Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

उस्मानाबादेतून कोणी आहे का इकडे? [गायकवाड प्रकरण]

अ
अत्रे
Mon, 03/27/2017 - 07:34
🗣 592 प्रतिसाद
चप्पलमार खा. गायकवाड यांना विमानातून प्रवास करण्यास केलेल्या बंदीविरोधात शिवसेनेने उस्मानाबाद बंदाचा इशारा दिला आहे (http://www.hindustantimes.com/india-news/shiv-sena-calls-for-osmanabad-bandh-may-bring-privilege-motion-over-mp-ravindra-gaikwad-on-no-fly-list/story-5aYaUj9cwxRup9US7FiteL.html) माफी मागायची ओडून असले बंद करण्या इतपत त्यांची मजल जाते म्हणजे उस्मानाबादेतील लोकांमध्ये काही प्रमाणात तरी खा. गायकवाड यांच्या बद्दल सहानुभूती (!?) आहे असे वाटते. मिपा वर कोणी तिथून आहे काय? तिथल्या सामान्य लोकांचे म्हणणे काय आहे?
वर्गीकरण
चर्चा

प्रतिक्रिया द्या
94896 वाचन

💬 प्रतिसाद (592)
स
सतीश कुडतरकर Mon, 03/27/2017 - 08:03 नवीन
मी सुद्धा सोलापूरकरांना शोधतोय, सैनिकांच कौतुक करणाऱ्या त्या सुधाकर परिचारक विषयी विचारायचं.
ज
जिमहेश Mon, 03/27/2017 - 08:58 नवीन
प्रशान्त परिचारक
↩ प्रतिसाद: सतीश कुडतरकर
स
सतीश कुडतरकर Mon, 03/27/2017 - 09:10 नवीन
धन्यवाद!
↩ प्रतिसाद: जिमहेश
ल
लोनली प्लॅनेट Mon, 03/27/2017 - 08:21 नवीन
या मूर्खाला कोणाही उस्मानाबाद करांचा अजिबात पाठिंबा नाही लोकसभा निवडणुकीच्या वेळी केवळ मोदींना पंतप्रधान करायचे म्हणून याला निवडून द्यावे लागले होते आणि हि याची पहिली आणि शेवटची टर्म. आणि काहीही झाले तरी नेत्यांचे चेले आणि त्या त्या पक्षाचे वेठबिगार बंद ची घोषणा करतातच, त्याला कोणीही भीक घालत नाही
अ
अत्रे Mon, 03/27/2017 - 08:29 नवीन
धन्यवाद. ऐकून बरे वाटले.
↩ प्रतिसाद: लोनली प्लॅनेट
श
शार्दुल_हातोळकर Mon, 03/27/2017 - 20:07 नवीन
हे असे "मूर्ख" वगैरे विशेषणे वापरुन प्रतिसाद लिहिणे आणि त्यावर दुसऱ्या सभासदाने उघडपणे समाधान व्यक्त करणे इत्यादी मिपाच्या पॉलिसीजमधे मान्य आहे का?
↩ प्रतिसाद: अत्रे
म
मोदक Mon, 03/27/2017 - 20:18 नवीन
अहो इथे मुख्यमंत्र्यांनाही हरामखोर म्हटले गेले आहे. मग मूर्ख वगैरे एकदम सामान्य गोष्टी आहेत.
↩ प्रतिसाद: शार्दुल_हातोळकर
श
शार्दुल_हातोळकर Mon, 03/27/2017 - 20:33 नवीन
मला इथे लक्षात येताच मी संपादकांच्या निदर्शनास आणुन देण्याचा प्रयत्न केला. पण एकुणच चर्चा ही निकोपच व्हायला हवी. गलिच्छ भाषा वापरणे फार काही अवघड नसते. शिवाय मिपासारखा प्लॅटफॉर्म हाताशी मिळाला म्हणजे काहीही मनाला येईल ते आक्षेपार्ह भाषेत लिहिण्याचा अधिकार लोकांना प्राप्त होत नाही!
↩ प्रतिसाद: मोदक
अ
अत्रे Tue, 03/28/2017 - 01:49 नवीन
भाषेबद्दल जो निर्णय सम्पादक घेतील तो योग्यच असेल. पण लोकांना चपलेने मारणाऱ्या खासदारांना शब्दांचा मार तरी नागरिक म्हणून देता यावा.
↩ प्रतिसाद: शार्दुल_हातोळकर
श
शार्दुल_हातोळकर Tue, 03/28/2017 - 07:45 नवीन
खाली "अभ्या..." यांनी दिलेल्या प्रतिसादात ते प्रस्तुत संसद सदस्यांच्या मतदारसंघातीलच आहेत हे सांगितले आहे आणि त्यांची मते स्पष्ट नमूद केली आहेत. यावरुन ग्राउंड लेव्हल वर प्रस्तुत संसद सदस्यांबद्दल तिथल्या लोकांचे साधारण मत काय आहे हे प्रतित होते. याउलट इथे वर "लोनली प्लॅनेट" या आयडीने आक्षेपार्ह भाषेत मत नोंदवताच तुम्ही प्रस्तुत आयडीची व्यक्ती उस्मानाबाद मतदारसंघातील आहे किंवा नाही हे न विचारताच "धन्यवाद. ऐकुन बरे वाटले" असे मत नोंदवले. यावरुन हे स्पष्ट दिसते आहे की केवळ उस्मानाबादच्या लोकांचे मत जाणुन घेणे हा तुमचा निस्पृह हेतु नव्हता तर तुमच्या मनात या प्रकरणाबद्दल पुर्वग्रहदुषित एकांगी भूमिका होती. त्याशिवाय सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही त्या विमान प्रकरणाचे प्रत्यक्ष साक्षीदार नसताना आणि अधिकृतरित्या नक्की चुक कोणाची होती/कोणी कोणास भडकवुन प्रकरण या थरास नेले हे कळालेले नसताना, गलिच्छ आणि आक्षेपार्ह भाषेतील प्रतिसादास सहमती दाखवुन मोकळे झालात. उद्या विमान कंपनीच्या लोकांनी चुकीचे वर्तन करुन संसद सदस्याला कठोर भूमिका घेण्यास भाग पाडल्याचे अधिकृतरित्या सिद्ध झाल्यास तुम्ही स्वतः इथे मिपावर आक्षेपार्ह भाषेबद्दल बिनशर्त माफी मागणार आहात काय? मिपाचा असा गैरवापर होणे अत्यंत चुकीचे आहे. अर्थात संपादक त्याबद्दल निर्णय घेतीलच!
↩ प्रतिसाद: अत्रे
अ
अत्रे Tue, 03/28/2017 - 07:59 नवीन
मंडळ आभारी आहे :)
↩ प्रतिसाद: शार्दुल_हातोळकर
श
शार्दुल_हातोळकर Tue, 03/28/2017 - 08:59 नवीन
तुम्ही अत्यंत सोयिस्कररित्या मी वरच्या प्रतिसादात विचारलेल्या प्रश्नाला बगल देत आहात. त्यापेक्षा स्पष्ट उत्तर द्याल तर बरे होईल.
↩ प्रतिसाद: अत्रे
अ
अभ्या.. Tue, 03/28/2017 - 09:05 नवीन
ते तर आहेच. असल्यांकडून माफीचीही नाही अन आभाराचीही अपेक्षा नाही. त्यांनी स्वतःच सांगितलेय. शाब्दिक राडा घालायसाठीच आहेत ते फक्त.
↩ प्रतिसाद: शार्दुल_हातोळकर
अ
अत्रे Tue, 03/28/2017 - 09:17 नवीन
ओके, देतो तर उत्तर. १. अभ्या यांच्या प्रतिसादाला पण मी उत्तर दिले होते, तो प्रतिसाद दुर्लक्षित केला नाही (पुन्हा वाचा). आणि लोन्ली प्लॅनेट यांच्या प्रतिसादात त्यांची म्हटले होते कि "याला निवडून द्यावे लागले" - वाचून मला वाटले कि हे ही तिकडचेच असतील. आणि मला "हे पुन्हा निवडून येणार नाहीत" हे ऐकून आनंद झाला होता - नुसतं "मूर्ख" वाचून नाही. २.
उद्या विमान कंपनीच्या लोकांनी चुकीचे वर्तन करुन संसद सदस्याला कठोर भूमिका घेण्यास भाग पाडल्याचे अधिकृतरित्या सिद्ध झाल्यास तुम्ही स्वतः इथे मिपावर आक्षेपार्ह भाषेबद्दल बिनशर्त माफी मागणार आहात काय?
त्याचं कसंय.. मी हे मुळीच मनात नाही कि कोणी शिवीगाळ केली तरी आपल्याला शारीरिक मारहाण करण्याचा अधिकार नसतो. हे तुम्हाला मान्य आहे का - हो कि नाही - हे सांगा. आणि केली मारहाण तर माफी ही मागितलीच पाहिजे. हे तुम्हाला मान्य आहे का - हो कि नाही - हे सांगा. ३. समजा उद्या सिद्ध झाले कि एअर इंडिया वाल्यांनी त्यांना आधी शारीरिक मारहाण केली होती - तर मी स्वतःहून असे नमूद कारेन कि वृत्त माध्यमांनी पूर्ण चित्र दाखवले नाही. पण मी वापरलेले "चप्पलमार" वगैरे शब्द मग मी एअर इंडिया वाल्याना पण वापरेन - पण म्हणून गायकवाड यांना सूट देण्यात काहीच बरोबर नाही. माझा राग यावर आहे कि गायकवाड माफी न मागता नाक वर करून फुशारकी करतात.
↩ प्रतिसाद: शार्दुल_हातोळकर
अ
अत्रे Tue, 03/28/2017 - 09:23 नवीन
टायपिंग मिस्टेक - "अधिकार असतो" - असे वाचा. थोडक्यात चप्पलमार माणसाला चप्पलमार म्हणण्याबद्दल माफी कसली मागायची? पण त्यांना शारीरिक मारहाण झाल्याचे सिद्ध झाल्यास एवढे मान्य कारेन की चूक एकट्याची नव्हती.
↩ प्रतिसाद: अत्रे
श
शार्दुल_हातोळकर Tue, 03/28/2017 - 10:03 नवीन
अत्रे साहेब, माझा मुळ आक्षेप अयोग्य आणि एकेरी भाषेबद्दल होता हे मी अगदी स्पष्टपणे मांडलेले आहे. लोनली प्लॅनेट यांच्या प्रतिसादात तुम्हाला लोकनियुक्त संसद सदस्याबद्दलची एकेरी आणि अपमानास्पद भाषा आक्षेपार्ह वाटली नाही का? शिवाय खाली तुम्ही औरंगाबादचे आहात असे नमूद केले आहे आणि उस्मानाबादच्या लोकांना विचारताय म्हणजे तुम्हाला स्वतःला प्रस्तुत संसद सदस्यांच्या मतदारसंघाबद्दल आणि त्यांच्या कामाबद्दल तसेच लोकसंपर्काबद्दल अजिबात माहिती नाही हे स्पष्ट दिसते आहे. मग अशा स्थितीत तुम्ही लोनली प्लॅनेट यांच्या संपुर्ण प्रतिसादाशी उपलब्ध माहितीची कुठलीही पडताळणी न करता सहमत कसे काय झालात नव्हे उघड उघड आनंद व्यक्त कसा केलात? शिवाय तुम्ही म्हणताय की माफी न मागता एवढेच मान्य करेन की चुक एकट्याची नव्हती. अत्रे साहेब हे जगजाहीर आहे की टाळी कधी एका हाताने वाजत नसते. त्यासाठी असा स्वतंत्र धागा काढण्याची काही आवश्यकता नव्हती. शिवाय संबंधित आक्षेपार्ह प्रतिसादाला सहमती दर्शविणे म्हणजे त्या लोकसभा मतदारसंघातील त्यांना निवडुन देणाऱ्या १०-१२ लाख लोकांना तुम्ही नक्की काय समजत आहात? (जरा शोधुन पाहा उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ उस्मानाबाद, सोलापुर आणि लातुर या तीन जिल्ह्यात विखुरलेला आहे, मग अशा ठिकाणी निवडुन येणे किती अवघड असेल ते)
↩ प्रतिसाद: अत्रे
अ
अत्रे Tue, 03/28/2017 - 10:11 नवीन
तुम्ही आधी माझ्या दोन हो कि नाही प्रश्नाचे (वरती बघा) उत्तर द्या, मग या प्रतिसादाचे उत्तर देतो.
↩ प्रतिसाद: शार्दुल_हातोळकर
श
शार्दुल_हातोळकर Tue, 03/28/2017 - 10:40 नवीन
माझी मते स्पष्ट आहेत. मारहाण करणे हे कायद्याच्या दृष्टीकोनातुन चुकच. मी त्या गोष्टीचे कुठेही समर्थन केलेले नाही. पण तुम्ही या संपुर्ण प्रकाराची सखोल माहिती घेण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत नाही. शिवाय विमान कंपनीच्या लोकांच्या वर्तनाबद्दल तुम्ही तुमचे म्हणने मांडलेले नाही. या धाग्यावर देखील काही व्हिडिओ च्या लिंक्स दिल्या गेल्या आहेत तसेच काल मराठी न्युज चॅनेलवर पाहण्यात आले की विमान कंपनीच्या लोकांचे वर्तन कसे चुकीचे होते आणि त्यामुळेच ठिणगी पडुन संसद सदस्यांनी कठोर भुमिका घेतली. तुम्ही याबाबतीत updated नाही आहात काय? शिवाय संसद सदस्यांनी माफी मागावी की नाही हे माझ्या अखत्यारित नाही, तसेच तत्वतः माफी मागायला हवी की नाही ते मा. न्यायालयाच्या निकालानंतरच सामान्य माणसाला ठरविता येईल. पण तुमच्या उघड आणि अयोग्य भाषेच्या समर्थनाबद्दल माफी मागायची की नाही हे तुम्ही नक्कीच ठरवु शकता. शिवाय आपली चुक मान्य करुन माफी मागण्यात कमीपणा कसला? मला वाटते की तुमच्या प्रश्नांची मी अतिशय सुस्पष्ट उत्तरे दिली आहेत. आता माझी तुम्हाला विनंती आहे की मुळ अयोग्य भाषेचा मुद्दा सोडुन अधिकचे प्रतिप्रश्न उपस्थित करुन विषय भरकटवु नये.
↩ प्रतिसाद: अत्रे
म
मोदक Tue, 03/28/2017 - 06:32 नवीन
शिवाय मिपासारखा प्लॅटफॉर्म हाताशी मिळाला म्हणजे काहीही मनाला येईल ते आक्षेपार्ह भाषेत लिहिण्याचा अधिकार लोकांना प्राप्त होत नाही! हेच आणि असेच लोकांना नोटाबंदी झाल्यापासून सांगत आहे, पण पटतच नाही. बिन्धास्त खोटी माहिती देतात, चुकीच्या लॉजिकचे ट्रक फिरवतात, यांवर आपण उत्तरे दिली की मिपाकरांवर निखालस खोटी टीका करायची आणि ते ही उलटले की पळ काढणे आणि सोयीस्कर निवृत्ती स्वीकारणे आहेच.
↩ प्रतिसाद: शार्दुल_हातोळकर
श
शार्दुल_हातोळकर Tue, 03/28/2017 - 07:49 नवीन
चर्चा निकोप असावी, एकांगी आणि पुर्वग्रहदुषित नसावी हेच मुळी लोकांना पटत नाही!!
↩ प्रतिसाद: मोदक
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Tue, 03/28/2017 - 16:39 नवीन
ते ही उलटले की पळ काढणे आणि सोयीस्कर निवृत्ती स्वीकारणे आहेच.
ख्या ख्या ख्या हे लोकं ऑलिंपिक मधे प्लॅटिनम मेडल मिळवुन देतील एवढ्या पटकन पळतात बरं का रे. वरनं त्यांची एक्सक्युझेस ऐकणं रोचक प्रकार असतो. जनरली प्रत्येक गोष्टीमधलं आपल्यालाचं कळतं अशी वाटणारी माणसं ह्या क्याटेग्रीत बसतात (किंवा पळ काढतात). =))
↩ प्रतिसाद: मोदक
इ
इरसाल कार्टं गुरुवार, 04/06/2017 - 07:56 नवीन
नक्की कोणासाठी म्हणायचं हे?
↩ प्रतिसाद: मोदक
न
निष्पक्ष सदस्य Wed, 03/29/2017 - 15:27 नवीन
अहो इथे मुख्यमंत्र्यांनाही हरामखोर म्हटले गेले आहे. मग मूर्ख वगैरे एकदम सामान्य गोष्टी आहेत.
माझ्याबद्दल बोलत असाल तर मी सर्व हिंदी मिडियावाल्यांना हरामखोर म्हटलं आहे,,,,,,,,बाकि कोणाबद्दल बोलत असाल तर i don't know.
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक गुरुवार, 03/30/2017 - 04:21 नवीन
तुमच्याबद्दल बोलत नाहीये.. त्यामुळे गैरसमज नसावा. :)
↩ प्रतिसाद: निष्पक्ष सदस्य
अ
अत्रे Mon, 03/27/2017 - 09:02 नवीन
Shiv Sena MP Anandrao Adsul raises the issue of airlines banning his party MP Ravindra Gaikwad after the latter brutally thrashed an Air India staff. He also says actor Kapil Sharma too misbehaved with an airline staff earlier. But he was not banned. They why ban an MP?
लिंक वा! काय लॉजिक आहे! चोर तो चोर वर शिरजोर. यांना परत बालवाडीत पाठवायला पाहिजे. असली स्पष्टीकरणे तिथेच शोभतील. सामान्य लोकांपेक्षा खासदारांकडून कडून अधिक अपेक्षा करू नाही शकत का आपण?
ह
हतोळकरांचा प्रसाद Mon, 03/27/2017 - 11:37 नवीन
तुम्ही या प्रकरणाची नीट माहिती घ्यावी असे वाटते. खालील लिंक कामाला येते का ते बघा. ताज्या घडामोडी या धाग्यवर बरीच चर्चा झाली आहे ती पण वाचावी. http://www.loksatta.com/desh-videsh-news/raveendra-gaikwad-shivsena-mp-air-india-sukumar-air-hostess-1440530/ माध्यमे दाखवतात तेच खरे हेच मानून स्वतःची टोकाची मते मांडण्यात काय हशील? आणि उस्मानाबादमध्ये त्यांना आहेच पाठिंबा! उगाच मोदींसाठी त्यांना निवडून दिले वगैरे कारणे फोल ठरतात. २००९ च्या लोकसभेला मोदी नसताना, भाजपचा छुपा विरोध असताना आणि बार्शीसारखा मोठा भाग (जो काँग्रेस राष्ट्रवादीच्या पारड्यात पडणार होता) नवीन जोडला असताना देखील रवी गायकवाडांचा पराभव हा फक्त ६-७ हजाराच्या फरकाने झाला होता (पद्मसिंह पाटील आणि रवी गायकवाड दोघानांही ४ लाखांपेक्षा जास्त मते मिळाली होती). इथे कायद्याच्या दृष्टीने दोघेही चोर आहेत. तेव्हा चोर ते चोर वगैरे गैरलागू आहे. विमान कंपन्यांचा "नो फ्लाय" हा उद्दामपणा अजिबात खपवून घेतला जाऊ नये. कुठल्या कायद्याने नो फ्लाय लागू करण्यात आलाय? खासदारांना दाद लागू न देणाऱ्या कंपन्या सामान्य माणसांना काय दाद देणार?
↩ प्रतिसाद: अत्रे
अ
अत्रे Mon, 03/27/2017 - 11:46 नवीन
धन्यवाद. लिंक वाचली. दोन प्रश्न १. गायकवाड यांनी चप्पल मारली कि नाही ? हो किंवा नाही मध्ये उत्तर द्या. (त्यांनी स्वतः काबुल केले आहे) २. विमान कंपन्यांचा "नो फ्लाय" हा उद्दामपणा अजिबात खपवून घेतला जाऊ नये. कुठल्या कायद्याने नो फ्लाय लागू करण्यात आलाय? याचे उत्तर खाली मिळेल
12:18 pm: Minister of Civil Aviation Ashok Gajpati Raju responds. "I just want to put things in right perspective. **Around November 2014, there was a lot of discussion on demeanor of the passengers. Any passenger whose demeanor is bad is stopped from travelling now**. An MP is also a passenger, we can't have unequal treatment to people of different classes, we need to keep safety in mind, can't compromise safety of airlines," says the Aviation Minister.
http://www.thehindu.com/news/national/live-updates-from-budget-session-in-lok-sabha-and-rajya-sabha/article17671359.एके समजा तुम्ही हॉटेल मध्ये जाऊन वेटर ला चपलेने बडवले तर हॉटेल ने का म्हणून तुम्हाला परत आत घ्यावे? कॉमन सेन्स ची गोष्ट आहे.
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
अ
अत्रे Mon, 03/27/2017 - 11:47 नवीन
बरोबर url http://www.thehindu.com/news/national/live-updates-from-budget-session-in-lok-sabha-and-rajya-sabha/article17671359.ece
↩ प्रतिसाद: अत्रे
ग
गॅरी ट्रुमन Mon, 03/27/2017 - 11:58 नवीन
An MP is also a passenger, we can't have unequal treatment to people of different classes
यापुढे जाऊन जर आमदार,खासदार,मंत्री अशा पदावर असलेल्या व्यक्तीने असा बेजबाबदारपणा केला तर त्याला त्याच बेजबाबदारपणासाठी सामान्य माणसाला असेल त्यापेक्षा अधिक कडक शिक्षा हवी असे मी म्हणेन. तुम्ही जर का लोकप्रतिनिधी असाल तर तुमच्या वर्तनातून लोकांपुढे आदर्श निर्माण केला पाहिजे.जर असे वर्तन लोकप्रतिनिधींचेच असेल तर ते कसे चालेल? बाकी जर का त्या कर्मचार्‍याने रवी गायकवाडांना 'तू एम.पी असशील तर तुझ्या घरचा. नियम म्हणजे नियम' असे म्हटले असेल तर तो कर्मचारी अभिनंदनास पात्र आहे. असल्या बेमुर्वत लोकप्रतिनिधींना चाप लावायचे धाडस दाखविणे ही साधी गोष्ट नाही. या पेंग्विनसेनेची आणि त्यांच्या समर्थकांची नेहमी मजा वाटते. एकीकडे सतत शिवाजी महाराजांचा घोषा लावायचा. पण त्याच शिवाजी महाराजांच्या मावळ्याने 'परवलीचा शब्द माहित नसेल तर तुम्ही प्रत्यक्ष शिवाजी महाराज जरी असलात तरी गडाचे दरवाजे तुमच्यासाठी उघडणार नाही' असे म्हटले होते अशी गोष्ट आहे. म्हणजे कोणीही-- अगदी स्वतः स्वराज्याचे संस्थापक छत्रपतीही नियमावर नाहीत हा छत्रपतींचा आदर्श होता. त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून शिवसेनेचा एम.पी म्हणजे मानवजातीचे कल्याण करायला आकाशातून टपकला आहे अशी धारणा करून घेऊन वर उद्दामपणाचे समर्थन करायचे आणि त्याचवेळी त्याच शिवाजीमहाराजांच्या नावाचाही जप करायचा!! आणि यात काही विसंगती आहे हे पण त्यांच्या गावी नसते. मागे शिवसेनेच्या एका कार्यकर्त्याने असेच काहीतरी झाले म्हणून ट्रॅफिक पोलिसाला थोबडावला होता. तर या खासदाराने एअर इंडियाच्या कर्मचार्‍याला मारहाण केली आहे. सामान्य शिवसैनिक ते खासदार अशी प्रगती झाल्यावर कोणाला थोबडावायचे यातही प्रगती व्हायला नको का? उंचे लोग उंची पसंद!!
↩ प्रतिसाद: अत्रे
ह
हतोळकरांचा प्रसाद Mon, 03/27/2017 - 12:27 नवीन
ट्रुमन साहेब, मुजोर नेते आणि मुजोर बाबू लोक याना चाप लावण्यासाठी कानाखाली मारली तर त्याला सहानुभूती मिळते हि परिस्थिती आली आहे हे खरे आहे. पण त्याचे असे सरसकटीकरण योग्य नाही. गायकवाड शांतपणे बोलत असताना सुकुमार यांच्याकडून काहीतरी वाक्य गेल्याचे ती हवाई सुंदरी म्हणते आहे. मी माझ्या माहितीनुसार अरेरावी करून तू एमपी असशील तर घरचा आणि मोदींकडे तक्रार करेन हे ते वाक्य असावे असे म्हटले होते. वास्तविक वेबवरलया काही प्रतिक्रियांमध्ये हा टर्निंग पॉईंट म्हणजे गायकवाडांना "आईवरून शिवी" असल्याचे ऐकले आहे. विडिओत ते ऐकूही येतेय असे काही लोकांचे म्हणणे आहे. मी तो व्हिडीओ पाहून काही माहिती मिळतेय का ते पाहायचा प्रयत्न करतो. पण मुद्दा हा आहे कि या प्रकरणातल्या गायकवाडांच्या बाजूच्या बऱ्याच गोष्टी ह्या सरळ सरळ दुर्लक्ष करण्यात येत आहेत त्याचे एकमेव कारण ते शिवसेनेचे आहेत हे भासते. चप्पल ने मारणे हा कायद्याने गुन्हा आहेच आणि त्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच आहे. ती प्रक्रिया हि कायद्याने दोन माणसातील भांडण ह्या प्रकारेच हाताळली जायला हवी. विरोधाला विरोध करायचा म्हणून काहीही उदाहरणे देऊन कसे चालेल? वर एक हॉटेलचे उदाहरण पहिले आपण. एका हॉटेल मध्ये जर तिथल्या वेटरने अपशब्द वापरले आणि त्यातून बाचाबाची झाली तर शहरातल्या सर्व हॉटेल्सनी आपल्यावर बंदी टाकावी? मोगलाई आहे का ही? कि सगळे राजकारणी म्हणजे गलिच्छ आणि समाजातील इतर घटक चांगले हे गृहीतच धरून चालायचे? नेत्यांच्या (एकुणात एकूण सगळ्या पक्षांच्या, एकही सोडून नाही) उद्दामपणाची हजारो उदाहरणे सांगता येतील आणि दररोज डोळ्यासमोर दिसतात. पण फक्त शिवसेनेचेच तसे आहे म्हणून त्यांना धारेवर धरण्यात काय अर्थ आहे? शिवाजी महाराजांचे नाव न घेणारा कुठला पक्ष आहे का आता? शिवाय नाव घेऊन ते छत्रपतींचा आदर्श पाळणारा आहे का कुठला पक्ष? त्या गोष्टी त्या त्या नेत्यांचं वैयक्तिक प्रकरण गृहीत धरून कायद्याने का सोडवलं जाऊ नये?
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
अ
अत्रे Mon, 03/27/2017 - 12:39 नवीन
वास्तविक वेबवरलया काही प्रतिक्रियांमध्ये हा टर्निंग पॉईंट म्हणजे गायकवाडांना "आईवरून शिवी" असल्याचे ऐकले आहे. विडिओत ते ऐकूही येतेय असे काही लोकांचे म्हणणे आहे. .
याची लिंक देता का? फेसबुक वर वाचले का रेडिट? तुमचं (शिवसेना पॉईंट) म्हणणं थोडाफार पटतं. कारण त्यांची प्रतिमाच तशी झालेली आहे. शिवसेनेला खळ्ळखट्याक आणि राडा करण्याची हौस असते. यावेळी त्यांचे शिलेदार चांगले कायद्याच्या कचाट्यात अडकले, म्हणून मला (आणि माझ्यासाख्या शांतताप्रिय नागरिकाना ) पर्सनली फार आनंद झाला आहे हे मीही मान्य करतो.
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
अ
अभ्या.. Mon, 03/27/2017 - 12:45 नवीन
शिवसेनेला खळ्ळखट्याक आणि राडा करण्याची हौस असते.
बोर्डावर ऑलरेडी एक धागा चालू असताना उस्मानाबादचे सेपरेट नाव घेऊन राडा करायच्या तुमच्या हौसेचे कारण कळले नाही अद्याप.
↩ प्रतिसाद: अत्रे
अ
अत्रे Mon, 03/27/2017 - 12:47 नवीन
हाहा, शाब्दिक राडा हो! :) त्याने कुठे काय होतंय...
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. Mon, 03/27/2017 - 12:52 नवीन
बरं बरं. मग चालूद्या काय होत नसंल तर. . बरं झालं च्यायला तुम्ही सांगितलं ते. लक्षच द्यायला नाय पायजे.. मायची किटकिट
↩ प्रतिसाद: अत्रे
ग
गणामास्तर Mon, 03/27/2017 - 13:08 नवीन
आमचा राड्याला थोडा हातभार : ते धाराशिवचे खासदार हैत, काय लावलंय उगा उस्मानाबाद उस्मानाबाद.
↩ प्रतिसाद: अभ्या..
ब
बॅटमॅन Wed, 04/12/2017 - 20:39 नवीन
नायतर काय भेंडी. नामांतर नामांतराच्या नावाने बोंबलणार्‍यांना म्हणा अगोदर उस्मानाबादचं धाराशिव करा. औरंगाबादेचं नंतर पाहता येईल. धाराशिव म्हणणारी लोकं अजून जिवंत आहेत. ते नाव रिस्टोअर केले तर उलट भारी होईल पण त्याला ग्लॅमर नाही ना. शिवसेनावाल्यांच्या डोक्यात हे शिरेल का?
↩ प्रतिसाद: गणामास्तर
ह
हतोळकरांचा प्रसाद Mon, 03/27/2017 - 13:41 नवीन
याची लिंक देता का? फेसबुक वर वाचले का रेडिट?
हे तुम्ही खोचकपणे विचारात नसाल असे गृहीत धरून उत्तर देतोय. मी काही एपपेरच्या खालच्या प्रतिक्रियांमध्ये आणि फेसबुकच्या कंमेंट्स मधेही वाचले. तूर्तास नक्की आठवत नाही कुठे ते पण म्हणूनच मी म्हणालो कि मी तो व्हिडीओ पाहून काही माहिती मिळतेय का ते पाहायचा प्रयत्न करतो. बाकी कायद्याचे कचाट्यात सापडले वगैरे केस चालून निकाल लागला तर तुमचा आनंद सार्थकी लागेल.
↩ प्रतिसाद: अत्रे
श
श्रीगुरुजी Mon, 03/27/2017 - 12:53 नवीन
गायकवाड शांतपणे बोलत असताना सुकुमार यांच्याकडून काहीतरी वाक्य गेल्याचे ती हवाई सुंदरी म्हणते आहे. हवाईसुंदरीची कहाणी फक्त लोकसत्ता व मटाच्या आंतरजाल आवृत्तीतच आहे. लोकसत्ताच्या छापील आवृत्तीत याचा उल्लेख नाही (मटाची छापील आवृत्ती वाचलेली नाही). मटा व लोकसत्ताचे शिवसेनाप्रेम सर्वश्रुत आहे. इतर वृत्तसंस्थांनी याची दखल घेतलेली नाही. दोन्ही ठिकाणी दिलेल्या बातमीत तफावत आहे. लोकसत्ताच्या बातमीत म्हटले आहे की गायकवाडांनी फक सँडल काढली होती. परंतु मटाच्या बातमीत म्हटले आहे की त्यांनी कर्मचार्‍याला सँडलने मारहाण करून विमानाच्या शिडीवरून ढकलून दिले होते. दोन्ही बातम्यात हवाईसुंदरीची ओळख लपविण्यात आली आहे. या प्रकरणात ओळख लपविण्याची अजिबात गरज नव्हती. तरीसुद्धा ओळख लपविण्यामागचा हेतू समजत नाही.
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
क
कुंदन Mon, 03/27/2017 - 18:52 नवीन
http://maharashtratimes.indiatimes.com/india-news/i-dont-think-he-wanted-to-throw-sukumar-down-the-ladder-he-was-trying-to-build-pressure-on-senior-officials-air-hostess/articleshow/57842144.cms दोघेही आधी शांतपणे बोलत होते पण अचानकपणे काहीतरी खटका उडाला. सुकुमार यांच्या तोंडून कदाचित चुकीचे शब्द निघाले आणि गायकवाड यांचा संताप अनावर झाला.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 03/27/2017 - 18:57 नवीन
एक अनसेन्सॉर्ड व्हिडिओ पाहिला तेव्हा गायकवाडांना उद्देशुन शिवीगाळही ऐकली आहे. जर शिवीगाळ ऐकुन किंवा परत परत तक्रारी करुन एअर इंडियाच्या लोकांनी हा प्रकार केला असेल तर लुंगीवाल्याला फोडला हेचं उत्तम. एअर इंडियाचा स्टाफ लोकांशी क्वचितचं नीट वागतो. बाकी विमानांमधल्या सुविधांबद्दल वेगळे सांगणे न लगे. अश्या परिस्थितीमधे जर का धडा शिकवण्यासाठी हे पाउल उचललं असेल तर उत्तम काम केलं गायकवाडांनी. मी शिवसैनिक अथवा शिवसेना भक्तं नाही.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ह
हतोळकरांचा प्रसाद Mon, 03/27/2017 - 19:26 नवीन
शंभर विडिओ दाखवा हो तुम्ही, काय फरक पडतो? स्वतःच्या तोंडाने फुशारक्या मारल्या ना गायकवाडांनी! मग आता परिस्थिती उलटी सिद्ध झाली तरी आम्ही मानणार नाही. बाकी ते ढिस्क्लेमर टाकल्याने काही होत नाही बरं!
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
ग
गुलाम Wed, 03/29/2017 - 09:12 नवीन
लोकसत्ताचे शिवसेनाप्रेम
कै च्या कै.. तण माजोरी.. हा अग्रलेख वाचा आणि मग काय ते मत बनवा..
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 03/29/2017 - 10:58 नवीन
हा अग्रलेख ३-४ दिवसांपूर्वीच वाचला होता. स्पष्ट शब्दात टीका न करता घोळवून घोळवून गुळमुळीत शब्द वापरून अग्रलेख लिहिलेला आहे. गायकवाडांविरूद्ध प्रतिक्रिया देणार्‍यांना प्रतिक्रियाखोर असे संबोधले आहे. लोकसत्ता आणि मटा या दोन वृत्तपत्रांचे शिवसेनाप्रेम अगदी सहज लक्षात येते. ही दोन वृत्तपत्रे रोज "सामना"चे अग्रलेख आपल्या आंतरजाल आवृत्तीत छापून "सामना"ची फुकट प्रसिद्धी करत असतात. "सामना"चे अग्रलेख म्हणजे लोकमान्य टिळकांनी लिहिलेले "केसरी"तील अग्रलेख आहेत किंवा आचार्य अत्र्यांनी लिहिलेले परखड अग्रलेख आहेत अशी यांची समजूत झालेली दिसते. अगदी आजच्या लोकसत्तात सुद्धा तुमचे गुंड तुम्हीच सांभाळा; शिवसेनेचा योगी आदित्यनाथांवर निशाणा असा मथळा देऊन "सामना"च्या अग्रलेखात काय छापले आहे हे "लोकसत्ता"त प्रसिद्ध केले आहे. मटाने देखील सामनाचा अग्रलेख छापला आहे. बरं, ते नुसते "सामना"चे अग्रलेख छापून थांबत नाहीत, तर त्याबरोबर "उद्धव ठाकरेंचा मोदींना सणसणीत टोला", "शिवसेनेकडून भाजपला घरचा आहेर", "उद्धव ठाकरेंचा फडणविसांवर जबरदस्त प्रहार", "शिवसेनेचा भाजपवर निशाणा", "शिवसेनेच्या टीकेने भाजप घायाळ", "शिवसेनेचा खोचक सवाल, "उद्धव यांची टोलेबाजी", "शिवसेनेचा भाजपला रोकडा सवाल" असे कौतुकोद्गारही असतात. मराठी माध्यमात या दोन संस्थांनी गेल्या २-३ वर्षांपासून हा नवीनच विचित्र प्रकार सुरू केला आहे. या दोघांचे शिवसेनाप्रेम इतके अनावर झाले आहे की आपल्या प्रतिस्पर्ध्याची फुकट प्रसिद्धी करेपर्यंत यांची मजल गेली आहे. हे दोघे फक्त "सामना"चेच अग्रलेख पुनर्मुद्रीत करतात. "सकाळ", "लोकमत", "पुढारी" इ. वृत्तपत्रांकडे हे दुर्लक्ष करतात. कारण उघड आहे. शिवसेना हा यांच्या हृदयातील मृदु कोपरा आहे.
↩ प्रतिसाद: गुलाम
त
तिमा Mon, 03/27/2017 - 09:09 नवीन
शिवसेना व भाजप हे सारखेच निर्लज्ज पक्ष आहेत. निर्ल्लज्ज्पणाच्या बाबतीत ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्याही पुढे गेले आहेत. ते चंद्रकांत पाटील (भाजप) म्हणत आहेत की नारायण राणे हे सर्वांना हवेहवेसे व्यक्तिमत्व आहे. समाजातला गाळच सगळा राजकीय पक्षांत गेलेला आहे. चांगली माणसे सापडणे, फार कठीण आहे.
स
संजय क्षीरसागर Mon, 03/27/2017 - 09:13 नवीन
डायरेक्ट गुरुजींशी पंगा ?
↩ प्रतिसाद: तिमा
म
मोदक Mon, 03/27/2017 - 11:11 नवीन
ते चंद्रकांत पाटील (भाजप) म्हणत आहेत की नारायण राणे हे सर्वांना हवेहवेसे व्यक्तिमत्व आहे. काहीही.. भाजपाला राजकीय आत्महत्या करायची इतकी घाई का करत आहेत ते कळत नाही
↩ प्रतिसाद: तिमा
श
श्रीगुरुजी Mon, 03/27/2017 - 13:37 नवीन
भाजप नारायण राणेंसारखा झगा स्वतःच्या गळ्यात बांधून घेईल असे वाटत नाही. नारायणे राणे मूळचे शिवसैनिक. शिवसेनेप्रमाणेच त्यांचं उपद्रवमूल्य प्रचंड आहे. अशा उपद्रवीला पक्षात घेऊन स्वत:च्या मार्गात खड्डा करण्याइतके फडणविस मूर्ख नाहीत. मोदी व फडणविस शतप्रतशत भाजप या विशिष्ट दिशेने काम करीत आहे. शिवसेनेची मुजोरी मोडून शिवसेनेला पूर्णपणे निष्प्रभ करून सोडायचे व शिवसेनेवरील किंवा इतर पक्षांवरील अवलंबित्व पूर्णपणे थांबवायचे हा त्यांचा अंतिम उद्देश आहे. परंतु चंद्रकांत पाटील, गडकरी, मुनगंटीवार इ. नेते मात्र इतर पक्षांशी जमवून घेण्याचा प्रयत्न करीत असतात. कधी गडकरी राज ठाकरेंना भेटतात, मुनगंटीवार मातोश्रीवर जाऊन कचकड्याचा वाघ भेट देतात, चंद्रकांत पाटील शिवसेनेशी जमवून घ्यायचा सल्ला देतात आणि नारायण राणेंना प्रमाणपत्र देतात. परंतु फडणविस मात्र यात न पडता पक्ष वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Mon, 03/27/2017 - 15:49 नवीन
भाजप नारायण राणेंसारखा झगा स्वतःच्या गळ्यात बांधून घेईल असे वाटत नाही. मुंडेंना हलवतील असेही वाटले नव्हते.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Tue, 03/28/2017 - 12:08 नवीन
चंद्रकांत पाटलांची सर्व वाक्ये न घेता फक्त एकच वाक्य घेऊन माध्यमे त्याचा कीस पाडत आहेत. चंद्रकांत पाटील असे म्हणाले होते की, "नारायण राणे शिवसेनेत परत जाणार अशा बातम्या येत आहेत. ते काँग्रेस सोडून भाजपत येणार अशाही बातम्या येत आहेत. परंतु, ते काँग्रेस अजिबात सोडणार नाहीत व ते काँग्रेसमध्येच राहतील असे काँग्रेसचे प्रवक्ते सांगत आहेत. एकंदरीत राणे हे सर्वांना हवेहवेसे वाटणारे व्यक्तिमत्व आहे.". यातील फक्त शेवटचे वाक्यच माध्यमांनी उचलले व राणेंना पक्षात घेण्यास भाजप उत्सुक आहे अशा कंड्या पिकवायला सुरूवात केली. जर त्याआधीची सर्व वाक्ये एकत्रित वाचली तर माध्यमांचा मूर्खपणा लक्षात येईल.
↩ प्रतिसाद: मोदक
ह
हतोळकरांचा प्रसाद Tue, 03/28/2017 - 16:58 नवीन
राणेंचा पक्ष सोडण्याचा कुठलाही विचार नसल्याचे निलेश राणेंनी आज स्पष्ट केले आहे. शिवाय माध्यमांनी हा खोडसाळपणा थांबवावा नाहीतर कायदेशीर कारवाई करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा