Skip to main content

कविता

कठीण आहे कधी कधी

लेखक निनाव यांनी सोमवार, 18/04/2011 01:47 या दिवशी प्रकाशित केले.
कठीण आहे कधी कधी लिहिणे शब्दांना तुझ्या हृदयाची भाषा ओठांस कळतांना आठवत नाहीत शब्द तु समोर असतांना नेहमीच पडतात अपुरे मग तुला लिहितांना लाजुन जे झुकतात नजरांचे प्रणय होतांना शब्दात करू कसे परिमित अश्या तुझ्या डोळ्यांना हरवतो मी तुझ्या ह्रदयाचे स्पंदन तीव्र ऐकतांना सांग आता लावू कसे शब्द ह्या चालीस बसतांना बांधु कसे शंब्दात अल्हड केश तुझे ते उडतांना जीवच जाईल माझा तसा प्रयत्न देखील करतांना कठीण आहे कधी कधी लिहिणे शब्दांना तुझ्या हृदयाची भाषा ओठांस कळतांना

समुद्र भरल्या डोळ्यांनी

लेखक तीन फुल्या तीन बदाम यांनी रविवार, 17/04/2011 22:20 या दिवशी प्रकाशित केले.
निशब्द पण बोलके क्षण, हसरे अन लाजरे क्षण, गालाच्या खळी आडून वेडावणारे तर ओठांनी खुणावणारे क्षण. वेणीच्या पेडा बरोबर सुटतं जाणारे तर तु़झ्या मनात गुंतत जाणारे क्षण. क्षण तु़झ्या-माझ्या भेटीचे शोधतोय मी... समुद्र भरल्या डोळ्यांनी....

कविता माझी

लेखक निनाव यांनी रविवार, 17/04/2011 15:07 या दिवशी प्रकाशित केले.
वय धावते आहे तरी, कधी वेळ थांबतेच मग कितीही ठरविले लिहायचे नाही, तरी पेन उचलले जाते धडपडच सुरु होते माझ्या मनी मग असंख्य लाटांची आणि उतरते मग त्यातून सावरत.. नाजुक कविता माझी .. सुंदर मउ पायांनी .. अलगद पाउले टाकत उघडून दार मनाचे बाहेर डोकावत थांबते, थोडी लाजते मग पुन्हा नजर उचलून बघते माझ्या डोळ्यात स्पर्शते मन माझे..अन ऐकते स्पंदन हृदयातले डोळे माझे निजतात शब्द माझे पोहोचतात भावनांच्या खोल समुद्रात माझेच मला कळत नाही मग भान वेळे चे उरत नाही मग अन उतरते ती हळुवार विश्वात माझ्या .... कविता माझी !

फोडली तिजोरी - लुटला सर्व ठेवा -

लेखक विदेश यांनी रविवार, 17/04/2011 14:43 या दिवशी प्रकाशित केले.
(चाल : देहाची तिजोरी - भक्तीचाच ठेवा ) फोडली तिजोरी - लुटला सर्व ठेवा पकडणार चोरांना त्या - पकडणार केव्हा ? नसे दूर चौकी इथुनी फार पोलिसांची , तरी चोरटयांच्या नाही भीती मुळी त्यांची - सरावल्या चोरांनी का दंड थोपटावा ?
काव्यरस

दूर वाट अशी ही छळणारी

लेखक निनाव यांनी शनिवार, 16/04/2011 13:04 या दिवशी प्रकाशित केले.
दूर वाट अशी ही छळणारी वळणावर अलगद निजणारी; रात्र मोजती अंतर किती अंतरावर तुझ्या ही सळणारी. ह्रदयी टोचते ही पानगळ मनास बोचतो गार वारा; येशील कधी तु सांग सख्या रे झुंझते वात ही विझणारी. नागिण विरहाची भिरणारी आवळते पाश भोवती मज असा; येशील कधी तु सांग सख्या रे विषदंश हर-क्षण ही घेणारी. खडू आठवणींचे नदीत टाकतांना तरंग एक एक उठणारी; येशील कधी तु सांग सख्या रे जगेल तरंग का ही विरणारी.

कार्ट्यांस...

लेखक नगरीनिरंजन यांनी शनिवार, 16/04/2011 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावरच्या सर्व कार्ट्यांस समर्पित. (चालः चल री सजनी अब क्या सोचे) लिही रे भावा तू अपुल्या मनचे डोहाळे कशाला प्रतिक्रियांचे लिही रे... टाकून खरडी भिक्षा मागणे जमवून कंपू गोंधळ घालणे असं काही ऽऽ करू नकोऽऽ, करू नकोऽ रे लिही रे... असेलही तुझी लेखणी धमाल करिती इथले सगळेचि लाल स्वतःचीऽऽ, स्वतःचीऽऽ, स्वतःचीऽच रे लिही रे... लिहीले जरी तू ओतुनि तनमन गेले जरी पुढच्या पानी ते पटकन दबलेलाऽ कोळसाऽ तो होईल हिरा रे लिही रे... जुन्या जाणत्यांचे लागावे चरणी आतल्या गोटात लावावी वरणी भाषा नाहीऽ शैली नाहीऽ पीआर हवा रे लिही रे...

पाऊस माझा

लेखक नगरीनिरंजन यांनी शनिवार, 16/04/2011 08:26 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येकाचं पावसाशी स्वतःचं असं एक नातं असतंच शिवाय ते वेगवेगळ्यावेळी वेगवेगळंही असतं.

आकुंचन

लेखक निनाव यांनी शनिवार, 16/04/2011 00:55 या दिवशी प्रकाशित केले.
कोठे गेले पूल, कोठे गेले रस्ते, सापडत नाहिये व्यायामशाळा मुलांचे दप्तर, वह्या अन झब्बे अन आज काय तर गेले पाणी अन सोबत गेल्या वाहूनी जल-वाहिन्या दॄष्टीहिनास मिळाला आज काय सांगू जड-वाहन चालविण्याचा परवाना गल्ली-बोळात गरज तिथे उभा आज वैद्यकिय सहाय्य्कांचा दवाखाना ओरबाडली गेली लज्जा कुणाची दमटवले गेले कुणाला दाबली जमीन कुणाची तर खल्लासच केले कुणाला अपंग व्यवस्था, लुळे कायदे लुटले गेले आज भर चौकात मज दिसलेच नाही हे सगळे काय सांगू 'व्यस्त' होतो मी 'जवळचे' बघताना लोचट-गिरी ला उरले नाही वय पाहावा तिथे रोग मानसिक विकॄती चा लहान असो वा मोठी - लाज कुणाची तिला वरतून खाली बघातांना साठे झाले जप्त, सा

कृष्ण

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी शुक्रवार, 15/04/2011 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
कृष्ण - १ कधी कधी वाटते...... कृष्ण होण्यापेक्षा राधा व्हावे...... पहाटेच्या चांद्रवैभवाचे रुपेरी चांद्रकण गाळणार्‍या कदंब वृक्षाखाली.......... सुंदर मोरपिसांच्या........ मोठ्या मोठ्या डोळ्यांची नक्षी असलेली..... उदात्त युगांतीत प्रेमाची भरजरी शाल पांघरावी.... म्हणजे मग..... द्रौपदीच्या अब्रूचे धिंडवडे निघतांना....... साध्या सुती साडीच्या दोन हात..... तुकड्याची चिंता करण्याची गरज उरत नाही....... कृष्ण - २ पण मग नंतर वाटते...... राधा होण्यापेक्षाही मीरा व्हावे......... कृ