई आक्रोश घुमत जाई कडेकपारी ऐल चंद्र पैल निशा घेरतात सुन्न दिशा घुमतात वेड्यापिशा स्वप्नांच्या घारी ऐल प्राण पैल सखा जीव भेटीला पारखा खुपतो काट्यासारखा सल जिव्हारी ऐलपैलाच्याही पार तुझ्या महालाचे दार त्याच्या पायरीशी थार दे रे मुरारी
काव्यरस

(काय साला त्रास आहे!)

लेखक मेघवेडा यांनी गुरुवार, 15/12/2011 01:27 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा : - अर्थात हीच! मिसळलेला काव्यप्रेमी यांनी ह. घ्यावं. मूळ कविता फारच सुंदर आहे. तिला मी दिलेली दाद समजावी. :) भर दुपारी चाललेला गायनाचा तास आहे सांग कैसी काढु डुलकी, ताप हा डोक्यास आहे झोप येता धावली ती बावळी कार्टीं तुझी गं सोड तू छंदास या, हा मद्गळ्यासी फास आहे तान लावोनि भसाडी, रेडक्याला साजिरीशी गंध नाही त्या सुरांचा.. च्यायला!

घेऊ कसा उखाणा ..?

लेखक मनीषा यांनी बुधवार, 14/12/2011 15:24 या दिवशी प्रकाशित केले.
बरं का मंडळी ...... एकदा एका गावात .. मोठी लगीन घाई झाली पायताणं नाही कुणाच्या .. पायामध्ये राहिली । फेटे आणि मुंडाशी .. डोईवर चढली बिलवर , पाटल्या संगे .. नथ ही झुलली । जिलब्यांची रास .. श्रीखंडाचा घास रंगीत रांगोळीची .. पंगतही सजली । नाव घ्या, नाव घ्या .. मंडळी बोलली नवी नवी पाटलीण .. गालातच हसली । घेऊ कसा उखाणा .. (तिला) कोडं पडलं नवं कोणाचं नाव ? .. आणि कसं बाई घ्यावं? । सगळे म्हणती बाई .. लाजू नको काही नाव घे झोकात .. आणि सांग काही-बाही । पाटलीण बोलली लाजून .. घेते मी नाव मान तुमचा राखून ताई, माई, अक्का जरा ...

भरारी

लेखक navinavakhi यांनी बुधवार, 14/12/2011 14:48 या दिवशी प्रकाशित केले.
अंधार हा असा, काळोखल्या दिशा तुजवीण सख्या रे, दयनीय ही दशा मारू कुणा मी हाका तू देवाघरचा वासी सांगू दुखः कुणाला तू केवळ मनात वससी दाखवू कुणाला मनातली स्वप्ने तुजसवे पाहिलेली जो तो हळहळे क्षणभर नि दाखवे सहानुभूती नको खोटा आधार कुणाचा जगण्यासाठी तुझ्या प्रेमाच्या बळावर मरीन भरारी मोठी
काव्यरस