Skip to main content

कविता

नारो शंकराची घंटा ...!!

लेखक प्रकाश१११ यांनी मंगळवार, 12/04/2011 16:12 या दिवशी प्रकाशित केले.
त्या दगडी देवळाच्या मुख्य दरवाजावर कोरलेल्या अर्धवर्तुळात ती घंटा पितळेची ,कदाचित पंचधातूची पुरुषभर उंचीची घनघोर आवाजाची खालूनच नदी वाहतेय गोदावरी आखीव रेखीव काठ शिसवी रंगाच्या कभिन्न दगडांनी बांधलेला किनारां पावसाळ्यात त्यावरून वाहणारे झुळझुळ पाणी पायावरून वेलांटत नागमोडी पसरत सरकणारे पाय भिजवीत महादेवाच्या दर्शनाला गेल्याची बारीकशी आठवण मंदिरात घुसताना घंटेचे दर्शन घाबरून जायचो तिच्या आकाराने बेलाचे पान वाहताना डोळे मिटून घ्यायचो तेव्हा घंटाच यायची डोळ्यासमोर घंटा तशी बर्याच उंचीवर महापुरात देखील पाणी नाही लागत तिच्या पायाला जेव्हा लागेल तेव्हा सगळे गाव जाईल वाहू
काव्यरस

काजव्यांचा जणू सूर्यास शाप आहे

लेखक गणेशा यांनी मंगळवार, 12/04/2011 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
बंद ओठ बंद कान मनही बंद का हो? न्याय मिळेल का येथे एक जीव किंचाळत आहे सहनशिलतेचा येथे आज संग्राम आहे समाजात माथेफिरुंचाच सरंजाम आहे गवताची पाती सजली या भयाण राती काजव्यांचा जणू सूर्यास शाप आहे का लढवय्या आता बदनाम होत आहे पाठीत खंजीर खुपसणार्‍यांचा धाक आहे यल्गाराचा आता दबला आवाज येथे खोट्यांचाच येथे चित्कार आहे ------ शब्दमेघ

सरसरणारे यौवन तुझे ते

लेखक निनाव यांनी मंगळवार, 12/04/2011 00:47 या दिवशी प्रकाशित केले.
सर सर सर सर थेंब गालावर ओले मोती ते ओघळणारे पडता पडता थेट तुझ्यावर मन माझे ते जळणारे थांबायचे? सरकायचे? प्रश्न त्यास पडले भिजवायचे-लाजवायचे मनी असे ठरले केसांमधुनी ओठांवरती थेंब ते कोसळणारे श्वासांमधल्या गंघामधुनी प्रेम ते दरवळणारे बोलायचे? न बोलायचे? प्रश्न त्यास पडले भुलवायचे, भिजवायचे मनी असे ठरले लाजत लाजत गुलाबी मनावर नाजुक इतुके ओठ लाजणारे येताच जवळ मी होत बांवरे गोड भितीनं ते थरथरणारे स्पर्शायचे? फुलवायचे? प्रश्न त्यास पडले पाहायचे, साठवायचे मनी असे ठरले उन्मद लाटा हरवुन वाटा किनार्यावर आदळणारे सोडत बंधन हळुच सारे तन तुझे आज पाघळणारे नेसायचे? सावरायचे?

अक्षय पात्र

लेखक ajay wankhede यांनी सोमवार, 11/04/2011 13:15 या दिवशी प्रकाशित केले.
तु मला अजुनहि जानलं नाहिस कारण तुझा स्वभाव च तसा आहे त्याला मि तरि काय करु. मि तर भरभरुन देतो... तुला घेता च येत नाहि , त्याला मि तरि काय करु. मि देता देता थकत नाहि, पण तु घेता घेता च थकतेस, त्याला मि तरि काय करु. मि तुला देतो ते हि तुला आवडत नाहि, मि तिला देतो ते हि तुला आवडत नाहि. कारण तुझा स्वभाव च तसा आहे.. त्याला मि तरि काय करु. मि तुला तिला सर्वानाच देतो ... तरि माझं पात्र रिकामं होत नाहि. मि सदैव त्रुप्त तु सदैव अत्रुप्त . आज मि तुला माझं अक्षयपात्र च देतो.. ते तरि तु निस्वन्शयि मनाने घे. नि मि जसा देतो तसं तु भरभरुन दे.

का केली मैत्री ही अशी...?

लेखक हर्षद प्रभुदेसाई यांनी रविवार, 10/04/2011 23:01 या दिवशी प्रकाशित केले.
खरं सांगायचं तर..... आज-काल मैत्री करयची देखील खुप भीती वाटते । कारण.... कुणाशीतरी आपल्याला ती, नकळतच बांधून टाकते । बांधलेते धागे मग, सहजा-सहजी तुटत नाहीत । भावनांचे पीळ त्या नात्यातले, काहीकेल्या सुटत नाहीत । सुटले पीळ तुटले धागे तरी, ते जखमा देउन जातात । जखमा त्या डोळ्यांत अपुल्या, ओलावा ठेउन जातात । ओलावा त्या डोल्यांतला, लपवू पाहता लपत नाही । डोळ्यांची मिटली झापडे तरी, थेंब खाली पडल्या वाचून राहत नाही । आणि मग...! का केली मैत्री ही अशी...? हा प्रश्‍न मला सतावत राहतो । पण मी मात्र सदैव असाच, मैत्री प्रत्येकाशी करत राहतो । हर्षद अ.प्रभुदेसाई....

वाच वाचुनी अति मी दमले -

लेखक विदेश यांनी रविवार, 10/04/2011 09:32 या दिवशी प्रकाशित केले.
(चाल : नाच नाचुनी अति मी दमले -) वाच वाचुनी अति मी दमले - विटले रे कवितेला ! कविता-लेखन तुज न झेपले , निमुटपणा ना कसला ! आजच कचरा-कुंडी-स्थानी सफाईवाला आला ! निरुपयोगी कविता-कागद रद्दी घातली त्याला ! विषय आज ना काही सुचेना , अती ताप तो झाला ! अजब तुझ्या त्या छंदापायी , सुसंवाद ना घडला ! रोख मानधन... नाही काही - मजवर राग का धरला ? स्वत: दुजांच्या घेता फिरक्या - अंगलटी त्या आल्या ! कवितेतील मज काव्य कळेना... कागद वाया गेला ! अंधारी ही डोळ्या पुढती - जीव वाचना भ्याला !!

आज ही गेले

लेखक निनाव यांनी रविवार, 10/04/2011 02:47 या दिवशी प्रकाशित केले.
आज ही गेले काल मधे जमा झाले आठवणींच्या पेटित असे बंद झाले!! न आठवलो मी कुणास आजही न कुणी मज आज भेटीस आले!! बघून आभाळ खिडकी तुन म्हणतो मी चला दिवस अजुन एक कमी झाले!! अनवाणी चालतांना टोचले जर पायी अजुन एक घाव, नवीन काय झाले!! कुणी ठेवले नाव मज, तिच्या नावानं नाव असे झालेच, तर निनाव काय झाले!! आज ही गेले काल मधे जमा झाले आठवणींच्या पेटित असे बंद झाले!!

संकल्प सिद्धी

लेखक बाळासाहेब तानवडे यांनी शनिवार, 09/04/2011 20:09 या दिवशी प्रकाशित केले.
संकल्प सिद्धी मिळेल जीवनात खात्रीने जय. पहिलं पक्क असावं अंतिम ध्येय. स्वप्नरंजनातच न व्हावं चकित. कागदावर ध्येयाच होऊ दे लिखित. नवी कल्पना नित्य लिखितात भरु दे. अंतिम ध्येयाला परिपूर्णत्व येऊ दे. सार्याय कल्पनांची आता योजना बनु दे. प्राथमिकता महत्ते अनुक्रम ठरू दे. नुसत्या ध्येयाला ना आरंभ ना शेवट. पूर्णत्वाची समय सीमा असावी चिवट. आता ना कशाची वाट पहावी. तत्काळ कार्याला सुरुवात करावी. एक ही दिन ना व्यर्थ असावा. अंतिम ध्येय प्राप्तीतच अर्थ दिसावा. लिखित ध्येयाच महत्व सर्वास कळावं. मनाजोग यश सर्वास मिळावं. कवी : बाळासाहेब तानवडे © बाळासाहेब तानवडे – ०४/०४/२०११
काव्यरस

तुझ्या सावलीस लपता लपता

लेखक निनाव यांनी शुक्रवार, 08/04/2011 18:13 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा देत आहे ही रचना.. ------------------ तुझ्या सावलीस लपता लपता जात होतो गल्लीत अंधार जसा कुठे होते ठाऊक तरी मला भेटशील तिथं ही तु अशी वेड्यावानी माझी वाट बघता विखुरले काच असे आज खाली असंख्य तुकड्यांमधे तारेच ओठी लागायचे माझ्या कधी नजर काढून माझी झाले रक्तरंजित विघ्न जणु माझे हरता शोधत राहिले ते सारे त्याला त्या घरातच हसु न आवरले मज पाहाता पाहाता गुंतले होते मन कुणाचे किती बघत जड होता तो कोपर्‍यात उभा दाटुन होते मन त्याचे जाता जाता राहिले रिकामेच ते घर त्याच्या गेल्यानं न आलेच मृत्युही तिथे राहावयास कधी एकटेपण आले मग असे काही शेजार कुणी नसलेले जगले काही काळ निनाव राहता

बहकलेले दिवस

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी शुक्रवार, 08/04/2011 16:33 या दिवशी प्रकाशित केले.
कसे ते बहकलेले दिवस अन् कश्या त्या मंतरलेल्या रात्री मोहर तुझ्या अवघ्या देहास अन् सुगंधी दरवळ माझ्या गात्री एवढे एवढे होत उरले होते जग फक्त आपल्या दोघांचे क्षणाक्षणांवर उमटले होते सुंदर ठसे आपल्या मिलनाचे सहवासी सुखाचा सोहळा निळ्या नभीचा निळा चांदवा अद्भुत अनुभव आगळा तुझ्या मिठीचा नवा गोडवा कंपित ओठांची धुंद सय थरथरते स्पर्श मोरपिशी गंधित श्वासांची संथ लय झरझरते हर्ष हृदयाशी झुगारून दे काळाची बंधने फिरून जागवं ते क्षणन् क्षण उभारून दे स्मरणांची स्पंदने भारुनी अस्वस्थतेचे कणन् कण |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (०८/०४/२०११)
काव्यरस